Live Blog Updates:मोठी बातमी! नरहरी झिरवळ यांना राष्ट्रवादी पक्षाकडून अभय
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...

पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: आखाती देशात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज भारतात महत्त्वाची बैठक होणार आहे. आज नैसर्गिक आणि पेट्रोलियम गॅससंदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)...More
अनु मलिक यांच्यां विरोधात महिलांनी तक्रार केली होती, त्यावेळी रुपाली चाकणकर यांनी अनु मलिक याना क्लिन चिट दिली होती,
त्यात सोहम चाकणकर याला अनु मलिक च्या फिल्म मध्ये काम मिळले होते
सोहम हा रुपाली चाकणकर यांचा मुलगा आहे - सुषमा अंधारे
ज्यांनी ट्विट केले त्याच्या विरोधात ही खोलवर खोदकाम करणार
मुख्यमंत्री यांनी फ्री हॅन्ड दिले आहे
पुढे काय होणार बघितले पाहिजे
मुख्यमंत्री यांनी मित्र पक्षातील लोकांना चेकमेट करायचे आहे एवढेच थांबू नये
फलटण प्रकरणात आम्ही अजूनही जामीन नाही - सुषमा अंधारे,
केसरकर आणि चाकणकर याचे फोन रेकॉर्ड अर्थिक खाते चेक करा
आर्थिक गुन्हे शाखेला भेटणार आहे
चौधरी जे तटकरे सोबत अनेक व्यवहारत ते कोकणात चाकणकर यांच्यां सोबत आहेत
साडेचारशे पाचशे कोटीचा प्रोजेक्ट आहे, येवडी ताकद येते कुठून : सुषमा अंधारे
लॉकडाऊन लागणार नाही. लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल. सर्वांना स्पष्ट सांगतो, अफवा पसरवू नका नाही तर फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मोठी बातमी-
नरहरी झिरवळ यांना राष्ट्रवादी पक्षाकडून अभय
कथीत व्हिडीओ प्रकरणात नरहरी झिरवळ यांना राजीनामा घेतला जाणार नाही
दरवेळी आरोप झाले की राजीनामा घ्यावा हे काही योग्य नाही पक्षातील वरिष्ठांची भुमिका
त्यामुळे व्हिडीओ प्रकरणात नरहरी झिरवाळ यांचा राजीनामा घेतला जाणार नाही- सुत्रांची माहिती.
वनराणी’ मिनी टॉय ट्रेन पुन्हा बंद, पर्यटकांचा हिरमोड
नवीन ट्रेन बंद झाल्यामुळे पर्यटकांमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासना विरोधात मोठी नाराजी
गुजरात अहमदाबाद मधून नवीन ट्रेन मागवण्यात आली होती
नवीन ट्रेन बंद पडल्यामुळे ट्रेन बनवणारी कंपनीचा कामावर देखील प्रश्न चिन्ह निर्माण केली जात आहे
* बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘वनराणी’ मिनी टॉय ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड
* इंजिनमध्ये समस्या निर्माण झाल्याने सेवा तीन दिवसांपासून तात्पुरती बंद
* वनराणीची सफर करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना परत जावे लागत असल्याने नाराजी
* शुक्रवारपासून सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता – उद्यान प्रशासनाची माहिती
* मे 2021 मध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे वनराणी सेवा बंद झाली होती
* 6 जानेवारी 2026 पासून पुन्हा पर्यटकांसाठी सुरू
* 14 मार्च रोजी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन
* आता डिझेलऐवजी बॅटरीवर धावणारी वनराणी
* जानेवारीपासून आतापर्यंत 40 ते 50 हजार पर्यटकांनी घेतला वनराणीचा आनंद
* 1974 पासून राष्ट्रीय उद्यानातील प्रमुख आकर्षण म्हणून वनराणीची ओळख
स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना फसवणारे बंटी बबली जेरबंद
ओळख लपवण्यासाठी ९ मोबाईल आणि १२ सिम कार्डचा केला वापर
‘प्रति तोळा ६० हजार... मेकिंग चार्ज नाही', अशी बतावणी करून लुटले करोडो रुपये
कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या दांपत्याला पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक
अटक होण्यापूर्वी देशातील विविध राज्यात केली भ्रमंती
हेमंत दत्तात्रेय खरोटे आणि रूपाली हेमंत खरोटे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे
आयआरएस सचिन मोटे प्रकरणातील डीडीएसआरच्या अडचणी वाढणार
कोकण विभागीय आयुक्तांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे चौकशीचे आदेश
गोपीचंद पडळकर यांच्या मागणी नंतर मंत्री बावनकुळे यांचे निर्देश
डीडीएसआरने गौण खनिज उत्खननात शासनाची रॉयल्टी बुडवल्याचा पडळकरांचा आरोप
डीडीएसआरच्या चौकशीसाठी तात्काळ टीम पाठवण्याचे मंत्री बावनकुळेंचे आदेश
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निवेदनानंतर बावनकुळेंचे आदेश
ठाणे जिल्ह्यातील गौण खनिज उत्खनन प्रकरणी होणार चौकशी
प्लॉट क्रमांक २२ ते २६ मधील उत्खननाची स्वतंत्र चौकशी केली जाणार
याआधीच फसवणूक प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून सह पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशीचे आदेश
डीडीएसआर व आयआरएस सचिन मोटे यांच्या भोवती कारवाईचा आवळता फास
Beed News : बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावर काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली. खडीने भरलेल्या भरधाव हायवाने कारला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे कारने अचानक पेट घेतला आणि त्यामध्ये असलेल्या आई आणि मुलाला बाहेर पडता न आल्याने होरपळून जागीच मृत्यू झाला. केज तालुक्यातील साळेगाव येथील रहिवासी असलेले हे दोघेजण कारमधून बीडच्या दिशेने जात होते. याच वेळी बीडकडून डोईठाणकडे खडी घेऊन जाणाऱ्या एका भरधाव हायवाने कापशी गावाजवळ कारला समोरून जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारच्या इंजिनने तात्काळ पेट घेतला.
मदत मिळेपर्यंत होत्याचे नव्हते झाले: कारने पेट घेतल्याने आत असलेल्या आई - मुलाला दरवाजा उघडून बाहेर पडता आले नाही. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले आणि मदतीसाठी लोक धावण्यापूर्वीच दोघांचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे महामार्गावर मोठी गर्दी झाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे.
नाशिकच्या जेलरोड परिसरातील शिवाजीनगर भागात एका महिलेची नोकरीच आमिष दाखवून फसवणूक करून तिलाच बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. शिवाजीनगर परिसरातील 32 वर्षीय महिलेला नोकरी लावून देण्याचे खोटे आमिष दाखवणाऱ्या आलं. संशयितांनी महिलेकडून एक लाख रुपये उकळले. मात्र मार्च महिना संपत आल्याने घरगुती गरजांसाठी महिलेने आपले पैसे परत मागितले असता संशयितांनी पैशांऐवजी महिलेला बेदम मारहाण करत थेट जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पीडित महिलेने दिलीय.
Beed News : बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील एका गावातील अवघ्या 2 वर्षाच्या मुलीचा 17 मार्च रोजी पाण्याच्या हौदात बुडून मृत्यू झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते यावेळी तपासणी करत असताना तिच्यावर अत्याचार झाल्याचे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले.परंतु कुटुंबीयांना याबाबत कोणतीही माहिती नव्हती यानंतर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक बाब समोर आली. एका 15 वर्षीय मुलाने इंटरनेटवरील अश्लील व्हिडिओ पाहून या मुलीला आपल्या घरी नेत अत्याचार केल्याची तपासात समोर आले.यानंतर आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पिंक पथकाचे अधिकारी करत आहेत.
मुंबईच्या माजी महापौर आणि नगरसेविका श्रद्धा जाधव यांचे पती उद्योजक श्रीधर जाधव यांचे निधन...
श्रीधर जाधव यांचे मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन
श्रीधर जाधव यांच्यावर आज दुपारी होणार अंत्यसंस्कार...
उद्धव ठाकरे दुपारी दीड वाजता अंत्य दर्शनासाठी जातील
लॉकडाउनबाबत पसरत असलेल्या अफवा पूर्णपणे चुकीच्या आहेत.
सरकारच्या पातळीवर असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही.
पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सरकार देशात इंधन, ऊर्जा आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहील, यासाठी प्रयत्नशील आहे.
प्रत्येक संभाव्य आव्हानाला तोंड देण्यासाठी आपण पूर्णपणे सज्ज आहोत.
भारताने यापूर्वीही जागतिक अनिश्चिततेच्या काळात आपली ताकद सिद्ध केली आहे, आणि यापुढेही आपण योग्यवेळी, सक्रियपणे आणि समन्वयाने पावले उचलत राहू.
हरदीप सिंग पुरी यांची एक्स पोस्ट
पुण्यात सासरच्या छळला कंटाळून एका तरुणाने केली आत्महत्या
एक वर्षापूर्वी झाल होत त्याच लग्न
पती आणि पत्नी मध्ये सातत्याने किरकोळ भांडण व्हायची मात्र त्याला सासरचे मंडळी त्रास देत असत
या मानसिक त्रासाला कंटाळून शेवटी त्याने उंदीर मारण्याच औषध पिवून आत्महत्या केली आहे
महंमद साद एस या तरुणाच नाव आहे त्याने वीडियो बनवून मित्राला पाठवला आणि आत्महत्या केली
पुण्यात भूमिगत मेट्रो नवे नियम
बोअरवेल खोदताना झालेल्या गळती नंतर प्रशासनाचा मोठा निर्णय
शुक्रवार पेठ परिसरात बोअरवेल खोदताना खाली असलेल्या मेट्रो मार्गला झाले होते नुकसान
यामुळे पाण्याची गळती झाली होती
यावर मेट्रो प्रशासनाकडून तातडीने दुरुस्ती करण्यात आली
मात्र आता पुणे महापालिका आयुक्त यांनी गंभीर दखल घेतली असून बोअर वेल खोदताना आता स्वतंत्र परवानगी घ्यावी लागणार आहे
भोंदू अशोक खरातची नवीन मोडस ऑप्रेंडी समोर....
येणाऱ्या भोळ्या भाबड्या ग्राहकांची आधीच मिळवत असल्याचा पोलिसांना संशय
ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी खरात स्वतंत्र यंत्रणा राबवित असल्याचा संशय
नातेवाईक कोण, जवळचे मित्र कोण शत्रू कोण जीवनातील काही चढ उतार याबाबतीत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा पोलिसांचा अंदाज
भेटीच्या पहिल्या ५ मिनिटांत अचूक माहिती सांगून विश्वास करत होता संपादन...
कोल्ड रीडिंग व हॉट रीडिंग तंत्रांचा करायचा वापर
हॉट रीडिंगमध्ये आधीच माहिती गोळा करून ठेवली जाते
तर कोल्ड रिडिंगमध्ये पाहिले काही प्रश्न विचारून त्यावरून अंदाज लावत समोरच्याला भ्रमित केलं जात
मानसशास्त्र आणि फेस रीडिंगचा प्रभावी उपयोग..
बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाईच्या अफवांमुळे ठिकठिकाणवरील पंपावर इंधनासाठी ग्राहकांनी गर्दी केली असल्याच बघायला मिळत आहे .. तर चिखली येथील एका पंपावर ग्राहकाने चक्क 200 लिटरची पाण्याची टाकी विकत घेऊन पंपावर आला आणि टाकी भरून डीझेल ही घेऊन गेला असल्याचा प्रकार घडला .. तर इतर ही ग्राहक पंपावर मिळेल ती भांडी, प्लास्टिकचे डब्बे घेऊन रांगेत लागलेले दिसले .. दुसरीकडे मात्र जिल्हाधिकारी यांनी इंधन साठ्यावर कडक निर्बंध आणले असले तरीही पंप चालकाकडून त्याचे पालन होत नसल्याचे दिसत आहे .. आता प्रशासना काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.
भोंदू बाबा अशोक खरातबाबत आणखी एक खुलासा
अपघात आणि अर्धांग वायूच्या झटक्यांन खरात झाला होता बेजार
- दीड वर्षांपूर्वी खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती
- उत्तेजक (शक्तिवर्धक) औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडल्याचा संशय
- शहरातील खासगी रुग्णालयात करण्यात आले होते उपचार
- डॉक्टर भक्ताने वेळीच उपचार करून वाचवला जीव
- आजही एका हाताची हालचाल मर्यादित, भुवईत बदल दिसून येत असल्याची माहिती
- उत्तेजक औषध घेणं बेतलं असते जीवावर
- तपासातून महत्त्वाची वैद्यकीय माहिती समोर येण्याची शक्यता
भिवंडी शहरातील निजामपुरा परिसरात असलेल्या भारत गॅस एजन्सीसमोर 5 किलोच्या गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे नागरिकांनी रात्रीपासूनच एजन्सीसमोर रांगा लावल्याचे दिसून आले.
विशेषतः कामगार वर्ग मोठ्या संख्येने 5 किलोचा सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत उभा असल्याचे दिसत आहे. मात्र, सिलेंडरचा पुरवठा मर्यादित असल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.
याबाबत भारत गॅस एजन्सी मालकाने सांगितले की, दररोज केवळ 40 ते 50 सिलेंडरचा पुरवठा होत असून नागरिकांची मागणी त्यापेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे सर्वांना सिलेंडर उपलब्ध करून देणे शक्य होत नसल्याने एजन्सीसमोर गर्दी होत आहे. दरम्यान, सिलेंडर न मिळाल्याने तसेच लाकडाच्या किमती वाढल्यामुळे कामगार व सर्वसामान्य नागरिकांना स्वयंपाक करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
भोंदू अशोक खरात प्रकरण
SIT ने जाहीर केलेल्या हेल्पलाईन पडतोय तक्रारी आणि माहिती चा पाऊस
अशोक खरात याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी sit ने जाहिर केल्यात दोन हेल्पलाईन
यावर अशोक खरात संदर्भात माहिती देण्यासाठी सर्वाधिक फोन आल्याची माहिती
शंभरहुन अधिक फोन कॉल मध्ये काही महिलांचे ही फोन नाशिक,पुणे अहिल्यानगर भागातील महिला आणि तक्रारदारानी फोन केल्याची माहिती
बनावट, रत्न खडे लाखो रुपयांना दिल्याची माहिती
50 रुपये किमतीचे खडे 1 लाख दोन लाख रुपयांना विकल्याची माहिती
अशोक खरात ने अत्याचार केल्याची काही महिला तक्रारदारानी दिली माहिती
भोंदू बाबा अशोक खरात च्या जाळ्यात अनेक बडे मासे
- धार्मिक विधी आणि भविष्य पाहण्यासाठी नाशिकसह इतर काही जिल्ह्यातील राजकीय नेते सेलिब्रिटी देखील भोंदू बाबा अशोक खरात कडे जात असल्याची माहिती
- भविष्य आणि धार्मिक विधीच्या नावाखाली अशोक खरात या भोंदू बाबाने राजकीय नेते आणि काही सेलिब्रिटींना देखील लुबाडल्याची सूत्रांची माहिती
- गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणात अनेक धक्कादायक होते आहेय खुलासा
- महिलांवर अत्याचार करण्यासोबतच या भोंदूबाबा ने अनेकांना मोठ्या लोकांना आर्थिक गंडा घातल्याची देखील सूत्रांची माहिती
तीन अल्पवयीन मुलींना चारचाकी वाहनातून जंगल परिसरात फिरायला नेल्यानंतर त्यातील एका ११ वर्षीय चिमुरडीवर वाहनातचं अत्याचार केला. यावेळी अन्य दोन मुलींना आरडाओरड केल्यास किंवा घटनेची माहिती कुणाला सांगितल्यास त्यांच्याच्यावरही अत्याचार करू आणि जीवनाशी ठार मारू अशी धमकी दिली. ही धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील एका गावात घडली. पीडितेच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाल्यानंतर लाखांदूर पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या अटकेच्या कारवाईनं आरोपींनं गावातून पळ काढला होता. या आरोपीला लाखांदूर पोलिसांनी चंद्रपूरच्या मिंथुर इथून अटक केली आहे. प्रथम कुडेगावे (१८) असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नावं आहे
महाराष्ट्रात भोंदू बाबांचा सुळसुळाट वाढतोय.. धक्कादायक म्हणजे या जाळ्यात अडकणारे लोक हे शिकलेली सवरलेली आहेत.. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कायम सांगत आपण विज्ञान सृष्टी घेतली विज्ञानाची दृष्टी घेतली नाही. वैज्ञानिक दृष्टीने प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारणे गरजेचे आहे.. मात्र प्रश्न विचारणाऱ्या मुलाला आपल्याकडे उद्धट समजलं जातं.. त्यामुळे शिक्षण पद्धत आपल्याला प्रश्न विचारायला भाग पाडत आहे.. समाजामध्ये हव्यास पसरला आहे,खूप गोष्टी हव्या आहेत, याचा फायदा सुशिक्षित लोकांना फसवण्यासाठी भोंदू बाबा करत आहे. त्यामुळे शालेय वयापासून चिकित्सक मनोभावाचा शिक्षणामध्ये समावेश करणे शिक्षणाची पद्धत बदलणे आवश्यक आहे.. त्याचबरोबर शालेय वयापासूनच मुलांना जादूटोणा कायदा विषयीचा अभ्यास देणं गरजेचा आहे..त्याचबरोबर प्रशासनाने प्रत्येक पोलीस स्टेशनला अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष उभारण्याची गरज आहे..आणि समाजामध्ये सोशल मीडिया वरून ज्या अंधश्रद्धा पसरवल्या जात आहेत.. याला अटकाऊ घालण्याची गरज आहे.. शिक्षणामधूनच या भोंदू बाबांच्या अंधश्रद्धेला आणि अत्याचाराला उतारा मिळू शकतो असं मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले आहे.
मनपा रुग्णालये २४ तास सुरू ठेवण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश
अनेक रुग्णालयांमध्ये सेवा मर्यादित वेळेतच उपलब्ध असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची नोंद.
विशेषतः औषधे, इंजेक्शनसाठी रुग्णांना खाजगी रुग्णालयांवर अवलंबून राहाव लागतं
२०२६-२७ अर्थसंकल्पावरील चर्चेत मुद्दा उपस्थित
यामध्ये उच्च रक्तदाब, कर्करोग व इतर आजारांसाठी आवश्यक उपकरणांनी रुग्णालये सज्ज करण्याचाही निर्णय
प्रमुख, उपनगरीय व विशेष रुग्णालयांमध्ये सेवा उपलब्धतेसाठी केंद्रीकृत डॅशबोर्ड तयार करण्याचे आदेश
रिक्त पदे भरून सेवा सुरळीत ठेवण्यावरही भर दिला जाणार
यामुळे कमी वेळेत अधिक रुग्णांना उपचार मिळण्याची अपेक्षा
Crime : अध्यात्मिक साधना शिकवण्याच्या नावाखाली पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात बुधवारी झिरो नंबर वर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी गुरुवारी रात्री त्याच्या वसईतील निवासस्थानी धाड टाकली, मात्र तो तेथे आढळून आला नाही.
बुधवारी रात्री ‘झिरो नंबर’ने गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला तातडीने अटक करणे अपेक्षित होते. मात्र, पोलिसांना तो सापडला नसल्याने आता त्याला फरार होण्यास व मोबाईलमधील महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यास वेळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणातील तपास पुढील कारवाईसाठी पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पुणे पोलिसांचे पथकही आरोपीच्या शोधासाठी वसईत दाखल झाले असून त्याचा शोध सुरू आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ २९ मार्चपासून देशातील ३० शहरांना जोडले जाणार आहे. गुरूवारी नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयए) कंपनीने याचे प्रसिद्धीपत्रक काढून याबाबतची अधिकृत घोषणा केली. यापूर्वी या विमानतळावरून १६ शहरांमध्ये दिवसा विमानप्रवास करणे शक्य झाले होते. २९ मार्चपासून विमानतळावरून प्रवाशांना देशांतर्गत ४६ शहरांपर्यंत पोहचता येईल. प्रारंभी सुरूवातीला दररोज २२ उड्डाणे असताना एप्रिल महिन्यापर्यंत ती वाढून ७८ उड्डाणांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. नवी मुंबई विमानतळावरून कोणत्या ३० शहरांमध्ये जाऊ शकाल...आग्रा, औरंगाबाद, अयोध्या, बागडोगरा, बरेली, बेळगाव, भावनगर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, दिऊ, दुर्गापूर, गोवा (डाबोळीम), गोरखपूर, हिंडन, राजकोट (हिरा सर), हुबळी, जबलपूर, जम्मू, झारसुगुडा, कन्नूर, कोल्हापूर, मदुराई, कोलकाता, पटना, रायपूर, श्रीनगर, तिरुपती, तिरुवनंतपुरम आणि विशाखापट्टणम.
भारतीय नागरिकांची परदेशात तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीच्या प्रमुखाला सीबीआयने नुकतीच मुंबईतून अटक केली
सुनील नेल्लाथू रामकृष्णन उर्फ ‘कृष’ असे या आरोपीचे नाव असून त्याला मुंबईतून अटक केली आहे.
सुनील हा म्यानमारमधील (म्यावाडी परिसर, विशेषतः KK पार्क) सायबर फसवणूक केंद्रांमध्ये भारतीय नागरिकांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप आहे.
या रॅकेटद्वारे भारतातील लोकांना थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून दिल्ली–बँकॉकमार्गे म्यानमारमध्ये नेले जात होते
तिथे जबरदस्तीने “डिजिटल अरेस्ट”, रोमांस फ्रॉड आणि क्रिप्टो फसवणूक करण्यात लावले जात होते. पीडितांना कैदेत ठेवून मानसिक व शारीरिक छळ केला जात होता.
2025 मध्ये काही पीडितांनी पळून जाऊन थायलंडमार्गे भारतात परत येण्यात यश मिळवले होते.
परत आलेल्या लोकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे CBI ने तपास करून सुनील उर्फ कृष याची मुख्य भूमिका उघडकीस आणली.
मुंबईत परतल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून त्याच्या घरातून महत्त्वाचे डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध CBI घेत आहे.
- मुख्यपृष्ठ
- क्राईम
- Live Blog Updates:मोठी बातमी! नरहरी झिरवळ यांना राष्ट्रवादी पक्षाकडून अभय