पंकजा मुंडे म्हणाल्या की, "गोपीनाथ मुंडेंनी ज्यांना राजकारणातून हद्दपार केलं होतं, त्याच लोकांनी उद्या परळीत परिवर्तन सभेचा समारोप ठेवला आहे. खरंतर त्यांच्या परळीतील नेत्याने यात्रेचा शुभारंभ परळीतून करायला हवा होता, परंतु समारोप ठेवला आहे. त्याच दिवशी आम्ही इथे येणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसह त्यांच्या पक्षाचाच समारोप केल्याशिवाय राहणार नाही."
तसंच राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे 70 वर्षाचं खरकटं आम्ही काढलं, खंडणीखोर आणि गुन्हेगारी मुंडें साहेबांनी संपवली. आता राष्ट्रवादीने फक्त कार्यकर्ते पोसले आणि आता यात्रा काढत आहेत. गळे काढणारे काय हल्ला करणार असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीका केली. तसंच परळीत राष्ट्रवादीचे लोक पार्टी देऊन निवडून येतात, असंही त्या म्हणाल्या.