Aashay Kulkarni :  कलर्स मराठीवरील (Colors Marathi) 'सुख कळले' (Sukh Kalale) या मालिकेत माधवच्या आकस्मिक निधनाने मिथिला कोलमडलीये. पण आपल्या घराची आणि कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलल्याशिवाय गत्यंतर नाही,हे तिला माहिती आहे. अनेक आव्हानं आता तिच्यासमोर आहेत पण मिथिलाला आता खंबीर व्हावंच लागणार आहे.  एकीकडे आपल्या दुःखाचा सामना करत ती कौटुंबिक आणि आर्थिक जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी आता तिला घराबाहेर पडावं लागतंय. 


मिथिलाने 10 वर्ष गृहिणीची जबाबदारी सांभाळल्यानंतर आता  आयुष्याच्या या कसोटीच्या काळात पुन्हा नव्याने कामावर रूजू होण्यासाठी सज्ज होणार आहे.तर दुसरीकडे बाईने घरच सांभाळावं, तिनं कामासाठी बाहेर पडू नये, अशी विमल आत्याची विचारसरणी असल्याने मिथिलाला सगळ्या कसोट्यांवर परिस्थितींचा सामना करावा लागणार आहे.


सौमित्रच्या येण्याने मालिकेत नवा ट्विस्ट


'सुख कळले' मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये आपण पाहू शकता की ,सौमित्रच्या आगमनामुळे मालिकेत एक नवं वळण आलं आहे. सौमित्रचे साधेपण, मनमिळावू स्वभाव आणि मदतीची वृत्ती मिथिलाच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे दिसून येतंय. सौमित्रला कवितांची आवड आहे आणि त्याच्याकडे एक खेरपणा आहे, ज्यामुळे तो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतो.


कसं आहे सौमित्रचं पात्र?


 हसमुख, मदत करणारा आणि इतरांच्या भावना समजून घेणारा सौमित्रचा स्वभाव आहे. पैशापेक्षा संबंधांना अधिक महत्त्व देणाऱ्या सौमित्रच्या व्यक्तिमत्त्वामुळे कथा आणखी रंगतदार होईल. आशय कुलकर्णीने साकारलेली सौमित्रची भूमिका प्रेक्षकांचे मन जिंकण्यास यशस्वी ठरेल का हे पाहणं गरजेचं असणार आहे. 'सुख कळले' मालिकेत पुढे काय घडणार याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली आहे. सौमित्रच्या प्रवेशाने मालिकेत नवी उर्जा आणि नवे वळण आले असून अभिनेता आशय कुलकर्णीच्या एन्ट्री आता पुढे काय होणार हे पाहणं गरजेचं ठरेल.                                                                                                  






ही बातमी वाचा : 


Kill Movie Review : ट्रेनमधील रक्तरंजित खेळ, अॅक्शन,अॅक्शन आणि अॅक्शनच असलेला कील; वाचा रिव्ह्यू