Nagpur Crime News : किरकोळ वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या; नागपुरातील दोन वेगवेगळ्या हत्येच्या घटना, उपराजधानी हादरली!
Nagpur Crime News : राज्याची उपराजधानी नागपूरात काल (19 फेब्रुवारी) रात्री दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची हत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.

Nagpur Crime News : राज्याची उपराजधानी नागपूरात काल (19 फेब्रुवारी) रात्री दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची हत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील पहिल्या घटनेत शहरातील यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विहांग रंगारी या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाची लग्न समारंभाच्या हॉल बाहेर हत्या करण्यात आली आहे. विहांग रंगारीच्या मित्राच्या बहिणीचा लग्न सुरू असताना बिरजू वाढवे आणि लखन वाढवे हे दोन गुंड प्रवृत्तीचे आरोपी लग्नाच्या ठिकाणावर येऊन गोंधळ घालत होते. नवरी मुलीच्या भावाने त्यांची समजूत काढून त्यांना तिथून बाहेर काढले. त्यानंतर बाहेरही दोघे गोंधळ घालत असताना विहांगने मित्राच्या बहिणीचा लग्न सुरू असताना त्या ठिकाणी होणारा गोंधळ पाहून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. आणि बिरजू आणि लखन यांना समजूत घातली. त्याचाच राग धरून बिरजू आणि लखन वाढवे या दोन्ही भावांनी विहांग रंगारीची चाकूने भोसकून लग्न समारंभाच्या हॉल बाहेर हत्या केली.
दोनच दिवसापूर्वी तुरुंगातून सुटका, मित्रांना भेटाला, अन्....
तर दुसरी घटना नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रामबाग परिसरात घडली आहे. यात दीपक उर्फ सोनू वासनिक नावाच्या गुंडाची त्याचाच मित्र असलेल्या आकाश मेश्रामने दगडाने ठेचून हत्या केली आहे. दीपक उर्फ सोनू वासनिक सराईत गुंड होता. त्याच्या विरोधात वर्धामध्ये 70 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते. दोनच दिवसापूर्वी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर दीपक नागपुरात आपल्या मित्रांना भेटायला आला होता. यात मद्यपान केल्यानंतर क्षणिक शाब्दिक वाद होऊन हत्येची ही घटना घडल्याची माहिती आहे.
दरम्यान नागपुरात घडलेल्या सलग दोन हत्येच्या घटनेने शहर पुन्हा एकदा हादरले आहे. या दोन्ही घटनांचा तपास पोलीस करत असून मारेकऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र या हत्येच्या घटनेने शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा
























