Mobile Recharge Price Hike : देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेल (Bharti Airtel) मोबाईल यूजर्सना पुन्हा एकदा मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. येत्या 3 ते 4 महिन्यांत मोबाईल रिचार्जच्या दरांमध्ये (Mobile Tariff Hike) 12 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, कंपन्यांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी 5 G नेटवर्क विस्तार आणि वाढत्या खर्चामुळे ही दरवाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.

Continues below advertisement

Telecom Tariff Hike Reasons : रिचार्ज महागण्यामागची मुख्य कारणे

टेलिकॉम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, मोबाईल प्लान्सचे दर वाढण्यामागे खालील महत्त्वाची कारणे आहेत:

5 जी इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेटवर्क विस्तार : कंपन्या देशाभरात 5 जी (5G Infrastructure) सेवेचा विस्तार करण्यासाठी आणि स्पेक्ट्रमसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. हा खर्च भरून काढण्यासाठी ग्राहकांवर भार टाकला जाण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

ARPU (प्रति ग्राहक सरासरी उत्पन्न) वाढवणे : कंपन्यांना आपले प्रति ग्राहक सरासरी उत्पन्न सुधारायचे आहे, जेणेकरून नफा टिकवून ठेवता येईल.

सस्ते प्लान्स बंद करणे : एअरटेल आणि जिओने आधीच आपले काही सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान्स टप्प्याटप्प्याने बंद केले आहेत, ज्यामुळे ग्राहकांना नाईलाजाने महागडे रिचार्ज करावे लागत आहेत.

बाजारातील डुओपॉली (Duopoly) : सध्या खाजगी टेलिकॉम क्षेत्रात जिओ आणि एअरटेलचे वर्चस्व आहे. बाजारात मुख्यत्वे दोनच मोठ्या कंपन्यांचे प्राबल्य असल्याने दरवाढ झाल्यास ग्राहकांकडे इतर पर्याय मर्यादित उरतात.

Mobile Recharge Hike Impact : ग्राहकांच्या खिशावर कसा होणार परिणाम?

जर रिचार्जच्या दरात 12 ते 15 टक्क्यांची वाढ झाली, तर प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहकांच्या महिन्याच्या बजेटवर थेट परिणाम होईल. उदाहरणार्थ, सध्या ज्या रिचार्ज प्लानची किंमत 500 रुपये आहे, तो 12 टक्के दरवाढीनंतर सुमारे 560 आणि 15 टक्के दरवाढीनंतर सुमारे 575 पर्यंत महागू शकतो.

ही बातमी वाचा: