Union Budget 2022 Finance Minister Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच जगभरात सुरु असलेल्या कोरोना महामारीचा उल्लेख केला. या महामारीच्या काळातही भारत आपली विकास यात्रा कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे, असं म्हटलं आहे. 


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं की, भारतीय अर्थव्यवस्था ग्लोबल स्तरावर परेशानीचा सामना करत आहे मात्र या परिस्थितीत देखील भारतानं कोरोनो महामारीशी चांगला मुकाबला केला आहे.  अर्थसंकल्प सादर करताना सीतारमण यांनी सांगितलं की, भारत जगातील सर्वात वेगाने वाढत असलेल्या एका अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. या वर्षीच्या बजेटमध्ये पुढील 25 वर्षाची ब्ल्यू प्रिंट असेल. देशात आर्थिक रिकव्हरीला बळकट करण्यावर फोकस केला जाणार आहे, असंही त्यांनी म्हटलं.  


या अर्थसंकल्पातून भारताला पुढील 25 वर्षांचा पाया मिळेल, असे अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या. पुढील आर्थिक वर्षात विकास दर 9.2% राहण्याची अपेक्षा आहे. देशाची अर्थव्यवस्था हळूहळू सावरतेय.  आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देत 60 लाख नवे रोजगार निर्माण करणार आहोत, असं त्या म्हणाल्या. 30 लाख अतिरिक्त नोकऱ्या देण्याची क्षमता आहे. सर्वसमावेशक विकास हेच सरकारचं ध्येय असेल, असं त्यांनी म्हटलं. 


या बजेटमध्ये पुढच्या 25 वर्षांची ब्लू प्रिंट असणार आहे असं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. एलआयसीचा आयपीओ लवकरच बाजारात आणणार आहोत. पायाभूत सुविधांसाठी 20 हजार कोटी रुपये देणार आहोत, असं त्यांनी म्हटलं.


बजेटमधील आतापर्यंतचे महत्त्वाचे मुद्दे 


आत्मनिर्भर भारत योजनेमुळे 16 लाख रोजगाराच्या संधी
तर मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख रोजगार उपलब्ध
पुढील आर्थिक वर्षात 9.2% विकास दर अपेक्षित आहे 
ऊर्जा, वाहतूक, विपणन यावर भर दिला जाईल
पुढील आर्थिक वर्षात 25 हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बनवणार
येत्या 3 वर्षात 400 नव्या वंदे भारत ट्रेन धावणार 
गतीशक्ती मास्टर प्लॅनद्वारे पायाभूत सुविधांना  प्रोत्साहन देणार
शहरी वाहतूक रेल्वे मार्गाशी जोडणार


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha