<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान! महाभारतातील द्रौपदीचं ते सत्य अन् पांडवांचा संभाव्य शाप वाचला</title><atom:link href="https://marathi.abplive.com/blog/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Thu, 25 Jun 2026 11:00:40 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[Maya Satya Bhram Movie Review: माया सत्य  भ्रम (2026) : फिलॉसॉफिकल थ्रिलर]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/maya-satya-bhram-2026-philosophical-thriller-bengali-cinema-kolkata-blog-by-narendra-bandabe-1429258</link><comments>https://marathi.abplive.com/blog/maya-satya-bhram-2026-philosophical-thriller-bengali-cinema-kolkata-blog-by-narendra-bandabe-1429258#respond</comments><pubDate>Wed, 24 Jun 2026 14:39:01 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ नरेंद्र बंडबे ]]></dc:creator><category><![CDATA[ करमणूक ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/maya-satya-bhram-2026-philosophical-thriller-bengali-cinema-kolkata-blog-by-narendra-bandabe-1429258</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Maya Satya Bhram Movie Review:&lt;/strong&gt; कोलकात्यातून (Kolkata News) दोन जण बेपत्ता होतात. इन्स्पेक्टरचा पाच वर्षांचा मुलगा आणि एक विदेशी संशोधक. या दोघांचा शोध एका आध्यात्मिक बाबाशी येऊन थांबतो. इथूनच माया सत्य &amp;nbsp;भ्रम (2026) या बंगाली सिनेमाचं (Bengali Cinema) कथानक वाकडी-तिकडी वळणं घ्यायला सुरुवात होते. हा शोध अद्वैत वेदांताच्या तत्त्वज्ञानाशी जोडला जातो. आदि शंकराचार्यांनी सत्य हे एकच असतं, अशी मांडणी केली. सत्य समोर येतं तेव्हा भ्रम तुटतो, माया संपते आणि सर्व काही काचेसारखं साफ होतं.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;img src=&quot;https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/06/24/ec89c5f6022d4f5bd499a5367577377f178229149642688_original.jpeg&quot; width=&quot;257&quot; height=&quot;193&quot; /&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;समिक रॉय चौधरी यांचा माया सत्य &amp;nbsp;भ्रम (2026) हा बंगाली सिनेमा अद्वैत वेदांताचे दाखले देताना प्रेक्षकांना रोलर कोस्टर राइडचा अनुभव देतो. यातून घडणारं नाट्य हे क्राईम थ्रिलरपेक्षा (Crime Thriller) जास्त फिलॉसॉफिकल बनतं. पण ते जड होत नाही, तर तत्त्वज्ञानाची बाजू अधिक साधी-सोपी करून दाखवतं.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;img src=&quot;https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/06/24/93b412a5caa92053c012f89737972fb3178229152594588_original.jpeg&quot; width=&quot;241&quot; height=&quot;331&quot; /&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कोलकात्यातला बाबा त्रिलोकदर्शी (सनत चट्टोपाध्याय) या मुख्य पात्राभोवती सिनेमाचं कथानक फिरतंय. त्याच्याकडे येणारे भक्तगण भविष्याची विचारणा करण्यासाठी आलेले असतात. त्रिलोकदर्शी त्यांचा हात पकडून त्यांचा भूतकाळ जाणतो आणि भक्ताला वर्तमानाची जाणीव करून देतो. त्रिलोकदर्शी आणि त्याच्या दैवी शक्तीविषयी संशोधन करायला आलेली परदेशी रिसर्चर सारा हे जवळून पाहत असते. एका दृश्यात ती त्रिलोकला या संदर्भात विचारणा करते. तेव्हा त्रिलोक सत्याची मांडणी करतो. माया (Illusion) आणि भ्रम (Delusion) या पलीकडे सत्य हे जगण्याचं एकमेव साधन आहे. जे आहे ते वर्तमानात आहे. भूतकाळ घडून गेलाय. भविष्याचा अंदाज लावता येत नाही. वर्तमान हेच एकमेव सत्य आहे. त्यात चांगलं जगता आलं पाहिजे, असं तो साराला सांगतो. त्याचवेळी कथानक सत्य माया भ्रम या संकल्पनेतून तावून सुलाखून निघतं.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;br /&gt;&lt;img src=&quot;https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/06/24/959f2d7c65ae90b3beb9c9e2258fcef0178229155099588_original.jpeg&quot; width=&quot;222&quot; height=&quot;314&quot; /&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;समिक रॉय चौधरी यांचा माया सत्य &amp;nbsp;भ्रम (2026) सिनेमा आधी दोन घटनांचा शोध घेणारा एक क्राईम थ्रिलर वाटतो. कथानकाची मांडणी नॉन-लिनियर आहे. म्हणजे एका रेषेत घडत नाही. ते त्रिलोक, सारा आणि इन्स्पेक्टरच्या अशा तीन उपकथानकांमध्ये फिरतं. प्रेक्षकाला माया आणि भ्रमात गुंतवून ठेवतं आणि जेव्हा एकमेव सत्य समोर येतं, तेव्हा मेंदूला झिणझिण्या येतील अशी अनुभूती देऊन जातं.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;साहिर लुधियानवी यांचा शेर आहे ...&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;जो भी है बस यही इक पल है&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;समिकचा माया सत्य भ्रम (2026) हीच अनुभूती देतो. माया सत्याचा विपर्यास करते, संभ्रम तयार करते. ज्ञान माणसाला सत्याच्या दिशेने घेऊन जातं.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आधी न्यूयॉर्क इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, अमेरिका आणि नंतर बिश्केक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, किर्गिझस्तान अशा दोन ठिकाणी समिक यांच्या माया सत्य &amp;nbsp;भ्रम (2026) या सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळालाय. पुढच्या महिन्यात सिनेमा भारतात प्रदर्शित होणार आहे.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/06/24/a2f3a9415363c93c3e15d50053ed376e178229206616288_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : स्त्रियांच्या वाढत्या अमानुष आक्रमकतेचे सामाजिक मौन!]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/ketan-agrawal-death-cas-the-social-silence-surrounding-women-rising-brutal-aggression-siya-goyal-1429182</link><comments>https://marathi.abplive.com/blog/ketan-agrawal-death-cas-the-social-silence-surrounding-women-rising-brutal-aggression-siya-goyal-1429182#respond</comments><pubDate>Tue, 23 Jun 2026 19:51:48 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ क्राईम ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/ketan-agrawal-death-cas-the-social-silence-surrounding-women-rising-brutal-aggression-siya-goyal-1429182</guid><description><![CDATA[&lt;p&gt;स्त्रियांनी केलेल्या हत्या आणि खून ह्याविषयी सोशल मीडियामध्ये तितका आक्रोश दिसत नाही जितका तो पुरुषांनी केलेल्या हत्या आणि अत्याचाराबद्दल दिसतो. तद्वतच एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीच्या हत्येत केलेली मदत जसे की हुंडा बळी, अनैतिक संबंध, ब्लॅकमेलिंग इत्यादि घटनांतदेखील समाजाचा आक्रोश पुरुष अपराध्याबद्दल अधिक असतो, तुलनेने अपराधी स्त्रीविषयी तितका संताप दिसत नाही.&amp;nbsp;मागील दशकात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यात नवविवाहित स्त्रियांनी अतिशय निर्दयतेने आपल्या पतीचा काटा काढला आणि वर त्याच्या संपत्तीवर डोळा ठेवला. अनेक महिलांनी बाह्य अफेअरपायी आपल्या नवऱ्याला अमानुषपणे मारलेय, अनेक स्त्रियांनी विलक्षण थंडपणे आपल्याच सुनेला भावजयीला जाऊबाईला मृत्यूच्या हवाली केलेय. अनेक गर्लफ्रेण्ड्सनी आपल्या बॉयफ्रेण्डची हत्या केलीय. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;स्त्री कठोर हृदयाची मारेकरी असूच शकत नाही, ती सराईत गुन्हेगार असणाऱ्या पुरुषांसारखी असूच शकत नाही असं आपल्या समाजाला वाटत असेल का? एकेकाळी हे पूर्णसत्य असेलही मात्र अलीकडील काळातल्या घटना पाहू जाता हा समज अर्धसत्य असावा असे वाटू लागलेय. वरती दिलेले माझे निष्कर्ष चुकले असतील तर माझ्याइतका आनंद कुणालाच होणार नाही. कारण अनेक स्त्रियांच्या आयुष्याची राखरांगोळी कशी झाली आहे आणि ती अजूनही कशी जारी आहे हे मी डोळसपणे पाहिले आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;सिया गोयलला मुलगा पसंत नव्हता तर तिचे लग्न बळजबरीने ठरवणाऱ्या पालकांचा बुरखा तिने फाडला असता तर ते बरे दिसले असते मात्र ज्याने आपल्यासोबत लग्न करावे म्हणून जबरदस्ती केलेली नाही त्या वाग्दत्त वराची अमानुष हत्या करणे कधीही समर्थनीय नाही. अत्याचार करणाऱ्याचे जेंडर पाहून त्याच्या विरोधात व्यक्त न होणे ही वृत्ती आणि गुन्हेगाराची अपराध्याची जात पाहून त्याचे छुपे समर्थन करण्याची वृत्ती एकसारखीच मानली पाहिजे. आपण काही लिहिलं की, तुम्ही ह्याच्यावर लिहिलं पण त्याच्यावर लिहिलं नाही हे तुणतुणे वाजवणारे भामटे स्वतः कायम एकतर्फी आणि एकांगी असतात, ते देखील ह्याच कॅटेगरीत मोडतात. स्वतः निपक्षपाती असणाऱ्यांनीच इतरांना शहाणपणा शिकवावा असा नियम केल्यास सोशल मीडियावरची निम्मी अकाउंट्स बंद पडतील. असो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;अत्याचार करणारा, खून करणारा व्यक्ती कोणत्याही जातीधर्माचा, भाषेचा, प्रांताचा, जेंडरचा असो त्याचा समान निषेध करता आला पाहिजे. आजवर असंख्य पुरुषांनी अगणित स्त्रियांवर अनन्वित निर्घृण अत्याचार केलेले आहेत, आजही करताहेत आणि कदाचित भविष्यात देखील हे प्रमाण असेच असू शकते हे जळजळीत सत्य नाकारणारा माणूस स्वतःचीच फसवणूक करतो; मात्र त्याचवेळी हे ही मान्य केले पाहिजे की आताशा ह्या चित्रात किंचित बदल दिसू लागलाय, जी बाजू आजवरच्या काळात कधीही दागदार नव्हती तिच्यावरही आता बारीक सारीक लालभडक शिंतोडे उडू लागलेत. समाजातली सर्वस्तरीय वीण उसवत असतानाच, लैंगिक स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यातली रेषा धूसर होत असताना आणि व्यक्तिगत हक्काच्या जाणिवा ठळक होत असतानाच्या काळातच हा बदल का घडतोय ह्याचाही मागोवा घेतला जाणे अपेक्षित आहे! असो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;अशा घटनांच्या काही नोंदी -&lt;/h2&gt;
&lt;p&gt;2001मध्ये महिलांकडून गुन्ह्यांचे प्रमाण IPC गुन्ह्यांमध्ये सुमारे 5.4% होते, ते 2011 पर्यंत 6.2% झाले. एकूण अटक झालेल्या महिलांची संख्या 1.44 &amp;nbsp;लाखांवरून 1.93 लाखांपर्यंत वाढली. हे प्रमाण अजूनही पुरुषांच्या तुलनेत खूप कमी आहे (सुमारे 20:1चे प्रमाण), पण वाढ स्पष्ट आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;2005 मध्ये 3439 महिलांना खुनासाठी अटक, 2007 मध्ये 3812 महिलांना अटक, 2009 मध्ये 4007 जणी अटकेत! महिलांचा खुनातला सहभाग 5.4 % वरून 6.4 % पर्यंत वाढला. जीवे मारण्याच्या गुन्ह्यात महिला सहभागी असण्यात वाढ (2.6% ते 4.2%)&lt;/p&gt;
&lt;p&gt;चोरी, दगाबाजी, हुंडा-संबंधित गुन्हे, घरगुती हिंसा, दारू/मादक पदार्थांची तस्करी, दंगल, इ. मध्ये सामील असण्याच्या टक्केवारीतही वाढ. महिलांचा सहभाग असणारे गुन्हे पूर्वी 'सॉफ्ट' टाइपचेच जसे तस्करी, अधिक होते. आता मात्र हिंसक आणि संघटीत गुन्ह्यांकडेही महिला वळल्या असल्याचे दिसते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;महिलांचा गुन्हेगारीचा वाटा अजूनही लहान आहे, पण गुणवत्ता आणि हिंसक स्वरूप बदलत आहे.&lt;br /&gt;2020 पर्यंतच्या डेटानुसार मागील पाच वर्षांच्या तुलनेत महिलांची अटक 10 % वाढली, तर पुरुषांच्या अटक होण्याच्या प्रमाणात घट झालीय.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;NCRB नुसार जेलमध्येही महिला कैद्यांची संख्या वाढत आहे. ही वाढ सामाजिक बदल, आर्थिक दबाव आणि संधींच्या उपलब्धतेमुळे असेल का? कायदा, शिक्षण, आर्थिक सक्षमीकरण आणि मानसिक आरोग्य संतुलन, समुपदेशन यांद्वारे नियंत्रण शक्य असावे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;शहरीकरण, पाश्चात्यीकरण, आर्थिक स्वातंत्र्याची मागणी, कुटुंब/समाजातील दबाव, गरिबी, बेकारी, बदला घेणे आदी गोष्टी ह्याच्या मुळाशी असू शकतात असं गुन्हे अन्वेषण विश्लेषकांना वाटतं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;पुरुष-प्रधान गुन्हेगारीच्या तुलनेत हे प्रमाण खूपच किरकोळ आहे हे वास्तव आहे. कौटुंबिक हिंसा अनुभवणाऱ्या आणि मानसिक दबावात येणाऱ्या स्त्रिया हयात मुख्यत्वे सामील झालेल्या असतात.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;फेक फेमिनिस्ट मंडळींसाठी सूचना - पोस्ट वाचून त्रागा करू नये. शांतपणे विचार करावा&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;- समीर गायकवाड&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/06/23/c4a16b8abbfb938e7f7a3fb0e8fef65b17822243567501002_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : हडप्पाकालीन मूर्तीची नग्नता आणि एनसीईआरटीचा भोंगळपणा!       ]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/ncert-9th-textbook-art-history-mohenjo-daro-dancing-girl-statue-controversy-sameer-gaikwad-blog-1428310</link><comments>https://marathi.abplive.com/blog/ncert-9th-textbook-art-history-mohenjo-daro-dancing-girl-statue-controversy-sameer-gaikwad-blog-1428310#respond</comments><pubDate>Tue, 16 Jun 2026 16:27:32 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ भारत ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/ncert-9th-textbook-art-history-mohenjo-daro-dancing-girl-statue-controversy-sameer-gaikwad-blog-1428310</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;BLOG :&lt;/strong&gt; NCERT च्या नववीच्या पुस्तकात हडप्पा कालीन मूर्तीमधील नृत्य करणारी मुलगी नग्न आहे हे दिसू नये यासाठी तिच्या प्रतिमेत छातीखालचा भाग ब्लर &amp;nbsp;केला आहे; तिने कपडे घातलेत असे विद्यार्थ्यांना वाटावे असे ncert चं म्हणणं! 4500 वर्षांपूर्वीच्या या मुक्त स्वातंत्र्याच्या संस्कारांपासून आताच्या मुलांना वाचवण्यासाठी डिजिटल युगातल्या कथित संस्कृतिरक्षक सरकारने जे काही चाळे चालवले आहेत त्याच्या बिनडोकपणाला तोड नाही! स्वतःमधलं भोंगळंपण लपवण्यासाठी बायकांना कपड्यांच्या ताग्यात लपेटण्याची ही जुनाट वृत्ती विकृतच मानली पाहिजे!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नग्नतेकडे कसे पाहिले पाहिजे हेच ह्यांना ठाऊक नाहीये ही किती खेदाची बाब आहे! उद्या उठून खजुराहोमधील विख्यात लेण्यांना देखील हे वस्त्रात बंदिस्त करतील! जैनांच्या नग्न मुर्त्यांना देखील कपड्यात दाखवतील! मुळात माणूस जन्माला आलाय तो वस्त्रहीनच; मात्र मानवी जीवनातील लैंगिक भावना निकोप राहाव्यात तसेच लज्जा, आदर भाव ह्यांचे संवर्धन करण्यासाठी वस्त्रांचा वापर सुरु झाला.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आता कपड्यांची बंधने स्त्रियांवर लादून समाज नामानिराळा झाला आहे! घरोघरच्या पिंट्या, भाई, बंटी ह्यांना आवर घालण्याऐवजी साऱ्या मर्यादांचे ओझे बायकांवर ढकलून लोक मोकळे झालेत. साडेचार हजार वर्षांपूर्वीच्या जेमतेम साडेदहा सेंटीमीटर उंचीच्या तांब्याच्या काळसर मुर्तीमधील नग्नता कशी काय छळू शकते? त्यात आक्षेपार्ह काय आहे? त्याने कोणता वाद उद्भवणार आहे आणि जरी उद्भवलाच तर त्याचे शमन करण्याची ताकद संबंधितांत नाहीये का? की, वाद उद्भवेल ह्या खोट्या सबबीखाली ह्यांनाच त्या मुर्तीमधील नग्नता नकोशी झालीय?&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;असे असेल तर देशात अशी अनेक पेंटिंग्ज सापडतील ज्यात नग्न मुर्त्या आहेत, नग्न व्यक्ती आहेत! अशी अनेक शिल्पे आढळतील ज्यात नग्न देवी देवता आहेत, नग्न अवस्थेतील स्त्री पुरुष आहेत! ह्या सर्वांचे पुस्तकी उल्लेख करताना त्यांना झाकण्याचा पराक्रम हे करणार का? काय खुळचटपणा आहे हा? &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;खरे तर हडप्पा काळात पुरुष आणि स्त्रिया कमरेच्यावरती आत्ता उपरण्यासारखे दिसणाऱ्या कपड्यांचा वापर करत तर धोतराचा वापर कमरेपासून खाली कपडे म्हणून केला जात असे. या काळातील लोक कापड विणण्यात अतिशय पारंगत होते. सामान्यत: पुरुष धोतर तर स्त्रिया परकरसारख्या वेशभूषा दैनंदिन जीवनात वापरत असत. मात्र सर्व व्यक्ती वस्त्र घालत नसत!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;काही शिल्पं आणि चित्रांनुसार तत्कालीन महिला फक्त कमरेच्या खाली झाडांच्या पानाचा वापर करत असत. अशोका या झाडाची पाने, तसेच पुन्नैच्या फुलांचा वापर करुन परकर बनवले जात. काही शिल्पांमध्ये स्त्रिया &amp;lsquo;कलिंगम&amp;rsquo; नावाचं वस्त्र पुर्ण शरीर झाकण्यासाठी करत असत असं दाखवण्यात आलं आहे. मात्र अनेकदा वस्त्र परिधान करण्याऐवजी केवळ आभूषणे घातली जात.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एनसीईआरटीला जिच्यामुळे संस्कृतीरक्षणाची दाट उबळ दाटून आली ती मूर्ती मोहेंजो-दारो येथे सापडलेल्या दोन कांस्य मूर्तींपैकी एक आहे. ही मूर्ती एका मुलीची आहे. कांस्यशिल्पातली ही मुलगी नग्न आहे, तिने अनेक बांगड्या आणि एक हार घातला आहे, आणि तिला एका हाताने कमरेवर ठेवून नैसर्गिक उभ्या स्थितीत चित्रित केले आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तिच्या डाव्या हातात 24 ते 25 बांगड्या आहेत आणि उजव्या हातात 4 बांगड्या घातल्या आहेत. तिने डाव्या हातात एक वस्तू धरली आहे, हा हात तिच्या मांडीवर टेकलेला आहे; तिचे दोन्ही हात असामान्यपणे लांब आहेत. तिच्या हाराला तीन मोठे पेंडंट आहेत. तिने आपले लांब केस एका मोठ्या अंबाड्यात बांधले आहेत जो तिच्या खांद्यावर रेललेला दिसतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;इतक्या दुर्मिळ आणि देखण्या शिल्पाकडे पाहून ज्याच्या मनात काही विवादास्पद गोष्टी येत असतील तो विकृतच म्हटला पाहिजे, साडेचार हजार वर्षांपुर्वी ज्याने हे शिल्प बनवले ती व्यक्ती, जिचे हे शिल्प आहे ती मुलगी आणि त्या काळातल्या तमाम लोकांचा लैंगिक आणि देहिक दृष्टिकोन निकोप आणि सदृढ होता असे म्हणताना आताच्या ह्या गणंगांची लाज वाटते! &amp;nbsp; &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एक तरुण मुलगी, तिचा हात कमरेवर ठेवून अर्ध-विश्रांतीच्या स्थितीत, आणि तिचा पाय किंचित पुढे ठेवून ती संगीताच्या तालावर पाय हलवत आहे, त्यामुळेच ह्या शिल्पाला नर्तकी असे नाव देण्यात आले! 'सिंधू संस्कृतीच्या उत्खनन स्थळावरील सर्वात मनमोहक कलाकृती' असं ह्या शिल्पकृतीचे वर्णन केले जाते!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपल्या समृद्ध पूर्वजांचा हा वारसा पुढे नेण्यात आपल्यातले काही लोक असमर्थ ठरताहेत कारण त्यांच्या मनात सदैव खुळचट संस्कृतीमधल्या कथित लज्जारक्षणाचे शेण्मूत्र साठून असते!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;काळाची चक्रे उलटी फिरवण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या मनात उचित भावना निर्माण व्हाव्यात आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी कसे पाहावे ह्याच्या निकोप दृष्टिकोनाचे धडे शिकवले पाहिजेत! सगळे नीतीमत्ता पाठ मुलींना शिकवण्याची जी पुरुषी वर्चस्ववादी वृत्ती आहे त्या वृत्तीने साडेचार हजार वर्षापूर्वीच्या नग्न मूर्तीला कपडे घातलेले दाखवावेत ही अतिशय शरमेची बाब आहे!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आसपास इतकं काही उघडं नागडं सुरु असतं त्याला हे सरकार आणि ह्यातले हे भुक्कड लोक आळा घालू शकतील का?&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;समजा एनसीईआरटीच्या एखाद्या पुस्तकात कुंभमेळ्याची माहिती देण्याचा विषय असेल तर त्या फोटोमध्ये गांजाफुक्या नागा साधूंना नागडं दाखवण्याऐवजी एडिट करून पॅन्टशर्टमध्ये दाखवतील का?&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एका बेजान शिल्पाला तुम्ही कपडे घालू शकता कारण तिच्या बाजूने बोलणारे कुणी नाही मात्र नागड्या फिरणाऱ्या अनेक साधू महंतांना तुम्ही अटकाव करू शकता का, ह्याचे उत्तर नाही असेच येईल!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अकलेची दिवाळखोरी दर्शवणारे हे दुटप्पी वागणे बंद करावे. ज्या पुस्तकात हा उद्योग केला आहे ते पुस्तक नववीच्या विद्यार्थ्यांचे आहे. म्हणजे ही पौगंडावस्थेतली मुलं आहेत. झाकलेली वस्तू काय आहे हे पाहण्याची जिज्ञासा मानवी स्वभावात अधिक आढळते. इंटरनेटपासून ते हजारो साधनांत ही मूर्ती ह्या मुलांना नग्न दिसेल तेव्हा त्यांचे चित्त विचलित होणार नाही का, काहीतरी वाद होणार नाही का? उलट हेच वय आहे अशा गोष्टी नेटक्या पद्धतीने समजावून सांगण्याचे!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपल्या देशात मोठ्या प्रमाणात जे बलात्कार होतात, चिमुरड्या मुलींचे शोषण होते, वृद्ध बायका देखील त्यातून सुटत नाहीत, कोणत्याही स्त्रीमध्ये मादी शोधण्याची एक विकृती जडून आहे, वखवखलेल्या नजरेने फिरणारे वासनेने लाखो बुभुक्षित पुरुष मोकाट फिरत असतात! ह्याचे मुख्य कारण माहिती आहे का? आपल्या देशात अनेक मुलांना, पुरुषांना आपल्या लैंगिक भावनांचे योग्य शमन कसे करायचे हेच ठाऊक नाही! त्या भावनांना कसे हाताळले पाहिजे ह्याचे ज्ञान त्यांना नसते!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;उद्दीपित झालेल्या पुरुषांना आवरण्यासाठी मुले विद्यार्थी दशेत असतानाच ह्याची वैचारिक जडणघडण निकोप आणि सदृढ करता येते! त्यासाठी हजारो वर्षांपूर्वीच्या मूर्तीला कपडे घालणे हा निव्वळ बिनडोकपणा आणि वैचारिक मागासलेपणा आहे!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ह्या निर्णयाचा फेर विचार करुन हा अगोचरपणा रद्द केला पाहिजे. कधीकधी अशा छोट्या छोट्या घटना लिटमस टेस्ट म्हणूनही केलेल्या असतात, लोक गप्प बसले तर ह्यातल्या पुढच्या टप्प्यांना हात घालणे त्यांना सोपे जाते! म्हणून अशा गोष्टींना विरोध केलाच पाहिजे!&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/06/16/d4de65ba5561c93ea092d9c2bc9fe9b8178160740477293_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Bishkek International Film Festival: बिश्केक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल: मध्य आशियातला नवा सिनेमॅटिक स्टार]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/bishkek-international-film-festival-central-asias-new-cinematic-star-blog-by-narendra-bandabe-1428261</link><comments>https://marathi.abplive.com/blog/bishkek-international-film-festival-central-asias-new-cinematic-star-blog-by-narendra-bandabe-1428261#respond</comments><pubDate>Tue, 16 Jun 2026 11:56:23 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ नरेंद्र बंडबे ]]></dc:creator><category><![CDATA[ करमणूक ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/bishkek-international-film-festival-central-asias-new-cinematic-star-blog-by-narendra-bandabe-1428261</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Bishkek International Film Festival:&lt;/strong&gt; गेल्या अनेक वर्षांपासून किर्गिस्तानला (&lt;span dir=&quot;ltr&quot; lang=&quot;en&quot;&gt;&lt;span class=&quot;mw-page-title-main&quot;&gt;Kyrgyzstan&lt;/span&gt;&lt;/span&gt;) पर्यटकांची पहिली पसंती मिळत आहे. बर्फाच्छादित डोंगर रांगा आणि स्वच्छ शहरांसाठी पर्यटक किर्गिस्तानला येतात. &amp;nbsp;मेडिकलचा अभ्यास करण्यासाठी भारतातल्या विद्यार्थ्यांचा ओढा बिश्केक (Bishkek) अर्थात इथली राजधानीचं शहर आहे. पण आता किर्गिस्तानाची नवी ओळख तयार होतेय. बिश्केक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या (Bishkek International Film Festival) निमित्ताने. यंदा फेस्टिव्हलचं चौथं वर्ष होतं. पण आयोजन आणि नियोजनात बिश्केक फिल्म फेस्टिव्हलनं वरचा नंबर गाठलाय.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बिश्केक (Bishkek) शहर हे सर्वाधिक प्रसिध्द आहे ते मध्यवर्ती असलेल्या अल-आ-तूर स्क्वेअरसाठी. हा ऐतिहासिक चौक आहे. जिथं आजवरची मोठी आंदोलनं झाली. 1991 ला रशियापासून वेगळं झाल्यानंतर किर्गिझ रिपब्लिक अशी नवी ओळख तयार झाली. त्यानंतर या चौकात अनेक आंदोलनं झाली. या चौकातच बिश्केक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात झाली. एमिली (2002) या फ्रेंच सिनेमातून जगभरात पोचलेली अ&amp;zwj;ॅन्ड्र्यू टाटू यंदाच्या फेस्टिवलची विशेष पाहुणी होती. तिला यंदा सिनेमा क्षेत्रातल्या योगदानासाठी विशेष पुरस्कार देण्यात आला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बिश्केकमध्ये 44 देशांचे जवळपास 100 हून अधिक सिनेमे दाखवण्यात आले. पण बिश्केकची खासियत वेगळी आहे. तिथं मध्य आशियातलं सिनेमाचं मार्केट विकसित करण्यासाठी प्रयत्न केला जातोय. CAF Pitch आणि BARs In Progress माध्यमातून किर्गिझ आणि आशियातल्या सिनेमांना मार्केट मिळवून देण्याचं मोठं काम इथं केलं जातंय. सध्या त्याची व्याप्ती कमी असेल. पण भविष्यात बिश्केकमध्ये मध्य आशियातलं सर्वात महत्त्वाचं आणि मोठं आशियाई फिल्म मार्केट तयार होण्याची ही मुहूर्तमेढ आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बिश्केक फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वात आकर्षण ठरलं ते इथलं स्काय कार्पेट (SKY Carpet). खाली निळं कार्पेट आणि वर निळंशार आकाश अशी ही फेस्टिव्हलची नवी ओळख तयार होत आहे. यंदाचं चौथं वर्ष असतानाही जगभरातले फेस्टिव्हल प्रोग्रामर, क्युरेटर, वेगवेगळ्या देशांचे माध्यम प्रतिनिधी अशी भन्नाट मंडळी या स्काय कार्पेटवर चालली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;खास किर्गिझ अंदाजात ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनी पार पडला. जग गाजवलेला इंडोनेशियाचा ऑन युअर लॅप (2025) हा रेझा रमादानचा सिनेमा सर्वोत्कृष्ट ठरला. द डिवाईन आयडियल ऑफ किलींग (2026) या इराणच्या सिनेमाचा दिग्दर्शक आरियोबारझान सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आठवडा भर इथं स्क्रिप्ट वर्कशॉप, नव्या दिग्दर्शक आणि कलाकारांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजम करण्यात आलं. भारतातर्फे एकमेव माया सत्य भ्रम (2026) हा सामाजिक रॉय चौधरीचा सिनेमा मुख्य स्पर्धेत होता. ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;किर्गिस्तानमध्ये बॉलिवुडचे (Bollywood News) हिंदी सिनेमे (Hindi Movie) प्रसिद्ध आहेत. आधी राज कपूर, नंतर मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) आणि आता शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांची क्रेझ पाहायला मिळाली. सिनेमा पाहून पाहून हिंदी बोलणारे अनेक लोक इथं भेटले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;महत्त्वाच्या इतर बातम्या :&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/blog/shape-of-momo-review-a-thought-provoking-tale-of-identity-and-womanhood-1426333&quot;&gt;Shape of Momo: शेप ऑफ मोमो&amp;rsquo;: सिक्किमच्या गर्द झाडीतलं &amp;lsquo;फेमिनिस्ट&amp;rsquo; वादळ&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/06/16/d7146ed8b2700a331b069f2a352d9818178159105847388_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/jambhul-viral-discussions-about-the-drought-and-the-legend-of-the-jamun-a-fruit-from-the-era-of-the-mahabharata-1428068</link><comments>https://marathi.abplive.com/blog/jambhul-viral-discussions-about-the-drought-and-the-legend-of-the-jamun-a-fruit-from-the-era-of-the-mahabharata-1428068#respond</comments><pubDate>Sun, 14 Jun 2026 20:08:57 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/jambhul-viral-discussions-about-the-drought-and-the-legend-of-the-jamun-a-fruit-from-the-era-of-the-mahabharata-1428068</guid><description><![CDATA[&lt;p&gt;सध्या जांभूळ ट्रेंडमध्ये आहे. बऱ्याच जणांनी त्याविषयी भाष्य केले आहे, काहींनी अंदाज वर्तवलेत तर काहींनी शास्त्रोक्त चिकित्सा केली आहे. त्या अनुषंगाने जांभुळाची ही एक वेगळी नोंद! आपल्यापैकी अनेकांना जांभूळ आख्यान ठाऊक असेलच. त्याचा ह्या नोंदीशी थेट संबंध आहे.&amp;nbsp;व्यासांच्या महाभारतात नसलेली मात्र महाभारतीय लोककथेत असलेली ही एक बोधकथा आहे. 'जांभूळ आख्यान' या कथेच्या नावाचा आणि 'जांभूळ' या फळाचा थेट, अतिशय महत्त्वाचा संबंध आहे; कारण ही संपूर्ण कथा एका जांभळाच्या फळाभोवती आणि त्यावरून समोर येणाऱ्या कटूसत्याभोवती फिरते. &amp;nbsp;ह्या कथेमध्ये जांभूळ हे केवळ एक फळ नसून ते मानवी मनातील दडलेली रहस्ये आणि सत्य बाहेर आणण्याचे एक माध्यम ठरते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;महाभारतातील पांडवांच्या वनवास काळात, जंगलात एका झाडाला एक अतिशय मोठे, वैशिष्ट्यपूर्ण आणि रसरशीत जांभळाचे फळ लटकलेले असते. एका ऋषींच्या बारा वर्षांच्या घोर तपस्येचे फळ असणारे जांभूळ खास त्यांच्यासाठीच राखून ठेवलेले असते. अन्य कुणालाही त्याला हात लावण्याची वा तोडण्याची अनुमती नसते. भटकंती करत तिथे आलेले पांडव आणि द्रौपदी ते रसरशीत जांभूळ पाहून स्तब्ध होतात, द्रौपदी तर मोहित होते! मागचा पुढचा कोणताही विचार न करता जांभळाच्या मोहात पडलेली द्रौपदी ते जांभूळ तोडते. जांभूळ तोडल्याचे ऋषींना कळले तर ते शाप देतील ह्याची शाश्वती असणारे श्रीकृष्ण निमिषार्धात प्रकटतात.&lt;/p&gt;
&lt;p&gt;द्रौपदीने जे जांभूळ तोडलेले आहे ते किती विशेष आहे आणि ते जांभूळ तोडण्याचे दुष्परिणाम श्रीकृष्ण सांगतात. प्रकट होतात आणि सांगतात की, जर सर्वांनी आपले पूर्ण सत्य आणि मनात दडलेली गुप्त रहस्ये जाहीरपणे कबूल केली, तरच हे जांभूळ पुन्हा झाडाला जाऊन चिकटेल आणि ऋषींच्या संभाव्य शापापासून पांडव वाचतील. श्रीकृष्णांनी वास्तव सांगतात पांडव आधी संभ्रमात पडतात मात्र वास्तव जाणून घेत भानावर येतात आणि एकेक करून ते पाचही जण यास राजी होतात. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव एकेक करून आपल्या मनातील सुप्त इच्छा आणि सत्य सांगतात. प्रत्येक पांडवाने सत्य बोलल्यावर ते जांभूळ जमिनीवरून हळूहळू वर सरकते.&lt;/p&gt;
&lt;p&gt;पाचही पांडवांनी आपलं रहस्य सांगूनदेखील जांभूळ पूर्णतः झाडाला मूळ जागी चिकटत नाही, मात्र जवळ जाऊन टेकतं! श्रीकृष्ण अधीर होऊन द्रौपदीकडे पाहतात आणि तिने पुढे होऊन तिच्या मनातले रहस्य सांगितल्याशिवाय जांभूळ पहिल्यासारखे मूळ जागेवर चिकटणार नाही हे नजरेनेच सांगतात.&amp;nbsp;मनातला संभ्रम दूर सारून द्रौपदीला तिच्या मनातील सर्वात मोठे रहस्य सांगावे लागते. ती कबूल करते की, तिचे पाच पतींवर प्रेम असले, तरी क्षणभरासाठी कर्णाचे रूप पाहून तिचे मन पाघळले होते आणि तो जर सहावा पती असता तर, असा विचार काही निमिषासाठी तरी तिच्या मनात आला होता हे रहस्य ती सांगते.&lt;/p&gt;
&lt;p&gt;द्रौपदीने हे अत्यंत कठीण सत्य रहस्य कथन करताच ते जांभूळ पुन्हा झाडाला घट्ट चिकटते आणि पांडवांवरचे शापाचे संकट टळते. श्रीकृष्ण अंतर्धान पावतात, पांडव पुढच्या मार्गावर निघतात. ही लोककथा म्हणजे जांभूळ आख्यान! ह्या कथेत एक रुपक दडलेय. जांभूळ खाल्ल्यावर जशी जीभ जांभळी होते आणि तो डाग लपवता येत नाही, तसेच माणसाच्या मनात दडलेले पाप किंवा रहस्य कधी ना कधी समोर येतेच.&amp;nbsp;लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी या आख्यानाचा प्रयोग करताना शेवटी प्रेक्षकांना जांभूळ देऊन सांगायचे, &quot;द्रौपदीला दोष देण्याआधी हे फळ खा. जर तुमची जीभ जांभळी झाली, तर समजून घ्या की तुमच्या मनातही असे एखादे रहस्य दडलेले आहे, जे तुम्ही जगाला सांगू शकत नाही&quot;&lt;/p&gt;
&lt;p&gt;आता सोशल मीडियावर जांभूळ आणि जांभळाची जास्तीची फळउत्पत्ती ह्याविषयी लिहिताना दुष्काळ, पर्यावरण, वृक्षतोड, जमीनीचा ऱ्हास आदी बाबींवर लोक व्यक्त होताना दिसताहेत. खरे तर ह्यात अनेक लोक असे आढळले की जे मधल्या काळात राज्यात देशात झाडे तोडताना मौन बसून होते! अनेक टेकड्या खोदून खाणींसाठी आंदण देताना गप्प होते! जंगले कापली जात असताना, नद्यांच्या काठावरची बेसुमार वाळू उपसली जात असताना मौन राहिले!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;पर्यावरणाविषयी शून्य आत्मीयता असणारे आणि आपल्या विचारधारेचे लोक जे काही विध्वंस करतील त्याविषयी चकार शब्द देखील न बोलणारे ह्या जांभूळ ट्रेंडमध्ये सामील होऊन पर्यावरण कसे संकटात आले आहे, झाडे कशी कमी होत आहेत, निसर्गाचा समतोल कसा बिघडत आहे आदीविषयी बोलताना दिसले! ढोंगी दुटप्पीपणाचे नवल वाटते! ज्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात एकही झाड लावले नसेल अशीही माणसं ह्यावर बोलली असतीलच की! असो! &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;जांभूळ खाल्ल्यावर जीभ जांभळी होते, तो डाग लपवता येत नाही! मनातल्या गोष्टी बाहेर येतातच! तसे काही तरी सोशल मीडियावरच्या जांभळाबाबत असायला हवे होते! म्हणजे जे एरव्ही झाडे, जंगल, टेकड्या, नद्या, पर्यावरण ह्याविषयी आत्मीयता नसणाऱ्या माणसाने अशी पोस्ट लिहिली की तिच्या अक्षरांचा फॉन्ट काळ्या रंगात न राहता ती अक्षरे आपसूक जांभळी व्हायला हवी होती! मग किती लोकांनी ही जांभूळ दुष्काळाची पोस्ट लिहिली असती?&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;'जांभूळ आख्यान' सारखं ह्या सोशल व्हायरल जांभूळ स्टोरीबाबत घडलं असतं तर अनेकांचे चेहरे उघडे पडले असते! जांभूळ स्टोरीच्या अनुषंगाने लिहित असताना निसर्ग, पर्यावरण ह्याबाबत व्यक्त व्हायचे असेल तर आपल्या आवडत्या लोकांनी, आवडत्या नेत्यांनी, आवडत्या राजकीय विचारांच्या महापुरुषांनी माती खाल्ली तर तेव्हाही आपण बोलत असू, आपण पर्यावरण प्रेमी असू, आपण झाडे लावलेली आणि वाचवलेले असतील तरच जांभूळ स्टोरी लिहावी! जांभळाचे आभाळ कुणीही हाणेल!&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/06/14/994a60823a2d05bc77396ed2c0d20ca217814468739121002_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान! महाभारतातील द्रौपदीचं ते सत्य अन् पांडवांचा संभाव्य शाप वाचला]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/jambhul-akhyan-viral-drought-debate-and-the-jambhul-akhyan-draupadi-truth-from-mahabharata-and-the-curse-the-pandavas-escaped-1428054</link><comments>https://marathi.abplive.com/blog/jambhul-akhyan-viral-drought-debate-and-the-jambhul-akhyan-draupadi-truth-from-mahabharata-and-the-curse-the-pandavas-escaped-1428054#respond</comments><pubDate>Sun, 14 Jun 2026 18:32:24 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ करमणूक ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/jambhul-akhyan-viral-drought-debate-and-the-jambhul-akhyan-draupadi-truth-from-mahabharata-and-the-curse-the-pandavas-escaped-1428054</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Jambhul Akhyan:&lt;/strong&gt; सध्या जांभूळ ट्रेंडमध्ये आहे. बऱ्याच जणांनी त्याविषयी भाष्य केले आहे, काहींनी अंदाज वर्तवलेत तर काहींनी शास्त्रोक्त चिकित्सा केली आहे. त्या अनुषंगाने जांभुळाची ही एक वेगळी नोंद! आपल्यापैकी अनेकांना जांभूळ आख्यान ठाऊक असेलच. त्याचा ह्या नोंदीशी थेट संबंध आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;व्यासांच्या महाभारतात नसलेली मात्र महाभारतीय लोककथेत असलेली ही एक बोधकथा आहे. 'जांभूळ आख्यान' या कथेच्या नावाचा आणि 'जांभूळ' या फळाचा थेट, अतिशय महत्त्वाचा संबंध आहे; कारण ही संपूर्ण कथा एका जांभळाच्या फळाभोवती आणि त्यावरून समोर येणाऱ्या कटूसत्याभोवती फिरते. ह्या कथेमध्ये जांभूळ हे केवळ एक फळ नसून ते मानवी मनातील दडलेली रहस्ये आणि सत्य बाहेर आणण्याचे एक माध्यम ठरते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;महाभारतातील पांडवांच्या वनवास काळात, जंगलात एका झाडाला एक अतिशय मोठे, वैशिष्ट्यपूर्ण आणि रसरशीत जांभळाचे फळ लटकलेले असते. एका ऋषींच्या बारा वर्षांच्या घोर तपस्येचे फळ असणारे जांभूळ खास त्यांच्यासाठीच राखून ठेवलेले असते. अन्य कुणालाही त्याला हात लावण्याची वा तोडण्याची अनुमती नसते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;भटकंती करत तिथे आलेले पांडव आणि द्रौपदी ते रसरशीत जांभूळ पाहून स्तब्ध होतात, द्रौपदी तर मोहित होते! मागचा पुढचा कोणताही विचार न करता जांभळाच्या मोहात पडलेली द्रौपदी ते जांभूळ तोडते. जांभूळ तोडल्याचे ऋषींना कळले तर ते शाप देतील ह्याची शाश्वती असणारे श्रीकृष्ण निमिषार्धात प्रकटतात.&lt;/p&gt;
&lt;p&gt;द्रौपदीने जे जांभूळ तोडलेले आहे ते किती विशेष आहे आणि ते जांभूळ तोडण्याचे दुष्परिणाम श्रीकृष्ण सांगतात. प्रकट होतात आणि सांगतात की, जर सर्वांनी आपले पूर्ण सत्य आणि मनात दडलेली गुप्त रहस्ये जाहीरपणे कबूल केली, तरच हे जांभूळ पुन्हा झाडाला जाऊन चिकटेल आणि ऋषींच्या संभाव्य शापापासून पांडव वाचतील.&amp;nbsp; &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;श्रीकृष्णांनी वास्तव सांगतात पांडव आधी संभ्रमात पडतात मात्र वास्तव जाणून घेत भानावर येतात आणि एकेक करून ते पाचही जण यास राजी होतात. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव एकेक करून आपल्या मनातील सुप्त इच्छा आणि सत्य सांगतात. प्रत्येक पांडवाने सत्य बोलल्यावर ते जांभूळ जमिनीवरून हळूहळू वर सरकते.&lt;/p&gt;
&lt;p&gt;पाचही पांडवांनी आपलं रहस्य सांगूनदेखील जांभूळ पूर्णतः झाडाला मूळ जागी चिकटत नाही, मात्र जवळ जाऊन टेकतं! श्रीकृष्ण अधीर होऊन द्रौपदीकडे पाहतात आणि तिने पुढे होऊन तिच्या मनातले रहस्य सांगितल्याशिवाय जांभूळ पहिल्यासारखे मूळ जागेवर चिकटणार नाही हे नजरेनेच सांगतात.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मनातला संभ्रम दूर सारून द्रौपदीला तिच्या मनातील सर्वात मोठे रहस्य सांगावे लागते. ती कबूल करते की, तिचे पाच पतींवर प्रेम असले, तरी क्षणभरासाठी कर्णाचे रूप पाहून तिचे मन पाघळले होते आणि तो जर सहावा पती असता तर, असा विचार काही निमिषासाठी तरी तिच्या मनात आला होता हे रहस्य ती सांगते.&lt;/p&gt;
&lt;p&gt;द्रौपदीने हे अत्यंत कठीण सत्य रहस्य कथन करताच ते जांभूळ पुन्हा झाडाला घट्ट चिकटते आणि पांडवांवरचे शापाचे संकट टळते. श्रीकृष्ण अंतर्धान पावतात, पांडव पुढच्या मार्गावर निघतात. ही लोककथा म्हणजे जांभूळ आख्यान! ह्या कथेत एक रुपक दडलेय. जांभूळ खाल्ल्यावर जशी जीभ जांभळी होते आणि तो डाग लपवता येत नाही, तसेच माणसाच्या मनात दडलेले पाप किंवा रहस्य कधी ना कधी समोर येतेच.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी या आख्यानाचा प्रयोग करताना शेवटी प्रेक्षकांना जांभूळ देऊन सांगायचे, &quot;द्रौपदीला दोष देण्याआधी हे फळ खा. जर तुमची जीभ जांभळी झाली, तर समजून घ्या की तुमच्या मनातही असे एखादे रहस्य दडलेले आहे, जे तुम्ही जगाला सांगू शकत नाही&quot;&lt;/p&gt;
&lt;p&gt;आता सोशल मीडियावर जांभूळ आणि जांभळाची जास्तीची फळउत्पत्ती ह्याविषयी लिहिताना दुष्काळ, पर्यावरण, वृक्षतोड, जमीनीचा ऱ्हास आदी बाबींवर लोक व्यक्त होताना दिसताहेत. खरे तर ह्यात अनेक लोक असे आढळले की जे मधल्या काळात राज्यात देशात झाडे तोडताना मौन बसून होते! अनेक टेकड्या खोदून खाणींसाठी आंदण देताना गप्प होते! जंगले कापली जात असताना, नद्यांच्या काठावरची बेसुमार वाळू उपसली जात असताना मौन राहिले!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;पर्यावरणाविषयी शून्य आत्मीयता असणारे आणि आपल्या विचारधारेचे लोक जे काही विध्वंस करतील त्याविषयी चकार शब्द देखील न बोलणारे ह्या जांभूळ ट्रेंडमध्ये सामील होऊन पर्यावरण कसे संकटात आले आहे, झाडे कशी कमी होत आहेत, निसर्गाचा समतोल कसा बिघडत आहे आदीविषयी बोलताना दिसले! ढोंगी दुटप्पीपणाचे नवल वाटते! ज्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात एकही झाड लावले नसेल अशीही माणसं ह्यावर बोलली असतीलच की! असो!&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;जांभूळ खाल्ल्यावर जीभ जांभळी होते, तो डाग लपवता येत नाही! मनातल्या गोष्टी बाहेर येतातच! तसे काही तरी सोशल मीडियावरच्या जांभळाबाबत असायला हवे होते! म्हणजे जे एरव्ही झाडे, जंगल, टेकड्या, नद्या, पर्यावरण ह्याविषयी आत्मीयता नसणाऱ्या माणसाने अशी पोस्ट लिहिली की तिच्या अक्षरांचा फॉन्ट काळ्या रंगात न राहता ती अक्षरे आपसूक जांभळी व्हायला हवी होती! मग किती लोकांनी ही जांभूळ दुष्काळाची पोस्ट लिहिली असती?&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;'जांभूळ आख्यान' सारखं ह्या सोशल व्हायरल जांभूळ स्टोरीबाबत घडलं असतं तर अनेकांचे चेहरे उघडे पडले असते! जांभूळ स्टोरीच्या अनुषंगाने लिहित असताना निसर्ग, पर्यावरण ह्याबाबत व्यक्त व्हायचे असेल तर आपल्या आवडत्या लोकांनी, आवडत्या नेत्यांनी, आवडत्या राजकीय विचारांच्या महापुरुषांनी माती खाल्ली तर तेव्हाही आपण बोलत असू, आपण पर्यावरण प्रेमी असू, आपण झाडे लावलेली आणि वाचवलेले असतील तरच जांभूळ स्टोरी लिहावी! जांभळाचे आभाळ कुणीही हाणेल!&amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;- समीर गायकवाड&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/06/14/33c0d3f5203d7dfc9263be4e314f980c17814421151911063_original.jpg" width="220"/></item></channel></rss>