<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>नकाराला स्वीकारणं....एक आव्हान</title><atom:link href="https://marathi.abplive.com/blog/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Fri, 5 Jun 2026 05:39:01 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[BLOG : आपल्या सर्वात जिवंत असलेला सदाकांत मिश्रा!]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/sameer-gaikwad-blog-tukaram-mundhe-fda-commissioner-raid-food-adulteration-maharashtra-jolly-llb-marathi-1426685</link><comments>https://marathi.abplive.com/blog/sameer-gaikwad-blog-tukaram-mundhe-fda-commissioner-raid-food-adulteration-maharashtra-jolly-llb-marathi-1426685#respond</comments><pubDate>Wed, 3 Jun 2026 22:26:51 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ मुंबई ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/sameer-gaikwad-blog-tukaram-mundhe-fda-commissioner-raid-food-adulteration-maharashtra-jolly-llb-marathi-1426685</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;'जॉली एलएलबी'च्या क्लायमॅक्स सीनमध्ये वकील असणारा जगदीश उर्फ जॉली त्यागी एक विलक्षण प्रश्न करतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हिट अँड रन केसमध्ये आरोपीला वाचवण्यासाठी केस कमजोर करणाऱ्या तपास अधिकाऱ्याला विचारतो की, तुम्ही आपल्या काळजावर हात ठेवून सांगू शकता का, 'की तुम्ही ह्या केसचे काम अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे केले आहे का?'&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तपास अधिकारी सबइन्स्पेक्टर राठी म्हणतात की, 'मी अगदी प्रामाणिकपणे काम केले आहे.'&lt;br /&gt;&amp;nbsp;&lt;br /&gt;राठीच्या उत्तरानंतर ऍडव्होकेट त्यागी आपल्या हातातला कागदाचा तुकडा त्यांच्या हाती देऊन ह्या कागदाच्या चिठोऱ्यावरील यादीत ज्या लोकांची नावे दिली आहेत ती वाचा. ह्या अपघातात मरण पावलेल्या लोकांची नावे आहेत.&lt;br /&gt;&amp;nbsp;&lt;br /&gt;न्यायमूर्ती देखील सांगतात की, जरा नावं वाचून तरी पाहा.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;राठी हातातल्या कागदावर लिहिलेली नावे वाचून दाखवू लागतात.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एकेक करुन ते नावं वाचून दाखवू लागतात. एका नावापाशी ऍडव्होकेट त्यागी त्यांना थांबवून म्हणतात की, जेव्हापासून मी ही केस घेतली आहे तेव्हापासून ह्यात मरण पावलेली माणसं माझ्या स्वप्नात येतात आणि सांगतात की तुम्ही तुमचं काम इमानदारीने केलेले नाही.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ह्यावर इन्स्पेक्टर राठी कुत्सितपणे हसून उद्गारतो की, 'मग ह्यातल्या एखाद्या मुडद्याला तुम्ही इथे साक्षीला का बोलवत नाही?'&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्यागी म्हणतात की, 'मी तेच करणार आहे. ह्या अपघातात जिवंत असलेल्या मात्र तुम्ही कागदोपत्री मृत दाखवलेल्या माणसाला मी बोलवलं आहे!'&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;लपून छपून कसेबसे कोर्टापर्यंत आलेला अपघातात पाय गमावून बसलेला सदाकांत मिश्रा हातातल्या बैसाखीच्या सहाय्याने लंगडत लंगडतच कोर्टातल्या विटनेस बॉक्समध्ये येतो आणि पुढे काय होते हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हे सर्व इथे लिहायचे कारण म्हणजे, अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नुकतेच नियुक्त झालेल्या तुकाराम मुंढे यांनी मागील काही दिवसांत जी धडक कारवाई हाती घेतली आहे, ज्या धाडी घातल्या जात आहेत ते सर्व थक्क करणारे आणि आपल्या हतबलतेविषयी तिडीक आणणारे आहे!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दूध, लस्सी, खवा, मिठाई, फळे, भाजीपाला, डाळी, धान्ये काहीही भेसळीशिवाय आपल्या पर्यंत पोहोचत नव्हते आणि आजही पोहोचत नाही हे स्पष्ट झालेय.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बनावट औषधे, बनावट दूध, बनावट, खाद्य पदार्थ हे सारं आपण बिनदिक्कत वापरत होतो, डोळे झाकून खात होतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हे सर्व जिवघेणं आणि आपल्या विश्वासाला तडा देणारं आहे हे काही विशिष्ठ लोकांना माहिती होतं. तरीही ते हे करत होते आणि जे ह्यात सक्रिय सहभागी नव्हते ते ह्यांना संरक्षण देत होते;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हे सर्व घडतेय हे सरकारमधील बाशिंद्यांनाही ठाऊक होतं, ह्या सर्वांना मलिदा मिळत होता. आपण मात्र विष खात होतो, जहर पित होतो. अद्यापही आपण विष खातो आहोत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपण ज्यांना निवडून दिलं त्यांनाही हे ठाऊक होतं, जे सरकारी सेवेत राहून कर्तव्यात कसूर करून पैशाच्या हव्यासापायी डोळे मिटून होते. जे ह्या धंद्यात रुतले होते ते आपल्या घासात जहर कालवत होते!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;किती मोठी घोर फसवणूक हे लोक करत होते आणि आपण ह्यांच्यावर भरवासा ठेवून होतो! आपण किती हतबल झालो आहोत हे आता कळतेय!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मधल्या काळात अन्न भेसळीने अनेकांच्या शरीरात व्याधी निर्माण झाल्या, काहींना कॅन्सरसारखे आजार झाले. काहींचे अवयव बाद झाले, काहींची दृष्टी गेली तर काहींच्या शरीरावरचे नियंत्रण गेले, अनेकांना मधुमेह रक्तदाबाने ग्रासले!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आणि ह्यावर जी औषधे घेतली जात होती त्यातदेखील सरमिसळ होत होती हे आता समोर येतेय! ह्या सर्व हाराकिरीपायी जी माणसं जीव गमावून बसली, जी अधू झाली, जी खचून गेली ती सर्व माणसं आता आपल्या[पैकी अनेकांच्या समोर तरळत असतील!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;काय दोष होता ह्या लोकांचा?&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ही सर्व दिवंगत माणसं आणि आता हयात असणारी हतबल माणसं एकच प्रश्न विचारत आहेत आणि तो म्हणजे सरकारमधील मंत्र्यांसह, सचिवासह, संबंधित खात्यातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह ह्या सर्व लोकांनी आपलं काम नीट प्रामाणिकपणे केलेलं नाही. त्यांनी असं का केलं?&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्यांनी आपल्याला फसवलं आहे. जे काम मुंढे करत आहेत ते काम आधी का केलं गेलं नाही? का गप्प होते हे लोक? आता ह्याची फिर्याद कुणाकडे करायची? आपलं जे अंतर्बाह्य नुकसान झाले आहे त्याची भरपाई कशी होणार?&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपण सारेच, सदाकांत मिश्रा आहोत, मात्र जॉली एलएलबी मधला सदाकांत आणि आपण ह्यात एक फरक आहे!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;'जॉली'मधला सदाकांत कागदोपत्री मरण पावलेला होता. आपण मात्र कागदोपत्री जिवंत आहोत मात्र प्रत्यक्षात आपण सारी कलेवरे आहोत, ज्यांना आवाज नाही, ज्यांचा आक्रोश मौनाच्या कुपीत कैद आहे!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बस्स! मला आणखी काहीच सांगायचं नाही...&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/06/03/7f9a09edd5daeec88018fef6b7b23d6c178050576636293_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Suman Kalyanpur: 'सुमन सुगंधा'चे दुःखद वास्तव! ‘ऐ मेरे वतन के लोगो’ आधी सुमनताईंनी रिहर्सल केलेलं; पण शेवटच्या क्षणी घडलं असं काही की…]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/suman-kalyanpurs-painful-reality-rehearsed-ae-mere-watan-ke-logon-first-but-everything-changed-at-the-last-moment-1426414</link><comments>https://marathi.abplive.com/blog/suman-kalyanpurs-painful-reality-rehearsed-ae-mere-watan-ke-logon-first-but-everything-changed-at-the-last-moment-1426414#respond</comments><pubDate>Mon, 1 Jun 2026 19:16:33 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ करमणूक ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/suman-kalyanpurs-painful-reality-rehearsed-ae-mere-watan-ke-logon-first-but-everything-changed-at-the-last-moment-1426414</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Suman Kalyanpurkar: &lt;/strong&gt;'सुमन सुगंध' हे सुमन कल्याणपूर यांचे मंगला खाडिलकर ह्यांनी लिहिलेलं चरित्र. ते वाचताना जाणवते की, त्यांच्या जीवनाचा प्रवास अत्यंत खडतर होता. आयुष्यभर सल लागून राहिल, अशी एक घटना त्यांच्या बाबतीत घडली होती आणि त्या घटनेच्या परिघात लता मंगेशकर, सी. रामचंद्र आणि पंडित नेहरू यांच्यासारखी उत्तुंग माणसं होती.&amp;nbsp; 1963 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत 'ऐ मेरे वतन के लोगों' हे अजरामर देशभक्तीपर गीत सादर केले जाणार होते. संगीतकार सी. रामचंद्र यांनी सुरुवातीला हे गाणे गाण्यासाठी सुमन कल्याणपूर यांची निवड केली होती व त्यांच्यासोबत या गाण्याचे तास न् तास सराव देखील पूर्ण झाले होते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मात्र हे गाणे लता मंगेशकर गाणार असल्याचे त्यांना अचानक सांगण्यात आले. शेवटच्या क्षणी इतकी मोठी ऐतिहासिक संधी हातातून निसटल्यामुळे सुमनजींना प्रचंड मानसिक त्रास झाला. ह्या घटनेची सल आणि संधी हिरावली गेल्याचे दुःख त्यांच्या मनात आयुष्यभर कायम राहिले. त्यांच्या जागी अन्य कुणी व्यक्ती असती तर तिने लता मंगेशकरांना याचा दोष सहज दिला असता!&lt;/p&gt;
&lt;p&gt;मात्र चित्र वेगळेच होते. 'ऐ मेरे वतन के लोगो' या ऐतिहासिक गीताची निर्मिती, सुमनताई कल्याणपूर यांच्या कडून करवून घेण्यात आलेली संपूर्ण तयारी आणि ऐनवेळी त्यांना संगीतकारांनी दिलेला नकार, त्यावेळी त्यांच्या मनाची झालेली घालमेल, उद्विग्नता, नाराजी, त्याही परिस्थितीत लतादीदींचा कोणताही दोष नव्हता ह्या साऱ्या घटना आणि त्या बाबतीत त्यांचं म्हणणं, हे सर्व त्यांनी 'सुमन सुगंध'मध्ये अधोरेखित केलेय. रामचंद्र चितळकर ह्यांच्यामुळे हे कसे घडले ह्यावरही त्यात प्रकाश टाकलाय. &amp;nbsp; &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h3&gt;दीदींच्या तुलनेत खूप कमी गाणी मात्र...&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;भारताच्या स्वातंत्र्यापासून ह्या गीतासंबंधीचा आणि लता मंगेशकर यांच्या बद्दलचा गैरसमज त्यांनी स्वतः होऊन दूर केला. सुमनताई व लतादीदी या दोन महान गायिकांमधील नसलेला परंतु दाखविण्यात येत असलेला संघर्ष यासंदर्भातील मळभ सुमनताईंनी स्वतःच दूर केलं; हा सुमन कल्याणपूर यांच्या मनाचा मनाचा मोठेपणाच म्हटला पाहिजे.&amp;nbsp; सुमन कल्याणपूर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात जे साम्य होते, त्याने त्यांना कामही दिले आणि दगाही दिला! सुमनताई ह्याकडे योगायोग म्हणून पाहत नाहीत. संधीचा अभाव राहिला हे त्या मान्य करतात. लता दीदींच्या तुलनेत त्यांना खूप कमी गाणी मिळाली आणि प्रसिद्धीही अगदी माफक मिळाली. अमुक एक गाजलेले गाणे त्यांचे आहे हेच मुळी श्रोत्यांना ठाऊक नसे. त्यांची सर्व गाणी लता दीदींची वाटत!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;लता दीदींची गाणी सुमन कल्याणपूर यांनी गायली आहेत असं लोक कधी म्हणत नव्हते मात्र सुमन ताईंनी गायलेली गाणी मात्र लोकांना लता बाईंची वाटत! स्वतः सुमनताई याकडे तटस्थपणे आणि सकारात्मकतेने पाहतात. मात्र अनेकांना वाटते की, ह्या दोघीत रंजिश होती; मात्र सुमनताईंनी अशा दृष्टीकोनातून कधीही पाहिले नाही. आपल्यातल्या साम्यामुळेच आपल्याला काम मिळाले हे सांगताना त्यांनी काहीही लपवले नाही. हाच दाखला मोहम्मद रफी यांच्या सुनेने दिला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;लता रफी यांच्या मतभेदानंतर मिळाली ती संधी&amp;nbsp;&lt;/h3&gt;
&lt;p&gt;यास्मिन खालिद रफी, ह्या मोहम्मद रफी यांच्या सूनबाई! आपल्या सासऱ्यांचे चरित्र त्यांनी लिहिले आहे; 'मोहम्मद रफी - माय अब्बा, ए मेमॉयर' ह्या चरित्रात रफी, लता आणि सुमन कल्याणपूर ह्यांच्या एका योगायोगाबद्दल लिहिलं आहे. 1960 &amp;nbsp;च्या दशकाच्या सुरुवातीला एक असा टप्पा आला, जेव्हा लता मंगेशकर यांचे मोहम्मद रफी यांच्याशी मतभेद झाले आणि त्यांनी त्यांच्यासोबत युगलगीत गायचे थांबवले. त्यांनी जवळपास चार वर्षे एकत्र काम केले नाही, युगल गीत गायली नाहीत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;ह्या काळात लता दीदींनी महेंद्र कपूर यांच्यासोबत आणि तर मोहम्मद रफी ह्यांनी सुमन कल्याणपूर यांच्यासोबत गाणी गायली,&quot; असे यास्मिन लिहितात. लताबाई &amp;nbsp; आणि रफी ह्यांनी एकत्रित गायलेल्या गाण्यांवरील रॉयल्टीच्या मुद्द्यावरून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. लता दीदींचे म्हणणे होते की, गाण्याच्या रॉयल्टीमध्येही त्यांना काही हिस्सा मिळाला पाहिजे! त्यांनी हा मुद्दा निर्मात्यांसमोर मांडला; रफींनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा अशी त्यांची अपेक्षा होती.&lt;/p&gt;
&lt;p&gt;ट्रँकबार प्रेसने प्रकाशित केलेल्या ह्या पुस्तकानुसार, लता दीदींच्या अपेक्षेच्या विपरित अशी भूमिका रफींनी घेतली. त्यांचे मत होते की, 'जेव्हा निर्मात्याने गाण्यासाठीचे मानधन गायकाला दिलेले असते तेव्हा गाण्याच्या पुढच्या कमाईत त्याचा वाटा मागण्याचा प्रश्न येत नाही.' रफींनी आपल्या भूमिकेला समर्थन दिले नाही ह्याचे लता दीदींना वाईट वाटले. आपलेच म्हणणे बरोबर आहे ह्यावर त्या ठाम होत्या, त्यांनी रफींसोबत ड्युएट्स गायला नकार दिला.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;ज्यांना रफी लता यांचे ड्युएट सॉन्ग हवे होते त्यांना लताबाईंचा पर्याय मिळाला. कोमल, मुलायम आवाजाच्या नि लता दीदींसारख्याच गोड गळ्याच्या सुमन कल्याणपूर अशांची पहिली पसंती राहिल्या. ह्या चार वर्षात त्यांना बऱ्यापैकी काम मिळालं. त्यांची गाणीही लोकप्रिय झाली मात्र ती गाणी त्यांची आहेत हे खूप कमी रसिकांना ज्ञात होतं. लता दीदींच्या जागी सुमन कल्याणपुऱ् फिट बसल्या मात्र रफींच्या जागी महेंद्र कपूर हा पर्याय काही यशस्वी ठरला नाही, कारण ह्या दोन दिग्गज गायकांच्या आवाजाचे पोत भिन्न होते!&lt;/p&gt;
&lt;h3&gt;पुन्हा संधी घटत गेली..&lt;/h3&gt;
&lt;p&gt;रफी लता यांचा वाद म्युझिक इंडस्ट्रीला घातक आहे हे एव्हाना अनेकांच्या लक्षात आले होते. दिवंगत संगीत दिग्दर्शक जयकिशन यांनी अखेरीस दोघांमध्ये समेट घडवून आणला. या प्रकरणानंतर रफी आणि लता यांनी एकत्र रेकॉर्ड केलेले पहिले युगलगीत 'पलकों की छाँव में' या चित्रपटासाठी होते. हे दोघे पुन्हा एकत्र गाऊ लागले आणि सुमन कल्याणपूर यांना मिळणारी गाणी पुन्हा घटत गेली! आपला आवाज सर्वोत्कृष्ट गायिकेसारखा सेम टू सेम असणं ही बाब त्यांच्या मुळावर आली आणि त्यातच त्यांचे नुकसान झाले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;लता बाईंच्या आधी किंवा नंतर त्यांच्या आवाजाचा कालखंड असता तर चित्र खूप खूप वेगळे दिसले असते. जग हायपोथिकल गोष्टीवर चालत नसते असं म्हणत आपण ह्यापासून सुटका करुन घेऊ शकतो मात्र वास्तव हेच होते हे नाकारू शकत नाही. यमन रागावर विलक्षण पकड असलेल्या सुमनताईंचे नाव गंमतीने यमन कल्याणपूर असेही घेतले जाई. त्यांची हिंदीतली तसेच मराठीतली अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत, मात्र त्यांना संधी कमी मिळाली आणि प्रसिद्धी कमी मिळाली, हे शल्य त्या लोकप्रियतेला जोडूनच समोर येते ही बाबही कारुण्यपूर्ण आहे!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h3&gt;दीदींच्या आवाजाशी साम्यच ठरले दुर्भाग्य?&lt;/h3&gt;
&lt;p&gt;काही वर्षांपूर्वी दारिद्र्य अवस्थेतील राणू मंडल ह्यांना सिग्नलजवळ गाताना एकाने शूट केले आणि त्या सोशल मीडिया अटेन्शन झाल्या. देशभरात त्यांच्या नावाची चर्चा झाली. त्यावेळी लता दीदी हयात होत्या. त्यांनी राणू मंडल यांच्या गायकीबद्दल प्रतिक्रिया दिली होती - 'माझं नाव आणि माझ्या कामामुळं कुणाचं भलं होत असेल तर मी स्वतःला भाग्यवान समजते. पण मला वाटतं की कुणाचं अनुकरण करून मिळालेलं यश फार काळ टिकत नाही. किशोरदा, मोहम्मद रफी, आशा भोसले आणि मुकेश यांची गाणी गाऊन सध्याचे गायक लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. पण ते कायम राहत नाही' ह्या विधानानंतर अनेकांनी लता बाईंवर टीका केली होती मात्र आज राणू मंडल यांची अवस्था पाहून ते भाष्य परखड असले तरी वास्तववादी होते हे लक्षात येते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;हेच विधान आपण काळाच्या कसोटीवर अन्यायकारक अशा दृष्टीकोनातून सुमन कल्याणपूर ह्यांच्या बाबतीत लावून अभ्यासले तर लक्षात येईल की, सुमनताई कॉपी नव्हत्या! तो त्यांचा नैसर्गिक स्वर होता. ती त्यांची स्वतःची शैली होती मात्र त्या स्वरात नि शैलीत साम्य होते, मात्र ते इतके अत्युच्च दर्जाचे होते की त्यांना कधी कुणी हिणवले नाही की कमी लेखले नाही! हे साम्य, हेच त्यांचे दुर्भाग्य ठरले अन्यथा त्यांचे नावही यशाच्या शिखरावर असले असते. त्यांच्याविषयी बोलताना लिहिताना अनेकजण त्यांच्यात आणि लताबाईंच्यात रायव्हलरी असल्यासारखं भासवतात मात्र खुद्द सुमनताईंनी मात्र असं कधीही कुठेही म्हटलेले नाही, त्यांच्या चरित्रात देखील तसा उल्लेख नाही.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h3&gt;सुमन कल्याणपूर यांची गायकी&lt;/h3&gt;
&lt;p&gt;सुमन कल्याणपूर ह्यांची गायकी श्रेष्ठ आणि दर्जेदार होती. त्यांच्या गाण्यातली विविधता आणि रागदारीचे बारकावे ह्याची साक्ष देतात. मराठी संगीतप्रेमी रसिकांचे त्यांच्यावर अंमळ जास्तीचे प्रेम होते कारण ज्या काळात रेडिओचे वर्चस्व होते, ज्या काळात भावगीतांचा वरचष्मा होता त्या काळात सुमन कल्याणपूर ह्यांनी मराठी संगीतसृष्टीच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर राज्य केलं!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;सुमन कल्याणपूर आणि लता मंगेशकर यांच्यातले साम्य किती भयंकर होते, ह्याचा एक दाखला देऊन थांबतो. 1964 मधल्या 'फरियाद' सिनेमात &amp;nbsp;'हाल-ए-दिल उनको सुनाना था सुना ना गया, सुनाया ना गया' हे केदार शर्मा ह्यांचे नितांत सुंदर गाणं आहे. सुमनताईंनी ते गायलं आहे. 1964 मधल्याच 'जहां आरा' चित्रपटातलं 'हाल-ए-दिल यूं उन्हे सुना गया' हे लता बाईंनी गायलेलं गाणं तुम्ही ऐका! मग तुम्ही आश्चर्यचकित होऊन स्तब्ध व्हाल आणि मला खात्री आहे की तुम्हीही म्हणाल की, 'होय, सुमन कल्याणपूर ह्यांच्यावर अन्याय झालाय!' एका गुणी गायिकेची कदर होऊ शकली नाही हे वास्तव आहे!&lt;/p&gt;
&lt;p&gt;अलविदा सुमनजी..&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/06/01/b4e82782ab32e2fd53cf1a081a9f535717803215823241063_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[आसाम ते केरळम - नव्या सरकारचा पहिला पंधरवडा]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/assam-to-keralam-new-state-governments-first-15-days-blog-by-somesh-kolage-marathi-news-1426400</link><comments>https://marathi.abplive.com/blog/assam-to-keralam-new-state-governments-first-15-days-blog-by-somesh-kolage-marathi-news-1426400#respond</comments><pubDate>Mon, 1 Jun 2026 17:22:28 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सोमेश कोलगे ]]></dc:creator><category><![CDATA[ भारत ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/assam-to-keralam-new-state-governments-first-15-days-blog-by-somesh-kolage-marathi-news-1426400</guid><description><![CDATA[&lt;p&gt;आसाम , पश्चिम बंगाल , केरळम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू या पाच राज्यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. आसाम आणि पुद्दुचेरी वगळता इतर तीन राज्यांत मतदारांनी ऐतिहासिक कौल दिला. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री विराजमान झाला तर काँग्रेसकडे असलेल्या राज्यात केरळमची भर पडली. तामिळनाडूत काँग्रेसचा पराभव झाला असला तरीही विजय आणि टीवीकेच्या रुपाने एक नवे मैत्रीपर्व सुरू झाले. आसाम मध्ये काँग्रेस आणि विरोधी पक्षांना संधी असूनही निवडणुका जिंकता आल्या नाहीत. पुद्दुचेरीत भाजप आणि एनडीए ने गड राखला. राजकारण वेगळे राहिले पण या सर्वच राज्यातील नव्या सरकारांनी पहिल्या पंधरा दिवसात कोणकोणते निर्णय घेतले याचा आढावा घेणे क्रमप्राप्त आहे. कारण सरकारची दिशा त्यातूनच स्पष्ट होईल.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;br /&gt;आसाम - समान नागरी कायदा ते सरकारी काटकसर&amp;nbsp;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;&lt;br /&gt;२५ मे रोजी आसामने 'समान नागरी संहिता विधेयक, २०२६' &amp;nbsp;सादर केले. &amp;nbsp;विवाह, घटस्फोट आणि कौटुंबिक बाबींचे नियमन करणाऱ्या 'समान नागरी संहिते'च्या (UCC) दिशेने पावले उचलणारे आसाम हे देशातील तिसरे राज्य ठरले आहे. हेमंत बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या UCC चा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावामध्ये 'BNS कायद्या'अंतर्गत बहुविवाहावर बंदी घालणे; विवाह व घटस्फोटांची नोंदणी साठ दिवसांच्या आत करणे अनिवार्य करणे; तसेच 'लिव्ह-इन रिलेशनशिप्स'चा &amp;nbsp;यात अशा ाबींचा समावेश आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;NDA ने १२६ पैकी १०२ जागा जिंकून एकहाती विजय मिळवला. &amp;nbsp;यामध्ये भाजपच्या ८२ जागांचा समावेश होता. १२ मे रोजी, सरकारने पुढील पाच वर्षांत २ लाख सरकारी नोकऱ्या निर्माण करण्याची योजना जाहीर केली. ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी, एक &amp;nbsp;टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे. १४ मे रोजी, भाजप, AGP आणि BPF या घटक पक्षांच्या प्रतिनिधींसह एकूण चार मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. तसेच, आगामी काळात मंत्रिमंडळाचा आणखी विस्तार करण्याचे संकेतही सरकारने दिले आहेत. &amp;nbsp;सरकारने सहा महिन्यांचा एक 'काटकसर कार्यक्रम' सुरू केला. आर्थिक शिस्त आणि डिजिटल प्रशासनाला चालना देण्यासाठी या कार्यक्रमांतर्गत परदेश दौऱ्यांवर निर्बंध, इंधनाच्या वापरात २०% कपात, अधिकाऱ्यांच्या वाहनांच्या ताफ्यात कपात, कार्यालयीन वापरासाठी परदेशी वस्तूंवर निर्बंध आणि प्रत्यक्ष चर्चासत्रांऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर यांसारख्या उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. सरकारने गुवाहाटी येथील शंकरदेव कलाक्षेत्रामध्ये ३२ कोटी रुपये खर्चून 'भूपेन हजारिका संग्रहालय' उभारण्यास मंजुरी दिली. सरकारने 'आसाम राज्य डेटा धोरण (ASDP) २०२६' ला मंजुरी दिली. या धोरणांतर्गत 'डेटा व्यवस्थापन केंद्र' (CDM) स्थापन करण्यात आले असून, यामुळे विविध विभागांमधील डेटाची देवाणघेवाण करणे आणि प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व डेटा विश्लेषण (Analytics) यांचा वापर करणे शक्य होणार आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h3&gt;केरळम: गड आला पण सिंह ठरायला दहा दिवस&amp;nbsp;&lt;/h3&gt;
&lt;p&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;काँग्रेसप्रणित UDF ने १०२ जागा जिंकत डाव्यांची १० वर्षांची राजवट संपुष्टात आणली; परंतु व्ही. डी. सतीशन आणि के सी वेणुगोपाल यांच्या संघर्षामुळे केरळमला जवळपास दहा दिवस मुख्यमंत्र्यांविना राहावे लागले. अखेरीस इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या भक्कम पाठिंब्यामुळे सतीशन मुख्यमंत्री बनले. काँग्रेसमधील मतभेद, नेत्यांमधील एकमताचा अभाव आणि सत्तास्थापनेस झालेला विलंब यामुळे प्रशासनाऐवजी नेतृत्वाशी संबंधित मुद्द्यांवर लक्ष केंद्रित झाले आणि सरकारच्या तयारीबाबत प्रश्नचिन्हे निर्माण झाली. १८ मे रोजी मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतरही, सरकारने खातेवाटपाची यादी जाहीर करण्यास अनेक दिवस विलंब लावला, ज्यामुळे अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले. हा विलंब प्रामुख्याने काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात मत्स्यव्यवसाय आणि उच्च शिक्षण या खात्यांच्या वाटपावरून झालेल्या मतभेदांशी संबंधित होता. मत्स्यव्यवसाय खात्याच्या वाटपावरून कॅथोलिक ख्रिश्चन समाज नाराज झाल्याचे लक्षात येताच, खातेवाटप जाहीर झाल्यानंतर लगेचच मत्स्यव्यवसाय मंत्री अब्दुल गफूर यांनी चर्चच्या प्रतिनिधींची भेट घेतली आणि परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला.&lt;/p&gt;
&lt;p&gt;१८ मे रोजी झालेल्या शपथविधी समारंभादरम्यान, मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी आपल्या नावासोबतच वडिलांची जातीय ओळख दाखवणारे नाव वापरले. यामुळे सतीशन टीकेचे लक्ष झाले. काँग्रेस पक्षाच्या पुरोगामी आणि जातिविरोधी प्रतिमेला यामुळे मोठा धक्का बसल्याचे मानले गेले. शपथविधीत संपूर्ण सहा कडव्यांचे &amp;nbsp;'वंदे मातरम' गायन झाले. विरोधी पक्षांकडून टीका झाल्यानंतर, मुख्यमंत्री सतीशन यांनी या व्यवस्थेची जबाबदारी 'लोक भवन'कडे बोट दाखवले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;br /&gt;माजी मुख्य निवडणूक अधिकारी रतन यू. केळकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात सचिवपदी करण्यात आलेल्या नियुक्तीवर काही राजकीय गटांनी टीका केली. टीकाकारांनी असा युक्तिवाद केला की, काँग्रेसने यापूर्वी इतर राज्यांमध्ये अशाच प्रकारच्या नियुक्त्यांना विरोध केला होता; त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या या भूमिकेतील सुसंगततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 'मुनंबम वक्फ' (Munambam Waqf) वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे; केरळम वक्फ मंडळाने वादात असलेली ४०४ एकर जमीन 'उमीद' (UMEED) पोर्टलवर नोंदवली. लॅटिन कॅथलीक समुदाय आणि मच्छिमारांसह ६०० हून अधिक कुटुंबांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. यामुळे हा विषय कायदेशीर वाद न राहता, जमिनीचे हक्क आणि सामाजिक प्रतिनिधित्व यांशी निगडित एक राजकीय व सामाजिक मुद्दा बनला आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही कुटुंबाला विस्थापित केले जाणार नाही, असे आश्वासन दिले असले तरी, अद्याप यावर कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;br /&gt;२० मे रोजी, न्यायालयाच्या आदेशानुसार एर्नाकुलम जिल्ह्यातील 'मलयिडमथुरुथ' येथून अनुसूचित जातीच्या सात कुटुंबांना बेदखल करण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली. याविरोधात निदर्शने झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पाण्याचा मारा करावा लागला. ही घटना नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनासमोर आव्हान ठरली आणि यामुळे सरकारच्या 'समावेशक प्रतिमे'वर टीका झाली. तसेच, डाव्या प्रशासनाशी जवळीक मानल्या जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यामुळे सरकारला पुन्हा एकदा नव्या वादाला सामोरे जावे लागले; या बदल्यांमागे 'राजकीय सूडबुद्धी' असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h3&gt;पश्चिम बंगाल - पहिला भाजप मुख्यमंत्री&amp;nbsp;&lt;/h3&gt;
&lt;p&gt;&lt;br /&gt;भाजपने २९४ पैकी २०७ जागांवर विजय मिळवत एक ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयामुळे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारची पंधरा वर्षांची सत्ता संपुष्टात आली आणि मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजप सत्तेवर आले. सरकारने सीमा कुंपण प्रकल्पांसाठी 'बीएसएफ'ला (BSF) जमीन वाटप करण्यास मंजुरी दिली, तसेच 'आयुष्मान भारत', 'पीएम किसान' आणि 'उज्ज्वला' यांसारख्या प्रलंबित केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीला सुरुवात केली. याव्यतिरिक्त, प्रशासकीय कामकाज, रोजगार निर्मिती आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या जनगणनेच्या प्रक्रियेची अंमलबजावणी यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्रशासकीय सुधारणाही सरकारने राबवल्या. यातील प्रमुख सुधारणांमध्ये दोन आयएएस अधिकाऱ्यांना केंद्रीय प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये समाविष्ट करणे, सरकारी नोकऱ्यांसाठीची वयोमर्यादा पाच वर्षांनी वाढवणे आणि राज्याचे प्रशासन राष्ट्रीय प्रणालींशी सुसंगत करण्यासाठी जनगणनेच्या निर्देशांची अंमलबजावणी करणे यांचा समावेश होता. सरकारने पहिल्याच दिवशी टोळ्या, अवैध खाणकाम आणि जनावरांची तस्करी यांविरुद्ध कारवाई सुरू केली, भरती घोटाळ्यांच्या प्रकरणांमध्ये सीबीआयद्वारे खटला चालवण्यास मंजुरी दिली. प्रशासकीय पुनर्रचना आणि संस्थात्मक बदल युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहेत. शाळा आणि मदरशांमध्ये वंदे मातरम अनिवार्य केले आणि सार्वजनिक रस्त्यांवर नमाज अदा करण्यावर निर्बंध घातले.&lt;/p&gt;
&lt;p&gt;महिला कल्याण आणि सामाजिक सुरक्षेसाठी सरकारने अन्नपूर्णा योजनेला मंजुरी दिली असून, पात्र महिलांना दरमहा ३,००० रुपयांची मदत दिली जाईल. राज्यातील महिलांसाठी बस प्रवास मोफत करण्यात आला आहे आणि ज्येष्ठ नागरिक, विधवा व दिव्यांग व्यक्तींचे निवृत्तीवेतन दुप्पट करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्याने सुमारे १.६९ कोटी जात प्रमाणपत्रांच्या पुनर्तपासणीचे आदेश दिले आणि विद्यमान ओबीसी यादीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. राज्याने जून २०२६ पासून धर्म-आधारित सहाय्यता कार्यक्रम बंद केले आहेत.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;कृषी उत्पादनांच्या आंतरराज्यीय वाहतुकीवरील निर्बंध उठवण्याचा सरकारचा निर्णय पश्चिम बंगालच्या कृषी अर्थव्यवस्थेला मोठी चालना देणारा आहे. भारतनेट विस्तारासाठी दूरसंचार (राईट ऑफ वे) नियम, २०२४ आणि डिजिटल व आर्थिक एकात्मतेला समर्थन देणाऱ्या उपाययोजना स्वीकारल्या आहेत. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ७ व्या राज्य वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. पारदर्शकतेला प्राधान्य देण्यासाठी, सरकारने भरती प्रक्रियेमध्ये OMR कार्बन प्रतींचे वाटप करण्याची पद्धत सुरू केली आहे.&lt;/p&gt;
&lt;h3&gt;&lt;br /&gt;तामिळनाडू - थलपती विजय - २४ तासांत दोन निर्णयवापसी&amp;nbsp;&lt;/h3&gt;
&lt;p&gt;&amp;nbsp;टीव्हीके १०८ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडणूक जिंकला आणि काँग्रेस, सीपीआय, सीपीआयएम, व्हीसीके व आययूएमएल यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. यामुळे तामिळनाडूच्या राजकारणातील डीएमके व एआयएडीएमकेचे अनेक दशकांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. त्रिशंकू विधानसभा निकालामुळे सरकार स्थापनेस विलंब झाला. विजय यांनी आघाडीचा पाठिंबा मिळवताना राज्यपालांसोबत अनेक बैठका घेतल्या. व्हीसीकेच्या वाटाघाटींचे प्रसंग आणि काँग्रेसच्या पाठिंब्याच्या पत्राच्या घटनेने आघाडीवरील अवलंबित्व अधोरेखित केले. पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच, विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ५०० युनिट्सपर्यंत वीज वापरणाऱ्या कुटुंबांना दर दोन महिन्यांतून एकदा २०० युनिट्स मोफत वीज देण्याची घोषणा केली. ही घोषणा जाहीरनाम्यातील दरमहा २०० युनिट्स मोफत वीज देण्याच्या आश्वासनापेक्षा वेगळी आहे. तसेच, लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ५०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णयही घेण्यात आला, परंतु टीव्हीके यांनी ५ एकरपर्यंत जमीन असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. ते पूर्ण होणार का, हे पाहणे महत्त्वाचे. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;विजय यांचे ज्योतिषी असलेले रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांची विशेष कार्य अधिकारी (राजकीय) म्हणून नियुक्ती केल्याने राजकीय टीका आणि जनतेचा रोष निर्माण झाला. सरकारला २४ तासांच्या आत ही नियुक्ती मागे घ्यावी लागली. &amp;nbsp;१० मे रोजी मंत्र्यांनी शपथ घेतली असली तरी, जवळपास सहा दिवस खातेवाटप झाले नाही, ज्यामुळे प्रशासकीय अनिश्चितता निर्माण झाली. या निर्णयामुळे प्रशासकीय चिंता आणि मित्रपक्षांमधील समन्वयाचा अभाव निर्माण झाला आहे. खरेदी प्रक्रियेकडे लक्ष वेधणाऱ्या अनियमिततेच्या आरोपांनंतर काही तासांतच सरकारला १६.८३ लाख रुपयांची सार्वजनिक कामांची निविदा रद्द करण्यास भाग पडले आहे. चेन्नई आणि इतर भागांमधील वीज कपात हे सुरुवातीच्या काळात प्रशासनापुढील एक मोठे आव्हान आहे, कोईम्बतूरमध्ये १० वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येसंदर्भात प्रश्नांना टाळल्याच्या वृत्तामुळे उद्योगमंत्री एस. कीर्तना यांना टीकेला सामोरे जावे लागले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h3&gt;&lt;br /&gt;पुदुच्चेरी - NDA सरकार: पहिले १५ दिवस&lt;/h3&gt;
&lt;p&gt;NDA ने ३० पैकी १८ जागा जिंकून सत्तेत पुनरागमन केले आणि प्रशासकीय सातत्य राखले. यामुळे एन. रंगसामी यांची सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी निवड झाली. रंगासामी सरकारने केलेल्या घोषणा पूर्ण करण्यासाठी गतीने प्रयत्न सुरू केले आहेत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;'कामराजर शताब्दी दगडी घर बांधकाम योजना गेमचेंजर ठरू शकते. योजनेचा लाभ सुमारे ८,६०० कुटुंबांना होणार आहे. या योजनेअंतर्गत व्याजाचा बोजा माफ करण्यात आला असून, केवळ मूळ रक्कम परत करण्याची मुभा देण्यात आली आहे. संबंधित &amp;nbsp;कुटुंबांना त्यांच्या जमिनीचे हक्क पुन्हा मिळून घरांचे बांधकाम प्रकल्प पूर्ण करण्यास मदत होईल. सरकारने कराईकल आणि पेरालम दरम्यानची रेल्वे जोडणी पुन्हा सुरू केली. जवळपास ४० वर्षांनंतर थिरुनल्लरमधून रेल्वे धावली. या निर्णयामुळे थिरुनल्लर या तीर्थक्षेत्राचा विकास होईल आणि प्रादेशिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. &amp;nbsp;नवीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि घरगुती विजेचा खर्च कमी करण्यासाठी, सरकारने 'पीएम सूर्य घर योजने'अंतर्गत घरांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प (रूफटॉप सोलर) बसवण्यासाठी ३०,००० रुपयांचे अतिरिक्त अनुदान जाहीर केले आहे. या योजनेचा लाभ सुमारे १३,००० कुटुंबांना मिळेल असा अंदाज आहे.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/06/01/c199c3654bd6afab6c9cc2486bfe3e2e1780314701495989_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Shape of Momo: शेप ऑफ मोमो’: सिक्किमच्या गर्द झाडीतलं ‘फेमिनिस्ट’ वादळ]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/shape-of-momo-review-a-thought-provoking-tale-of-identity-and-womanhood-1426333</link><comments>https://marathi.abplive.com/blog/shape-of-momo-review-a-thought-provoking-tale-of-identity-and-womanhood-1426333#respond</comments><pubDate>Mon, 1 Jun 2026 10:29:53 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ नरेंद्र बंडबे ]]></dc:creator><category><![CDATA[ करमणूक ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/shape-of-momo-review-a-thought-provoking-tale-of-identity-and-womanhood-1426333</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Shape of Momo Feminist Film:&lt;/strong&gt; बिश्नू (गौमाया गुरंग) दिल्लीतील (Delhi) नोकरी सोडून सिक्किमला आलीय. दिल्लीत ती एका जाहिरात कंपनीत कॉपीरायटर होती. गावाकडे ती आईसोबत एका दुखवट्यात सहभागी झालीय. तिथे सर्वांसमोर तिने लिहिलेली जाहिरात (Shape of Momo) वाचायला सांगितले जाते. जाहिरात इंग्रजीत आहे. गावात वाढलेली आपली मुलगी इतकं सुंदर इंग्रजी (Entertainment) लिहिते-वाचते, याबद्दल तिच्या आईला खूप अभिमान वाटतो. गावातील पुरुषमंडळी तिच्या आईने मुलीला मुलासारखे वाढवले याचे कौतुक करतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हे सर्व बिश्नू पाहतेय, ऐकतेय. आजूबाजूचे सर्व पुरुषमंडळी तिच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. तिला लग्न करायचे आहे का? हे कुणी विचारत नाही; गावातील कोणता मुलगा तिच्यासाठी योग्य ठरेल, याचीच चर्चा चालू आहे. आईला चांगली स्थळे सुचवली जात आहेत. दुखवट्याच्या घरातही ही चर्चा रंगात आली आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्रिवेणी गीता राय यांच्या &amp;lsquo;शेप ऑफ मोमो&amp;rsquo; (२०२५) या सिनेमाची सुरुवात अशी होते. सिनेमा नेपाळी भाषेत आहे. नेपाळी नाव आहे &amp;lsquo;छोरा जैस्ते&amp;rsquo;, म्हणजे मुलासारखे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पुरुषसत्ताक समाजात महिलेच्या जाणिवा-नेणिवांपलीकडे तिचे लग्न हाच सर्वात मोठा विषय बनतो. ३२ वर्षांची बिश्नू या सर्व घटनांकडे चिकित्सकपणे पाहततेय. घरात तीन पिढ्या आहेत, आजी, आई आणि गरोदर बहीण. परदेशात गेलेले वडील कधीतरी परत येतील या आशेवर आजी आहे. आई घराची व्यवस्था पाहते. बहीण येणाऱ्या बाळाची तयारी करतेय. त्यांच्या रोजच्या जगण्यात वडिलांचा काहीही सक्रिय सहभाग नाही, तरीही त्यांचं &amp;lsquo;अस्तित्व&amp;rsquo; घरात, गावात आणि त्या तिघींच्या मनात सदैव आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दिल्ली गाठून परतलेल्या बिश्नूला हे सर्व असह्य होतं. दिल्लीने तिला सहजासहजी स्वीकारले नव्हते. आता गावातही तिला &amp;lsquo;बाहेरची&amp;rsquo; वाटू लागले आहे. दिल्लीत ती &amp;lsquo;आउटसायडर&amp;rsquo; होती, गावातही ती &amp;lsquo;आउटसायडर&amp;rsquo; बनत चाललीय. बिश्नू समाजाची विस्कटलेली घडी नीट बसवण्याचा प्रयत्न करते. या प्रक्रियेत ती एकटी पडते. आतले आणि बाहेरचे दोघेही हा बदल स्वीकारायला तयार नाहीत. यातून तिला स्वतःच &amp;lsquo;मिसफिट&amp;rsquo; असल्यासारखे वाटू लागते. शेप ऑफ मोमोची गोष्ट जगाच्या कुठल्याही भागात अशीच घडू शकेल.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;lsquo;शेप ऑफ मोमो&amp;rsquo;चा वर्ल्ड प्रीमियर दक्षिण कोरियातील बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला. तेथे सिनेमाला दोन प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले. त्यानंतर कोलकाता, मुंबई, न्यूयॉर्क, सिंगापूर अशा देश-विदेशातील अनेक महोत्सवांत हा सिनेमा सर्वोत्कृष्ट ठरला. हा त्रिवेणी गीता राय यांचा पहिला सिनेमा आहे. कथानक सिक्किममध्ये घडते. सिनेमात पर्यटकांना दिसणारा सिक्किम नव्हे, तर आतल्या भागातील सिक्किम दाखवण्यात आला आहे. बिश्नूच्या मनातलं वादळ इथल्या गर्द झाडीत घोंघावते आणि शांतही होते. डीओपी अर्चना घांगरेकरनं ही प्रक्रिया अत्यंत प्रभावीपणे कॅमेर्&amp;zwj;यात टिपलीये.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;lsquo;शेप ऑफ मोमो&amp;rsquo; हा सिनेमॅटिक फेमिनिस्ट गेझ &amp;nbsp;जगण्याचा स्त्रीवादी दृष्टिकोन आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जगभरात महिला स्टोरीटेलर्सची एक मजबूत इकोसिस्टम उभी राहतेय. लोई झाओ यांचा &amp;lsquo;नोमॅडलँड&amp;rsquo; (२०२०), सेलीन साँग यांचा &amp;lsquo;पास्ट लाइव्ह्स&amp;rsquo; (२०२३) यासारखी उदाहरणे देता येतील. टायटॅनिकमधील केट विंसलेटनेही &amp;lsquo;गुड बाय जून&amp;rsquo; (२०२५) या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलंय. आपल्याकडे सध्या पायल कापडिया, झोया अख्तर, रिमा कटगी यांसारख्या दिग्दर्शिका आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत आहेत. या यादीत आता त्रिवेणी गीता रायची भर पडलीये.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बाई जेव्हा बाईची गोष्ट सांगते, तेव्हा ती जगाकडे बाईच्या नजरेतून बघण्याचा दृष्टिकोन देते. सई परांजपे, अपर्णा सेन, अरुणा राजे, मीरा नायर, दीपा मेहता, गौरी शिंदे, अश्विनी अय्यर तिवारी, कोंकणा सेन शर्मा, रिमा दास अशा अनेक दिग्दर्शिकांनी यापूर्वीच हा मार्ग मोकळा केलाय. कॅनमध्ये &amp;lsquo;ग्रँ प्री&amp;rsquo; (पायल कापडिया) आणि बाफ्टा (लक्ष्मीप्रिया देवी) हे जागतिक पुरस्कार भारतीय महिला दिग्दर्शकांनी मिळवून दिलेत. सिनेमाच्या क्षेत्राला भारताला जगाच्या नकाशावर आणलंय. &amp;nbsp;महिला स्टोरीटेलर्सची इकोसिस्टम मज़बुत होतेय. हे चित्रं आशादायी आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;महत्त्वाच्या इतर बातम्या:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/entertainment/suman-kalyanpur-passed-away-legendary-marathi-hindi-playback-singer-padma-bhushan-awardee-death-marathi-news-1426282&quot;&gt;भावगीतांची सम्राज्ञी हरपली! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;ABP माझाच्या बातम्या LIVE...&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;ABP Majha LIVE | Devendra Fadnavis | Vidhan Parishad Election | Maharashtra Politics | Marathi News&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY&quot; width=&quot;1396&quot; height=&quot;785&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/06/01/9a2040d212e54d7f3855e886c96617c217802899423271339_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : आरोग्य, काम आणि कुटुंब... प्राधान्यक्रम काय असावा? ]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/ashwin-bapat-blog-on-health-work-life-balance-family-priority-marathi-1425856</link><comments>https://marathi.abplive.com/blog/ashwin-bapat-blog-on-health-work-life-balance-family-priority-marathi-1425856#respond</comments><pubDate>Thu, 28 May 2026 21:54:24 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अश्विन बापट, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ लाईफस्टाईल ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/ashwin-bapat-blog-on-health-work-life-balance-family-priority-marathi-1425856</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;Health is Wealth&lt;br /&gt;Work is Worship&lt;br /&gt;Family is not important thing, it is everything...&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपल्या आयुष्यातील तीन अतिशय महत्त्वाच्या घटकांबद्दल अलिकडेच ही तीन इंग्रजी वाक्यं वाचनात आली. आरोग्य, आपलं काम किंवा कुटुंब. या तीन स्तंभांवर आपलं आयुष्य स्थिरावत असतं. साहजिकच या तिघांचीही भूमिका आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असते. आता प्रश्न हा उरतो की, या तिन्ही विषयांमध्ये प्राधान्य क्रम काय असावा? किंवा तो काळानुरुप, वयानुरुप बदलावा का? तर या प्रश्नावर &amp;nbsp;खरंच सखोल मंथन होण्याची गरज आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपण नोकरी करण्यायोग्य वयात येईपर्यंत म्हणजे विशीपार होईपर्यंत आईवडिलांचं डोळ्यात तेल घालून आपल्याकडे लक्ष असतं. पुढे वयाची विशी पार केल्यावर काही मंडळी प्रगत शिक्षण घेतात, तर काही थेट घरच्या परिस्थितीनुसार नोकरी-व्यवसायाची कास धरतात. प्रगत शिक्षण घेतल्यानंतरही दोन-तीन वर्षांतच नोकरी-व्यवसायाची वाट त्याही ऑप्शनमध्ये निवडावीच लागते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पंचविसाव्या वर्षी तुमचं प्रोफेशनल लाईफ किंवा व्यावसायिक जीवन सुरु झालं असं मान्य केलं तर वयाच्या 58 ते 60 वर्षांपर्यंत म्हणजे &amp;nbsp;सुमारे 35 वर्षे तुम्हाला ही तारेवरची कसरत करायची असते. त्यात आताच्या कॉर्पोरेट कल्चरच्या जगात, वाढती स्पर्धा साहजिकच त्यामुळे येणारं परफॉर्मन्स प्रेशर... कामाचे वाढते तास, शिफ्ट ड्युटीज, काही वेळा नाईट शिफ्टमध्येही काम करावं लागतं. कॉर्पोरेटमध्ये काही वेळा पगाराचे आकडे गलेलठ्ठ असतात. त्याच वेळी तुम्हाला कधी कधी 12-12 तासही काम करावं लागतं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तुमच्या फिटनेसच्या सर्वोच्च पातळीवर तुम्ही असताना म्हणजे वयाच्या पंचविशीत तुमचा जॉब सुरु होतो. साहजिकच इथे हा क्रम &amp;nbsp;काम, आरोग्य आणि कुटुंब असा असतो. मग तुम्ही जेव्हा उद्योग-व्यवसायात स्थिरावता तेव्हा काळानुरुप प्रापंचिक जबाबदाऱ्याही आपल्यावर येतात. इथे काम-कुटुंब यात तुम्हाला बॅलन्स करायचा असतो. अर्थात आरोग्य सांभाळून. हा टप्पा 30 ते 45 वयोगटातला धरता येईल. तर 45 पासून पुढे तुमचा प्रवास मध्यम वयातून वार्धक्याकडे सुरु होतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शरीर हळूहळू तुम्ही केलेल्या मेहनतीच्या किंवा काही वेळा दुर्लक्ष केल्याच्या खुणा दाखवू लागतं. यात परत स्त्री-पुरुष असं वर्गीकरण वेगळं करावं लागेल. कारण, स्त्री आणि पुरुषाचीही मानसिक, शारीरिक स्थिती ही वेगळी विचारात घ्यावी लागेल. इथपासून म्हणजे करिअरच्या 15 वर्षांच्या निर्णायक टप्प्यात (45 ते 60 या वयात) तुमचा प्राधान्य क्रम काय असावा....तर, तो आरोग्य, कुटुंब आणि काम असा असावा. म्हणजे कामाला कमी महत्त्व नव्हे तर, आरोग्य-कुटुंब याकडे आता जास्त लक्ष द्यायला हवं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अर्थात या टप्प्यावर आपला आर्थिक आढावा घेऊनच आपण पावलं टाकत असतो. साहजिकच पुढच्या 15 वर्षांमध्ये आपल्याला किती पैसा कमवायचा आहे, त्यानुसार, याचं नियोजन करावं लागतं. अर्थात पैसा, मिळणाऱ्या सोयीसुविधा आपल्याला कितीही मिळाल्या तरी कमीच वाटतात. तेव्हा आपल्याकडच्या मिळकतीची ब्रेक इव्हन रक्कम किती असावी, हा विचारही ज्याचा त्याचा असतो. इथून पुढे आरोग्य आणि कुटुंब दोन्ही प्राधान्य क्रमात पहिल्या नंबरवर आल्यास आपलं जीवन सुखकर होतं. नाहीतर, आणखी पैसा, आणखी आलिशान जीवनशैलीच्या नादात आपण कुटुंबासोबतचा क्वालिटी टाईम गमावतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;वयाच्या या पंचेचाळीस प्लसच्या टप्प्यावरही जर आपण पैसे कमवणं हेच ध्येय ठेवलं तर, आपली जीवनशैली आणखी दिमाखदार होईलही. पण, त्या बदल्यात आपण जे मोल देतोय, ते किती आणि कशाचं आहे... याचाही खोलवर विचार करायला हवा. आपण जे पैसे कमावतोय, त्याचा उपभोग घेण्यासाठी प्रकृती किमान पातळीवर चांगली असायला हवी आणि आयुष्यातल्या वार्धक्याकडे कूच करण्याच्या त्या टप्प्यात आपली माणसंही आपल्या सोबत असायला हवीत. किंबहुना त्यांच्यासोबत आपल्याला वेळ घालवता यायला पाहिजे. सो, त्या टप्प्यात प्राधान्य हे आरोग्य आणि कुटुंबालाच असावं हे माझं वैयक्तिक मत आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या विषयावर ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ (Mindfullness Teacher) डॉ. राजेंद्र बर्वे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, या विषयाशी डील करताना सगळ्यात पहिल्यांदा आपला वर्क लाईफ बॅलन्स बिघडलाय हे आपण स्वीकारायला हवं. मग तुम्ही यातून मार्ग काढू शकता. टाईम मॅनेजमेंट, ध्येय निश्चित करणं यासारख्या मुद्यांमध्ये तुमची गल्लत होतेय, हे स्वीकारून तुम्ही पुढे गेलात की त्यावर उपाय शोधणं, पावलं टाकणं सोपं जातं.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;डॉ. राजेंद्र बर्वे पुढे सांगतात की, एखाद्या तज्ज्ञाची यासंदर्भात मदत घेण्याआधी दैनंदिनी लिहावी. तुम्ही ठरवलेली ध्येयं आणि तुम्ही पूर्णत्वास नेलेले मुद्दे याबद्दल अत्यंत डोळसपणे तुम्ही मांडणी केलीत की गोष्टी सोप्या होतात. फोकस्ड राहणं, कामाप्रती निष्ठा राखणं गरजेचं असतं. डेलिगेटिंग वर्क अर्थात कामाबद्दलचा नेमकेपणाही तितकाच महत्त्वाचा असतो. आपण नोकरी-व्यवसायामध्ये आपल्यावर असलेल्या जबाबदारी व्यतिरिक्त इतरांची कामं ओढवून तर घेत नाहीये ना, हेही चाचपून पाहण्याची गरज असते. तिथे आपला वेळ काही वेळा अनाठायी जात असतो. जो आपण आपल्या कुटुंबाला देऊ शकतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आता कुटुंबाविषयी बोलायचं झाल्यास कुटुंबासोबत टीव्ही पाहिला, सिनेमा पाहिला म्हणजे क्वालिटी टाईम स्पेंड केला असं नव्हे तर, त्यांच्याशी खास करून मुलांशी संवाद ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. अर्थात या संवादात डबा खाल्ला का, होमवर्क झाला का, अभ्यास झाला का, परीक्षा कधी आहे असे स्टीरिओ टाईप प्रश्न विचारणं म्हणजे हा संवाद पुरेसा ठरत नाही तर, त्याखेरीज तुम्ही जर मुलांना त्यांच्या मित्रपरिवाराबद्दल बोलतं केलंत किंवा दिवसभरातला एखादा गंमतशीर अनुभव त्यांना विचारलात तर मुलं आणखी खुलतात. असाच अनुभव तुम्ही बायकोशी संवाद ठेवताना तिलाही दिवसभरातील अनुभवाविषयी विचारलंत तर नवरा-बायकोमध्ये अधिक सकारात्मक संवाद होऊ शकतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आता आरोग्याबद्दल सांगतो. खरं तर या विषयावर आपण बोलू तितकं कमी आहे, पण आजच्या धकाधकीच्या जीवनातही तुम्ही दिवसभरातला किमान एक तास तुमच्यासाठी द्यायलाच हवा, त्या एक तासात योगासनं करा, मेडिटेशन करा, हलका व्यायाम करा. तो एक तास तुमचा स्वत:चा असावा. हा तुम्ही स्वत:शी करत असलेला संवादच असतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हलक्याफुलक्या शब्दात सांगायचं तर, आपला वर्क लाईफ बॅलन्स अर्थात WLB नीट राहिला नाही तर आपण क्रिकेटच्या भाषेतील LBW होण्याची शक्यता असते, असं सांगत डॉ. बर्वेंनी या विषयाची आपल्या आयुष्यातलं मर्म आणि महत्त्व अधोरेखित केलं.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/28/7f2f645938eb486c7ee59c77ea630e45177998541910193_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : एका जिंदादिल शायराची अंतिम विदाई!]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/bashir-badr-indian-poet-urdu-shayar-passes-away-sameer-gaikwad-blog-hindi-shayari-marathi-1425847</link><comments>https://marathi.abplive.com/blog/bashir-badr-indian-poet-urdu-shayar-passes-away-sameer-gaikwad-blog-hindi-shayari-marathi-1425847#respond</comments><pubDate>Thu, 28 May 2026 19:59:18 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ करमणूक ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/bashir-badr-indian-poet-urdu-shayar-passes-away-sameer-gaikwad-blog-hindi-shayari-marathi-1425847</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;BLOG :&lt;/strong&gt; आज बशीर बद्र गेले. सकाळीच त्यांचा इंतकाल झाला. बशीर सरांना त्यांचा ख़ुदा आता नक्कीच भेटला असेल..&amp;nbsp;&lt;br /&gt;&amp;nbsp;&lt;br /&gt;विख्यात शायर, कवी बशीर बद्र आजारी असल्याचं ऐकून वाचून होतो. मध्यंतरी काही महिन्यांपूर्वीच काही नतद्रष्ट लोकांनी त्यांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल केली होती, वास्तवात मागील काही वर्षे ते गंभीर आजारी होते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;काही दिवसापूर्वी त्यांचा एक व्हिडीओ पाहण्यात आला होता, ज्यात बद्र सरांच्या पत्नी राहत बद्र, त्यांची शुश्रूषा करताना दिसतात, बशीर सरांची यारदाश्त चांगली राहावी म्हणून त्यांच्या शेरो शायरीबद्दल बोलताना दिसतात, बद्र सरांना डिमेन्शिया आणि अल्झायमरने ग्रासले होते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्यांचा भूतकाळ ते हळूहळू विसरत गेले, त्यांच्या माणसांची त्यांना ओळख लागेनाशी झाली होती. त्यांचं स्वतःचं अस्तित्वही ते काही काळ विसरत चालले होते. त्यांचा जीव की प्राण असणारी शायरीदेखील त्यांच्या स्मरणनोंदीतून लुप्त होईल की काय असे वाटत होते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ते ब्लँक झाले होते. उरली होती केवळ, त्यांची मंद गतीतली धडधडती नब्ज!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बशीर बद्र सरांच्या प्रकृतीच्या घसरणीचा वेग केवळ त्यांच्या शायरीमुळेच कमी होता, कारण त्यांच्या पत्नी राहतजी, रोज त्यांच्याशी त्यांच्या शायरीविषयी बोलत असत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;काही शेर त्या सुनावत असत आणि आपल्या लाडक्या पतीने पुढचा शेर तोडक्या मोडक्या अल्फाजमध्ये फर्मावा म्हणून विनवणी करत. राहत भाभी कधी कधी मतला सांगत आणि पतीला पुढच्या पंक्ती सांगण्यासाठी हट्ट करत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मग बद्र सर, त्यांच्या आलम तनहाईच्या दुनियेतून बाहेर येण्याची धडपड करत. इकडे तिकडे पाहत, शून्यात नजर गढवत. पत्नीकडे पाहत, कसनुसे हसत आणि मेंदूला ताण देत, मग कुठे काही अल्फाज वा अख्खी पूर्ण पंक्ती त्यांना आठवत असे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्यांनी रदीफ़ बयान करताच राहतजींच्या चेहऱ्यावर समाधान विलसे. आपल्या प्राणप्रिय पत्नीला खूश पाहून मग बशीर सरांच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मितरेषा उमटे!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बद्र सर आता एक्क्याण्णव वर्षांचे झाले होते, माझ्यासारखे अनेक जण त्यांच्या शायरीवर प्रेम करत वाढले आहेत! त्यांच्या शायरीने अनेकांना दिलासा दिलाय, अनेकांना आधार दिलाय! राहतजी खऱ्या अर्थाने बशीर सरांच्या गझल झाल्या आहेत! &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जी क्लीप, मी पाहिली होती त्यात त्यांच्या बेगमजान त्यांना जो शेर ऐकवत होत्या, त्याची पंक्ती अशी होती - ख़ुदा ऐसे एहसास का नाम है.., ही पंक्ती त्या वारंवार सांगत होत्या आणि बशीर सरांना पुढची ओळ नाहीतर रदीफ़ ऐकवावा म्हणून गळ घालत होत्या, तीन चार रिपिटेशन्सनंतर बशीर सरांना त्याची पुढची ओळ आठवली, ते काहीसे अडखळत उत्तरले - रहे सामने और दिखाई न दे!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपल्या शोहरकडून शेर पूर्ण होताच लहान मुलांसारख्या त्या खुदखुदून हसल्या! बशीरजींच्या गालावरून हात फिरवत आपल्या कापऱ्या आवाजात त्यांनी संपूर्ण शेर अर्ज केला - &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ख़ुदा ऐसे एहसास का नाम है&lt;br /&gt;रहे सामने और दिखाई न दे..&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बशीर बद्र सरांचा ख़ुदा त्यांच्या पत्नीच्या रूपाने त्यांची काळजी घेत होता, खुदा त्यांच्या समोरच होता मात्र ते महसूस करू शकत नव्ह,ते कारण ते या गोष्टींच्या पुढे गेले होते! मध्येच त्यांना भास होत असत की मुशायरा सुरु आहे! मग घराच्या दिवाणखान्यात ते एकटेच बसून असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज येई आणि स्वतःच्या नकळत ते म्हणत, इर्षाद इर्षाद! हे दृश्य डोळे पाणावणारे असे! &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आता लौकिक अर्थाने, ते पाण्याची लिखावट वाचण्यास रवाना झाले आहेत, त्यांना ठाऊक आहे की, हरेक नदी हजारो वर्षांच्या कथा बयान करते! त्या कथांच्या, व्यथांच्या साम्राज्यात ते अलगद हरवून जातात!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अगर फ़ुर्सत मिले पानी की तहरीरों को पढ़ लेना&lt;br /&gt;हर इक दरिया हज़ारों साल का अफ़्साना लिखता है..&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एक नोंद सांगावीशी वाटते. डॉक्टरसाब अगदी बेशकिंमती शेर सहजतेने सांगत असत, पैकी हा एक शेर विलक्षण रसाळ आहे-&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अगर तलाश करूँ कोई मिल ही जाएगा&lt;br /&gt;मगर तुम्हारी तरह कौन मुझ को चाहेगा..&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हा शेर राहतजी, जेव्हा बशीर सरांना ऐकवत असतील तेव्हा ते राहतजींच्या प्रेम जाणिवांच्या परिघात, परिपूर्णतेने परतत असतील असे राहून राहून वाटते! आता मात्र बशीर सर कधीही परतून येणार नाहीत, ते अनंताच्या प्रवासाला रवाना झाले आहेत! अलविदा बशीर साहब, तुम्ही कोट्यवधी रसिकांच्या हृदयात सदैव सचेत असाल&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बशीर बद्र यांच्याविषयीच्या काही नोंदी - &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नोंद 1 - बशीरसाबना एकुलता एक मुलगा होता, नुसरत त्याचं नाव. नुसरतच्या डोक्यात बालवयातच कवितेची ओढ होती, मात्र मीरत जाळपोळीत सर्वस्व लुटलं गेल्यानंतर बशीर सर व्याकुळ झाले होते. त्यामुळे मुलाने शायर कवी व्हावं असं त्यांना कधीही वाटलं नाही. परिणामी नुसरतच्या नज्मना त्यांनी कधी प्रेमाचा आसरा दिला नाही. याचे व्हायचे तेच परिणाम झाले, नुसरतला व्यावसायिक यश मिळण्यास फार मोठा कालावधी लागला.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मुलाला उशिरा यश मिळाले म्हणून बशीर सर नाराज झाले नाहीत. त्यांना वाटलं सारं सुरळीत झालंय पण वास्तव तसं नव्हतं, प्रारब्ध काही वेगळंच होतं, नुसरत गंभीर आजारी पडला, तब्बल दशकभर तो आजारी होता. 2020 सालच्या फेब्रुवारीमध्ये त्याचं निधन झालं. बशीर आणि राहत, दांपत्य खचून गेलं. राहत भाभीना डगमगून चालणार नव्हतं, हळूहळू त्यांच्या पतीचा स्मृतीभ्रंश वाढत होता, त्यांना सावरण्यासाठी जगणं क्रमप्राप्त होतं. मुलाच्या मृत्यूने शोकविव्हळ झालेले बशीर बद्र एकांतात दुःखी राहू लागले जे की त्यांच्यासाठी हानिकारक होते. त्यांच्या पत्नीने त्यांना थोडेफार सावरले असले तरी काळजातली उदासी कधीकधी नकळत बाहर येई. बद्र सर लिहितात -&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कभी कभी तो छलक पड़ती हैं यूँही आँखें&lt;br /&gt;उदास होने का कोई सबब नहीं होता..&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नोंद 2 - 1987 साली उत्तर प्रदेशातील मीरत शहरात सलग मार्च ते जून, चार महिने दंगली सुरु होत्या. हजारो घरे या दरम्यान जाळली गेली, साडेतीनशेहून अधिक लोक मारले गेल्याची अधिकृत आकडेवारी आहे. शहरातील हाशिमपुरा मोहल्ल्यातील तब्बल चाळीस मुस्लिम तरुणांना यूपीच्या सशस्त्र पोलीस दलाच्या एकोणीस जवानांनी जबरदस्तीने पकडून नेलं. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये न्यायच्या ऐवजी गंगेच्या काठी घेऊन नेण्यात आलं; अत्यंत थंड डोक्याने या मुलांना अतिशय जवळून गोळ्या घालून ठार केले, सर्व तरुणांचे मृतदेह नदीपात्रात फेकून दिले. यापैकी वाचलेला एक तरुण पाण्यात पोहून नदीपार गेला, त्यानेच एफआयआरची नोंदवलं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;काँग्रेस नेते वीर बहादूर सिंह हे तत्कालीन यूपीचे मुख्यमंत्री होते. न्यायाच्या नावावर तीस वर्षे कुचेष्टा केली गेली. 2015 साली यातील पीडितांच्या नातलगांना नुकसान भरपाई दिली गेली यावरून काय ते ओळखावे! असो. हा पोस्टचा मुद्दा नाही, या दंग्यात बशीर बद्र यांचे घर जाळण्यात आले. त्यांची अनेक हस्तलिखिते, डायऱ्या, पुस्तके आगीच्या भक्षस्थानी पडले, संसार उघड्यावर आला. डॉक्टरसाब व्यथित झाले. त्यांनी मीरत कायमचे सोडले आणि ते भॊपाळला स्थायिक झाले. या साऱ्या उद्विग्नतेच्या काळात त्यांनी तो शेर लिहिला जो त्यांची पहचान बनून गेला!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;लोग टूट जाते हैं एक घर बनाने में&lt;br /&gt;तुम तरस नहीं खाते बस्तियाँ जलाने में.. ..&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ज्याचं जळतं त्यालाच ते बेहद्द कळतं, बाकी जग केवळ सहानुभूती देण्याशिवाय काही करत नाही. इतकं होऊनही ज्यांना द्वेष जारी ठेवावा वाटतो ते द्वेष करतच राहतात.. असो.. &amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नोंद 3 - तसे तर त्यांनी त्यांच्या ख़ुदाला एक कैफियत त्यांच्या वयाच्या चाळीशीतच केली होती, ज्यात ते आपल्या परिस्थितीवर असे काही नाराज होते की त्यांच्या वेदना थेट काळजाला भिडतात..&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ज़िंदगी तू ने मुझे क़ब्र से कम दी है ज़मीं&lt;br /&gt;पाँव फैलाऊँ तो दीवार में सर लगता है..&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बशीर सरांना त्यांच्या अंतिम कश्मकशचा अंदाज पूर्वीच आला असावा. अतिसंवेदनशील असणं त्रासदायक असतं. हा माणूस उत्तुंग आणि उदात्त होता, त्याचे कलाम आपल्याला वाचता आले ही आपली पुण्याई! त्यांना अलविदा म्हणणं जड जातंय मात्र नियतीपुढे कुणाचेही काही चालत नाही!&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/28/5c810b98e5751ab246184fc6c286357f177997853738793_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कुरघोडी करणारी आयर्न लेडी!]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/blog-of-sameer-gaikwad-on-claudia-sheinbaum-pardo-mexico-iran-football-team-donald-trump-us-1425728</link><comments>https://marathi.abplive.com/blog/blog-of-sameer-gaikwad-on-claudia-sheinbaum-pardo-mexico-iran-football-team-donald-trump-us-1425728#respond</comments><pubDate>Wed, 27 May 2026 22:10:14 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ विश्व ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/blog-of-sameer-gaikwad-on-claudia-sheinbaum-pardo-mexico-iran-football-team-donald-trump-us-1425728</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;BLOG :&lt;/strong&gt; मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबॉम ह्यांचे वर्णन सद्यकालीन आयर्न लेडी असे करता येईल. त्या जन्माने ज्यू आहेत मात्र कर्मकांडे अथवा धार्मिक कट्टरतेने त्यांना ग्रासलेले नाही हे विशेष आहे! नुकताच त्यांनी एक असा कारनामा करुन दाखवला आहे की, माजोरड्या आणि उन्मत्त डोनाल्ड ट्रम्प यांच्या थोतरीत लगावली गेलीय.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;झाले असे की, यंदाच्या वर्षी फिफा वर्ल्ड कपचे फुटबॉल सामने अमेरिकेत होणार आहेत, अमेरिका यजमान देश आहे. 2020 च्या मध्यात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे, अमेरिकन प्रशासनाने इराणच्या फुटबॉल संघाला संपूर्ण स्पर्धेदरम्यान अमेरिकेत मुक्कामी राहण्यास नकार कळवला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आडमुठ्या ट्रम्पच्या धोरणानुसार इराणी टीमला अमेरिकन भूमीवर खेळण्याची परवानगी होती, मात्र त्यांनी तिथे मुक्कामी राहू नये अशी अट घातली होती!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सध्या जगभरात ट्रम्प यांच्या हडेलहप्पी नीतीने आणि लहरी आत्मघातकी निर्णयांमुळे अख्ख्या जगाची कोंडी होताना दिसतेय. त्यांच्या मस्तवालपणाला थेट आव्हान देण्याचे धाडस सध्या तरी कुणीच दाखवलेले नाही. खेरीज ह्या घटनाक्रमाला जागतिक शेड्स आहेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;इस्रायल हे एक ज्यू राष्ट्र आहे आणि इस्रायलने इराण विरोधात पुकारलेल्या युद्धात अमेरिकेने साथ दिली. जगभरातून खास करुन युरोपमधून त्यांना पाठिंबा मिळेल असे वाटले होते. मात्र प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. त्याच बरोबर त्यांच्या विरोधातही थेट कुणी उतरले नाही!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हे युद्ध आता जागतिक आर्थिक अरिष्टाचे रूप घेऊ पाहतेय, त्यामुळे सध्या कुणीही कोणतीही थेट भूमिका घेण्याचे धाडस करताना दिसत नाही. अर्थात याला काही अपवाद आहेत तर काहींनी ट्रम्पचे बूट चाटायचे शिल्लक ठेवलेत!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ट्रम्प यांच्या राजवटीत मेक्सिको आणि अमेरिकेचे संबंध अतिशय तणावपूर्ण झाले आहेत. मेक्सिकोची सीमा अमेरिकेस लागून आहे, तिथून अवैध घुसखोरी होते आणि मेक्सिकन नागरिक ड्रग तस्करी करतात असा ट्रम्प प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे त्यांना ह्या संपूर्ण सीमेवर अजस्त्र भिंत बांधायची आहे, तसा त्यांनी चंग बांधला आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;क्लॉडिया शिनबॉम ह्या ज्यू महिलेने मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे घेतल्यावर आपली बाजू भक्कम होईल असा ट्रम्प यांचा होरा होता, जो पुढे जाऊन साफ चुकला.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अमेरिकेने ज्यू समूदाय आणि इस्रायल यांच्या बाजूने सातत्याने धृतराष्ट्री एकांगी भूमिका घेतली असल्याने शिनबॉम आज ना उद्या आपल्या तालावर नाचतील असे अमेरिकेला वाटत होते. मात्र तसे काही न घडता, काही अनेपक्षित उलटे धक्के मात्र जरूर बसले! &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;याची कारणे क्लॉडिया शिनबॉम ह्यांच्या जडणघडणीत दडली आहेत. मेक्सिको सिटीमध्ये एका ज्यू कुटुंबात जन्मलेल्या क्लॉडिया यांचे वडील, कार्लोस शिनबॉम योसेलेविट्झ हे रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांचे पूर्वज लिथुआनियातून मेक्सिकोत आले होते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;क्लॉडिया यांची आई अॅनी पार्डो सेमो पेशाने जीवशास्त्रज्ञ होत्या आणि त्याच बरोबर युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापकही &amp;nbsp;होत्या. क्लॉडियाचे मातापिता, दोघेही 1968 च्या मेक्सिको विद्यार्थी आंदोलनात सक्रिय होते. त्यामुळे क्लॉडिया यांना लहानपणापासून सामाजिक न्यायाचे आणि विज्ञाननिष्ठतेचे, असे दोन्हीही दृष्टिकोन मिळाले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;क्लॉडिया शिनबॉम यांचे वैयक्तिक जीवन साधे, शिस्तबद्ध आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने भरलेले आहे. त्या नास्तिक आहेत आणि आपल्या यहुदी वारशाबद्दल खुलेआम बोलतात, त्या कोणत्याही ज्यू धर्मीय प्रथा पाळत नाहीत. त्यामुळे इस्रायलच्या राक्षसी अधम वृत्तीविषयी त्यांना तीळमात्रही सहानुभूती नाही! नेतान्याहू यांच्या अगदी उलट, शिनबॉम यांचा दृष्टिकोन मानवतेचा आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्यांच्या वैयक्तिक जीवनातील कोणत्याही घडामोडी त्यांनी मेक्सिकन जनतेपासून लपवून ठेवलेल्या नाहीत. 1987 मध्ये त्यांचे कार्लोस इमॅझ गिस्पर्ट यांच्याशी त्यांचे लग्न झाले. त्यांच्यापासून मारियाना ही मुलगी जन्मली. तीस वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;2016 मध्येच विद्यापीठातले त्यांचे सहकर्मी असणारे जुने मित्र जेसुस ट्रीबा यांच्यासोबत त्यांची मैत्री नव्याने बहरली. 2023 सालच्या नोव्हेंबरमध्ये त्यांनी एका छोटेखानी खासगी समारंभात विवाह केला. क्लॉडिया यांचे पती जेसुस हे सध्या, बँक ऑफ मेक्सिकोमध्ये वित्तीय जोखीम व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत. आपली पत्नी राष्ट्राध्यक्ष आहे ह्याचा त्यांना जराही दंभ नाही!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;क्लॉडिया शिनबॉम यांनी 2024 सालच्या ऑक्टोबरमध्ये मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षपदी शपथ घेतली तेव्हा मेक्सिको अतिशय डळमळीत अवस्थेत होते. आंद्रेझ मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर अर्थात अमलो, यांच्या &amp;lsquo;फोर्थ ट्रान्सफॉर्मेशन&amp;rsquo; संकल्पनेच्या वारसदार म्हणून क्लॉडिया यांच्याकडे पाहिले जाते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कारकिर्दीच्या पहिल्या दीड वर्षात त्यांनी बऱ्यापैकी चित्र बदलवले! सामाजिक कल्याणकारी योजना राबवताना रोजगार, शिष्यवृत्ती आणि पेन्शन हे घटनात्मक हक्क बनवले गेले. राजरोस होणाऱ्या खूनखराब्याने देश बेजार झाला होता, त्या तुलनेत हत्यांच्या संख्येत लक्षणीय घट नोंदवली गेली. काही राज्यांत ही घट तब्बल साठ टक्के इतकी खाली आली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;महिला अधिकार, पर्यावरण आणि ऊर्जा क्षेत्रात नवीन धोरणे त्यांनी राबवली आहेत. आर्थिक स्थैर्य आणणे आणि गरिबी घटवणे ह्यावर सातत्यपूर्ण फोकस ठेवलाय. असे असले तरी, गुन्हेगारी आणि ड्रग कार्टेल्स ही त्यांच्यापुढची सर्वात मोठी समस्या आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ट्रम्प प्रशासनाच्या दबावामुळे मेक्सिकोच्या राजकीय सामाजिक परिघात सातत्याने तणाव जाणवतो. न्यायव्यवस्था आणि संस्थांवर मोरेना पक्षाच्या वाढत्या नियंत्रणामुळे लोकशाहीचे संतुलन बिघडण्याची भीती सतत व्यक्त केली जाते. मेक्सिकोची आर्थिक वाढ बऱ्याच प्रमाणात संथ आहे, ही गोष्ट क्लॉडिया शिनबॉम जाहीर रित्या स्वीकारतात आणि आपले सरकार हे चित्र बदलण्यासाठी कटिबद्ध असल्याचा दावा त्या नित्य करतात. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;क्लॉडिया शिनबॉम यांचे नेतृत्व शांत, वैज्ञानिक आणि डेटा आधारित आहे. मध्यम मार्गी आणि तंत्रज्ञान केंद्रित दृष्टिकोन हे त्यांचे वैशिष्ट्य! मेक्सिको सध्या &amp;lsquo;परिवर्तन आणि स्थिरता&amp;rsquo; यांच्या संक्रमण काळात आहे. ह्या महत्वपूर्ण दशकात शिनबॉम यांचे प्रेरणादायी जीवन आणि नेतृत्व ही मेक्सिकोच्या आधुनिक इतिहासात एक आशादायक गोष्ट म्हणून पाहिली जाते! &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एका वैज्ञानिक महिला, जी तिच्या देशाची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष आहे, तिने सत्तेत येताच अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. इराणी फुटबॉल टीमला अमेरिकेत मुक्काम करण्यास नकार देताच त्यांचे सामने जवळपास बारगळल्यात जमा होते, कारण अमेरिकेची खपामर्जी पत्करून त्यांना कोण आश्रय देणार हा यक्षप्रश्नच होता!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;क्लॉडिया शिनबॉम ह्यांनी इराणी फुटबॉल टीमला आपल्या देशात मुक्काम करण्याची अनुमती देऊन एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. आपण ट्रम्पसमोर झुकत नाही हा पहिला दृढ संदेश देतानाच ट्रम्प यांची कोंडी केलीय. आपण ज्यू असूनही, इस्रायलने ज्या इराण विरोधात युद्ध पुकारले आहे त्या इराणी संघाला आश्रय देऊन त्यांनी इस्रायलला चपराक लावली आहे!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सगळ्या जगाला आपण वाकवू शकतो हा डोनाल्ड ट्रम्प यांचा तोरा त्यांनी मोडून काढताना मेक्सिकन जनतेला नवा आत्मविश्वास दिला आहे. दक्षिण अमेरिकन देशांची आणि अमेरिकेची जी पूर्वापार खुन्नस सुरु आहे त्याचे नेतृत्व करण्यास मेक्सिको कधीही मागे हटणार नाही हा मेसेज त्यांनी उपखंडात दिला आहे!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;क्लॉडिया शिनबॉम ह्यांच्या फुटबॉल बॉम्बचे काय करायचे याचे उत्तर अजून तरी ट्रम्प प्रशासनास गवसले नाही. क्लॉडिया शिनबॉम ह्या रुढार्थाने, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी ह्यांच्यासारख्या देखण्या नसतील, मात्र त्यांच्या पाठीचा कणा जगातल्या कोणत्याही राष्ट्रप्रमुखापेक्षा ताठ आहे हे त्यांनी दाखवून दिलेय!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हा बिनधास्त भिडणारा बाणा दाखवण्यासाठी माणूस प्रामाणिक, इमानी, देशप्रेमी आणि निष्कलंक चारित्र्याचा असावा लागतो! ह्यासाठी जिगर असावे लागते जे क्लॉडिया शिनबॉम ह्यांच्या ठायी आहे!&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/27/1c09915caa61d6d4e32a70aed54eabe6177989993689193_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[साखरेची किंमत: बीडच्या महिलांचे शरीर, कर्ज, मासिक पाळी आणि ऊसतोडीची व्यवस्था]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/the-price-of-sugar-paying-women-in-beed-debt-menstruation-sugarcane-harvesting-system-blog-by-dhananjay-pushpalata-karvir-thackeray-1425496</link><comments>https://marathi.abplive.com/blog/the-price-of-sugar-paying-women-in-beed-debt-menstruation-sugarcane-harvesting-system-blog-by-dhananjay-pushpalata-karvir-thackeray-1425496#respond</comments><pubDate>Tue, 26 May 2026 11:48:24 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/the-price-of-sugar-paying-women-in-beed-debt-menstruation-sugarcane-harvesting-system-blog-by-dhananjay-pushpalata-karvir-thackeray-1425496</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;gt;&amp;gt; &lt;strong&gt;धनंजय पुष्पलता करवीर ठाकरे&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपल्या चहात विरघळणारी साखर गोड असते. सणावाराच्या मिठाईत, थंड पेयात, चॉकलेटमध्ये, &amp;nbsp;बिस्किटात, बाजारातील असंख्य पदार्थांत ती सहज मिसळलेली असते. पण त्या साखरेच्या प्रत्येक कणामागेकोणाचा घाम आहे, कोणाचेकर्जआहे, कोणती वेदना आहे आणि कोणत्या स्त्रीच्या शरीराची किंमत दडलेली आहे, हा प्रश्न आपण क्वचितच विचारतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ऊसतोड महिला मजुरांच्या गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांबाबत गेल्या काही वर्षांत अनेक अहवाल, बातम्या, अभ्यास आणि सरकारी चर्चासमोर आल्या आहेत. काही सार्वजनिक चर्चांमध्येअसा दावा केला जातो की, 2024 मध्ये बीड जिल्ह्यात 843 महिलांनी ऊसतोडीसाठी जाण्यापूर्वी गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया केली आणि त्यापैकी 477 महिला 30 ते 35 वयोगटातील होत्या. हा दावा अत्यंत गंभीर आहे; मात्र उपलब्ध अधिकृत खुल्या स्रोतांत या विशिष्ट आकड्याची स्पष्ट आणि स्वतंत्र पुष्टी अद्याप दिसत नाही. उलट 30 जुलै 2025 रोजी राज्यसभेत दिलेल्या उत्तरात महाराष्ट्र शासनाने केंद्राला कळविलेल्या माहितीनुसार 2022 तेमार्च 2025 या काळात बीड जिल्ह्यात महिला ऊसतोड मजुरांमध्ये 211 गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया झाल्या असल्याचेनमूद आहे. त्यामुळे या लेखात आकड्यांपेक्षा अधिक महत्त्व त्या व्यवस्थेला दिलेआहेजी स्त्रीच्या शरीराला मजुरीच्या हिशेबात अडकवते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हा लेख फक्त गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांवर नाही. तो मासिक पाळीवर आहे. तो कर्जावर आहे. तो मजुरीवर आहे. तो स्त्रीच्या शरीराविषयी समाजाच्या उदासीनतेवर आहे. तो साखर उद्योगाच्या पुरवठा साखळीवर आहे. आणि सर्वात महत्त्वाचेम्हणजे, तो या प्रश्नावर आहे, आपल्या गोडव्याची खरी किंमत कोण भरत आहे?&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;बीड, ऊसतोड आणि कर्जाची व्यवस्था&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बीड आणि मराठवाड्यातील अनेक भाग वर्षानुवर्षे दुष्काळ, पावसाची अनिश्चितता, अपुरी शेती, &amp;nbsp;कर्जबाजारीपणा आणि स्थानिक रोजगाराच्या कमतरतेशी झगडत आहेत. शेतीवर जगणे कठीण झाले की, कुटुंबे ऊसतोडीसाठी स्थलांतर करतात. हे स्थलांतर आवडीने केलेली निवड नसते; ते जगण्यासाठी केलेली तडजोड असते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ऊसतोडीच्या व्यवस्थेत पती-पत्नीला एकत्र 'कोयता' म्हणून नोंदवलं जाते. कोयता म्हणजे ऊस तोडण्याचे साधन; पण या व्यवस्थेत तो पती-पत्नीच्या संयुक्त श्रमाचे नाव बनतो. मुकादम नावाचा मध्यस्थ हंगामा पूर्वी कुटुंबाला आगाऊ रक्कम देतो. ही रक्कम साधारणपणे घरखर्च, कर्जफेड, लग्नकार्य, वैद्यकीय खर्च किंवा दैनंदिन गरजांसाठी वापरली जाते. पण एकदा आगाऊ रक्कम घेतली की, कुटुंब हंगामभर ऊसतोडीच्या कामाशी बांधले जाते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ही रक्कम वरकरणी मदत वाटते; पण प्रत्यक्षात ती कर्जबंधन बनते. हंगाम सुरू झाल्यावर दाम्पत्याला ठरावीक प्रमाणात ऊस तोडावा लागतो. काम चुकले, आजार झाला, मुलांची काळजी घ्यावी लागली, &amp;nbsp;पाळीमुळे स्त्रीला विश्रांती हवी झाली, तरी मजुरीचा हिशेब थांबत नाही. उलट अनुपस्थितीचा दंड, कपात किंवा कर्जवाढण्याचा धोका निर्माण होतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या संपूर्ण व्यवस्थेत स्त्रीला स्वतंत्र मजूर म्हणून पूर्ण मान्यता मिळत नाही. ती पतीसोबतच्या 'कोयता'चा भाग म्हणून पाहिली जाते. तिचे श्रम दिसतात, पण तिची वेदना दिसत नाही. तिचा घाम दिसतो, पण तिची मासिक पाळी दिसत नाही. तिच्या हातातील कोयता दिसतो, पण तिच्या शरीरातील वेदना अदृश्य राहतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;मासिक पाळी: लपवलेले मूळ&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या संपूर्ण प्रश्नाच्या मुळाशी मासिक पाळी आहे. पण याच गोष्टीबद्दल समाज सर्वात कमी बोलतो. ऊसतोडीच्या हंगामात महिला अनेकदा तात्पुरत्या झोपड्यांत किंवा असुरक्षित निवासात राहतात. स्वच्छतागृह नसते, पाणी पुरेसे नसते, स्नानाची सोय नसते, कपडे बदलण्यासाठी सुरक्षित जागा नसते, कचरा व्यवस्थापन नसते आणि विश्रांतीसाठी वेळ नसतो. पाळीच्या काळात स्त्रीला वेदना, अशक्तपणा, जास्त रक्तस्राव, &amp;nbsp;पाठदुखी, पोटदुखी, चक्कर, संसर्ग किंवा थकवा जाणवू शकतो. पण ऊसतोडीच्या श्रमव्यवस्थेत या वेदनांना जागा नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;स्त्रीला पाळी आली म्हणून काम थांबत नाही. ऊस थांबत नाही. मुकादमाचा हिशेब थांबत नाही. कर्ज थांबत नाही. घराचा खर्च थांबत नाही. त्यामुळे मासिक पाळी हा आरोग्याचा प्रश्न न राहता उत्पन्नाचा प्रश्न बनतो. &amp;nbsp;पाळीमुळे एक दिवस काम चुकले, तर त्या दिवसाची मजुरी कमी होते, दंड होऊ शकतो, दाम्पत्याच्या एकूण कामावर परिणाम होतो आणि कर्जाचा दबाव वाढतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हीच या व्यवस्थेची क्रूरता आहे. स्त्रीच्या शरीरातील एक नैसर्गिक प्रक्रिया 'कामातील अडथळा' बनवली जाते. पाळी म्हणजे, विश्रांती, स्वच्छता, सन्मान आणि आरोग्याची गरज असलेली वेळ आहे; पण ऊसतोडीच्या हंगामात ती आर्थिक शिक्षा बनते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;यातून काही महिलांसमोर भयावह विचार उभा राहतो, पाळीचा त्रासच नसेल तर काम चुकणार नाही. काम चुकणार नाही तर दंड होणार नाही. दंड होणार नाही तर कर्जवाढणार नाही. आणि या विचाराच्या टोकाशी गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया उभी राहते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;समाज म्हणून आपण येथे थरथरायला हवे. कारण कोणतीही स्त्री केवळ कामासाठी, दंड टाळण्यासाठी किंवा पाळीचे दिवस अडथळा ठरू नयेत, म्हणून गर्भाशय काढण्याचा विचार करू लागते, म्हणजे ती तिची वैयक्तिक समस्या नाही; ते संपूर्ण व्यवस्थेचे अपयश आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांचे भयावह वास्तव&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया काही वैद्यकीय परिस्थितीत आवश्यक असू शकते. गर्भाशयातील गाठी, &amp;nbsp;अतिशय गंभीर रक्तस्राव, काही प्रकारचे कर्करोग, दीर्घकाळ उपचारांनी न बरे होणारे गंभीर स्त्रीरोग, अशा परिस्थितीत डॉक्टर योग्य वैद्यकीय विचाराने शस्त्रक्रियेचा सल्ला देऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक शस्त्रक्रिया चुकीची आहे, असे म्हणणे योग्य नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पण बीडमधील ऊसतोड महिला मजुरांच्या संदर्भात प्रश्न वेगळा आहे. येथे प्रश्न असा आहे की, या शस्त्रक्रिया खरोखर वैद्यकीय गरजेपोटी झाल्या का? की त्या गरिबी, अज्ञान, चुकीची माहिती, खाजगी आरोग्यसेवेवरील अवलंबित्व, डॉक्टरांचा पुरेसा समुपदेशनाविना दिलेला सल्ला, कुटुंबाचा आर्थिक दबाव, मुकादमाची मजुरी रचना आणि पाळीमुळे काम चुकण्याच्या भीतीमुळे घडल्या?&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;2019 मध्येसमोर आलेल्या सरकारी चौकशीशी संबंधित अहवालांनुसार बीडमधील 82,309 महिला ऊसतोड मजुरांपैकी 13,861 महिलांचे गर्भाशय काढण्यात आलेहोते, असा उल्लेख अनेक वृत्तांतांमध्ये आढळतो. हा आकडा जवळपास 17 टक्के इतका आहे. 2024 मध्ये IIED या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेच्या अभ्यासात स्थलांतरित ऊसतोड कुटुंबांतील महिलांमध्ये गर्भाशय काढण्याचे प्रमाण 55.73 टक्के आढळले, तर गावात राहिलेल्या महिलांमध्ये हे प्रमाण 17.06 टक्के होते. हा फरक धक्कादायक आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;भारताच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार 15 ते 49 वयोगटातील महिलांमध्ये गर्भाशय काढण्याचेराष्ट्रीय प्रमाण सुमारे 3 टक्क्यांच्या आसपास आहे. त्या तुलनेत बीडमधील स्थलांतरित ऊसतोड महिलांमध्ये दिसणारे प्रमाण अत्यंत गंभीर सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या असामान्य आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तरुण वयात गर्भाशय काढल्यास स्त्रीच्या शरीरावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. हार्मोनल बदल, &amp;nbsp;लवकर रजोनिवृत्तीची शक्यता, हाडांची झीज, हृदय व चयापचयाशी संबंधित धोके, मानसिक परिणाम, &amp;nbsp;लैंगिक आरोग्यावरील परिणाम, अशक्तपणा, वेदना आणि आयुष्याच्या गुणवत्तेवर परिणाम, या सर्व गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. शस्त्रक्रिया म्हणजेफक्त एक दिवसाची घटना नाही; ती स्त्रीच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करू शकते. म्हणून गर्भाशय काढण्याच्या प्रत्येक शस्त्रक्रियेकडे केवळ वैद्यकीय नोंद म्हणून न पाहता, तिच्यामागील सामाजिक आणि आर्थिक कारणेही तपासली पाहिजेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;स्त्रीदेह आणि श्रमशोषण&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या प्रकरणात स्त्रीचे शरीर श्रमाच्या बाजारात गुंतवले जाते. तिचे हात ऊस तोडतात, पाठ ओझे वाहते, पाय चिखलातून चालतात, पोट वेदना सहन करते, आणि गर्भाशय कामात अडथळा ठरू नये म्हणून काढून टाकले जाते, ही कल्पनाच अस्वस्थ करणारी आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपला समाज स्त्रीच्या सहनशक्तीचे कौतुक करतो; पण तिच्या वेदनेला न्याय देत नाही. ग्रामीण स्त्री पाळीत काम करते, प्रसूतीनंतर लगेच श्रम करते, आजार लपवते, घर सांभाळते, मुलांना वाढवते आणि आर्थिक गरजांसाठी स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करते. समाज याला 'त्याग' म्हणतो. प्रत्यक्षात ते अनेकदा अन्याय असतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;स्त्रीचे शरीर उत्पादनाचे साधन नाही. तिची पाळी कमकुवतपणा नाही. तिची विश्रांती आळस नाही. तिचा आजार खर्च नाही. आणि तिचे गर्भाशय श्रम व्यवस्थेतील अडथळा नाही. हे समजून घेणे हे आरोग्यधोरणाचे, &amp;nbsp;कामगार धोरणाचे आणि समाजाच्या नैतिकतेचे पहिले पाऊल आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;साखर उद्योग, पुरवठा साखळी आणि नैतिक जबाबदारी&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ऊस शेतातून साखर कारखान्यांकडे जातो. कारखान्यांतून साखर तयार होते. ती पुढे मोठ्या अन्न-पेय कंपन्यांच्या उत्पादनांत वापरली जाते. एका स्त्रीनेपाळीच्या वेदनेत तोडलेला ऊस अखेरीस बाजारातील गोड पदार्थात रूपांतरित होतो. म्हणून ऊसतोड मजुरांच्या स्थितीचा प्रश्न फक्त गावाचा किंवा जिल्ह्याचा राहत नाही; तो संपूर्ण पुरवठा साखळीचा प्रश्न बनतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;साखर कारखाने कदाचित म्हणू शकतात की, मजुरांशी त्यांचा थेट करार नाही. मोठ्या कंपन्या म्हणू शकतात की, त्या फक्त साखर खरेदी करतात. पण नैतिक जबाबदारी इतकी सोपी नसते. एखाद्या उत्पादनाच्या पुरवठा साखळीत कर्जबंधन, दंडात्मक मजुरी, असुरक्षित निवास, महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष आणि गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांशी संबंधित दबाव दिसत असेल, तर &quot;आमचा थेट संबंध नाही&quot; ही भूमिका पुरेशी ठरत नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;The New York Times आणि The Fuller Project यांच्या तपासात महाराष्ट्रातील साखर पुरवठा साखळीतील कर्ज, बालविवाह, बालमजुरी, महिलांचे आरोग्य आणि गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. Bonsucro सारख्या आंतरराष्ट्रीय प्रमाणन संस्थेनेही महाराष्ट्रातील ऊसतोड महिलांशी संबंधित मानवी हक्कांच्या धोक्यांकडे लक्ष देण्याची गरज मान्य केली आहे. अमेरिकेच्या कामगार विभागाने भारतातील ऊसतोडीत जबरदस्तीच्या मजुरीचे संकेत नमूद केले आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, प्रमाणपत्र पुरेसे नाही. कागदी तपासणी पुरेशी नाही. खरी तपासणी त्या स्त्रीच्या निवासस्थानी, शेतात, मजुरीच्या हिशेबात, आरोग्य नोंदीत आणि तिच्या बोलण्याच्या अधिकारात व्हायला हवी.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;माझा मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभव&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काम करताना मला वारंवार जाणवले आहे की, हा विषय फक्त सॅनिटरी पॅड वाटण्यापुरता मर्यादित नाही. ग्रामीण, आदिवासी, शहरी झोपडपट्टी आणि वंचित भागांमध्ये फिरताना अनेक मुली आणि महिलांच्या अनुभवांतून एकच गोष्ट दिसली, पाळीबद्दल मौन आहे, &amp;nbsp;लाज आहे, अज्ञान आहे, सोयींचा अभाव आहेआणि आरोग्याविषयी गंभीर उपेक्षा आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;काही मुलींना पहिली पाळी आल्यावर काय घडते आहे हे समजलेले नसते. काही महिलांना जास्त रक्तस्राव, पोटदुखी किंवा संसर्ग हे उपचारयोग्य प्रश्न आहेत, हेच माहीत नसते. काही ठिकाणी शौचालय असतेपण पाणी नसते. काही ठिकाणी पॅड मिळतात, पण त्यांची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नसते. काही ठिकाणी पाळीबद्दल बोलणेही गैर मानले जाते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या अनुभवातून बीडमधील ऊसतोड महिलांचा प्रश्न अधिक खोलवर समजतो. कारण येथे मासिक पाळी ही केवळ आरोग्याची बाब नाही. ती मजुरीची, कर्जफेडीची, स्थलांतराची, सन्मानाची आणि जगण्याची बाब बनते. म्हणून या प्रश्नाकडे दयेच्या नजरेने नव्हे, तर हक्क, आरोग्य, श्रम आणि न्याय यांच्या चौकटीतून पाहिले पाहिजे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;समाजाचेमौन आणि व्यवस्थेचे अपयश&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपण पाळीबद्दल बोलायला संकोचतो; पण स्त्रियांनी पाळीच्या वेदनांत काम करावे, अशी अपेक्षा ठेवतो. &amp;nbsp;आपण स्त्रीच्या त्यागाचेकौतुक करतो; पण तिच्या आरोग्यासाठी सुरक्षित कामाची व्यवस्था निर्माण करत नाही. आपण ऊसतोड मजुरांना मेहनती म्हणतो; पण त्यांना पाणी, शौचालय, विश्रांती, आरोग्य तपासणी, &amp;nbsp;सुरक्षित निवास आणि न्याय्य मजुरी देण्याबाबत पुरेसेगंभीर होत नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हेफक्त बीडचेप्रकरण नाही. हेभारतातील असंघटित महिला श्रमाचेमोठे चित्र आहे. शेतीमजूर, बांधकाम मजूर, विटभट्टीवरील महिला, स्थलांतरित कामगार, घरगुती कामगार, कचरा वेचक, अनेक क्षेत्रांत महिलांचेश्रम वापरलेजातात; पण त्यांच्या शरीराच्या मर्यादा, आरोग्याच्या गरजा आणि सन्मान यांना पुरेसे स्थान दिले जात नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;स्त्रीच्या वेदनेला 'सहज' मानणेही आपली सामाजिक सवय झाली आहे. पण जेव्हा वेदना इतकी सामान्य केली जाते की, स्त्री स्वतःचे गर्भाशय काढण्याचा विचार करते, तेव्हा तो समाज आरोग्यदृष्ट्या नव्हे तर नैतिकदृष्ट्याही आजारी आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;शासनानेकाय करणे अपेक्षित आहे?&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शासनाने समित्या स्थापन करणे आवश्यक आहे; पण समित्यांवरच प्रश्न थांबू नये. आरोग्य विभाग, कामगार विभाग, महिला व बालविकास विभाग, ग्रामीण विकास विभाग, सहकार विभाग, साखर आयुक्तालय, &amp;nbsp;सामाजिक न्याय विभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी एकत्रित कृती करणे गरजेचे आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पहिले, बीड आणि ऊसतोडीशी संबंधित सर्व जिल्ह्यांत विशेष महिला आरोग्य सर्वेक्षण केले पाहिजे. या सर्वेक्षणात फक्त गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया मोजू नयेत; पाळीतील वेदना, रक्तक्षय, संसर्ग, &amp;nbsp;गर्भधारणा, प्रसूती, कर्ज, स्थलांतर, कामाचेतास, दंड आणि निवासस्थिती यांची संयुक्त माहिती घ्यावी. दुसरे, गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांचे वैद्यकीय आणि सामाजिक लेखा-परीक्षण करावे. शस्त्रक्रियेपूर्व तपासण्या, डॉक्टरांचा सल्ला, दुसरे वैद्यकीय मत, संमतीपत्र, रुग्णाला दिलेली माहिती, शस्त्रक्रियेची&lt;br /&gt;वास्तविक गरज आणि शस्त्रक्रियेनंतरची आरोग्य निगा यांची तपासणी व्हावी.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तिसरे, ऊसतोडीपूर्व आरोग्य तपासणी शिबिरे अनिवार्य करावीत. या शिबिरांत स्त्रीरोग तपासणी, रक्तक्षय तपासणी, पाळी आरोग्य समुपदेशन, औषधोपचार, पोषण सल्ला आणि आवश्यक असल्यास पुढील उपचारासाठी मार्गदर्शन द्यावे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;चौथे, प्रत्येक स्थलांतरित महिला मजुरासाठी स्वतंत्र आरोग्य नोंदवही तयार करावी. तिचेनाव 'कोयता'च्या मागे लपलेले राहू नये. तिचा आरोग्य इतिहास, पाळीची स्थिती, तपासणी, औषधे, शस्त्रक्रिया इतिहास आणि पुढील तपासणीची तारीख नोंदवली जावी.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पाचवे, मासिक पाळी आरोग्य कार्ड सुरू करावे. या कार्डामध्ये पाळीविषयी प्राथमिक माहिती, आरोग्य लक्षणे, उपलब्ध आरोग्यसेवा, समुपदेशकाचा संपर्क, तातडीची मदत आणि जवळचे आरोग्य केंद्र यांची माहिती असावी.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सहावे, ऊसतोडीच्या ठिकाणी पाणी, शौचालय, स्नानाची सोय, कपडे बदलण्यासाठी सुरक्षित जागा आणि कचरा व्यवस्थापन अनिवार्य करावे. ही सुविधा दान म्हणून नव्हे, तर कामगार हक्क म्हणून दिली पाहिजे. सातवे, पाळीदरम्यान स्त्रीला विश्रांती किंवा कामातील लवचिकता मिळाली पाहिजे. पाळीमुळे काम चुकले म्हणून दंड, कपात किंवा कर्जवाढवणेही अमानवी पद्धत थांबवली पाहिजे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आठवे, मुकादम नोंदणी प्रणाली मजबूत करावी. आगाऊ रक्कम, दंड, कपात, कामाचे दिवस, निवास, &amp;nbsp;वाहतूक आणि आरोग्य जबाबदारी यांचेलेखी नियम असावेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नववे, तरुण वयातील गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी दुसरे वैद्यकीय मत आणि समुपदेशन आवश्यक करण्याचा विचार करावा. आपत्कालीन परिस्थिती वगळता स्त्रीला निर्णय समजून घेण्यासाठी वेळ आणि माहिती दिली पाहिजे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दहावे, शस्त्रक्रियेनंतर दीर्घकालीन आरोग्य पाठपुरावा करावा. शस्त्रक्रिया झाली म्हणजे प्रश्न संपला असे समजू नये. तिच्या हाडांचे आरोग्य, रक्तक्षय, मानसिक आरोग्य, शरीरातील बदल, कामाची क्षमता आणि पोषण यांचा मागोवा घ्यावा.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;सामाजिक संस्थांची जबाबदारीची भूमिका&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या प्रश्नाकडे केवळ 'पॅड वाटप' म्हणून पाहणे अपुरे आहे. पॅड आवश्यक आहेत; पण पाणी नसेल, &amp;nbsp;शौचालय नसेल, सुरक्षित जागा नसेल, आरोग्य तपासणी नसेल, मजुरीत दंड असेल आणि स्त्रीला बोलण्याचा अधिकार नसेल, तर पॅड एकटा उपाय ठरू शकत नाही. सामाजिक संस्थांनी पाळी आरोग्य साक्षरता, स्त्रीरोग तपासणी शिबिरे, कायदेशीर मदत, समुपदेशन, &amp;nbsp;आरोग्य नोंदी, मुकादम व मजूर यांच्यातील माहिती पारदर्शकता आणि महिलांसाठी सुरक्षित तक्रार व्यवस्था निर्माण करावी.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;डॉक्टरांनी नैतिक वैद्यकीय पद्धतींचे पालन करावे. प्रत्येक शस्त्रक्रियेपूर्वी स्त्रीला पर्याय, धोके, परिणाम आणि उपचाराचे इतर मार्ग समजावून सांगितले पाहिजेत. वकिलांनी कर्जबंध मजुरी, दंडात्मक मजुरी आणि माहितीपूर्ण संमती या विषयांवर कायदेशीर मदत द्यावी. पत्रकारांनी या विषयावर सातत्याने, संवेदनशील आणि पुराव्याधारित लेखन करावे. संशोधकांनी दीर्घकालीन अभ्यास करावेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;CSR च्या माध्यमातून चल वैद्यकीय पथके, महिला आरोग्य केंद्रे, पाळी आरोग्य सुविधा, शौचालये, &amp;nbsp;पाण्याची व्यवस्था, रक्तक्षय प्रतिबंध कार्यक्रम, स्थलांतरित मुलांचेशिक्षण, महिलांसाठी समुपदेशन आणि स्वतंत्र तक्रारव्यवस्था उभारता येऊ शकते. साखर खरेदी करणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या पुरवठा साखळीत मानवी हक्क तपासणी, गुप्त महिला मुलाखती, स्वतंत्र सामाजिक तपासणी आणि सुधारणा निधी तयार केला पाहिजे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बीडमधील ऊसतोड महिलांचा प्रश्न आपल्याला एक अस्वस्थ करणारा आरसा दाखवतो. या आरशात आपल्याला दिसते की, बाजारातील गोडवा अनेकदा समाजातील सर्वात वंचित स्त्रीच्या मौनावर उभा असतो. &amp;nbsp;तिच्या पाळीला आपण समस्या म्हणतो, तिच्या विश्रांतीला तोटा म्हणतो, तिच्या आजाराला अडथळा म्हणतो, आणि तिच्या गर्भाशयाच्या अनुपस्थितीला कामासाठी सोय मानतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हे बदलायचे असेल तर भाषाच बदलावी लागेल. ऊसतोड महिला आधी मनुष्य आहे, नंतर मजूर. तिचेशरीर उत्पादनाचेसाधन नाही. तिची पाळी कामातील दोष नाही. तिची वेदना वैयक्तिक कमजोरी नाही. तिची शस्त्रक्रिया के वळ आकड्यात बंद होणारी घटना नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपण खात असलेली साखर फक्त गोड नाही. तिच्या कणांत काही स्त्रियांची वेदना, मासिक पाळीचे मौन, कर्जाची बेडी आणि श्रम शोषणाची कडू किंमत मिसळलेली असूशकते. म्हणून पुढच्या वेळी साखरेचा गोडवा जिभेवर लागला, तेव्हा एक प्रश्न मनात यायला हवा, ही साखर कोणाच्या शरीराच्या किंमतीवर तयार&lt;br /&gt;झाली आहे?&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;- धनंजय पुष्पलता करवीर ठाकरे,&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;लोकधोरण अभ्यासक तथा एम.पी.पी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;(वरील मतं आणि माहिती पूर्णपणे लेखकानं लिहिलेली असून ABP माझा फक्त माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.)&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/26/31e87ae31c80e2fe84f37687ef0e5629177977620130988_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[अर्जुन सचिन तेंडुलकर होणं सोप्पं नाही…]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/vijay-kesarkar-write-about-arjun-sachin-tendulkar-struggle-and-his-patience-in-his-cricket-field-1425288</link><comments>https://marathi.abplive.com/blog/vijay-kesarkar-write-about-arjun-sachin-tendulkar-struggle-and-his-patience-in-his-cricket-field-1425288#respond</comments><pubDate>Sun, 24 May 2026 14:17:18 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ विजय केसरकर, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ क्रीडा ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/vijay-kesarkar-write-about-arjun-sachin-tendulkar-struggle-and-his-patience-in-his-cricket-field-1425288</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;क्रिकेटचा देव म्हणून जगभरातील दिग्गज खेळाडू ज्याचे पूजन करतात त्या सचिन तेंडुलकरच्या अर्जुन सचिन तेंडूलकरला अखेर आयपीएलमध्ये एका सामन्यात का असेना संधी मिळाली. लखनऊ संघाचा या हंगामातील शेवटचा सामना होता. पाण्याची बॉटल घेऊन मैदानात येणारा अर्जुन थेट खेळण्यासाठी उतरला. गेल्या अनेक वर्षांपासून अर्जुन मैदानावर कधी उतरेल याची मी व्यक्तीश: वाट पाहत होतो. अर्जुननं 5 बॉलमध्ये 5 धावा आणि 4 षटकांत 36 धावा देऊन 1 बळी मिळवला हे आपण सर्वांनी काल पाहिलं. मात्र, त्यानंतर अनेकांनी अर्जुनला समाज माध्यमांतून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. या आधी अनेकदा अर्जूनला ट्रोल केलं होतं. आता देखील ट्रोल करण्याची संधी नेटिझन्सनी सोडली नाही, पण अर्जूनच्या बाजूनं देखील अनेकांनी पोस्ट केल्याचं पाहायला मिळालं. अर्जुननं केलेली कामगिरी अत्यंत कौतुकास्पद होती. कारण जगातील कोणत्याच खेळाडूवर जितकं दडपण नसेल तितकं दडपण गेल्या अनेक वर्षांपासून अर्जुन सहन करत आला आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;खचला नाही तो संधीची वाट पाहत राहिला&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सचिन तेंडुलकरचा मुलगा म्हटल्यानंतर सर्वजण अपेक्षा करणार यात काही चूक नाही. पण तो सचिन होता आणि हा अर्जुन आहे. बापाप्रमाणे मुलानं देखील तितकंच चांगल्या पद्धतीनं खेळलं पाहिजे असं काही नाही. पण त्याचे प्रयत्न कुठंच कमी पडत नव्हते हे देखील तितकंच महत्वाचे आहे. 14-15 वर्षांची वैभव सूर्यंवंशी सारखी सामान्य कुटुंबातून आलेली मुलं अख्खं क्रिकेट विश्व गाजवत आहेत. अशावेळी अर्जूनच्या ठिकाणी दुसरा कुणी असता तर पुर्णपणे खचून गेला असता, पण अर्जून खचला नाही तो संधीची वाट पाहत राहिला. संधी मिळाल्यानंतर त्यानं झलक दाखून दिली. सचिन तेंडुलकर नावाच्या कुबड्या त्यानं कधीही घेतल्या नाहीत.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तग धरुन राहण्याला देखील खूप धाडस लागतं&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अर्जुन तेंडूलकर हा मुळात काहीसा लाजाळू मुलगा आहे. कोल्हापुरात आल्यानंतर नृसिंहवाडी आणि पुन्हा कोल्हापूरपर्यंत त्याच्यासोबत प्रवास करण्याचा योग आला होता. फारसा बोलणार नाही पण कुणाला दुखवणार देखील नाही असा त्याचा स्वभाव आहे. अलिकडेचं एका मुलाखतीमध्ये तो अगदी मोजून मापून वाक्य बोलल्याचं आपण पाहिलं आहे. सध्या तो गोवा राज्याकडून खेळतो. क्रिकेट सोडून इतर क्षेत्रातील मुलांसोबत त्याची मैत्री आहे. मित्रांमध्ये तो क्रिकेटविषयी बोलत नाही. कदाचित त्यामुळंच तो टिकाकार दुनियेपासून लांब राहिला. ग्रामीण भागात एक म्हण आहे, मोठ्या झाडाखाली छोटं झाड कधीच मोठं होतं नाही. मोठ्या झाडाखाली असणाऱ्या छोट्या छोट्या झाडांना लगेच काढून फेकून दिलं जातं. मात्र अशावेळी तग धरुन राहण्याला देखील खूप धाडस लागतं. ते धाडस अर्जुन तेंडुलकरमध्ये सध्या दिसत आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पण कधी माज दाखवला नाही&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अर्जून तेंडूलकरनं काल संधीचं सोनं केल्यानंतर सचिन सुखावला. त्यानं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून एखाद्या बापाचा आनंद काय असतो ते पाहायला मिळाले. अर्जुन हा सचिन तेंडूलकरच्या नावानंच जगभर प्रसिद्ध आहे. अर्जूनच्या सोबतची किंवा त्यापेक्षा लहान मुलं क्रिकेट विश्वात नाव गाजवत आहेत. अशावेळी बाप म्हणून सचिनवर काहीसं दडपण असणार हे नक्की, पण त्यानं कधी ते अर्जुनला किंवा सार्वजनिक ठिकाणी दाखवलं नाही. सचिननं केलेल्या पोस्टमधून त्याच्या मनावर आतापर्यंत दाटून आलेलं मळभ दूर झाल्याचं दिसत होतं. काल सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली, आमच्याकडं गावात सरपंचाचं पोरगं असलं तर त्याला सगळ्यात आधी बॅटिंग आणि बॉलिंग द्यायला लागतीय पण इथं ज्याच्या बापाला क्रिकेट देव समजला जातो त्याच्या मुलानं ड्रेसिंग रुममध्ये कित्येक महिने बसून काढले, पाण्याची बॉटल घेऊन मैदानात गेला पण कधी माज दाखवला नाही, म्हणून अर्जून सचिन तेंडुलकर होणं सोप्पं नाही.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/24/3bc8c8c088d852cf95da770e701147361779612312594736_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[नकाराला स्वीकारणं....एक आव्हान]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/accepting-rejection-a-challenge-blog-by-aswin-bapat-1425010</link><comments>https://marathi.abplive.com/blog/accepting-rejection-a-challenge-blog-by-aswin-bapat-1425010#respond</comments><pubDate>Fri, 22 May 2026 07:38:26 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अश्विन बापट, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ लाईफस्टाईल ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/accepting-rejection-a-challenge-blog-by-aswin-bapat-1425010</guid><description><![CDATA[&lt;p&gt;आयुष्यात सर्वात आव्हानात्मक गोष्टींची यादी आपण केली तर त्यात पहिल्या पाचांमध्ये येणारा घटक म्हणजे नकाराला स्वीकारणं. अर्थात हे माझं मत आहे. नकार... म्हणायला फक्त तीन अक्षरी शब्द आहे....पण, त्या नकार स्वीकारण्याने किंवा न स्वीकारण्याने आयुष्य बदलून गेल्याच्या अनेक घटना आपण आजूबाजूला पाहतो. वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत सगळीकडेच या नकाराचा रोल फार मह्त्त्वाचा असतो. यामध्ये मला जास्त फोकस सध्या करायचाय तो लहान वयावर. अर्थात संस्कारक्षम वयावर. पाच ते पंधरा या वयोगटातल्या मुलांचं मन हे मातीच्या गोळ्यासारखं असतं. त्याला आकार द्याल तसं ते घडतं. त्याच वयात म्हणजे पाच वर्षांपासून थोडंसं कळू लागल्याने मागण्या खरं तर हट्ट वाढलेले असतात. हेच हवं, असंच हवं, इतकंच हवं. एक ना अनेक. याच वेळी आईवडील मुलाला हवं तेव्हा हवं ते देत गेले तर, त्याचा आनंद तुम्हाला तात्पुरता सुखावेल. पण, दीर्घकालीन विचार केल्यास ही धोक्याची पहिली पायरी आहे. जिथे तुम्ही मुलांच्या मागण्यांना ब्रेक लावायला हवा. अशा डिमांड्सचं रुपांतर पुढे हव्यासात झालं तर नुकसान होतं.&lt;/p&gt;
&lt;p&gt;एखादी महागडी वस्तू, ड्रेस, महागड्या हॉटेलचं जेवण अगदी काहीही या लिस्टमध्ये असू शकतं. केवळ मुलांच्या चेहऱ्यावरच्या आनंदापोटी तो म्हणेल तसं प्रत्येक वेळी आपण करत गेलो तर पुढे थोडं मोठं झाल्यावर हीच महत्त्वाकांक्षा हव्यासामध्ये बदलली जाते आणि वाटचाल खडतर होते. सगळंच बिनसत जातं. सध्याच्या धावपळीच्या आणि कॉर्पोरेट कल्चरच्या युगात आईवडील मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. याचंही गिल्ट काही वेळा त्यांच्या मनात असतं. म्हणूनही मुलांचे लाड अनेकदा पुरवले जातात. त्यात सध्या छोट्या कुटुंबात म्हणजे बऱ्याच ठिकाणी एकच मूल (हम दो हमारा एक) कुटुंबात असतं. याहीवेळी ही डिमांडिंग सवय वाढत जाते. एकाच मुलावर आईवडिलांचं लक्ष केंद्रित असतं. साहजिकच लाड, प्रेम, कौतुक सर्व काही त्याचंच होत असतं. ही आईवडिलांसाठी फार ट्रिकी सिच्युएशन आहे. 'मागाल ते पुरवू'चा फार चुकीचा संदेश या मुलांमध्ये जातो. पुढे मुलं फार आक्रस्ताळी, मनमानी करणारी होऊ शकतात. जे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठीही घातक आहे. म्हणून अगदी याच म्हणजे पाच ते पंधरा वयातच आईवडिलांनी मुलांना ग्रेसफुली नकार द्यायला हवा आणि तो तितक्याच खिलाडूवृत्तीने पचवायलाही शिकवायला हवा.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;काळानुरूप खूप गोष्टींची उपलब्धता असणं हाही फॅक्टर यामध्ये महत्त्वाचा आहे. म्हणजे आमची पिढी जेव्हा पाच वर्षांची होती म्हणजे ८० च्या दशकात...तो काळ आणि आताची पिढी जेव्हा पाच वर्षाच्या वयोगटात आहे म्हणजे २०२६ चा काळ. आजूबाजूला जग प्रचंड बदललंय. आपला जगण्याचा वेग वाढलाय, आर्थिकदृष्ट्याही परिस्थिती बदलल्याने पर्चेसिंग पॉवर अर्थात वस्तू किंवा सेवा विकत घेण्याची क्षमता वाढलीय. यामुळे मनोरंजनाचे, एन्जॉयमेंटचे पर्याय रुंदावलेत. वाढलेत, त्यात फाईव्ह जीच्या वेगाने सुटणाऱ्या मनाच्या घोड्याला लगाम घालणं कठीण आहे. म्हणूनच आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडत असलं तरी त्या गोष्टीची मुलांना त्या वेळी खरंच गरज आहे का हा विचार ठराविक वयानंतर तरी व्हायलाच हवा. नाहीतर आपल्या प्रत्येक मागणीला आईवडील होकारार्थी घेऊन ती मान्य करतायत, हा अत्यंत चुकीचा मेसेज मुलांमध्ये जातो. अमृता सुभाष एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर एका एपिसोडमध्ये फार खोलवर विचार करायला लावणारं वाक्य बोलली होती... ती म्हणाली होती, आपण सकारात्मक होण्यासोबतच स्वीकारात्मक व्हायला हवं. या एका वाक्यातच सारं आलं. या स्वीकारात्मक शब्दात अनेक स्वीकार आहेत तसाच नकाराचाही स्वीकार अपेक्षित आहे. हे लिहिणं म्हणजे कुणाला काही शिकवण्याचा हेतू नाही, किंवा कुणाला टोकण्याचाही हेतू नाही. आयुष्याच्या या बाजूकडेही अतिशय डोळसपणे आणि तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न इतकाच याचा हेतू आहे.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/22/d0234b9a661f1382e9426b5aee1e1f141779415655644987_original.jpg" width="220"/></item></channel></rss>