Union Budget 2025 Live Updates : करमुक्त उत्पन्न मर्यादा 12 लाखांवर, निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा
Union Budget 2025 Live Updates:अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मांडण्यास सुरुवात केली.सीतारामन या अर्थसंकल्प मांडण्यास उभ्या राहताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली

Background
Nirmala Sitharaman Speech Union Budget 2025 Live Updates : अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी (1 फेब्रुवारी) 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी धनधान्य योजना आणणार असल्याचं जाहीर केलं. तसंच आमचा फोकस GYAN वर असल्याचं त्यांनी नमूद केलं. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, आमचे लक्ष 'ग्यान'वर आहे. GYAN म्हणजे G - गरीब, Y- तरुण, A- अन्नदाता आणि N - नारी शक्ती. अर्थमंत्री म्हणाल्या की, आम्ही गेल्या 10 वर्षात बहुआयामी विकास केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात सरकारचा भर सर्वांसाठी विकासावर असल्याचे सांगितले. मध्यमवर्गीयांचा लाभ वाढवण्यावर भर दिला जात आहे. जियोपॉलिटिकल तणावामुळे जागतिक वाढ घसरली आहे.
अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजना जाहीर केली आहे. सरकार ही योजना राज्यांसोबत चालवणार आहे.यामुळे १.७ कोटी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. सीतारामन म्हणाल्या की, गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल.
शेतीची वाढ, ग्रामीण विकास आणि उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. आर्थिक क्षेत्रातील सुधारणांकडेही लक्ष देणार आहे. 100 जिल्ह्यांमध्ये धनधान्य योजना सुरू करण्यात येत आहे. तसेच किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाख रुपये झाली आहे.
सरकार अनेक योजनांत बदल करणार का?
केंद्र सरकार यावेळी महिला व बालविकास, शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, आरोग्य आदी क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच शेती आणि महिलांच्या विकासासाठी अनेक योजनांत केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोबतच सरकार काही नव्या योजनांची घोषणा करणार का? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अर्थसंकल्पानंतर जळगावात सोने दरात वाढ
Devendra Fadnavis : मध्यमवर्गासाठी ड्रीम बजेट : देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यम वर्गासाठी एक ड्रीम बजेट दिलंय, असं म्हटलं.
12 लाख उत्पन्न असणाऱ्यांना आता टॅक्स भरावा लागणार नाही.
याचा फायदा आता मध्यम वर्गीय आणि तरुणांना होणार आहे.
यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे.
अतिशय धीराने घेतेलेला हा निर्णय आहे.
देशाच्या आर्थिक विकासात एक मैलाचा दगड ठरणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.























