Jalgaon Crime : कॉलेज प्राचार्यांकडून मित्रांसमोर मारहाणकेल्याच्या नैराश्यातून 20 वर्षीय विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, राहत्या खोलीत गळ्याला दोर लावला; जळगाव हादरलं!
Jalgaon : जळगाव शहरातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात कॉलेजच्या प्राचार्यांनी मित्रांसमोर मारहाण केल्यामुळे आलेल्या नैराश्यातून विद्यार्थ्याने थेट गळफास घेत आपलाही जीवनयात्रा संपवली आहे.

Jalgaon Crime News : जळगाव शहरातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात कॉलेजच्या प्राचार्यांनी मित्रांसमोर मारहाण केल्यामुळे आलेल्या नैराश्यातून विद्यार्थ्याने थेट गळफास (Jalgaon Crime News) घेत आपलाही जीवनयात्रा संपवली आहे. जळगाव शहरातील देवकर फार्मसी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थ्याने हे टोकाचं पाऊल उचललंय. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात संबंधित प्राचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर श्याम प्रभाकर पाटील, असं आत्महत्या (Crime News) केलेल्या वीस वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. तर प्राचार्यांनी कॉलेजमध्ये मित्रांसमोर पीव्हीसी पाईपाने मारहाण (Crime News) केल्यामुळे श्याम याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाम पाटील हा जळगाव येथील श्री. गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी प्राचार्य योगेश पवार यांनी दोष नसताना पीव्हीसी पाईपने मारहाण करून शिक्षक व मित्रांसमोर अपमान केल्याची माहिती श्यामने आपल्या कुटुंबीयांना दिली होती. 14 फेब्रुवारी रोजी त्याने वडिलांना व काकांना फोन करून आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले होते. यानंतर नेहरूनगर येथील राहत्या खोलीवर त्याने टोकाचे पाऊल उचलले.
Jalgaon Crime News : वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्राचार्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
दरम्यान, पोलीस तपासात घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली असून त्यात प्राचार्यांनी मारहाण केल्याचा उल्लेख आहे. मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्राचार्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांची सुसाईड नोट आम्ही जप्त केली असून प्राचार्य विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती रामानंद पोलिसांनी दिली. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
























