मुंबई : लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. निकालाआधीच राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे वाहू लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




राज्यातील विधानसभा निवडणुकीआधी काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचा अनुमान वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर पक्षात आलेल्या काही 'आयाराम' नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची चिन्हं आहेत.

लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपला अनुकूल लागल्यास राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो. त्यानंतर या दिग्गज नेत्यांना महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तर जयदत्त क्षीरसागर यांनाही शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

Vikhe family disputes | विखे कुटुंबातील लढाई पुन्हा रस्त्यावर | अहमदनगर 



राधाकृष्ण विखे पाटील दोन नंबरच्या मंत्रिपदाची म्हणजेच महसूल खात्याची मागणी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून महसूल खातं काढून विखेंना मिळण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जातं. मात्र पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर रिक्त असलेलं आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे अतिरिक्त भार असलेलं कृषी खातं विखेंना मिळण्याची दाट शक्यता आहे.
कोणतं दाबायचं? मतदानासाठी आलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या सवालाने हास्यकल्लोळ

दुसरीकडे, मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अहमदनगर आणि मराठवाड्यात संघटनेला बळकटी देण्यासाठी आणि पक्ष विस्तारीकरणासाठी मंत्रिपद देणार असल्याची चर्चा आहे.

त्याआधी 21 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या निवडणूक आढावा बैठकीत लोकसभा निवडणुकीत डावलल्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न होणार आहेत.
सुजयने राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी असं राहुल गांधींनी सुचवलं, हे धक्कादायक : राधाकृष्ण विखे पाटील


राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर?


सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवायची इच्छा होती. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीच्या कोट्यातील ही जागा मागितली. मात्र राष्ट्रवादीने ही जागा बदलून देण्यास नकार दिल्याने सुजय विखेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला होता. भाजपने सुजय विखेंना तिकीट दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांचा उघड प्रचारही केला होता.

जयदत्त क्षीरसागरांचं बंडाचं निशाण

याआधी जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी विरोधात बंड करत भाजपच्या लोकसभेसाठीच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून राष्ट्रवादीत नाराज असलेल्या क्षीरसागर यांनी बीडमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेत प्रीतम मुंडेंना पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. क्षीरसागरांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चाही रंगल्या होत्या.