Aditi Dravid : स्वप्नांची मायानगरी म्हणून ओळख असलेल्या मुंबईत स्वत:चं हक्काचं घरं असावं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. बाहेरुन आलेल्या प्रत्येकाला मुंबई सहज आपलंस करते. पण या शहरामध्ये आपलं म्हणावं असं हक्कचं छप्पर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. सामन्यांपासून ते अगदी मोठ मोठ्या उद्योगपतींपर्यंत हे स्वप्न इथे आलेला प्रत्येकजण त्या स्वप्नासाठी झटत असतो. कलाकार मंडळीही त्याला अपवाद नाहीत. अनेक कलाकार मंडळी अभिनयाच्या कास धरत मुंबईची वाट पकडतात आणि या शहराला आपलंसं करुन घेतात. अनेक कलाकार मंडळींनी आतापर्यंत मुंबईत हक्काचं घर घेतलं आहे तर अजूनही अनेकजण त्यासाठी झटत आहेत. अभिनेत्री अदिती द्रविड (Aditi Dravid) हिने देखील नुकतच मुंबईत तिच्या हक्कच्या घराचं स्वप्न पूर्ण केलं. त्यासाठी तिने सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. 


अदितीने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला होता. तिचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावर अनेकांनी कमेंट्स करत तिचं अभिनंदन देखील केलंय. त्यातच आता तिने तिच्या घराची नेमप्लेट शेअर केली आहे. त्यावर तिने घर घेण्यापर्यंतच संपूर्ण प्रवास मांडला आहे. तिच्या या पोस्टवरही अनेकांनी कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे. 


अदितीची पोस्ट नेमकी काय?


अदितीने म्हटलं की, '2015 ला पहिल्यांदा मुंबईत आले होते. त्यानंतर अनेक घरं बदलली. रेंट नी,रुम वर ,शेयरिंग मधे,roommates सोबत,सर्व काही! चांगले वाईट अनुभव घेत अभिनयचा प्रवास चालू होता! 2019 मध्ये एक शॉर्टफिल्म शूट करत होते. Covid चा काळ असल्याने तेव्हा रेंट च घर सोडलं होतं. एका दिवसात शूट संपणं अपेक्षित होतं म्हणून कुठेही सोय बघून ठेवली नव्हती. पॅकप होताना समजलं की अजून एक दिवस शूट वाढलं आहे! अणि कोणतीही alternative सोय करायचा आत दिग्दर्शक "PACKUP” म्हणले अणि एका क्षणात १०० लोकांनी गजबजलेला set, पूर्ण रिकामा झाला! बरीच रात्र झाली होती,काय करावं काही सुचेना! मला ऐनवेळी तिथे रेवती लिमये भेटली आणि अडचण कळताचक्षणी ती मला तिच्या घरी घेऊन गेली. पण ती पूर्ण रात्र झोप लागली नाही. विचार करत राहिले आणि स्वतःच घर घ्यायचं हे त्याच रात्री ठरवलं! त्यानंतर 4 वर्ष गेली,कष्ट आणि आई वडिलांच्या आशीर्वादानी आज Finally हे धडतयं! Still can’t believe it’s true! Thankful for everyone who stood by me in this journey!खरं म्हणतात, मुंबई सपनों का शेहेर हैं! And iam Falling in love with her all over again!' 






अदिती द्रविड ही मालिकांमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील तिच्या ईशा नावाच्या व्यक्तीरेखेला विशेष पसंती मिळाली होती. त्यानंतर ती सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतूनही प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. पण अदितीने केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा या सिनेमात मंगळागौरीचं गाणं लिहिलं, जे बरंच गाजलं. त्या गाण्यानेही अदितीला विशेष ओळख मिळवून दिली.  


ही बातमी वाचा : 


Divya Agarwal : घटस्फोटाच्या चर्चांवर दिव्या अग्रवालने अखेर सोडलं मौन, म्हणाली, 'प्रत्येक गोष्टीचा शेवट गोडच...'