दिसपूर: आसाममध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. 126 जागा असलेल्या विधानसभेसाठी सुरु असलेल्या मतमोजणीमध्ये भाजप आणि मित्रपक्षांनी 75 जागांवर आघाडी घेऊन बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे तर विरोधी पक्ष काँग्रेस 42 जागांवर आघाडीवर आहे. 


सुरुवातीच्या कलांनुसार एनडीएचे मुख्यमंत्री असलेले सर्वानंद सोनोवाल हे आपली सत्ता कायम ठेवतील असं दिसतंय. आम्हाला जनतेने आशीर्वाद दिला असून आम्हीच सरकार बनवणार हे स्पष्ट आहे असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


 






आसाममध्ये 2016 च्या विधानसभा निवडणुकीत युपीएला 26 आणि एनडीएला  86 जागा मिळाल्या होत्या. इतर पक्षांना 14 जागा मिळाल्या होत्या. 


आसामला 27 मार्च, 1 एप्रिल आणि 6 एप्रिल असे तीन टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. आसाममध्ये एनडीए आणि यूपीएमध्ये लढत होती. कॉंग्रेस येथे महाआघाडी  करून उतरली होती. एआईयूडीएफ, बीपीएफ, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (माले), आंचलिक गण मोर्चा (एजीएम), आरजेडी, आदिवासी नॅशनल पार्टी (एएनपी) आणि जिमोचयन (देओरी) पीपुल्स पार्टी (जेपीपी)  सोबत होते.