<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं...; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली "आशा''</title><atom:link href="https://marathi.abplive.com/blog/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Fri, 15 May 2026 20:26:47 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[आपण 'सोडून द्यायला' कधी शिकणार?]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/lifestyle-daily-routine-blog-by-by-ashwin-bapat-1424155</link><comments>https://marathi.abplive.com/blog/lifestyle-daily-routine-blog-by-by-ashwin-bapat-1424155#respond</comments><pubDate>Fri, 15 May 2026 11:04:41 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अश्विन बापट, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/lifestyle-daily-routine-blog-by-by-ashwin-bapat-1424155</guid><description><![CDATA[&lt;p&gt;आपण सोडून द्यायला कधी शिकणार? या शीर्षकातला हा प्रश्न खरं तर मी स्वत:ला विचारतोय आणि आपल्या सर्वांसमोर मांडतोय. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अनेक अनुभव येत असतात. आनंददायी, दु:खदायी, वेदनादायी, काही बोच देणारे तर काही मन दुखावणारेही असतात. यामध्ये काही पराकोटीचा राग आणणारे असतात तर, काहीवेळा आपण उगाचच एखाद्या गोष्टीचा फार बाऊ करतो किंवा मनाला लावून घेतो, म्हणूनही आपल्याला येत असतात. म्हणूनच हास्यजत्रामधील समीर चौघुलेंच्या लोचन मजनू कॅरेक्टरच्या भाषेत सांगायचं झालं तर राहून राहून यही प्रश्न उरताहै रसिकहो...क्या है...गुस्सा? आणि त्यात अॅड करावंसं वाटतं क्यूँ है यह गुस्सा ? अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर आपण कधी कधी हर्ट होतो, कधी ती प्रचंड मनाला लावून घेतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मग एखादी गोष्ट आपल्याला आधी कळली नाही म्हणून किंवा एखादी गोष्ट आपल्याला नकोय तरीही घडली म्हणून किंवा एखादी गोष्ट आपण न करण्यास सांगितल्यावरही घडली म्हणूनही राग येऊ शकतो. यामध्ये काही वेळा आपल्या मनाविरुद्ध घडल्याची सल असते तर काही वेळा आपला स्वाभिमान (की अहंकार?) दुखावल्याची रुखरूख असते. खरंच इतका ताण घ्यायची आणि द्यायचीही गरज असते का? याचं उत्तर अजिबात नाही असंच आहे. सध्याच्या धकाधकीच्या काळात आठ ते दहा तास आपण किंवा कदाचित त्याहीपेक्षा जास्त तास घरापासून, कुटुंबापासून दूर असतो.या कुटुंबात आईवडील, भावंडं, बायको, मुलं सारेच असतात. ही आपली सपोर्ट सिस्टीम असते. ती आपल्याला कधी कधी आठवड्यात काही वेळ किंवा काही मिनिटंच भेटत असते. म्हणजे सकाळी ८.३० ला स्कूलबस येणाऱ्या मुलांचे सेकंड शिफ्ट करणारे आईवडील त्यांना दिवसाला फक्त ४५ मिनिटं भेटतात. सकाळी साडेसातला तुम्ही उठलात की मुलांची शाळेची तयारी. मुलांची ८.१५ ते ८.३० दरम्यान स्कूल बस येते. मग मुलं शाळेमध्ये. दुपारी साडेतीनच्या सुमारास घरी जेव्हा ही बच्चेकंपनी घरी परतते तेव्हा तुम्ही ऑफिसकडे निघालेले असता. रात्री १२ नंतर तुम्ही घरी परतता तेव्हा मुलं गाढ झोपलेली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;ही झाली मुलांबद्दलची कथा तर दुसरीकडे तळहाताच्या फोडांप्रमाणे आपल्याला जपणाऱ्या आईवडीलांनाही त्यांच्या उतारवयात आपण हवा तेवढा वेळ देऊ शकत नाही. आपल्या मुलांना काय किंवा आईवडिलांना काय इतकंच काय नवरा-बायकोही एकमेकांना पाहिजे तसा वेळ देऊ शकत नाहीत. ही जरी आपली अपरिहार्यता असली तरी म्हणूनच जेवढा वेळ आपल्याला कुटुंबासोबत आपल्या माणसांसोबत मिळतो, तो क्वालिटी टाईम आपण खरंच प्रत्येक मिनिट भरभरून जगून केला पाहिजे. त्यातही एकमेकांच्या कुरबुरी काढणं, तू असंच बोललास, ती असंच म्हणाली, हे टाळायला हवं. त्याच वेळी भूतकाळात घडलेल्या काही जखमांच्या खपल्या पुन्हा पुन्हा काढून आपण वर्तमान आणि कदाचित भविष्यावरही का घाव घालायचा बरं? &amp;nbsp;आपला अहंकार, स्वाभिमान इतका टोकदार झालाय की, आपल्याला लगेच राग येतो. &amp;nbsp;हे टाळलंच पाहिजे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;मुलं काय किंवा आईवडील काय....किंवा अगदी नवरा-बायको काय...सर्वच नात्यात एकमेकांकडून हवे असतात दोन आपुलकीचे शब्द. तेव्हाही जर तुम्ही एकमेकांची किंवा बाहेरच्या कुणाची तरी उणीधुणी काढून त्यावर चर्चा किंवा वाद घालत बसलात तर तुमच्या हक्काचा क्वालिटी टाईम तुम्हीच नासवताय. वेळ ही कापरासारखी असते. निसटून जाते. भुर्ऱकन उडून जाते. त्यात मोबाईल नावाच्या यांत्रिक सदस्याची कुटुंबात केव्हा एन्ट्री झाली आणि केव्हा तो फॅमिलीतला एक होऊन केला ते कळलंही नाहीये. या मोबाईलवरही दिवसातला आपला बराच वेळ जातो. म्हणजे कामाबद्दलचे ग्रुप्स आणि मेसेजेस बाजूला ठेवले तरी आपला दिवसाचा स्क्रीन टाईम किती असावा, याचाही आपण विचार कळण्याची वेळ आलीय. या मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळे, मेंदूवर होणारे परिणाम, मानसिक आरोग्यावर होणारे आघात याबद्दल तज्ज्ञ नेहमीच पोटतिडकीने सांगत असतात. या मोबाईलमुळेच जग जवळ आलंय. पण,माणसं लांब जातायत का? प्रत्यक्ष संवादाचं नेटवर्क तुटत चाललंय का? आपण स्वत:ला तटस्थपणे प्रश्न करायला हवेत. म्हणून म्हणतो, आपण झालं गेलं सोडून द्यायला हवं. एकमेकांशी बोलताना प्रत्येकानेच भान ठेवायला हवं. प्रत्येकाचा मान राखायला हवा, हे जरी खरं असलं तरीही तीच तीच गोष्ट मग अगदी १०-१२ वर्षांपूर्वी घडलेली असली तरी तुम्ही उगाळत बसलात तर तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य तुम्ही गमावून बसता. घरचं वातावरण कलुषित होतं. आयुष्य हातून निसटायला लागतं. त्यापेक्षा 'शो मस्ट गो ऑन' या बाण्याने पुढे जात राहावं. समोरच्याचा एखाद-दुसरा चुकीचा शब्द विसरून जावा किंवा त्याकडे दुर्लक्ष करावं. हातात आहेत ते क्षण भरभरून जगावेत. या लेखाच्या शीर्षकातला प्रश्न मला कुणालाही विचारायचा नाहीये. आपण प्रत्येकाने स्वत:च आपल्याला विचारून पाहायचाय. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकरांनी म्हटलंय ना...सांगा...कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा...&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/15/e4650c89922735bf60496d9f4438696b1778823247034987_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Art of Living's 45th Anniversary: जीवनाला उत्सव बनवणारा अवलिया!]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/gurudev-sri-sri-ravi-shankar-70th-birthday-and-art-of-living-45th-anniversary-blog-post-1424054</link><comments>https://marathi.abplive.com/blog/gurudev-sri-sri-ravi-shankar-70th-birthday-and-art-of-living-45th-anniversary-blog-post-1424054#respond</comments><pubDate>Thu, 14 May 2026 15:36:57 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ कुमकुम नरेन ]]></dc:creator><category><![CDATA[ धार्मिक ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/gurudev-sri-sri-ravi-shankar-70th-birthday-and-art-of-living-45th-anniversary-blog-post-1424054</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Art of Living's 45th Anniversary:&lt;/strong&gt; प्रत्येकाला जीवनात आनंद हवा असतो पण तो मिळवायचा आणि टिकवायचा कसा हे मात्र समजत नाही. त्यासाठी कोणी मार्गदर्शक हवा असतो. माझ्या सुदैवाने तो मला 25 वर्षांपूर्वी लाभला आणि माझे जीवनच बदलून गेले. मी 'जीवन जगण्याची कला' अर्थात 'आर्ट ऑफ लिव्हिंग' शिकले. 2001 साली मी 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चा पहिला कोर्स केला. तो सहा दिवसांचा होता, एकूण 20 तास. पण तो केल्यावर मला जाणवले की वयाच्या 36 व्या वर्षी माझा पुनर्जन्म झाला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;चार वर्षांचा आजार बरा झाला&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्या कोर्सच्या काळात माझी चार वर्षे साथ देणारी व्याधी अगदी सहज अदृश्य झालीच, पण त्याचबरोबर जीवनाची एक अवर्णनीय अनुभूति आली. आजवर कधीही न अनुभवलेला एक वेगळ्याच उच्च पातळीचा आनंद प्राप्त झाला. 'सुदर्शन क्रिया' केल्यावर स्वतःचे आणि एकूणच या जीवनाचे एक अभूतपूर्व दर्शन झाले. आणि त्यानंतर नियमित साधना आणि गुरुवचनांचा अभ्यास यामुळे सगळे आयुष्यच एका अद्भुत चमत्कारासारखे भासू लागले.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;45-70 उत्सव एक अद्वितीय पर्वणी&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;1981 मध्ये श्री श्री रवि शंकर यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग ची स्थापना केली तेव्हा ते 25 वर्षांचे होते. आता 2026 मध्ये 13 मे रोजी गुरूदेव 70 वर्षांचे होतील आणि संस्था 45 वर्षांची. या केवळ 45 वर्षांत गुरुदेवांच्या ध्येयासक्तीमुळे, दैवी शक्तीमुळे आणि अखंड परिश्रमांमुळे ही संस्था 182 देशांमध्ये पसरलेली जगातील सर्वात मोठी सेवाभावी चळवळ आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कोट्यावधी लोकांनी गुरुदेवांच्या अतिशय व्यावहारिक आणि परिणामकारक ज्ञानाला आत्मसात करून आपले जीवन सहज, आनंदी आणि अद्भुत बनवले आहे. 'सुदर्शन क्रिया' ही एक अतिशय सहज आणि सुलभ श्वसन प्रक्रिया आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करून स्वतःचे आणि त्याचबरोबर स्व&amp;zwj;कीयांचे जीवन आनंदोत्सवी बनवले आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;विश्व विकास हेच ध्येय&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पण व्यक्ती विकास आणि व्यक्तीच्या अपार क्षमतांची जाणीव करून देणे एवढेच गुरुदेवांचे लक्ष्य नाही. व्यक्ती विकासातून समाज विकास आणि समाज विकासातून विश्व विकास हे त्यांचे ध्येय आहे. त्यासाठी त्यांनी आपल्याला लाभलेल्या दैवी ज्ञानाचा अविरत प्रसार करण्यासाठी ही संस्था जोपासली आणि वाढवली आहे. त्यांचे ज्ञान आणि सेवाकार्य सर्वदूर पोचावे यासाठी जगभरात चाळीस हजाराहून अधिक प्रशिक्षक आणि लाखो स्वयंसेवकांची फौज तयार केली आहे. समाजाच्या स्वास्थ्यासाठी उपयुक्त असे हजारो प्रकल्प जगभर सुरु केले आहेत.&lt;br /&gt;&amp;nbsp; &amp;nbsp;&amp;nbsp;&lt;br /&gt;शिक्षण, पर्यावरण संवर्धन, नद्यांचे पुनरुज्जीवन, नैसर्गिक शेती, कारागृहातील कैद्यांचे मानसिक संगोपन, युद्धावरून परतलेल्या सैनिकांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सांभाळणे, इत्यादी अनेक क्षेत्रांमधील आपल्या सर्वांगीण कार्याद्वारे संस्थेने समाजावर टाकलेल्या प्रभावाची आकडेवारी आणि यादी किती करावी तेव्हढी अपुरीच राहणार आहे. तरी ही आकडेवारी &amp;nbsp;&amp;lsquo;शाश्वत समाज विकासासाठी 'व्यक्तीचे सक्षमीकरण' हाच मूलाधार असतो&amp;rsquo;, या 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब आहे. गुरूदेव म्हणतात, &amp;ldquo;आनंदी माणसेच आनंदी समाजांची निर्मिती करतात.&amp;rdquo;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;गुरुदेव श्री श्री रवि शंकर पुढे म्हणतात&lt;/strong&gt;: &quot;जेव्हा सर्व काही सुरळीत चालू असते, तेव्हा स्मितहास्य करणे ही काही विशेष गोष्ट नाही; परंतु संघर्ष आणि अराजकतेच्या परिस्थितीतही तुम्ही सहजतेनं मंद स्मित करू शकाल, तरच तुम्ही खऱ्या अर्थाने 'जगण्याची कला' (The Art of Living) शिकले आहात.&quot;&lt;br /&gt;सध्याचा काळ वाढता जागतिक तणाव, वैयक्तिक आणि सामाजिक संघर्ष आणि तीव्र अशांततेचा आहे. अशा वेळी शांततेचा संदेश पूर्वीपेक्षाही अधिक स्पष्टपणे ऐकला जाणे नितांत गरजेचे आहे. म्हणूनच, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या वर्षीच्या आनंद उत्सवांना एक नवा अर्थ प्राप्त झाला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;शांतता आणि सामायिक मानवतेचा संदेश&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हे उत्सव आशा, शांतता आणि सामायिक मानवतेचा संदेश घेऊन आले आहेत. स्वतःशीच संघर्ष करणाऱ्या मानवतेला खऱ्या अर्थाने सामर्थ्य प्रदान करण्याची क्षमता केवळ अध्यात्मामध्येच आहे. लोकांमध्ये पुन्हा सुबुद्धी आणि आपलेपणाची भावना अध्यात्मच जागृत करू शकते. केवळ स्वतःच्या हिताचा विचार करण्याऐवजी इतरांची सेवा करण्यास तत्पर असणारे सर्वसमावेशी हृदय केवळ अध्यात्मानेच शक्य आहे. आणि 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या ४५ व्या वर्षांच्या उत्सवाचा हाच नेमका गाभा आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गेल्या 45&amp;nbsp; वर्षांत 'दी आर्ट ऑफ लिव्हिंग'ने पर्यावरण संवर्धन, आपत्ती निवारण, आघातांमुळे येणाऱ्या तणावापासून मुक्ती, सर्व दूर सर्वांगीण शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांतील असंख्य समाजसेवा उपक्रमांद्वारे जगभरातील कोट्यावधी लोकांची सेवा केली आहे. इतकेच नव्हे तर प्रभावी आणि विज्ञाननिष्ठ श्वसनतंत्रे व ध्यानसाधनेच्या माध्यमातून 80 कोटींहून अधिक लोकांना त्यांच्या अंतर्मनातील आनंद आणि शांतीशी जोडण्यास मदत केली आहे. परिणामी, आज हे लोक अधिक आनंदी, अधिक समाधानकारक आणि निरोगी आयुष्य जगत आहेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;भारतामध्ये अतिशय दुर्गम ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये संस्थेतर्फे 1327 मोफत शाळा चालवल्या जातात. या शिक्षणाद्वारे १.२० लाखांहून अधिक मुलांपर्यंत शिक्षणाचा प्रकाश पोचतो. देशातील 75 हून अधिक नद्या आणि जलस्रोतांच्या संस्थेच्या वतीने केलेल्या पुनरुज्जीवनामुळे जवळपास साडेतीन कोटी लोकांना लाभ झाला आहे. 'प्रिझन स्मार्ट' उपक्रमाद्वारे पुनर्वसन झालेले हजारो कैदी असोत, किंवा नैसर्गिक शेती पद्धतींद्वारे प्रशिक्षित केलेले लाखो शेतकरी असोत, अशा सामान्य लोकांनीच या संस्थेचे कार्य प्रामुख्याने पुढे नेले आहे. हे यामुळेच शक्य झाले कारण त्यांनी काहीतरी असाधारण करण्याची तयारी दाखवली.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;'आर्ट ऑफ लिव्हिंग सोशल प्रोजेक्ट्स' विभाग सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणसंबंधी आव्हानांवर सर्वांगीण उपाय देऊ करतो. आमचे कार्य स्थानिक समुदायांशी असलेल्या भक्कम भागीदारीमध्ये रुजलेले आहे. त्याचबरोबर विविध कॉर्पोरेशन्स, शासकीय कार्यालये, अशासकीय संस्था (NGOs), विकास संस्था आणि सामाजिक प्रतिष्ठाने यांच्या सहयोगातून ते अधिक बळकट झाले आहे. आमचा दृष्टीकोन अखिल भारतात विस्तारलेला आहे त्यायोगे आम्ही सहयोगात्मक दृष्टिकोन, क्षमता-वृद्धीचे प्रभावी कार्यक्रम आणि विस्तारक्षम कार्यप्रणालींच्या माध्यमातून समाजावर सशक्त आही सकारात्मक प्रभाव पडणारे उपक्रम राबवतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पण हे झाले समाजासाठी राबवलेले प्रकल्प. याशिवाय आर्ट ऑफ लिव्हिंगचे विविध कोर्स करून आपले जीवन अतिशय समृद्ध, सशक्त आणि आनंदी केलेल्या करोडो लोकांनी या अद्भुत ज्ञानाच्या आधारे आपल्या सभोवतालचे वातावरण अधिक सकारात्मक व्हावे यासाठी सतत कार्य चालू ठेवले आहे. सध्याच्या सामाजिक वातावरणात अशा सकारात्मकतेची नितांत आवश्यकता आहे. गुरूदेव म्हणतात, &amp;ldquo;या ज्ञानाद्वारे तुम्हाला जीवन अधिक आनंदी झाल्याचे जाणवले असेल तर मग या ज्ञानज्योतीने आपल्या भोवतालच्या किमान दहा दिव्यांना तरी प्रज्वलित करा. असे करत राहाल तर हा ज्ञानप्रकाश हळू हळू सर्वदूर पसरेल आणि दुःखाच्या अंधाराचा संपूर्ण विनाश होईल.&amp;rdquo;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;जगभरात 182 देशांमध्ये प्रसार&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;स्वतः गुरूदेव या वयातही जगभर भ्रमण करून हा आनंदाचा ज्ञानसंदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवू पाहतात. संस्थेतर्फे चालवलेल्या सेवाप्रकल्पांचा आढावा घेतात आणि त्याला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देतात. जगभरात १८२ देशांमध्ये सर्व पातळींवरील लोकांमध्ये त्यांच्या प्रेमाची छाया पाहता येते. मला तरी सध्याच्या जगात त्यांच्याएवढा सर्वप्रिय आणखी कुणी दिसत नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गुरुदेवांना &amp;ldquo;शांतीचा देवदूत&amp;rdquo; असे संबोधले जाते. कोलम्बियापासुन ते श्रीलंका, ईशान्य भारत, उत्तर भारत आणि काश्मीर आदि अनेक भागातील गृहयुद्धे थांबवण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न सर्वाना माहित आहेत. युनो पासून ते दावोस पर्यंत; जगातल्या अनेक शिक्षण संस्थांपासून ते युद्धग्रस्त प्रदेशातील पीडीतांपर्यंत सर्व ठिकाणी त्यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रण असते आणि ते तिथे जाऊन देतात. त्याचबरोबर एका गावातल्या शेतकऱ्यापासून ते एखाद्या देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत सर्वांच्या दुःखांचे आणि अडचणींचे निवारणही करतात.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;रोज हजारो लोक त्यांचे दर्शन घेऊन तृप्त आणि आनंदी कसे होतात हे अनुभवायचे असेल तर त्यांच्या दैनंदिन सत्संगामध्ये जाऊन बसावे. आधुनिक सोशल मिडीयाच्या माध्यमातूनदेखील गुरूदेव sw लोकांना नेमके योग्य मार्गदर्शन करून त्यांचे दुःख निवारण कसे काय करतात, हा अभ्यासाचा विषय आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;जीवन समृद्ध होणार अनुभव&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आर्ट ऑफ लिव्हिंगध्ये आल्यापासून आधी गुरूदेवांचा शिष्य आणि मग त्यांच्या ज्ञानाला लोकांपर्यंत पोचवण्याचे त्यांचे एक साधन (हॅपीनेस प्रोग्राम प्रशिक्षक) या नात्यांनी माझे जीवन समृद्ध केले आहे. त्यांच्या ज्ञानाच्या मदतीने जीवनातील सर्व अडचणी सोप्या झाल्यात, सर्व दुःखे सुसह्य झालीत आणि सर्व संकटे आपसूकच विरून गेली आहेत. आनंदाची उच्च पातळी अनुभवता आली आहे. रोजचे अद्भुत चमत्कार आता अनुभवात येत नाहीत, कारण गुरुदेवांच्या आशीर्वादाने हे पूर्ण जीवनच एक चमत्कार बनून राहिले आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मी गुरूदेवांची ऋणी आहे, असे मला अजिबात वाटत नाही. कारण मी आणि गुरूदेव वेगळे कुठे आहोत?&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/14/03a7adddf75294ab416963627a3dc2a41778756799821381_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Tamil Nadu Government Formation: राज्यपालांच्या भूमिकेतून तामिळनाडू सत्तास्थापनेची दुसरी बाजू]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/tamil-nadu-government-formation-governor-rajendra-vishwanath-arlekar-thalapathy-vijay-tvk-blog-by-somesh-kolge-1423245</link><comments>https://marathi.abplive.com/blog/tamil-nadu-government-formation-governor-rajendra-vishwanath-arlekar-thalapathy-vijay-tvk-blog-by-somesh-kolge-1423245#respond</comments><pubDate>Fri, 8 May 2026 12:17:28 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सोमेश कोलगे ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/tamil-nadu-government-formation-governor-rajendra-vishwanath-arlekar-thalapathy-vijay-tvk-blog-by-somesh-kolge-1423245</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Tamil Nadu Government Formation:&lt;/strong&gt; 2026 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकांनंतर (Tamil Nadu Assembly Election 2026) कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने 'त्रिशंकू विधानसभा' निर्माण झाली. अशा परिस्थितीत सरकार स्थापनेचा दावा करणाऱ्या कोणत्याही पक्षाला आमंत्रित करण्यापूर्वी राज्यपालांनी 'स्पष्ट बहुमताचा' दस्तऐवजी पुरावा मागण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर विरोधकांकडून टीका करण्यात आली. प्रत्यक्षात राज्यपालांनी घेतलेली ही भूमिका पूर्णपणे वैध आणि घटनात्मक असू शकते. हा निर्णय केवळ त्यांच्या विवेकाधीन अधिकारांच्या चौकटीत बसणारा नाही, तर लोकशाही प्रक्रियेची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी आणि आमदारांच्या खरेदी-विक्रीसारख्या घोडेबाजाराला आळा घालण्यासाठी अत्यावश्यकही आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;तामिळनाडू विधानसभेतील सध्याचे संख्याबळ&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;1. विधानसभा एकूण सदस्यसंख्या : 234&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बहुमताचा आकडा : 118 आमदार&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;टीव्हीकेच्या आमदार : 108 सीट्स (थलपती विजय दोन जागेवर निवडून आले आहेत त्यामुळे 107)&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;काँग्रेसचे 5 आमदार जोडले तरी संख्या 112 होते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;म्हणजेच, बहुमतासाठी अजूनही 5 जागांची कमतरता आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;2. विजय आणि त्यांचे समर्थक माध्यमांद्वारे अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत की, राज्यपालांनी मूलभूत गणिताकडे दुर्लक्ष करावं. जर त्यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करून बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ देण्यात आला, तर त्यामुळे आमदारांची खरेदी-विक्री आणि अनैतिक पक्षांतराला प्रोत्साहन मिळू शकते. हा संभाव्य धोका या प्रकरणाची दुसरी बाजू आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;3. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांनी सरकार स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ असल्याचे सिद्ध करावे, अशी भूमिका घेतली असून, त्यांची भूमिकासुद्धा घटनात्मक आणि कायदेशीर दृष्ट्या योग्य आणि शहाणपणाची ठरू शकते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;4. विजय यांनी 118 आमदारांच्या समर्थनाची पत्रे सादर करणे आवश्यक आहे. यात नाराजी किंवा गोंधळ निर्माण करण्यासारखे काहीही नाही.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;राज्यपालांच्या भूमिकेचा घटनात्मक आधार&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;- भारतीय राज्यघटनेच्या कलम 164(1) नुसार मुख्यमंत्री नेमण्याचा अधिकार राज्यपालांकडे आहे. यामागील मूलभूत तत्त्व असे आहे की, ज्या व्यक्तीला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले जाते, त्या व्यक्तीकडे सभागृहातील बहुमत मिळवण्याची क्षमता आहे याबाबत राज्यपालांना वैयक्तिकरीत्या समाधान झाले पाहिजे. समाधानाच्या बाबतीत ही केवळ औपचारिकता नसते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;- त्रिशंकू विधानसभेच्या परिस्थितीत, राज्यपाल कलम 163(1) अंतर्गत विवेकाधीन अधिकार वापरून अशा व्यक्ती किंवा आघाडीची निवड करतात ज्यांच्याकडे &quot;सभागृहाचा विश्वास मिळवण्याची सर्वाधिक शक्यता&quot; असते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;- सर्वोच्च न्यायालयाने 'रामेश्वर प्रसाद विरुद्ध भारत सरकार' (2006) प्रकरणात स्पष्ट केलं होतं की, जर राज्यपालांना सरकार स्थापनेचा दावा करणारा पक्ष स्थिर सरकार देऊ शकणार नाही असं वाटत असेल, तर तो दावा नाकारण्याचा अधिकार राज्यपालांना आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;- स्पष्ट बहुमत नसलेल्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करून बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ देणं म्हणजे, प्रत्यक्षात घोडेबाजाराला निमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे राज्यपालांनी &quot;कागदोपत्री बहुमत&quot; मागणं हे प्रतिबंधात्मक पाऊल आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;- सध्याच्या परिस्थितीत TVK कडे 107 जागा आहेत, ज्या बहुमतासाठी आवश्यक 118 जागांपेक्षा कमी आहेत. त्यामुळे 'सर्वात मोठा पक्ष' म्हणून त्यांना कोणतीही तपासणी न करता आमंत्रित करणे हे सरकारची स्थिरता सुनिश्चित करण्याच्या राज्यपालांच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष ठरेल.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;एस. आर. बोम्मई निकालाचा अन्वयार्थ&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;- टीका करणाऱ्यांकडून अनेकदा एस. आर. बोम्मई विरुद्ध भारत संघ (1994) या प्रकरणाचा संदर्भ देत असा युक्तिवाद केला जातो आहे की, बहुमत सिद्ध करण्यासाठी सभागृहच एकमेव जागा आहे. मात्र, हा अर्थ पूर्णपणे अचूक नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;- या निर्णयामुळे मुख्यमंत्री नेमण्यापूर्वी राज्यपालांना आवश्यक तपासणी करण्यास बंदी येत नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भूमिका राज्यपालांच्या पूर्वअनुभवांवर आधारित&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;1. कर्नाटक (2004)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेस - जेडीएस आघाडीचे सरकार&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;2004 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. भाजपकडे 79 जागा, काँग्रेसकडे 65 आणि JD(S) कडे 58 जागा होत्या. राज्यपालांनी काँग्रेस-JD(S) आघाडीला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले कारण त्यांच्याकडे 123 जागांचे बहुमत होते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;2. &amp;nbsp;कर्नाटक (2008)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;2008 मध्ये भाजपने 110 जागा जिंकल्या. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप नेते बी.एस. येडियुरप्पा यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले. त्यांनी नंतर बहुमत सिद्ध केले.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;3. &amp;nbsp;कर्नाटक (2018)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला आमंत्रण पण सत्तास्थापनेत अपयशी&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;2018 मध्ये भाजपकडे 104 जागा, काँग्रेसकडे 78 आणि JD(S) कडे 37 जागा होत्या. निवडणूकीनंतर काँग्रेसने JD(S) ला समर्थन जाहीर केले होते. तरीही राज्यपालांनी प्रथम भाजपला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ दिला. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा विवेकाधीन अधिकार मान्य केला. पण सर्वोच्च न्यायालयाने तातडीने बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले. परिणामतः भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही सरकार स्थापन करू शकले नाहीत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;पुनर्निवडणुका आणि राजकीय अस्थिरता टाळण्याचा प्रयत्न&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;राज्यपालांच्या विवेकाधीन अधिकारांचा उद्देश वारंवार होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावांच्या अपयशामुळे निर्माण होणारी अस्थिरता रोखणे हा देखील आहे. जर सर्वात मोठ्या पक्षाला आमंत्रित करूनही तो बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरला, तर अखेरीस विधानसभा विसर्जन आणि पुनर्निवडणुकांची वेळ येऊ शकते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;संरक्षक म्हणून राज्यपालांची भूमिका&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;- राज्यपालांची भूमिका ही कलम 164 अंतर्गत एक संरक्षणात्मक उपाय आहे. सरकार स्थापनेच्या दाव्याची वैधता तपासण्याचा त्यांचा विवेकाधीन अधिकार हा 'रिव्हॉल्विंग डोअर पॉलिटिक्स'विरुद्ध एक महत्त्वाचा अडसर आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;- राज्यपाल केवळ सरकार स्थापनेचा दावा स्वीकारू शकत नाहीत. एकदा कागदोपत्री मान्यता मिळाल्यानंतर लहान पक्ष, अपक्ष आणि इतर पक्षांचे सदस्य खातेवाटप, मंत्रिपदे अशा बाह्य प्रभावांकडे आकर्षित होण्याची शक्यता वाढते. तो जनादेशाशी विश्वासघात ठरतो. त्यामुळे विजय यांनी सरकार स्थापनेसाठी आवश्यक संख्या सिद्ध करावी, ही राज्यपाल आर्लेकर यांची भूमिका घटनात्मक आणि कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे योग्य आहे.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/08/dcbf9da3597bd91065b605598228c4c0177822267218388_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : स्व-गणनेच्या माध्यमातून परिपूर्ण 'डेटा' संकलनाची सुवर्णसंधी सरकारने गमावली (?)]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/blog-by-sudhir-laxmikant-dani-on-self-enumeration-census-comprehensive-data-collection-india-1422666</link><comments>https://marathi.abplive.com/blog/blog-by-sudhir-laxmikant-dani-on-self-enumeration-census-comprehensive-data-collection-india-1422666#respond</comments><pubDate>Sun, 3 May 2026 21:09:06 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सुधीर दाणी ]]></dc:creator><category><![CDATA[ भारत ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/blog-by-sudhir-laxmikant-dani-on-self-enumeration-census-comprehensive-data-collection-india-1422666</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;BLOG :&lt;/strong&gt; भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या आणि भौगोलिक विविधता असलेल्या देशात 'डेटा' (Data) हा केवळ आकडा नसून तो विकासाचा कणा आहे. 'ज्याचा डेटा अचूक, त्याचा विकास वेगवान' हे 21 व्या शतकातील जागतिक सूत्र आहे. नुकतीच 'जनगणना 2027' ची प्रक्रिया सुरू झाली असून, त्याचा पहिला टप्पा म्हणून 'स्व-गणना' (Self-Enumeration) ही डिजिटल सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. तंत्रज्ञानाच्या युगात ही प्रक्रिया म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाचा आणि कुटुंबाचा 'मास्टर डेटाबेस' तयार करण्याची एक ऐतिहासिक संधी होती. मात्र, या प्रक्रियेतील प्रश्नांची व्याप्ती आणि दर्जा पाहता, सरकारने एक अत्यंत महत्त्वाची संधी गमावली असल्याचे खेदाने म्हणावे लागते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;India is good in planning but worst in implementation अशी भारताची देशात आणि विदेशात प्रतिमा निर्माण झालेली आहे यासाठी सर्वात कारणीभूत घटक कोणता असेल तर तो म्हणजे परिपूर्ण डेटाचा अभाव . याचे राज्यातील ताजे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे &quot;लाडकी बहीण योजना &quot;. सरकारकडे परिपूर्ण माहितीचा अभाव असल्याने तब्बल 60 लाख अपात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ वर्षभर उचलला आहे&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;नियोजनाचा पाया: डेटा की केवळ डोकी?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;भारतासारख्या महाकाय देशाच्या दृष्टीने जनगणना ही अत्यंत महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. त्याहून अधिक महत्त्वाची बाब ही की, जनगणना ही सातत्याने होणारी प्रक्रिया नाही. वर्तमान जनगणना तब्बल 15 वर्षांनंतर होते आहे. व्यक्ती, संस्था असो की राष्ट्र, भविष्याच्या नियोजनाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे योजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेला 'परफेक्ट डेटा'.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;वर्तमानात भारत आणि महाराष्ट्रात याचीच 'बोंब' आहे. म्हणूनच प्रत्येक नव्या योजनेच्या आधी सरकारला स्वतंत्र माहिती संकलन प्रक्रिया राबवावी लागते. कधी भटके कुत्रे गणना, कधी पशू गणना, कधी विद्यार्थी गणना, तर कधी 'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी पात्र लाभार्थी शोधण्याची धावपळ. यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि अफाट सार्वजनिक निधी खर्च केला जातो. भविष्यातील हा मनुष्यबळाचा आणि निधीचा अपव्यय टाळण्यासाठी सरकारने जनगणनेचा वापर 'एकात्मिक डेटाबेस' (Integrated Database) तयार करण्यासाठी करणे अपेक्षित होते. परंतु, प्रशासकीय आणि राजकीय असंवेदनशीलतेमुळे आपण या सुवर्णसंधीकडे पाठ फिरवल्याचे दिसते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;शिक्षकांचा बळी आणि शैक्षणिक दर्जावर परिणाम&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;वारंवार डेटा गोळा करण्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामाला जुंपले जात असल्याने त्याचा अत्यंत विपरीत परिणाम देशातील शिक्षण दर्जावर आणि विद्यार्थ्यांच्या 'लर्निंग आऊटकम'वर होतो आहे. जर 'स्व-गणना' प्रक्रियेतच सर्वसमावेशक प्रश्नांची मांडणी केली असती, तर नागरिकांनी स्वतःहून माहिती भरल्यामुळे शिक्षकांवरील हा भार कमी झाला असता आणि त्यांना वर्गात राहून गुणवत्तेवर लक्ष देता आले असते. अर्थात अजूनही सरकारला ही संधी सुधारण्याची संधी आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;स्व-गणना: एक तोकडा प्रयत्न?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सरकारने जारी केलेल्या जाहिरातीनुसार, नागरिकांना स्वतः संकेतस्थळावर जाऊन माहिती भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे पाऊल वेळेची बचत आणि अचूकतेसाठी स्वागतार्ह असले तरी, विचारले जाणारे प्रश्न अत्यंत प्राथमिक आहेत. जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नसून ती भविष्यातील 50 वर्षांच्या नियोजनाचा पाया असायला हवी. पण सध्याच्या स्वरूपावरून असे वाटते की, सरकार केवळ 'संख्या' मोजण्यात रस दाखवत आहे, नागरिकांचे 'जीवनमान' जाणून घेण्यात नाही.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;परिपूर्ण नियोजनासाठी 'या' माहितीचा अंतर्भाव हवाच:&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जर सरकारने स्व-गणनेच्या माध्यमातून खालील माहिती संकलित केली असती, तर आज भारताकडे जगातील सर्वात शक्तिशाली डेटाबेस असता:&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;1. एकात्मिक ओळख (Unified Identity)&lt;/strong&gt;: प्रत्येक सदस्याचा आधार क्रमांक, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट क्रमांक यांचा समावेश करून सर्व सरकारी कागदपत्रांचे एकत्रीकरण (Linking) करण्याची ही उत्तम वेळ होती. यामुळे 'एक नागरिक - एक डेटा' हे स्वप्न साकार होऊन भ्रष्टाचाराला आणि बोगस लाभार्थ्यांना कायमचा लगाम बसला असता.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;2. आरोग्य कुंडली (Health Profile)&lt;/strong&gt;: केवळ संख्या मोजण्याऐवजी, कुटुंबातील सदस्यांना असलेले गंभीर आजार (उदा. बीपी, मधुमेह, हृदयरोग), दिव्यांगत्वाचे नेमके स्वरूप आणि त्यांना आरोग्य विम्याचे कवच आहे का, याची माहिती गोळा केली असती तर सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि 'आयुष्मान भारत' सारख्या योजनांचे सूक्ष्म नियोजन (Micro-planning) करणे सहज शक्य झाले असते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;3. शिक्षण आणि कौशल्य मॅपिंग&lt;/strong&gt;: शिक्षण किती झाले, यासोबतच ते कोणत्या माध्यमात झाले आणि मुख्य म्हणजे संबंधित व्यक्तीकडे कोणते तांत्रिक कौशल्य (उदा. प्लंबिंग, कोडिंग, सुतारकाम) आहे, याची नोंद घेतल्यास 'स्कील इंडिया' मोहिमेला थेट डेटा मिळाला असता.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;4. पायाभूत सुविधांचे ऑडिट&lt;/strong&gt;: ज्या ठिकाणी नागरिक राहतात, तिथल्या सुविधांचे थेट 'ग्राऊंड रिपोर्टिंग' नागरिकांकडूनच करून घेता आले असते. रस्ते नेमके कोणते आहेत (कच्चे/डांबरी/सिमेंट)? जवळ सरकारी दवाखाना, शाळा किंवा मैदान आहे का? कचरा व्यवस्थापनाची स्थिती काय आहे? यावरून त्या भागाच्या विकासाचा खरा इंडेक्स समजला असता.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;5. हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापन&lt;/strong&gt;: सध्याच्या काळात वाढते पूर आणि चक्रीवादळे पाहता, घराचे बांधकाम कोणत्या प्रकारचे आहे आणि परिसरातील पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था कशी आहे, याचा डेटा आपत्ती व्यवस्थापनासाठी अत्यंत मोलाचा ठरला असता.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;6. पशु गणना आणि कृषी माहिती&lt;/strong&gt;: स्व-गणनेत पाळीव प्राणी (गाय, म्हैस, शेळी इ.) आणि शेतजमिनीचे क्षेत्र (जिरायती/बागायती) व सिंचनाचा प्रकार याची माहिती संकलित केल्यास कृषी धोरणे आखताना 'रिअल-टाइम' डेटा उपलब्ध झाला असता.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;7. कल्याणकारी योजनांचा मागोवा&lt;/strong&gt;: नागरिक केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणकोणत्या योजनांचा लाभ घेतात, याची माहिती दिल्यास भविष्यात योजनांचे दुवे जोडणे सोपे झाले असते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;तुलनात्मक वास्तव: खासगी क्षेत्र विरुद्ध सरकारी यंत्रणा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आज खासगी कंपन्या आपल्या आवडीनिवडीचा इतका सूक्ष्म डेटा गोळा करतात की, आपल्याला नेमकी कोणत्या गोष्टीची गरज आहे हे त्यांना आधीच समजते. याउलट, अब्जावधी रुपये खर्च करूनही सरकारकडे स्वतःच्या नागरिकांचा अद्ययावत डेटा उपलब्ध नसतो. अन्नसुरक्षा योजनेतील अपात्र लाभार्थी असोत किंवा मृत व्यक्तींच्या नावाने उचलली जाणारी पेन्शन, हे सर्व 'डेटा समन्वया'च्या अभावामुळे घडते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;'स्व-गणना' हा टप्पा म्हणजे नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळवण्याची मोठी संधी होती. मात्र, प्रशासकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे किंवा जुनाट विचारसरणीमुळे आपण या डिजिटल क्रांतीचा पूर्ण फायदा घेऊ शकलो नाही. तंत्रज्ञान उपलब्ध असूनही जर आपण फक्त प्राथमिक माहितीच गोळा करणार असू, तर &quot;योजनांचा सुकाळ, पण अंमलबजावणीचा दुष्काळ&quot; ही आपली प्रतिमा बदलणे कठीण जाईल. सरकारने अजूनही वेळ गेलेली नाही, हे ओळखून पुढील टप्प्यांत हा डेटा परिपूर्ण करण्यावर भर द्यावा. कारण डेटा हाच भविष्यातील विकासाचा खरा 'पासपोर्ट' आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सरकारने तातडीने डेटा संकलन सुवर्णसंधी दवडू नये आणि आपली चूक तातडीने सुधारावी हि विनंती आणि मागणी&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/03/bdfb049e8d22e245098efe8b5b647017177782273148093_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : निषेधाची अगरबत्ती..]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/blog-by-sameer-gaikwad-on-maharashtra-women-atrocities-ashok-kharat-case-sanjay-gaikwad-1422590</link><comments>https://marathi.abplive.com/blog/blog-by-sameer-gaikwad-on-maharashtra-women-atrocities-ashok-kharat-case-sanjay-gaikwad-1422590#respond</comments><pubDate>Sun, 3 May 2026 09:43:26 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/blog-by-sameer-gaikwad-on-maharashtra-women-atrocities-ashok-kharat-case-sanjay-gaikwad-1422590</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;BLOG :&lt;/strong&gt; बुवा बाबा बलात्कार करतो, तेव्हा समाजातला एक घटक लगेच त्याची बाजू घेऊन पोकळ युक्तिवाद करतो. म्हणजेच धार्मिक शेड्स असणाऱ्या कोणत्याही धर्माच्या नीच इसमाच्या मागे त्या समाजातला एक तरी हिस्सा कधी उघड तर कधी छुप्या पद्धतीने उभा असतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बलात्काराचा गुन्हा शाबित होऊन सजा भोगून बाहेर आलेल्या अधम पुरूषांचा सत्कार एका विशिष्ट विचारसरणीचे, पक्षाचे लोक करताना दिसतात. विशेष म्हणजे यांचा निषेध त्या विचारांच्या, त्या पक्षाच्या एकाही माणसाला यावर ब्र शब्द उच्चारावा असे वाटत नाही. ही नैतिकता हेच त्यांचे खरे चरित्र असते!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आमदारासारखे लोकप्रतिनिधी सामान्य माणसाला धमकावतात की तुझ्या आईला झ*, तुझ्या बहिणीला *वतो, बायकोचा फो* फाडतो.. तेव्हा पोलिस सांगतात की हा अदखलपात्र गुन्हा आहे. म्हणजेच सार्वजनिक रित्या बलात्कार करण्याची धमकी देणं गंभीर नाही, त्याने कुणाची आयमाय एक केली तरच कायद्याचे स्तंभन होणार! एरव्ही आरोपी गबरगंड असला की पोलिसांचे वीर्यपतन ठरलेलं असतं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ज्या जातीचा माणूस बलात्कारी असतो त्या जातीतले लोक लगेच त्याच्या बचावात उतरलेले असतात. अर्थात याला काही अपवाद आहेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अपराधी गुन्हेगार आपल्या आवडत्या पक्षाचा असेल तर त्या पक्षाचे समर्थक खुलेआमपणे त्याची बाजू घेताना दिसतात.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अपराधी इसमाविषयीचा समाजाचा तत्कालिक राग कमी होताच न्यायव्यवस्थेतले दलाल आधी साक्षीदार फोडतात, पुराव्यांशी छेडछाड करतात नि सरतेशेवटी पीडितेच्या कुटुंबियांना धमकावणे सुरू होते. त्यांना आमिष दाखवलं जातं. ठार मारण्याची भीती घातली जाते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;यावेळी त्यांच्या मागे सोशल मीडिया नसतो, पब्लिक नसतं, नातलग समाज कुणीही त्यांच्या मागे नसतं. मग ते हतबल होत जातात. त्यांचं खटल्याच्या सुनवणीस येणं रोडावत जातं. केस कमजोर होते. आरोपी निर्दोष सुटतो. बाहेर पडल्यावर त्याचं नरपुंगवांचं धाडस आणि सामाजिक वजन दोन्हीही वाढलेलं असतं.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एरव्ही रोज किमान शंभरेक बलात्कार घडत असतात तेव्हा समाज नावाचा सुस्त अजगर गप पडून असतो. ते बलात्कार दखलपात्र नसतात का? ज्या घटनेत काही तरी भयंकर, अमानुष, टोकाची विकृती दिसते त्या बाबतीत किंवा जातीधर्माचा टोकदार ॲंगल असेल तरच त्या प्रकरणाची हाईप तयार होते. कथित जनक्षोभ काही दिवसांसाठी उफाळून येतो. पुन्हा थंड पडतो. असेच एखादे अमानवी कृत्य उघडकीस येईपर्यंत हा पादरा जनक्षोभ गवताचे भारे बांधत पडून असतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपल्या नावडत्या पक्षाचे राज्य जिथे सत्तेत आहे तिथे घडणाऱ्या बलात्कारादि घटनांविषयी आकांडतांडव करणारे लोक आवडत्या पक्षाच्या राजवटीत कसलाही गुन्हा घडला तरी तोंड उघडत नसतात! हे आता अंगवळणी पडलंय!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;फक्त बोलण्यापुरता संताप व्यक्त करून स्त्रियांच्या चरित्राविषयी आपल्या अंतःकरणात खूप कणव आहे असे दाखवणारे अनेक जण अवघ्या काही तासांतच मूळ रंग दाखवत सोशल मीडियावर आईबहिण एक करताना दिसतात. वाट्टेल तशी शिवीगाळ करून स्त्रियांचे एक प्रकारे डिजिटल रेप करतात! हे सहज खपून जातं, आणि यात स्त्रियाही सामील असतात!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;इतकं सारं असूनही अलीकडील काळात बलात्कारासाठी स्त्रियांना दोषी धरण्याचे खूळ हेतूत: रूजवले जातेय. बायका कशा बदचलन होत चालल्यात याचा सतत भडीमार सुरू असतो. बायकांनी काय बोलावं, काय काम करावं, कसं राहावं, कोणते कपडे घालावेत अशा एक ना शंभर सूचनावजा आदेशांची भरमार असते! बंडूपासून ते *डूपर्यंतचे टगे मात्र मोकाट सोडलेले असतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बलात्काराच्या गुन्ह्यांत दोषी सिद्ध होऊन सजा लागण्याचे प्रमाण अल्प आहे. केसची सुनावणी काही दशके चालते. आरोपी ऐश करत राहतो, पीडितेला मात्र लोकांच्या हावरट नजरांचा रोज सामना करावा लागतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आयटीसेल सारखी विकृत पैदास पोसली जाते जी विरोधात व्यक्त होणाऱ्या स्त्रियांना बीभत्स, किळसवाण्या, गलिच्छ शिव्यांची लाखोली वाहत असते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बेसिकली आपण दांभिक झालो आहोत. बाई ही एक भोगवस्तू आहे हे आपल्याकडे अतिशय चतुराईने लोकमानसात बिंबवले गेलेय, आता त्यास विलक्षण बळकटी मिळतेय.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;वरवर हे सर्व भिन्न आणि लहानमोठे मुद्दे वाटतात मात्र याचा परस्परसंबंध आहे! या सर्व गोष्टींनी विकृत पुरूषांचे मनोबल वाढत असते. आपल्याला काही फरक पडत नसतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;थोडक्यात सांगायचे झाले तर बलात्कार ही अतिशय विकृत गंभीर आणि दुःखद गोष्ट आपण न्यू नॅार्मलवर आणून ठेवलीय. आणि त्याची फळे सत्तरीच्या वृद्धेपासून ते सात महिन्याच्या कोवळ्या बालिकेलाही भोगावे लागतायत!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पण आपल्याला काय त्याचं, आपली निषेधाची अगरबत्ती तर कालच लावून झालीय! आपलं महान कर्तव्य आपण चोख पार पाडलंय!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;- समीर गायकवाड&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/03/ddabc29bf10f3415bbfebaa1dcbf2d001777781547172358_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Moham Review: प्रेयसीचा खुन करण्याच्या विचारानं झपाटला; 1 तास 51 मिनिटांच्या फिल्ममध्ये माथेफिरू प्रेमाचा थरार]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/moham-review-dark-romance-thriller-1-hr-51-min-thriller-exposes-dark-side-of-toxic-love-1421721</link><comments>https://marathi.abplive.com/blog/moham-review-dark-romance-thriller-1-hr-51-min-thriller-exposes-dark-side-of-toxic-love-1421721#respond</comments><pubDate>Sun, 26 Apr 2026 10:45:59 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ नरेंद्र बंडबे ]]></dc:creator><category><![CDATA[ मूव्ही रिव्हिव्ह ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/moham-review-dark-romance-thriller-1-hr-51-min-thriller-exposes-dark-side-of-toxic-love-1421721</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Moham Review:&lt;/strong&gt; गेल्या काही वर्षांमध्ये टॉक्सिक मस्कुलॅनिटी दाखवणारे बरेच सिनेमे आले. अर्जुन रेड्डी (२०१७), एनिमल (२०२३) हे सर्वात जास्त चर्चिले गेले. यह मेरी बंदी है किंवा तू ही ज़रिया, तू ही मंजिल है, असं म्हणत तिला प्रेमात जकडायचं. हा सोयीस्कर पुरुषी प्रस्पेक्टिव्ह दिसतो. तिच्यावर याचा नक्की काय परिणाम होत असेल? या टॉक्सिक प्रेमाचा स्विकार - अस्विकार करताना ती नक्की कुठल्या मानसिक स्थितीतून जात असेल? याचं उत्तर हवं असेल तर फाजिल रजाकचा मोहम (२०२५) हा सिनेमा पाहायला हवा. नुकत्याच रशियात पार पडलेल्या ४८ व्या मॉस्को आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये मोहम (२०२५) सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरलाय. शिवाय अमृता कृष्णकुमारला सर्वोतम अभिनेत्रीचा पुरस्&amp;zwj;कार मिळाला. (Moham Review)&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;काय आहे कथानक?&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एक मानसिक संतुलन बिघडलेली मुलगी आणि नाकारणाऱ्या प्रेयसीचा खुन करण्याच्या विचारानं झपाटलेला एक माथेफिरु तरुण. असे दोघे एकत्र येतात. त्याला प्रेयसीला गोळ्या घालून ठार मारायचंय. त्यासाठी पिस्तुल हवंय. त्याचे पैसे जमवण्यासाठी तो या वेडसर मुलीची मदत घेतो.&amp;nbsp;या मुलीला म्हणजेच आमलाला स्कूटरबद्दल प्रचंड आकर्षण आहे. लहानपणी वडिलांच्या स्कूटीवर बसून तिनं सुंदर जग अनुभवलंय. शानू बेरोजगार आहे. त्याचं एका झोमॅटो डिलिव्हरी करणाऱ्या मुलीवर प्रेम आहे. शानू स्वकैंद्री आहे. आमलाच्या भूतकाळात घडलेल्या घटनांमुळं तिचं भान हरवलंय. पुढचं कथानक या दोघांच्या पिस्तुल मिळवण्याच्या प्रयत्नांचं आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;टॉक्सिक मस्कुलॅनिटीचा उतारा&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आमलाचा भूतकाळ आणि शानूचा वर्तमान दोन्हीची परिणिती सारखीच आहे. इथं फाजिल रजाकच्या मोहमची पोजिशन महत्वाची आहे. या दोन्ही मिसफिट कॅरेक्टर्सना क्लोजर देण्याच्या प्रक्रियेत फाजिलनं टॉक्सिक मस्कुलॅनिटीचा उदोउदो करणाऱ्यांना आरसा दाखवलाय.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;स्त्री आणि पुरुष प्रेम भावनेनं एकत्र येतात. या संबंधात &amp;nbsp;एकमेकांना पुरक राहणं अपेक्षित असतं. पण &amp;nbsp;पुरुषसत्ताक समाजात स्त्री-पुरुष संबंधात 'ती' हक्क गाजवण्याचं साधन ठरते. याने नातेसंबंधांचा समतोल बिघडतो आणि होत्याचं नव्हतं होतं. विस्कटतं. &amp;nbsp;हक्क गाजवणारा पुरुष तिचं नुकसान करतो. एखादी सामना करते . वेगळी होते. पण तेही त्याला पटत नाही. ती संपली तरच आपलं प्रेम संपेल अश्या मानसिकतेत तो येतो. मोहम याच सर्व बाजूंना अगदी सोप्प करुन दाखवतो. माथेफिरु प्रेम हे कधीच पॅशननेट नसतं. ते घाताकडे जाणारं असतं. सिनेमातून येणारं हे ग्लोरीफाईंग टॉक्सिक प्रेम घातक आहे. या टॉक्सिक मस्कुलॅनिटीचा उतारा फाजिल रझाकचा मोहम देतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/26/799018fa0aa373b3e9e32ae82ba4363417771804762671063_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG: आमदार संजय गायकवाड शिवीगाळ : काही निरीक्षणे]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/sanjay-gaikwad-shivaji-kon-hota-book-controversy-publisher-prashant-ambi-blog-by-wrighter-heramb-kulkarni-1421469</link><comments>https://marathi.abplive.com/blog/sanjay-gaikwad-shivaji-kon-hota-book-controversy-publisher-prashant-ambi-blog-by-wrighter-heramb-kulkarni-1421469#respond</comments><pubDate>Fri, 24 Apr 2026 12:27:55 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ हेरंब कुलकर्णी ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/sanjay-gaikwad-shivaji-kon-hota-book-controversy-publisher-prashant-ambi-blog-by-wrighter-heramb-kulkarni-1421469</guid><description><![CDATA[&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;gt;&amp;gt; हेरंब कुलकर्णी&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;1. महाराष्ट्रातील अनेक वर्षे गाजत असलेल्या पुस्तकाविषयी किंचितशी माहिती नसलेला लोकप्रतिनिधी महाराष्ट्रात आहे हे यातून दिसले... एकूणच साहित्यिक वैचारिक विश्व यापासून अनेक राजकारणी किती कोसो मैल दूर आहे. याचा अंदाज या निमित्ताने आला. जागतिक पुस्तक दिनाच्या रात्री या शिव्या दिल्या यातून राजकारण आणि पुस्तके हे अंतरही लक्षात आले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;2. गोविंद पानसरे यांच्या हत्येने महाराष्ट्रातील सामाजिक वर्तुळ आणि सामान्य माणसे व्यथित असताना त्यांच्याविषयी अत्यंत असंवेदनशील अनुदार उद्गार त्यांनी काढले. यावरून सामाजिक कार्यकर्त्यांविषयी किती अनादाराची आणि असंवेदनशील भावना अनेक राजकारण्यांच्या मनात असते हेही बघता आले...&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;3. मीडिया राजकारणी आणि सामाजिक संस्था पूर्वी अशा विषयावर जितक्या आक्रमक व्हायच्या त्या आता का दिसत नाही हा प्रश्न पडतो..? अजित पवार यांनी धरणात लघुशंका करण्याच्या विधानावर पूर्ण राजकीय वर्तुळ हलले होते... दादांच्या राजकारणाला त्या एका वाक्याने मोठा सेटबॅक बसला. बाळासाहेब ठाकरे यांनी पु. ल. देशपांडे, वसंत बापट यांच्याविषयी काढलेल्या अपमानकारक उद्गाराने तेव्हाचे युती सरकार बॅकफूटवर गेले होते... साहित्य संमेलनात गोंधळ झाला.. आज संजय गायकवाड आई वरून बायकोवरून ज्या शिव्या देतात त्या ऐकवत नाहीत... स्त्रियांविषयी किती हीन भावना मनात आहे. जीभ कापण्याची भाषा ते करतात... तरीही विरोधी पक्ष आक्रमक होत नाही... रस्त्यावर येत नाही.सत्ताधारी पक्षातील विचारी लोकही चुकीला चुकीचे म्हणत नाहीत... व महाराष्ट्र ढवळून निघत नाही. त्यामुळे हा फरक जास्त अस्वस्थ करणारा आहे. जणू हे आपण स्वीकारले आहे अशी मानसिकता सर्वांची झाली आहे...&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;4. पूर्वी राजकारणात असलेल्या सर्वपक्षीय महिला अशा विषयांवर पक्षभेद विसरून आक्रमक भूमिका घेत होत्या... आता सत्ताधारी पक्षातील महिला गप्प आहेत, या शिव्या ऐकल्यानंतर त्यांना काहीच वाटले नसेल का...? महिला अभिनेत्री, कलावंत लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या हा राजकीय विषय म्हणून सोडून देतात...&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;5. संजय गायकवाड यांनी दिलेल्या शिव्या ऐकल्यावर &amp;nbsp;सार्वजनिक जीवनात काय स्तराची माणसे आली आहेत, हे बघून धक्का बसतो. सुशिक्षित वर्गाने राजकारणाकडे पाठ फिरवल्यानंतर आणि राजकारण आणि सामाजिक चळवळी यांचे नाते कमी होत गेल्यानंतर काय प्रकारची माणसे आपले नेतृत्व करत आहेत, हा दीर्घ चिंतनाचा विषय यानिमित्ताने पुन्हा पुढे आला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/24/7100a054a814458b02417c017f449fec177701355110788_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : मराठा बंधू आणि भगिनींना खुले पत्र...]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/buldhana-sanjay-gaikwad-on-shivaji-kon-hota-book-an-open-letter-to-maratha-brothers-and-sisters-blog-sameer-gaikwad-1421394</link><comments>https://marathi.abplive.com/blog/buldhana-sanjay-gaikwad-on-shivaji-kon-hota-book-an-open-letter-to-maratha-brothers-and-sisters-blog-sameer-gaikwad-1421394#respond</comments><pubDate>Thu, 23 Apr 2026 19:08:46 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ बुलढाणा ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/buldhana-sanjay-gaikwad-on-shivaji-kon-hota-book-an-open-letter-to-maratha-brothers-and-sisters-blog-sameer-gaikwad-1421394</guid><description><![CDATA[&lt;p&gt;हे पत्र, मी &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/maratha&quot;&gt;मराठा (Maratha)&lt;/a&gt; आहे म्हणून लिहिलेलं नसून एक सच्चा शिवभक्त म्हणून लिहिलं आहे हे आधी स्पष्ट करू इच्छितो. या पत्राचे प्रयॊजन आमदार&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/sanjay-gaikwad&quot;&gt; संजय गायकवाड (Sanjay Gaikwad)&lt;/a&gt; यांच्या वक्तव्याविषयीचे आहे. &amp;nbsp; &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;बुलढाणा जिल्ह्यातले सिंदखेड राजा हे स्वराज्यप्रेरिका, राजमाता जिजाऊ मां साहेबांचे जन्मस्थान. रयतेच्या माता असणाऱ्या जिजाऊंच्या जन्माने पावन झालेल्या बुलढाणा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असणाऱ्या बुलढाणा शहरापासून, सिंदखेड राजा 80 किमी अंतरावर वसले आहे. जिजाऊंनी शिवबांच्या मनात स्वराज्याचे बीज रोवले, चारही पातशाहयांच्या विरोधात विद्रोह करण्याचे धडे दिले, अतुल्य पराक्रम, साहस, द्रष्टेपण, मुत्सद्दीपणा आणि रयतेच्या प्रेमाच्या बळावर मावळ्यांच्या मदतीने त्यांनी स्वराज्य उभे केले. जगाच्या पाठीवर शिवरायांसारखा राजा आढळत नाही. शिवबांच्या अंगी सदगुणांची खाण होती त्यातलाच एक मुख्य म्हणजे स्त्रियांचा आदर सन्मान होय! 'परस्त्री मातेसमान' हे पुस्तकी वाक्य त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्षात उतरलं होतं!&lt;/p&gt;
&lt;p&gt;ज्या बुलढाणा जिल्ह्यात जिजाऊ जन्मल्या त्याच बुलढाणा शहराचे आमदार संजय गायकवाड यांनी, पेशाने पुस्तक प्रकाशक असणाऱ्या प्रशांत आंबी यांना आई बहिणीवरून अर्वाच्च शिवीगाळ आणि दमदाटी केलीय! प्रशांत आंबी हा तरुण प्रकाशक आहे. गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या, 'शिवाजी कोण होता' हे अर्थपूर्ण आणि वाचनीय पुस्तक त्यांनी प्रकाशित केले आहे. हे पुस्तक प्रकाशित होऊन तीन दशके उलटून गेलीत. चिथावणीखोरांना अपेक्षित असणारे शिवाजी यात नसल्याने, अकरा वर्षांपूर्वीच पुरोगामी विचारांच्या पानसरे सरांची हत्या करण्यात आली. आजही त्या हत्येचे छुपे समर्थन करणारे नीच समाजात उजळ माथ्याने वावरताना दिसतात. हे कोण लोक आहेत हे वेगळे लिहिण्याची गरज नाही.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;संजय गायकवाड प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. 'शिवाजी कोण होता' या पुस्तकावरून त्यांनी प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिलीय. तुझ्या आईची गां*, तुझ्या बायकोचा टण्णा, तुझ्या मायचा फोद* अशा गलिच्छ शिव्या या इसमाने दिल्या आहेत. आईघा*, हरामखो*, माद**द या त्यांच्या आवडत्या शिव्याही दिल्या आहेत. घरात घुसून मारीन, चिरडुन टाकीन, शंभर पोरे तुझ्यावर सोडतो अशी कारंजी त्यांनी त्यांच्या तोंडामधून उडवली आहेत. इथे शिव्या लिहिण्याचा उद्देश हा की, यांची भाषा किती खालच्या दर्जाची आहे हे कळावे! &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;या महाशयांनी एकतर हे पुस्तक वाचलेले नाही. पुस्तक न वाचता त्यांना पुस्तकाचा विरोध करायचा आहे. त्यांच्या संवादात ते एके ठिकाणी म्हणतात की, 'मी मराठा आहे!'&amp;nbsp;&lt;br /&gt;इथे मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणूनच हे पत्र लिहिले आहे! मराठा समाजातील प्रत्येक माणसाला शिवराय आपल्या जातीत जन्माला आले याचा विलक्षण अभिमान आहे, मला देखील आहे! इव्हन हरेक भारतीयास त्यांच्याविषयी आदरभाव आणि प्रेम आहे! शिवराय हे मराठ्यांचे काळीज आहे असं म्हणायचं आणि शिवबांच्या खऱ्या इतिहासापासून दूर जायचं, यात बदल घडायला हवा.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;शिवाजी राजांचे नाव घेऊन हे आमदार म्हणतात की, तुझ्या आईच्या भो*त तलवार घालतो! यात आमदारांची अब्रू जात नाही. शिवबांचे नाव घेण्याचा अशांना हक्क नाही, हे मराठा समाजाने ठणकावून सांगितले पाहिजे. शिव्या देण्याचा यांना इतकाच कंड असेल तर आपल्या आईबापाचे, आवडत्या व्यक्तीचे नाव घेऊन, यांनी काय ती शिवीगाळ करावी! मात्र आपल्या घाणेरड्या मुखातून यांनी राजांचे नाव घेऊ नये हे यांना सांगितले पाहिजे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;या शिवीगाळीच्या संवादात ते एके ठिकाणी म्हणतात की, राजांच्या सेवेतली माझी ही आठवी पिढी आहे! कदाचित हे सत्य असेलही! मात्र त्यांच्या पहिल्या पिढीतले आज कुणी जिवंत असते तर त्यांनीच यांना अद्दल घडवली असती! कारण आपला राजा कसा होता आणि त्यांनी स्त्रियांना कसे सन्मानाने वाढवले होते हे त्या पहिल्या पिढीला नक्कीच ठाऊक असणार! शिवबा आवडतात म्हणायचे आणि घरात घुसून मारतो, चिरडून काढतो ही कसली भाषा!&lt;/p&gt;
&lt;p&gt;हे गृहस्थ आमदार आहेत! थोडक्यात एका मतदारसंघाच्या रयतेचे प्रतिनिधी आहेत. त्यांना ही भाषा शोभत नाही. बुलढाणा भागातील लोकांनी या महोदयांना याची जाणीव करून दिली पाहिजे. प्रत्येक खेपेस लोकप्रतिनिधीलाच जबाबदार धरून भागणार नाही, आपल्या जातीचा माणूस म्हणून वा काही हजार रुपड्यांसाठी यांना मते देणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवांनी आणि अन्य मतदारांनीही हा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मुळात अलीकडील काळात, शिवाजी महाराज हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय झाला आहे याला मराठा समाजाचे जराही ऑब्जेक्शन नाही ही गोष्ट अतिशय शोकात्म आणि निंदनीय आहे!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मिरवणुकीत डीजे केव्हढा लावला, किती फुटांची मूर्ती बसवली, किती बाय कितीचा मंडप घातला, पोरांना ड्रेस किती दिले, केव्हढा मोठा फ्लेक्स लावला, घोषणाबाजी करत पुढे पुढे येत चमकोगिरी किती केली यावरून एखाद्याला शिवभक्त म्हणणे आधी बंद व्हायला पाहिजे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;शिवाजी राजे हा मस्तकात आणि हृदयात ठेवायचा अमूल्य ठेवा आहे, त्यांच्या विचारांवर चालणारा युवा घडवायचा असेल तर अभ्यासू आणि विचारी वृत्तीने शिवाजी अभ्यासले पाहिजेत, त्यांचे सखोल वाचन केले पाहिजे!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;संजय गायकवाड यांच्यासारखं पुस्तक न वाचता केवळ शीर्षक एकेरी आहे म्हणून बाह्या सावरत येणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आवर घालण्याचे काम मराठा समाजाने प्रकर्षाने केले पाहिजे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज, छावा संघटना, मराठा महासंघ इत्यादी जितक्याही, सर्व काही मराठा संघटनांनी या संदर्भात एखादी आचारसंहिता जाहीर केली पाहिजे. अशी वक्तव्ये करून काळिमा फासणाऱ्या लोकांचा निषेध केला पाहिजे. दोन जातीत धर्मात तेढ माजवणाऱ्या प्रवृत्ती ओळखता आल्या पाहिजेत, त्यांचा बिमोड केला पाहिजे!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;हे असेच चालू राहिले तर एके दिवशी आड रिकामे होतील आणि पोहऱ्यातही काहीच येणार नाही! मग मी मराठा आहे, माझी अमुक पिढी आहे, आम्ही शिवाजी राजांच्या जातीत जन्मलो आहोत या वल्गना पोकळ ठरतील कारण शिवाजी यांना कळालेच नाहीत! कळले असते तर अशा वांत्या करत गावभर फिरले नसते!&lt;/p&gt;
&lt;p&gt;या संजय गायकवाड यांनी भूतकाळात काय दिवे लावले आहेत ते पाहण्यासारखे आहे - मुंबईतील आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याच्या रागातून त्यांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. मार्च 2024 मध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत एका तरुणाला पोलिसांच्या लाठीने मारहाण करतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सप्टेंबर 2024 मध्ये त्यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. जुलै 2025 मध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या एका विधानामुळे मराठा समाजात संताप व्यक्त झाला होता, ज्यावर नंतर त्यांनी माफी मागितली. 1987 मध्ये वाघाची शिकार केल्याचा दावा, पोलिसांना भ्रष्ट म्हणणे आणि मतदारांबद्दल &quot;त्यांना फक्त दारू आणि मटण हवे असते&quot; असे विधान करणे, अशा अनेक कारणांमुळे ते नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. या तोंडाळ आणि चवचाल व्यक्तीचा निषेध केला पाहिजे असे मराठा समाजातील धुरिणांना वाटत नाही का?&lt;/p&gt;
&lt;p&gt;केवळ निवडून येण्याचा निकष लावून आपल्या समाजात अशा जहरी वृत्ती वाढू दिल्या तर एक काळ असा येईल की सारा भोवतालच विखारी होऊन जाईल! शिवाजी राजांनी हेच स्वप्न पाहिले होते का? त्यांचे विचार असे होते का? रयतेतल्या प्रत्येक घटकाविषयी आपल्या राजांची भूमिका कशी होती हे आपण आपल्याच लोकप्रतिनिधींना सांगू शकत नसू तर आपल्याला तर काय अधिकार आहे राजांचे नाव घेण्याचा?&lt;/p&gt;
&lt;p&gt;शिवाजी राजे हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नसून डोक्यात आणि काळजात जतन करायचा अमूल्य ठेवा आहे आणि त्यांच्या विचारांवर आपल्याला चालायचे असेल तर त्यांचे चरित्र अभ्यासले पाहिजे, त्यांचे सर्वांगाने वाचन केले पाहिजे. त्यांची धोरणे, त्यांचे ध्येय, त्यांचे विचार यांनी झपाटले पाहिजे! हे आपण करत नसू आणि निव्वळ दिखाऊगिरी करत असू तर आपण खऱ्या अर्थाने गद्दार आहोत!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;शेवटची नोंद - गोविंद पानसरे सरांची हत्या केल्याचा आरोप ज्याच्यावर होता त्याचे नावही समीर गायकवाड होते. तो आपल्याच समाजाचा भरकटलेला तरुण असावा! माझे नावही तेच आहे! एके काळी मी देखील अशाच विचारांनी भरकटलो होतो! पानसरेंची हत्या झाल्यानंतर आरोपी समीर गायकवाडला पकडल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी माझ्या घरी फोन करून यानेच तर हे केले नाही ना, अशी विचारणा केली होती! आजही या गोष्टींचा मला पश्चाताप होतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;आपल्या समाजातील मुलांना भडकवले जाते, आपल्याला चिथावणी दिली जाते आणि आपला वापर होतो हे आपल्या समाजाला कळेनासे झालेय. हे छद्म ओळखायला शिकले पाहिजे, ही एक दुष्टनीती आहे आणि त्यात आपला समाज वाहवत चाललाय. बंधूंनो आणि भगिनींनो आपण यावर गाभार्याने आत्मपरीक्षण केले पाहिजे. मगच आपण संजय गायकवाड यांच्या सारख्या मुजोर आणि बेमुर्वत प्रवृत्तींना वेसण घालू शकू.&lt;/p&gt;
&lt;p&gt;संजय गायकवाड यांच्या वर्तनात आणि शिवप्रेमात एक विलक्षण विसंगती आहे. छिंदम, भगतसिंग कोश्यारी, सोलापूरकर आणि कोरटकर इत्यादि लोकांनी शिवाजी राजांविषयी गरळ ओकली होती तेव्हा हेच गायकवाड आणि यांचे कर्ते धर्ते तोंड शिवून गप्प होते! मात्र ज्यांनी शिवाजी राजांवर एक अप्रतिम पुस्तक लिहिलं आहे त्यांच्यावरुन ते पुस्तक प्रकाशकाला तुला ही पानसरेकडे पाठवतो अशी भाषा करतात! यांना सत्तेत राहायचे असल्याने काहीनी शिवाजी राजांविषयी काहीही विखार वदला तरी हे मौन राहतील कारण यांचे शिवप्रेम खोटे आहे, शिवप्रेम दाखवून सत्तेत राहायचे हे यांचे मनसुबे आहेत! हे ओळखून समाजाने यांना जागेवर आणलं पाहिजे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;तुमचा,&amp;nbsp;&lt;br /&gt;समीर गायकवाड.&lt;/p&gt;
&lt;p&gt;हे पत्र मराठा समाजातील बांधवांना उद्देशून लिहिले असले तरी अन्य शिवप्रेमी जनतेनेही यावर विचार केला पाहिजे! आपण हे किती काळ हे मुक्यागत बघत राहणार आहोत यावर कृती केली पाहिजे&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/23/df6f2897c58767099f95e18d44f9959617769512896561002_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : मटक्याची बेरंग दुनिया...]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/blog-of-sameer-gaikwad-on-matka-king-ratan-khatri-village-economy-marathi-news-1421280</link><comments>https://marathi.abplive.com/blog/blog-of-sameer-gaikwad-on-matka-king-ratan-khatri-village-economy-marathi-news-1421280#respond</comments><pubDate>Wed, 22 Apr 2026 22:08:15 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ बॉलीवूड ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/blog-of-sameer-gaikwad-on-matka-king-ratan-khatri-village-economy-marathi-news-1421280</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;BLOG :&lt;/strong&gt; नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन आणि संयुक्त निर्मिती असलेला 'मटका किंग' सिरिज पाहिली, मनात अनेक गोष्टींचे मोहोळ जागे झाले. त्या अनेक टपऱ्या आठवल्या आणि त्यांच्या नादाला लागून उद्ध्वस्त झालेले संसार आठवले. मटक्याचे रकाने, काही खास दैनिकात येणारे आकड्यांचे अंदाज, फुल स्केप पेपरचे बरोबर बारा तुकडे करून त्या मध्ये कार्बन पेपर ठेवून दिली जाणारी टीप आठवली. सकाळ संध्याकाळच्या खास नेमक्या वेळी कासावीस होऊन आशाळभुतागत मटका टपरीवर जाऊन ओपन काय आले आहे आणि क्लोज काय आले आहे याचे अदमास घेणारे भुकेच्या डोहात बुडालेले चेहरे आठवले. मटका लागल्यावर ऐश करून पैसे उडवले जायचे आणि मोठी रक्कम हारली की देशी दारूचा गुत्ता जवळ केला जायचा. हारलेला माणूस पुन्हा पुन्हा पैसे लावत राहायचा. कधी तरी एकदा जिंकायचा मात्र बहुतांश वेळी तो गर्तेत जायचा. असं करत करत घरेच्या घरे मटक्याने गिळंकृत केली. पण जे मटका घेत होते त्यांचे काय झाले?&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बऱ्याचदा मटका घेणारी माणसं तिशीतली चाळीशीतली असायची. रापलेल्या चेहऱ्याने विस्कटलेल्या केसांची ही माणसं मळकट बिन इस्त्रीच्या कपड्यांवर असायची. टपरीत दोन तीन देवी देवतांची चित्रे असत. साल संपून गेलेले कॅलेंडर असे. शाळेची काळी पाटी एका तारेला अडकवली जायची. पाटीच्या खाली कागदाच्या सुरळ्या असत. कोपऱ्यात कुठे तरी दोन तीन वह्या असत ज्यांची पाने भरलेली असत. सतरंजी अंथरूण त्यावर हा सदगृहस्थ बसलेला असे. गुटखा सुरु होण्याच्या आधीच्या काळात मावा नाहीतर तंबाखू जर्दा यांची गोळी जबड्यात दाबून ठेवलेल्या अवस्थेत तोंडातला तोबरा तसाच धरून ही माणसं येणाऱ्या जाणाऱ्यांचे निरीक्षण करत असत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मटका बुकी असं यांचं टेक्निकल पोझिशन असलं तरी लोक मात्र त्याला मटक्याचा दलाल म्हणत. सकाळची ओपनची फिगर डिक्लेअर होण्याच्या सुमारास टपऱ्या उघडल्या जात असल्या तरी रात्रीची फायनल फिगर येईपर्यंत टपरी बंद केली जात नव्हती. सुरुवातीला हे केवळ मटक्याचे आकडे घेत असले तरी पुढे जाऊन या लोकांनी जोडधंदे सुरु केले. व्याजबट्टा, जुगाराचे क्लब, टँगो पंचच्या बाटल्यांचा साठा ठेवणे असं करत करत यांच्यातले काही गबरगंड झाले. काहींनी यात अफाट हात मारला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मटका बुकिंग घेऊन मोठी झालेली धेंडं स्वतःची यंत्रणा राबवू लागले, काहींनी तर स्थानिक लेव्हलवर वैयक्तिक धंदा सुरु केला. पैसा पैशाकडे ओढला जातो असं म्हटलं जातं, त्या उक्तीप्रमाणे ही काही मोजकी माणसं प्रचंड पैसेवाली झाली. पैसा अफाट झाला की पोलिसांना खुश ठेवणं आलं. पोलिसांनी आपल्यावर रोज चढू नये म्हणून राजकरण्यांशी संधान बांधणे हेही ओघाने आलं! यातून आणखी पुढचं पाऊल टाकत काहींनी थेट राजकारणात सहभाग घेऊन स्थानिक निवडणुका लढवल्या आणि पैशाच्या जोरावर ते निवडूनही आले. समाजात आपली पत वाढावी म्हणून ही मंडळी कोणत्याही जातीधर्माच्या उत्सवाच्या मंडळांचे कार्यकर्ते वर्गणीसाठी यांच्याकडे गेले तर त्यांना नाराज करत नसत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्यांनी एकीकडे डोकं वापरुन पैसा वाटताना आपापल्या समाजात मात्र चिक्कार पैसा टाकत आपण समाजातले एक मसिहा आहोत हे लोकांमध्ये समाजामध्ये रुजवले. त्यांच्याशी ओळख असणं ही मोठी बाब मानली जाऊ लागली. प्रत्येक जातीतला असा एक धर्मात्मा मोठा होत गेला. त्या त्या जातीच्या लोकांनी त्याला हृदयात स्थान दिलं. पुढे जाऊन या लोकांनी मग आपली दानत आणखी वाढवत गोरगरिबांना मदत ही केली. मात्र ही मदत एकीकडे जारी असताना त्यांचा हा हजारोंचे संसार उद्ध्वस्त करणारा मटक्याचा धंदाही चालूच होता! अशी माणसं प्रत्येक शहरात दिसू लागली. मटक्याने बाळसं धरलं आणि या मोजक्या लोकांना तर जणू अमरत्व लाभलं!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नवीन पोलीस अधिकारी आले की कारवाईचा फार्स व्हायचा. हप्त्याची सेटिंग पक्की व्हायची, वसुलदार नेमले जायचे आणि पुन्हा धंदा सुरळीत चालायचा. जे राजकारणात यशस्वी झाले नाहीत त्यांनी अपराध जगतातले अन्य मार्ग चोखाळून पाहिले. काहींनी बायकांचे कुंटणखाणे उभे केले, लॉजिंगच्या गोंडस नावाखाली मोक्याच्या जागी चादरबदलीचा धंदा सुरु केला. काहींनी हातभट्टीला बळ दिले तर काहीनी नव्या जमान्याचा व्हिडीओ पार्लरचा धंदा खोलला. मोजक्या लोकांना हे साधले, बाकी किरकोळ बुकिंग घेणारे कस्पटासमान जिंदगी जगले आणि मेले! त्यांच्याकडे किरकोळ दोन पाच रुपयांची बुकिंग देणारे कंगाल होऊन मेले आणि त्यांच्यापेक्षा थोडेसे बरे आयुष्य जगून हेदेखील खस्ताहाल अवस्थेतच मेले. यांच्या पिढ्या उद्ध्वस्त झाल्या.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मटका चालू राहावा अशी पोलिसांची इच्छा असे. दोन नंबर धंदा सुरु असला की सगळीकडे चलन फिरते, मार्केटमध्ये कॅश फ्लो टिकून राहतो आणि क्रिमिनल एलिमेंट्स पैसा कमवत शांत राहतात, पोलिसांना हप्ता मिळतो! सर्वांनाच बरकत! फक्त जे पैसे लावतात तेच खपतात, पण त्यांची पर्वा कुणी आणि का करावी? त्यामुळे काहीही झाले तरी मटका आपलं स्वरूप बदलून नव्या नव्या प्रकारे स्थापित होत राहिला. मोबाईलचे प्रस्थ वाढल्यावर अनेक ठिकाणी पोलिसांचा पत्ता कट करण्यासाठी वा त्यांची 'पाती' कमी करण्यासाठी मोबाइलवर बुकिंग घेतले जाऊ लागले. पुढे जाऊन मटक्यावाल्यांनी आयपीएलचे सट्टे सुरु केले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हा नवा मटका सट्टा तरुण पिढीला उद्ध्वस्त करत असतानाही साऱ्या यंत्रणा शांत मौन बसून आहेत! यात एक विचित्र विरोधाभास आणि गंमतदेखील आहे- जे कथित पांढरपेशे वा मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांना या संपूर्ण प्रकाराची फक्त उत्सुकता असते. मात्र ते त्याविषयी चीड संताप व्यक्त करताना दिसत नाहीत. कारण त्याची झळ त्यांना क्वचित बसते. आयपीएलचा सट्टा सुरु झाल्यापासून मात्र या परिघाबाहेर कुणीच राहिले नाही, सर्वांचे वर्तुळ एकच झालेय! तरीही कुणाला त्याची फिकीर नाही!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आता नागराज मंजुळे यांचा मटका किंग पाहिल्यावर अनेकांना ती रोजगारीची संधी वाटेल इतके ते जग त्यांनी भन्नाट पद्धतीने दाखवले आहे. हॉटेल कामगार, बांधकाम मजूर, रोजंदारीचे कामगार, हातावर पोट असणारी लाखो माणसं, काहीही केलं तरी उत्पन्न वाढत नसल्याने चटकन पैसे मिळावेत म्हणून गुंतून पडलेले कनिष्ठवर्गीय, चोरीचपाटी करून वीस पंचवीस रुपये मिळवणारे भणंग, पैशाचा हव्यास जडलेली माणसं अशी लाखों माणसं आणि त्यांचा संसार या धंद्याने उद्ध्वस्त करूनही हा धंदा आजही सुरु आहे!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एक शेवटची नोंद करून थांबतो. रेड लाइट एरियात फिरताना एक गोष्ट जाणवली ती अशी की, या धंद्यातील ऐंशी नव्वदच्या दशकातल्या बहुसंख्य बायका मटक्यावर पैसे लावत. आकडा सांगणारा एक इसम त्यांच्या गुत्त्यात फिरे, हारलेल्या बायका उद्या पैसे जिंकता येतील या आशेने पुन्हा पुन्हा पैसे लावत. त्यांनी जिंकलेले पैसे देखील त्यांना क्वचित दिले जायचे, ही गोष्ट त्रासदायक होती. मटकेवाल्यापाशी उधारी चालत नव्हती. ते या बायकांशी थेट संबंध कधीच ठेवत नसत. नोटबंदीच्या काळात या बायकांचे पैसे ज्यांनी ज्यांनी लुबाडले त्यात मटकेवाले अग्रस्थानी होते!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;केवळ या बायकाच पैसे लावत होत्या असे म्हणणे धाडसाचे ठरेल. हॉटेलात भांडी धुणाऱ्या बायकांनाही याचे व्यसन जडलेले असे. झाडलोट करणाऱ्या आणि मोस्टली श्रमाचे काम करणाऱ्या बायकांही यात अडकून पडल्या होत्या. त्यांच्यात आणि रोज उठून आशाळभुतासारखं आकड्याचं जग डोक्यात घेऊन फिरणाऱ्या पुरुषांत एक महत्वाचा फरक होता. तो फरक म्हणजे या बायकांना जिंकलेले पैसे कुटुंबाच्या जबाबदाऱ्या निभावण्यासाठी हवेहवेसे वाटत! मटक्यात पैसे जिंकलेली बाई दारूमटणाची पार्टी करताना मी माझ्या आयुष्यात कुठेही कधीही पाहिली नाही!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मटका किंग रतन खत्रीच्या रूपाने देशभरात एकच होता मात्र त्याचे स्थानिक उमराव जमीनदारासारखे मनसबदार मात्र प्रत्येक शहरात निर्माण झाले, त्यांनी व्यवस्थेशी असा काही संग केला की पोटं फुगलेल्या ढेरपोटयांचे खिसे मजबूत भरले, राजकारण्यांचे बँक बॅलन्स वाढवले, खाकी वर्दीला पैशाने गर्वार केले आणि स्वतः मात्र धर्मात्मा म्हणून मिरवून घेतलं! आकडे सांगणाऱ्या बाबा बुवांचे पेव फुटले. भाग्यलक्ष्मी लाभलंक्ष्मी सारख्या लॅाटऱ्यांनी हात धुवून घेतले!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;फिरोजखान आणि प्रेमनाथच्या प्रमुख भूमिका असलेला धर्मात्मा हा देखील मटकाकिंग रतन खत्रीच्या आयुष्यावर बेतलेला होता. यात प्रेमनाथचे नाव धर्मदास असतं. हाच धागा &amp;lsquo;कर्ज&amp;lsquo;मध्ये होता, त्यात त्याला जे काही महत्वाचे सांगायचे असते, ते तो काचेच्या ग्लासवर टिचकी मारून सांगायचा. त्याने किती टिचक्या मारल्या आणि त्याचा ध्वनीनाद कसा होता यावरून अर्थ लावण्यात यायचा. खऱ्या आयुष्यातला रतन खत्री मटक्यावर टिचक्या मारायचा, त्याने किती टिचक्या मारल्या याची नोंद पत्ते काढणारा घेत असे. अपराध जगताची एंट्री करुन देणाऱ्या या धंद्यातले कोडवर्डस आजही विसरू शकलो नाही.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नागराज मंजुळेंचा मटका किंग पाहताना ते हजारो भकास चेहरे, आणि हताशा हतबलतेने ग्रासलेले खचलेली पिचलेली माणसं आठवली! पोटात कालवलं! पायाखाली मुंग्या चिरडून टाकाव्यात इतक्या सहजतेने समाजाने, सरकारने आणि व्यवस्थेने ही माणसं अशी किड्यामुंगीच्या मौतीने कशी काय मरू दिली याचे शल्य आजही वाटते! माझे बालपण आणि आयुष्यातील बरीच वर्षे ज्या परिसरात गेली त्या भागांतली अनेक माणसं, अनेक घरं आणि तिथल्या विमनस्क चेहऱ्याच्या बायका आठवल्या! याची दोषनिश्चिती कशी करायची हा यक्षप्रश्न आजही छळतो!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मटक्याची दुनिया बेरंगी होती पण इंद्रधनुष्यी स्वप्ने दाखवण्याची त्यात ताकद होती, याच स्वप्नांना गोरगरीब भुलत गेले हे वास्तव टोकदार होतं!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/22/5fda182036b0b0c35ba1d12289e487f4177687573337493_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं...; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली "आशा'']]></title><link>https://marathi.abplive.com/blog/asha-bhosle-who-disappointed-swar-chandane-shimpit-bugadi-mazi-sandli-ge-singer-1419971</link><comments>https://marathi.abplive.com/blog/asha-bhosle-who-disappointed-swar-chandane-shimpit-bugadi-mazi-sandli-ge-singer-1419971#respond</comments><pubDate>Sun, 12 Apr 2026 17:52:19 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ abp majha web team ]]></dc:creator><category><![CDATA[ करमणूक ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/asha-bhosle-who-disappointed-swar-chandane-shimpit-bugadi-mazi-sandli-ge-singer-1419971</guid><description><![CDATA[&lt;p&gt;मोठ्या झाडाच्या सावलीत लहान झाड फारसे वाढत नाही या उक्तीला तीने चुकीचे ठरवले, हयातभर अपार कष्ट उपसत आणि स्वर साधना करीत, दीनानाथ मंगेशकर यांच्यासारख्या आक्रमक, पल्लेदार गायकी असलेल्या गुणी आणि प्रतिभाशाली गायकापोटी जन्म घेण्याचे सौभाग्य इतर भावांडा प्रमाणेच &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/asha-bhosle&quot;&gt;तिला (Asha bhosle)&lt;/a&gt; ही लाभले, मात्र साक्षात सरस्वतीचा दैवी अंश असलेल्या &quot;लता दीदींच्या मोठ्या झाडाच्या सावलीत राहण्याचा आणि वाढण्याचा शाप घेऊनच ती जगली, वावरली आणि यशाच्या एकेक पायऱ्या चढत स्वतःचे झाड ही तीने महावृक्षात रूपांतरित केलें ते आपल्या जादुई गोड गळ्याने आणि &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/singer&quot;&gt;संगीतातील (Singer)&lt;/a&gt; सर्व प्रकारच्या चालीत सारख्याच सहजतेने लीलया केलेल्या गायकीने.&lt;/p&gt;
&lt;p&gt;तिच्या आवाजात &quot;लता दीदी आणी रफी यांच्यासारखीच अफाट रेंज होती म्हणूनच अभंग, नाट्य, करुण, शृंगार, कॅबरे लोकगीत अशी सर्वच ढंगात असलेली हजारो गाणी तीने अश्या काही जोशात आणि अवेशात सादर केली कि ती गाणी &quot;पडदा, सिनेमा, गीतकार, संगीतकार यांना छेदन देत तिची स्वतःची झाली, तिच्या &quot;आशा गाण्यांचे &quot;असे एक स्वतंत्र लोभस नाणे गोल्डन इरातील गाण्यात पडले. हंसराज बहेल (ज्याने लताला &quot;जब रात नही कटती जिंदगी कैसे कटेगी सारखे अवीट गोडीचे गाणे दिले (जेवरात या सिनेमांत )त्या बहेल ने तिला पहिले स्वतंत्र हिंदी सोलो गाणे दिले त्यापूर्वी दहाव्या वर्षी तीने पार्श्वगायन केलें होते आणि नंतर गीता दत्त, आणी जोहराबाई यांसोबत गायली होती पण नंतर तीने मागे वळून पाहिले नाही, तिचा कलाप्रवास सोपा नव्हताच, काटेरी मार्गाने त्यांना कायम चालत रहावे लागले, गाणी मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागली, कारण खरी स्पर्धक घरातच होती &quot;लता दीदी यांच्या रूपात... असो&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मला आवडलेल्या त्यांच्या काही गाण्यांच्या सुंदर रांगोळ्याचे दर्शन घडवत त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. त्यांची &quot;जिवलगा राहिले रे दूर घर माझे &quot;चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले &quot;कोकिळा गा &quot;हात नका लावू माझ्या साडीला &quot;ब्रम्हा विष्णू आणी महेश &quot;ही वाट दूर जाते &quot;समईच्या शुभ्र कळ्यांनी &quot;तरुण आहे रात्र &quot;माझा होशील का?&quot;तू दूर दूर तेथे &quot;विसरशील खास मला &quot;धुंदी कळ्यांना &quot;चंद्र आहे साक्षीला, &quot;बुगडी माझी सांडली ग&quot; स्वप्नातल्या कळ्यानो उमलू नकाच केव्हा &quot;रामा रघु नंदाना &quot;धागा धागा अखंड विणू या अश्या सुंदर भावगीत, भक्ती गीत यांच्या स्वर रांगोळ्या आहेत. तशाच हिन्दीतील &quot;आंखोसे जो उतरी है दिलमे, &quot;जाईये आप कहा जायेंगे &quot;चैन से हमको कभी आपने जीने न दिया &quot;बेकसी हद से गुजर जाये &quot;आईये मेहेरबान, &quot;पंछी रे ओ पंछी, &quot;सच हुये सपने &quot;तोरा मन दर्पण कहेलाये &quot;दिल चीज है क्या &quot;आंखोमे क्या जी &quot;ओ मेरे सोना रे, &quot;बाहोमे चले आओ, &quot;अशको से हमने 'तेरी तस्वीर बनायी है, &quot;जब चली थंडी हवा, &quot;ओ पंछी प्यारे, &quot;आणी &quot;वो सुबह कभी तो आयेगी...&lt;/p&gt;
&lt;p&gt;अश्या अनेक सुंदर गाण्यांच्या सुंदर रांगोळ्या मागे ठेवून &quot;आशाजी हे भौतिक जग सोडून, चाहत्याना दुःखाच्या सागरात लोटून &quot;राहिले रे दूर घर माझे म्हणतं &quot;देवाच्या सर्वात मोठ्या घरात कायम स्वरूपी रहायला गेल्या आहेत... आणखी एक &quot;मंगेशी सूर&quot; मंगेशीच्या गाभाऱ्यात कायमचा निमला, मागे &quot;आशा सुरांची शांत स्नीग्ध समई रसिकांच्या मनात वर्षानुवर्षे तेवत राहील हे नक्कीच. तिच्या जाण्याने माईची खूप आठवण झाली, देवघरातील तिच्या फोटोला रोज हळदी कुंकू वाहणारी भाबडी माई... आशा ताईंच्या पवित्र आत्म्यास आपले दत्तगुरु शांती प्रदान करोत. ॐ शांती&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;(लेखक - दिलीप मोडक)&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/12/bb42f366eca68951cb18f2be218a992117759963448281002_original.jpeg" width="220"/></item></channel></rss>