पवार पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांची दैना झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. कारखाने आजारी पडले आहेत. मंदीचे संकट आलेले आहे. लोकांची रोजीरोटी जातेय. आज ही सगळी संकट आज महाराष्ट्रात आली आहेत त्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्याची धमक भाजपमध्ये नाही, असे पवार म्हणाले. प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आहे त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याची पावले टाकली ते लोकांना पसंत नाही असेही पवार म्हणाले.
दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ऑफिस आहे. कॉंग्रेसचं कधी राज्य आलं तर कधी पराभव झाला. असे अनेक चढउतार पाहिलेल्या कॉंग्रेसच्या कार्यालयावर धाड घालत चार लोकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु आहे. निवडणूक सुरु असताना असा प्रकार घडणं योग्य नाही. मलाही त्रास देण्याचा प्रयत्न झाला असे ते म्हणाले.
ही काय राज्य चालवायची पद्धत आहे. कोण कुणाच्या ओळखीचा आहे एवढ्या मुद्दयावर तुम्ही गुन्हा दाखल करता. सत्ता आल्यावर पाय जमिनीवर ठेवायचे असतात आणि डोकं जाग्यावर ठेवायचं असतं असा सल्ला शरद पवार यांनी भाजप सरकारला दिला.