Donald Trump Tariffs on India : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर लादलेल्या 50 टक्के टॅरिफचा परिणाम आता भारतातील अनेक उद्योगक्षेत्रात दिसायला लागलाय. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं 50 टक्के टॅरिफ लादलं असल्याचे सांगितलं जातंय. परिणामी याचा फटका आता भारतीय बाजारपेठेवर पडला असून अमेरिकेच्या टॅरिफवॉरमुळे गुजरातमधील (Donald Trump Tariffs on India) हिरे उद्योगास (Diamond Market) मोठा हादरा बसला आहे. ज्यामुळे गेल्या 10 दिवसांत जवळपास 1 लाख लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर हे संकट अधिक बळावणार असल्याची भीतीहि व्यक्त केली जात आहे.
छोट्या हिरा युनिट्सला टॅरिफचा सर्वाधिक फटका
अमेरिकेने भारतावर लादलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे भारतीतील वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रावर परिणाम होत असल्याचे बघायला मिळत आहे. तिकडे देशातील कोळंबी निर्यात (Shrimp export ) उद्योग देखील गंभीर संकटात सापडला आहे. अशातच आता गुजरातमधील हिरे उद्योगासही या टॅरिफचा फटका बसताना दिसत आहे. गुजरातच्या सौराष्ट्र भागातील भावनगर, आमरेली आणि जुनागढ येथील छोट्या हिरा युनिट्सला टॅरिफचा सर्वाधिक फटका बसला आहे. टॅरिफ वाढल्यामुळे अनेकांच्या निर्यात ऑर्डर्स प्रलंबित झाल्या आहेत किंवा रद्द झाल्या असल्याची माहिती गुजरातमधील 'डायमंड वर्कर्स युनियन'चे उपाध्यक्ष भावेश टांक यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात परिस्थिती सुधारली नाही तर संकट आणखी गडद होण्याची भीतीही आता जाणकार व्यक्त करत आहे.
सप्टेंबरमध्ये पंतप्रधान मोदी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार?
दुसरीकडे, संयुक्त राष्ट्र महासभेची (UNGA) शिखर परिषद सप्टेंबर 2025 मध्ये न्यू यॉर्क येथे होणार आहे. या व्यासपीठावर, जगातील सर्वोच्च नेते पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय अजेंडा निश्चित करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊ शकतात. ही बैठक केवळ भारत-अमेरिका संबंधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकत नाही, तर व्यापार, शुल्क आणि भू-राजकीय मुद्द्यांवरही त्याचा महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो.
जर ही बैठक झाली, तर गेल्या 7 महिन्यांत दोन्ही नेत्यांमधील ही दुसरी बैठक असेल. पंतप्रधान मोदी यांनी फेब्रुवारीमध्ये शेवटची व्हाईट हाऊसला भेट दिली होती. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात दोघांमध्ये वैयक्तिक चर्चाही झाली होता, परंतु दुसऱ्या कार्यकाळात टॅरिफ आणि इतर व्यापार मुद्द्यांवर त्यांनी केलेल्या विधानांमुळे या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. परिणामी या भेटीत काही तोडगा निघतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या