Dewas Fake Marriage Fraud: मध्य प्रदेशातील (MP Crime) देवास जिल्ह्यात विवाह फसवणुकीचे एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. यात एक-दोन नव्हे, तर तब्बल 42 तरुणांना लग्नाचे स्वप्न दाखवून लाखो रुपयांना फसवण्यात (Fake Marriage Fraud Case) आले. हे सर्व तरुण डोक्यावर फेटे घालून आपल्या वऱ्हाडी मंडळींसोबत देवासमधील क्लबच्या मैदानावर आले, पण तासांतास वाट पाहिल्यानंतरही ना वधू आली, ना तिचे कुटुंबीय. जेव्हा सत्य उघडकीस आले, तेव्हा घटनास्थळी घडलेलासंपूर्णप्रकारउजेडातआलाआणिएकच गोंधळ उडाला. दरम्यानयाफसवणुकीविरोधात पीडित नवरदेवांनी आता न्यायासाठी पोलिसांकडे धावघेतली आहे. मात्रयाघटनेनंसर्वत्रमोठीखळबळउडालीआहे. (MP Dewas Fake Marriage Fraud Crime case)

Continues below advertisement

Dewas Fake Marriage Fraud Case : अनाथाश्रमातील मुलींसाठी सामूहिक विवाह; प्रत्येक तरुणाकडून 15,000 ते 25,000 रुपये 

मिळालेल्या माहितीनुसार, देवास आणि आसपासच्या जिल्ह्यांतील 42 तरुणांची लग्नाच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली. असा आरोप आहे की, विदिशामधील एका तरुणाने मध्यस्थ असल्याचे भासवून, इंदूरमधील एका अनाथाश्रमातील मुलींसाठी सामूहिक विवाह आयोजित करण्याचे आश्वासन दिले. त्या बदल्यात, प्रत्येक तरुणाकडून 15,000 ते 25,000 रुपये आकारले जात होते. विवाह निश्चित झाल्यावर, त्या तरुणांना त्यांच्या मोबाईल फोनवर मुलींचे फोटो दाखवून, त्यांचे विवाह निश्चित झाले आहेत, असे पटवून देण्यात आले.

Continues below advertisement

MP Dewas Marriage Fraud Case : अनाथाश्रमातील मुलींच्या लग्नाची फसवणूक

मिळालेल्या माहितीनुसार, ठरल्याप्रमाणे सर्व तरुण नवरदेवाच्या वेशात सकाळी लवकर क्लबच्या मैदानावर पोहोचले. लग्नाची तयारीही करण्यात आली. मात्र, जसजसा वेळ गेला, तसतशा वधू कुठेच दिसल्या नाहीत. रात्री उशिरापर्यंत कोणीही न आल्याने, त्या तरुणांच्या लक्षात आले की त्यांची फसवणूक झाली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नवरदेवांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठा गदारोळ केला.

दरम्यान, पीडितांचा आरोप आहे की, लग्नाच्या नावाखाली त्यांच्या भावनांशी खेळ केला गेला आणि लाखो रुपये उकळण्यात आले. लग्नाच्या आशेने अनेक तरुणांनी पैसे उधार घेतले होते. पीडितांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली.

Marriage Fraud Case : लग्नाच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक

देवास बीएनपी पोलीस स्टेशनच्या प्रभारी प्रीती कटारे यांनी सांगितले की, हे प्रकरण लग्नाच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीचे आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत. ज्या अनाथाश्रमाच्या नावाखाली तरुणांची फसवणूक झाली, त्या अनाथाश्रमाच्या चालकांचीही पोलीस चौकशी करणार आहेत. सध्या हे प्रकरण संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनले आहे. लोकांचे म्हणणे आहे की, लग्नासारख्या पवित्र नात्याच्या नावाखाली होणारी अशी फसवणूक अत्यंत लज्जास्पद आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असा पोलिसांचा दावा आहे.

इतरमहत्वाच्याबातम्या