Abhijeet Bhattacharya On Celebs: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पीओकेमध्ये घुसून 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. भारतीय सैन्याच्या या कृतीचा संपूर्ण देशाला अभिमान वाटत असताना, बॉलिवूड सेलिब्रिटींनी मात्र, यावर मौन बाळगले आहे. त्याचवेळी, ज्येष्ठ गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी एका मुलाखतीत बॉलिवूडमधील मोठ्या स्टार्सचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे आणि ते म्हणाले की, 'ते पान मसाला विकतील पण पाकिस्तानविरुद्ध काहीही बोलणार नाहीत'.


एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत भट्टाचार्य म्हणाले, "पाकिस्तानी कलाकार आपल्यापेक्षा जास्त नेशनलिस्ट आहेत. ते आजही आपल्याविरुद्ध आवाज उठवत आहेत. आम्ही त्यांना मोठं केलं. आम्ही त्याला पैसे दिले. आम्ही त्यांना शहरत असे नाव दिले आणि फक्त स्थानिक लोकच त्यांना ओळखतात. जगभर त्यांची ओळख व्हावी यासाठी ते लोक आपल्याविरुद्ध बोलत आहेत. कारण ते त्यांच्या स्वभावातच आहे, असंही ते पुढे म्हणालेत.


पान मसाला विकणारे स्टार्स पाकिस्तानविरुद्ध बोलणार नाहीत


अभिजीत भट्टाचार्य यांनी बॉलीवूड स्टार्सना पुढे प्रश्न विचारला आणि म्हणाला, "इथे शांतता आहे आणि आपण काय करत आहोत? आपण स्वतःविरुद्धही बोलत आहोत." एकतर आपण बोलत आहोत किंवा अजिबात बोलत नाही आहोत. शांतता बाळगण्यात आली. ते गुटखा विकणार ते पाकिटे विकतील पण 'पाकिस्तान, आम्ही तुला नष्ट करू', हे त्यांच्या तोंडून कधीच निघणार नाही, असंही अभिजीत भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे. अभिजीत भट्टाचार्य पुढे म्हणाले की, "पाकिस्तान हा शब्द तोंडातून निघणार नाही. चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्रींची तरुण पिढी कदाचित याबद्दल अधिक चिंतित असेल कारण त्यांना वाटते की पाकिस्तानमध्ये त्यांचे चाहते खूप मोठे आहेत."