आत्मनिर्भर भारतसाठी पतंजलीची स्वदेशी चळवळ; कंपनीच्या व्हिजनने भारताचा जागतिक बाजारपेठेत वट
पतंजली कंपनीने दावा केला की, कंपनीने आयुर्वैदीक उत्पादने जसं की दंत कांती, केश कांती आणि तूप उत्पादनातून बाजारात आपला जम बसवला आहे.

नवी दिल्ली : पंतजली (Patanjali) आयुर्वैदाने मोठा दावा केला असून आपल्या बिझनेस मॉडेलने (Business) भारतीय बाजारपेठेत नवा इतिहास रचल्याचे म्हटले आहे. सुरुवातीच्या काळात आयुर्वैद आणि हर्बल उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेल्या फास्ट मूव्हिंग कंज्युमर सेक्टर (FMCG) मध्येही आपली पकड घट्ट केली आहे. त्यानंतर, आता कंपनीने आपलं व्हिजन आणखी वाढवलं आहे. FMCG सह इतरही उद्योगातही उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम ना केवळ आर्थिक, तर सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरावरही पाहायला मिळेल.
पतंजली कंपनीने दावा केला की, कंपनीने आयुर्वैदीक उत्पादने जसं की दंत कांती, केश कांती आणि तूप उत्पादनातून बाजारात आपला जम बसवला आहे. या सर्व उत्पादनांच्या यशस्वीचे मॉडेल हे रास्त दर, स्वदेशी ओळख आणि नैसर्गिक सामुग्रीच्या वापरावरील भर हेच आहे. याच माध्यमातून कंपनीने भारतातील ग्रामीण व शहरी भागातही आपलं जाळं उभारलं आहे. त्यामुळे, गावागावात पतंजलीचं नाव आणि उत्पादने पोहोचली आहेत. त्यासह, पतंजलीने लहानसहान उद्योग आणि शेतकऱ्यांनाही देखील बळ दिलं आहे. ज्यामुळे आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळकटी मिळाली असून त्याचाच एक भाग हे उद्योग आहेत. आपली कंपनी शेतकऱ्यांकडून थेट माल खरेदी करुन सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे, लाखो लोकांना रोजगारही मिळत असल्याचे पतंजलीने म्हटलं आहे.
FMCG च्या पुढे पाऊल टाकत कंपनीने आर्थिक सेवांमध्येही उडी घेतली आहे. नुकतेच मॅग्मा जनरल इंश्युरन्स कंपनीत भागिदारी घेतली आहे. त्या माध्यमातून वीमा क्षेत्रातही कंपनीने पहिलं पाऊल टाकलं आहे. त्यामुळे, कंपनीचा व्यवहार्य, पोर्टफोलिओ वाढविण्यास निश्चितच मदत होईल. त्यासह, पतंजलीने शिक्षण, आरोग्य आणि संशोधन क्षेत्रात गुंतवणूक करत आपलं सामाजिक उत्तरदायित्वही निभावलं आहे. कंपनीने 30 पेक्षा जास्त देशांमध्ये आपल्या उत्पादनांची निर्यात सुरू केली असून बाजारात भारताची आंतरराष्ट्रीय ताकद वाढली आहे.
मेक इन इंडियाला प्रोत्साहन मिळालं
आपल्या बिझनेस मॉडेलमुळे मेक इन इंडियाला प्रोत्साहन मिळालं आहे. आम्ही MSME लघु व मध्यम उद्योगांना तांत्रिक व वितरण सहाय्य देत स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन दिलं आहे. पुढील 5 वर्षात भारतातील प्रमुख FMCG कंपनी बनणे हे कंपनीने लक्ष्य आहे. हिंदुस्तान लिव्हर सारख्या कंपन्यांना टक्कर देण्याचं काम पतंजली करेल. कंपनीने केवळ बाजारातच स्पर्धा निर्माण केली नाही, तर ग्राहकांना नैसर्गिक आणि स्वदेशी पर्यायही दिले आहेत. त्यामुळे, विदेशी कंपन्यांना आयुर्वैदीक उत्पादने बाजारात लाँच करणे क्रमप्राप्त झाले. पतंजलीचे व्हिजन हे भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठीचं एक आंदोलन आहे, असेही कंपनीने म्हटले.
हेही वाचा
मुंबई अन् नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटीची उभारणी; 5 विदेशी विद्यापीठांना इरादापत्र देणार
























