Eknath Khadse on Exit Poll : एक्झिट पोलचा (Exit Poll) निकाल पाहता 350 च्या वर जागा मिळतील अशी चिन्हे असल्याचे वक्तव्य माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं. राज्यात फोडाफोडीचे राजकारण आणि शेतकऱ्यांच्या समस्या पाहता जनतेला हे फारसे रुचलेल दिसत नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं काही जागा कमी झाल्याचं चित्र दिसतय. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकसाठी महायुतीनं आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे खडसे म्हणाले.


 साडेतीनशे जागांचा टप्पा पार होईल असा विश्वास 


लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात एबीपी माझा आणि सी व्होटर्सचे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहेत. या संदर्भात राज्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काही विकासकामं केली आहेत, ते पाहता जनतेने त्यांना पुन्हा एकदा पाठींबा दिल्याचं पाहायला मिळत असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. चारशे पार होईल अशी आपल्याला अपेक्षा नव्हती. मात्र साडेतीनशे पार होईल हा विश्वास होता. पोलचां निकाल पाहता साडेतीनशे वर जागा मिळतील अशी चिन्हे आहेत असंही खडसे म्हणाले.


विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं आत्मचिंतन करावं


राज्यात मात्र फोडाफोडीचे राजकारण आणि शेतकऱ्यांच्या समस्या पाहता जनतेला हे फारसे रुचलेल दिसत नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं काही जागा कमी झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. 


रक्षा खडसे निवडूण येतील


घरातील महिलांनी तुतारीचा प्रचार केला असला तरी कमळाला मतदान केल्याचे रक्षा खडसे यांनी वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचे एकनाथ खडसे यांनी खंडन केले आहे. रोहिणी खडसे यांनी उन्हा तन्हात फिरुन त्यांनी त्यांच्या पक्षासाठी काम केले आहे. त्यामुळं लोक त्यांच्या पक्षाला मतदान करणार हे निश्चित असल्याचे खडसे म्हणाले. त्यामुळं रक्षा खडसे यांच्या मताशी आपण सहमत नसल्याचे खडसे यांनी म्हटलं आहे. रक्षा खडसे चांगल्या मतांनी निवडूण येतील असेही खडसे म्हणाले. 


निवडणूक निकालानंतर लवकरच भाजप प्रवेश होणार 


निवडणूक निकालानंतर आपला लवकरच भाजप प्रवेश होणार असल्याची माहितीही एकनाथ खडसे यांनी दिली आहे. दरम्यान, काल एबीपी सी व्होटरचे एक्झिट पोल हाती आले आहेत, या पोलनुसार रक्षा खडसे आघाडीवर असल्याचा अंदाज सांगण्यात आला आहे. मात्र, राज्यात महायुतीला फटका बसणार असल्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजप राज्यात मोठा भाऊ शटरणार आहे. मात्र, पाच ते सहा जागी भाजप देखील पराभूत होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज आहे. शिवसेना शिंदे गटाच्याही पाच ते सहा जागा पराभूत होण्याची शक्यता आहे.  


महत्वाच्या बातम्या:


Rohini Khadse : सुनेच्या जबाबदारीपोटी एकनाथ खडसे यांनी वेगळा निर्णय घेतला; भाजप पक्ष प्रवेशाबद्दल रोहिणी खडसे यांचे रोखठोक मत