Election Results Live Update
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्ये अद्याप कोणत्याही पक्षाला बहुमात मिळालेले नाही, तरिही काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा, आज रात्री भेटण्यासाठी राज्यपालांकडे वेळ मागितली. तेलंगणा : तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) 88 जागा जिंकत सत्ता कायम राखली आहे. त्याचबरोबर काँग्रेसने 19 जागा, एमआयएमने 7, टीडीएसने 2, ऑल इंडिया फॉरर्वड ब्लॉकने 1 आणि अपक्ष उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे. मिझोरम : मिझो नॅशनल फ्रंटला (MNF) 26 जांगासह स्पष्ट बहुमत मिळालं आहे. काँग्रेसला 5 जागांवर आणि भाजपवला एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. तर 8 अपक्ष उमेदवार याठिकाणी निवडून आले आहेत. राजस्थान : राजस्थानच्या वसुंधरा राजे शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राजस्थान : सत्ता स्थापनेबाबत बोलण्यासाठी आम्ही राज्यापालांकडे भेटण्याची वेळ मागितली आहे. त्यांनी उद्या भेटण्याची वेळ दिली आहे - राजस्थान कांग्रेसचे जनरल सेक्रेटरी सुशील शर्मा राजस्थान , छत्तीसगड, मध्य प्रदेश : विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अभिनंदन केलं. तेलंगणा, मिझोरम : तेलंगणात जिंकलेल्या केसीआर गारु आणि मिझोरममध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या एमएनएफचंही अभिनंदन मोदींनी केले मध्य प्रदेश : खूप कमी मतांच्या फरकामुळे मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर उमेदवार आक्षेप घेत आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशमधील अंतिम निकालास उशीर होत आहे. मध्य प्रदेश : मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस पुन्हा आघाडीवर मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस भाजपची रस्सीखेच सुरुच, भाजप एका जागेने आघाडीवर आहे. राजस्थान , मध्य प्रदेश : राजस्थानमध्ये तब्बल 11 मंत्री पराभूत, तर मध्य प्रदेशमध्ये 12 मंत्री पिछाडीवर राजस्थान : राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाचे नाव उद्या जाहीर होणार मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी आमच्या सोबत असल्याने आम्ही सत्ता स्थापन करणार : काँग्रेस खासदार राजीव सातव राजस्थान : राजस्थानमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने, मुख्यमंत्रीपदासाठी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे या दोघांची नावे चर्चेत देशातील जनता भाजपला मतदान करणार नाही : राज ठाकरे देशाला राम राज्याची गरज आहे, राम मंदिराची नाही : राज ठाकरे मोदी सरकारची उलटी गिनती सुर झाली आहे : अरविंद केजरीवाल छत्तीसगडमधील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारणार : रमणसिंग मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदासाठी कमलनाथ यांचं तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत यांचं नाव चर्चेत पाच राज्यातले निकाल पाहता शिवसेना अाणि भाजप स्वतंत्र निवडणूक लढण्याची हिंमत करणार नाही, आजपासूनच ते हनिमूनची तयारी करतील : जितेंद्र आव्हाड मध्य प्रदेशात बहुमत जमवण्याची जबाबदारी दिग्विजय सिंह यांच्याकडे : सूत्र मोदींचा प्रभाव संपला हे सिद्ध, धनशक्तीवर जनशक्तीचा विजय, 2019 लोकसभा निवडणुकांत देशात काँग्रेसचीच सत्ता, मोदी जातील आणि राहुल गांधी येतील : अशोक चव्हाण दुपारी तीन वाजेपर्यंत NOTA ची आकडेवारी छत्तीसगड : 1 लाख 33 (2.2 टक्के) मतं NOTA ला राजस्थान : 3 लाख 31 हजार मतदारांची (1.5 टक्के) पसंती NOTA ला मध्य प्रदेश : 2 लाख 42 हजार (1.5 टक्के) मतं NOTA ला तेलंगणा : 1 लाख 69 हजार (1.1 टक्के) मतं NOTA ला मिझोरम : 2 हजार 785 (0.5 टक्के) मतं NOTA ला 'करो राजतिलक की तयारी , आ रहे है नितीन गडकरी' भाजपच्या गोटातून सोशल मीडीयावर मेसेज व्हायरल मध्य प्रदेश : दोलायमान स्थिती कायम; भाजप 113, काँग्रेस 107, इतर 10 "करो राजतिलक की तैयारी, आ रहें हैं नितीन गडकरी," सोशल मीडियावर मेसेज व्हायरल राजस्थान : काँग्रेस बहुमताजवळ, अशोक गहलोत यांच्याकडून चहाचं वाटपलोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्याच्या वर्षपूर्तीलाच त्यांना मोठं गिफ्ट मिळालं आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना काँग्रेसने मोठा हादरा दिला. सतत पाच वर्षांनी सत्तापालटाचा राजस्थानचा ट्रेण्ड कायम राहिला आहे. राजस्थानमध्ये भाजपने कडवी झुंज दिली असली, तरी काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांचं सरकार काँग्रेसने केवळ खालसाच केलं नाही, तर भाजपचा सुपडासाफ झाला. मध्य प्रदेशात मात्र भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये कांटे की टक्कर रंगली. तेलंगणामध्ये टीएसआरच्या के चंद्रशेखर राव यांना आपला गड राखण्यात यश आलं आहे. मिझोरममध्ये सत्तापालट झाले असून तीन मोठ्या राज्यात मोठी आघाडी मिळवणाऱ्या काँग्रेसने आपल्या हातून मिझोरमची सत्ता गमावली आहे. मिझोरम नॅशनल फ्रन्टने मिझोरममध्ये सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिलेल्या 8 हजार 500 उमेदवारांचं भविष्य ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स)मध्ये बंद झालं होतं. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली.