<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>Chhatrapati Shivaji Maharaj: शिवरायांच्या एका अफलातून मोहिमेचे अन्वयार्थ!</title><atom:link href="https://marathi.abplive.com/blog/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Thu, 6 Aug 2026 22:27:30 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/suspend-punitive-action-against-vehicles-until-the-goal-of-pothole-free-roads-is-achieved-road-accident-pathole-1434427</link><comments>https://marathi.abplive.com/blog/suspend-punitive-action-against-vehicles-until-the-goal-of-pothole-free-roads-is-achieved-road-accident-pathole-1434427#respond</comments><pubDate>Tue, 4 Aug 2026 19:00:10 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सुधीर दाणी ]]></dc:creator><category><![CDATA[ मुंबई ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/suspend-punitive-action-against-vehicles-until-the-goal-of-pothole-free-roads-is-achieved-road-accident-pathole-1434427</guid><description><![CDATA[&lt;p&gt;राज्यातील &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/road&quot;&gt;रस्त्यांची (Road)&lt;/a&gt; अवस्था ही केवळ वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न राहिलेली नाही; ती आता सार्वजनिक सुरक्षेचा, प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा आणि भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालण्याचा प्रश्न बनली आहे. म्हणूनच सजग नागरिक मंच, नवी मुंबई यांनी मुख्यमंत्री &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot;&gt;देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)&lt;/a&gt; यांना निवेदन पाठवून दोन महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. पहिली, राज्यात सुरक्षित आणि खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध होईपर्यंत हेल्मेट, सीटबेल्ट, वाहन विमा, पीयूसी आणि तत्सम नियमांअंतर्गत होणाऱ्या दंडात्मक कारवाईला तात्पुरती स्थगिती द्यावी. दुसरी, प्रत्येक रस्त्याच्या दर्जाबाबत संबंधित अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदार यांचे उत्तरदायित्व कायद्याने निश्चित करावे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;सरकारने दुचाकी-चारचाकी वाहनचालक व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्ती, सीटबेल्ट सक्ती, इन्शुरन्स सक्ती असे विविध नियम केलेले आहेत आणि त्याचे उल्लंघन करणाऱ्यावर सरकारी यंत्रणा कारवाई करतात. कारण पुढे केले जाते की नागरिकांचा जीवाचे रक्षण . प्रश्न असा आहे की, नागरिकांनी हेल्मेट घातले, सीटबेल्ट लावला, विमा आणि पीयूसी पूर्ण केले, तरी जर त्यांचा जीव खड्डेमय आणि निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे धोक्यात येत असेल, तर शासनाने नागरिकांवर केवळ दंडात्मक कारवाई करणे कितपत न्याय्य आहे? नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी केवळ वाहनचालकांवर नसून सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची प्राथमिक जबाबदारी राज्याची आहे. त्यामुळे, रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत शासन स्वतः उत्तरदायी ठरत नाही, तोपर्यंत केवळ नागरिकांवर कायद्याची कडक अंमलबजावणी करणे हा एकतर्फी दृष्टिकोन ठरतो. आज रस्ते हे विकासाचे प्रतीक कमी आणि भ्रष्टाचाराचे आगार अधिक झाले आहेत. ग्रामपंचायत ते मंत्रालय या संपूर्ण साखळीत रस्ते म्हणजे अनेकदा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदार यांच्या संगनमतातून सार्वजनिक निधी लुटण्याचा राजमार्ग बनल्याची भावना सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होतो, रस्त्यांचे उद्घाटन होते, परंतु काही महिन्यांतच ते खड्ड्यांनी भरून जातात. मुंबईसारख्या देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एका महापालिकेत हजारो कोटी रुपये खर्च करूनही खड्डेमुक्त रस्ते निर्माण होत नसतील, तर ही केवळ तांत्रिक चूक नसून व्यवस्थेतील गंभीर अपयश आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;विशेष म्हणजे, महाराष्ट्राबाहेरील अनेक राज्यांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना रस्त्यांच्या गुणवत्तेतील स्पष्ट फरक जाणवतो. तेथे रस्ते अधिक टिकाऊ, नियोजनबद्ध आणि दर्जेदार असतात. त्यामुळे एक मूलभूत सूत्र समोर येते: शासन आणि प्रशासन जितके भ्रष्टाचारमुक्त, तितकी सार्वजनिक कामांची गुणवत्ता उच्च; आणि व्यवस्था जितकी भ्रष्ट, तितकी गुणवत्ता निकृष्ट. रस्ते हे कोणत्याही सरकारच्या प्रामाणिकतेचे आरसे असतात. शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना नियमित रस्ते तपासणीचे आदेश दिल्याचे अनेकदा जाहीर केले जाते. परंतु जर अधिकारी प्रत्यक्ष दौरे करत असतील, तर त्यांना खड्डे का दिसत नाहीत? आदेश केवळ कागदावर आहेत का, की अधिकारीच शासनाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत आहेत? या प्रश्नांची उत्तरे नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. म्हणूनच प्रत्येक रस्त्याच्या दोन्ही टोकांना माहिती फलक लावणे बंधनकारक करावे. त्यावर रस्ते बांधकामाचा खर्च, संबंधित विभाग, उत्तरदायी अभियंते, कंत्राटदार, काम पूर्ण झाल्याची तारीख आणि दोष निवारण कालावधी स्पष्टपणे नमूद असावा. जो रस्ता निकृष्ट दर्जाचा निघेल, त्यासाठी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर आर्थिक तसेच प्रशासकीय जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;सरकारने प्रत्येक रस्त्याला प्रॉपर्टी कोड देणे स्थानिक स्वराज्य संस्थांना , सार्वजनिक बांधकाम विभागाला, एमएमआरडीए सारख्या संस्थांना अनिवार्य करावे आणि त्या त्या रस्त्यावर केल्या जाणाऱ्या खर्चाचा तपशील पब्लिक डोमेनवर खुला करणे सक्तीचे करावे . जो पर्यंत रस्ते निर्मिती देखभाल यावर करदात्या नागरिकांचा तिसरा डोळा राहत नाही , नागरिकांच्या माध्यमातून सोशल ऑडिट सुरु केले जात नाही तोपर्यंत खड्ड्यामुळे दरवर्षी हजारो नागरिकांचे जाणारे बळी थांबणार नाहीत. खड्डेमुक्त महाराष्ट्राची सुरुवात केवळ डांबर टाकण्याने होणार नाही; ती उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराने होईल. नागरिकांना दंड करणे सोपे आहे; परंतु निकृष्ट रस्ते बांधणाऱ्यांना दंडित करणे हीच खरी सुशासनाची परीक्षा आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;सुधीर लक्ष्मीकांत दाणी&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;लेखक सजग नागरिक मंच, नवी मुंबईचे अध्यक्ष आहेत&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/04/2c6f626eea1e5a993be7472277455aae17858501955141002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Ajinkya Rahane Retirement: संयमाचा 'अजिंक्य' तारा]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/ajinkya-rahane-retirement-blog-by-ashwin-bapat-1433847</link><comments>https://marathi.abplive.com/blog/ajinkya-rahane-retirement-blog-by-ashwin-bapat-1433847#respond</comments><pubDate>Fri, 31 Jul 2026 11:06:30 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अश्विन बापट, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ क्रिकेट ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/ajinkya-rahane-retirement-blog-by-ashwin-bapat-1433847</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Ajinkya Rahane Retirement: &lt;/strong&gt;८५ कसोटी, ९० वनडे आणि २० टी-ट्वेन्टी. अजिंक्य रहाणेच्या करिअरचा हा स्कोअर. व्हाईट बॉल क्रिकेटपेक्षा पारंपरिक कसोटी सामन्यांमध्ये त्याची बॅट दुमदुमली. ५ हजारहून अधिक धावा. ३८.४६ ची सरासरी. १२ शतकं. त्यातली ८ परदेश भूमीवर. ही आकडेवारी अजिंक्यच्या दर्जाची आणि गुणवत्तेची साक्ष देणारी अशीच आहे. याच अजिंक्यने गरज लागली तेव्हा संघाचं सुकाणू हाती घेतलं. कांगारूंच्या भूमीवरची २०२०-२१ ची ती मालिका आठवा. पहिल्या कसोटीत भारत सर्वबाद ३६. दारुण पराभव पदरी. आत्मविश्वास जमिनीत गाडला गेला होता. त्यात कॅप्टन विराट कौंटुबिक कारणासाठी मायदेशी परतलेला. मालिकेत ०-१ ने पिछाडी. निेराशेचं मळभ दाटलं होतं. समोर अंधार पसरला होता. त्या काळोखातच पुढच्या मॅचमध्ये खेळताना मेलबर्नच्या मैदानातल्या गवतावर अजिंक्यने प्रेरणेची नवी वात पेटवली. कसोटी क्रिकेटचा तुटपुंजा अनुभव असलेले शिलेदार हाताशी घेऊन अजिंक्य लढला. संघ तीन बाद ६१ अशा स्थितीत अजिंक्यने शतकी नजराणा पेश केला. त्याच्या क्लासिक शतकाने मोठी आघाडी मिळवून दिली. मधल्या फळीत महत्त्वाच्या भागीदाऱ्या रचल्या. आपली टीम जिंकली. तिथूनच मालिका विजयाचं बीज संघात रोवलं गेलं.&lt;/p&gt;
&lt;p&gt;ऑसी भूमीवर आपण सलग दुसरी कसोटी मालिका जिंकलो तेही तुलनेने नवख्या टीमला घेऊन. असाच आणखी तुरा त्याच्या शिरपेचात रोवला गेला. तो ऐतिहासिक लॉर्डसच्या मैदानात. जिथे रथीमहारथींना शतकाने हुलकावणी दिलीय. त्या मैदानातल्या ऑनर्स बोर्डवर अजिंक्य रहाणेचं नाव झळकलंय. करिअरची २०११ ते २०२३ अशी १२ वर्षे त्याने निष्ठेने संघाचं प्रतिनिधित्व केलं. २०१७-१८ नंतर त्याच्यासाठी संघातली स्पर्धाही आणखी तीव्र झाली. कालांतराने आंतरराष्ट्रीय संघातून बाहेर गेल्यावरही आयपीएलच्या मैदानात धडक देत राहिला. अखेर त्याने आता आपली बॅट म्यान केलीय. संयमाचा हा अजिंक्य तारा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात दिसणार नाहीये. डोंबिवली लोकलमधून क्रिकेटची किट बॅग घेऊन चर्चगेटपर्यंतचा प्रवास करणारा, पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर पताका दुमदुमत ठेवणारा अजिंक्य निवृत्तीची घोेषणा करताना म्हणाला, मी कधी चुकलो कधी हरलो, पण तुम्ही मला कधी परकं मानलं नाहीत. त्याला बोलताना आणि आपल्याला ऐकतानाही मन गलबलून आलं. अजिंक्यच्या निवृत्तीने संयमी क्रिकेट पर्वाची सांगता झाली. जंटलमन क्रिकेटर अजिंक्यला पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/31/bfc3ed07cfda13fd0857c1ba9274ccee1785476181369987_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[तुलसीदासांना अभिप्रेत असलेले 'श्रीराम'!]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/the-lord-shri-ram-envisioned-by-tulsidas-blog-of-sameer-gaikwad-marathi-blog-hindu-religion-1433737</link><comments>https://marathi.abplive.com/blog/the-lord-shri-ram-envisioned-by-tulsidas-blog-of-sameer-gaikwad-marathi-blog-hindu-religion-1433737#respond</comments><pubDate>Thu, 30 Jul 2026 13:28:21 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ धार्मिक ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/the-lord-shri-ram-envisioned-by-tulsidas-blog-of-sameer-gaikwad-marathi-blog-hindu-religion-1433737</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्पार्किंग पॉईंट येतो जिथे त्याचे आयुष्य बदलते. तुलसीदास रामभक्त होते मात्र त्यांनी आपले जीवन रामाला समर्पित केलेले नव्हते. मात्र त्यांच्या आयुष्यात एक प्रसंग असा घडला की, त्यांच्या मनात थेट वैराग्य भावनाच जागृत झाली आणि त्यांनी आपले जीवन प्रभू रामचंद्रांना समर्पित केले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;रत्नावली ही तुलसीदासांची पत्नी. अतिशय रूपवान आणि बुद्धिमान स्त्री! तुलसीदास आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करत. एकदा रत्नावली आपल्या भावासोबत माहेरी गेली. तुलसीदास पत्नीच्या विरहाने व्याकुळ झाले. ते भर पावसात, रात्रीच्या वेळी, उफाणणाऱ्या यमुना नदीला ओलांडून गेले. नदी ओलांडण्यासाठी त्यांनी नदीत सोडलेल्या एका प्रेताचा वापर लाकूड म्हणून केला. त्यावर बसून हातांनी पाणी वल्हवत ते सासरी पोहोचले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कोणताही निरोप, आगाऊ सूचना न आपला पती असा भर रात्री अचानक समोर पाहून रत्नावलीला अतिशय संकोच वाटला. तिने तुलसीदास यांना फटकारत दोहा म्हटला. जो आजही विख्यात आहे. &quot;अस्थि चर्ममय देह मम, तामें ऐसी प्रीति। तैसी जो श्रीराम में, होती न तौ भवभीति॥&quot;&lt;br /&gt;माझे शरीर हाडं आणि चामड्याचे आहे, त्यावर तुमचे एवढे प्रेम आहे. जर एवढे प्रेम प्रभू श्रीरामावर केले असते, तर या संसाररुपी भयापासून तुमची सुटका झाली असती!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पत्नीचे टोकदार शब्द तुलसीदासांच्या हृदयाला थेट लागले. त्यांना क्षणात वैराग्य प्राप्त झाले. ते पत्नीला तसेच सोडून रात्रीच्या रात्री तिथून निघून गेले आणि त्यांनी संन्यास घेतला. त्यांनी पुन्हा कधीही संसारात रस घेतला नाही. ह्या पुढच्या त्यांच्या प्रवासात अनेक आख्यायिका आहेत ज्यांचे वर्णन भिन्न साधनांत विविध पद्धतीने समोर येते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तुलसीदास आधी काशीला गेले. तिथून चित्रकुटला रवाना झाले. ह्या दरम्यानच एका स्मशानभूमी नजीक वास्तव्यास असताना एका प्रेताच्या माध्यमातून हनुमानांनी तुलसीदासांची कसोटी घेतली. अखेर आपले खरे स्वरूपही दाखवले. तुलसींनी मारुतीरायाचे पाय घट्ट पकडले. मारुती त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले. त्यांनी तुलसीदासांना श्रीरामांच्या दर्शनाचा मार्ग दाखवला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तुलसीदासांची आणि राम लक्ष्मणाची भेट घालून देण्याचे मारूतीरायांनी कबुल केलेलं. ते त्यानुसार कामास लागले. एकदा चित्रकुटच्या घाटावर तुलसीदास बसून चंदन उगाळत होते. तिथे बालक रूपातील श्रीराम आणि लक्ष्मण आले. तुलसीदास त्यांना ओळखू शकले नाहीत. तेव्हा हनुमानजींनी पोपटाचे रूप घेऊन दोहा म्हटला: &lt;em&gt;&lt;strong&gt;&quot;चित्रकूट के घाट पर, भई सन्तन की भीर। तुलसीदास चन्दन घिसें, तिलक देत रघुबीर॥&quot;&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हे ऐकताच तुलसीदास यांना ज्ञान झाले. प्रभू श्रीरामांनी आपल्या भाळावरचा चंदन गंध काढून स्वतः तुलसीदास यांच्या कपाळावर लावला. त्यांना दर्शन दिले. त्या दिवसानंतर तुलसींचे आयुष्य आमूलाग्र बदलले. &amp;nbsp;1574 साली त्यांनी अयोध्येत 'रामचरितमानस' लिहिण्यास सुरुवात केली. हा ग्रंथ त्यांनी तत्कालीन लोकभाषा 'अवधी' मध्ये लिहिला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;संस्कृत हीच देवाची भाषा मानणाऱ्या काशीच्या पंडितांनी, रामकथा लोकभाषा अवधीमध्ये लिहिल्यामुळे तुलसीदास यांना प्रचंड विरोध केला. त्यांचा ग्रंथ चोरण्याचा आणि नष्ट करण्याचा प्रयत्नही झाला. त्यांना डिवचले जाऊ लागले, त्यांना पदोपदी अपमानास सामोरे जावे लागले, मात्र ते डगमगले नाहीत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अशीही एक आख्यायिका आहे की, तुलसींनी लिहिलेल्या ग्रंथाचे पावित्र्य तपासण्यासाठी, स्थानिक पंडितांनी त्या ग्रंथाची परीक्षा घ्यायचे ठरवले. काशीच्या विश्वनाथ मंदिरात सर्वात खाली 'रामचरितमानस', त्यावर पुराणे, वेद आणि सर्वात वर अन्य शास्त्रे ठेवली गेली. रात्री मंदिर बंद केले गेले. सकाळी जेव्हा मंदिर उघडले, तेव्हा 'रामचरितमानस' हा ग्रंथ सर्वात वर होता आणि सत्यं शिवं सुन्दरम् ही अक्षरे उमटली होती! हे पाहून सर्व पंडितांनी तुलसीदास यांची माफी मागितली.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आजदेखील रामचरितमानस ह्या ग्रंथास रामायणाइतकीच महत्ता प्राप्त आहे. उत्तरेकडील राज्यात त्याचा मोठा प्रभाव आहे. &amp;nbsp;भारतीय संतपरंपरेत संत तुलसीदास हे केवळ कवी नव्हते; ते दुःखाच्या अग्निकुंडातून जन्मलेले एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जीवनात जितकी रामभक्ती होती, तितक्याच तीव्रतेने नियतीचे आघातही होते. नियतीने त्यांच्या वाट्याला सुखापेक्षा संघर्षच अधिक दिला; पण त्या संघर्षालाच त्यांनी भक्तीचे रूप दिले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तुलसीदासांचा जन्म होताच दुःखाने त्यांच्या दारात पाऊल ठेवले. जन्मानंतर काही दिवसांतच त्यांची आई हुलसीमाता यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 'अभुक्त मूळ नक्षत्रात' झाला होता, पंडितांच्या मते तो एक अशुभ योग मानला जाई. परिणामी तुलसीदास शिशु अवस्थेत असतानाच त्यांचे वडील आत्माराम ह्यांनी त्यांचा त्याग केला. 'चुनिया' नावाच्या दासीकडे तुलसीला सोपवले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्यांच्याविषयीच्या आख्यायिकांनुसार जन्मल्यावर ते रडले नव्हते, त्यांचे पहिले शब्दोच्चारण राम होते! त्यामुळे रामबोला हे त्यांचे टोपणनाव! कोवळ्या वयातच आईच्या मायेचा पदर हरवलेल्या त्या बालकाला जगाच्या कठोर वास्तवाने कवेत घेतले. मायेची ऊब, पित्याचा आधार आणि घराचे छत&amp;mdash;या तिन्ही गोष्टी त्यांच्या आयुष्यात नव्हत्या.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;रामबोला केवळ साडेपाच वर्षांचे असताना दासी चुनियाचेही निधन झाले. पुन्हा एकदा तुलसीदास अनाथ झाले. भुकेची झळ, उपेक्षेची वेदना आणि एकाकीपणाचा अंधार यांच्याशी सामना करत त्यांनी बालपण व्यतीत केले. गावोगावी भटकत, दारोदारी भिक्षा मागत जगणाऱ्या त्या बालकाच्या डोळ्यांतली ज्ञानाची आणि ईश्वरप्राप्तीची ज्योत मात्र विझली नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;रामबोलाचे हाल पाहून भगवान शिवाच्या प्रेरणेने प्रसिद्ध संत बाबा नरहरिदास यांनी त्यांना आपल्या पदराखाली घेतले. त्यांना आपले शिष्यत्व दिले. गुरुंनी त्यांचे नाव बदलून 'तुलसीदास' ठेवले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्यांनी तुलसीदास यांना अयोध्या आणि सुकरखेत (आताचे सोरोन) येथे नेऊन प्रभू श्रीरामाची संपूर्ण कथा ऐकवली. नरहरिदास यांनी तुलसीदासांना काशीचे प्रसिद्ध विद्वान शेष सनातन यांच्याकडे शिक्षणासाठी पाठवले. दीड दशकाहून अधिक काळ काशीमध्ये राहून तुलसीदासांनी वेद, उपनिषदे, पुराण, इतिहास आणि षड्दर्शनांचा सखोल अभ्यास केला आणि ते प्रकांड पंडित बनले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;विद्वत्ता मिळाल्याने दुःखाचे सावट दूर झाले नाही. सांसारिक जीवनात प्रवेश केल्यानंतर पत्नी रत्नावलीवर त्यांचे अतोनात प्रेम जडले. त्या प्रेमाने त्यांना इतके व्यापून टाकले की, मुसळधार पावसाच्या रात्री प्राणांची पर्वा न करता ते तिची भेट घेण्यासाठी नदी ओलांडून गेले. तेव्हा रत्नावलीने उच्चारलेले शब्द त्यांच्या आयुष्याचा निर्णायक क्षण ठरले!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आयुष्यात इतकं काही घडूनही त्यांच्या मनातलं अवधी भाषेविषयीचं प्रेम कमी झालं नाही! रामायणावर ग्रंथनिर्मिती करण्याचे त्यांनी निश्चित केले तेव्हा साहजिकच त्यांच्या मनात अवधी ग्रंथ रचनाच समोर आली. त्या काळात संस्कृत हीच धर्मग्रंथांची भाषा मानली जात होती. त्यामुळे अनेक कर्मठ पंडितांनी त्यांच्या कार्याला तीव्र विरोध केला.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अवधीसारख्या लोकभाषेत रामकथा लिहिणे हे धर्माचा अपमान असल्याचे आरोप झाले. त्यांची हेटाळणी झाली, त्यांच्या विद्वत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. पण तुलसीदासांचा विश्वास अढळ होता, रामकथा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचली पाहिजे, हा त्यांचा निर्धार होता. त्यांनी रामचरितमानस पूर्ण केले, त्यांची रामभक्ती अजरामर झाली. त्यांनी केलेल्या रामजागराचे आजही लोकांच्या मनावर गारुड आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तुलसीदासांनी आयुष्यभर गरिबी, अवहेलना आणि विरोध सहन केला; पण त्यांच्या लेखणीतून कटुता कधीच उतरली नाही. उलट प्रत्येक वेदना त्यांनी भक्तीमध्ये विलीन केली. म्हणूनच त्यांच्या शब्दांत करुणा आहे, समता आहे आणि माणसाला उभारी देणारा आशावाद आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;रामचरितमानसची भाषा आईच्या ममतेची आणि मातृत्वाच्या कारुण्याची का आहे, याचे उत्तर तुलसीदासांच्या आयुष्यात दडलेय! ज्याच्या आयुष्याची सुरुवात अनाथपणाने झाली, ज्याने उपेक्षा, विरह आणि संघर्ष अनुभवला, त्याच संताने 'रामचरितमानस'सारखा लोकमानसाचा अलौकिक ग्रंथ निर्माण केला. ही केवळ साहित्यनिर्मिती नव्हती! ते वेदनेचे भक्तीत झालेले अक्षर रूपांतर होते!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;संत तुलसीदासांचे चरित्र म्हणजे नियतीच्या कठोर परीक्षांवर श्रद्धेने मिळवलेला विजय. त्यांच्या डोळ्यांतून वाहिलेले अश्रू आजही त्यांच्या ओव्यांत, दोह्यांत आणि रामनामात मोत्यांसारखे चमकत राहतात. म्हणूनच तुलसीदास हे केवळ संत किंवा कवी नाहीत; ते दुःखाला दिव्यत्व देणारे भारतीय संस्कृतीचे अमर दीपस्तंभ आहेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आयुष्याचा शेवटचा काळ त्यांनी काशीतील 'अस्सी घाटा'वर घालवला. वयाच्या उत्तरार्धात त्यांना हातामध्ये तीव्र वेदना झाल्या, बाहूशूलाने ग्रासलेले असूनही त्यांनी 'हनुमान बाहुक'ची रचना केली. 1623 मध्ये आजच्या तारखेला मुखी रामनाम घेत त्यांनी देह त्यागला. त्यांच्या मृत्यूबाबतचा दोहा प्रसिद्ध आहे:&lt;br /&gt;&quot;संवत सोरह सौ असी, असी गंग के तीर। श्रावण शुक्ला सप्तमी, तुलसी तज्यो शरीर॥...&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तुलसीदासांना जे राम अभिप्रेत होते ते राम सद्यकाळात किती जणांच्या हृदयात वसले आहेत हा प्रश्न निराश करणारा आहे! वाराणसीच्या सर्वाधिक प्रसिद्ध घाटांपैकी एक अस्सी घाटाची आजची अवस्था काय आहे? वरुणा आणि अस्सी ह्या दोन नद्यांचा जिथे संगम झाला ते शहर म्हणजे वाराणसी! ज्या घाटावर अस्सीचे पाणी स्थिरावले तो घाट म्हणजे अस्सी घाट!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आजघडीला अस्सी नदीचे रूपांतर अस्सी नाल्यात झालेय. घाटावर रात्री काय चालते त्या विषयी न लिहिलेलं बरे. करुणा, माया, प्रेम, त्याग, आस्था, विश्वास, श्रद्धा, शौर्य, पावित्र्य आणि प्रगल्भता यांचे समृद्ध प्रतीक असणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाचा वापर काहीजण द्वेष तिरस्कार पसरवण्यासाठी करतायत! आज तुलसीदास असते तर रामचरितमानस लिहिण्याबरोबरच, सद्यकालीन कथित रामभक्तांच्या मानसिकतेवर त्यांनी नक्कीच प्रहार केले असते! असो..&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तुलसीदासांचा एक दोहा आवर्जून सांगावा वाटतो - 'दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान। तुलसी दया न छाँड़िए, जब लग घट में प्राण॥'&lt;br /&gt;दया करुणा हेच धर्माचा पाया होत, जोवर देहात प्राण आहेत तोपर्यंत दया भाव त्यागू नयेत. अहंकार अभिमान हे सकल पापांच्या मुळाशी आहेत! प्रभू रामाचे नाव घेऊन अनिष्ठ गोष्टी करणाऱ्या लोकांना तुलसीदास देशद्रोही, धर्मद्रोही वाटले तरी त्यात नवल नाही!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;खरे राम जाणून घ्यायचे असतील तर अंत:करण शुद्ध असले पाहिजे! बाकी माणूस मेल्यावर देखील राम नाम सत्य है असे म्हटले जातेच की, पण हे सत्य मृत्यूपश्चात कळून काय उपयोग! आज तुलसीदासांचा स्मरणदिवस!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;&amp;lsquo;तुलसी&amp;lsquo; काया खेत है, मनसा भयौ किसान&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;पापपुण्य देउ बीज हैं, बुवै सो लुनै निदान...&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;- समीर गायकवाड&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/30/fc351c8984cbc670f0c7a6374c850a061785398159479381_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Ajinkya Rahane : विराट कोहली टीमला सोडून गेला, बेंचवरच्या खेळाडूंना घेऊन बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवलं, अजिंक्य रहाणेचं न विसरता येणारे नेतृत्व]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/ajinkya-rahane-best-captaincy-on-australia-tour-2020-21-bgt-blog-of-kiran-mahanavar-marathi-news-1433735</link><comments>https://marathi.abplive.com/blog/ajinkya-rahane-best-captaincy-on-australia-tour-2020-21-bgt-blog-of-kiran-mahanavar-marathi-news-1433735#respond</comments><pubDate>Thu, 30 Jul 2026 12:59:30 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ किरण महानवर ]]></dc:creator><category><![CDATA[ क्रीडा ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/ajinkya-rahane-best-captaincy-on-australia-tour-2020-21-bgt-blog-of-kiran-mahanavar-marathi-news-1433735</guid><description><![CDATA[&lt;p&gt;जेव्हा ऑस्ट्रेलियन भूमीवर भारतीय संघाची अवस्था अत्यंत बिकट झाली होती, महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते, तेव्हा या खचलेल्या संघाला आपल्या खांद्यावर पेलून कांगारूंचा अहंकार चक्काचूर करणारा तो नायक म्हणजेच अजिंक्य रहाणे होता.&lt;/p&gt;
&lt;p&gt;होय... भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज आणि शांत संयमी नेतृत्व करणारा अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. अजिंक्यने त्याच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर एक अत्यंत भावुक व्हिडिओ शेअर करत या निर्णयाची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे त्याने या व्हिडिओमध्ये नमूद केले.&lt;/p&gt;
&lt;p&gt;अजिंक्य रहाणेने भारतासाठी 11 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. यामध्ये 6 कसोटी, 3 एकदिवसीय (ODI) आणि 2 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने खेळलेल्या 6 कसोटी सामन्यांपैकी एकही सामना गमावला नाही. त्याच्या कप्तानीखाली भारताने केवळ एकच टी-20 सामना गमावला आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;बेंचवरच्या खेळाडूंना घेऊन बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवलं&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;2021 च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ॲडलेड येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ दुसऱ्या डावात अवघ्या 36 धावांवर ऑलआऊट झाला होता. ऑस्ट्रेलियाने तो सामना अवघ्या अडीच दिवसांत 8 गडी राखून जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.&lt;/p&gt;
&lt;p&gt;त्यानंतर विराट कोहली बाबा होणार होता, त्यामुळे रजेवर भारतात परतला, तर मोहम्मद शमी दुखापतीमुळे बाहेर झाला. मार्क वॉ आणि रिकी पॉन्टिंग यांसारख्या ऑस्ट्रेलियन दिग्गजांनी दावा केला होता की, विराट आणि शमीशिवाय भारतीय संघ पुनरागमन करूच शकणार नाही आणि ऑस्ट्रेलिया मालिका 4-0 ने जिंकेल.&lt;/p&gt;
&lt;p&gt;पण अजिंक्य रहाणेने शांतपणे ऑस्ट्रेलियाच्या माइंड गेमला उत्तर दिले. कर्णधारपद हाती घेताच त्याने खचलेल्या आणि दुखापतग्रस्त भारतीय संघात एक नवी ऊर्जा भरली.&lt;/p&gt;
&lt;p&gt;मेलबर्न येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात रहाणेने संघाचे आघाडीवरून नेतृत्व केले. त्याने पहिल्या डावात 112 धावांची अत्यंत संयमी व जिद्दी शतकीय खेळी खेळली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून धुव्वा उडवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.&lt;/p&gt;
&lt;p&gt;या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमं आणि माजी खेळाडूंनी भारतीय खेळाडूंचे लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळे डावपेच आखले. भारतीय खेळाडूंवर कोविड-19 च्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप करण्यात आले, तर संघ ब्रिस्बेनमध्ये खेळण्यास घाबरत असल्याच्या बातम्या पसरवल्या गेल्या. पण रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या मानसिक दबावाला जराही जुमानले नाही.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;'गाबा'चा ऐतिहासिक विजय&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;सिडनी येथील तिसऱ्या कसोटीत मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर वर्णद्वेषी टीका झाली. रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारी गंभीर दुखापतग्रस्त झाले. तरीही, भारतीय फलंदाजांनी तब्बल 131 षटके फलंदाजी करत सामना अनिर्णित (Draw) राखला आणि मालिका जीवंत ठेवली.&lt;/p&gt;
&lt;p&gt;पण, ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर ऑस्ट्रेलिया गेल्या 33 वर्षांपासून एकही कसोटी सामना हारली नव्हती. परंतु, रहाणेच्या युवा व ध्येयवेड्या संघाने तिथे इतिहास रचला. भारताने ऑस्ट्रेलियाचा 3 गडी राखून पराभव केला आणि मालिका 2-1 अशी जिंकली.&lt;/p&gt;
&lt;p&gt;भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिकेत पराभूत केले. याआधी 2018-19 मध्ये भारताने मालिका 2-1 ने जिंकली होती. परंतु, तेव्हा दिग्गजांचे म्हणणे होते की, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर बंदी असल्यामुळे ऑस्ट्रेलिया कमजोर होती. मात्र, 2020-21 च्या बॉर्डर-गावसकर मालिकेत स्मिथ आणि वॉर्नर दोघेही संघात होते. अशा कठीण परिस्थितीतही रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मालिका जिंकून दाखवली. अजिंक्य रहाणे भारताचा असा यशस्वी कसोटी कर्णधार ठरला, ज्याच्या नेतृत्वाखाली संघाने 6 पैकी एकही कसोटी गमावली नाही.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/30/020675b1d3ef3c8b92d3696d7b9efdaa17853965138811378_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[मोहम्मद इरफानसारख्या लाखोंच्या स्वप्नांचा आक्रोश!]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/a-blog-post-by-writer-sameer-gaikwad-about-mohammed-irfan-1433260</link><comments>https://marathi.abplive.com/blog/a-blog-post-by-writer-sameer-gaikwad-about-mohammed-irfan-1433260#respond</comments><pubDate>Sun, 26 Jul 2026 22:18:16 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/a-blog-post-by-writer-sameer-gaikwad-about-mohammed-irfan-1433260</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जंतर मंतरवरचे आंदोलन संपलेय. त्या अनुषंगाने देशात विविध दृष्टीकोनातून चर्चा सुरु झालीय. अनेकांची मते समोर येताहेत, त्यातच एका तरुणाने अख्ख्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे, त्याचे नाव आहे मोहम्मद इरफान! जंतर मंतरवर त्याने बर्फ विक्रीचा ठेला लावला होता! अंगात जुना टी-शर्ट, चुरगळलेली पॅन्ट आणि गळ्यात स्कार्फ घालून अगदी तळमळीने बोलणारा इरफान पेशाने एक हातगाडीवाला आहे मात्र त्याचा अभ्यास, त्याची प्रगल्भता, मांडणी आणि तळमळ विलक्षण आहे. इरफान दिल्लीतल्या झोपडपट्टीत राहतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दिल्लीच्या झगमगत्या रस्त्यांवरून वेगाने धावणाऱ्या मोटारींच्या काचांतून भारत वेगळा दिसतो; पण त्याच शहराच्या कडेने पसरलेल्या झोपडपट्ट्यांतून चालत गेल्यावर दुसराच भारत भेटतो. त्या भारतात पावसापासून संरक्षण देणारे छप्परही कायमस्वरूपी नसते, दिवसाची मजुरी उद्याच्या भाकरीची खात्री देत नाही आणि भविष्य हा शब्द अनेकदा शब्दकोशातच राहतो. अशाच एका झोपडपट्टीत, काही चौरस फुटांच्या कच्च्या घरात राहणारा मोहम्मद इरफान अचानक देशाच्या चर्चेत आलाय. त्याच्या हातात कोणतेही पद नाहीये, त्याच्यामागे कोणतीही संघटना नाही, त्याने कोणत्याही विद्यापीठाची पदवी मिळवलेली नाही. तरीही त्याचे बोलणे लाखो लोक ऐकताहेत, ही मोठी लक्षणीय गोष्ट आहे!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गरिबी, अनेकदा माणसाचे शिक्षण हिरावून घेते. इरफानच्या बाबतीतही तसेच झाले. त्याने नियमित शालेय शिक्षण घेतले नाही. न अडखळता वाचता-लिहिता येत नसल्याची कबुली तो स्वतः देतो. पण ज्ञानाची भूक मात्र त्याने मरू दिली नाही. हीच त्याच्या आयुष्याची सर्वात विलक्षण बाजू आहे. ज्ञानाकडे जाणारा त्याचा मार्ग पुस्तकांच्या पानांतून नव्हे, तर मोबाईलच्या स्पीकरमधून गेलाय. तो व्हॉईस सर्चवर आधारित ध्वनी सहाय्यकांचा वापर करून आपली जिज्ञासा शमवून घेतो! इतिहास, संविधान, साहित्य, स्वातंत्र्यलढा, भगतसिंग, गांधी, दुष्यंत कुमार, अदम गोंडवी, जे काही समजून घ्यायचे असेल, ते तो ऐकतो. एखादे उत्तर पटले नाही, तर पुन्हा विचारतो. पुन्हा खात्री करतो. माहितीची पडताळणी करण्याचा प्रयत्न करतो. त्यातून त्याने विलक्षण ज्ञानप्राप्ती केलीय आणि जोडीने विवेकाची कास धरलीय!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जंतर मंतरवरची त्याची मुलाखत प्रचंड व्हायरल झालीय, देशातल्या अनेक नामवंत विवेकी ज्ञानी मंडळींनी त्याच्याविषयी लिहिलंय. तो ह्या आंदोलनाचा चेहरा होण्याइतका मोठा नव्हता, मात्र आजघडीला सर्वत्र त्याची चर्चा आहे. भावनांच्या आहारी न जाता, देशाच्या लोकशाहीवर आणि त्यातील सहभागावर, आपल्या अंतरात्म्याच्या आवाजाद्वारे त्याने आपला हक्क ज्या पद्धतीने सांगितलाय ती थक्क करणारी आहे. त्याचे मुद्दे विलक्षण प्रभावी आहेत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&quot;सरकार, लॉजिस्टिक्स म्हणजेच मालवाहतूक व वितरण व्यवस्था आणि देशाचा जीडीपी वाढवण्याबद्दल बोलते; सरकार मोठ्या उद्योगांना कमी व्याजाची कर्जे आणि स्वस्त वीज पुरवते. पण सरकार मजुरांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला किंवा किमान वेतन देऊ शकत नसेल तर तुमच्या त्या जीडीपीचा काहीच उपयोग नाही,&quot; असे म्हणत त्याने देशातील गरीब मजुरांच्या समस्यांकडे लक्ष वेधलेय.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&quot;एखादा मजूर पाचशे रुपये कमवून घरी आणतो; त्यातून मीठ, साबण, तांदूळ आणि पीठ खरेदी करतो आणि त्या खरेदीवरही तो टॅक्स भरतो. ते देखील भारताचे करदाते आहेत; ते कोणाच्या दयेवर जगत नाहीत;&quot; गरीब मजुरांच्या वतीने बोलताना त्याचा श्वास कोंडला होता, अश्रू अनावर झाले होते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तो म्हणतो की, &quot;मी कुठेतरी ऐकलेय की, हा देश 'सुवर्णकाळातून' जात आहे, तरीही आजही बहुसंख्य भारतीय किमान उत्पन्नापेक्षा कमी पैशांवर गुजराण करतात आणि शारीरिक कष्ट करणारे मजूर म्हणून काम करतात.&quot; इरफानची हतबलता, समाजाची सदसद्विवेकबुद्धी जागृत करते, मन हेलावून टाकते आणि आपल्याला अंतर्बाह्य &amp;nbsp;हादरवते; आपल्याला त्याची व्यथा जाणवते, पण पुढच्याच क्षणी जाणवते की, इरफान म्हणतो तसे आपण सारेच हतबल झालो आहोत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;इरफान म्हणतो की, &quot;मजुरांबद्दल कोणीच बोलत नाही; मजूर रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकत नाहीत. जर त्यांनी एक दिवसही काम बुडवले, तर त्यांच्या घरी चूल पेटणार नाही; मजूर निषेध करू शकत नाहीत.&quot; हे सांगताना त्याला रडू कोसळलं. मजुरांवर अन्याय आणि क्रूरता करण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही हे तो बजावून सांगतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;केवळ इंटरनेटचा वापर करणारा एखादा मजूर किंवा हातगाडीवाला आर्थिक संकटाचे इतके सखोल ज्ञान कसा बाळगू शकतो, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. ह्या प्रश्नाआडून आपण सत्य नाकारू शकत नाही. पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारतात मजुरांची अवस्था किती दयनीय आहे, हे इरफान अगदी स्पष्टपणे मांडतो!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपल्या कक्षेबाहेरील आणि बौद्धिक पातळीवरील विषयांवरही त्याचे विचार अगदी स्पष्ट आहेत. अशी माणसं झोपडपट्ट्यांतून आणि संघर्षातून वर येतात, मनातील भावना मोकळेपणाने मांडतात; त्यांच्या शब्दांतून शहाणपण एखाद्या प्रवाही नदीसारखे वाहते, जे थेट आपल्या काळजाला भिडते आणि दीर्घकाळ आपल्या मनात साद घालते. &amp;nbsp; &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नव्या पिढीत अशी माणसे अस्तित्वात आहेत, ह्या गोष्टीचाही आता अभिमान वाटू लागलाय, कारण विवेकाची चूड पेटवण्याच्या काळात, एक अल्पशिक्षित तरुण हातगाडीवाला देशातल्या नामवंत अर्थशास्त्रज्ञांनाही लाजवेल असे लॉजिक मांडतो तेव्हा आपण दिग्मूढ होतो!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;इरफानच्या बोलण्यात आकडेवारी आहे; पण आकड्यांपेक्षा त्यामागची माणसे जास्त टोकदार आहेत. तो अर्थव्यवस्थेवर भाष्य करतो, पण शेअर बाजाराच्या भाषेत नाही. त्याची अर्थव्यवस्था दिवसाची मजुरी, घरभाडे, औषधाचा खर्च आणि स्वयंपाकाच्या गॅसपर्यंत मर्यादित आहे. त्यामुळे त्याचे प्रश्न अर्थशास्त्राच्या ग्रंथातून आलेले नाहीत; ते रोजच्या जगण्यातून आलेले आहेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तो स्वतःला कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडत नाही. सत्तेत जाण्याची महत्त्वाकांक्षा नसल्याचे सांगतो. महात्मा गांधींच्या अहिंसेवर विश्वास असल्याचेही तो नमूद करतो. आंदोलनात सहभागी होणे, प्रश्न विचारणे आणि संविधानाचा उल्लेख करणे, याचा अर्थ एखाद्या पक्षाचे प्रतिनिधित्व करणे असा नसतो, हे तो अधोरेखित करतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मोहम्मद इरफान सारखे तरुण गरीब असूनही या भूमीचा वारसा आणि देशाचे भविष्य आहेत, एका तेजस्वी आणि विशुद्ध विचारसरणीचे धनी आहेत. ह्या अनुषंगाने एक प्रश्न असा विचारावा वाटतो की, अशांच्या दयनीय अवस्थेला कोण जबाबदार आहे? अशा लोकांची काळजी कोण घेणार? त्यांना न्याय कोण मिळवून देणार? आणि या गरीब मजुरांसाठी आवाज कोण उठवणार?&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जंतर मंतरवर लाखो लोकांच्या गर्दीत, जिथे 'जेन झी'ला बदमाश ठरवले जात होते, तिथे इरफानने सरकारला आरसा दाखवलाय. आंदोलन सुरु असताना कदाचित त्याला कोणी नीट पाहिले नसेल, परिणामी मंचावर बोलण्याची परवानगी त्याला मिळाली नाही. तो मंचावर आला असता तर भगतसिंगांचा अंश नव्याने समोर आला असता! त्याने या देशातील तरुणांमध्ये आणखी थोडा उत्साह भरला असता. संवादाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही, हे सरकारला सांगितले असते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपल्या देशाचे राजकारण हिंदू-मुस्लिम आणि जातीच्या आधारावर विभागलेले आहे, आणि या देशात असेच तरुण लोकशाही जिवंत ठेवत आहेत हे वास्तव त्याच्या रूपाने ठळकपणे समोर आलेय. मोहम्मद इरफानची खरी ताकद त्याच्या प्रश्नांत आहे. त्याच्या प्रश्नांची उत्तरे कुणापाशीच नाहीत! ती समाजाने, सरकारने आणि नागरिकांनी मिळून शोधायची आहेत. कदाचित म्हणूनच मोहम्मद इरफानची कथा एका व्यक्तीची राहत नाही; ती भारतीय लोकशाहीतील त्या असंख्य चेहऱ्यांची कथा बनलीय, जे रोज श्रम करतात, रोज जगण्यासाठी लढतात, आणि तरीही जगाकडे प्रश्न विचारण्याचे धैर्य सोडत नाहीत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्याच्या तळहातांवर श्रमाचे घट्टे आहेत; पण त्या हातांनी उचललेला सर्वांत मोठा भार कदाचित विटांचा किंवा हातगाडीचा नाही, तर स्वतःला आणि समाजाला सतत प्रश्न विचारण्याचा आहे. देशाच्या मेनस्ट्रीम मीडियात असा एकही अँकर नाही, जो अशा गोष्टी स्पष्टपणे बोलत नाही... एवढ्या हुशार व्यक्तीला औपचारिक शिक्षण का मिळालं नाही? त्याच्यासारख्या लाखो लोकांच्या स्वप्नांचा आक्रोश कोणी ऐकणार की नाही हा कळीचा प्रश्न आहे! हा अफलातून तरूण दिल्लीच्या झोपडपट्टीत राहतो. त्याला सलाम!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;- समीर गायकवाड&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/26/29cc8ccd3e9bff460549e6b2c01d3b2e1785084473096339_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Jan Rose Kasmir Flower Girl: सुरक्षा दलांना फुल देणारी अमेरिकन तरुणी!]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/jan-rose-kasmir-flower-girl-chrysanthemum-and-the-vietnam-war-delhi-student-protest-blog-by-sameer-gaikwad-1432731</link><comments>https://marathi.abplive.com/blog/jan-rose-kasmir-flower-girl-chrysanthemum-and-the-vietnam-war-delhi-student-protest-blog-by-sameer-gaikwad-1432731#respond</comments><pubDate>Wed, 22 Jul 2026 14:56:33 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ विश्व ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/jan-rose-kasmir-flower-girl-chrysanthemum-and-the-vietnam-war-delhi-student-protest-blog-by-sameer-gaikwad-1432731</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपल्याकडे जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यापैकीच काही फोटो, आंदोलनकर्ते मुलं मुली पोलिसांना फुले देतानाचे आहेत! हे फोटो पाहून, 'द गर्ल विथ द फ्लॉवर' म्हणून जगभर प्रसिद्ध असलेली जेनरोज कास्मिर हिची आठवण झाली. जेनचा एक फोटो जगभरात व्हायरल असलेल्या शंभर फोटोंपैकी एक आहे!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जेव्हा हा फोटो काढला गेला तेव्हा जेन कास्मिर फक्त सतरा वर्षांची होती, आणि त्या वयात देखील तिने युद्धविरोधी चळवळीला पूर्णपणे वाहून घेतले होते. व्हिएतनाममधील युद्ध हे अमेरिकन साम्राज्यवादाचे एक भयानक रूप होते आणि तिथे अमेरिकन सैन्याच्या अस्तित्वाचे काहीही कारण नव्हते असे तिला वाटायचे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अमेरिकेच्या व्हिएतनाम विरोधातील युद्धखोर नीतीविरोधात पेंटागॉनवरील मोर्चा काढण्यात आला होता. त्यासाठी जेन एकटीच गेली होती. जेन तिथे पोहोचली, तेव्हा लोक मोठ्या संख्यने लिंकन मेमोरियल रिफ्लेक्टिंग पूलजवळ जमले होते. पेंटागॉनकडे चालत जात असताना, मी &amp;ldquo;व्हिवा चे, व्हिवा चे&amp;rdquo; अशी घोषणा देणाऱ्या गर्दीत जेन देखील सामील झाली. विशेष म्हणजे त्या दिवसापर्यंत जेनने चे गेवाराबद्दल कधीच काहीही &amp;nbsp;ऐकलं नव्हतं.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हा जत्था पेंटागॉनच्या जवळ पोहोचताच, आंदोलकांना आत शिरण्यापासून रोखण्यासाठी नॅशनल गार्डने अडथळ्याची भिंत उभी केली होती. तिथेच कोणीतरी फुले वाटत होते, आणि त्यामुळेच नकळत जेनच्या हाती शेवंतीचे एक फूल आले. या दरम्यान सैनिकांनीही आपल्या बाजूने सामील व्हावे म्हणून जेन त्यांना खुणावत होती. आपण कोणत्या धोक्यात आहोत हा विचार तिच्या मनातच आला नाही! केंट स्टेटच्या आधीची गोष्ट असल्याने आपल्याला कुणी मारून टाकेल अशी भीती तिच्या मनात कधीच दाटली नाही.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मानवी भिंत बनवून उभ्या असलेल्या पोलिसांपैकी कोणीही तिच्या नजरेस नजर मिळवली नाही. त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. पण नंतर फोटोग्राफरने &amp;nbsp;जेनला सांगितले की, ते पोलीस थरथरत होते! आंदोलकांवर गोळीबार करायला सांगितले जाईल या भीतीने त्यांना ग्रासलं होतं. तरीही जेनने ठरवलं की, यांना किमान एक फुल तरी सदिच्छेचे, प्रेमाचे प्रतीक म्हणून दिले पाहिजे! &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपण जर बारकाईने जेन कास्मिरच्या चेहऱ्याकडे पाहिले तर लक्षात येते की, त्या फोटोत जेन अत्यंत दु:खी दिसते! कारण प्रत्यक्षात फुल देताना जेनने आजूबाजूला पाहिले आणि तिच्या लक्षात आले की, आजूबाजूला अनेक कोवळी मुलंमुली होती! इतर कोणाप्रमाणेच तेही युद्धयंत्रणेचे बळी होते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अनेक वर्षांनंतर, जेनने ते चित्र पहिल्यांदा प्रदर्शनात पाहिले, तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आले; त्या स्मृतींनी त्या अथांग दुःखात खपली पुन्हा निघाली. कारण तिचा फोटो कुणी काढला आहे आणि तो इतका व्हायरल झाला आहे याची तिला कल्पना नव्हती. घटनेच्या दिवशी अंधार पडेपर्यंत, ती आंदोलनस्थळीच थांबली आणि मग बसने घरी परतली होती. तिच्यासाठी तो काही विशेष घडामोडींचा दिवस नव्हता.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ऐंशीच्या दशकात तिला तो फोटो सापडला. तिचे वडील स्कॉटलंडला गेले होते आणि त्यांनी एक फोटोग्राफी मासिक विकत घेतले. ते उघडल्यावर त्यांना त्यात त्यांची मुलगी दिसली. मॅग्नममार्फत फोटोग्राफर मार्क रिबौड यांना तिने पत्र लिहिले, &amp;ldquo;फोटोतली मुलगी मीच आहे. तुम्हाला माझ्या पत्त्याची निकड असेल की नाही हे मला माहीत नाही, पण हा माझा पत्ता आहे.&amp;rdquo; पत्रात तिने पत्ता पाठवला पण त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही. जेन रोझ, वयाच्या चाळीशीत पोहोचेपर्यंत ती कोण आहे यात लोकांना स्वारस्य नव्हते! आणि वृत्तसंस्थांनीही तिच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली नव्हती.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मागे वळून पाहताना जेन रोझला वाटतं की तो एक अविश्वसनीय काळ होता. ती टिन एजर होती. तिथे कम्युनिस्ट, व्हाईट पँथर्स , ब्लॅक पँथर्स आणि इतर अनेक गट होते. काय विचार करावा हेच तिला कळत नव्हतं. मेरीलँडमधील माँटगोमेरी कॉलेजच्या तिच्या कॅम्पसमध्ये एका मोठ्या विद्यार्थी संपाचे तिने नेतृत्व केले, पण तो संप हळूहळू थंडावला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जेन आता पंच्याहत्तरहुन अधिक वर्षांची आहे आणि आजही तिला वाटते की, तो काही क्षणिक मूर्खपणा नव्हता, ती एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी उभी होती!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपल्याला अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांना, सुरक्षा दलाच्या जवानांना, जंतर मंतरवर फुलं देणाऱ्या मुलामुलींच्या मनात कोणत्या भावना असतील हे नेमके सांगता येत नाही मात्र ही मुलं जे काही करत आहेत तो काही क्षणिक भावनाविवश होण्यातला वा लाटेवर स्वार होऊन केलेला मूर्खपणा नक्कीच नाही! ही सर्व मुलं एका महत्वाच्या गोष्टीसाठी उभी आहेत, जशी जेन रोझ कास्मिर उभी होती!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जेंव्हा जेंव्हा आपल्या विरोधात बंदुका. लाठ्या ताणुन पोलीस उभे असतील आणि समोरील आंदोलनकर्त्यापैकी कुणीही त्यांना फुल देत असेल तेव्हा तेव्हा जेन रोज कास्मिरची आठवण काढली जाईल!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;इतिहास त्या पोलिसांची, त्या मारेकऱ्यांची आठवण कधीच काढणार नाही ज्यांना ह्या मुलामुलीनीं फुलं दिली आहेत! मात्र ह्या बहादूर, धाडसी, विनम्र मुलामुलींची आठवण नेहमीच काढली जाईल! आंदोलने अशा बारीक सारीक गोष्टींनीच मोठी होत असतात!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;काही नोंदी :&lt;/strong&gt; जेन रोझने पुढे जाऊन आपल्या अनुभवांवर आधारलेलं पुस्तक लिहिलं, जे बेस्टसेलर ठरलं. ऑल यु नीड इज लव्ह, हा विचार तिच्या जगण्याचा आधार आहे! फोटो काढला गेला तेव्हा ती चक्क शाळकरी मुलगी होती!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जेनला वाटते की, कोवळ्या वयात क्रांतिकारी विचार अधिक साद घालतात आणि भीतीला फाट्यावर मारून विरोधात उभं राहणं तेव्हा अधिक सोपं जातं!&lt;br /&gt;जेन रोझ आता पूर्णवेळ शांततावादी कार्यकर्ता म्हणून सक्रिय आहे.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/22/1c36f609c62b876fbf017bdbcb8ea919178471232843888_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Devendra Fadnavis: मोजकेच बोलणारं, पण कृतीतून सिद्ध करणारं व्यक्तिमत्व]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/cm-devendra-fadnavis-birthday-special-article-dynamic-leader-action-speaks-more-than-talks-1432574</link><comments>https://marathi.abplive.com/blog/cm-devendra-fadnavis-birthday-special-article-dynamic-leader-action-speaks-more-than-talks-1432574#respond</comments><pubDate>Tue, 21 Jul 2026 13:38:59 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/cm-devendra-fadnavis-birthday-special-article-dynamic-leader-action-speaks-more-than-talks-1432574</guid><description><![CDATA[&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&amp;gt;&amp;gt; डॉ. मनोज पोचट&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णानं उत्कृष्टतेची (श्रेष्ठतेची) एक अशी व्याख्या दिली आहे, जी युगायुगांपासून अमर आहे. योगः कर्मसु कौशलम् (कामातील कुशलता म्हणजेच योग). जर आधुनिक भारतीय सार्वजनिक जीवनात असा कोणता नेता शोधायचा असेल, ज्यानं स्वतः कधीही या श्लोकाचा उल्लेख न करता तो आपल्या आयुष्यात पूर्णपणे उतरवला आहे, तर तो शोध नागपूरच्या देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या उंबरठ्यावर येऊन संपतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ही कथा केवळ प्रभावी वक्तृत्वाची नाही. महाराष्ट्राने यापेक्षाही अधिक प्रभावी आणि बुलंद वक्ते पाहिले आहेत. ही कथा अशा एका व्यक्तीची आहे, ज्यांनी आपल्या तब्बल 34 &amp;nbsp;वर्षांच्या सार्वजनिक जीवनातील प्रत्येक टप्प्यावर भाषणांपेक्षा आपल्या कामगिरीची नोंदच बोलकी ठरवली. आणि जेव्हा नियतीने त्यांच्या हातातील ती कामगिरीची वही हिसकावून घेतली, तेव्हा त्यांनी कोणताही गाजावाजा न करता शांतपणे नव्या कामाची नवी वही उघडली.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;नागपूरमधील सुरुवातीचे संस्कार आणि राजकीय वाटचाल&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्यांचा संयमी स्वभाव सुरुवातीच्या काळातच घडला. 1975 मध्ये जेव्हा आणीबाणीच्या काळात त्यांचे वडील, जनसंघाचे आमदार गंगाधरराव फडणवीस यांना तुरुंगात टाकण्यात आलं, तेव्हा अवघ्या पाच वर्षांच्या देवेंद्र यांनी आपल्या वडिलांना तुरुंगात टाकणाऱ्या पंतप्रधानांच्या नावानं असलेल्या शाळेत जाण्यास नकार दिला. तो एका बालकाचा निषेध होता, पण त्यातून त्यांच्या विचारांचा खंबीरपणा दिसून आला. विचार शांतपणे जपायचे, पण त्यावर ठामपणे अंमलबजावणी करायची.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) त्यांच्या या विचारांना एक शिस्तबद्ध आकार दिला आणि त्यांना एक दुर्मिळ सांस्कृतिक दृष्टिकोन दिला. नागपूर हे केवळ एक शहर नाही; ते संघाचे केंद्र आहे. तेथे वाढलेल्या या तरुणाने लहानपणीच हे आत्मसात केले की राजकारण हे केवळ एका सखोल ध्येयाचे - एका संस्कृतीचा स्वाभिमान पुनरुज्जीवित करण्याचे - बाह्य माध्यम आहे. 1992 मध्ये, वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी, त्यांनी नागपूर महानगरपालिकेत भारतातील सर्वात तरुण नगरसेवकांपैकी एक म्हणून प्रवेश केला. पाच वर्षांनंतर, वयाच्या 27 व्या वर्षी, ते देशाच्या इतिहासातील सर्वात तरुण महापौरांपैकी एक बनले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ज्यांना केवळ शोभेचे महापौर अपेक्षित होते, त्यांनी देवेंद्र फडणवीसांना ओळखण्यात चूक केली. त्यांनी महानगरपालिकेच्या फाईलकडे राज्याच्या अर्थसंकल्पाइतक्याच गांभीर्याने पाहिले - स्वच्छता, नागरी वित्त आणि प्रशासकीय उत्तरदायित्व. नगरसेवक म्हणून घालवलेल्या या वर्षांनी त्यांना लुटियन्सच्या वर्गांपेक्षा खूप मोठे धडे शिकवले. अंतिम शासन हे पाण्याचे कनेक्शन, मालमत्ता कराच्या नोंदी आणि रस्त्यावरील काम करणाऱ्या दिव्यांबद्दल असते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;1999 मध्ये त्यांनी नागपूर पश्चिम (नंतरचे नागपूर दक्षिण-पश्चिम) मतदारसंघातून विधानसभेत प्रवेश केला; ही ती जागा आहे जिथून ते आजपर्यंत कधीही पराभूत झालेले नाहीत. 2003 पर्यंत, राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या (CPA) महाराष्ट्र शाखेने त्यांना राज्याचे 'उत्कृष्ट संसदपटू' (उत्कृष्ट आमदार) म्हणून सन्मानित केले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;विरोधी पक्षातील वर्षे: गृहपाठ म्हणजेच राजकारण&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;2000 च्या दशकात आणि 2010 च्या सुरुवातीला, फडणवीस यांनी विरोधी बाकांवरील सर्वात अभ्यासू नेता म्हणून आपली ओळख निर्माण केली. सिंचन घोटाळ्याचा पर्दाफाश हा त्यांचा महत्त्वाचा टप्पा होता - हजारो पानांची कागदपत्रे आणि अभ्यास, पण एकही पुराव्याविना आरोप नाही. जेव्हा 2013 मध्ये पक्षाने त्यांना महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष केले, तेव्हा ती त्यांच्या कामगिरीची पावती होती. इतर नेते जेव्हा केवळ नाट्य निर्माण करत होते, तेव्हा हा नेता आपला पूर्ण अभ्यास करत होता.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;यानंतर 2014 च्या निवडणुकीतील विजयाने त्यांना वयाच्या 44 व्या वर्षी महाराष्ट्राच्या इतिहासातील दुसरे सर्वात तरुण आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री बनवले. विदर्भातील हा ब्राह्मण चेहरा मराठाबहुल राजकारणात टिकू शकणार नाही, अशी भविष्यवाणी अनेकांनी केली होती. परंतु, वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;पहिला कार्यकाळ: पायाभूत सुविधा हाच विचार&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पाच वर्षांत त्यांनी काय साध्य केले? नागपूर ते मुंबई दरम्यानचा 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग हा केवळ घोषित करण्यात आला नाही, तर त्याला निधी उपलब्ध करून देण्यात आला, जमीन अधिग्रहित करण्यात आली आणि तो प्रत्यक्षात आणला गेला. यामुळे 16 तासांचा प्रवास आता आठ तासांवर आला असून विदर्भ आणि मराठवाड्याला राज्याच्या मुख्य आर्थिक प्रवाहाशी जोडले. मुंबई मेट्रोचा विस्तार, कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (अटल सेतू), मुंबई-पुणे मिसिंग लिंक, नवी मुंबई विमानतळाचा विस्तार आणि गडचिरोलीतील नक्षलवादाचा यशस्वी बीमोड - या प्रत्येक प्रकल्पाला याच काळात गती मिळाली.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हा पॅटर्न स्पष्ट आहे: फडणवीस यांच्यासाठी पायाभूत सुविधा हे केवळ फोटो काढण्याचे साधन नाही. ते प्रत्यक्ष आकार घेणारे ध्येय आहे - ही अशी धारणा आहे की, एखादी संस्कृती स्वतःचे निर्माण करूनच पुनरुज्जीवित होते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पहिल्या कार्यकाळात त्यांची सर्वात मोठी आणि शांत परीक्षा झाली. 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथील हिंसेमुळे राज्याची सामाजिक वीण धोक्यात आली होती. एका कमकुवत सरकारने नाट्यमय प्रतिक्रिया दिली असती. पण त्यांच्या प्रशासनाने ही हिंसा उत्स्फूर्त नसून घडवून आणलेली आहे हे ओळखले. एल्गार परिषदेच्या मागे असलेल्या सूत्रांचा तपास केला आणि विजय स्तंभाच्या अभिवादनाचे पावित्र्य पुनर्स्थापित केले. तेव्हापासून दरवर्षी 1 जानेवारीला लाखो लोक कोणत्याही अडथळ्याविना शांततेत श्रद्धांजली अर्पण करतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;पाणी: एका मोठ्या धरणाऐवजी लाखो लहान बंधारे&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;महाराष्ट्राची शोकांतिका नेहमीच विषम आकडेवारीची राहिली आहे. देशातील 40 टक्के मोठी धरणं असूनही सिंचनाची टक्केवारी सर्वात कमी. फडणवीस यांनी हे मॉडेल बदललं. 'जलयुक्त शिवार' योजनेनं एक मोठा जलाशय बांधला नाही, तर 16 हजारहून अधिक दुष्काळग्रस्त गावांमध्ये लाखो लहान-लहान बंधारे, शेततळी आणि नाले रुंदीकरणाची कामं केली. 'मागेल त्याला शेततळे' या योजनेनं उद्दिष्ट ओलांडलं.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आणि त्यांच्या पुढील कार्यकाळात ही संकल्पना गावातील तलावांपासून नदी जोड प्रकल्पांपर्यंत विस्तारली. 88,000 कोटींहून अधिक खर्चाच्या 'वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पाला' मंजुरी देण्यात आली, ज्यामुळे विदर्भातील पावसाचं अतिरिक्त पाणी दुष्काळी पट्ट्यात नेलं जाईल. याशिवाय मराठवाडा वॉटर ग्रीड आणि नार-पार-गिरणा जोड प्रकल्पामुळे राज्यातील सर्वात जास्त पाणीटंचाई असलेल्या भागांना दिलासा मिळाला. त्यांच्यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाकडे एका ठराविक मुदतीतील अभियांत्रिकी समस्या म्हणून पाहिलं नव्हतं.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;शेतकऱ्यांची खाती&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;येथील आकडेवारी शांतपणे समजून घेण्यासारखी आहे. 2017 मध्ये, 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने'अंतर्गत 89 लाख शेतकरी कुटुंबांचे 34,000 कोटी रुपयांहून अधिक कर्ज माफ करण्यात आलं, त्यावेळची ही राज्यातील सर्वात मोठी शेतकरी मदत होती.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पीएम-किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 12,000 रुपये (केंद्र सरकारकडून 6,000 रुपये आणि राज्य सरकारकडून 6,000 रुपये) मिळतात. त्यांच्या वित्तमंत्रीपदाच्या काळातील अर्थसंकल्पात, 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'द्वारे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात आलं आणि प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान देण्यात आलं. दशकांपासून प्रामाणिक शेतकरी थकितदारांना मदत करत होता; फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी सवलतीसोबतच शिस्तीचाही पुरस्कार केला. यामध्ये शेतीसाठी दिवसा वीज देणाऱ्या सौर कृषी वाहिन्यांची जोड दिली.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;आरक्षणाचा तिढा आणि प्रशासकीय कौशल्य&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;महाराष्ट्राच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यासमोर एकच कठीण आव्हान होतं. मराठा आरक्षणाची मागणी आणि इतर मागासवर्गीयांच्या (OBC) हक्कांचं रक्षण. बहुतेकांनी जुना राजकीय मार्ग निवडला - समिती स्थापन करा, आंदोलन काढा आणि प्रश्न पुढील सरकारवर ढकलून द्या. फडणवीस यांनी हा प्रश्न थेट सोडवण्याचा निर्णय घेतला. 2018 मध्ये, त्यांच्या सरकारनं भक्कम मागासवर्गीय कागदपत्रांच्या आधारे मराठा आरक्षण कायदा संमत केला आणि तो उच्च न्यायालयातही टिकला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नंतर सर्वोच्च न्यायालयानं 50 टक्क्यांच्या मर्यादेवर तो रद्द केला, तेव्हा महायुती सरकारनं 2024 मध्ये 10 टक्के SEBC कायदा आणला, जो न्यायालयाच्या विशिष्ट हरकतींना उत्तर देण्यासाठी तयार केला गेला होता - OBC कोट्यातून एक टक्काही न कमी करता मराठा समाजाला आरक्षण दिले गेले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्यानंतर सप्टेंबर 2025 मध्ये जेव्हा मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन पोहचले, तेव्हा संपूर्ण राज्य चिंतेत होते. इतर ठिकाणी अशी आंदोलने लाठीमार, गोळीबार आणि जाळपोळीत संपली आहेत. पण महाराष्ट्रात: पाच दिवसांची चर्चा, 1918 च्या हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करणारा जीआर, ज्यामुळे पुराव्यांच्या आधारे कुणबी नोंद असलेल्या मराठवाड्यातील मराठ्यांना प्रमाणपत्रे मिळाली आणि गर्दी शांततेत परतली. एकाही ओबीसी हक्काला धक्का लागला नाही; फडणवीस यांनी हे सभागृहात आणि ओबीसी नेत्यांना थेट सांगितले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एका मराठा-बहुल राजकारणात, एका ब्राह्मण मुख्यमंत्र्याने आंदोलनाचा संपूर्ण ताप सहन केला, आणि एकही जीव न गमावता तो प्रश्न सोडवला. मराठा आकांक्षा एका बाजूला आणि ओबीसी संरक्षण दुसऱ्या बाजूला - दोन्ही तराजू समतोल ठेवणे हे केवळ व्यवस्थापन नाही, ते 'उत्कृष्ट मुत्सद्देगिरी' (Statecraft) आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;गुंतवणुकीचं केंद्र&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रानं पहिल्याच दिवशी 14.5 लाख कोटी रुपयांचा सामंजस्य करार (MoUs) केले आणि एकूण 30 लाख कोटी रुपयांच्या (सुमारे $360 बिलियन) करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. ही रक्कम महाराष्ट्राच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या जवळपास पाच पट आहे. यात 83 टक्के परकीय थेट गुंतवणूक (FDI) 18 देशांमधून आली आहे आणि मागील वर्षाच्या करारांची अंमलबजावणी दर 75 टक्के आहे. यातून पुढील दशकात 30 ते 40 लाख रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;या गुंतवणुकीचा भौगोलिक विस्तार पाहा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;टाटा समूहासोबत मुंबईजवळ भारतातील पहिले इनोव्हेशन सिटी; 1 लाख कोटी रुपयांचा हायपरस्केल डेटा सेंटर पार्क; रायगड-पेण ग्रोथ सेंटर; छत्रपती संभाजीनगरसाठी 55,000 कोटी रुपये; नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगरसाठी 50,000 कोटी रुपये; नागपूर आणि विदर्भासाठी 2.7 लाख कोटी रुपये - ज्यामध्ये गडचिरोलीतील आर्सेलरमित्तलचा 1.1 लाख कोटी रुपयांचा ग्रीन स्टील प्लांट समाविष्ट आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एकेकाळी केवळ भूसुरुंगांसाठी प्रसिद्ध असलेला गडचिरोली जिल्हा आज 'स्टील सिटी' बनत आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण नक्षलविरोधी अभियानामुळे हा जिल्हा नक्षलमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. फडणवीस यांचे नक्षलवादाला उत्तर केवळ बंदूक नव्हते; तर ते कारखाने, खाण भाडेपट्टे आणि रोजगाराच्या संधी हे होते. महाराष्ट्र आज भारताची जीएसटी राजधानी आहे आणि 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;सांस्कृतिक पुनरुज्जीवन&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्यांनी भूषवलेल्या प्रत्येक भूमिकेमागे एक ठाम विश्वास राहिला आहे. महाराष्ट्राचा विकास हा त्याच्या सांस्कृतिक स्वाभिमानाच्या पुनरुज्जीवनाशिवाय अपूर्ण आहे. त्यांनी हे स्पष्टपणे सांगितले आहे की, ते एक गर्विष्ठ हिंदू आहेत - आणि नंतर कामातून ते सिद्ध केले आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;औरंगाबाद आता 'छत्रपती संभाजीनगर' आहे; उस्मानाबाद 'धाराशिव' आहे, अहमदनगर 'अहिल्यानगर' आहे. ज्या किल्ल्यांवर स्वराज्याचा इतिहास रचला गेला, त्यांची डागडुजी करण्यात आली, अतिक्रमणे हटवण्यात आली आणि जुलै 2025 मध्ये महाराष्ट्राच्या 12 किल्ल्यांच्या 'मराठा मिलिटरी लँडस्केप्स'ला युनेस्कोने (UNESCO) जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गडचिरोलीच्या जंगलात सशस्त्र नक्षलवादाचा बीमोड केल्यानंतर, त्यांनी शहरातील नक्षलवादी विचारसरणीकडे मोर्चा वळवला. जुलै 2025 मध्ये गृहमंत्री म्हणून त्यांनी 'महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक' संमत करून घेतले, ज्यामुळे नक्षलवादी संघटनांच्या फ्रंटल ऑर्गनायझेशनवर बंदी घालण्यात आली. परंतु त्यांनी सभागृहात स्पष्ट केले की, हा कायदा केवळ संविधानाला आव्हान देणाऱ्यांवरच कारवाई करेल. कायद्याचा दुरुपयोग न करता शांतता प्रस्थापित करणे हे त्यांच्या गृहमंत्रीपदाचे वैशिष्ट्य आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;गृह मंत्रालय: 60 दिवसांत न्याय&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गृहमंत्री म्हणून त्यांची कार्यपद्धती स्पष्ट आहे: कोणताही गाजावाजा नाही, फक्त कडक कारवाई. 1 मे 2026 रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेला अत्याचार आणि हत्येच्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्यानंतरची कारवाई पाहा: दुसऱ्याच दिवशी आरोपीला अटक, 15 दिवसांत 12-शे पानांचे चार्जशीट, 16 दिवसांत 55 साक्षीदारांची तपासणी आणि 60 दिवसांच्या आत विशेष न्यायालयाकडून फाशीची शिक्षा. ज्या देशात खटले वर्षांनुवर्षे चालतात, तिथे महाराष्ट्राने 60 दिवसांत न्याय देऊन एक नवा मानदंड निर्माण केला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;लोहगड किल्ल्यावर तरुण उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्येनंतरही त्यांनी जलदगती न्यायालय आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली. पण त्यांनी समाजाला विचार करायला लावणारा प्रश्न विचारला: शिक्षित आणि सुशिक्षित घरातील मुले अशा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे का वळत आहेत? गुन्ह्याकडे केवळ कायद्याच्या चौकटीतून न पाहता सामाजिक दृष्टिकोनातून पाहणारा गृहमंत्री दुर्मिळ असतो. कायद्याचे राज्य आणि वेगवान न्याय प्रक्रिया ही त्यांची ओळख आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;पंतप्रधानांचं स्वप्न पूर्ण करणं&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;फडणवीस यांच्या सार्वजनिक जीवनाच्या केंद्रात एक नाते आहे: एक कार्यकर्ता आणि त्याचा नेता यातील बंध. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा 'विकसित भारत 2047' चा संकल्प सोडला, तेव्हा फडणवीस यांनी महाराष्ट्राचा रोडमॅप तयार केला. महाराष्ट्र भारताच्या जीडीपीमध्ये जवळपास 15% योगदान देतो आणि जीएसटी संकलनात देशात अव्वल आहे. त्यामुळे भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्यासाठी महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनणे आवश्यक आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दावोस मधील 30 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, अर्थसंकल्पात भांडवली खर्चातील 21 टक्के वाढ, मेक इन इंडियासाठी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र', पीएम गतिशक्तीसाठी 'समृद्धी महामार्ग' आणि 'अटल सेतू', आणि महिलांसाठी 'लाडकी बहीण योजना' - या सर्व गोष्टी पंतप्रधानांच्या राष्ट्रीय संकल्पाला महाराष्ट्रातून बळ देतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;संघर्षाचा काळ: 2019-2022&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नोव्हेंबर 2019 मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला जनादेश दिला होता, पण 25 वर्षांच्या मित्राने साथ सोडली. अजित पवार यांच्यासोबतचा पहाटेचा शपथविधी अवघ्या 80 तासांत संपला आणि फडणवीस यांनी राजीनामा दिला. प्रचारातील त्यांचे शब्द - &quot;मी पुन्हा येईन&quot; - यावरून विरोधकांनी त्यांची प्रचंड टवाळी केली.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्यांनी हा अपमान शांतपणे सहन केला. 2019 ते 2022 या काळात विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी सरकारला प्रत्येक अधिवेशनात धारेवर धरले, पक्ष संघटना मजबूत ठेवली आणि 2020 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून एनडीएला विजय मिळवून दिला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;शिस्तीची परीक्षा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जून 2022 मध्ये राजकीय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. सर्व पक्षाला वाटत होते की फडणवीस मुख्यमंत्री होतील. परंतु पक्षाच्या आदेशानुसार, त्यांनी स्वतःपेक्षा पक्ष संघटनेला प्राधान्य देत उपमुख्यमंत्री पद स्वीकारले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;काहींनी याला डिमोशन (अवनती) म्हटले, पण स्वयंसेवकांनी याकडे &quot;स्वत्त्वापेक्षा संघटना श्रेष्ठ&quot; या भावनेने पाहिले. दोन वर्षे त्यांनी गृह आणि वित्त ही महत्त्वाची खाती सांभाळली आणि महायुती सरकारला मजबुती दिली.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;पुनरागमन&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;2024 च्या लोकसभा निकालानंतर त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत पद सोडण्याची तयारी दर्शवली होती, पण पक्षाने ती नाकारली. त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत, महायुतीने विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आणि भाजपने एकट्याने 132 जागा जिंकल्या.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;5 डिसेंबर 2024 रोजी आझाद मैदानावर पंतप्रधानांच्या उपस्थितीत त्यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. &quot;मी पुन्हा येईन&quot; ही आता टवाळी राहिली नव्हती, तर ती एक खरी ठरलेली भविष्यवाणी होती - तीही कोणावरही कटुता न ठेवता.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;आजचा काळ&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तिसऱ्या कार्यकाळात आव्हानेही आली. जानेवारी 2026 मध्ये बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर, फडणवीस यांनी अत्यंत संयमाने आणि खंबीरपणे सरकार व राज्याला सावरले. शोक आणि दुःखाच्या काळातही त्यांनी प्रशासकीय गांभीर्य आणि सन्मान राखून परिस्थिती हाताळली.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;ते जगतात तो श्लोक&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;राजकारण गोंधळाला बक्षीस देते; पण इतिहास संयम आणि कामाला लक्षात ठेवतो. देवेंद्र फडणवीस हे नगरसेवक, महापौर, आमदार, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री असे सर्व प्रवास करणारे बहुदा एकमेव भारतीय नेते आहेत. त्यांच्या संपूर्ण प्रवासात... कोणताही आव नाही, कोणताही सूड नाही. ज्या माणसाने दंगल न घडवता शहरांची नावे बदलली, गोळीबार न करता आंदोलने सोडवली आणि एकाच टेबलावरून मंदिरे आणि महामार्ग दोन्ही उभारले - त्यांचा विश्वास फक्त एकाच गोष्टीवर आहे, काम बोलेल.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन... (तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे, त्याच्या फळावर कधीही नाही).&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बहुतेक राजकीय नेते या श्लोकाचा फक्त उच्चार करतात. पण फार थोडे असे असतात, ज्यांनी परिस्थितीमुळे हा श्लोक प्रत्यक्ष जगला आहे - सर्व सार्वजनिक उपहासांना तोंड देत, स्वतःचा संयम राखून आणि राज्याला अधिक मजबूत करून ते बाहेर पडले आहेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्या अल्पभाषिणी नेत्याचे मोजमाप हेच आहे: **त्यांच्या कर्तृत्वाला कधीही स्पष्टीकरणाची किंवा प्रवक्त्याची गरज पडली नाही.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/10/55bc9a944c3477ba9d7ebd13c9a09d551778396025700487_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[वामन होवाळ यांच्या निमित्ताने..]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/sameer-gaikwad-blog-on-renowned-marathi-rebel-dalit-writer-waman-hoval-1432458</link><comments>https://marathi.abplive.com/blog/sameer-gaikwad-blog-on-renowned-marathi-rebel-dalit-writer-waman-hoval-1432458#respond</comments><pubDate>Mon, 20 Jul 2026 12:01:03 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/sameer-gaikwad-blog-on-renowned-marathi-rebel-dalit-writer-waman-hoval-1432458</guid><description><![CDATA[&lt;p&gt;इयत्ता बारावीच्या युवकभारती पुस्तकात विख्यात विद्रोही दलित साहित्यिक वामन होवाळ यांची 'मजल्याचं घर' ही कथा होती. होवाळांच्या 'बेनवाड' ह्या गाजलेल्या कथासंग्रहातली ही कथा. बयाजी नावाच्या माणसाची. त्याच्या स्वप्नाची आणि स्वप्नासाठीच्या लढाईची!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;गावातल्या तालेवार लोकांची, उच्च जातीय मंडळींची, कथित श्रेष्ठ वर्गीयांची जशी घरे आहेत तसंच आपलंही घर असावं हे बयाजीचे स्वप्न. बयाजीच्या स्वप्नातले घर दुमजली होते ही गावाच्या दृष्टीने पोटदुखी होती कारण गावात कोंडीबा पाटलाचे एकच घर दुमजली असते! हे स्वप्न बयाजी एकट्याने पाहत नाही. त्याचं अख्खं कुटुंब त्यात सामील असते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;चार दशके मुंबईच्या गोदीत काम करून आपल्या गावी आलेला बयाजी गावाकडे आपल्या मालकीचे घर बांधू इच्छितो. निवृत्तीनंतर मिळालेले फंडाचे सगळे पैसे कनवटीला बांधून गावात येतो. येताना आपल्या पोरापोरीसाठी बायकोसाठी तो कोणतीही चीजवस्तू आणत नाही. सर्वांचा हिरमोड होतो. त्याने एक ट्रंक आणलेली असते ज्यात फक्त भांडीकुंडी, खिळे आणि काही फोटो फ्रेम असतात.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;लोकांनी मारलेले टोमणे सहन करत, दमदाटी सोसत बयाजी घर बांधतो. भिंतीच्या आतून त्याने एक जिना बांधलेला असतो जेणेकरुन गावाला असे वाटू नये की, ह्याने दुमजली घर बांधले आहे! नकळत त्याच्या मनातल्या दडपणाने त्याच्या इच्छेवर मात केलेली असते, पोटमाळ्यासारखा मजला बांधून झाल्यावर त्याचे घर पूर्ण होते. बाहेरून पाहणाऱ्या कोणत्याही माणसाला ते एक मजली घर वाटले असते अशी त्याची रचना असते!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;बांधकाम उरकल्यावर एक दिवस ठरवून, बयाजी आपल्या नव्या घराचे 'वास्तुक' घालायचे ठरवतो. पाव्हण्या रावळ्यांना जेवणाचे निमंत्रण देतो, गावातल्या जिम्मेदार माणसांना पानसुपारीचे आवतण धाडतो. कारण त्यांना बयाजीच्या वस्तीमधले जेवण कसे चालले असते! आप्तेष्ट मंडळींसाठी शिरापुरीचा बेत होतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;तो दिवस उजाडतो. घरापुढे मांडव उभा राहतो. लोक आवर्जून येतात. भजनी मंडळींकडून आंबेडकर आणि बुद्ध यांची भजने गायली जातात. जेवणावळी पूर्ण होतात. गावातले लोक त्याच्यावर जाम चडफडतात. 'भिकारडं माजलंय, ह्याच्याकडे बघितलं पाहिजे,' अशी शेरेबाजी होते आणि मध्यरात्र उलटल्यानंतर बयाजीच्या घराला आग लागते!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;आग लावली गेली की लागली हे कळून येत नाही मात्र आपले घर वाचवण्यासाठी आग विझवण्याच्या नादात बयाजी होरपळून निघतो. त्यात त्याचा मृत्यू होतो. सुखाची झोप घेण्यासाठी गावाकडे राहायला आलेल्या बयाजीला अकाली सरणावर निजावे लागते! मरताना तो आपल्या मुलांना एकच सांगतो, 'मजल्याचं घर बांधा पोरवांनो माझी एकच इच्छा आहे!'&lt;/p&gt;
&lt;p&gt;बयाजी मरून जेमतेम एक हप्ता उलटतो आणि बयाजीची पोरं कुदळ फावडी खोरे हाती घेऊन कामाला लागतात. गाव आश्चर्य करू लागतं, 'पोरांनो तुमचा बाप मरून अजुक धा रोज पण झालं नाहीत आणि तुम्ही हे काय लावलंय! त्याच्या आत्म्याला शांती कशी मिळेल!'&lt;br /&gt;बयाजीचा थोरला पोरगा उत्तरतो, &quot;त्या साठीच तर हे चाललंय!&quot;&lt;br /&gt;गावकरी विचारतात, 'पण तुम्ही करताय तरी काय?'&lt;br /&gt;&quot;ही घराची सुरुवात हाय, ती पन दडग्या मजल्याची नव्हं! दुमजली घराची सुरुवात!&quot; बयाजीचा पोरगा उत्तरतो. आणि त्यासरशी लागलीच त्याचे सारे कुटुंब नेटाने दुमजली घरासाठी कामाला लागते.&amp;nbsp;&lt;br /&gt;इथे कथा संपते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;आज हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे होवाळ मांगाचे होते की महाराचे होते ह्या भिकार वादाने आलेला उद्वेग! हा साहित्यिक माझ्या जातीचा होता हे दोन्ही बाजूंच्या लोकांना आपल्या समाजाला सांगायचे आहे. कशासाठी, तर अस्मितेची चूल पेटवण्यासाठी! 'मजल्याचं घर मध्ये बयाजी मरून जातो आणि त्याची पुढची पिढी त्याच्या कामाचा वसा घेत तेचे स्वप्न पूर्ण करते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;वामन होवाळ आता हयात नाहीत, त्यांच्या स्वप्नातलं अक्षर साहित्याचं घर बांधण्याचा वसा कुणालाही नकोय मात्र त्यांच्या जातीचा वारसा अनेकांना हवाय! ही, त्या थोर व्यक्तीच्या विचारांची परवड आहे! ही लाजिरवाणी बाब आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;'मजल्याचं घर'मध्ये एका परिच्छेदात बयाजीचे घर पूर्ण झाल्यानंतर त्याने त्याच्या घरात कोणकोणत्या थोर महापुरुषांच्या तसविरी लावलेल्या आहेत याचा एक उल्लेख आहे. त्यात कर्मवीर भाऊराव पाटील आणि जोतिबा फुले यांचीही नावे आहेत. ही बाब महत्वाची आहे. &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;वामन होवाळ, सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील तडसर गावचे. इथेच गावकुसाबाहेर त्यांचा जन्म झाला. अत्यंत संघर्षमय वातावरणात त्यांनी शिक्षण घेतले. रेल्वेत नोकरी केली. दलितांच्या व्यथा टोकदार शब्दांत मांडल्या. होवाळ लक्षात राहिले ते त्यांच्या कथाकथनामुळे. अन्य प्रीव्हिलेज्ड जातींच्या कथाकथनकारांच्या तुलनेत त्यांनी स्वतःला प्रस्थापित केलं हे विशेष.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;त्यांचे जन्मगाव अतिशय सुंदर निसर्गरम्य आहे, सह्याद्रीच्या कुशीत वसले आहे मात्र त्यांच्या कथांतले गाव टोचणी देणारे आहे. जगण्याची साधने धडधाकट असली तर जगण्याचा, भोवतालाचा आनंद घेता येतो अन्यथा सारं काही बेगडी ठरतं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;वामन होवाळ यांच्या विचारांचा वारसा हवाय म्हणून समाज बाह्या सरसावून पुढे येत नाही तर त्यांच्या जातीशी आपली जात जोडली जावी म्हणून पुढे येतोय हे चित्र त्यांच्या संघर्षाचा, विचारांचा अपमान करणारे आहे! अर्थातच सर्वचजण ह्या विचारांचे आहेत असे नाही, त्यात काही अपवादही आहेत मात्र त्यांची संख्या नगण्य आहे. उपवर्गीकरणाचे निमित्त करुन दोन शोषित जातींत लावला गेलेला हांडगूळ एक सुनियोजित कारस्थान आहे हे देखील समाजाला कळू नये हे त्याहून वाईट आहे!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;- समीर गायकवाड&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/20/bbc9a9e3765f48ec2c9f2fe4607240971784528962738954_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : आमरण उपोषणाचा धक्कादायक जागतिक आविष्कार!]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/sonam-wangchuk-protest-delhi-neet-paper-leak-shocking-global-manifestation-fast-unto-death-1432297</link><comments>https://marathi.abplive.com/blog/sonam-wangchuk-protest-delhi-neet-paper-leak-shocking-global-manifestation-fast-unto-death-1432297#respond</comments><pubDate>Sat, 18 Jul 2026 21:59:28 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ भारत ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/sonam-wangchuk-protest-delhi-neet-paper-leak-shocking-global-manifestation-fast-unto-death-1432297</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;BLOG :&lt;/strong&gt; सोनम वांगचूक यांची जबरदस्तीने धरपकड केल्यानंतर आमरण उपोषण पुन्हा एकदा चर्चेत आलेय. आमरण उपोषण हे व्यवस्थेविरोधातील आंदोलनाचे एक प्रभावी अस्त्र! भारतात त्याचा वापर बऱ्यापैकी केला जातो, जगभरातही अनेक देशात ह्या शांततेच्या गांधीवादी आंदोलन पद्धतीची भुरळ पडली आहे. ही नोंद आहे उत्तर आयर्लंडमधील आमरण उपोषणाची! हे उपोषण विलक्षण गाजले ते त्यातील भयंकर गोष्टींनी, उपोषणाने झालेल्या दहा जणांच्या मृत्यूने! &amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;युनायटेड किंगग्डमचा घटक असणाऱ्या, उत्तर आयर्लंडमध्ये अनेक दशके कॅथोलिक आयरिश राष्ट्रवादी आणि ब्रिटनशी एकनिष्ठ प्रोटेस्टंट यांच्यात संघर्ष सुरू होता. या संघर्षाला पुढे 'द ट्रबल्स' म्हणून ओळखले जाऊ लागले. आयरिश रिपब्लिकन आर्मी (आयआरए) या सशस्त्र संघटनेचे अनेक कार्यकर्ते ब्रिटिश सरकारने अटक करून मेझ तुरुंगात डांबले. 1976 पर्यंत या कैद्यांना राजकीय कैद्याचा दर्जा दिला जात होता; परंतु आयर्लंड द्वेषी ब्रिटिश सरकारने तो दर्जा काढून टाकला आणि त्यांना सामान्य गुन्हेगारांप्रमाणे वागवण्यास सुरुवात केली. हाच पुढील संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;राजकीय कैद्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला. सुरुवातीला त्यांनी तुरुंगातील गणवेश घालण्यास नकार दिला. त्यांना कपडे नाकारले गेल्यावर त्यांनी केवळ अंगावर चादर गुंडाळून राहण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनाला ब्लॅंकेट प्रोटेस्ट असे नाव मिळाले. त्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कैद्यांनी कोठड्या स्वच्छ करण्यासही नकार दिला. मारहाण, अपमान आणि अमानुष वागणूक यांचा निषेध म्हणून त्यांनी स्वतःच्या कोठड्यांच्या भिंतींवर मलमूत्र फासले. या टप्प्याला डर्टी प्रोटेस्ट म्हणून इतिहासात नोंदवले गेले. मानवी प्रतिष्ठा आणि राजकीय ओळख यासाठी सुरू झालेला हा संघर्ष दिवसेंदिवस अधिक टोकदार होत गेला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अखेरीस 1 मार्च 1981 रोजी या संघर्षाने सर्वांत भीषण वळण घेतले. आयरिश रिपब्लिकन नेता बॉबी सँड्स यांनी आमरण उपोषण सुरू केले. मागण्या फारशा अवास्तव नव्हत्या. कैद्यांना तुरुंगाचा गणवेश घालण्यास भाग पाडू नये; त्यांना तुरुंगातील सक्तीच्या कामातून सूट मिळावी; इतर राजकीय कैद्यांशी मुक्त संपर्क ठेवता यावा; शिक्षण आणि विरंगुळ्याच्या सुविधा मिळाव्यात; तसेच शिक्षा कमी करण्याचे पूर्वीचे अधिकार पुन्हा लागू करावेत. या मागण्या फाईव्ह डिमांड्स &amp;nbsp;Demands म्हणून प्रसिद्ध झाल्या.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या उपोषणाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व कैद्यांनी एकाच दिवशी उपोषण सुरू केले नाही. एका मागोमाग एक कैदी उपोषणात सहभागी होत गेला. त्यामुळे प्रत्येक मृत्यूनंतर आंदोलनाची तीव्रता कमी होण्याऐवजी वाढत गेली. प्रत्येक नव्या उपोषणकर्त्याने आधीच्या मृत सहकाऱ्याचा धागा जोडला आणि जगाला पुन्हा एकदा ब्रिटिश सरकारकडे पाहण्यास भाग पाडले. ह्या आंदोलनावर डेव्हिड बेरेसफर्ड यांनी, 'टेन मेन डेड : द स्टोरी ऑफ द १९८१' हे विलक्षण पुस्तक लिहिले. त्यांचे पुस्तक जागतिक पातळीवर नावाजले गेले! मात्र सुरुवातीला कौतुक करणार लोक देखील त्यांच्या विरोधात गेले!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;उपोषण सुरू असतानाच घडलेली एक घटना या पुस्तकाचा भावनिक आणि राजकीय केंद्रबिंदू ठरते. उपोषणाच्या काळात फमानुह आणि साउथ टायरोन या मतदारसंघातून झालेल्या पोटनिवडणुकीत बॉबी सँड्स यांनी उमेदवारी दिली आणि ते ब्रिटिश संसदेवर निवडून गेले. तुरुंगात असलेला उपोषणकर्ता खासदार बनल्याची ही अभूतपूर्व घटना होती. या विजयाने जगभरातील माध्यमांचे लक्ष उत्तर आयर्लंडकडे वेधले. ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव निर्माण झाला. तरीही त्यांनी आपली भूमिका बदलण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांचे प्रसिद्ध विधान होते&amp;mdash;&quot;Crime is crime; it is not political.&quot; त्यांच्या दृष्टीने हे कैदी राजकीय नव्हते, तर गुन्हेगार होते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दिवसागणिक उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत जाते. शरीर क्षीण होत जाते, दृष्टी धूसर होते, बोलण्याची ताकद कमी होते, स्मरणशक्ती ढळू लागते आणि अखेरीस शरीरातील प्रत्येक अवयव मृत्यूकडे झुकू लागतो. पण या शारीरिक विघटनापेक्षाही, अधिक खोलवर नोंद पुस्तक आपण होऊन करते!आणि ती म्हणजे, &amp;nbsp;ती मानसिक दृढतेची. प्रत्येक कैद्याला माहीत असते की हा मार्ग मृत्यूकडेच जात आहे; तरीही ते मागे हटत नाहीत. त्यांचा विश्वास असतो की, व्यक्तीचा मृत्यू हा सामूहिक प्रतिष्ठेपेक्षा मोठा असू शकत नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;5 मे 1981 रोजी उपोषणाच्या ६६व्या दिवशी बॉबी सँड्स यांचा मृत्यू होतो. त्यांच्या अंत्ययात्रेला लाखो लोक उपस्थित राहतात. त्यानंतर फ्रान्सिस ह्यूजेस, रेमंड मॅक्रीश, पॅट्सी ओ'हारा, जो मॅकडॉनेल, मार्टिन हर्सन, केविन लिंच, किरन डोहर्टी, थॉमस मॅकएल्वी आणि अखेरीस मायकेल डिव्हाइन असे एकामागून एक दहा उपोषणकर्ते मृत्युमुखी पडतात. प्रत्येक मृत्यू उत्तर आयर्लंडमध्ये संतापाची नवी लाट निर्माण करतो. निदर्शने, दंगली आणि आंतरराष्ट्रीय निषेध यामुळे हा संघर्ष जागतिक चर्चेचा विषय बनतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पुस्तकाची सर्वांत मोठी ताकद म्हणजे लेखक कोणत्याही बाजूचा प्रचारक बनत नाही. डेव्हिड बेरेसफर्ड यांनी तुरुंगातील कैदी, त्यांचे कुटुंबीय, ब्रिटिश अधिकारी, डॉक्टर, धर्मगुरू आणि राजकीय नेते यांच्याशी केलेल्या संवादांवर आधारित हा वृत्तांत उभा केला आहे. त्यामुळे हे पुस्तक एकाच वेळी मानवी शोकांतिका, राजकीय संघर्ष आणि नैतिक द्वंद्व यांचे दस्तऐवज बनते. लेखक कैद्यांचे गौरवीकरण करत नाही आणि ब्रिटिश सरकारचे एकांगी राक्षसीकरणही करत नाही; तो घटनांना त्यांच्या संपूर्ण गुंतागुंतीसह मांडतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;डेव्हिड बेरेसफर्ड यांनी लिहिलेले &amp;nbsp;'टेन मेन डेड : द स्टोरी ऑफ द 1981' हे केवळ एका उपोषणाचे वृत्तांतात्मक पुस्तक नाही; ते विसाव्या शतकातील सर्वाधिक वेदनादायी आणि राजकीयदृष्ट्या परिणामकारक संघर्षांपैकी एका संघर्षाचे जिवंत दस्तऐवजीकरण आहे. 1981 साली उत्तर आयर्लंडमधील बेलफास्टजवळील 'मेझ' तुरुंगात दहा आयरिश रिपब्लिकन कैद्यांनी केलेल्या आमरण उपोषणाची ही कथा आहे. या उपोषणाने केवळ दहा जणांचे प्राण घेतले नाहीत; तर ब्रिटिश राजकारण, आयरिश राष्ट्रवाद आणि उत्तर आयर्लंडच्या संघर्षाच्या इतिहासाला कायमचे वळण दिले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जनतेने न्याय मागण्यांसाठी केलेली आंदोलने सत्तेत असणाऱ्या लोकांकडुन दडपली जातात हा इतिहास आहे, मात्र ही दडपशाही कशा पद्धतीची असते आणि ती कधी व कुणामार्फत केली जाते ह्यावर खूप काही अवलंबून असते; त्यावर अख्खे जग लक्षात ठेवून असते. वांगचूक यांचे आंदोलन चिरडण्यासाठी पांढरी चादर आडवी धरून कृष्णकृत्य लपवू शकता मात्र सत्य लपवू शकत नाही. आगामी काळात वांगचूक यांच्या आंदोलनस्थळी लाठीमार अथवा बळाचा सक्तीने केलेला वापर पाहायला मिळाला तरी नवल वाटणार नाही. डोळे कान बंद करून बसलेली सत्ता तुलनेने अधिक नीच असते मात्र ती विसरत असते की, जिथे उदय आहे तिथे अस्तही असतो ! आणि हे सूत्र कुणालाही टळले नाही!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नोंदी - बाराव्या शतकात 1169 मध्ये इंग्लंडने आयर्लंडवर आक्रमण करून हळूहळू आपला ताबा मिळवण्यास सुरुवात केली. त्यानंतरच्या काळात ब्रिटिशांनी आयरिश लोकांवर अनेक अत्याचार केले, त्यांच्या जमीनी बळकावल्या आणि दंडात्मक कायदे लादले. 1801 च्या 'अॅक्ट ऑफ युनियन'मुळे आयर्लंड अधिकृतपणे युनायटेड किंगडमचा (United Kingdom of Great Britain and Ireland) भाग बनला.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दीर्घ संघर्षानंतर आणि 1919 ते 1921 दरम्यान झालेल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर, अखेर 1922 मध्ये आयर्लंडला स्वातंत्र्य मिळाले. मात्र,असे असले तरी आयर्लंडच्या उत्तरेकडील सहा प्रांत युनायटेड किंगडमचा भाग राहिले, ज्याला आज 'उत्तर आयर्लंड' म्हणून ओळखले जाते. हा भाग आजही युनायटेड किंगडमचा एक भाग आहे. तिथे आजही स्वातंत्र्याची आस अनुभवता येते!&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/18/54b4c29a910e48c22d3ef622669afe56178439214322193_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Chhatrapati Shivaji Maharaj: शिवरायांच्या एका अफलातून मोहिमेचे अन्वयार्थ!]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/chhatrapati-shivaji-maharaj-the-story-of-chhatrapati-shivaji-maharaj-battles-blog-by-sameer-gaikwad-1431988</link><comments>https://marathi.abplive.com/blog/chhatrapati-shivaji-maharaj-the-story-of-chhatrapati-shivaji-maharaj-battles-blog-by-sameer-gaikwad-1431988#respond</comments><pubDate>Thu, 16 Jul 2026 11:55:20 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/chhatrapati-shivaji-maharaj-the-story-of-chhatrapati-shivaji-maharaj-battles-blog-by-sameer-gaikwad-1431988</guid><description><![CDATA[&lt;p&gt;दिल्लीला झुकवण्याचे आणि शह देण्याचे नानाविध मार्ग अवलंबताना ऋतुचक्र, हवामान, पाऊसपाणी, सैन्यबळ, आर्थिक कुवत, रसद, रोगराईच्या शक्यता, पूरस्थितीचे अंदाज, शत्रूची कमजोरी, अंतर आणि त्यासाठीचा कालावधी, मोहिमेतील प्राण्यांची शारीरिक क्षमता, कूटनीती आणि डावपेच अशा नानाविध गोष्टींवर काम केले जाई. शिवरायांवर आणि स्वराज्यावर जीव ओवाळून टाकण्यास तयार असणारे मावळे ह्या मोहिमा फत्ते करत.&amp;nbsp;अशा मोहिमांपैकीच एका अविस्मरणीय स्वारीची ही नोंद! उठता बसता &amp;nbsp;छत्रपती शिवाजीराजांचे नाव घेणारे आणि त्यांच्या नावाने कारभार करणारे राजकारणी वास्तवात राजांच्या एकाही गोष्टीचे नेटके अनुसरण करत नाहीत, त्यांनी अशा गोष्टी पुन्हा अभ्यासल्या पाहिजेत!असो. ह्या मोहिमेद्वारे केवळ एका खलित्याच्या माहितीच्या आधारे शिवाजी राजांनी मुघल बादशहाचा एक करोड रुपयांचा खजिना कसा हस्तगत केला आणि वर औरंगजेबाला कसे खिजवले हे वाखाणण्याजोगे आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे वैशिष्ट्य केवळ तलवारीच्या धारेत नव्हते; ते त्यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेत, अचूक नियोजनात आणि शत्रूच्या मनाचा वेध घेणाऱ्या रणनीतीत होते. याचे एक अत्यंत रंजक उदाहरण म्हणजे पूर्वीच्या निजामशाहीच्या अंमलात असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील भीमेच्या काठी असलेल्या पेडगाव नजीकच्या बहादूरगड येथील खजिना हस्तगत करण्याच्या मोहीमेकडे पाहिले जाते. इ.स. 1674 मध्ये महाराजांच्या गुप्तहेर खात्याने बहिर्जी नाईक यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कामगिरी बजावली. बहादूरगडचा मुघल सुभेदार खानजहान बहादूरशाह कोकलताश याने बादशहा औरंगजेबाला एक खलिता पाठवून मुघल सल्तनतेसाठी आपण एक कोटी रुपयांचा खजिना किल्ल्यावर जमा करून ठेवला असल्याचे कळवले होते!&lt;/p&gt;
&lt;p&gt;खानजहानने बादशहाला पाठवलेले ते पत्र दिल्लीत पोहोचण्यापूर्वीच बहिर्जी नाईकांच्या चलाखीने महाराजांच्या हाती आले. हा खानजहान कोकलताश, मुघल बादशाह औरंगजेबाचा दूधभाऊ होता त्यामुळे त्याच्यावर बादशहाचा अतूट विश्वास होता. त्यामुळेच इतका मोठा खजिना तो स्वतःजवळ राखून होता. खजिन्याची माहिती मिळताच, राजांनी सरसेनापती वेळ न दवडता हंबीरराव मोहिते यांना पाचारण केले, त्यांनी अत्यंत चतुराईने लुटीची योजना आखली. त्यासाठी नऊ हजार मावळ्यांचे सैन्य मुकरर करण्यात आले. हे सैन्य दोन भागात विभागले गेले. सात हजार मावळे पुण्याकडील पश्चिमेकडून बहादूरगडाकडे रवाना झाले, तर स्वतः हंबीरराव दोन हजार निवडक सैनिकांसह किल्ल्याच्या पूर्वेकडे, सुमारे दोन किलोमीटर अंतरावर, गुप्तपणे दबा धरून बसले.&lt;/p&gt;
&lt;p&gt;पश्चिमेकडून आलेल्या सात हजार मराठ्यांनी किल्ल्याबाहेर येऊन मोगलांना उघडपणे युद्धाचे आव्हान दिले. समोर फक्त सात हजार मराठ्यांचे सैन्य होते आणि आपल्या बाजूला तब्बल पस्तीस हजारांची फौज असल्याने मुघल चकित झाले. शिवराय विनाकारण आपल्या सैनिकांना मृत्यूच्या दाढेत ढकलणार नाहीत, हे त्यांनाही ठाऊक होते. त्यामुळे या धाडसामागे काहीतरी गूढ आहे, अशी शंका त्यांच्या मनात आली. तरीही आपल्या प्रचंड सैन्याच्या बळावर मराठ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या उद्देशाने कोकलताश संपूर्ण फौज घेऊन किल्ल्याबाहेर पडला. दोन्ही सैन्ये समोरासमोर आली आणि ठरल्याप्रमाणे नेमक्या त्याच क्षणी मराठ्यांनी अचानक माघार घेतली. मुघल सैन्याने त्यांचा पाठलाग सुरू केला. काही अंतर गेल्यावर मराठे घाबरून पळाले, असा समज करून मुघलांनी पाठलाग थांबवला आणि पुन्हा किल्ल्याकडे वळले. पण परत येताना त्यांना पुन्हा तेच सात हजार मराठे समोर घाटवळणातून पुढे येताना दिसले!&lt;/p&gt;
&lt;p&gt;मुघलांनी पुन्हा युद्धाची तयारी केली आणि ठरल्याप्रमाणे पुन्हा मराठ्यांनी वळसा घेत माघार घेतली. मुघलांनी पुन्हा पाठलाग केला, पुन्हा थांबले, पुन्हा परतले. हा प्रकार एकदा-दोनदा नव्हे, तर तिसऱ्यांदा, चौथ्यांदा आणि पाचव्यांदाही घडला. मग मात्र मुघल संतापले. मराठ्यांना कोणत्याही परिस्थितीत पकडून ठार मारायचे, असा त्यांनी निर्धार केला. त्यांनी विवेक बाजूला ठेवला आणि क्रोधाच्या भरात मराठ्यांच्या मागे पिसाळल्यागत धावू लागले. हा पाठलाग इतका लांबला की, मुघल सैन्य बहादूरगडापासून जवळपास शंभर किलोमीटर दूर, सिंहगड परिसरापर्यंत येऊन पोहोचले. तेथे मराठे दाट जंगलात अदृश्य झाले. इकडे जंगलात दबा धरून बसलेल्या हंबीररावांना कोणत्या प्रहरापर्यंत काय केले जाणार आहे याचा पुरेपूर अंदाज होता. पाचवेळा मराठा सैन्याने कोकलताशच्या सैन्याला आपल्या सापळ्यात अडकवून आपल्यामागे फरफटत नेऊन ते स्वतः पसार झाले तेव्हा मुघल सैन्यास परत यायला किती प्रहर लागतील याचाही अदमास त्यांनी घेतला होता.&lt;/p&gt;
&lt;p&gt;ह्याच प्रहराची हंबीरराव मोहिते वाट पाहत होते. बहादूरगड किल्ला जवळजवळ संरक्षणविहीन झाला होता. हंबीरराव आपल्या दोन हजार सैनिकांसह बहादूरगडात शिरले. एक कोटी रुपयांचा खजिना ताब्यात घेतला, इतकेच नव्हे तर गडावर असणारी युद्धसामग्री, घोडे, अन्नधान्याची रसद सर्व काही लुटून हंबीरराव एका प्रहरात पूर्वेकडील मार्गाने निघून गेले. कोणताही विशेष प्रतिकार झाला नाही. त्यांनी तो खजिना संपूर्ण लुटीसह सुरक्षितपणे रायगडावर रवाना केला. पण शिवाजी महाराजांची खेळी इथेच संपली नाही. खजिना लुटल्याची बातमी समजताच कोकलताश संतापेल आणि तातडीने कारवाई करेल, याची महाराजांना कल्पना होती. त्यांनी आपला वकील कोकलताशकडे पाठविला. त्या वकिलाने अत्यंत नम्रपणे महाराजांच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. त्याने असेही सांगितले की, महाराज खजिना परत करण्यास तयार आहेत; मात्र त्यासाठी एक अट आहे. औरंगजेबाने लेखी फर्मान देऊन शिवाजी महाराजांना या प्रकरणात माफी दिली पाहिजे. त्या काळी दिल्लीहून लेखी आदेश येण्यासाठी महिनाभराहून अधिक काळ लागत असे. कोकलताशने तो प्रस्ताव मान्य केला. औरंगजेबाकडे दूत रवाना झाला. दरम्यान दिवस सरत गेले आणि पावसाळा जवळ आला. राजांना ऋतूबदलाचा हा अंदाज होताच, म्हणूनच त्यांनी अतिशय विश्वासाने कोकलताशसमोर तो प्रस्ताव ठेवला होता.&lt;/p&gt;
&lt;p&gt;पावसाळा म्हणजे सह्याद्रीचा अभेद्य कवच. त्या ऋतूत डोंगरी किल्ल्यांवरील मराठ्यांना पराभूत करणे जवळजवळ अशक्य ठरत असे. घनदाट जंगले, रोरावणारे वारे आणि बेफाम कोसळणारा पाऊस, जंगलातल्या श्वापदांची वेगळीच भीती अशा सगळ्या भवतालात सह्याद्रीवर हल्ला चढवणारा कुणी वेडाच असू शकतो! त्यामुळे बादशहाचे फर्मान घेऊन येणारा कोकलताश परत येईल तेव्हा पावसाळा भरात आलेला असेल हे राजांना ठाऊक होते! राजांच्या अंदाजाप्रमाणे महिन्याभरानंतर कोकलताश औरंगजेबाचे फर्मान घेऊन परतला. मात्र तोवर परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. महाराजांनी त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. खजिना परत देण्यात असमर्थता दर्शवली. कोकलताशलाही हे उमगले की आता पावसाळा ऐन भरात आहे; रायगडावर चढाई करून काही साध्य होणार नाही. शिवाजी राजा काबीज केलेली कोणती चीजवस्तू परत देत नसतात हे एव्हाना त्याला उमगले होते. खेर त्याला निराश होऊन माघारी फिरावे लागले. अशा असंख्य डावपेचांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ रणांगणावरच नव्हे, तर आर्थिक आघाडीवरही मोगल साम्राज्याला मोठे धक्के दिले. त्यांच्या युद्धनीतीत तलवारीइतकीच बुद्धीही धारदार होती. शत्रूला पराभूत करण्यासाठी केवळ सामर्थ्य नव्हे, तर संयम, नियोजन, मानसशास्त्र आणि योग्य वेळी खेळलेली चाल किती प्रभावी ठरू शकते, याचे हे एक विलक्षण उदाहरण आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;आताचे राज्यकर्ते नाव शिवाजी राजांचे घेतात आणि दिल्लीपुढे लोटांगण घालत राज्यात गोबरपट्ट्याला डोक्यावर घेताना दिसतात! मागील काही काळात मराठी माणूस चेपला जाताना किंवा त्याचेच दमण होतानाच्या ज्या बातम्या समोर आल्या आहेत ते पाहू जाता राज्यकर्त्यांना शिवाजी राजांचे नाव घेण्याचा अधिकार तरी आहे का असा प्रश्न पडला पाहिजे! असो! भारतातले राजकारणी कोणत्याही थराला जाऊन राजकारण करू शकतात हे आता आपल्या सर्वांच्या अंगवळणी पडले आहे. तरीही अधून मधून शिवाजी राजांच्या अतुलनीय साहसाचे, दूरदृष्टीचे, धोरणांचे, स्वराज्यप्रेमाचे आणि निष्ठेचे दाखले देत राहिले पाहिजे, न जाणो यांच्या डोक्यात कधीतरी प्रकाश पडेल! पेडगावला राहून दख्खनवर अंमल करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या कोकलताशला शिवाजी राजांनी अक्षरशः मुर्खात काढले होते आणि वर बादशाहालाही खिजवले होते! ह्या घटनेपासूनच 'पेडगावचे शहाणे' हा वाक्यप्रचार रूढ झाला! अलीकडील काळात शिवाजी राजांचे राज्य नाहीये, मात्र त्यांचे नाव घेऊन राज्य करणारे पेडगावचे शहाणेच जणू राज्यकारभार करत आहेत असं वाटण्याजोगी स्थिती आहे! बहादूरगड लुटीची घटना घडली त्याला कालच्या तारखेस 452 वर्षे उलटली, त्या औचित्यावर नवे अन्वयार्थ शोधण्याचा हा प्रयत्न.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;खानजहान कोकलताश विषयीच्या काही नोंदी -&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;कोकलताश हे खानजहानचे नाव नव्हते. ती एक पर्शियन उपाधी होती जी औरंगजेबाने त्याला दिली होती कारण तो त्याचा दूधभाऊ होता!&lt;/p&gt;
&lt;p&gt;6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि दीड महिन्यात स्वराज्याच्या खजिन्यात प्रचंड मोठी वाढ झाली. या घटनेने मराठयांना जो हुरूप आला, त्यातच बुऱ्हाणपूरच्या लुटीची बीजे रोवली गेली.&lt;/p&gt;
&lt;p&gt;1674 मध्ये बहादूरगडची लूट केल्यानंतर खानजहानने स्वतःला दोष देण्यास सुरुवात केली. त्याने दख्खनऐवजी मध्य प्रांताची सुभेदारी घेतली. तो बुऱ्हाणपूरचा सुभेदार झाला. मात्र, ह्याला कसे बनवायचे हे मराठ्यांना चांगलेच ठाऊक झाले होते. शिवाजी राजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षण केले. मधल्या काळात खालावत गेलेल्या खजिन्यात भर घालण्यासाठी संभाजी राजांनी पुन्हा एकदा खानजहानचीच निवड केली.&lt;/p&gt;
&lt;p&gt;1681 साली फेब्रुवारीमध्ये खानजहान कोकलताश एक महिन्याच्या कालावधीसाठी कुतुबशहाच्या एका शाही विवाहात सहभागी होण्याकरिता औरंगाबादला रवाना झाला होता. शिवाजी राजांचे निधन झाले म्हणजे आता आपल्याला दख्खनमध्ये कोणताही धोका नाही, ह्या फाजील आत्मविश्वासाने त्याने बुऱ्हाणपूरच्या रक्षणाची आणि किल्ल्यातली सारी रसद, खजिन्याची जबाबदारी काकर खानावर सोपवून त्याने मोठी माती खाल्ली.&lt;/p&gt;
&lt;p&gt;खानजहान दौऱ्यावर गेल्याचे कळताच संभाजी राजांनी आणि हंबीररावांनी पुन्हा एकदा लुटीचा डाव टाकला. तब्बल तीन दिवस त्यांनी बुऱ्हाणपूर शहर, बाजारपेठ लुटली! शिवाजी राजांनीं एक कोटींचा खजिना लुटला होता तर संभाजी राजांनी त्याहून दुप्पट दोन कोटींचा खजिना लुटला!&lt;/p&gt;
&lt;p&gt;खानजहान हा मूर्ख असला तरी पराक्रमी होता. त्याने साल्हेरच्या युद्धासह अनेक महत्वाच्या लढाया मराठ्यांच्या विरोधात लढल्या होत्या. त्यामुळे तो चवताळला तर आपण गोत्यात येऊ हे संभाजी राजांना ज्ञात होते म्हणून त्यांनी बुऱ्हाणपूरवर हल्ला चढवला तेव्हाच्या काळात सर्वत्र हूल उठवली की, मराठ्यांनी पुन्हा एकदा सुरतेवर हल्ला केला आहे! खानजहानसह सर्व सुभेदारांनी, मुघल सरदारांनी आपली सगळी कुमक सुरतेला पाठवली. पूर्णतः संरक्षणविहीन असलेली बुऱ्हाणपूरची बाजारपेठ संभाजीराजांच्या हाती लागली!&lt;/p&gt;
&lt;p&gt;खानजहानला खरी खबर पोहोचली तेव्हा संतापाने त्याचा तीळपापड झाला. मात्र तो पुढे खूप काळ हिंदुस्थानी मुलुखात राहू शकला नाही. आपल्या बादशाहाला आपण तोंड दाखवू शकत नाही हे एव्हाना त्याला कळून चुकले. त्याने दूर मुलुखात आपली रदबदली करून घेतली. संतापाने लाल झालेल्या औरंगजेबाने खानजहानला धडा शिकवण्यासाठी बुऱ्हाणपूर पासून हजार किमी दूर असलेल्या लाहोरचे सुभेदार केले.&lt;/p&gt;
&lt;p&gt;आपल्या दूधभावाला मुर्खात काढून इतका मोठा खजिना शिवाजी राजांनी लुटला ही गोष्ट औरंगजेब विसरला नाही. संभाजी राजे आणि कवी कलश यांना पकडण्यात आले तेव्हा याच बहादूरगडच्या किल्ल्यावर त्यांचा छळ करण्यात आला.&lt;/p&gt;
&lt;p&gt;1690 मध्ये खानजहान सुभेदार म्हणून लाहोरला रुजू झाला. दरम्यान बादशहाला कळून चुकले की, हा माणूस कामाचा नाही! कारण लाहोरमधल्या त्याच्या तीन वर्षांच्या कारकिर्दित लाहोरच्या बाजारपेठेस उतरती कळा लागली, नीळ व्यापार उद्ध्वस्त झाला, शेतीचे कंबरडे मोडले! अखेर 1694 मध्ये औरंगजेबाने त्याला पदच्युत केले, त्याला कोणतीही नवी जबाबदारी दिली नाही!&lt;/p&gt;
&lt;p&gt;सततच्या पडत्या काळाने खानजहान खचून गेला आणि 1697 मध्ये तो मरण पावला. लाहोरमध्ये त्याचा मकबरा अजूनही अस्तित्वात आहे! शिवाजी राजांनी राज्याभिषेकानंतर दीड महिन्यात लूट केली होती आणि संभाजी राजांनी पंधरवड्यात लूट केली होती आणि दोघांचेही सावज खानजहानच राहिला! कमजोर मूर्ख माणूस हेरून त्याला अरबी अश्व लावण्याचे तत्कालीन मराठ्यांचे कसब अफाट होते!&lt;/p&gt;
&lt;p&gt;अलीकडील मराठे दिल्ल्लीश्वराला, ईडी सीबीआयला भिऊन आपण नावालाच राज्यकर्ते आहोत हे सिद्ध करतात! शिवाजी राजांची धोरणे तंतोतंत अंमलात आणली गेली तर आजही महाराष्ट्रच दिल्लीचे तख्त राखू शकतो हे कुणीही नाकारू शकत नाही! परंतु.. असो!&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/16/382d760fdf8bdd5af84d148fff02a9041784182977551987_original.jpeg" width="220"/></item></channel></rss>