<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>BLOG : कागदांची भिंत : कर्जाच्या चौकटीबाहेर राहिलेल्या महिला</title><atom:link href="https://marathi.abplive.com/blog/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Sat, 25 Apr 2026 07:26:45 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[BLOG: आमदार संजय गायकवाड शिवीगाळ : काही निरीक्षणे]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/sanjay-gaikwad-shivaji-kon-hota-book-controversy-publisher-prashant-ambi-blog-by-wrighter-heramb-kulkarni-1421469</link><comments>https://marathi.abplive.com/blog/sanjay-gaikwad-shivaji-kon-hota-book-controversy-publisher-prashant-ambi-blog-by-wrighter-heramb-kulkarni-1421469#respond</comments><pubDate>Fri, 24 Apr 2026 12:27:55 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ हेरंब कुलकर्णी ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/sanjay-gaikwad-shivaji-kon-hota-book-controversy-publisher-prashant-ambi-blog-by-wrighter-heramb-kulkarni-1421469</guid><description><![CDATA[&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;gt;&amp;gt; हेरंब कुलकर्णी&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;1. महाराष्ट्रातील अनेक वर्षे गाजत असलेल्या पुस्तकाविषयी किंचितशी माहिती नसलेला लोकप्रतिनिधी महाराष्ट्रात आहे हे यातून दिसले... एकूणच साहित्यिक वैचारिक विश्व यापासून अनेक राजकारणी किती कोसो मैल दूर आहे. याचा अंदाज या निमित्ताने आला. जागतिक पुस्तक दिनाच्या रात्री या शिव्या दिल्या यातून राजकारण आणि पुस्तके हे अंतरही लक्षात आले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;2. गोविंद पानसरे यांच्या हत्येने महाराष्ट्रातील सामाजिक वर्तुळ आणि सामान्य माणसे व्यथित असताना त्यांच्याविषयी अत्यंत असंवेदनशील अनुदार उद्गार त्यांनी काढले. यावरून सामाजिक कार्यकर्त्यांविषयी किती अनादाराची आणि असंवेदनशील भावना अनेक राजकारण्यांच्या मनात असते हेही बघता आले...&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;3. मीडिया राजकारणी आणि सामाजिक संस्था पूर्वी अशा विषयावर जितक्या आक्रमक व्हायच्या त्या आता का दिसत नाही हा प्रश्न पडतो..? अजित पवार यांनी धरणात लघुशंका करण्याच्या विधानावर पूर्ण राजकीय वर्तुळ हलले होते... दादांच्या राजकारणाला त्या एका वाक्याने मोठा सेटबॅक बसला. बाळासाहेब ठाकरे यांनी पु. ल. देशपांडे, वसंत बापट यांच्याविषयी काढलेल्या अपमानकारक उद्गाराने तेव्हाचे युती सरकार बॅकफूटवर गेले होते... साहित्य संमेलनात गोंधळ झाला.. आज संजय गायकवाड आई वरून बायकोवरून ज्या शिव्या देतात त्या ऐकवत नाहीत... स्त्रियांविषयी किती हीन भावना मनात आहे. जीभ कापण्याची भाषा ते करतात... तरीही विरोधी पक्ष आक्रमक होत नाही... रस्त्यावर येत नाही.सत्ताधारी पक्षातील विचारी लोकही चुकीला चुकीचे म्हणत नाहीत... व महाराष्ट्र ढवळून निघत नाही. त्यामुळे हा फरक जास्त अस्वस्थ करणारा आहे. जणू हे आपण स्वीकारले आहे अशी मानसिकता सर्वांची झाली आहे...&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;4. पूर्वी राजकारणात असलेल्या सर्वपक्षीय महिला अशा विषयांवर पक्षभेद विसरून आक्रमक भूमिका घेत होत्या... आता सत्ताधारी पक्षातील महिला गप्प आहेत, या शिव्या ऐकल्यानंतर त्यांना काहीच वाटले नसेल का...? महिला अभिनेत्री, कलावंत लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या हा राजकीय विषय म्हणून सोडून देतात...&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;5. संजय गायकवाड यांनी दिलेल्या शिव्या ऐकल्यावर &amp;nbsp;सार्वजनिक जीवनात काय स्तराची माणसे आली आहेत, हे बघून धक्का बसतो. सुशिक्षित वर्गाने राजकारणाकडे पाठ फिरवल्यानंतर आणि राजकारण आणि सामाजिक चळवळी यांचे नाते कमी होत गेल्यानंतर काय प्रकारची माणसे आपले नेतृत्व करत आहेत, हा दीर्घ चिंतनाचा विषय यानिमित्ताने पुन्हा पुढे आला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/24/7100a054a814458b02417c017f449fec177701355110788_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : मराठा बंधू आणि भगिनींना खुले पत्र...]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/buldhana-sanjay-gaikwad-on-shivaji-kon-hota-book-an-open-letter-to-maratha-brothers-and-sisters-blog-sameer-gaikwad-1421394</link><comments>https://marathi.abplive.com/blog/buldhana-sanjay-gaikwad-on-shivaji-kon-hota-book-an-open-letter-to-maratha-brothers-and-sisters-blog-sameer-gaikwad-1421394#respond</comments><pubDate>Thu, 23 Apr 2026 19:08:46 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ बुलढाणा ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/buldhana-sanjay-gaikwad-on-shivaji-kon-hota-book-an-open-letter-to-maratha-brothers-and-sisters-blog-sameer-gaikwad-1421394</guid><description><![CDATA[&lt;p&gt;हे पत्र, मी &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/maratha&quot;&gt;मराठा (Maratha)&lt;/a&gt; आहे म्हणून लिहिलेलं नसून एक सच्चा शिवभक्त म्हणून लिहिलं आहे हे आधी स्पष्ट करू इच्छितो. या पत्राचे प्रयॊजन आमदार&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/sanjay-gaikwad&quot;&gt; संजय गायकवाड (Sanjay Gaikwad)&lt;/a&gt; यांच्या वक्तव्याविषयीचे आहे. &amp;nbsp; &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;बुलढाणा जिल्ह्यातले सिंदखेड राजा हे स्वराज्यप्रेरिका, राजमाता जिजाऊ मां साहेबांचे जन्मस्थान. रयतेच्या माता असणाऱ्या जिजाऊंच्या जन्माने पावन झालेल्या बुलढाणा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असणाऱ्या बुलढाणा शहरापासून, सिंदखेड राजा 80 किमी अंतरावर वसले आहे. जिजाऊंनी शिवबांच्या मनात स्वराज्याचे बीज रोवले, चारही पातशाहयांच्या विरोधात विद्रोह करण्याचे धडे दिले, अतुल्य पराक्रम, साहस, द्रष्टेपण, मुत्सद्दीपणा आणि रयतेच्या प्रेमाच्या बळावर मावळ्यांच्या मदतीने त्यांनी स्वराज्य उभे केले. जगाच्या पाठीवर शिवरायांसारखा राजा आढळत नाही. शिवबांच्या अंगी सदगुणांची खाण होती त्यातलाच एक मुख्य म्हणजे स्त्रियांचा आदर सन्मान होय! 'परस्त्री मातेसमान' हे पुस्तकी वाक्य त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्षात उतरलं होतं!&lt;/p&gt;
&lt;p&gt;ज्या बुलढाणा जिल्ह्यात जिजाऊ जन्मल्या त्याच बुलढाणा शहराचे आमदार संजय गायकवाड यांनी, पेशाने पुस्तक प्रकाशक असणाऱ्या प्रशांत आंबी यांना आई बहिणीवरून अर्वाच्च शिवीगाळ आणि दमदाटी केलीय! प्रशांत आंबी हा तरुण प्रकाशक आहे. गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या, 'शिवाजी कोण होता' हे अर्थपूर्ण आणि वाचनीय पुस्तक त्यांनी प्रकाशित केले आहे. हे पुस्तक प्रकाशित होऊन तीन दशके उलटून गेलीत. चिथावणीखोरांना अपेक्षित असणारे शिवाजी यात नसल्याने, अकरा वर्षांपूर्वीच पुरोगामी विचारांच्या पानसरे सरांची हत्या करण्यात आली. आजही त्या हत्येचे छुपे समर्थन करणारे नीच समाजात उजळ माथ्याने वावरताना दिसतात. हे कोण लोक आहेत हे वेगळे लिहिण्याची गरज नाही.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;संजय गायकवाड प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. 'शिवाजी कोण होता' या पुस्तकावरून त्यांनी प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिलीय. तुझ्या आईची गां*, तुझ्या बायकोचा टण्णा, तुझ्या मायचा फोद* अशा गलिच्छ शिव्या या इसमाने दिल्या आहेत. आईघा*, हरामखो*, माद**द या त्यांच्या आवडत्या शिव्याही दिल्या आहेत. घरात घुसून मारीन, चिरडुन टाकीन, शंभर पोरे तुझ्यावर सोडतो अशी कारंजी त्यांनी त्यांच्या तोंडामधून उडवली आहेत. इथे शिव्या लिहिण्याचा उद्देश हा की, यांची भाषा किती खालच्या दर्जाची आहे हे कळावे! &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;या महाशयांनी एकतर हे पुस्तक वाचलेले नाही. पुस्तक न वाचता त्यांना पुस्तकाचा विरोध करायचा आहे. त्यांच्या संवादात ते एके ठिकाणी म्हणतात की, 'मी मराठा आहे!'&amp;nbsp;&lt;br /&gt;इथे मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणूनच हे पत्र लिहिले आहे! मराठा समाजातील प्रत्येक माणसाला शिवराय आपल्या जातीत जन्माला आले याचा विलक्षण अभिमान आहे, मला देखील आहे! इव्हन हरेक भारतीयास त्यांच्याविषयी आदरभाव आणि प्रेम आहे! शिवराय हे मराठ्यांचे काळीज आहे असं म्हणायचं आणि शिवबांच्या खऱ्या इतिहासापासून दूर जायचं, यात बदल घडायला हवा.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;शिवाजी राजांचे नाव घेऊन हे आमदार म्हणतात की, तुझ्या आईच्या भो*त तलवार घालतो! यात आमदारांची अब्रू जात नाही. शिवबांचे नाव घेण्याचा अशांना हक्क नाही, हे मराठा समाजाने ठणकावून सांगितले पाहिजे. शिव्या देण्याचा यांना इतकाच कंड असेल तर आपल्या आईबापाचे, आवडत्या व्यक्तीचे नाव घेऊन, यांनी काय ती शिवीगाळ करावी! मात्र आपल्या घाणेरड्या मुखातून यांनी राजांचे नाव घेऊ नये हे यांना सांगितले पाहिजे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;या शिवीगाळीच्या संवादात ते एके ठिकाणी म्हणतात की, राजांच्या सेवेतली माझी ही आठवी पिढी आहे! कदाचित हे सत्य असेलही! मात्र त्यांच्या पहिल्या पिढीतले आज कुणी जिवंत असते तर त्यांनीच यांना अद्दल घडवली असती! कारण आपला राजा कसा होता आणि त्यांनी स्त्रियांना कसे सन्मानाने वाढवले होते हे त्या पहिल्या पिढीला नक्कीच ठाऊक असणार! शिवबा आवडतात म्हणायचे आणि घरात घुसून मारतो, चिरडून काढतो ही कसली भाषा!&lt;/p&gt;
&lt;p&gt;हे गृहस्थ आमदार आहेत! थोडक्यात एका मतदारसंघाच्या रयतेचे प्रतिनिधी आहेत. त्यांना ही भाषा शोभत नाही. बुलढाणा भागातील लोकांनी या महोदयांना याची जाणीव करून दिली पाहिजे. प्रत्येक खेपेस लोकप्रतिनिधीलाच जबाबदार धरून भागणार नाही, आपल्या जातीचा माणूस म्हणून वा काही हजार रुपड्यांसाठी यांना मते देणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवांनी आणि अन्य मतदारांनीही हा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मुळात अलीकडील काळात, शिवाजी महाराज हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय झाला आहे याला मराठा समाजाचे जराही ऑब्जेक्शन नाही ही गोष्ट अतिशय शोकात्म आणि निंदनीय आहे!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मिरवणुकीत डीजे केव्हढा लावला, किती फुटांची मूर्ती बसवली, किती बाय कितीचा मंडप घातला, पोरांना ड्रेस किती दिले, केव्हढा मोठा फ्लेक्स लावला, घोषणाबाजी करत पुढे पुढे येत चमकोगिरी किती केली यावरून एखाद्याला शिवभक्त म्हणणे आधी बंद व्हायला पाहिजे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;शिवाजी राजे हा मस्तकात आणि हृदयात ठेवायचा अमूल्य ठेवा आहे, त्यांच्या विचारांवर चालणारा युवा घडवायचा असेल तर अभ्यासू आणि विचारी वृत्तीने शिवाजी अभ्यासले पाहिजेत, त्यांचे सखोल वाचन केले पाहिजे!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;संजय गायकवाड यांच्यासारखं पुस्तक न वाचता केवळ शीर्षक एकेरी आहे म्हणून बाह्या सावरत येणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आवर घालण्याचे काम मराठा समाजाने प्रकर्षाने केले पाहिजे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज, छावा संघटना, मराठा महासंघ इत्यादी जितक्याही, सर्व काही मराठा संघटनांनी या संदर्भात एखादी आचारसंहिता जाहीर केली पाहिजे. अशी वक्तव्ये करून काळिमा फासणाऱ्या लोकांचा निषेध केला पाहिजे. दोन जातीत धर्मात तेढ माजवणाऱ्या प्रवृत्ती ओळखता आल्या पाहिजेत, त्यांचा बिमोड केला पाहिजे!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;हे असेच चालू राहिले तर एके दिवशी आड रिकामे होतील आणि पोहऱ्यातही काहीच येणार नाही! मग मी मराठा आहे, माझी अमुक पिढी आहे, आम्ही शिवाजी राजांच्या जातीत जन्मलो आहोत या वल्गना पोकळ ठरतील कारण शिवाजी यांना कळालेच नाहीत! कळले असते तर अशा वांत्या करत गावभर फिरले नसते!&lt;/p&gt;
&lt;p&gt;या संजय गायकवाड यांनी भूतकाळात काय दिवे लावले आहेत ते पाहण्यासारखे आहे - मुंबईतील आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याच्या रागातून त्यांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. मार्च 2024 मध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत एका तरुणाला पोलिसांच्या लाठीने मारहाण करतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सप्टेंबर 2024 मध्ये त्यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. जुलै 2025 मध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या एका विधानामुळे मराठा समाजात संताप व्यक्त झाला होता, ज्यावर नंतर त्यांनी माफी मागितली. 1987 मध्ये वाघाची शिकार केल्याचा दावा, पोलिसांना भ्रष्ट म्हणणे आणि मतदारांबद्दल &quot;त्यांना फक्त दारू आणि मटण हवे असते&quot; असे विधान करणे, अशा अनेक कारणांमुळे ते नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. या तोंडाळ आणि चवचाल व्यक्तीचा निषेध केला पाहिजे असे मराठा समाजातील धुरिणांना वाटत नाही का?&lt;/p&gt;
&lt;p&gt;केवळ निवडून येण्याचा निकष लावून आपल्या समाजात अशा जहरी वृत्ती वाढू दिल्या तर एक काळ असा येईल की सारा भोवतालच विखारी होऊन जाईल! शिवाजी राजांनी हेच स्वप्न पाहिले होते का? त्यांचे विचार असे होते का? रयतेतल्या प्रत्येक घटकाविषयी आपल्या राजांची भूमिका कशी होती हे आपण आपल्याच लोकप्रतिनिधींना सांगू शकत नसू तर आपल्याला तर काय अधिकार आहे राजांचे नाव घेण्याचा?&lt;/p&gt;
&lt;p&gt;शिवाजी राजे हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नसून डोक्यात आणि काळजात जतन करायचा अमूल्य ठेवा आहे आणि त्यांच्या विचारांवर आपल्याला चालायचे असेल तर त्यांचे चरित्र अभ्यासले पाहिजे, त्यांचे सर्वांगाने वाचन केले पाहिजे. त्यांची धोरणे, त्यांचे ध्येय, त्यांचे विचार यांनी झपाटले पाहिजे! हे आपण करत नसू आणि निव्वळ दिखाऊगिरी करत असू तर आपण खऱ्या अर्थाने गद्दार आहोत!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;शेवटची नोंद - गोविंद पानसरे सरांची हत्या केल्याचा आरोप ज्याच्यावर होता त्याचे नावही समीर गायकवाड होते. तो आपल्याच समाजाचा भरकटलेला तरुण असावा! माझे नावही तेच आहे! एके काळी मी देखील अशाच विचारांनी भरकटलो होतो! पानसरेंची हत्या झाल्यानंतर आरोपी समीर गायकवाडला पकडल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी माझ्या घरी फोन करून यानेच तर हे केले नाही ना, अशी विचारणा केली होती! आजही या गोष्टींचा मला पश्चाताप होतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;आपल्या समाजातील मुलांना भडकवले जाते, आपल्याला चिथावणी दिली जाते आणि आपला वापर होतो हे आपल्या समाजाला कळेनासे झालेय. हे छद्म ओळखायला शिकले पाहिजे, ही एक दुष्टनीती आहे आणि त्यात आपला समाज वाहवत चाललाय. बंधूंनो आणि भगिनींनो आपण यावर गाभार्याने आत्मपरीक्षण केले पाहिजे. मगच आपण संजय गायकवाड यांच्या सारख्या मुजोर आणि बेमुर्वत प्रवृत्तींना वेसण घालू शकू.&lt;/p&gt;
&lt;p&gt;संजय गायकवाड यांच्या वर्तनात आणि शिवप्रेमात एक विलक्षण विसंगती आहे. छिंदम, भगतसिंग कोश्यारी, सोलापूरकर आणि कोरटकर इत्यादि लोकांनी शिवाजी राजांविषयी गरळ ओकली होती तेव्हा हेच गायकवाड आणि यांचे कर्ते धर्ते तोंड शिवून गप्प होते! मात्र ज्यांनी शिवाजी राजांवर एक अप्रतिम पुस्तक लिहिलं आहे त्यांच्यावरुन ते पुस्तक प्रकाशकाला तुला ही पानसरेकडे पाठवतो अशी भाषा करतात! यांना सत्तेत राहायचे असल्याने काहीनी शिवाजी राजांविषयी काहीही विखार वदला तरी हे मौन राहतील कारण यांचे शिवप्रेम खोटे आहे, शिवप्रेम दाखवून सत्तेत राहायचे हे यांचे मनसुबे आहेत! हे ओळखून समाजाने यांना जागेवर आणलं पाहिजे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;तुमचा,&amp;nbsp;&lt;br /&gt;समीर गायकवाड.&lt;/p&gt;
&lt;p&gt;हे पत्र मराठा समाजातील बांधवांना उद्देशून लिहिले असले तरी अन्य शिवप्रेमी जनतेनेही यावर विचार केला पाहिजे! आपण हे किती काळ हे मुक्यागत बघत राहणार आहोत यावर कृती केली पाहिजे&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/23/df6f2897c58767099f95e18d44f9959617769512896561002_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : मटक्याची बेरंग दुनिया...]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/blog-of-sameer-gaikwad-on-matka-king-ratan-khatri-village-economy-marathi-news-1421280</link><comments>https://marathi.abplive.com/blog/blog-of-sameer-gaikwad-on-matka-king-ratan-khatri-village-economy-marathi-news-1421280#respond</comments><pubDate>Wed, 22 Apr 2026 22:08:15 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ बॉलीवूड ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/blog-of-sameer-gaikwad-on-matka-king-ratan-khatri-village-economy-marathi-news-1421280</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;BLOG :&lt;/strong&gt; नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन आणि संयुक्त निर्मिती असलेला 'मटका किंग' सिरिज पाहिली, मनात अनेक गोष्टींचे मोहोळ जागे झाले. त्या अनेक टपऱ्या आठवल्या आणि त्यांच्या नादाला लागून उद्ध्वस्त झालेले संसार आठवले. मटक्याचे रकाने, काही खास दैनिकात येणारे आकड्यांचे अंदाज, फुल स्केप पेपरचे बरोबर बारा तुकडे करून त्या मध्ये कार्बन पेपर ठेवून दिली जाणारी टीप आठवली. सकाळ संध्याकाळच्या खास नेमक्या वेळी कासावीस होऊन आशाळभुतागत मटका टपरीवर जाऊन ओपन काय आले आहे आणि क्लोज काय आले आहे याचे अदमास घेणारे भुकेच्या डोहात बुडालेले चेहरे आठवले. मटका लागल्यावर ऐश करून पैसे उडवले जायचे आणि मोठी रक्कम हारली की देशी दारूचा गुत्ता जवळ केला जायचा. हारलेला माणूस पुन्हा पुन्हा पैसे लावत राहायचा. कधी तरी एकदा जिंकायचा मात्र बहुतांश वेळी तो गर्तेत जायचा. असं करत करत घरेच्या घरे मटक्याने गिळंकृत केली. पण जे मटका घेत होते त्यांचे काय झाले?&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बऱ्याचदा मटका घेणारी माणसं तिशीतली चाळीशीतली असायची. रापलेल्या चेहऱ्याने विस्कटलेल्या केसांची ही माणसं मळकट बिन इस्त्रीच्या कपड्यांवर असायची. टपरीत दोन तीन देवी देवतांची चित्रे असत. साल संपून गेलेले कॅलेंडर असे. शाळेची काळी पाटी एका तारेला अडकवली जायची. पाटीच्या खाली कागदाच्या सुरळ्या असत. कोपऱ्यात कुठे तरी दोन तीन वह्या असत ज्यांची पाने भरलेली असत. सतरंजी अंथरूण त्यावर हा सदगृहस्थ बसलेला असे. गुटखा सुरु होण्याच्या आधीच्या काळात मावा नाहीतर तंबाखू जर्दा यांची गोळी जबड्यात दाबून ठेवलेल्या अवस्थेत तोंडातला तोबरा तसाच धरून ही माणसं येणाऱ्या जाणाऱ्यांचे निरीक्षण करत असत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मटका बुकी असं यांचं टेक्निकल पोझिशन असलं तरी लोक मात्र त्याला मटक्याचा दलाल म्हणत. सकाळची ओपनची फिगर डिक्लेअर होण्याच्या सुमारास टपऱ्या उघडल्या जात असल्या तरी रात्रीची फायनल फिगर येईपर्यंत टपरी बंद केली जात नव्हती. सुरुवातीला हे केवळ मटक्याचे आकडे घेत असले तरी पुढे जाऊन या लोकांनी जोडधंदे सुरु केले. व्याजबट्टा, जुगाराचे क्लब, टँगो पंचच्या बाटल्यांचा साठा ठेवणे असं करत करत यांच्यातले काही गबरगंड झाले. काहींनी यात अफाट हात मारला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मटका बुकिंग घेऊन मोठी झालेली धेंडं स्वतःची यंत्रणा राबवू लागले, काहींनी तर स्थानिक लेव्हलवर वैयक्तिक धंदा सुरु केला. पैसा पैशाकडे ओढला जातो असं म्हटलं जातं, त्या उक्तीप्रमाणे ही काही मोजकी माणसं प्रचंड पैसेवाली झाली. पैसा अफाट झाला की पोलिसांना खुश ठेवणं आलं. पोलिसांनी आपल्यावर रोज चढू नये म्हणून राजकरण्यांशी संधान बांधणे हेही ओघाने आलं! यातून आणखी पुढचं पाऊल टाकत काहींनी थेट राजकारणात सहभाग घेऊन स्थानिक निवडणुका लढवल्या आणि पैशाच्या जोरावर ते निवडूनही आले. समाजात आपली पत वाढावी म्हणून ही मंडळी कोणत्याही जातीधर्माच्या उत्सवाच्या मंडळांचे कार्यकर्ते वर्गणीसाठी यांच्याकडे गेले तर त्यांना नाराज करत नसत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्यांनी एकीकडे डोकं वापरुन पैसा वाटताना आपापल्या समाजात मात्र चिक्कार पैसा टाकत आपण समाजातले एक मसिहा आहोत हे लोकांमध्ये समाजामध्ये रुजवले. त्यांच्याशी ओळख असणं ही मोठी बाब मानली जाऊ लागली. प्रत्येक जातीतला असा एक धर्मात्मा मोठा होत गेला. त्या त्या जातीच्या लोकांनी त्याला हृदयात स्थान दिलं. पुढे जाऊन या लोकांनी मग आपली दानत आणखी वाढवत गोरगरिबांना मदत ही केली. मात्र ही मदत एकीकडे जारी असताना त्यांचा हा हजारोंचे संसार उद्ध्वस्त करणारा मटक्याचा धंदाही चालूच होता! अशी माणसं प्रत्येक शहरात दिसू लागली. मटक्याने बाळसं धरलं आणि या मोजक्या लोकांना तर जणू अमरत्व लाभलं!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नवीन पोलीस अधिकारी आले की कारवाईचा फार्स व्हायचा. हप्त्याची सेटिंग पक्की व्हायची, वसुलदार नेमले जायचे आणि पुन्हा धंदा सुरळीत चालायचा. जे राजकारणात यशस्वी झाले नाहीत त्यांनी अपराध जगतातले अन्य मार्ग चोखाळून पाहिले. काहींनी बायकांचे कुंटणखाणे उभे केले, लॉजिंगच्या गोंडस नावाखाली मोक्याच्या जागी चादरबदलीचा धंदा सुरु केला. काहींनी हातभट्टीला बळ दिले तर काहीनी नव्या जमान्याचा व्हिडीओ पार्लरचा धंदा खोलला. मोजक्या लोकांना हे साधले, बाकी किरकोळ बुकिंग घेणारे कस्पटासमान जिंदगी जगले आणि मेले! त्यांच्याकडे किरकोळ दोन पाच रुपयांची बुकिंग देणारे कंगाल होऊन मेले आणि त्यांच्यापेक्षा थोडेसे बरे आयुष्य जगून हेदेखील खस्ताहाल अवस्थेतच मेले. यांच्या पिढ्या उद्ध्वस्त झाल्या.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मटका चालू राहावा अशी पोलिसांची इच्छा असे. दोन नंबर धंदा सुरु असला की सगळीकडे चलन फिरते, मार्केटमध्ये कॅश फ्लो टिकून राहतो आणि क्रिमिनल एलिमेंट्स पैसा कमवत शांत राहतात, पोलिसांना हप्ता मिळतो! सर्वांनाच बरकत! फक्त जे पैसे लावतात तेच खपतात, पण त्यांची पर्वा कुणी आणि का करावी? त्यामुळे काहीही झाले तरी मटका आपलं स्वरूप बदलून नव्या नव्या प्रकारे स्थापित होत राहिला. मोबाईलचे प्रस्थ वाढल्यावर अनेक ठिकाणी पोलिसांचा पत्ता कट करण्यासाठी वा त्यांची 'पाती' कमी करण्यासाठी मोबाइलवर बुकिंग घेतले जाऊ लागले. पुढे जाऊन मटक्यावाल्यांनी आयपीएलचे सट्टे सुरु केले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हा नवा मटका सट्टा तरुण पिढीला उद्ध्वस्त करत असतानाही साऱ्या यंत्रणा शांत मौन बसून आहेत! यात एक विचित्र विरोधाभास आणि गंमतदेखील आहे- जे कथित पांढरपेशे वा मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांना या संपूर्ण प्रकाराची फक्त उत्सुकता असते. मात्र ते त्याविषयी चीड संताप व्यक्त करताना दिसत नाहीत. कारण त्याची झळ त्यांना क्वचित बसते. आयपीएलचा सट्टा सुरु झाल्यापासून मात्र या परिघाबाहेर कुणीच राहिले नाही, सर्वांचे वर्तुळ एकच झालेय! तरीही कुणाला त्याची फिकीर नाही!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आता नागराज मंजुळे यांचा मटका किंग पाहिल्यावर अनेकांना ती रोजगारीची संधी वाटेल इतके ते जग त्यांनी भन्नाट पद्धतीने दाखवले आहे. हॉटेल कामगार, बांधकाम मजूर, रोजंदारीचे कामगार, हातावर पोट असणारी लाखो माणसं, काहीही केलं तरी उत्पन्न वाढत नसल्याने चटकन पैसे मिळावेत म्हणून गुंतून पडलेले कनिष्ठवर्गीय, चोरीचपाटी करून वीस पंचवीस रुपये मिळवणारे भणंग, पैशाचा हव्यास जडलेली माणसं अशी लाखों माणसं आणि त्यांचा संसार या धंद्याने उद्ध्वस्त करूनही हा धंदा आजही सुरु आहे!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एक शेवटची नोंद करून थांबतो. रेड लाइट एरियात फिरताना एक गोष्ट जाणवली ती अशी की, या धंद्यातील ऐंशी नव्वदच्या दशकातल्या बहुसंख्य बायका मटक्यावर पैसे लावत. आकडा सांगणारा एक इसम त्यांच्या गुत्त्यात फिरे, हारलेल्या बायका उद्या पैसे जिंकता येतील या आशेने पुन्हा पुन्हा पैसे लावत. त्यांनी जिंकलेले पैसे देखील त्यांना क्वचित दिले जायचे, ही गोष्ट त्रासदायक होती. मटकेवाल्यापाशी उधारी चालत नव्हती. ते या बायकांशी थेट संबंध कधीच ठेवत नसत. नोटबंदीच्या काळात या बायकांचे पैसे ज्यांनी ज्यांनी लुबाडले त्यात मटकेवाले अग्रस्थानी होते!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;केवळ या बायकाच पैसे लावत होत्या असे म्हणणे धाडसाचे ठरेल. हॉटेलात भांडी धुणाऱ्या बायकांनाही याचे व्यसन जडलेले असे. झाडलोट करणाऱ्या आणि मोस्टली श्रमाचे काम करणाऱ्या बायकांही यात अडकून पडल्या होत्या. त्यांच्यात आणि रोज उठून आशाळभुतासारखं आकड्याचं जग डोक्यात घेऊन फिरणाऱ्या पुरुषांत एक महत्वाचा फरक होता. तो फरक म्हणजे या बायकांना जिंकलेले पैसे कुटुंबाच्या जबाबदाऱ्या निभावण्यासाठी हवेहवेसे वाटत! मटक्यात पैसे जिंकलेली बाई दारूमटणाची पार्टी करताना मी माझ्या आयुष्यात कुठेही कधीही पाहिली नाही!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मटका किंग रतन खत्रीच्या रूपाने देशभरात एकच होता मात्र त्याचे स्थानिक उमराव जमीनदारासारखे मनसबदार मात्र प्रत्येक शहरात निर्माण झाले, त्यांनी व्यवस्थेशी असा काही संग केला की पोटं फुगलेल्या ढेरपोटयांचे खिसे मजबूत भरले, राजकारण्यांचे बँक बॅलन्स वाढवले, खाकी वर्दीला पैशाने गर्वार केले आणि स्वतः मात्र धर्मात्मा म्हणून मिरवून घेतलं! आकडे सांगणाऱ्या बाबा बुवांचे पेव फुटले. भाग्यलक्ष्मी लाभलंक्ष्मी सारख्या लॅाटऱ्यांनी हात धुवून घेतले!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;फिरोजखान आणि प्रेमनाथच्या प्रमुख भूमिका असलेला धर्मात्मा हा देखील मटकाकिंग रतन खत्रीच्या आयुष्यावर बेतलेला होता. यात प्रेमनाथचे नाव धर्मदास असतं. हाच धागा &amp;lsquo;कर्ज&amp;lsquo;मध्ये होता, त्यात त्याला जे काही महत्वाचे सांगायचे असते, ते तो काचेच्या ग्लासवर टिचकी मारून सांगायचा. त्याने किती टिचक्या मारल्या आणि त्याचा ध्वनीनाद कसा होता यावरून अर्थ लावण्यात यायचा. खऱ्या आयुष्यातला रतन खत्री मटक्यावर टिचक्या मारायचा, त्याने किती टिचक्या मारल्या याची नोंद पत्ते काढणारा घेत असे. अपराध जगताची एंट्री करुन देणाऱ्या या धंद्यातले कोडवर्डस आजही विसरू शकलो नाही.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नागराज मंजुळेंचा मटका किंग पाहताना ते हजारो भकास चेहरे, आणि हताशा हतबलतेने ग्रासलेले खचलेली पिचलेली माणसं आठवली! पोटात कालवलं! पायाखाली मुंग्या चिरडून टाकाव्यात इतक्या सहजतेने समाजाने, सरकारने आणि व्यवस्थेने ही माणसं अशी किड्यामुंगीच्या मौतीने कशी काय मरू दिली याचे शल्य आजही वाटते! माझे बालपण आणि आयुष्यातील बरीच वर्षे ज्या परिसरात गेली त्या भागांतली अनेक माणसं, अनेक घरं आणि तिथल्या विमनस्क चेहऱ्याच्या बायका आठवल्या! याची दोषनिश्चिती कशी करायची हा यक्षप्रश्न आजही छळतो!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मटक्याची दुनिया बेरंगी होती पण इंद्रधनुष्यी स्वप्ने दाखवण्याची त्यात ताकद होती, याच स्वप्नांना गोरगरीब भुलत गेले हे वास्तव टोकदार होतं!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/22/5fda182036b0b0c35ba1d12289e487f4177687573337493_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं...; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली "आशा'']]></title><link>https://marathi.abplive.com/blog/asha-bhosle-who-disappointed-swar-chandane-shimpit-bugadi-mazi-sandli-ge-singer-1419971</link><comments>https://marathi.abplive.com/blog/asha-bhosle-who-disappointed-swar-chandane-shimpit-bugadi-mazi-sandli-ge-singer-1419971#respond</comments><pubDate>Sun, 12 Apr 2026 17:52:19 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ abp majha web team ]]></dc:creator><category><![CDATA[ करमणूक ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/asha-bhosle-who-disappointed-swar-chandane-shimpit-bugadi-mazi-sandli-ge-singer-1419971</guid><description><![CDATA[&lt;p&gt;मोठ्या झाडाच्या सावलीत लहान झाड फारसे वाढत नाही या उक्तीला तीने चुकीचे ठरवले, हयातभर अपार कष्ट उपसत आणि स्वर साधना करीत, दीनानाथ मंगेशकर यांच्यासारख्या आक्रमक, पल्लेदार गायकी असलेल्या गुणी आणि प्रतिभाशाली गायकापोटी जन्म घेण्याचे सौभाग्य इतर भावांडा प्रमाणेच &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/asha-bhosle&quot;&gt;तिला (Asha bhosle)&lt;/a&gt; ही लाभले, मात्र साक्षात सरस्वतीचा दैवी अंश असलेल्या &quot;लता दीदींच्या मोठ्या झाडाच्या सावलीत राहण्याचा आणि वाढण्याचा शाप घेऊनच ती जगली, वावरली आणि यशाच्या एकेक पायऱ्या चढत स्वतःचे झाड ही तीने महावृक्षात रूपांतरित केलें ते आपल्या जादुई गोड गळ्याने आणि &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/singer&quot;&gt;संगीतातील (Singer)&lt;/a&gt; सर्व प्रकारच्या चालीत सारख्याच सहजतेने लीलया केलेल्या गायकीने.&lt;/p&gt;
&lt;p&gt;तिच्या आवाजात &quot;लता दीदी आणी रफी यांच्यासारखीच अफाट रेंज होती म्हणूनच अभंग, नाट्य, करुण, शृंगार, कॅबरे लोकगीत अशी सर्वच ढंगात असलेली हजारो गाणी तीने अश्या काही जोशात आणि अवेशात सादर केली कि ती गाणी &quot;पडदा, सिनेमा, गीतकार, संगीतकार यांना छेदन देत तिची स्वतःची झाली, तिच्या &quot;आशा गाण्यांचे &quot;असे एक स्वतंत्र लोभस नाणे गोल्डन इरातील गाण्यात पडले. हंसराज बहेल (ज्याने लताला &quot;जब रात नही कटती जिंदगी कैसे कटेगी सारखे अवीट गोडीचे गाणे दिले (जेवरात या सिनेमांत )त्या बहेल ने तिला पहिले स्वतंत्र हिंदी सोलो गाणे दिले त्यापूर्वी दहाव्या वर्षी तीने पार्श्वगायन केलें होते आणि नंतर गीता दत्त, आणी जोहराबाई यांसोबत गायली होती पण नंतर तीने मागे वळून पाहिले नाही, तिचा कलाप्रवास सोपा नव्हताच, काटेरी मार्गाने त्यांना कायम चालत रहावे लागले, गाणी मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागली, कारण खरी स्पर्धक घरातच होती &quot;लता दीदी यांच्या रूपात... असो&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मला आवडलेल्या त्यांच्या काही गाण्यांच्या सुंदर रांगोळ्याचे दर्शन घडवत त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. त्यांची &quot;जिवलगा राहिले रे दूर घर माझे &quot;चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले &quot;कोकिळा गा &quot;हात नका लावू माझ्या साडीला &quot;ब्रम्हा विष्णू आणी महेश &quot;ही वाट दूर जाते &quot;समईच्या शुभ्र कळ्यांनी &quot;तरुण आहे रात्र &quot;माझा होशील का?&quot;तू दूर दूर तेथे &quot;विसरशील खास मला &quot;धुंदी कळ्यांना &quot;चंद्र आहे साक्षीला, &quot;बुगडी माझी सांडली ग&quot; स्वप्नातल्या कळ्यानो उमलू नकाच केव्हा &quot;रामा रघु नंदाना &quot;धागा धागा अखंड विणू या अश्या सुंदर भावगीत, भक्ती गीत यांच्या स्वर रांगोळ्या आहेत. तशाच हिन्दीतील &quot;आंखोसे जो उतरी है दिलमे, &quot;जाईये आप कहा जायेंगे &quot;चैन से हमको कभी आपने जीने न दिया &quot;बेकसी हद से गुजर जाये &quot;आईये मेहेरबान, &quot;पंछी रे ओ पंछी, &quot;सच हुये सपने &quot;तोरा मन दर्पण कहेलाये &quot;दिल चीज है क्या &quot;आंखोमे क्या जी &quot;ओ मेरे सोना रे, &quot;बाहोमे चले आओ, &quot;अशको से हमने 'तेरी तस्वीर बनायी है, &quot;जब चली थंडी हवा, &quot;ओ पंछी प्यारे, &quot;आणी &quot;वो सुबह कभी तो आयेगी...&lt;/p&gt;
&lt;p&gt;अश्या अनेक सुंदर गाण्यांच्या सुंदर रांगोळ्या मागे ठेवून &quot;आशाजी हे भौतिक जग सोडून, चाहत्याना दुःखाच्या सागरात लोटून &quot;राहिले रे दूर घर माझे म्हणतं &quot;देवाच्या सर्वात मोठ्या घरात कायम स्वरूपी रहायला गेल्या आहेत... आणखी एक &quot;मंगेशी सूर&quot; मंगेशीच्या गाभाऱ्यात कायमचा निमला, मागे &quot;आशा सुरांची शांत स्नीग्ध समई रसिकांच्या मनात वर्षानुवर्षे तेवत राहील हे नक्कीच. तिच्या जाण्याने माईची खूप आठवण झाली, देवघरातील तिच्या फोटोला रोज हळदी कुंकू वाहणारी भाबडी माई... आशा ताईंच्या पवित्र आत्म्यास आपले दत्तगुरु शांती प्रदान करोत. ॐ शांती&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;(लेखक - दिलीप मोडक)&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/12/bb42f366eca68951cb18f2be218a992117759963448281002_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं...; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली "आशा'']]></title><link>https://marathi.abplive.com/blog/asha-bhosle-who-disappointed-swar-chandane-shimpit-bugadi-mazi-sandli-ge-singer-1419970</link><comments>https://marathi.abplive.com/blog/asha-bhosle-who-disappointed-swar-chandane-shimpit-bugadi-mazi-sandli-ge-singer-1419970#respond</comments><pubDate>Sun, 12 Apr 2026 17:52:18 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ abp majha web team ]]></dc:creator><category><![CDATA[ करमणूक ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/asha-bhosle-who-disappointed-swar-chandane-shimpit-bugadi-mazi-sandli-ge-singer-1419970</guid><description><![CDATA[&lt;p&gt;मोठ्या झाडाच्या सावलीत लहान झाड फारसे वाढत नाही या उक्तीला तीने चुकीचे ठरवले, हयातभर अपार कष्ट उपसत आणि स्वर साधना करीत, दीनानाथ मंगेशकर यांच्यासारख्या आक्रमक, पल्लेदार गायकी असलेल्या गुणी आणि प्रतिभाशाली गायकापोटी जन्म घेण्याचे सौभाग्य इतर भावांडा प्रमाणेच &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/asha-bhosle&quot;&gt;तिला (Asha bhosle)&lt;/a&gt; ही लाभले, मात्र साक्षात सरस्वतीचा दैवी अंश असलेल्या &quot;लता दीदींच्या मोठ्या झाडाच्या सावलीत राहण्याचा आणि वाढण्याचा शाप घेऊनच ती जगली, वावरली आणि यशाच्या एकेक पायऱ्या चढत स्वतःचे झाड ही तीने महावृक्षात रूपांतरित केलें ते आपल्या जादुई गोड गळ्याने आणि &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/singer&quot;&gt;संगीतातील (Singer)&lt;/a&gt; सर्व प्रकारच्या चालीत सारख्याच सहजतेने लीलया केलेल्या गायकीने.&lt;/p&gt;
&lt;p&gt;तिच्या आवाजात &quot;लता दीदी आणी रफी यांच्यासारखीच अफाट रेंज होती म्हणूनच अभंग, नाट्य, करुण, शृंगार, कॅबरे लोकगीत अशी सर्वच ढंगात असलेली हजारो गाणी तीने अश्या काही जोशात आणि अवेशात सादर केली कि ती गाणी &quot;पडदा, सिनेमा, गीतकार, संगीतकार यांना छेदन देत तिची स्वतःची झाली, तिच्या &quot;आशा गाण्यांचे &quot;असे एक स्वतंत्र लोभस नाणे गोल्डन इरातील गाण्यात पडले. हंसराज बहेल (ज्याने लताला &quot;जब रात नही कटती जिंदगी कैसे कटेगी सारखे अवीट गोडीचे गाणे दिले (जेवरात या सिनेमांत )त्या बहेल ने तिला पहिले स्वतंत्र हिंदी सोलो गाणे दिले त्यापूर्वी दहाव्या वर्षी तीने पार्श्वगायन केलें होते आणि नंतर गीता दत्त, आणी जोहराबाई यांसोबत गायली होती पण नंतर तीने मागे वळून पाहिले नाही, तिचा कलाप्रवास सोपा नव्हताच, काटेरी मार्गाने त्यांना कायम चालत रहावे लागले, गाणी मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागली, कारण खरी स्पर्धक घरातच होती &quot;लता दीदी यांच्या रूपात... असो&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मला आवडलेल्या त्यांच्या काही गाण्यांच्या सुंदर रांगोळ्याचे दर्शन घडवत त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. त्यांची &quot;जिवलगा राहिले रे दूर घर माझे &quot;चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले &quot;कोकिळा गा &quot;हात नका लावू माझ्या साडीला &quot;ब्रम्हा विष्णू आणी महेश &quot;ही वाट दूर जाते &quot;समईच्या शुभ्र कळ्यांनी &quot;तरुण आहे रात्र &quot;माझा होशील का?&quot;तू दूर दूर तेथे &quot;विसरशील खास मला &quot;धुंदी कळ्यांना &quot;चंद्र आहे साक्षीला, &quot;बुगडी माझी सांडली ग&quot; स्वप्नातल्या कळ्यानो उमलू नकाच केव्हा &quot;रामा रघु नंदाना &quot;धागा धागा अखंड विणू या अश्या सुंदर भावगीत, भक्ती गीत यांच्या स्वर रांगोळ्या आहेत. तशाच हिन्दीतील &quot;आंखोसे जो उतरी है दिलमे, &quot;जाईये आप कहा जायेंगे &quot;चैन से हमको कभी आपने जीने न दिया &quot;बेकसी हद से गुजर जाये &quot;आईये मेहेरबान, &quot;पंछी रे ओ पंछी, &quot;सच हुये सपने &quot;तोरा मन दर्पण कहेलाये &quot;दिल चीज है क्या &quot;आंखोमे क्या जी &quot;ओ मेरे सोना रे, &quot;बाहोमे चले आओ, &quot;अशको से हमने 'तेरी तस्वीर बनायी है, &quot;जब चली थंडी हवा, &quot;ओ पंछी प्यारे, &quot;आणी &quot;वो सुबह कभी तो आयेगी...&lt;/p&gt;
&lt;p&gt;अश्या अनेक सुंदर गाण्यांच्या सुंदर रांगोळ्या मागे ठेवून &quot;आशाजी हे भौतिक जग सोडून, चाहत्याना दुःखाच्या सागरात लोटून &quot;राहिले रे दूर घर माझे म्हणतं &quot;देवाच्या सर्वात मोठ्या घरात कायम स्वरूपी रहायला गेल्या आहेत... आणखी एक &quot;मंगेशी सूर&quot; मंगेशीच्या गाभाऱ्यात कायमचा निमला, मागे &quot;आशा सुरांची शांत स्नीग्ध समई रसिकांच्या मनात वर्षानुवर्षे तेवत राहील हे नक्कीच. तिच्या जाण्याने माईची खूप आठवण झाली, देवघरातील तिच्या फोटोला रोज हळदी कुंकू वाहणारी भाबडी माई... आशा ताईंच्या पवित्र आत्म्यास आपले दत्तगुरु शांती प्रदान करोत. ॐ शांती&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;(लेखक - दिलीप मोडक)&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/12/bb42f366eca68951cb18f2be218a992117759963448281002_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : संघर्षातून उभा राहिलेला तहसीलदार! संवेदनशील अधिकारी हरपला]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/rakesh-gidde-tahsildar-kaij-beed-accident-death-inspirational-story-sameer-gaikwad-blog-1419758</link><comments>https://marathi.abplive.com/blog/rakesh-gidde-tahsildar-kaij-beed-accident-death-inspirational-story-sameer-gaikwad-blog-1419758#respond</comments><pubDate>Fri, 10 Apr 2026 22:47:22 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ बीड ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/rakesh-gidde-tahsildar-kaij-beed-accident-death-inspirational-story-sameer-gaikwad-blog-1419758</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;BLOG :&lt;/strong&gt; बीड जिल्ह्यातील केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी एका ऊसतोड कामगाराच्या कुटुंबातील मुलीच्या केसमध्ये व्यक्तिशः संपर्क साधून मदत केली होती. त्यांच्या बोलण्यातून त्यांची मदतीच्या भावनेची, कामाची तळमळ जाणवली होती. अतिशय उमद्या स्वभावाचा प्रामाणिक आणि मेहनती अधिकारी काल अपघाताने आपल्यातून निघून गेला आहे. त्यांचं अकाली जाणं धक्कादायक आणि खूप क्लेशदायक आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;राकेश गिड्डे यांचे वडील अण्णासो गिड्डे खासगी वाहनावर चालक म्हणून काम करायचे. घरची जेमतेम कोरडवाहू शेती. या कुटुंबात राकेश जन्माला आला. कष्टाने शिकला, संघर्ष केला आणि तहसीलदार झाला. गावाला त्याचे भारी कौतुक. &amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्यांच्याकडून प्रेरणा घेत अनेक तरुण स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागले, अनेकांनी यश मिळवले. त्यांचे काम लक्षवेधी होते आणि त्यांचा संसारही आता बहरू लागला होता, पण नियतीला हे मान्य नव्हते. एका अपघातात आज राकेश गिड्डे यांचे काल निधन झाले..&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे तहसीलदार राकेश अण्णासाहेब गिड्डे यांच्या अपघाती निधनाची बातमी आज सकाळी येऊन धडकली आणि सारे सुन्न झाले. ते ज्या शाळेत शिकले, त्या शहीद अभयकुमार पाटील विद्यालयासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;2019 ला अधिकारी झालेले राकेश गिड्डे अवघे एकतीस वर्षांचे होते. दीर्घकाळ पुण्यात राहून त्यांनी अभ्यास केला. वडिलांनी कष्टाने त्यांना बळ दिले..ज्या वयात मुले करिअरसाठी संघर्ष करतात, त्या वयात हा पठ्ठ्या तालुक्याचा प्रमुख म्हणून खुर्चीवर विराजमान झाला.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्यांच्या हाती जे होते, ते त्यांनी मुक्त हस्ते मदत करत शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. अडल्या-नडल्या लोकांच्या कल्याणाचे निर्णय गतीने राबवले. बांधावर जाऊन काम करणारा तहसीलदार अशी त्यांची मराठवाड्यात ओळख निर्माण झाली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बीडमध्ये काम करणे सोपं नसते, राकेशने ते करून दाखवले. तीन वर्षांपूर्वी थाटामाटात त्यांचे लग्न झाले. दोन वर्षांची मुलगी आहे त्यांना. पोरगा तहसीलदार झाल्याने कुटुंबाचे नशीबही पालटले. शेतीत विकास सुरू झाला. छोट्या-मोठ्या व्यवसायातून प्रगती व्हायला लागली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ते दूर मराठवाड्यात असले तरी गावातील अनेक उपक्रमांना त्यांचे पाठबळ असायचे. कोरोना संकट काळात त्यांनी औषधे, वैद्यकीय सुविधांसाठी मदत उभी केली होती.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;राज्यातील कित्येक होतकरू तरुणांना ते स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबत मार्गदर्शन करायचे. त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते... ते कष्टाने तहसीलदार झाले, पण त्यांचा डाव अर्ध्यावर मोडला.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ काल पहाटे झालेल्या भीषण कार अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधन वार्तेने संबंध मराठवाडा सुन्न आहे, त्यांचे मूळ गाव एरंडोलीवर शोककळा पसरली.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;भ्रष्टाचाराच्या आणि चाटूगिरीच्या दलदलीत रुतलेल्या प्रशासन व्यवस्थेत राकेश गिड्डेंसारखे अधिकारी मिसफिटच होते, मात्र त्यांच्यासारखे अधिकारी यात उरले नाहीत तर ही व्यवस्था अजूनच बरबटून जाईल!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हातावर मोजण्याइतके चांगले अधिकारी प्रशासनात कार्यरत असताना राकेश गिड्डेंची अकाली एक्झिट अधिकच क्लेशदायक ठरलीय.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्यांच्याशी संवाद झाला तेव्हाच जाणवले होते की हा तरुण अधिकारी खूप संवेदनशील आणि कनवाळू मनाचा आहे. इतक्या चांगल्या माणसासोबत असं घडायला नको होतं. हे काही बरं झालं नाही..&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/10/ef29cb943f0a7406b60207803cd0988b177584141459393_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Iran US War Ceasefire: मध्यस्थ म्हणून पाकिस्तान...पण का?]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/iran-us-war-ceasefire-why-is-pakistan-mediating-the-ceasefire-between-iran-and-the-us-lets-know-reason-donald-trump-shehbaz-sharif-blog-by-sameer-gaikwad-1419537</link><comments>https://marathi.abplive.com/blog/iran-us-war-ceasefire-why-is-pakistan-mediating-the-ceasefire-between-iran-and-the-us-lets-know-reason-donald-trump-shehbaz-sharif-blog-by-sameer-gaikwad-1419537#respond</comments><pubDate>Thu, 9 Apr 2026 10:17:24 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ विश्व ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/iran-us-war-ceasefire-why-is-pakistan-mediating-the-ceasefire-between-iran-and-the-us-lets-know-reason-donald-trump-shehbaz-sharif-blog-by-sameer-gaikwad-1419537</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;-समीर गायकवाड&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;भारतीय वायुदलाचे निवृत्त विंग कमांडर जी एस सेडा यांनी लिहिलेल्या लेखाचा हा स्वैर मराठी अनुवाद आहे. चंडीगढचे रहिवासी असणाऱ्या, वीस वर्षे वायुदलात सेवा बजावणाऱ्या सेडा यांच्या मतांना निश्चितच महत्व आहे. ते लिहितात - &amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मध्यस्थ म्हणून पाकिस्तान...पण का?&lt;/p&gt;
&lt;p&gt;गेल्या दोन दिवसांपासून माझ्या मानांत हा प्रश्न मनात घोळत आहे. पाकिस्तानच का? मध्यस्थी करू शकणाऱ्या सर्व देशांपैकी, हाच देश का? जो आर्थिकदृष्ट्या मोडकळीस आलेला आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर कलंकित आहे, ज्याने ओसामा बिन लादेनला आश्रय दिला, ज्याला अगणित वेळा दहशतवादाचा प्रायोजक म्हटले गेले आहे, जो अवघ्या वर्षभरापूर्वी इराणसोबत अक्षरशः क्षेपणास्त्रांची देवाणघेवाण करत होता? आणि तरीही, त्यांचीच नावे समोर होती. शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर! होय यांचीच नावे ट्रम्प यांनी त्यांच्या शस्त्रसंधीच्या घोषणेत स्वतः घेतली होती. मोदी नाही. एर्दोगान नाही. अगदी सौदीसुद्धा नाही. तो पाकिस्तान होता. म्हणून मी विचार करू लागलो की, मध्यस्थीसाठी नेमके काय आवश्यक असते. आणि जेव्हा मी संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचे उत्तर जवळजवळ लाजिरवाणे वाटेल इतके सोपे वाटले. तुमची निवड तुम्ही सद्गुणी, शक्तिशाली किंवा प्रशंसनीय आहात म्हणून होत नाही. तुमची निवड होते कारण तुम्ही उपयुक्त असता, आणि तुम्ही एकाच चेंबरमध्ये असताना प्रत्येकजण तुमच्यासोबत राहू शकतो. हा दृष्टिकोन सर्व काही बदलून टाकतो. यावर विचार करा. पाकिस्तानचे सर्वात वादग्रस्त वैशिष्ट्य म्हणजे दहशतवादी नेटवर्क आणि इस्लामी गटांशी असलेले त्याचे अनेक दशकांपासूनचे, अत्यंत अस्वस्थ करणारे संबंध. आणि, नेमकी याच गोष्टीने त्याला असा प्रवेश मिळवून दिला जो इतर कोणालाही मिळाला नाही.&amp;nbsp;जेव्हा एखाद्या महासत्तेला अशा व्यक्तीपर्यंत संदेश पोहोचवायचा असतो, ज्याला ती अधिकृतपणे मान्यता देऊ शकत नाही, तेव्हा पाकिस्तान फोन उचलू शकतो. आयएसआयने नेमके हेच गुप्त मार्ग पन्नास वर्षे जोपासले आहेत.&lt;/p&gt;
&lt;p&gt;बहुतेक व्यवसायांमध्ये हा इतिहास एक अडचण ठरू शकतो, परंतु गुप्त राजनैतिकतेच्या जगात हे एक असे कौशल्य आहे जे ठळकपणे मांडले पाहिजे; जे आपल्या बायोडेटामध्ये (CV) धैर्याने, आत्मविश्वासाने नमूद करता आले पाहिजे. आणि मग त्याहूनही एक अधिक मूलभूत गोष्ट आहे&amp;hellip; ती म्हणजे &amp;lsquo;नकार देण्याच्या&amp;rsquo; क्षमतेचे मूल्य. शस्त्रसंधी करू इच्छिणाऱ्या देशांना अनेकदा आपल्या शत्रूंशी संवादाच्या भूमिकेत दिसणे परवडत नाही. त्याची देशांतर्गत राजकीय किंमत खूप जास्त असते. त्यामुळे त्यांना अशा कोणाची तरी गरज असते, जो कोणताही मागमूस न ठेवता संदेश पोहोचवू शकेल. पाकिस्तान खूप काळापासून, शांतपणे आणि विश्वासार्हपणे, तीच &amp;lsquo;ती&amp;rsquo; व्यक्ती बनून राहिला आहे. &amp;ldquo;आम्ही त्यांच्याशी बोलत नाही आहोत. पण कोणीतरी बोलत आहे.&amp;rdquo; अशा प्रकारचा विश्वासार्ह नकार म्हणजे निव्वळ बावनकशी गोष्ट आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;खरं तर, हे वर्तन काही नवीन नाही. 1971 मध्ये, पाकिस्ताननेच किसिंजर यांच्या बीजिंगच्या गुप्त भेटीची सोय केली होती - हाच तो गुप्त मार्ग होता ज्यामुळे चीनचे दरवाजे उघडले आणि शीतयुद्धाला नवी दिशा मिळाली. याह्या खान यांनी यासाठी संरक्षण, रसद आणि ओळखी करून दिल्या. किसिंजर आणि निक्सन यांनी नंतर ते मान्य केले. गेल्या शतकातील पडद्यामागील राजनैतिक घडामोडींमधील हे कदाचित सर्वात महत्त्वाचे कृत्य आहे, आणि त्यामागे पाकिस्तानचा अदृश्य हात होता. त्यामुळे, गेल्या दोन दिवसांत जे काही घडताना आपण पाहिले, ते आश्चर्यकारक कमी आणि स्वतःला सिद्ध करणारे एक मासलेदार उदाहरण स्वरूपात अधिक आहे. आणि मग येतो भूगोल &amp;mdash; एक अशी गोष्ट ज्याकडे कोणताही देश दुर्लक्ष करू शकत नाही, जी खोटी ठरवू शकत नाही किंवा जिला सहजपणे टाळू शकत नाही. पाकिस्तानच्या सीमा अफगाणिस्तान, इराण, चीन आणि भारताला लागून आहेत, पाकिस्तान आखाती सागरी मार्गांवर वसलेला आहे आणि मध्य आशियाला स्पर्श करतो. या प्रदेशाच्या समस्यांचा नकाशा काढल्यास त्यावर पाकिस्तान कुठे ना कुठे दिसल्याशिवाय राहणार नाही &amp;mdash; एकतर गुन्हेगार म्हणून किंवा बळी म्हणून!&lt;/p&gt;
&lt;p&gt;चीनच्या चंचू प्रवेशाने यात आणखी एक पदर जोडला. बीजिंगला जास्त पुढे न येता आपले अस्तित्व नि उपयुक्तता &amp;nbsp;दाखवून द्यायची होती, आणि पाकिस्तानने त्यांना नेमके तेच दिले.एक विश्वासार्ह चेहरा पण नाकारता येण्याजोगी उपस्थिती. त्यांनी एकत्रितपणे जाहीर केलेल्या संयुक्त पंचसूत्री योजनेने काही अंशी पाकिस्तानचा दर्जा वाढवला, पण चीनच्या प्रभावाचा संकेतही दिला. त्या अर्थाने, पाकिस्तान चीनसाठी एक वापरण्यायोग्य माध्यम म्हणून काम करत होता, नाही म्हटले तरी ही एक उल्लेखनीय गोष्ट आहे. या सर्व घडामोडीत एक असाही शांत घटक आहे ज्याबद्दल कदाचित जास्त बोलले जात नाही - पाकिस्तानची स्वतःची शिया लोकसंख्या, जी 20% असून ती नगण्य नाही. त्यामुळे तणाव कमी करण्यामध्ये इस्लामाबादला एक असा स्वार्थ साधता आला, ज्याचा मान केवळ सुन्नी मध्यस्थाला मिळाला नसता. इराणने जरी तसे म्हटले नसले, तरी ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली असती.आणि कदाचित सर्वात विडंबनात्मक गोष्ट म्हणजे &amp;mdash; पाकिस्तानच्या याच दुर्बळतेमुळे तो स्वीकारार्ह ठरला आहे. &amp;nbsp;एखादा प्रभावशाली परिणाम साधण्याइतका तो शक्तिशाली नाही. उपदेशात्मक वाटण्याइतका तो स्वच्छ चारित्राचाही नाही. प्रबोधन करण्याइतका वैचारिक स्तरही त्याच्याकडे नाही. धमकी देण्याइतका परिणामकारकही &amp;nbsp;नाही. जेव्हा दोन्ही बाजू मोठ्या प्लेयरवर अविश्वास दाखवतात, तेव्हा कधीकधी आपल्याला अशी व्यक्ती हवी असते जी विश्वासार्ह वाटण्याइतकी मोठी, विश्वास ठेवण्याइतकी अनुभवी आणि सुरक्षित वाटण्याइतकी लघुत्तम असेल.&lt;/p&gt;
&lt;p&gt;अपयशी राष्ट्र? कदाचित. पण त्याचबरोबर ही गोष्ट आपल्या सतत लक्षात येत नाही की ते अजूनही एक उचापत्या करत असलेले सक्रिय राष्ट्र आहे. तिथले नागरी सरकार गोंधळलेले आहे, हे आपल्याला माहीत आहे. अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. पण तिथले लष्कर एकसंध आहे, गुप्तचर यंत्रणा मजबूत आहे, आणि ज्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये गुप्त राजनैतिक संबंध चालतात, त्यामध्ये पाकिस्तान आश्चर्यकारकपणे, अस्वस्थ करण्याइतका सक्षम आहे. युद्धखोर पक्ष हे विचारत नव्हते की, पाकिस्तान त्या भूमिकेसाठी पात्र आहे का? मात्र ही भूमिका कोण पार पाडू शकेल यावर ते विचार नक्कीच करत होते! आणि पाकिस्तान, त्याच्या ठायी समग्र कमकुवतपणा आणि उणिवा असूनही &amp;mdash; कदाचित त्याचमुळे &amp;mdash; ते करू शकत होता. हाच तो भाग आहे जो आपल्याला पचनी पडणे सर्वात कठीण जाईल. माझ्या पुढील पोस्टमध्ये, मला अधिक अवघड प्रश्न विचारायचा आहे - भारताला असे का करता आले नाही? विंग कमांडर जी. एस. सेडा यांनी मांडलेले सर्व मुद्दे अगदी चपखल आहेत. आपल्या परराष्ट्र धोरणात या मुद्दयांचा विचार झाला आहे की नाही हे नेमके सांगता येणार नाही मात्र मध्यस्थीच्या निमित्ताने जागतिक पटलावर पाकिस्तानसारखा छुप्या आतंकवादी देशाचे नाव समोर यावे हे आपल्याला परवडणारे नाही कारण हा कुरापतखोर कंगाल देश आपला शेजारी आहे.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/09/cad962eb8109e753ee5b5fbe6a65987c1775709920703987_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Ashok Kharat Case And Shyam Benegal Bhumika Movie Connection: अशोक खरात आणि 'भूमिका'!]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/ashok-kharat-case-and-shyam-benegal-directed-smita-patil-starar-bhumika-movie-connection-nashik-crime-news-blog-by-sameer-gaikwad-1419307</link><comments>https://marathi.abplive.com/blog/ashok-kharat-case-and-shyam-benegal-directed-smita-patil-starar-bhumika-movie-connection-nashik-crime-news-blog-by-sameer-gaikwad-1419307#respond</comments><pubDate>Tue, 7 Apr 2026 13:44:33 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ करमणूक ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/ashok-kharat-case-and-shyam-benegal-directed-smita-patil-starar-bhumika-movie-connection-nashik-crime-news-blog-by-sameer-gaikwad-1419307</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Ashok Kharat Case And Shyam Benegal Bhumika Movie Connection:&lt;/strong&gt; 1977 सालचा 'भूमिका' (Bhumika) हा श्याम बेनेगल (Shyam Benegal) यांचे दिग्दर्शन असलेला गाजलेला चित्रपट. 'भूमिका' ही एका अभिनेत्रीच्या जीवनातील अनेक भूमिका, यश, अपयश, प्रेम, शोषण आणि तिच्या स्वातंत्र्याच्या तळमळीची गहन आणि भावनिक कथा. गतपिढीच्या ख्यातनाम अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या आत्मचरित्रावर आधारलेला &amp;nbsp;हा चित्रपट स्मिता पाटील (Smita Patil) यांच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक मानला जातो.&lt;/p&gt;
&lt;p&gt;कथा गोव्यातील एका गरीब ब्राह्मण कुटुंबात सुरू होते. उर्वशी उर्फ उषा (स्मिता पाटील) ही एका देवदासी परंपरेच्या प्रसिद्ध गायिकेची नात आहे. तिच्या आजीने तिला शास्त्रीय संगीत शिकवलेलं. उषाची आई (सुलभा देशपांडे ) एका व्यसनी आणि मारहाण करणाऱ्या इसमाची पत्नी असते. त्याच्या अकाली मृत्यूनंतर, आईचा विरोध असूनही, &amp;nbsp;कुटुंबातीलच एक व्यक्ती असलेल्या केशव दळवी (अमोल पालेकर) सोबत मुंबईतील एका स्टुडिओमध्ये गायिका म्हणून ऑडिशन देण्यासाठी उषाला नेले जाते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;ही एका प्रक्रियेतील पहिली पायरी असते, जी उषाच्या प्रेमळ आजीच्या पसंतीने आणि आईच्या भीतीने पार पाडली जाते. अखेरीस हीच प्रक्रिया तिला कॅमेऱ्यासमोर उभं करते आणि किशोरवयीन स्टार बनवते; पुढे जाऊन केशवसोबत तिचा दुर्दैवी प्रेमविवाह घडवून आणते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;कुरूप आणि वयाने खूप मोठ्या असलेल्या केशवला त्याच्या शैशवापासूनच तिच्याबद्दल आकर्षण वाटत होते, लग्नाआधीच्या गर्भधारणेने उषा हे नाते हट्टाने पुढे नेते. तिच्या कुटुंबाप्रती असलेल्या त्याच्या निष्ठेची तो हेतुपूरस्सर वारंवार आठवण करून देतो. खेरीज उषाच्या प्रारंभिक ऐहिक यशातही त्याचा वाटा आहे याची तो जाणीव करून देत राहतो. असे असूनही ज्या घरात आपला छळ होतो तिथून घरातून सुटका मिळवण्याचे एक साधन म्हणून उषा त्याच्याकडे पाहते. वास्तवात उषा ही एक हट्टी स्त्री आहे, स्वतःच्या अभिनय कारकीर्दीवर तिचा जीव आहे. तिचा स्वभाव बंडखोरीचा असल्याने, आपल्या कडक शिस्तीच्या आईला आव्हान देण्यावर ती ठाम आहे. उषाच्या आईचा या लग्नाला विरोध आहे कारण केशव त्यांच्या जातीचा नाही.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;हट्टी उषा काही केल्या ऐकत नाही, ती केशवसोबत लग्न करते. लग्नानंतर उषाला हे पाहून धक्का बसतो की, केशव तिचा 'बिझनेस मॅनेजर' म्हणून काम करत राहतो आणि तिच्यासाठी लोकप्रिय अभिनेता राजन (अनंत नाग) सोबत मुख्य भूमिका मिळवून देतो; वास्तवात राजनचे उषावर एकतर्फी प्रेम असते. आपल्या व्यवसायात अयशस्वी ठरलेला असल्याने, तो पूर्णपणे उषाच्या कमाईवर अवलंबून असतो; आपल्या नाकर्तेपणाचा सल केशवच्या मनाला पोखरत असते. त्यामुळे तो एकाच वेळी टोकदार अहंकारी आणि वाईट स्वभावाचा मत्सरग्रस्त नवरा बनतो आणि एक लोभी दलाल बनतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;सह-कलाकाराविषयी घृणा वाटत असूनही तो उषाला काम करायला भाग पाडतो. त्यांच्या दांपत्यजीवनात मुलगी जन्माला आल्यानंतर उषाला अभिनय सोडून केवल गृहिणी म्हणून राहायचे असते. तिच्या विरोधाला न जुमानता, काम करण्यास भाग पाडतो. साहजिकच, त्यांचे नाते अधिकाधिक विषाक्त होत जाते. &amp;nbsp;विशेषतः स्टार-मॅगझिनमधील गप्पांमुळे केशवच्या मनात संशयाचे भूत उभे राहते. राजनसोबत उषाचे प्रेमसंबंध आहेत असं त्याला वाटू लागतं. अर्थात या गोष्टीत काही अंशी तथ्य असते देखील मात्र हे प्रेम एकतर्फी असतं!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;नवऱ्याकडून होणारा शाब्दिक आणि शारीरिक छळ, तसेच पोटच्या मुलीपासून आणि आईपासून तिला दूर राहावे लागते. हा विरह तिला घायाळ करतो. त्यातच कामानिमित्त अधूनमधून हॉटेलमध्ये राहण्यास तिला भाग पाडले जाते. &amp;nbsp;खचून गेलेली उषा, आधार शोधण्याच्या निमित्ताने अखेरीस नव्या संबंधाकडे वळते. यातूनच तिच्या आयुष्यात दुसरे पुरुष येतात. निराशावादी वृत्तीचा आणि आत्मकेंद्रित विचारांवर फोकस करणारा दिग्दर्शक सुनील वर्मा (नसीरुद्दीन शाह) अल्पकाळासाठी तिच्या आयुष्यात येतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;सुनीलशी जवळीक झाल्यानंतर उषाला आधार मिळण्याऐवजी निराशेच्या गर्तेने ग्रासले जाते. त्याच्यासोबत ती दुहेरी आत्महत्येचा कट रचते, जो सुनीलकडूनच हाणून पाडला जातो, पराभूत मनाने उषा त्याला अलविदा म्हणते. तिच्या परिघात नव्या पुरुषाची एंट्री होते. विलक्षण श्रीमंत व्यावसायिक असणाऱ्या विनायक काळे ( अमरीश पुरी ) सोबत ती आपमर्जीने राहू लागते. लग्नाचे आमिष दाखवून आपल्या आलिशान इस्टेटीवर एक लाडकी रखेल म्हणून तिला 'ठेवतो'. दुसरी पत्नी म्हणून उषाला क्षणभर एक प्रकारची प्रतिष्ठा मिळते, ज्यामुळे तिला विनायकची आई (दिना पाठक), मुलगा आणि अंथरुणाला खिळलेल्या पत्नीकडून काही प्रमाणात प्रेम आणि आदर मिळतो. मात्र उषाचा आनंद दीर्घकाळ टिकत नाही. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;एके दिवशी जेव्हा ती विनायकच्या मुलाच्या प्रेमाखातर त्याचा बालहट्ट पुरा करण्यासाठी गावाजवळच्या जत्रेत एकट्याने कारमधून जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला कळते की, यासाठी तिला अगदी मूलभूत स्वातंत्र्याचीही किंमत मोजावी लागते. काळेच्या सरंजामी पुरुषप्रधान नियमांचे पालन करणे तिला अशक्य होते. आपण नजरकैदेत अडकलो आहोत याची जाणीव झाल्यावर तिच्यासाठी अजूनही कायदेशीर नाते असलेल्या, तिचा एके काळचा तिरस्कृत पती केशवच्या हस्तक्षेपात सुटकेची एकमेव आशा दिसते. गुपचुप चिठ्ठी पाठवून ती त्याच्याशी संपर्क साधते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;पत्र मिळताच तिच्या कामाईवर डोळा ठेवून असणारा लोभी केशव पोलिसफाटा घेऊन तिला ताबडतोब न्यायला येतो. तिच्याच चेहऱ्याच्या जाहिरात फलकांनी सजलेल्या मुंबईत, आणि त्याच नीरस हॉटेलमध्ये व एकाकी परिस्थितीत तिला परत आणतो. वयाने मोठी झालेली उषाची मुलगी, उषाला तिच्यासोबत राहण्यासाठी आमंत्रित करते, पण उषा नकार देते. चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यात, हॉटेलच्या खोलीत उषा एकाकी अवस्थेत विमनस्क मनाने &amp;nbsp;बसलेली असते, तितक्यात तिला राजनचा फोन होतो. संभ्रम कायम ठेवून सिनेमा संपतो.&amp;nbsp;&lt;br /&gt;&amp;nbsp;&lt;br /&gt;भूमिकाचा पीक पॉईंट म्हणजे विनायकच्या घरातून उषाचं निघून जाणं! एकेक वस्तूंचा, माणसांचा निरोप घेऊन ती निघते. निघताना विनायकच्या पत्नीपाशी येते. सर्व पातळ्यांवर आयुष्याची लढाई हरलेली ती हतबल स्त्री शक्य तितक्या कारुण्याने उषाला एक त्रिकालाबाधित सत्य सुनावते. ती म्हणते, &quot;बायकांचे फक्त पलंग बदलतात, स्वयंपाकघरं बदलतात, वाट्याला आलेल्या माणसांचे मुखवटे बदलतात, पण त्यांच्या नशिबी आलेले भोग बदलत नाहीत. शोषण करणारी माणसं बदलत नाहीत&quot;&lt;/p&gt;
&lt;p&gt;'भूमिका' आठवण्याचे कारण म्हणजे, अशोक खरातने जे काही केले आहे, त्यावर सोशल मीडियावर वितंडवाद सुरू आहे आणि त्याच्याकडे गेलेल्या स्त्रियांविषयी समाजात दुही पडली आहे, काहींना प्रकर्षाने वाटते की, या बायका आपखुशीने गेलेल्या बदचलन बाया होत, तर माझ्यासारख्या काहींना वाटते की, या स्त्रियांचे सरसकटीकरण करणे अन्यायकारक ठरेल. कोणत्याही व्यक्तीची पार्श्वभूमी नीट ठाऊक असल्याशिवाय संबंधितांच्या चारित्र्यावर कधीही कुणीही प्रश्नचिन्ह लावू नये! कॅरेक्टर असॅसिनेशन करणे ही गोष्ट जिवंतपणी मरणयातना देण्यासारखे आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/07/b2ef47c910aff4dec74709aaaee735ca177554958775688_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : भूषण गगराणी, बस नाम ही काफी है…]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/hemant-nimbalkar-ips-blog-on-bhushan-gagrani-ias-bmc-commissioner-retirement-upsc-kolhapur-marathi-1418411</link><comments>https://marathi.abplive.com/blog/hemant-nimbalkar-ips-blog-on-bhushan-gagrani-ias-bmc-commissioner-retirement-upsc-kolhapur-marathi-1418411#respond</comments><pubDate>Tue, 31 Mar 2026 14:43:00 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ हेमंत निंबाळकर ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/hemant-nimbalkar-ips-blog-on-bhushan-gagrani-ias-bmc-commissioner-retirement-upsc-kolhapur-marathi-1418411</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;भूषण गगराणी&lt;br /&gt;बस नाम ही काफी है&amp;hellip;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सर, आज आपण सेवा निवृत्त होत आहात. त्या निमित्तानं..&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;1991-92 चं वर्ष असावं. कोल्हापूरच्या कोंडा वळीतल्या (कोंढा ओळ) घरात आपली पहिली भेट! आयएएस अधिकारी कसा असतो हे जवळनं पाहण्याचा तो माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्या अगोदर शिवाजी विद्यापीठाच्या लायब्ररीत टाईट जीन्स आणि गांधीकाडीचा बॅाटलग्रीन रेबॅान घालून मार्गदर्शन करायला येणारी पीएसआय लोकच भेटली होती. एकादा तुरळक तहशीलदार वगैरे&amp;hellip;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मी यूपीएससीचा अभ्यास करणार हे मी कट्ट्यावर माझ्या मित्रांना सांगितलं. आजही कोल्हापुरातले सर्व महत्त्वाचे निर्णय हे कट्ट्यावरच होतात. माझ्या या निर्णयाला कडाडून विरोध करत कार्पोरेशनच्या येऊ घातलेल्या निवडणुकीची तयारी करण्याचा काळजीवजा प्रामाणिक सल्ला मला देण्यात आला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;परीक्षेच्या नादाला का लागायचं नाही हे पटवून देण्यासाठी पोरं मला संतोषकडं (नरेंद्र कुलकर्णी, आयआरएस, कस्टम्स) घेऊन गेली. त्याचा अभ्यास आम्ही बाबूजमालात अगदी कौतुकानं पण जरा लांबनंच पाहिला होता. बाबूजमालात एकच चर्चा असायची, संत्या अभ्यासानं खुळं होणार म्हणून. त्या खोलीतली ती पुस्तकं, तो पसारा आणि ते वातावरण बघून जरा दचकलोच. अर्धातास गप्पा झाल्यावर संतोषनं सांगितलं, भूषण कोल्हापुरात आला आहे, तू एकदा भूषणला भेट म्हणून. संतोषनं वेळ आणि भेट ठरवून आपला पत्ता दिला होता.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आमच्या डोक्यातला आयएएस म्हणजे सूट बूटातला माणूस. दारातनंच &amp;lsquo;साहेब आहेत का&amp;rsquo; म्हणून ओरडलो. मरून रंगाचा टी शर्ट आणि पायजम्यात आपण दत्त!&amp;nbsp;&lt;br /&gt;&amp;lsquo;हेमंत का तू? ये आत ये.&amp;rsquo;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मनात म्हटलं, &amp;lsquo;आपल्यासारखंच दिस्तंय की राव..&amp;rsquo;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जरा भीती कमी झाली. जरा निवांतच झालो म्हणा की! हिरोसारखा गोरापान चेहरा आणि कीडमीडीत म्हणावी अशी शरीरयष्टी. कसलाही तामझाम नाही, आविर्भाव नाही आणि ते मंद हास्य जे आजही तसंच टिकून आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मला जरा वेगळीच भीती होती. सायबानं इंग्रजीत बोलायला चालू केलं तर कसं करायचं? तसं पुढारीत वाचलं होतं की तुम्ही परीक्षा मराठीतनं दिली होती म्हणून. पण मराठी साहित्य हा विषय घेऊन की संपूर्ण परीक्षा मराठीतनं हा गोंधळ तेवढा स्पष्ट नव्हता. बरं, त्यांच्याकडं पाहिलं तर ह्या एवढ्या गोऱ्यापान, देखण्या आणि सुसंस्कृत माणसाला मराठी येत असेल असं वाटूच शकत नव्हतं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मला एक सफरचंद कापून देत आपण बोलला,&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;ldquo;सांग, काय करायचं ठरवलं आहेस?&amp;rdquo;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आणि एक तासाभरात सर्व शंकांचं सुलभ मराठीत निरसन झालं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सर, यूपीएससीची परीक्षा मराठी भाषेत देण्याच्या आपल्या निर्णयानं अखंड महाराष्ट्रात वणवा पेटला. माझ्यासारख्या बांधावरच्या असंख्य पोरांच्या स्वप्नांना तुम्ही जी ताकद दिलीत तीचं मोल होऊच शकत नाही. क्रांतीची व्याख्या आणि उदाहरणं फक्त पुस्तकात वाचली होती... पण क्रांती होताना याची देही आम्ही अनुभवलेय ती ही माझ्यासारख्या अनेकांच्या आयुष्यात.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;इंग्रजी भाषेच्या न्यूनगंडात फसलेल्या तत्कालीन महाराष्ट्रातील लाखो तरूणांचे कार्ल मार्क्स आपण!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कोल्हापूरकरांसाठी आपण प्रशासकीय सेवेत काय ठसा ऊमटवला हा प्रश्नच नाहीय. मराठीतून जग जिंकता येतं हे आपण कोल्हापुरातून उभ्या देशाला सांगितलं हे आमच्या लेखी महत्वाचं आहे. &amp;lsquo;अमृता तेही पैजा जिंके&amp;rsquo; हे भक्तीभावानं ऐकत आणि म्हणत आलो होतो. तुम्ही ती पैज माऊलीच्या मराठीत जिंकली आणि कोणत्या वाटेनं जिंकता येतं हे आमच्यासारख्यांना दाखवून नवी वाट तयार केलीत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कोल्हापूरसाठी, महाराष्ट्रासाठी आणि आमच्या सारख्या बांधावरच्या अगणित पोरांसाठी तुम्ही कधी रिटायर होऊच शकत नाही.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कधी जुन्या वळणावर,&lt;br /&gt;नव्या वाटा शोधताना...&lt;br /&gt;मी पुन्हा भेटेन,&lt;br /&gt;त्याच बेधुंद वाऱ्यासोबत!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जिक्कलंस भावा&amp;hellip;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपला,&amp;nbsp;&lt;br /&gt;हेमंत निंबाळकर (IPS)&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;(लेखक हे कोल्हापूरचे सुपुत्र असून ते सध्या कर्नाटक राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी कार्यरत आहेत)&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/03/31/eeea46f6a5b95ef3d9f06de56109e57b177494823943593_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : कागदांची भिंत : कर्जाच्या चौकटीबाहेर राहिलेल्या महिला]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/rural-credit-crisis-women-financial-exclusion-india-abhidha-niphade-blog-1417529</link><comments>https://marathi.abplive.com/blog/rural-credit-crisis-women-financial-exclusion-india-abhidha-niphade-blog-1417529#respond</comments><pubDate>Tue, 24 Mar 2026 22:07:28 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अभिधा निफाडे ]]></dc:creator><category><![CDATA[ व्यापार-उद्योग ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/rural-credit-crisis-women-financial-exclusion-india-abhidha-niphade-blog-1417529</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;BLOG :&lt;/strong&gt; मुलाच्या उपचारासाठी पैशांची तातडीची गरज होती. उपचारासाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न तिच्यासमोर आ वासून उभा होता. नवऱ्याचा मागच्याच वर्षी अपघातात मृत्य झाला, कुटुंबाची सर्व जबाबदारी आता तिच्याच खांद्यावर होती. फॅक्टरीत रोजंदारीवर जाऊन त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशांवर ती घर चालवण्यापासून ते मुलांच्या आरोग्यापर्यंतची सर्व जबाबदारी सांभाळत होती.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अनेक वर्षे मजुरी करूनही आणि नियमित बचत करत असूनही, बँकेने तिच्याकडे उत्पन्न नव्हते म्हणून नव्हे, तर तिच्या नावावर आवश्यक कागदपत्रे नव्हती म्हणून तिचा कर्ज अर्ज नाकारला. अखेरीस तिला सावकाराकडून जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागले. ही कथा कुणा एक स्थलांतरित महिलेची नाही; ग्रामीण, स्थलांतरित आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक महिलांची हीच परिस्थिती आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;भारतामधील ग्रामीण पतसंकटाची चर्चा प्रामुख्याने शेतकरी कर्जबाजारीपणा, उत्पादन खर्च आणि बाजारातील अस्थिरता याभोवती केंद्रित असते. मात्र, या चर्चेत कोणाला कर्ज मिळते आणि कोणाला मिळतच नाही हा महत्त्वाचा मुद्दा सातत्याने दुर्लक्षित राहतो. कर्जप्रश्न केवळ &amp;lsquo;कर्ज घेतल्यानंतर काय होते&amp;rsquo;यापुरता मर्यादित न ठेवता, &amp;lsquo;कर्ज मिळण्याआधीच कोणाला वगळले जाते&amp;rsquo; हा प्रश्न विचारणे आवश्यक ठरते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;विशेषतः स्थलांतरित आणि असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी संकट हे कर्जाच्या ओझ्याचे नसून, कर्जासाठी ग्राह्यदेखील न धरले जाण्याचे आहे. या महिला नियमित मजुरी करतात, कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावतात, आणि अनेकदा आर्थिक जबाबदाऱ्याही पेलतात; तरीही औपचारिक पतव्यवस्थेत त्या कर्जदार म्हणून ओळखल्या जात नाहीत. त्यांच्या नावावर जमीन नसते, स्थिर उत्पन्नाचा पुरावा नसतो, आणि स्थलांतरामुळे स्थानिक कागदपत्रे अपुरी पडतात. परिणामी, त्यांच्या आर्थिक क्षमतेचा विचार होण्याआधीच त्या पतव्यवस्थेच्या चौकटीबाहेर ठेवलेल्या जातात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या प्रक्रियेत कर्ज त्यांच्या आर्थिक वर्तनामुळे नव्हे, तर त्यांच्या ओळखीच्या पुराव्याअभावी म्हणजेच कागदपत्रांच्या अभावामुळे नाकारले जाते, त्यामुळे ग्रामीण पतसंकट हे काही गटांसाठी कर्ज ओझे बनते, तर काही गटांसाठी कर्ज ही संधीच उपलब्ध होत नाही हा एक महत्त्वाचा, पण अदृश्य पैलू समोर येतो. स्थलांतरित महिलांच्या बाबतीत त्यांना या प्रक्रियेतून वगळणे संरचनात्मक आहे, आणि ती त्यांच्या आर्थिक प्रगतीच्या शक्यता सुरुवातीलाच मर्यादित करते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;यातून ग्रामीण पतसंकटाची दोन रूपे दिसतात. एकीकडे उपलब्ध असलेले कर्ज घेऊन त्याची परतफेड करणे शक्य नसल्याने कर्जबाजारी शेजारी आहेत तर दुसरीकडे, मोठ्या संख्येने अशा महिला आहेत ज्या पतव्यवस्थेच्या चौकटीत आणि नियमांत बसत नाहीत. कारण त्यांच्या नावावर जमीन नसते, स्थिर उत्पन्नाचा पुरावा नसतो, आणि स्थलांतरामुळे स्थानिक कागदपत्रे अपुरी पडतात. परिणामी, त्यांचे आर्थिक अस्तित्व पत व्यवस्थेसाठी निरुपयोगी ठरते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;विशेषतः स्थलांतरित आणि एकल महिलांच्या बाबतीत हे वगळणे अधिक तीव्र होते. पतीपासून वेगळे राहणाऱ्या, विधवा किंवा एकट्याने कुटुंब सांभाळणाऱ्या महिलांकडे कागदपत्रे मिळवण्याची प्रक्रिया अधिकच गुंतागुंतीची ठरते. त्यांच्या नावावर मालमत्ता नसते, स्थिर पत्ता नसतो, आणि अनेकदा त्यांची ओळख पुरुष कुटुंबीयांशी जोडलेली नसल्यामुळे प्रशासकीय पातळीवर त्यांचे अस्तित्वच दुर्लक्षित राहते. अशा परिस्थितीत त्या प्रत्यक्षात नियमित उत्पन्न मिळवत आणि कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असल्या तरी पतव्यवस्थेसाठी &amp;lsquo;उच्च जोखीम&amp;rsquo; या गटात त्या मोडत नाहीत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पतव्यवस्था कर्जदाराची पतक्षमता मुख्यतः कागदपत्रांद्वारे मोजते. जमीनहक्क, पत्ता, उत्पन्नाचा पुरावा ही सर्व कागदपत्रे केवळ ओळखीची साधने नसून, बँकांसाठी जोखीम मोजण्याची आणि नियंत्रित करण्याची साधने असतात. कर्जदार किती स्थिर आहे, परतफेडीची क्षमता किती आहे, आणि त्याच्यावर विश्वास ठेवता येऊ शकतो का हे सर्व या कागदपत्रांच्या आधारे ठरवले जाते. त्यामुळे कर्जप्रक्रिया ही प्रत्यक्ष आर्थिक वास्तवावर नव्हे, तर त्या वास्तवाच्या कागदोपत्री पुराव्यावर अवलंबून राहते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;परंतु जेव्हा ही साधने स्थलांतरित आणि एकल महिलांच्या परिस्थितीशी जुळत नाहीत, तेव्हा त्यांच्या आर्थिक क्षमतेचा विचार केला जात नाही. त्या नियमित काम करतात, उत्पन्न कमावतात, आणि कुटुंबाचा खर्च सांभाळतात; तरीही त्यांच्या नावावर स्थिर पत्ता किंवा औपचारिक उत्पन्नाचा पुरावा नसल्यामुळे &amp;lsquo;अदृश्य&amp;rsquo; ठरतात. परिणामी, कर्ज मिळण्याआधीच त्यांना अपात्र ठरवले जाते आणि आर्थिकरित्या स्थिर होण्याची संधी नाकारली जाते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या वगळणुकीचा थेट परिणाम म्हणजे महिलांचे अनौपचारिक कर्जव्यवस्थेकडे वळणे. सावकार, सोन्यावर कर्ज, आगाऊ रक्कम किंवा ओळखीच्या जाळ्यातून घेतलेले कर्ज हे पर्याय सहज उपलब्ध असले, तरी ते महागडे आणि असुरक्षित असतात. अशा कर्जांवरील व्याजदर औपचारिक कर्जाच्या तुलनेत अनेक पटीने जास्त असतात, आणि अनेकदा परतफेडीच्या अटी लवचिक नसून कठोर असतात. त्यामुळे महिलांचे अल्प आणि अस्थिर उत्पन्न कर्जफेडीतच संपते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या प्रक्रियेत कर्ज हे विकासाचे साधन न राहता टिकून राहण्याचा संघर्ष बनते. महिलांना छोट्या व्यवसायासाठी किंवा उत्पन्नवाढीसाठी कर्ज वापरण्याऐवजी, ते केवळ तातडीच्या गरजा भागवण्यासाठी वापरावे लागते. परिणामी, पुढील आर्थिक उन्नतीची शक्यता मर्यादित राहते आणि दारिद्र्याचे चक्र वेगानं फिरायला लागते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या अर्थाने, येथे कर्जाचा अभाव नसतो तर महागड्या कर्जाची सक्ती असते. औपचारिक पतव्यवस्थेतील वगळणूक महिलांना अशा व्यवस्थेकडे ढकलते, जिथे कर्ज उपलब्ध असते, पण त्याची किंमत अत्यंत जास्त असते. त्यामुळे ग्रामीण पतसंकटाचा प्रश्न केवळ कर्ज उपलब्ध आहे की नाही, एवढ्यावर मर्यादित राहत नाही; तो कर्ज कोणत्या अटींवर उपलब्ध आहे, याचाही प्रश्न बनतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या पार्श्वभूमीवर उपाय केवळ कर्जपुरवठा वाढवण्याचा नसून, पतव्यवस्थेने जोखीम मोजण्याच्या पद्धतींचा पुनर्विचार करण्याचा आहे. सध्या कर्जासाठी आवश्यक मानली जाणारी जमीन, स्थिर पत्ता, औपचारिक उत्पन्न ही ओळख अनेक महिलांच्या सद्यस्थितीशी विसंगत असते, त्यामुळे पतव्यवस्थेला कागदोपत्री पुराव्यांपलीकडे जाऊन, सामाजिक आणि आर्थिक वर्तनाच्या पर्यायी निदर्शकांचा स्वीकार करावा लागेल.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;स्वयं-सहायता गटांमधील परतफेडीचा इतिहास, नियमित बचत, आणि स्थानिक स्तरावरील सामाजिक विश्वास ही महिलांच्या पतक्षमतेची महत्त्वाची निदर्शने ठरू शकतात. या घटकांना औपचारिक केवायसी (KYC) आणि क्रेडिट मूल्यांकनाचा भाग बनवले, तर कर्जप्रवेश अधिक व्यापक होऊ शकतो. त्याचप्रमाणे, पंचायत किंवा स्थानिक संस्थांकडून दिलेली प्रमाणपत्रे कर्जदाराच्या ओळखीचे पूरक साधन म्हणून वापरली जाऊ शकतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;याबरोबरच, लहान कर्जांवरील व्यवहारखर्च कमी करण्यासाठी गटाधारित कर्जव्यवस्था आणि सहकारी संस्था अधिक प्रभावी ठरू शकतात. या मॉडेलमध्ये जोखीम सामूहिकपणे पेलली जाते, ज्यामुळे बँकांसाठीही कर्ज देणे व्यवहार्य होते. विशेषतः स्थलांतरित महिलांसाठी, ज्या औपचारिक चौकटीत बसत नाहीत, अशा लवचिक रचना महत्त्वाच्या ठरतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;धोरणाच्या पातळीवर, संयुक्त कागदपत्रांना प्रोत्साहन देणे आणि महिलांच्या नावावर ओळख व मालकी निर्माण करणे ही दीर्घकालीन पायरी आहे. परंतु त्याचवेळी, अल्पकालीन उपाय म्हणून &amp;lsquo;कागदपत्रे नसल्यामुळे अपात्र&amp;rsquo; हा निकष काही प्रमाणात का होईना सैल करणे आवश्यक आहे. अन्यथा, आर्थिक समावेशनाची प्रक्रिया सुरुवातीलाच अडखळत राहील.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;महत्त्वाचे म्हणजे, कर्जाच्या उद्देशाच्या व्याख्येचा देखील पुनर्विचारण्याची गरज आहे. आरोग्य, शिक्षण किंवा सामाजिक सुरक्षेसाठी घेतलेले कर्ज &amp;lsquo;अनुत्पादक&amp;rsquo; मानण्याऐवजी, ते कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याचा भाग म्हणून स्वीकारणे आवश्यक आहे. यामुळे महिलांच्या वास्तविक गरजांना औपचारिक पतव्यवस्थेत स्थान मिळू शकते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सरकारने आर्थिक समावेशनासाठी जनधन योजना, मुद्रा कर्ज आणि स्वयं-सहायता गट&amp;ndash;बँक संलग्नता यांसारख्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा उद्देश औपचारिक बँकिंग आणि पतव्यवस्थेपासून दूर राहिलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. मात्र, या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या अटी स्थलांतरित आणि असंघटित महिलांसाठी मोठा अडथळा ठरतात. ओळखपत्र, पत्ता पुरावा, उत्पन्नाचा दाखला, कधी व्यवसायाचा पुरावा या सर्व अटी कागदोपत्री सोप्या वाटल्या, तरी वास्तवात त्या अनेक महिलांसाठी अपूर्ण किंवा विसंगत असतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;यामुळे योजना अस्तित्वात असणे आणि त्यांना प्रत्यक्ष प्रवेश असणे यामध्ये मोठी दरी निर्माण होते. आर्थिक समावेशनाच्या आकडेवारीत वाढ दिसते , खाती उघडली जातात, योजना जाहीर होतात परंतु या खात्यांचा सक्रिय वापर आणि कर्जप्रवेश मर्यादित राहतो. अनेक महिलांकडे बँक खाते असले, तरी ते व्यवहारासाठी किंवा कर्जासाठी वापरले जात नाही. अशा प्रकारे, समावेशनाची प्रक्रिया आकडेवारीपुरती मर्यादित राहते, प्रत्यक्ष आर्थिक सक्षमीकरणापर्यंत पोहोचत नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या दरीमागे एक महत्त्वाची धोरणात्मक कमतरता आहे. समावेशनाची कल्पना कागदपत्रांवर आधारित आहे, पण कागदपत्रांपर्यंत पोहोचण्याची असमानता विचारात घेतली जात नाही. स्थलांतर, अस्थिर रोजगार आणि मालकीहक्कांचा अभाव या वास्तवांमुळे महिलांना कागदपत्रे मिळवणे कठीण जाते, आणि परिणामी त्या योजनांच्या बाहेर राहतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;यासोबतच, &amp;lsquo;उत्पादक&amp;rsquo;आणि &amp;lsquo;अनुत्पादक&amp;rsquo; कर्जाची व्याख्या देखील महिलांच्या विरोधात जाते. औपचारिक पतव्यवस्थेत कर्जाचा उपयोग प्रामुख्याने थेट उत्पन्ननिर्मितीशी जोडला जातो उदा. शेती, व्यवसाय किंवा उत्पादनासाठीचे कर्ज. परंतु ग्रामीण महिलांसाठी आरोग्य, शिक्षण, स्थलांतर, सामाजिक सुरक्षा किंवा घरगुती स्थैर्य यांसाठीचा खर्च हा तितकाच आवश्यक असतो. हे खर्च तात्काळ उत्पन्न वाढवत नसले, तरी दीर्घकालीन आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे असतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तरीही, अशा प्रकारचे कर्ज औपचारिक व्यवस्थेत कमी महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे महिलांच्या वास्तविक गरजा पतधोरणात प्रतिबिंबित होत नाहीत. परिणामी, ज्या गरजांसाठी महिलांना सर्वाधिक कर्जाची आवश्यकता असते, त्याच गरजा औपचारिक पतव्यवस्थेच्या चौकटीबाहेर राहतात. यामुळे महिलांना पुन्हा अनौपचारिक आणि महागड्या कर्जव्यवस्थेकडे वळावे लागते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या अर्थाने, आर्थिक समावेशनाचा प्रश्न केवळ योजना सुरू करण्याचा नाही, तर त्या योजनांची रचना आणि अटी वास्तवाशी जुळवून घेण्याचा आहे. जोपर्यंत प्रवेशाच्या अटी आणि कर्जाच्या व्याख्या महिलांच्या जीवनाशी सुसंगत केल्या जात नाहीत, तोपर्यंत समावेशनाची प्रक्रिया अपुरी आणि असमान राहील.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या पार्श्वभूमीवर उपाय केवळ कर्जपुरवठा वाढवण्याचा नसून, प्रवेशाच्या अटी बदलण्याचा आहे. कर्ज उपलब्ध करून देणे ही पहिली पायरी असली, तरी त्या कर्जापर्यंत कोण पोहोचू शकते, हा अधिक मूलभूत प्रश्न आहे. जोपर्यंत पतव्यवस्थेची प्रवेशद्वारे कागदपत्रांच्या अरुंद चौकटीत अडकलेली आहेत, तोपर्यंत मोठ्या संख्येने महिला या व्यवस्थेबाहेरच राहतील.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;संयुक्त कागदपत्रे असणे , जमीन, रेशनकार्ड, बँक खाती पती-पत्नी दोघांच्या नावावर असणे ही केवळ सामाजिक न्यायाची बाब नाही, तर आर्थिक दृष्ट्याही महत्त्वाची आहे. यामुळे महिलांची औपचारिक ओळख निर्माण होते, कर्जप्रवेश सुलभ होतो आणि कुटुंबाची आर्थिक जबाबदारी अधिक व्यापकपणे विभागली जाते. त्याचप्रमाणे, स्वयं-सहायता गटांचा परतफेडीचा इतिहास, नियमित बचत आणि सामूहिक जबाबदारी ही महिलांच्या पतक्षमतेची विश्वासार्ह निदर्शने ठरू शकतात. या नोंदींना वैध ओळख (केवायसी ) म्हणून मान्यता दिल्यास, कागदपत्रांच्या अभावामुळे निर्माण होणारी अडचण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;स्थानिक स्तरावरील पंचायत, स्थानिक संस्थांद्वारे दिलेली ओळख प्रमाणपत्रे यांसारख्या कागदपत्रांचा वापर केल्यास कर्जदाराचे सामाजिक आणि आर्थिक वास्तव अधिक अचूकपणे समजून घेता येते. अशा प्रकारे, पतव्यवस्थेने केवळ औपचारिक कागदपत्रांवर अवलंबून न राहता, स्थानिक आणि सामाजिक माहितीचाही विचार करणे आवश्यक आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सहकारी संस्था आणि गटाधारित कर्जव्यवस्था या दृष्टीने विशेष महत्त्वाच्या ठरतात. या व्यवस्थांमध्ये कर्जाची जबाबदारी सामूहिक असते, ज्यामुळे परतफेडीची शिस्त वाढते आणि बँकांसाठी जोखीम कमी होते. त्याचवेळी, लहान रकमेच्या कर्जांवरील व्यवहारखर्च कमी होतो, कारण प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र तपासणी करण्याऐवजी गटाच्या माध्यमातून व्यवहार केला जातो. त्यामुळे अन्यथा बँकांसाठी &amp;lsquo;अव्यवहार्य&amp;rsquo; मानली जाणारी लहान कर्जे या व्यवस्थेत व्यवहार्य बनू शकतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;यातही महत्त्वाचे म्हणजे, हे उपाय पतव्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांना विरोध करणारे नाहीत, तर त्यांना अधिक वास्तववादी बनवणारे आहेत. कागदपत्रांवर आधारित जोखीम मापनाच्या जोडीला सामाजिक भांडवल, परतफेडीचा इतिहास आणि स्थानिक विश्वास या घटकांचा समावेश केल्यास पतव्यवस्था अधिक समावेशक आणि प्रभावी होऊ शकते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या अर्थाने, ग्रामीण पतसंकटावर उपाय शोधताना कर्जाचा पुरवठा वाढवण्याइतकेच महत्त्वाचे म्हणजे कर्जाच्या अटींचा पुनर्विचार करणे महत्वाचे आहे. जोपर्यंत या अटी बदलल्या जात नाहीत, तोपर्यंत आर्थिक समावेशन ही संकल्पना मर्यादित गटांपुरतीच राहील.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;महिलांसाठी ग्रामीण पतसंकट हे केवळ पैशांचे संकट नाही, तर ते अर्थव्यवस्थेत स्थान मिळवण्यासाठी केलेला संघर्ष आहे. कर्ज मिळण्याची अट म्हणून जी जमीन, स्थिर पत्ता, औपचारिक उत्पन्न यांसारखी जी ओळख कागदपत्रे गृहित धरली जातात ती सर्वांसाठी समान नसतात. पतव्यवस्थेतील ही असमान महिलांपर्यंत कर्ज व आर्थिक सहाय्य्य पोहचू देत नाही. जोपर्यंत पतव्यवस्था कागदोपत्री ओळखीलाच प्राधान्य देत राहील, तोपर्यंत स्थलांतरित, असंघटित आणि एकल महिला, त्यांचा संघर्ष हा कायम पतधोरणाच्या चौकटीबाहेरच राहील.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या महिलांचे संकट मोठ्या आकडेवारीत किंवा ठळक बातम्यांमध्ये दिसत नाही. ते महागड्या कर्जावर अवलंबून राहणे, आरोग्य आणि शिक्षणावर तडजोड करणे, आणि आर्थिक निर्णयक्षमतेचा अभाव या आणि अशा दैनंदिन जीवनात उलगडते. ही वगळणूक केवळ वर्तमानापुरती मर्यादित राहत नाही, तर पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचते. त्यामुळे हे संकट अदृश्य असले, तरी त्याचे परिणाम खोलवर आणि दीर्घकालीन असतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;याच पार्श्वभूमीवर ,'कागदांची भिंत&amp;rsquo; हे केवळ एक रूपक नाही, तर ग्रामीण पतव्यवस्थेतील असमानतेचे प्रत्यक्ष वास्तव आहे. ही भिंत पाडल्याशिवाय आर्थिक समावेशन हे वास्तव न होता केवळ घोषणा राहील. आर्थिक समावेशनाचा अर्थ केवळ खाती उघडणे किंवा योजना सुरू करणे एवढाच नसून, त्या योजनांपर्यंत प्रत्यक्ष आणि सुलभ पोहोच निर्माण करणे हा आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अन्यथा, काही गटासाठी सहज उपलब्ध असलेले कर्ज इतरांसाठी आणि त्यातही मुख्यतः महिलांसाठी अशक्यच राहील. परिणामी 'कागदांची भिंत&amp;lsquo; महिलांना समाजव्यवस्थेतील सहभागापासून दूर ठेवेल आणि ग्रामीण पतसंकट अधिक तीव्र होत जाईल. &amp;ldquo;कागदांची भिंत&amp;rsquo; मोडल्याशिवाय आर्थिक समावेशन हे वास्तव न होता केवळ घोषणा राहील. आर्थिक समावेशनाचा अर्थ केवळ खाती उघडणे किंवा योजना सुरू करणे एवढाच नसून, त्या योजनांपर्यंत प्रत्यक्ष पोहोच निर्माण करणे हा आहे. पतव्यवस्थेने जर स्थलांतर, अस्थिर रोजगार आणि महिलांच्या आर्थिक भूमिकेला मान्यता दिली, तरच कर्जव्यवस्था खऱ्या अर्थाने समावेशक ठरू शकते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;(अ&amp;zwj;ॅड.अभिधा निफाडे या एक वकील असून &amp;lsquo;अरुणा&amp;rsquo; या संस्थेच्या माध्यमातून महिला आणि कामगार यांच्या हक्कांवर काम करतात)&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/03/24/ab580dcfcd353181f90f5149b95b1d00177437058675393_original.png" width="220"/></item></channel></rss>