<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>'पन्हाळगड ते पावनखिंड' पदभ्रमंती... इतिहासातून माणसाला समृद्ध करणारा भन्नाट निसर्ग अनुभव</title><atom:link href="https://marathi.abplive.com/blog/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Wed, 16 Sep 2026 04:16:21 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/blog-of-narendra-bandabe-shobhita-thakur-khilawadi-short-film-banchhada-girl-russia-film-festival-entertainment-marathi-1439095</link><comments>https://marathi.abplive.com/blog/blog-of-narendra-bandabe-shobhita-thakur-khilawadi-short-film-banchhada-girl-russia-film-festival-entertainment-marathi-1439095#respond</comments><pubDate>Mon, 14 Sep 2026 21:58:03 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ नरेंद्र बंडबे ]]></dc:creator><category><![CDATA[ करमणूक ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/blog-of-narendra-bandabe-shobhita-thakur-khilawadi-short-film-banchhada-girl-russia-film-festival-entertainment-marathi-1439095</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;BLOG&lt;/strong&gt; :&amp;nbsp;दिग्दर्शिका आणि लेखिका शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी' (2026) - 'The One Who Plays&amp;rsquo; या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा डंका वाजवलाय. या चित्रपटाला रशियातील प्रतिष्ठित 'कझान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' (Kazan International Film Festival) 'बेस्ट शॉर्ट फिल्म' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;'खिलावडी' हा चित्रपट सध्या जगभरातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने यापूर्वी कॅनडातील 'फॅसिनेशियन फिल्म फेस्टिव्हल' (Fascinasian Film Festival) मध्येही पुरस्कार जिंकलाय. याशिवाय, फ्रान्समधील 'फेस्टिव्हल डू फिल्म डी नॅन्सी' (Festival du Film de Nancy) मध्येही या चित्रपटाची अधिकृत निवड झालीय. विशेष म्हणजे, या दोन्ही आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये 'लाँग शॉर्ट फिल्म' (Long Short Film) श्रेणीत भारताचं प्रतिनिधित्व करणारा 'खिलावडी' हा एकमेव चित्रपट ठरला.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;आता भारतात होणार स्क्रीनिंग&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;परदेशातील चित्रपट महोत्सव गाजवल्यावर आता 'खिलावडी' भारतीय प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झालाय. &amp;nbsp;भारतातल्या नामांकित 'जागरण फिल्म फेस्टिव्हल' (Jagaran Film Festival) मध्ये 'खिलावडी'चे स्क्रीनिंग केलं जाणारेय.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;काय आहे 'खिलावडी'ची कथा?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हा चित्रपट मध्य प्रदेशातील एका अशा समाजावर आधारित आहे, जो आजही मुख्य प्रवाहापासून दूर आहे. आपल्या देशात अशा अनेक जमाती आहेत, ज्यांनी स्वातंत्र्याचा अर्थ काय असतो हे अजून अनुभवलेले नाही. जुन्या रूढी-परंपरा आणि सामाजिक परिस्थितीमुळे हा समाज आजही दलदलीत अडकला आहे. जर कोणी यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तर स्पर्धेच्या या युगात मागे पडतो आणि पुन्हा त्याच जुन्या, कायद्याने बंदी असलेल्या कामांकडे वळण्यास भाग पडतो. &amp;lsquo;खिलावडी&amp;rsquo; चित्रपट मध्य प्रदेशातील अशाच एका 'बांछडा' (Banchhada) या विमुक्त जमातीतल्या मुलींच्या वास्तविक जीवनावर प्रकाश टाकतो. ही कथा आहे एका १२ वर्षांच्या मुलीची; तिला डॉक्टर व्हायचे आहे. जुन्या सामाजिक चौकटी मोडून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची तिची धडपड आणि बदलाच्या शक्यतांवर या चित्रपटात भर दिलाय.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&amp;rsquo;पिछले पन्ने की औरतें' आणि 'खिलावडी&amp;rsquo;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;प्रसिद्ध लेखिका शरद सिंह यांच्या &amp;lsquo;पिछले पन्ने की औरतें&amp;rsquo; या पुस्तकात मध्य प्रदेशातील या अनिष्ट प्रथेवर जोरदार आसूड ओढलेत. हे रिपोर्टाज आहेत. मध्य प्रदेशात अशा अनेक जमाती आहेत, ज्यांमधील स्त्रियांना सामाजिक प्रथेचा भाग म्हणून देहविक्रयाच्या दलदलीत ढकललं जातं. धक्कादायक बाब म्हणजे त्यांचा सौदा करणारे हे त्यांच्या घरातील &amp;lsquo;कर्ते पुरुष&amp;rsquo;च असतात. म्हणजेच घरातील बाप किंवा भाऊ आपल्या मुलीला किंवा बहिणीला परपुरुषाला विकतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;काही समाजांमध्ये स्त्रीला काही वर्षांसाठी भाड्याने घेण्याचीही प्रथा आहे. त्यातून जन्माला येणाऱ्या मुलांची जबाबदारी स्त्रीचीच, अशी पुरुषसत्ताक आखणी या समाजात केलेली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;'खिलावडी'तली मुलगी ही अशाच संबंधातून जन्मलेली आहे. आपल्याकडे फासेपारधी समाजावर जसा 'चोर आणि दरोडेखोर' असा ठप्पा लावला गेला आहे, तसाच हा बांछडा समाजही पोलीस आणि समाजाच्या नजरेत गुन्हेगार ठरवला गेलाय. या समाजातल्या महिला वेश्याव्यवसाय करतात, हायवेला किंवा नाक्यावर उभ्या राहतात. तिथेच उभे राहून यांचा सौदा घरातले पुरुष करत असतात. घर चालवण्याची आणि पैसे कमवण्याची जबाबदारी महिलांची; तर पुरुष फक्त तिचा व्यवहार करणार आणि आराम करणार, अशी विचित्र आणि विकृत पुरुषसत्ताक रचना इथं तयार झालीय.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मध्यंतरी राजधानी दिल्लीला लागून असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांच्या सीमावर्ती भागात सुरू असलेल्या महिलांच्या खरेदी-विक्रीच्या बाजाराविरोधात मोठी मोहीम हाती घेण्यात आली. अनेक स्वयंसेवी संस्था (NGO), पोलीस आणि सरकारही कामाला लागले होते. परंतु, समाजात मुरलेली ही कुप्रथा आजही सुरूच आहे, हेच शोभिता ठाकूर यांच्या चित्रपटातून समोर येतं.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शोभिता ठाकूर यांनी या संवेदनशील विषयाला जागतिक मंचावर आणलंय. असे करून त्यांनी या गंभीर समस्येकडे जगाचे केवळ लक्षच वेधले नाही, तर भारतीय सिनेमाची ताकदही दाखवून दिलीय.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/09/14/035a0375722aedd9027e5bc9df5ab63b178940324007093_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Ekadesham Movie: डॉन पलाथराच्या 'एकदेशम' (2026) ची जर्मनीतल्या फिल्मफेस्ट आचेनमध्ये वर्णी]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/don-palathara-ekadesham-2026-movie-selected-for-filmfest-aachen-in-germany-blog-by-narendra-bandabe-1438871</link><comments>https://marathi.abplive.com/blog/don-palathara-ekadesham-2026-movie-selected-for-filmfest-aachen-in-germany-blog-by-narendra-bandabe-1438871#respond</comments><pubDate>Sat, 12 Sep 2026 13:41:15 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ नरेंद्र बंडबे ]]></dc:creator><category><![CDATA[ करमणूक ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/don-palathara-ekadesham-2026-movie-selected-for-filmfest-aachen-in-germany-blog-by-narendra-bandabe-1438871</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Ekadesham Movie:&lt;/strong&gt; दिग्दर्शक डॉन पलाथरा यांच्या 'एकदेशम' (2026) या नवीन सिनेमाची फिल्मफेस्ट आचेन, जर्मनी (23-27 सप्टेंबर 2026) इथं निवड झालीय. हा या सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर असेल. मल्याळम भाषेतला हा सिनेमा 'फिल्म विदिन फिल्म' (Film within a Film) या श्रेणीत मोडतो; म्हणजेच ही सिनेमा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचीच गोष्ट आहे. डॉन पलाथरा हा केरळतला एक महत्त्वाचा आणि आघाडीचा दिग्दर्शक आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;'एकदेशम' या शब्दाचा मराठीत अर्थ 'बहुतेक' किंवा 'जवळपास' असा होतो. ही सिनेमा क्षेत्रात संघर्ष करणाऱ्या चार पात्रांची गोष्ट आहे. ती कोची शहरात घडते. सरथ (रोशन मॅथ्यू) हा एक इंडिपेंडंट फिल्ममेकर आहे. श्रेया (दिव्या प्रभा) ही एक असिस्टंट डायरेक्टर आहे, जिला पुढे जाऊन स्वतः दिग्दर्शक व्हायचंय.. तिसरे पात्र म्हणजे टॅक्सी चालवणारा आणि अभिनेता होण्यासाठी संघर्ष करणारा एलन; आणि चौथी आहे निमिशा, जी सरथची पत्नी आणि एलनची पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड आहे. एकाच शहरात राहणाऱ्या या चारही पात्रांचा संघर्ष वेगवेगळा आहे. या संघर्षातून त्यांना नक्की काय मिळते, हीच 'एकदेशम'ची मूळ थीम आहे. आपल्या आयुष्यात अनेकदा अनेक गोष्टी 'जवळपास घडण्याच्या' प्रक्रियेत येतात. ही प्रक्रिया तुमच्या नातेसंबंधांवर आणि माणूस म्हणून स्वतः तुमच्यावर किती व कसा परिणाम करते, याभोवती हा सिनेमा फिरतो आणि सिनेमा क्षेत्रातील लोकांची एक रंजक गोष्ट सांगतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;'फॅमिली' (2023), '1956 सेंट्रल त्रावणकोर' (2020), 'जॉयफुल मिस्ट्री' (2021) आणि 'एव्हरीथिंग इज सिनेमा' (2021) असे उत्तम मल्याळम सिनेमे डॉनच्या नावावर आहेत. या सर्वच सिनेमांनी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्स गाजवलेत. &amp;nbsp;विशेषतः 'एव्हरीथिंग इज सिनेमा' आणि 'जॉयफुल मिस्ट्री' या दोन सिनेमांतल्या प्रयोगशीलतेमुळे डॉनला मल्याळम चित्रपटसृष्टीत एक वेगळ्या धाटणीचा दिग्दर्शक म्हणून ओळख मिळाली. डॉन सध्या पार्वती थिरुवोथु ('करीब करीब सिंगल' फेम) आणि दिलाश पोथन या दोघांना घेऊन एका मोठ्या सिनेमाची निर्मिती करतोय.. त्याआधी येणारा 'एकदेशम' हा डॉन यांच्या कारकिर्दीतील एक अत्यंत महत्त्वाचा सिनेमा ठरणारेय. विशेष म्हणजे 'एकदेशम'चा डीओपी (DOP) आणि एडिटर अशा दोन्ही भूमिका डॉननं निभावल्यात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;डॉनच्या सिनेमांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील पात्रे आपल्या आसपास दिसणाऱ्या लोकांसारखीच असतात. तो अनेकदा ह्युमरचा (विनोद) वापर करून समाजातल्या अनेक गोष्टींवर प्रकाश टाकतो, परिस्थितीची जाणीव करून देतो. त्याचे सिनेमे आणि त्यातील पात्रं समाजातील चांगल्या-वाईट गोष्टींचा सामना करतात. समाजात नक्की काय घडते आहे किंवा काय घडले आहे आणि माणूस म्हणून आपण कुठे आहोत, असे प्रश्नं ही पात्रं स्वतःला सतत विचारताना दिसतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या सिनेमात महेश नारायणन या मल्याळम इंडस्ट्रीतील आघाडीच्या दिग्दर्शकाने स्वतःचीच भूमिका (कॅमिओ/Self Role) केली आहे. हा चित्रपटसृष्टीतील लोकांशी संबंधित सिनेमा असल्यामुळे, डॉन याकडे 'सेल्फ-क्रिटिसिझम' (आत्मसमीक्षा) म्हणून पाहतो. डॉन यांच्या पात्रांची ही आत्मसमीक्षा समाजालाही तंतोतंत लागू पडते. यामुळेच हा सिनेमा जितका वैयक्तिक (Personal) वाटतो, तितकाच तो जागतिक पातळीवरही जोडला जातो. 'पर्सनल इज पॉलिटिकल' (Personal is Political) या संकल्पनेतून आकाराला येणाऱ्या त्याच्या गोष्टी प्रेक्षकांसमोर समाजाचा आरसा धरतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जर्मनीतील वर्ल्ड प्रीमियरनंतर 'एकदेशम' जगभरातील विविध फिल्म फेस्टिव्हल्समध्ये प्रदर्शित केला जाईल.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/09/12/08b551ac50c616a3a1885941437e7a77178920062654088_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[The voice of Hind Rajab: 'व्हॉईस ऑफ हिंद रिजाब'नंतर आता गाझा सिनेमा अकादमी; व्हेनिसमध्ये मोठी घोषणा]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/after-voice-of-hind-rijab-now-the-gaza-cinema-academy-major-announcement-in-venice-blog-by-narendra-bandabe-1438398</link><comments>https://marathi.abplive.com/blog/after-voice-of-hind-rijab-now-the-gaza-cinema-academy-major-announcement-in-venice-blog-by-narendra-bandabe-1438398#respond</comments><pubDate>Tue, 8 Sep 2026 11:56:28 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ नरेंद्र बंडबे ]]></dc:creator><category><![CDATA[ करमणूक ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/after-voice-of-hind-rijab-now-the-gaza-cinema-academy-major-announcement-in-venice-blog-by-narendra-bandabe-1438398</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;The voice of Hind Rajab:&lt;/strong&gt; इटलीत सुरू असलेल्या 83 व्या व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'गाझा सिनेमा अकादमी' सुरू करण्याची घोषणा करण्यात आलीय. पॅलेस्टिनी फिल्ममेकर एझालदीन शालाह (Ezzaldeen Shalah) आणि माई मसरी (Mai Masri) यांनी ही अकादमी सुरू झाल्याचे सांगितले. गाझापट्टीत चित्रपट शिक्षणासाठी आणि निर्मितीसाठी एक कायमस्वरूपी आणि सुरक्षित जागा तयार करावी हा 'गाझा सिनेमा अकादमी'चा मुख्य उद्देश आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;इस्रायल-पॅलेस्टाइन युद्धामुळे गाझापट्टी अगदी बेचिराख झालेय.गेल्या वर्षभरात इथल्या मानवी हक्कांसंबंधीच्या बातम्यां वृत्तपत्रे आणि इतर माध्यमांमध्ये प्राधान्यानं दिसतायत. गेल्या वर्षी व्हॉईस ऑफ हिंद रिजाब (2025) या सिनेमाने गाझात राहणाऱ्या लोकांची कुचंबना आणि अगतिकता दाखवली. गाझातल्या नागरिकांना नक्की काय भोगावे लागतंय, याची गोष्ट पाच वर्षीय हिंद रिजाबच्या ऑडिओ क्लिपद्वारे जगासमोर आली. त्यावर आधी डॉक्युमेंट्री बनली आणि लगेच कौथर बेन हानियाने त्यावर हा सिनेमा बनवला. तो थेट ऑस्करपर्यंत पोहोचला. गाझातल्या मानवी हक्कांच्या पायमल्लीची गोष्ट जगाला समजली. त्याची दाहकता समजली. हिंद रिजाबच्या दुःखाशी जग जोडले गेले. यातून एक गोष्ट झाली ती म्हणजे हिंद रिजाबला न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. आधी फक्त एक नॉर्मल प्रतिहल्ला म्हणून या घटनेकडे पाहिले गेलं. सिनेमानंतर हिंद रिजाब आणि तिच्या कुटुंबियांच्या गाडीवर हल्ला नक्की कसा झाला? याची चौकशी करण्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु झाली. आता ही चौकशी होणारेय. या सर्व पार्श्वभूमीवर गाझा सिनेमा अकादमीची घोषणा फार महत्त्वाची आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अकादमी तर्फे गाझातले तरुण आणि खासकरून महिलांना आपल्या गोष्टी जगाला सांगण्याची संधी मिळणारेय. खरंतर याची सुरुवात साल 2024 पासून झाली होती. अकादमीच्या कार्यपध्दतीची आखणी करण्यात आली. मार्च 2026 ला 25 तरुण पॅलेस्टिनी महिलांसाठी नऊ महिन्याचा फिल्ममेकिंग डिप्लोमा सुरू झाला. आता अल-क्वेड ओपन युनिव्हर्सिटीने यात पुढाकार &amp;nbsp;घेतला. अकादमीमुंळं स्थानिक तरुण फिल्ममेकर्सना आपली गोष्ट सांगण्याची कायमस्वरूपी संधी मिळणारेय. याला रामी युसुफ, हिएम अब्बास आणि सालेह बक्री तसेच हिंद रिजाबच्या दिग्दर्शिका कौथर बेन हानिया यांनी पाठिंबा दिला आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एझालदीन शालाह (Ezzaldeen Shalah) यांच्या मते, &quot;गाझात सिनेमा फक्त आर्ट नाही. सिनेमा म्हणजे आठवणी जपणे, नव्या पिढीसाठी तात्कालिक दृश्यांचे संवर्धन करणं आणि आम्हाला आमची गोष्ट सांगता येणं अशा पद्धतीने सिनेमाकडे आम्ही पाहतो...&quot; ही अकादमी गाझातल्या नव्या व्हिजनला आणि त्यांच्या क्रिएटिव्हिटीला आकार देईल अशी आशा शालाह यांनी व्यक्त केलीय.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;व्हेनिस आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल हा जगातला नावाजलेला फिल्म फेस्टिव्हल आहे. यंदा इथे दिग्दर्शक अहमद हस्सूनाचा सिटीझन ओसामा (2026) आणि मुआयद अलायनचा कन्व्हर्सेशन विथ द सी असे दोन गाझातले सिनेमे दाखवण्यात येत आहेत. जगभरातल्या फिल्ममेकर्स, युनिव्हर्सिटी आणि फिल्म फेस्टिव्हल्सनी या अकादमीला सपोर्ट करावा. गाझातल्या नव्या दमाच्या दिग्दर्शकांना त्यांच्या क्रिएटिव्ह आवाजाला प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;नरेंद्र बंडबे यांचे महत्त्वाचे इतर ब्लॉग :&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/blog/the-drama-movie-review-by-narendra-bandabe-simon-dillon-cinema-marathi-news-1437802&quot;&gt;The Drama Movie Review: द ड्रामा (2026) - 'कॅन्सल कल्चर&amp;rsquo; नात्यातलं आणि 'प्रेमा'तलंही&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/09/08/70f688a4732efbe84e44d1e3c6cd875f178884876574288_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Furious Movie Review: कोलमडलेल्या व्यवस्थेतली 'अँग्री वुमन'; फ्युरीयस वेब सिरीजनं बदलला क्राईम थ्रिलरचा पॅटर्न]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/furious-movie-review-by-narendra-bandabe-hulu-web-series-hollywood-1437940</link><comments>https://marathi.abplive.com/blog/furious-movie-review-by-narendra-bandabe-hulu-web-series-hollywood-1437940#respond</comments><pubDate>Fri, 4 Sep 2026 12:37:27 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ नरेंद्र बंडबे ]]></dc:creator><category><![CDATA[ करमणूक ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/furious-movie-review-by-narendra-bandabe-hulu-web-series-hollywood-1437940</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Furious Movie Review:&lt;/strong&gt; बऱ्याचशा क्राईम शोमध्ये (Crime Show) काय असतं? एक चांगला पोलीस अधिकारी असतो जो गुन्हेगाराला पकडतो. पण हुलूची (Hulu) नवीन सिरीज &amp;lsquo;Furious - फ्युरीयस (2026) यापेक्षा पूर्णपणे वेगळीय. हा थ्रिलर शो स्त्रीवादी दृष्टिकोनातून गुन्हेगारीकडे बघतो आणि त्यातील स्त्री पात्रांच्या एकमेकींशी जोडलेल्या वेदनेवर लक्ष केंद्रित करतो. शोमधील महिला सिरियल किलरला एक वेडी किंवा अघोरीन दाखवता, तिच्या या रागामागची खरी कारणं केलीयत. जेव्हा आपली कायदा आणि न्याय व्यवस्था शक्तिशाली शोषकांचे रक्षण करते, कुणालाही राग येणं स्वाभाविकच आहे. फ्युरीयसमध्ये याचा फेमिनिस्ट दृष्टीकोन असल्यानं ते जास्त भावतं. व्यवस्था महिलांच्या बाबतीत कशी अपयशी ठरते आणि जेव्हा महिला याविरोधात उभ्या ठाकतात तेव्हा काय होऊ शकतं हे फ्युरीयस दाखवून देतं.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एलिझाबेथ मेरीवेदर या फ्युरीयस शोच्या क्रिएटर आहेत. या शोमध्ये एकूण आठ एपिसोड. आहेत. जे दोन पुरुष (ब्रायन किर्क, आणि कॉरी फिन्ले) आणि दोन महिला (कॅरिना इवान्स आणि डेस्टिनी इकारघा) दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;तोकड्या कपड्यांपलिकडे जाऊन पुरुषी नजरेला छेद&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जुन्या हॉलिवूड सिनेमांमध्ये महिला किलर्सना बऱ्याचदा अवाजवी ग्लॅमरस दाखवलं जातं. घट्ट लेदरचे कपडे किंवा चकचकीत ड्रेसेस दाखवले जातात. ही आत्तापर्यंत पुरुषाच्या नजरेतून तयार झालेली स्त्री क्रिमिनल आहे. 'Furious' मधली सिरियल किलर कॅथरीन अगदी सर्वसामान्य दिसते. सर्वसाधारण कपडे घालते. या पारंपारीक महिला क्रिमिनल्सला पुरुषी कल्पनेतून बाहेर काढत थेट फेमिनिस्ट पर्याय देते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;लहानपणी तिचं लैंगिक शोषण करणाऱ्याला जेव्हा ती संपवते तेव्हा ती थ्रिलर सिनेमातल्या व्हिलनसारखी अजिबात दिसत नाही. त्याऐवजी, ती साधासुधा मांजराचा मास्क आणि सैल किंवा जड असे सोयीस्कर कपडे घालते. तिचे कपडे फॅशनसाठी नसून फक्त तिच्या बदल्यासाठी सोयीचे ठरणारे आहेत. ती वेगावान हालचाल करु शकते, मास्कपलिकडे स्वतःची ओळख लपवते आणि अंधारात सहज मिसळून जाते. कॅथरीनच्या दिसण्यातून ग्लॅमर काढून घेतल्यामुळं, हा शो प्रेक्षकांना तिच्या शरीराऐवजी तिच्या कृत्यांवर लक्ष केंद्रित करायला भाग पाडतो. तिचा हा बदला म्हणजे परफॉर्मन्स नसून, एक थंड डोक्याने केलेले काम बनतं. फेमिनिस्ट कथानकासाठी ही कपड्यांची निवड खूप महत्त्वाची आहे, कारण यामुळे या पात्राला ती जगासमोर कशी दिसणार यावर पूर्ण नियंत्रण मिळतं.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;भवतालच्या सखोल अभ्यासातून घडणारं कथानक&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हॉलीवूड असो की हिंदी सिनेमा व्यवस्थेच्या समस्या मांडण्याठी प्रचंड डायलॉगबाजी केली जाते. फ्युरीयस याला छेद देते. व्यवस्थेनं नाडलेली महिला पात्रं दाखवण्यासाठी संवाद नाही तर भवताल आणि सेट डिझाऊनचा योग्य वापर केलेला आहे. यातून सत्ता कशी काम करते याची अनुभूती मिळते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पुरुष बॉस सोबतचे बहुतांश सीन्स एफबीआयची (FBI) मोठी ऑफिसेस आणि कॉर्पोरेट बोर्डरूम्समध्ये होतात. या खोल्या थंडगार काच, स्टील आणि उंच छतांनी बनलेल्या आहेत. कॅमेरा एँगल मुद्दामहून वाईड ठेवण्यात आलाय. ॲलिस आणि नोरा सारखी पात्रं खूप लहान आणि एकटी वाटतात. ही महाकाय, आरपार दिसणारी काचेची इमारत थंड व्यवस्थेचे प्रतीक आहेत, जी महिलांवर नजर तर ठेवते पण त्यांचं रक्षण करायला नकार देते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दुसरीकडे, जेव्हा महिला पात्रं एकमेकींशी बोलतात, तेव्हा शोचे वातावरण पूर्णपणे बदलते. जेव्हा ॲलिस पीडित महिलांची चौकशी करते किंवा नोरासोबत केस प्लॅन करते, तेव्हा ती जागा लहान आणि खाजगी खोल्यांमध्ये बदलते. तिथे अगदी क्लोज किंवा मीड क्लोड शॉट आहेत, ज्यामुळं एक सुरक्षित आणि जिव्हाळ्याचे वातावरण तयार होत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;साध्या भाषेत सांगायचं झाल्यास मोठ्या, रिकाम्या काचेच्या खोल्या म्हणजे महिलांच्या वेदनांकडं दुर्लक्ष करणारी पुरुषप्रधान व्यवस्था. याउलट, त्या लहान, गर्दीच्या खोल्या महिलांनी स्वतःसाठी तयार केलेल्या सुरक्षित जागा. 'Furious' प्रेक्षकांना सतत आठवण करून देते की अधिकृत व्यवस्था जरी क्रूर असली, तरी महिलांची एकमेकींना असणारी साथ सुरक्षिततेची भावना निर्माण करते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;तणावाचे आवाज (Sound OF Stress)&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;प्रेक्षकांना फ्युरीयसमधल्या महिला पात्रांना होणाऱ्या त्रासाची जाणिव करुन देण्यासाठी साऊंड डिझाइनिंगचा अतिशय उत्तम वापर करण्यात आलाय. फक्त नाट्यमय संगातीवर अवलंबून न राहता एलिसच्या मनातलं वादळ दाखवण्यासाठी साऊंड इंजिनियरिंगचा जबरदस्त वापर करण्यात आला आहे. बहुतांश क्राईम शो मध्ये वापरलं जाणारं पार्श्वसंगीत हे अगदी टिपिकल असतं. पण फ्युरीयसमधला बॅकग्राऊंड स्कोअर पात्रांच्या इमोशनल स्थितीनुसार बदलतो. आवाजातला हा बदल चांगल्या स्टोरीटेलिंगचं साधन आहे. हे प्रेक्षकांना घाबरल्यामुळं आणि तणावामुळं होणाऱ्या शारीरिक त्रासाची जाणीव करून देतं. ॲलिसला स्वतःच्याच ऑफिसमध्ये खोटं ठरवलं जात असताना होणारा तिचा कोंडमारा आणि चीड आवाजानं प्रेक्षकाला नेमकी अनुभवायला मिळते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;महिलांच्या तीन 'फ्युरीयस' पिढ्या&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;'Furious' सिरीजचा मुख्य गाभा आहे महिलांच्या तीन पिढ्यांमधला गंभीर वैचारिक वाद. सिरीजमध्ये प्रत्येक महिला एका कोलमडलेल्या, पुरुषांचे वर्चस्व असलेल्या व्यवस्थेचा सामना करण्याचा एक वेगळा मार्ग दाखवतेय.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पहिली आहे नोरा. ती सगळ्यात मोठी आहे आणि भूतकाळाचे प्रतिनिधित्व करते. नोराने एफबीआयमध्ये नियमांचे पालन करून अनेक वर्षे स्वतःला टिकवून ठेवलंय. तिने स्वतःचा राग गिळायला, स्वतःचे काम शांतपणे करायला आणि गुपचूप केसेस उभ्या करायला ती शिकले. सिस्टीममध्ये टिकून राहण्यासाठी आणि स्वतःचं स्थान टिकवण्यासाठी पुरुषांच्या नियमांनुसार चालणे हाच एकमेव मार्ग आहे, असा तिचा विश्वास होता.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्यानंतर येते ॲलिस. ती आजच्या काळातल्या महिलांचं प्रतिनिधित्व करते. सिस्टीममध्ये चुका आहेत याची कल्पना ॲलिसला माहीत आहे. तिचा विश्वास आहे की ती आत राहून ही व्यवस्था सुधारू शकते. प्रचंड कष्टानं ती नियमात राहून काम करत असते. या तणावामुळे ती आतून तुटत चाललेय. यंत्रणा बदलायला तयार नसल्यामुळे ॲलिस मानसिकदृष्ट्या कशी खचत चालली आहे, हे प्रेक्षक पाहू आणि अनुभवू शकतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शेवटी येते कॅथरीन. ती एका टोकाच्या भविष्याचे प्रतिनिधित्व करते. कॅथरीनचा व्यवस्थेवरचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे. कायदे फक्त शोषकांचं रक्षण करतात अशी तिची धारणा झालेय. म्हणूनच ती त्यांना पूर्णपणे नाकारते. तिचा एकदम उपाय साधा आहे तो म्हणजे ही संपूर्ण व्यवस्था आणि समाजरचनाच मुळापासून उखडून टाकायला हवीय.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ही तीन पात्रं एकत्र आल्यानं 'Furious' फक्त एक चोर-पोलिसांचा खेळ उरत नाही. हा शो वेगवेगळ्या पिढ्यांमधील महिला या व्यवस्थेच्या अन्यायाचा सामना कसा करतात, हे दाखवतो. तो प्रेक्षकांना एक कठीण प्रश्न विचारतो: जेव्हा व्यवस्थाच बिघडलेली असते, तेव्हा तुम्ही नोरासारखे नियमांचे पालन करणार, ॲलिससारखे ते सुधारण्याचा प्रयत्न करणार, की कॅथरीनसारखे सर्व काही उद्ध्वस्त करणार?&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;फ्युरीयसमुळं क्राईम शोचे नियम बदलले&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;थोडक्यात सांगायचे तर, हुलूची 'Furious' सिरीज स्त्रीवादी ओटीटी कंटेंटच्या दिशेने टाकलेले एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. हा शो एका नेहमीच्या थ्रिलरमध्ये फक्त लोणच्या सारखं महिला पात्रांना तोंडी लावण्यासाठी घेण्यापेक्षा खूप सखोल विचार देते. ही सिरीज गुन्हेगारी आणि न्यायाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकते. ती प्रेक्षकांना सिरियल किलरच्या हिंसेपलीकडे जाऊन, त्यामागे कारणीभूत असलेल्या कोलमडलेल्या व्यवस्थेकडे बघायला भाग पाडते. या सिरीजचा शेवट कोणतीही सोपी उत्तरं किंवा हैपी एंडींग देत नाही. त्याऐवजी, ती प्रेक्षकांच्या मनात एक आव्हानात्मक प्रश्न सोडून जाते. जेव्हा व्यवस्था व्यवस्था महिलांचे रक्षण करण्यात अपयशी ठरते, तेव्हा त्यांनी खरा न्याय कसा मिळवायचा?&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;स्त्रीवादी कथाकथन म्हणजे टेलिव्हिजनवर गोष्टी सांगण्याची पद्धत कुठलीही तडजोड न करता पूर्णपणे बदलून टाकणे होय. हेच Furious' सिद्ध करते.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/09/04/20e55ad89d087254aadc27cfe00a44ca178850556855688_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[The Drama Movie Review: द ड्रामा (2026) - 'कॅन्सल कल्चर’ नात्यातलं आणि 'प्रेमा'तलंही]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/the-drama-movie-review-by-narendra-bandabe-simon-dillon-cinema-marathi-news-1437802</link><comments>https://marathi.abplive.com/blog/the-drama-movie-review-by-narendra-bandabe-simon-dillon-cinema-marathi-news-1437802#respond</comments><pubDate>Thu, 3 Sep 2026 10:27:26 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ नरेंद्र बंडबे ]]></dc:creator><category><![CDATA[ करमणूक ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/the-drama-movie-review-by-narendra-bandabe-simon-dillon-cinema-marathi-news-1437802</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;The Drama Movie Review:&lt;/strong&gt; एखादी व्यक्ती योग्य की, अयोग्य हे कोण, कधी आणि कशाच्या आधारे ठरवतं? 'द ड्रामा (2026)' चित्रपटात इमा आणि चार्लीचं लग्न ठरलंय आणि ते एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडालेत. पण लग्नाच्या अवघ्या काही दिवस आधी, इमाची &amp;nbsp;'मेड ऑफ ऑनर' (Maid of Honor) असलेली रशेल आणि तिचा पार्टनर माईकसोबत गप्पा मारताना इमा तिच्या लहानपणाची एक धक्कादायक आठवण सांगते. या एकाच गुपितावरून, रशेल 'मॉरल व्हॅल्यूज'चा (नैतिकतेचा) मोठा अवडंबर माजवते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;याचा थेट परिणाम इमा आणि चार्लीच्या नात्यावर होतो; विश्वासाची जागा अविश्वास घेतो आणि त्यातून अनेक अनपेक्षित गोष्टी घडू लागतात. प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी या सर्व गोष्टींचा असा काही उद्रेक होतो की संपूर्ण लग्नाचा बोजवारा उडतो. रशेलच्या या 'कॅन्सल कल्चर'मुळे निर्माण झालेला हा संघर्ष इमा आणि चार्लीच्या नात्यात मोठी तेढ निर्माण करतो आणि लग्नात चक्क मारामारी होते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;br /&gt;&lt;img src=&quot;https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/09/03/81bb7e3e2039330b1e3c8008c46275c0178841116902088_original.jpeg&quot; width=&quot;267&quot; height=&quot;417&quot; /&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या कठीण परिस्थितीत हे दोघं पुन्हा एकत्र येतील का? ते आपल्या नात्याची नव्यानं सुरुवात करू शकतील का? इथपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवत दिग्दर्शक क्रिस्टोफर बोर्जी (Kristoffer Borgli) शेवटपर्यंत धक्कातंत्राचा अप्रतिम वापर करतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;img src=&quot;https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/09/03/63eb23f9163e01d30e4d89ae32f48f32178841118888588_original.jpeg&quot; width=&quot;301&quot; height=&quot;241&quot; /&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या सिनेमात 'कॅन्सल कल्चर&amp;rsquo; तर आहेच, पण दिग्दर्शक क्रिस्टोफर बोर्जीने आणखी एका संकल्पनेवर जोरदार काम केलं आहे. इंग्रजीत याला 'Weaponized Judgment' (शस्त्रासारखी वापरलेली नैतिकता) असं म्हणता येईल. साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल मतप्रदर्शन करते किंवा टीका करते, तेव्हा ते तुमच्यात सुधारणा करण्यासाठी नसतं, तर तुम्हाला कमी लेखण्यासाठी किंवा मानसिक त्रास देण्यासाठी असतं. 'मोकळेपणा' आणि 'नैतिकता' या गोंडस नावांखाली संबंधित व्यक्तीला मानसिकदृष्ट्या नेस्तनाबूत करण्याची ही एक पद्धतशीर प्रक्रिया असते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;'द ड्रामा' सिनेमात रशेलचं पात्र कथानकातलं हे 'मोरालिटी इंजिन' ॲक्टिव्हेट करतं. पुढे जाऊन त्याचा वापर इमाच्या सोशल स्टेटसवर आघात करण्यासाठी केला जातो. इमा एक खुनशी आणि समाजाच्या दृष्टीने घातक असल्याचा आभास निर्माण करायला रशेल सर्वांना भाग पाडते. याचा थेट परिणाम इमा आणि चार्लीच्या नात्यावर होतो. चार्ली आता संभ्रमाच्या अवस्थेत जातो, त्याचा श्वास गुदमरतो. यातून तो एक चूक करतो आणि मग ती अप्रत्यक्षरीत्या मान्यही करतो. खरं तर रशेलने उभारलेल्या या नैतिक भिंतीचा पाया तसा तकलादूच असतो, पण यातून चार्लीच्या मनात एक निरर्थक आणि पोकळ भीती तयार होते. आपण निवडलेली व्यक्ती, म्हणजेच 'लव्ह ऑफ माय लाईफ' इमा योग्य की अयोग्य, अशा द्विधा मनःस्थितीत तो जातो आणि घोडचूक करून बसतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दिग्दर्शक क्रिस्टोफर बोर्जी सिनेमाची सुरुवात अगदी सॉफ्ट रोमँटिक कॉमेडीसारखी करतो. पण जसजसं कथानक पुढे जातं, तसं तो चित्रपटाला डार्क रोमँटिक कॉमेडी आणि 'सोशल सॅटायर'च्या (सामाजिक उपरोधाच्या) मार्गावर घेऊन जातो. प्रेक्षकही रशेलने उभारलेल्या या नैतिकतेच्या चक्रव्यूहात इमा आणि चार्ली इतकेच गुरफटून जातात. हा अनुभव प्रेक्षकांसाठी 'सुरियल' (Surreal) म्हणजेच अतिवास्तवाकडे घेऊन जाणारा ठरतो. चार्ली आणि इमासोबतच कॅन्सल कल्चरच्या या किचकट प्रक्रियेतून जाणारा प्रेक्षक सिनेमाच्या शेवटी 'आप-आपला सिनेमा' मनात घेऊन बाहेर पडतो. हीच दिग्दर्शक क्रिस्टोफर बोर्जीच्या स्क्रीनप्लेची खासियत आहे. म्हणूनच 'द ड्रामा' प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आणि त्याने बजेटच्या चौपट कमाई केली. शेवटी काय तर गोष्ट महत्त्वाची आणि त्यातलं प्रेक्षकांचं गुंतणं महत्त्वाचं; जे या सिनेमात पुरेपूर अनुभवायला मिळतं.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/09/03/a58b554cf548ba6e411ed5e98002ba12178841135393188_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Busan International Film Festival: ऑस्कर्स क्वालिफाइड बुसानचं जोरदार लाईनअप; इराणच्या माजिद माजिदीसहित अख्खं हॉलिवूड पहिल्यांदाच कोरियात]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/busan-international-film-festival-lineup-hollywood-including-irans-majid-majidi-arrives-in-korea-en-masse-for-the-first-time-1437682</link><comments>https://marathi.abplive.com/blog/busan-international-film-festival-lineup-hollywood-including-irans-majid-majidi-arrives-in-korea-en-masse-for-the-first-time-1437682#respond</comments><pubDate>Wed, 2 Sep 2026 11:56:18 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ नरेंद्र बंडबे ]]></dc:creator><category><![CDATA[ करमणूक ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/busan-international-film-festival-lineup-hollywood-including-irans-majid-majidi-arrives-in-korea-en-masse-for-the-first-time-1437682</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Busan International Film Festival:&lt;/strong&gt; दक्षिण कोरियातल्या (South Korea) बुसान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या (BIFF) मुख्य स्पर्धेचे लाईनअप जाहीर झालंय. चौदा फिल्म्सच्या यादीत जपानचा (Japan) नानाको हिरोसे (Nanako Hirose), इराणचा (Iran) माजिद माजिदी (Majid Majidi) आणि इंडोनेशियाचा योसेप आंगी नोएन या आशियाई नावाजलेल्या फिल्ममेकर्सच्या फिल्म्स आहेत. हे फिल्म फेस्टिव्हलचे 31वे वर्ष आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म प्रोड्युसर्स असोसिएशनने BIFFचा समावेश 'अ दर्जा'च्या फेस्टिव्हलमध्ये केलाय. याचा अर्थ असा की बुसान आता ऑस्कर-क्वालिफाइड फिल्म फेस्टिव्हल झाले आहे. इथे जी बेस्ट फिल्म ठरेल, ती ऑस्कर्स पुरस्कारासाठी थेट क्वालिफाइड होईल. त्यामुळे इथल्या मुख्य स्पर्धेत वर्णी लागणे हे महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. याने कॅन, बर्लिन, व्हेनिस, सनडान्स आणि टोरंटो यासारख्या प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हल्सच्या यादीत बुसान समाविष्ट झालाय. जाहीर झालेल्या लाईनअपवरून अतिशय मजबूत स्पर्धा असणार आहे, हे निश्चित.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बुसान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल आशियाई सिनेमांना प्राधान्य देते. मुख्य स्पर्धेतील यादी पाहता 14 आशियाई फिल्म्स आहेत. त्यातील 12 फिल्म्सचा वर्ल्ड प्रिमियर इथे होणारेय. &amp;nbsp;यातील चार दिग्दर्शकांची पहिली फिल्म स्पर्धेत आलीय. तर चार महिला दिग्दर्शक आहेत. असा सर्वसमावेशक कार्यक्रम यंदा आहे. मुख्य स्पर्धेशिवाय व्हिजन एशिया आणि व्हिजन कोरिया या दोन महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये कोरिया आणि आशियाई देशांमधील 24 फिल्म्स दाखवण्यात येणारेत. यात भारतातील दोन फिल्म्स आहेत. अंजली पाटील मुख्य भूमिकेत असलेली दिग्दर्शक शैलेश रथनकुमारची सेल्वी (2026) आणि शशांक वालियाची बर्ड्स इन द डार्क (2026). या दोन्ही व्हिजन एशिया स्पर्धेत आहेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;चिल्ड्रेन ऑफ हेवन (1997) फेम इराणचे दिग्दर्शक माजिद माजिदी पहिल्यांदा बुसानला येणारेय. यापूर्वी बर्लिन, व्हेनिस आणि कॅनसारख्या फेस्टिव्हल्समध्ये माजिदींच्या फिल्म्स गाजल्या आणि जिंकल्यत. ते पहिल्यांदाच इथे आपली फिल्म प्रेझेंट करणारेत. माजिदींच्या सिनेमाचे नाव मिडडे मील (2026) आहे. हा मानवी हक्क आणि इराणमधील रोजच्या जगण्याचा संघर्ष दाखवणारा सिनेमा आहे. शिवाय इंडोनेशियातील नव्या दमाचा दिग्दर्शक योसेप आंगी नोएन यांचा पॉलिटिकल ड्रामा द सी स्पीक्स हिज नेम (2026) हा तिथल्या राजकीय अस्वस्थ कालावधीतला सिनेमा आहे. यात इंडोनेशियातला शाहरुख खान समजला जाणारा रेझा राहादियन मुख्य भूमिकेत आहे. कोरियातील किम जोंग-क्वान यांचा द टेबल: डे अँड नाईट (2026) हा फेस्टिव्हलचा ओपनिंग सिनेमा आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आता ऑस्कर-क्वालिफाइड झाल्याने बुसानमध्ये येणाऱ्या विशेष पाहुण्यांची संख्या वाढणार, हे आपोआपच होणारेय. &amp;nbsp;फ्रान्समधील सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी कलाकार पियानो टीचर (2001) फेम इसाबेल ह्युपर्ट, गोल्डन ग्लोब अवॉर्ड विजेती आणि ऑस्कर-नॉमिनेटेड मॅगी गिलेनहाल, जपानचे आजच्या घडीचे सर्वात गाजलेले दिग्दर्शक हिरोकाझू कोरीएदा आणि क्राउचिंग टायगर, हिडन ड्रॅगन (2000) फेम मिशेल यो असे तगडे स्टार्स बुसानच्या रेड कार्पेटवर अवतरणारेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;इंडोनेशियातील सर्वात गाजलेल्या अभिनेत्री क्रिस्टीन हाकिम यांच्या तीन फिल्म्स बुसानमध्ये दाखवण्यात येणार आहेत. यापैकी दोन फिल्म्सचा वर्ल्ड प्रिमियर होणार आहे, तर तिसरी स्पर्धेत नसली तरी विशेष स्क्रीनिंग असणारेय. हा योगायोग असला तरी एखाद्या आशियाई कलाकारासाठी हा एक मोठा सन्मान आहे.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/09/02/06ba6bb03cfa4ddad09370900b88c9de178833035556988_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[क्रिकेटचा जननायक - क्लाइव्ह लॉइड!  ]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/clive-lloyd-birth-anniversary-legendary-greatest-captain-of-west-indies-special-blog-by-sameer-gaikwad-1437507</link><comments>https://marathi.abplive.com/blog/clive-lloyd-birth-anniversary-legendary-greatest-captain-of-west-indies-special-blog-by-sameer-gaikwad-1437507#respond</comments><pubDate>Mon, 31 Aug 2026 20:56:14 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ क्रिकेट ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/clive-lloyd-birth-anniversary-legendary-greatest-captain-of-west-indies-special-blog-by-sameer-gaikwad-1437507</guid><description><![CDATA[&lt;p&gt;आशुतोष गोवारीकर, आमिर खान यांच्या 'लगान' सिनेमाची खरी बीजे वेस्टइंडिजच्या क्रिकेटवेडात दिसतात! विंडीजचा माजी कप्तान क्लाईव्ह लॉइड याच्या क्रिकेटची आणि क्रिकेटकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाची गोष्ट लाजवाब आहे!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;क्लाइव्ह लॉइडचे जीवन केवळ धावा आणि अमर्याद विजयांपुरते मर्यादित नाही. ते कॅरिबियन समाजाच्या ऐतिहासिक वेदना, वसाहतवादी वारसा आणि नवस्वातंत्र्याच्या अभिमानाशी घट्टपणे जोडलेले आहे. त्याच्या नेतृत्वाच्या काळात क्रिकेट हा केवळ खेळ नव्हता; क्रिकेट हे सांस्कृतिक, राजकीय आणि मानसिक मुक्तीचे प्रतीक बनले होते. हे सर्व विलक्षण इंटरेस्टिंग आहे!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;साठ आणि सत्तरच्या दशकात वेस्ट इंडिजची अनेक बेटे ब्रिटिश वसाहतवादातून मुक्त होत होती. गयाना 1966 मध्ये स्वतंत्र झाले, नेमके त्याचवेळी लॉइडने आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेलं. जमैका, त्रिनिदाद, बार्बाडोस यांसारख्या बेटांनाही नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते. पण आर्थिक अस्थिरता, गरिबी आणि वांशिक विषमता कायम होती.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;क्रिकेट हा ब्रिटिशांनी आणलेला खेळ असला तरी, कॅरिबियन लोकांनी त्याला स्वतःचे हत्यार बनवले. मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे म्हणजे त्यांच्यासाठी वसाहतवादी जोखडाविरुद्धचा प्रतीकात्मक बदला होता. आशुतोष गोवारीकर आमिर खानच्या 'लगान' सिनेमाच्या थीमला साजेसे चित्र विंडीजच्या सर्व बेटांवर दिसायचे. &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;लॉइडच्या आधीच्या काळात वेस्ट इंडिज संघात बेटांमधील स्पर्धा तीव्र होती. बार्बेडियन, जमैकन, त्रिनिदादियन आणि गयानीज खेळाडू एकमेकांशी अधिक स्पर्धा करत, एकत्रित वेस्ट इंडियन ओळख कमकुवत होती. सर फ्रँक वॉरेल यांनी एकतेची पायाभरणी केली होती, पण लॉइडने ती पूर्णत्वास नेली. त्याने संघाचे स्वरूप 'बेटांचे प्रतिनिधी' असे न ठेवता 'एक कॅरिबियन शक्ती' असे बनवले. हे सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे होते, कारण त्यायोगे समग्र कॅरिबियन प्रदेशातील एकतेच्या आणि सामूहिक अभिमानाच्या भावनेला बळकटी मिळत होती. आयपीएलच्या मूळसूत्रात नेमके याच्या विरोधातले धोरण आहे हे इथे आवर्जून नमूद करावे वाटते. असो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;1970 च्या दशकात जगभरात ब्लॅक कॉन्शसनेस म्हणजेच कृष्णवर्णीय सचेतनेची चळवळ जोरात होती. अमेरिकेत नागरी हक्क चळवळ, आफ्रिकेत स्वातंत्र्यलढे आणि कॅरिबियनमध्येही सांस्कृतिक पुनरुत्थान सुरू होते. अशा पार्श्वभूमीवर वेस्ट इंडिजचा संघ कृष्णवर्णीय वर्चस्वाचे प्रतीक बनला. लॉइडच्या नेतृत्वात रॉबर्ट्स, होल्डिंग, गार्नर, मार्शल ह्या चार वेगवान गोलंदाजांची राक्षसी फळी श्वेत वर्चस्वाच्या क्रिकेट जगाचा थरकाप उडवत होती.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या पारंपरिक सत्तांना पराभूत करणे म्हणजे केवळ खेळातील विजय नव्हता; तो वांशि*क आणि सांस्कृतिक प्रतिष्ठेचा विजय होता. लॉइडने 'कॅलिप्सो क्रिकेटर्स' या उपहासात्मक आणि तुच्छता दर्शवणार्&amp;zwj;या लेबलला तीव्र विरोध केला. पूर्वी वेस्ट इंडियन खेळाडूंना आनंदफंदी, बेफिकीर आणि शिस्तहीन म्हणून दाखवले जात असे. त्याने संघाला शिस्त, व्यावसायिकता आणि अत्यंत ताकदवान आक्रमकता शिकवली. यामुळे क्रिकेटमधील वांशिक स्टिरिओटाइप तुटले आणि कॅरिबियन क्रिकेटला जागतिक आदराचे स्थान मिळाले.&lt;/p&gt;
&lt;p&gt;त्या काळात कॅरिबियन समाजात, क्रिकेट हा गरिबीतून बाहेर पडण्याचा एक महत्त्वाचा मार्ग होता. लॉइड स्वतः वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी घेऊन हॉस्पिटलमध्ये काम करत होता. अनेक खेळाडू गरीब पार्श्वभूमीतून येत होते. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस कॅरी पॅकरच्या वर्ल्ड सिरीज क्रिकेटने व्यावसायिक क्रिकेटची नवी वाट मोकळी केली. पैसा, करार आणि टीव्ही प्रसारण यांनी खेळाडूंना आर्थिक स्थैर्य दिले. लॉइडने या बदलांना स्वीकारले आणि संघाला आधुनिक व्यावसायिक युगात नेले.&lt;/p&gt;
&lt;p&gt;क्लाइव्ह ह्युबर्ट लॉइड हे त्याचे पूर्ण नाव. गयानाच्या मातीत जन्मलेला ह्या उंच, शक्तिशाली फलंदाजाचे अस्तित्व केवळ क्रिकेट खेळाडू म्हणून कधीच नव्हते; तो वेस्ट इंडिजला जागतिक क्रिकेटचे अधिराज्य देणारा कप्तान होता. त्याच्या नेतृत्वात कॅरिबियन बेटांच्या संघाने सत्तर आणि ऐंशीच्या दशकात क्रिकेट विश्वात दरारा निर्माण केला. त्याचे आयुष्य म्हणजे संघर्ष, शिस्त, एकता आणि विजयाची महागाथा होय.&lt;/p&gt;
&lt;p&gt;आजपासून 82 वर्षांपूर्वी 31 ऑगस्ट 1944 रोजी ब्रिटिश गयाना, आताच्या गयानामधील जॉर्जटाउन येथे क्लाइव्हचा जन्म झाला. त्याचे वडील स्थानिक डॉक्टरांचे वाहन चालक होते. सहा भावंडांपैकी तो दुसरा होता. वडिलांच्या अकाली निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी लहान वयातच त्याच्या खांद्यावर आली. शाळा सोडून त्याने हॉस्पिटलमध्ये लिपिक म्हणून काम सुरू केले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;पण गल्लीबोळात आणि शाळेच्या मैदानावर क्रिकेटची बीजे खोलवर रुजली होती. त्याचा उंच बांधा, भक्कम शरीरयष्टी याच्या जोरावर जोरदार फटकेबाजी करणारा आणि वेगाने धावणारा क्षेत्ररक्षक म्हणून तो लवकरच ओळखला जाऊ लागला.1963 मध्ये गयानाकडून त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 1966 मध्ये भारताविरुद्ध मुंबईत टेस्ट पदार्पण झाले. यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यांमध्ये त्याने आपली छाप पाडली. 1971 मध्ये त्याला 'विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर' म्हणून गौरवण्यात आले.&lt;/p&gt;
&lt;p&gt;1974 मध्ये रोहान कन्हाय यांच्यानंतर वेस्ट इंडिजचा कप्तान म्हणून नियुक्ती झाली. तेव्हा विंडीजच्या संघात बेटांमधील स्पर्धा होती आणि शिस्तीचा अभाव होता. लॉइडने संघाला एकत्र आणले. त्याने क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच, चार वेगवान गोलंदाजांची रणनीती अमलात आणली. अतिशय वेगाने गोलंदाजी करणाऱ्या बॉलर्सनी विरोधकांची पाचावर धारण बसवली! ही रणनीती क्रिकेटच्या इतिहासात क्रांतिकारक ठरली.&lt;/p&gt;
&lt;p&gt;1975 च्या पहिल्या क्रिकेट विश्वचषकात लॉइडने स्वतः फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 102 धावा काढल्या. वेस्ट इंडिजने विजय मिळवला. 1979 मध्ये पुन्हा विश्वचषक जिंकला. 1983 &amp;nbsp;मध्ये भारताकडून फायनलमध्ये पराभव झाला, पण ते अपवाद होते. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या नेतृत्वात संघाने 27 सामन्यांची अजिंक्य मालिका आणि 11 सलग विजय मिळवले. एकूण 74 टेस्ट सामन्यांमध्ये 36 विजय; ही कामगिरी अजूनही आदर्श मानली जाते. फलंदाज म्हणून त्याने 110 टेस्ट सामन्यांमध्ये 7515 धावा काढल्या, सरासरी सुमारे 46.67 आणि 19 शतके. त्याचा सर्वाधिक स्कोर 242 धावा होता. लॅन्कशर काउंटीसाठीही त्याने अनेक वर्षे खेळले आणि इंग्लिश क्रिकेटमध्येही तो लोकप्रिय झाला.&lt;/p&gt;
&lt;p&gt;आजच्या काळात लॉइडकडे पाहताना आपल्याला जाणवते की, त्याचे नेतृत्व केवळ रणनीतीपुरते नव्हते. ते सामाजिक एकतेचे, वांशिक अभिमानाचे आणि उत्तर-वसाहतवादी आत्मविश्वासाचे प्रतीक होते. सध्या वेस्ट इंडिज क्रिकेट कमकुवत दिसतो, लॉइडच्या काळातील संघ अजूनही आदर्श मानला जातो. समाजाच्या वेदना, आशा आणि संघर्षांचे प्रतिबिंब खेळात दिसते याची आठवण लॅाइडचा संघ करून देतो!&lt;/p&gt;
&lt;p&gt;आताचा वेस्ट इंडिज संघ कमकुवत का झाला आहे, ह्याचे सामाजिक आणि वैषयिक संदर्भ शोधायचा प्रयत्न केला तर सर्वात आधी समोर येते ती क्लाईव्ह लॉइडची रणनीती! त्याच्याकडे एक ध्येय होते, जे सामाजिक विषमतेचे सामर्थ्यास सुरूंग लावण्याचे साधन ठरले! तत्कालीन वेस्टइंडिज टीमपाशी आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा, विश्वविजेतेपद मिळवून आपल्याला कमी लेखणाऱ्यांचे दात घशात घालण्याचा जुनून होता! आता याचा अभाव आहे!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;तिथे तुलनेने आता स्थिरता आहे. कॅरिबियन बेटांचे स्वतःचे अस्तित्व आता जगाच्या नकाशावर ठळक आहे. तिथल्या लोकांनी इतिहास निर्माण केला याची जाणीव जगाला आहे. एके काळी गोऱ्या साहेबांचा खेळ म्हणून टेंभा मिरवणाऱ्या क्रिकेटचे आपण दोन दशके अनभिषिक्त सम्राट होतो, ही भावना त्यांना सुखवते. आर्थिक प्राप्तीसाठीचा महत्वाचा मार्ग म्हणून क्रिकेटकडे पाहण्याचे प्रमाण कमालीचे घटलेय कारण तिथल्या सद्य सामाजिक स्थितीत त्यांना असंतोषाची बीजे जाणवत नाहीत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;ते स्थिरावले आहेत. आपल्या स्वतःच्या अस्तित्वावर, स्वातंत्र्योत्तर कालखंडावर ते खुश आहेत. त्यांच्या आयुष्यात क्रिकेटला अजूनही स्थान आहे मात्र क्रिकेट हेच &amp;nbsp;त्यांचे सर्वस्व असल्याची भावना हळूहळू लोप पावत गेलीय. किंबहुना आज त्यांच्यात जे शैथिल्य आहे ते दौर्बल्य नसून ती सामाजिक मानसिक समाधानाची स्थिती आहे, क्लाईव्ह लॉइड आणि त्याच्या टीममेट्सनी ह्याचसाठी तर क्रिकेटकडे समर्पित वृत्तीने पाहिले होते. त्यांचे उद्दिष्ट एका अर्थाने सफल झालेय! एका क्रिकेटरने घडवलेली ही क्रांती अद्भुतच म्हटली पाहिजे!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;आजचा दिवस 'आफ्रिकी वंशाच्या लोकांसाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस' म्हणून साजरा केला जातो! या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे जगभरातील आफ्रिकी वंशाच्या लोकांच्या अधिकारांची आणि मानवतेच्या विविधतेची मान्यता देणे. आफ्रिकी वंशाच्या लोकांनी इतिहासात अनेक अडचणींना तोंड दिलं आहे, जसे की गुलामगिरी, वांशिक भेदभाव, आणि सामाजिक अन्याय. या दिवसाच्या माध्यमातून त्या लोकांच्या योगदानाची, संस्कृतीची आणि त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची ओळख पटवली जाते.&lt;/p&gt;
&lt;p&gt;या दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम, चर्चासत्रे, आणि सांस्कृतिक कार्यशाळा आयोजित केल्या जातात, ज्यामध्ये आफ्रिकी वंशाच्या लोकांच्या आव्हानांबद्दल चर्चा केली जाते. समाजात समानता आणि न्यायाची भावना बळकट करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ह्याच दिवशी क्लाईव्ह लॉइडचा वाढदिवस असणे, हा योगायोगही भारीच म्हटला पाहिजे! परिणामी वेस्ट इंडियन जनता लॉइडचा वाढदिवस जल्लोषात साजरा करते! लॉइडने केवळ क्रिकेटमध्येच त्यांच्या बेटांच्या समूहाची मान उंचावलीय असे कुणी म्हणत असेल तर ते त्याच्या कर्तृत्वावर अन्याय केल्यासारखे होईल! तो केवळ क्रिकेट टीमचा कप्तान नसून खऱ्या अर्थाने क्रिकेटचा जननायक आहे! &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;- समीर गायकवाड&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/31/c22e968179f5b82de18194e4323949741788189599569989_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Gulf Crisis: गल्फमधील पेचप्रसंग]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/the-gulf-crisis-blog-by-retired-commodore-anil-jai-singh-1437468</link><comments>https://marathi.abplive.com/blog/the-gulf-crisis-blog-by-retired-commodore-anil-jai-singh-1437468#respond</comments><pubDate>Mon, 31 Aug 2026 14:22:44 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ कमोडोर अनिल जय सिंह (निवृत्त) ]]></dc:creator><category><![CDATA[ भारत ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/the-gulf-crisis-blog-by-retired-commodore-anil-jai-singh-1437468</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;-कमोडोर अनिल जय सिंग (निवृत्त)&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;4 ऑगस्ट 2026 रोजी भारतीय ध्वजाखाली प्रवास करणाऱ्या MSV Faize Noore Oliya या जहाजावर येमेनच्या किनाऱ्याजवळ एका प्रक्षेपकाने हल्ला केला. जहाज उलटले आणि बुडू लागले. येमेनच्या तटरक्षक दलाने जहाजावरील सर्व 14 कर्मचाऱ्यांची सुटका केली. त्यापैकी 13 जण भारतीय होते. त्यांना मोखा बंदरात सुरक्षित आणण्यात आले. ही नक्कीच दिलासादायक बाब होती. मात्र, ज्या संकटातून ही घटना घडली, ते संकट अजून संपलेले नाही.&lt;/p&gt;
&lt;p&gt;पश्चिम आशियातील व्यापक संघर्षात भारताने आतापर्यंत किमान दहा खलाशी गमावले आहेत. यापैकी एकही जण भारतीय ध्वज असलेल्या जहाजावर नव्हता. जगातील एकूण खलाशांपैकी सुमारे 17 टक्के, म्हणजेच 3.2 लाखांहून अधिक भारतीय, या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यापैकी बहुतांश जण परदेशी ध्वज असलेल्या जहाजांवर काम करतात. व्यापारी जहाजांकडून सोयीसाठी इतर देशांचे ध्वज वापरण्याचे प्रमाण वाढत असल्याने, त्यांच्या सुरक्षेची हमी देण्यासाठी भारत सरकारकडे मर्यादित पर्याय राहतात. खलाशांसाठी हा त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे; रोजगार गमावण्यापेक्षा अनेक जण धोका पत्करणे पसंत करतात. याचे आर्थिक परिणाम समुद्रकिनाऱ्यापुरते मर्यादित राहत नाहीत. इंधनाच्या वाढत्या किमती, महागडा स्वयंपाकाचा गॅस आणि विलंबाने पोहोचणारा माल याचा फटका देशाच्या अंतर्गत भागातील व्यापाऱ्यांनाही बसतो.&lt;/p&gt;
&lt;p&gt;होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताच्या सुमारे निम्म्या कच्च्या तेलाची आणि जवळपास 90 टक्के LPG ची वाहतूक होते. हे आकडे किरकोळ नाहीत. एका अरुंद सागरी मार्गावर भारत किती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, हे ते दाखवतात. होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक रोखण्याची किंवा मर्यादित करण्याची धमकी हा अनेक दशकांपासून इराणच्या सामरिक धोरणाचा भाग राहिला आहे. आखाती देश आणि पाश्चिमात्य शक्तींशी झालेल्या विविध संघर्षांमध्ये ही धमकी वारंवार देण्यात आली आहे. मात्र, यावेळी परिस्थिती वेगळी आहे. ही धमकी आता केवळ वक्तव्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. येमेन, इराक आणि लेबनॉनमध्ये सक्रिय असलेल्या प्रॉक्सी नेटवर्क्सच्या माध्यमातून हा व्यत्यय पसरवण्यात आला असून त्याचे परिणाम आता प्रत्यक्ष दिसू लागले आहेत.&lt;/p&gt;
&lt;p&gt;संघर्षामुळे सामुद्रधुनीवरील दबाव वाढल्यानंतर अनेक जहाजांना सुरक्षित मार्ग मिळण्याची अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागली. ओमानच्या आखातात GPS जॅमिंग आणि AIS स्पूफिंगमुळे नेहमीची व्यापारी सागरी वाहतूकही अनिश्चित बनली. अशा क्षमता स्वतंत्रपणे काम करणाऱ्या सशस्त्र गटांकडे सहज उपलब्ध होत नाहीत. एवढ्या मोठ्या भौगोलिक क्षेत्रात सातत्याने मोहीम चालवण्यासाठी लागणारी उपकरणे, लक्ष्य निश्चित करण्यासाठीची गुप्त माहिती आणि समन्वय यामागे राज्यस्तरीय पाठबळ असल्याचे संकेत मिळतात&amp;mdash;ज्याचे संपूर्ण चित्र केवळ &amp;lsquo;प्रॉक्सी&amp;rsquo; हा शब्द स्पष्ट करत नाही. आखाती मार्गांवरील युद्ध-जोखीम आणि सागरी विम्याचे प्रीमियम अनेक पटींनी वाढले आहेत. हा अतिरिक्त खर्च अखेरीस पुरवठा साखळीतून ग्राहकांपर्यंत पोहोचतो.&lt;/p&gt;
&lt;p&gt;संकटापूर्वी सुमारे 65 अमेरिकी डॉलर प्रति बॅरल असलेली कच्च्या तेलाची किंमत उच्चांकी पातळीवर 115 डॉलरच्या पुढे गेली. भारतासाठी खरी किंमत केवळ बाजारातील तेलाच्या दरापुरती मर्यादित नाही. वाढलेले मालवाहतूक शुल्क, महागलेला विमा, जहाजांच्या विलंबामुळे लागणारे डेमरेज शुल्क आणि केप ऑफ गुड होपमार्गे वळसा घेतल्याने वाढणारे प्रवासाचे दिवस&amp;mdash;हे सर्व खर्च त्यात जोडले जातात. लहान निर्यातदार आणि आयातदारांसाठी वाढलेला वितरण कालावधी आणि मर्यादित रोख साठा हे गंभीर संरचनात्मक दबाव निर्माण करतात, जे एकूण व्यापाराच्या आकडेवारीत सहज दिसून येत नाहीत. भारताशी संबंधित व्यवसाय असलेल्या सिंगापूरस्थित SeaLead Shippingचे उदाहरण या जोखमीची व्याप्ती दाखवते. इराणी तेल नेटवर्कशी संबंधित निर्बंधांमध्ये अडकल्यानंतर कंपनीला लिक्विडेशनच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागले.&lt;/p&gt;
&lt;p&gt;आणखी पश्चिमेकडे, बाब-अल-मंदेब आणि दक्षिण लाल समुद्रातील परिस्थितीही तितकीच अस्थिर आहे. व्यापारी जहाजांविरुद्ध हूतींनी 19 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू केलेली मोहीम अजूनही सुरू आहे. ही साधी चाचेगिरी नाही आणि स्थानिक तक्रारींवर स्वतंत्रपणे प्रतिक्रिया देणाऱ्या एखाद्या गटाची कारवाईही नाही. ही एक समन्वित आणि बाह्य संसाधनांच्या मदतीने चालवली जाणारी मोहीम आहे, ज्यासाठी वापरली जाणारी शस्त्रे, आर्थिक मदत आणि लक्ष्य निश्चित करण्यासाठीचे मार्गदर्शन केवळ साना येथून येत नाही. हल्ल्यांचे लक्ष्य बनणारी जहाजे ग्रीक, जपानी, ब्रिटिश आणि भारतीय आहेत. त्यांची निवड त्यांच्या राष्ट्रीयत्वामुळे नव्हे, तर ती अशा समुद्री मार्गातून जात असल्यामुळे होते, ज्याचा वापर एका प्रादेशिक शक्तीने दबावाचे साधन म्हणून करण्याचे ठरवले आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;भारताने राजनैतिक पातळीवर सक्रिय भूमिका घेतली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आणि द्विपक्षीय चर्चांमधून नवी दिल्लीने व्यापारी जहाजांसाठी सुरक्षित आणि विनाअडथळा मार्गाची मागणी केली आहे. भारतीय कर्मचाऱ्यांशी संबंधित जहाजांवरील हल्ल्यांनंतर भारताने औपचारिक निषेधही नोंदवला आहे. ओमान आणि UAE मधील अधिकाऱ्यांसोबतच्या समन्वयामुळे अडकलेल्या भारतीय खलाशांना मायदेशी आणण्यास मदत झाली आहे. त्याचवेळी सागरी वाहतुकीचे मार्गही बदलत आहेत. सौदी अरेबियाच्या पूर्व-पश्चिम पाइपलाइनद्वारे यानबूकडे अधिक कच्चे तेल पाठवले जात आहे. सर्वाधिक धोकादायक सागरी क्षेत्राच्या बाहेर असलेल्या UAE मधील फुजैराह आणि खोर फक्कान बंदरांवर अधिक माल हाताळला जात आहे. ओमानमधील दुक्म, सलालाह आणि सोहार ही बंदरेही महत्त्वाची मध्यवर्ती केंद्रे म्हणून पुढे आली आहेत.&lt;/p&gt;
&lt;p&gt;मात्र, या उपाययोजनांमुळे मूळ समस्या सुटत नाही. समुद्री मार्गांवर दबाव निर्माण करण्याच्या जाणीवपूर्वक आखलेल्या रणनीतीची किंमत अशा देशांनाही मोजावी लागत आहे, ज्यांचा हा संघर्ष चालवणाऱ्यांशी थेट वाद नाही. भारताची दीर्घकालीन गुंतवणूक योग्य दिशेने सुरू आहे. ग्रेट निकोबार पायाभूत सुविधा प्रकल्पामुळे मलाक्का सामुद्रधुनीजवळ भारताचे सामरिक स्थान मजबूत होईल. I2U2 आणि India-Middle East-Europe Corridor (IMEC) यांसारखे उपक्रम अधिक सक्षम आणि पर्यायी प्रादेशिक संपर्क व्यवस्था निर्माण करण्याचे गंभीर प्रयत्न आहेत. मात्र, त्यांचे फायदे दिसण्यासाठी अनेक वर्षे लागतील. सध्याच्या व्यत्ययाचे परिणाम मात्र तात्काळ आहेत आणि त्यांची किंमत कोणताही पर्याय नसलेल्या कुटुंबांना आणि व्यवसायांना शांतपणे मोजावी लागत आहे. MSV Faize Noore Oliyaच्या कर्मचाऱ्यांची सुटका होणे ही सुदैवाची बाब होती. पण त्याकडे संकट संपल्याचे चिन्ह म्हणून पाहता येणार नाही. आखाती प्रदेशात सुमारे 80 लाख भारतीय राहतात आणि काम करतात. त्यांनी भारतात पाठवलेला पैसा, त्यांची सुरक्षा आणि त्यांच्या यजमान देशांच्या अर्थव्यवस्थांना चालना देणारी ऊर्जा वाहतूक&amp;mdash;हे सर्व याच वादग्रस्त समुद्री मार्गांशी जोडलेले आहे. हा व्यत्यय अपघाती नाही; तो जाणीवपूर्वक निर्माण केला जात आहे. हे समुद्री मार्ग खुले कोण ठेवणार आणि त्यासाठी किती किंमत मोजावी लागणार&amp;mdash;हे असे प्रश्न आहेत, ज्यांना 2026 ने आता पुढे ढकलणे अशक्य केले आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;(लेखक - कमोडोर अनिल जय सिंग (निवृत्त), इंडियन मेरिटाइम फाउंडेशनचे उपाध्यक्ष आणि अनुभवी पाणबुडी अधिकारी)&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/31/98d2709d415e4004df11d88dca46e34b1788166357259987_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/frederick-douglass-us-story-of-struggle-of-slaves-in-america-sameer-gaikwad-blog-marathi-1436784</link><comments>https://marathi.abplive.com/blog/frederick-douglass-us-story-of-struggle-of-slaves-in-america-sameer-gaikwad-blog-marathi-1436784#respond</comments><pubDate>Tue, 25 Aug 2026 18:55:17 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ विश्व ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/frederick-douglass-us-story-of-struggle-of-slaves-in-america-sameer-gaikwad-blog-marathi-1436784</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;BLOG :&lt;/strong&gt; अमेरिकेच्या इतिहासात काही माणसे अशी आहेत की त्यांच्या आयुष्याकडे पाहताना एखाद्या व्यक्तीची चरित्रकथा वाचत आहोत की एका समाजाच्या दीर्घ संघर्षाचा इतिहास, हेच उमगत नाही. फ्रेडरिक डग्लस हे असेच एक विलक्षण व्यक्तिमत्त्व. गुलाम म्हणून जन्मलेला, स्वतःच्या जन्मतारखेचीही खात्री नसलेला हा मुलगा पुढे लेखक, पत्रकार, वक्ता, संपादक, समाजसुधारक, स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कर्ता, कृष्णवर्णीयांच्या नागरी हक्कांचा लढवय्या आणि अमेरिकेच्या राजकीय जीवनातील महत्त्वाचा आवाज बनला. त्याच्या हातात सुरुवातीला बेड्या होत्या; नंतर त्याच हातात लेखणी आली. गुलाम म्हणून ज्याला स्वतःच्या जीवनावर अधिकार नव्हता, त्याने पुढे स्वतःच्या शब्दांनी अमेरिकेच्या लोकशाहीला तिच्याच अंतरात्म्याचा आरसा दाखवला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;फ्रेडरिक डग्लस यांचा जन्म मेरीलँडच्या टॅलबॉट काउंटीतील टकाहो परिसरात 1818 मध्ये झाला. फ्रेडरिक ऑगस्टस वॉशिंग्टन बेली हे त्यांचे पूर्ण नाव. त्यांच्या जन्माची अचूक जन्मतारीख त्यांनाही माहीत नव्हती; पुढे जाऊन 14 फेब्रुवारी हा दिवस आपला जन्मदिवस म्हणून निश्चित केला! आजघडीला बहुतांश ऐतिहासिक नोंदीमध्ये 1818 हेच त्यांचे जन्मवर्ष मानले गेलेय. त्यांच्या आई हॅरिएट बेली या गुलाम होत्या आणि वडील कोण होते याबद्दल डग्लस यांनी स्वतःच्या आत्मचरित्रांत ठाम माहिती दिलेली नाही; मात्र त्यांच्या वडिलांबद्दल गोऱ्या मालकाशी संबंधित असण्याची शक्यता त्यांनी नोंदवलीय. गुलामांच्या कुटुंबव्यवस्थेला गुलाममालकांची सत्ता कशी मोडून काढत असे, याचे पहिले दर्शन त्यांना स्वतःच्या बालपणातच झाले. आईपासून त्यांना जवळजवळ दूरच ठेवण्यात आले; त्यांच्या आईला ते आयुष्यात फारच थोड्या वेळा भेटले. त्यांचे बालपण मुख्यतः आजी बेट्सी बेली यांच्या झोपडीभोवती आणि नंतर मालकांच्या इस्टेटवर गेले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गुलामगिरीची क्रूरता केवळ चाबकाच्या फटक्यांत नसते हे त्यांनी अतिशय टोकदारपणे अनुभवले; माणसाला स्वतःच्या जीवनाची कथा सांगण्याचा अधिकार नाकारणे ही गुलामगिरीची सर्वोच्च हिंसा असते असं डग्लसनी म्हटलंय. बालपणात याची अनुभूती त्यांनी नित्य घेतली. गुलाम मुलाला शाळेत जायला अनुमती नव्हती, त्याच्यासाठी पुस्तके नव्हती, त्याला शिक्षणाचा अधिकार नव्हता. पण नियतीने फ्रेडरिकला एका विलक्षण वळणावर आणून उभे केले, आणि ते म्हणजे बाल्टिमोर.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;1826 मध्ये, साधारण आठ वर्षांचे असताना, फ्रेडरिक यांना बाल्टिमोरमधील ह्यू आणि सोफिया ऑल्ड यांच्या घरी पाठवण्यात आले. तेथे त्यांना ह्यू ऑल्ड यांच्या लहान मुलाची देखभाल करण्याचे काम करायचे होते. त्यांना बाल्टिमोरला का पाठवण्यात आले, याची पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. हा प्रवास शिक्षणासाठी किंवा कुटुंबाच्या इच्छेने झालेला नव्हता; मुळात गुलामांचा प्रवास त्यांच्या मर्जीने कधीच होत नसे! फ्रेडरिकला त्याच्या मालकाच्या नातेवाईकांच्या घरी कौटुंबिक सेवेसाठी पाठवण्यात आले होते. ह्यू ऑल्ड हे त्यांच्या मालकाच्या कुटुंबाशी संबंधित होते आणि फेल्स पॉइंट या जहाजबांधणीच्या परिसराशी त्यांचा संबंध होता. त्यामुळे ग्रामीण गुलामशेतीच्या जगातून शहरातील वेगळ्या वातावरणात प्रवेश करण्याची संधी डग्लसना मिळाली.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ह्याच बाल्टिमोरमध्ये त्यांच्या आयुष्याचा सर्वांत निर्णायक अध्याय सुरू झाला. ह्यू ऑल्ड यांची पत्नी सोफिया ऑल्ड यांनी सुरुवातीला डग्लस यांना वर्णमालेची अक्षरे शिकवली. तीन-चार अक्षरी शब्द वाचण्यापर्यंत त्यांना मदत केली. त्या वेळी सोफिया यांना गुलामाला शिक्षण देणे किती धोकादायक आणि कायद्याच्या विरोधात आहे, याची पूर्ण जाणीव नव्हती. ह्यू ऑल्ड यांना हे कळताच त्यांनी तिला ताबडतोब थांबवले. गुलाम वाचायला शिकला तर तो गुलाम राहणार नाही, असे ठणकावून सांगितले. ज्ञान आणि स्वातंत्र्य यांच्यातील हे नाते डग्लस यांच्या मनात याच प्रसंगातून घट्ट बसले. त्यांनी नंतर लिहिलेय की, ह्यू ऑल्ड यांनी शिक्षणाविरुद्ध केलेला युक्तिवाद त्यांच्या मनात शिक्षणाची इच्छा अधिकच तीव्र करून गेला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;इथे सोफिया ऑल्ड आणि फ्रेडरिक डग्लस यांच्या आयुष्यांची तुलना विलक्षण अर्थपूर्ण ठरते. सोफिया एका गुलामाला माणूस म्हणून पाहण्याची सुरुवातीची क्षमता बाळगून होती; पण ती क्षमता गुलामगिरीच्या सामाजिक-सत्तात्मक रचनेने हळूहळू कुंठित केली. डग्लस यांनी स्वतःच्या लेखनात, तिच्या परिवर्तनाचे अत्यंत तीक्ष्ण चित्रण केले आहे. सुरुवातीला मृदू असलेली स्त्री गुलाममालकीच्या सवयीने कठोर होत गेली, असे त्यांनी दाखवले. म्हणून सोफिया ऑल्ड यांची कथा केवळ, 'दयाळू स्त्रीने डग्लसला अक्षरओळख करून दिली' एवढी साधीसरळ नाही. गुलामगिरीच्या नैतिक विडंबनेचे ती जिवंत उदाहरण ठरते, ज्या व्यवस्थेत दयाभावालाही स्वामित्वाच्या हक्कापुढे शरण जावे लागते. डग्लस यांनी त्यांच्याविषयी आयुष्यभर भावनिक गुंतागुंत जपली; मात्र पुढील काळात त्यांच्यात पूर्वीसारखी आत्मीयता कायम राहिली, असे सरसकट म्हणणे अचूक ठरणार नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सोफियाने शिकवणे थांबवले, पण फ्रेडरिकची अक्षरांशी मैत्री थांबली नाही. त्यांनी बाल्टिमोरच्या रस्त्यांना आपली शाळा बनवले. गरीब श्वेत मुलांना भाकरी देऊन त्यांच्याकडून वाचनाचे धडे घेतले, नजरेस पडणारी प्रत्येक अक्षरे टिपून घेतली, जहाजांवरील शब्द आणि सांकेतिक अंक, खुणा लक्षात ठेवल्या, भिंतीवर खडूने लिहिण्याचा सराव केला. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांना &amp;lsquo;द कोलंबियन ऑरेटर&amp;rsquo; हे पुस्तक त्यांच्या हाती पडले. भाषणे, वादविवाद आणि नैसर्गिक हक्कांवरील लिखाणाने भरलेले हे पुस्तक त्यांच्या वैचारिक आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरले. गुलामगिरीत जन्मलेल्या मुलाच्या हातात हे पुस्तक आले आणि त्याला प्रथमच शब्दांच्या मागे &amp;lsquo;स्वातंत्र्य&amp;rsquo;, &amp;lsquo;हक्क&amp;rsquo;, &amp;lsquo;मानव&amp;rsquo; आणि &amp;lsquo;न्याय&amp;rsquo; या संकल्पना दिसू लागल्या.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मात्र शिक्षणाची ही तहान गुलामगिरीला सहन होणारी नव्हती. 1833 मध्ये फ्रेडरिक यांना पुन्हा पूर्व मेरीलँडमध्ये, थॉमस ऑल्ड यांच्या ताब्यात पाठवण्यात आले. पुढील काळात त्यांना एडवर्ड कोव्ही ह्या, गुलामांचे खच्चीकरण करणाऱ्या कुप्रसिद्ध शेतकऱ्याकडे काम करावे लागले. सततच्या मारहाणीने आणि अमानुष श्रमाने त्यांचा आत्मविश्वास मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला. पण 1834 मध्ये एडवर्ड कोव्हीशी झालेल्या झटापटीत डग्लस यांनी प्रतिकार केला आणि त्यानंतर कोव्हीने त्यांना पुन्हा चाबकाने मारण्याचे धाडस केले नाही. या प्रसंगाचा अर्थ त्यांच्या आत्मकथेत फार मोठा आहे. गुलामगिरीच्या चाबकाच्या वादीवर पहिल्यांदाच एखाद्या मनुष्याद्वारे प्रतिकाराची खूण उमटवली होती.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;1836 मध्ये त्यांनी सहकाऱ्यांसह पलायनाचा प्रयत्न केला; तो उधळला गेला आणि त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. मात्र या अपयशानंतर त्यांना पुन्हा बाल्टिमोरला पाठवण्यात आले. तेथे त्यांनी जहाजबांधणीशी संबंधित काम शिकण्यास सुरुवात केली. या काळात त्यांची भेट अॅना मरे या मुक्त कृष्णवर्णीय तरुणीशी झाली. अॅना मरेने त्यांच्या स्वातंत्र्याच्या प्रयत्नात अत्यंत महत्त्वाची साथ दिली. 3 सप्टेंबर 1838 रोजी डग्लस यांनी खलाशाचा वेश धारण करून रेल्वेने उत्तर दिशेला पलायन केले. चोवीस तासांच्या आत ते न्यूयॉर्कमध्ये पोहोचले. जगाने त्यांची ओळख गुलाम म्हणून निश्चित केली होती मात्र त्या पलायनाच्या त्या क्षणापासून त्यांनी स्वतःच्या नावाचा आणि आयुष्याचा अधिकार परत मिळवण्याची जिद्द बाळगली.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पलायनानंतर न्यू बेडफर्ड येथे अॅना मरेशी त्यांचा विवाह झाला. फ्रेडरिक डग्लस यांच्या चरित्रात त्यांच्या प्रखर सार्वजनिक व्यक्तिमत्त्वाच्या सावलीत अॅनाचे योगदान अनेकदा हरवून जाते. अॅना मुक्त विचारांची कृष्णवर्णीय स्त्री होती; डग्लस सार्वजनिक जीवनात व्यस्त असताना त्यांच्या घराच्या देखभालीचे, मुलांच्या संगोपनाचे आणि सततच्या प्रवासाचे ओझे तिने वाहिले. या दांपत्याला रोझेटा, लुईस, फ्रेडरिक ज्युनियर, चार्ल्स रेमंड आणि अॅनी अशी पाच मुले झाली; त्यांची मुलगी अॅनी हिचे वयाच्या दहाव्या वर्षी निधन झाले. त्याचा त्यांना विलक्षण धक्का बसला. डग्लस यांच्या पुढील सार्वजनिक आणि पत्रकारितेच्या कामात त्यांच्या मुलांनीही सहभाग घेतला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;1841 मध्ये डग्लस यांना मॅसॅच्युसेट्स अँटी-स्लेव्हरी सोसायटीच्या वतीने व्याख्याने देण्याची संधी मिळाली. त्यांच्या आवाजात गुलामगिरीच्या वेदनांचा कारुण्यभाव होता; पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे स्वतःच्या भीषण अनुभवांना सार्वजनिकरित्या नैतिक प्रश्नात रूपांतरित करण्याची विलक्षण क्षमता होती. सुरुवातीच्या काळात, काही श्रोत्यांना इतक्या प्रभावी भाषेत बोलणारा कृष्णवर्णीय माणूस पूर्वी गुलाम असू शकतो, यावरच विश्वास बसत नसे. त्यांच्या वाणीने त्यांच्या वर्णाविषयी लादलेल्या पूर्वग्रहांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी स्वतःला 'अपवाद' म्हणून सिद्ध करण्याऐवजी संपूर्ण गुलाम समाजाच्या माणूसपणाचा दावा केला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;याच अनुभवातून 1845 मध्ये 'नॅरेटिव्ह ऑफ द लाइफ ऑफ फ्रेडरिक डग्लस, अॅन अमेरिकन स्लेव्ह, रायटन बाय हिमसेल्फ' हे त्यांचे पहिले आणि सर्वाधिक प्रभावशाली आत्मचरित्र प्रकाशित झाले. हे पुस्तक केवळ आत्मकथन नव्हते; गुलामगिरीविरुद्ध साकारलेला तो एक जिवंत दस्तऐवज होता. विल्यम लॉयड गॅरिसन यांच्या प्रस्तावनेसह प्रकाशित झालेल्या या ग्रंथाने अमेरिकन साहित्याला नवा आवाज बहाल केला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;डग्लस यांच्या लेखनाचे सामर्थ्य त्याच्या अनुभवाच्या सत्यतेत होते. गुलामगिरीवर श्वेतवर्णियांनी लिहिलेल्या सहानुभूतीपूर्ण पुस्तकापेक्षा स्वतः गुलाम राहिलेल्या व्यक्तीने स्वतःची कथा सांगणे, हा मूलभूत राजकीय विद्रोह त्यांनी केला होता. 'गुलामाला बुद्धी नसते', 'गुलामाला स्वातंत्र्याची कल्पना नसते', 'गुलामगिरी ही गुलामांच्या हिताची आहे' हे त्या काळचे वांशिक पूर्वग्रह होते; त्यांच्या आत्मचरित्राने त्यावर थेट प्रहार केला. म्हणूनच ह्या पुस्तकाची दखल साहित्य म्हणून जशी घेतली जाते तसेच राजकीय दस्तऐवज म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. पुस्तकाच्या यशामुळे डग्लस यांना पुन्हा जेरबंद केले जाण्याचा धोका वाढला; परिणामी 1845 मध्ये ते ब्रिटन व आयर्लंडला गेले. ब्रिटनमधील समर्थकांनी पुढे त्यांची कायदेशीर मुक्तता मिळवण्यासाठी पैसे उभे केले; 1846 मध्ये त्यांना औपचारिकरीत्या मुक्त करण्यात आले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;परदेशातून परतल्यानंतर डग्लस यांनी आपला आवाज बुलंद केला. 1847 मध्ये रोचेस्टर, न्यूयॉर्क येथे त्यांनी *द नॉर्थ स्टार* हे वृत्तपत्र सुरू केले. 'Right is of no Sex : Truth is of no Color, God is the Father of us all, and all we are Brethren' हे त्याचे घोषवाक्य होते. पत्रकारिता त्यांच्यासाठी केवळ बातम्यांचे माध्यम नव्हते; गुलामांच्या आवाजाला सार्वजनिक क्षेत्रात स्थान मिळवून देण्याची ती अक्षर शस्त्रसज्जता होती. पुढे त्यांनी 'फ्रेडरिक डग्लस&amp;rsquo; पेपर', 'डग्लस&amp;rsquo; मंथली' आणि 'द न्यू नॅशनल एरा' यांसारख्या प्रकाशनांतून आपला वैचारिक प्रभाव विस्तारला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;याच काळात त्यांचे विचारही विकसित होत गेले. सुरुवातीला विल्यम लॉयड गॅरिसनच्या गुलामगिरीविरोधी चळवळीशी त्यांची जवळीक होती; पण पुढे अमेरिकेच्या संविधानाबाबत त्यांची भूमिका गॅरिसनपेक्षा वेगळी झाली. 1851 मध्ये त्यांनी संविधानाचा अर्थ गुलामगिरीच्या बाजूने नसून तिच्या विरोधात वापरता येऊ शकतो, असा आग्रह धरला. हा मतभेद केवळ वैयक्तिक नव्हता; तो डग्लस यांच्या राजकीय परिपक्वतेचा टप्पा होता. त्यांनी चळवळीत काम करताना सोबतच्या एखाद्या नेत्याचे अनुकरण करण्याऐवजी, स्वतःची राजकीय बुद्धी वापरण्यास सुरुवात केली.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;1852 मध्ये हॅरिएट बीचर स्टो यांचे 'अंकल टॉम्स कॅबिन', प्रसिद्ध झाले. 1855 मध्ये डग्लस यांचे दुसरे आत्मचरित्र 'माय बाँडेज अँड माय फ्रीडम' प्रकाशित झाले. त्याच काळात वॉल्ट व्हिटमन यांनी 'लीव्ह्ज ऑफ ग्रास'चे लेखन करुन अमेरिकन कवितेच्या रूढ चौकटी मोडीत काढल्या होत्या. राल्फ वॉल्डो एमर्सनचा ट्रान्सेंडेन्टलिझम, हेन्री डेव्हिड थोरोचे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि नागरी अवज्ञेचे विचार, हॅरिएट बीचर स्टो यांचे गुलामगिरीविरोधी कथालेखन आणि कृष्णवर्णीय लेखकांच्या गुलाम-कथनांची परंपरा; ह्या सर्वांच्या संगमात डग्लस यांचे लेखन उभे राहते. त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्यपूर्ण बाजू अशी की, त्यांनी गुलामगिरीचा अनुभव केवळ करुणेच्या भाषेत मांडला नाही; त्यांनी तो बुद्धी, नैतिकता, राजकारण आणि स्वाभिमान यांच्या भाषेत मांडला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;स्त्रियांच्या हक्कांबाबतही त्यांची भूमिका त्या काळाच्या मानाने पुढारलेली होती. 1848 मध्ये सेनिका फॉल्स येथे झालेल्या पहिल्या महिला हक्क अधिवेशनाला ते उपस्थित राहिले आणि स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा, या मागणीला पाठिंबा दिला. गुलामगिरीविरोधी लढा आणि स्त्रीस्वातंत्र्याचा लढा हे दोन स्वतंत्र प्रश्न नसून समान मानवी हक्कांच्या संघर्षाचे भाग आहेत, अशी त्यांची भूमिका होती. पुढील आयुष्यातही ते स्त्री-पुरुष समानतेच्या बाजूने राहिले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;1859 मध्ये जॉन ब्राउनने, हार्पर्स फेरी येथील शस्त्रागारावर हल्ला केला. गुलामांचा उठाव घडवून आणण्याचा ब्राउनचा प्रयत्न अयशस्वी ठरला. डग्लस यांचे ब्राउनशी संबंध होते; त्यांच्यावरील संभाव्य कारवाईच्या भीतीने डग्लस कॅनडा आणि नंतर ब्रिटनकडे गेले. हा प्रसंग त्यांच्या राजकीय विचारातील आणखी एका गुंतागुंतीचा दाखला आहे. अहिंसक चळवळीच्या सार्वजनिक राजकारणाशी बांधील राहूनही गुलामगिरीसारख्या हिंसक व्यवस्थेविरुद्ध सशस्त्र प्रतिकाराची अपरिहार्यता आणि नैतिकता त्यांना समजत होती.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गृहयुद्ध सुरू झाले तेव्हा डग्लस यांचा आवाज आणखी बुलंद झाला. कृष्णवर्णीय सैनिकांना संघराज्याच्या सैन्यात भरती करून घेण्याची त्यांनी मागणी केली. मॅसॅच्युसेट्सच्या चोपन्नाव्या कृष्णवर्णीय रेजिमेंटसाठी त्यांनी भरती मोहिमेत काम केले. राष्ट्रासाठी रक्त सांडणाऱ्या कृष्णवर्णीय सैनिकांना राष्ट्राच्या नागरिकत्वापासून वंचित ठेवता येणार नाही, हा त्यांच्या विचाराचा गाभा होता. गुलामगिरीच्या समाप्तीनंतरही त्यांचा संघर्ष संपला नाही; कारण त्यांच्या दृष्टीने मुक्ती म्हणजे केवळ बेड्या तुटणे नव्हते. मुक्ती म्हणजे मतदानाचा अधिकार, शिक्षण, नागरी समानता, रोजगार आणि प्रतिष्ठेची संपूर्ण पुनर्स्थापना होती असे ते म्हणत असत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गृहयुद्धानंतरच्या पुनर्बांधणीच्या काळात त्यांचे सार्वजनिक जीवन अधिक व्यापक झाले. त्यांनी कृष्णवर्णियांच्या मतदानाच्या अधिकारासाठी, नागरी हक्कांसाठी आणि वांशिक हिंसेविरुद्ध सातत्याने आवाज उठवला. त्यांची राजकीय भूमिका आता गुलामगिरीच्या अंतापलीकडे गेली होती. अमेरिकेने गुलामगिरी नष्ट केली असली तरी वंशभेदाची मानसिकता, कायदेशीर असमानता आणि सामाजिक हिंसा कायम होती. म्हणूनच डग्लस यांच्या उत्तरायुष्यातील भाषणे आणि लेखन हे मुक्तीनंतरच्या अपूर्ण स्वातंत्र्याचे दस्तऐवज बनले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्यांच्या सार्वजनिक कारकीर्दीत सरकारी जबाबदाऱ्याही आल्या. 1877 मध्ये ते डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाचे यू.एस. मार्शल झाले; 1881 मध्ये ते डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाचे रेकॉर्डर ऑफ डीड्स झाले. 1889 मध्ये हैती ह्या बेटवजा देशासाठी मंत्री आणि कॉन्सुल जनरल म्हणून त्यांची नियुक्ती झाली. म्हणजेच ज्या व्यक्तीला तरुणपणी कायद्याच्या दृष्टीने मनुष्य म्हणून पूर्ण मान्यता नव्हती, तोच पुढे अमेरिकन सरकारचा अधिकृत प्रतिनिधी बनला! इतिहासातील हा विरोधाभास त्यांच्या जीवनकथेचे विलक्षण सौंदर्य आणि अमेरिकन लोकशाहीच्या संघर्षमय प्रवासाचे प्रतीक आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;फ्रेडरिक डग्लस यांच्या कौटुंबिक जीवनाकडे पाहिले तर त्यांच्या सार्वजनिक व्यक्तिमत्त्वामागील दुसरीच दुनिया दिसते. अॅना मरे डग्लस चव्वेचाळीस वर्षे त्यांची सहचारिणी होती. तिने त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा भार कौटुंबिक पातळीवर उचलला, परंतु त्यांच्या आत्मचरित्रांत तिचा उल्लेख तुलनेने कमी आहे. 1882 मध्ये अॅनाच्या निधनानंतर डग्लस खोल नैराश्यात गेले. 1884 मध्ये त्यांनी हेलन पिट्स या श्वेतवर्णीय स्त्रीशी विवाह केला. हा आंतरवर्णीय विवाह त्या काळी मोठ्या सामाजिक वादाचा विषय ठरला. हेलन त्यांच्या सचिव म्हणून काम करत होत्या आणि त्या डग्लसपेक्षा वयाने सुमारे वीस वर्षांनी लहान होत्या. या विवाहामुळे त्यांच्या कुटुंबात आणि सार्वजनिक जीवनातही प्रतिक्रिया उमटल्या; तरी दोघांनी आपला निर्णय कायम ठेवला. त्यांना अपत्य झाले नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सोफिया ऑल्डच्या आयुष्याशी डग्लस यांच्या आयुष्याची तुलना इथे पुन्हा वेगळ्या अर्थाने उभी राहते. सोफिया एका गुलामाला अक्षर शिकवणारी स्त्री म्हणून इतिहासात येते; पण तिचे नंतरचे आयुष्य त्या कृतीच्या नैतिक धाडसापेक्षा गुलामगिरीच्या मानसिक संरचनेने बदलले. डग्लस मात्र त्या एका अक्षरापासून पुढे जात राहिले; अक्षरातून शब्द, शब्दातून विचार, विचारातून आत्मभान आणि आत्मभानातून सार्वजनिक प्रतिकार! सोफिया एका व्यवस्थेने बदलली; डग्लस यांनी त्या व्यवस्थेलाच बदलण्याचे आयुष्यभराचे ध्येय स्वीकारले. त्यामुळे या दोघांची कथा ही गुरु-शिष्याची साधी कथा नसून ज्ञान आणि सत्ता, दया आणि मालकी, मनुष्यत्व आणि गुलामगिरी यांच्यातील संघर्षाची कथा आहे ह्यावर अमेरिकन विचारवंतांचे एकमत झाले!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;डग्लस यांनी आपल्या आयुष्याची कथा तीन वेळा लिहिली. 1845 चे 'नॅरेटिव्ह ऑफ द लाइफ ऑफ फ्रेडरिक डग्लस' हे आत्मचरित्र गुलामगिरीतून मुक्त झालेल्या तरुणाची टोकदार साक्ष आहे; 1855 चे 'माय बाँडेज अँड माय फ्रीडम' हे अधिक विस्तृत आणि वैचारिक आत्मकथन आहे; तर 1881 चे 'द लाइफ अँड टाइम्स ऑफ फ्रेडरिक डग्लस' हे दीर्घ सार्वजनिक जीवनाकडे मागे वळून पाहणाऱ्या ज्येष्ठ नेत्याचे आत्मपरीक्षण आहे. या तिन्ही ग्रंथांतून एकाच मनुष्याची तीन वेगवेगळी रूपे दिसतात : गुलाम, मुक्तीचा योद्धा आणि राष्ट्रजीवनात स्थान मिळवलेला महान नागरिक! हा अक्षरप्रवास अचंबित करणारा आहे!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;20 फेब्रुवारी 1895 रोजी वॉशिंग्टन डी.सी. येथे फ्रेडरिक डग्लस यांचे हृदयविकाराने अचानक निधन झाले. त्या दिवशी ते नॅशनल कौन्सिल ऑफ विमेनच्या बैठकीत बोलून परतले होते आणि पत्नी हेलनशी त्या कार्यक्रमाविषयी बोलत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. आयुष्याच्या शेवटच्या क्षणीही त्यांचे जग सार्वजनिक प्रश्नांपासून दूर गेले नव्हते ही गोष्ट विशेष आहे!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;फ्रेडरिक डग्लस यांच्या जीवनाचा विचार करताना त्यांना केवळ 'गुलामगिरीतून सुटलेला गुलाम', म्हणून पाहणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला कमी लेखण्यासारखे ठरेल. त्यांनी गुलामगिरीविरुद्ध लढा दिला, पण त्याचबरोबर कृष्णवर्णीय पत्रकारितेला बळ दिले, आत्मकथनाला राजकीय अस्त्र बनवले, स्त्रियांच्या मतदानाच्या हक्कासाठी उभे राहिले, कृष्णवर्णीय सैनिकांच्या भरतीसाठी प्रयत्न केले, कथित समानतेच्या पुनर्बांधणीच्या राजकारणात हस्तक्षेप केला आणि अमेरिकन लोकशाहीच्या अपूर्णतेवर सातत्याने बोट ठेवले. स्वतःविषयी लिहिण्याचा अधिकार त्यांनी प्रथम हिसकावून घेतला ही त्यांनी केलेली अस्सल क्रांती होती!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आणि म्हणूनच बाल्टिमोरच्या एका घरात उच्चारलेली काही अक्षरे त्यांच्या जीवनात इतकी मोठी ठरली आहेत. सोफिया ऑल्डने त्यांना &amp;lsquo;ए&amp;rsquo;, &amp;lsquo;बी&amp;rsquo;, &amp;lsquo;सी&amp;rsquo; शिकवले; ह्यू ऑल्डने त्या अक्षरसज्जतेवर बंदी घातली; पण त्या निर्बंधानेच डग्लस यांच्या मनात अक्षरांची भूक पेटवली. पुढे त्यांनी शब्दांना आवाज दिला, आवाजाला विचार दिला आणि विचाराला चळवळीचे रूप दिले. गुलामगिरीने त्यांना मौन करायचा प्रयत्न केला; परंतु त्या मौनातून त्यांनी अशी काही ज्वालाग्राही भाषा निर्माण केली की, अमेरिकेला स्वतःच्या इतिहासाचे शब्द पुन्हा वाचावे लागले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ज्या व्यक्तीला माणूस म्हणून वाचण्याचा अधिकार नाकारला गेला, त्यानेच अखेर संपूर्ण राष्ट्राला माणूसपणाचा धडा वाचून दाखवला, ही फ्रेडरिक डग्लस यांच्या जीवनाची हीच सर्वांत मोठी साहित्यिक, ऐतिहासिक विजयगाथा होय!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आजचा दिवस गुलाम व्यापार आणि त्याचे निर्मूलन स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. आपला विवेक कुणापुढेही गहाण टाकणार नाही याची ग्वाही देण्यासाठी फ्रेडरिकच्या स्मरणार्थ हा अक्षरप्रपंच!&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/25/c40eaa7eb9a891ef2070379f2e9b0a53178766426339793_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA['पन्हाळगड ते पावनखिंड' पदभ्रमंती... इतिहासातून माणसाला समृद्ध करणारा भन्नाट निसर्ग अनुभव]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/panhala-to-pawankhind-kolhapur-range-trek-blog-of-umesh-alone-akola-marathi-news-1434747</link><comments>https://marathi.abplive.com/blog/panhala-to-pawankhind-kolhapur-range-trek-blog-of-umesh-alone-akola-marathi-news-1434747#respond</comments><pubDate>Fri, 7 Aug 2026 19:02:00 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/panhala-to-pawankhind-kolhapur-range-trek-blog-of-umesh-alone-akola-marathi-news-1434747</guid><description><![CDATA[&lt;p&gt;महाराष्ट्र एक्स्प्रेस हळूहळू अकोला रेल्वे स्थानकात शिरत होती. गाडीचा वेग कमी होत होता आणि माझ्या मनातल्या आठवणींचा वेग मात्र वाढत होता. तीन दिवसांपूर्वी याच स्थानकावरून मी एका प्रवासासाठी निघालो होतो; पण आज परतताना जाणवत होतं. हा प्रवास फक्त कोल्हापूरचा नव्हता, हा प्रवास साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या इतिहासात जाऊन परत येण्याचा होता. रेल्वेच्या दरवाज्यातून खाली उतरलो. अकोल्याच्या भूमीवर पहिलं पाऊल ठेवलं... आणि नकळत अंगावर रोमांच उभे राहिले.&lt;/p&gt;
&lt;p&gt;तीन दिवसांपूर्वी या भूमीतून निघताना माझ्या मनात इतिहासाबद्दल प्रचंड आदर होता; पण आज परतताना त्या इतिहासाविषयीचं नातं बदललं होतं. कारण तो इतिहास मी आता फक्त वाचलेला नव्हता, तर जगून आलो होतो. सह्याद्रीच्या कुशीत, पावसाच्या सरींत, चिखलाच्या वाटांवर, दगडधोंड्यांच्या पायवाटांवर आणि मावळ्यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या भूमीवर मी स्वतःची काही पावलं उमटवून आलो होतो. जीवनात काही प्रवास असे असतात की ते संपल्यावरही संपत नाहीत. उलट ते तेव्हाच सुरू होतात. प्रत्येक आठवण पुन्हा पुन्हा मनात उलगडत राहते. प्रत्येक प्रसंग नव्याने जगावासा वाटतो. पन्हाळगड ते पावनखिंड ही पदभ्रमंती माझ्यासाठी तसाच प्रवास ठरला.&lt;/p&gt;
&lt;p&gt;गेली चार वर्षे एक व्यक्ती सातत्याने माझ्या मागे लागली होती. &quot;उमेशजी... यंदा काहीही झालं तरी यायचंच...&quot; हा प्रेमळ आग्रह होता अकोल्यातील हिंदवी परिवाराचे सक्रिय मावळे आणि माझे मार्गदर्शक भूषणजी बापट यांचा. दरवर्षी मीही &quot;यावेळी नक्की...&quot; असं म्हणायचो; पण नियतीचा काही वेगळाच बेत असायचा. कधी काम, कधी जबाबदाऱ्या, तर कधी काही अनपेक्षित कारणं... आणि हा प्रवास पुन्हा पुढे ढकलला जायचा.&lt;/p&gt;
&lt;p&gt;मात्र यावर्षी मनाने ठरवलं होतं, आता नाही तर कधीच नाही. कारण काही स्वप्नांना वारंवार पुढे ढकललं की ती स्वप्नं राहत नाहीत... ती हळूहळू पश्चात्ताप बनतात.&lt;br /&gt;आणि मला हा पश्चात्ताप आयुष्यभर बाळगायचा नव्हता. म्हणून यंदा निर्णय झाला. जायचंच...&lt;br /&gt;शिवरायांची वाट चालायचीच... इतिहासाच्या त्या पाऊलखुणा स्वतःच्या डोळ्यांनी पाहायच्याच.&lt;/p&gt;
&lt;p&gt;२९ जुलै... अकोला रेल्वे स्थानकावर एक वेगळंच वातावरण होतं. कोणाच्या खांद्यावर सॅक होती, कोणाच्या हातात भगवा झेंडा होता, कोणाच्या चेहऱ्यावर उत्साह होता, तर कोणाच्या डोळ्यांत स्वराज्याचा अभिमान. आम्ही जवळपास साठ जण.&lt;br /&gt;वय वेगवेगळं... व्यवसाय वेगवेगळे... स्वभाव वेगवेगळे... पण त्या दिवशी आमची ओळख फक्त एकच होती... आम्ही शिवरायांच्या वाटेवर चालायला निघालेलो मावळे होतो. महाराष्ट्र एक्स्प्रेस सुटली...&lt;br /&gt;रेल्वेने वेग घेतला...आणि खिडकीबाहेर मागे सरकणाऱ्या अकोल्यासोबत दैनंदिन आयुष्यही मागे पडू लागलं.&lt;/p&gt;
&lt;p&gt;गाडीत गप्पा रंगल्या. कोणी आधीच्या मोहिमांचे अनुभव सांगत होतं. कोणी पावनखिंडीचा इतिहास सांगत होतं.कोणी पहिल्यांदाच येत असल्यामुळे उत्सुकतेने प्रश्न विचारत होतं. मी मात्र जास्त वेळ खिडकीबाहेर पाहत बसलो होतो. बाहेर धावत जाणारी शेतं दिसत होती... पाऊस नुकताच पडून गेल्यामुळे हिरवागार झालेला विदर्भ दिसत होता... पण मन मात्र सतत सह्याद्रीकडे धावत होतं. कितीदा पुस्तकात वाचलेला तो पन्हाळगड... कितीदा चित्रपटात पाहिलेली ती पावनखिंड... कितीदा ऐकलेली बाजीप्रभूंची रणगर्जना... आता हे सगळं प्रत्यक्ष पाहायला मिळणार होतं. त्या विचारानेच मनात एक वेगळी धडधड सुरू झाली होती.&lt;/p&gt;
&lt;p&gt;दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. पहिल्याच क्षणी जाणवलं...या शहराच्या हवेतच इतिहास मिसळलेला आहे. शहर जागं होत होतं... रस्त्यांवर हलकी धावपळ सुरू झाली होती... आम्ही मात्र सर्वप्रथम करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघालो. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच एक अवर्णनीय शांतता मनात उतरली. प्रवासाची सुरुवात आईच्या आशीर्वादाने होत होती. त्या क्षणी मनात एकच प्रार्थना होती... &quot;आई... हा प्रवास सुखरूप पूर्ण होऊ दे. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे हा इतिहास समजून घेण्याची बुद्धी आणि अनुभवण्याचं भाग्य दे.&quot; दर्शन झालं. मन प्रसन्न झालं. आणि आता खऱ्या प्रवासाची उत्सुकता आणखी वाढली.&lt;/p&gt;
&lt;p&gt;३१ जुलैची सकाळ... ही सकाळ इतर कोणत्याही सकाळीसारखी नव्हती. आज आम्ही फक्त पर्यटनाला निघालो नव्हतो. आज आम्ही इतिहासाच्या दिशेने चालायला निघालो होतो. कोल्हापूर शहर मागे पडत होतं. रस्ता सह्याद्रीच्या दिशेने वळत होता. पावसाच्या सरी अधूनमधून काचांवर आदळत होत्या. डोंगर धुक्याची शाल पांघरून उभे होते. संपूर्ण वातावरणात एक विलक्षण गूढता होती. वाटेत प्रथमच ज्योतिबाचं दर्शन झालं. डोंगरमाथ्यावर वसलेलं ते देवस्थान... आजूबाजूला पसरलेलं धुकं... आणि त्या धुक्यातून उमटणारा भगव्याचा रंग... क्षणभर वाटलं, निसर्गालाही आज भगव्या रंगाचीच उधळण करायची आहे. ज्योतिबाचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा पुढे निघालो... आणि मला अजूनही आठवतं...&lt;/p&gt;
&lt;p&gt;बसच्या खिडकीतून अचानक दूरवर काही काळसर तट दिसू लागले... कोणीतरी हळूच म्हणालं... &quot;तो बघा... पन्हाळगड...&quot; त्या एका वाक्याने बसमध्ये क्षणभर शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा त्या दिशेने वळल्या. माझ्याही... आणि पुढच्या काही क्षणांसाठी मी काहीच बोलू शकलो नाही... कारण दूरवर दिसणारा तो केवळ एक किल्ला नव्हता... तो माझ्या राजाचा इतिहास होता... तो स्वराज्याचा अभिमान होता... आणि पुढच्या तीन दिवसांसाठी तोच माझं जग होणार होता...&lt;/p&gt;
&lt;p&gt;पन्हाळगड जसजसा जवळ येत होता, तसतसं मन अधिकच अस्वस्थ होत होतं. आयुष्यात अनेक किल्ले पाहिले होते. अनेक ऐतिहासिक वास्तूंचं वार्तांकन केलं होतं. पण त्या दिवशी समोर दिसणारा पन्हाळगड हा फक्त दगडांनी उभा केलेला किल्ला नव्हता. तो स्वराज्याच्या अस्तित्वाचा साक्षीदार होता. शिवरायांच्या दूरदृष्टीचा, धैर्याचा आणि संघर्षाचा जिवंत इतिहास होता.&lt;/p&gt;
&lt;p&gt;बस पन्हाळगडाच्या पायथ्याशी पोहोचली. खाली उतरताच सह्याद्रीच्या थंडगार वाऱ्याने चेहऱ्यावर अलगद हात फिरवला. त्या वाऱ्यात एक वेगळाच स्पर्श होता. जणू तो सांगत होता...&quot;स्वागत आहे... आता तुम्ही इतिहासाच्या भूमीत प्रवेश करत आहात.&quot;&lt;/p&gt;
&lt;p&gt;गडावर चढत असताना सभोवताली पसरलेलं धुकं क्षणोक्षणी दाट होत होतं. अधूनमधून पावसाच्या सरी येऊन संपूर्ण परिसर चिंब भिजवत होत्या. हिरवाईने नटलेले तट, पावसाने धुऊन निघालेले दगड, दूरवर पसरलेले सह्याद्रीचे डोंगर... प्रत्येक दृश्य डोळ्यांत साठवून ठेवावंसं वाटत होतं.&lt;/p&gt;
&lt;p&gt;गडावर पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही शिवकालीन धान्यकोठार पाहिलं. आजच्या काळात आपण एखाद्या गोदामाकडे केवळ एक इमारत म्हणून पाहतो; पण हे धान्यकोठार पाहताना जाणवलं की स्वराज्य फक्त तलवारीच्या जोरावर उभं राहिलं नव्हतं. त्यामागे नियोजन होतं... दूरदृष्टी होती... प्रशासन होतं... हजारो सैनिकांच्या पोटाची काळजी घेणारी व्यवस्था होती. प्रत्येक दगड शिवरायांच्या राज्यकारभाराची साक्ष देत उभा होता.&lt;/p&gt;
&lt;p&gt;त्यानंतर आम्ही सज्जाकोठीकडे निघालो. सज्जाकोठी... हे नाव उच्चारतानाच मनात अनेक प्रसंग उभे राहतात. याच वास्तूत बसून छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दी जोहरच्या वेढ्यातून सुटण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. इथेच विशाळगड गाठण्याची योजना आकाराला आली होती. स्वराज्याचं भविष्य ठरवणारा तो निर्णय या भिंतींनी ऐकला होता. मी त्या दगडी भिंतींवर अलगद हात ठेवला... डोळे मिटले... क्षणभर सगळं शांत झालं. आणि मनात एक विलक्षण चित्र उभं राहिलं... रात्र गडद झाली आहे... सिद्दी जोहरचं सैन्य गडाभोवती तळ ठोकून बसलं आहे... सज्जाकोठीत दिव्याच्या मंद प्रकाशात शिवराय आपल्या विश्वासू सरदारांसोबत चर्चा करत आहेत... बाहेर मृत्यू उभा आहे... आत स्वराज्याचं भविष्य ठरत आहे... डोळे उघडले तेव्हा पुन्हा वर्तमानात आलो; पण त्या काही क्षणांत इतिहासाने मला आपल्या कुशीत घेतलं होतं.&lt;/p&gt;
&lt;p&gt;इतिहास वाचताना तो बुद्धीला स्पर्श करतो. पण इतिहासाच्या त्या भूमीवर उभं राहिल्यावर तो थेट हृदयाला स्पर्श करतो. सज्जाकोठीतून बाहेर आलो आणि पुढे पन्हाळगडाच्या मुख्य चौकात पोहोचलो. त्याआधी पन्हाळगड मोहिमेत ज्यांच्या बलिदानाने यशाचे तोरण लावला गेले त्या वीर शिवा काशिद यांच्या समाधीचे दर्शन घेतले. छत्रपतींच्या स्वराज्याच्या लढाईत शिवा काशिदांसारख्या एका ध्येयाने प्रेरित झालेल्या हजारो मावळ्यांच्या समिधा पायात काढल्या गेल्या आहेत. त्यामुळे शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा कळस चढू शकला. त्यानंतर पन्हाळगडाच्या मुख्य चौकात आलो. समोर नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचा भव्य पुतळा उभा होता. उंच मानेने... ताठ नजरेने... हातात तलवार घेऊन... क्षणभर आम्ही सारे नि:शब्द झालो. या महान योद्ध्यामुळेच आज आपण &quot;पावनखिंड&quot; हा शब्द अभिमानाने उच्चारतो. त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. &quot;जय भवानी... जय शिवराय...&quot;&quot;हर हर महादेव...&quot; या घोषणांनी पन्हाळगड दणाणून गेला.&lt;/p&gt;
&lt;p&gt;त्या घोषणांचा प्रतिध्वनी डोंगरकपारींमध्ये घुमत राहिला. आणि त्या प्रतिध्वनीसोबत आमच्याही मनात एक वेगळी ऊर्जा संचारली. क्षणभर वाटलं... आजूबाजूच्या दऱ्यांमधून कुठेतरी मावळे धावत येतील... आणि आपणही त्यांच्या मागे तलवार घेऊन निघू... इतका तो क्षण जिवंत होता. आणि मग... आमच्या पदभ्रमंतीची खरी सुरुवात झाली.&lt;/p&gt;
&lt;p&gt;पन्हाळगड मागे पडू लागला होता. आता आम्ही सह्याद्रीच्या कुशीत खोलवर उतरू लागलो होतो. एका बाजूला ढगांनी मिठी मारलेले डोंगर... दुसऱ्या बाजूला धुक्याच्या पांढऱ्या चादरीत हरवून गेलेल्या दऱ्या... मधूनच हिरव्यागार भातशेतीत काम करणारे शेतकरी... तर वरून अखंड बरसणारा पाऊस. असा पाऊस, जो अंग भिजवत होता; पण मन मात्र विलक्षण हलकं करत होता. आम्ही पुढे चालत होतो. कुणी इतिहासाच्या गप्पा मारत होतं... कुणी सह्याद्रीचं सौंदर्य डोळ्यांत साठवत होतं... तर कुणी आपल्या थकलेल्या पायांकडे पाहून हसत पुन्हा पुढे निघत होतं. आणि मी... मी मात्र वारंवार मागे वळून पन्हाळगडाकडे पाहत होतो. धुक्याच्या आडून अधूनमधून त्याचे तट दिसत होते.&lt;/p&gt;
&lt;p&gt;प्रत्येक वेळी वाटायचं... याच तटावर माझा राजा उभा राहिला असेल... याच वाटेकडे त्याने शेवटची नजर टाकली असेल... आणि मग स्वराज्य वाचवण्यासाठी मृत्यूच्या दिशेने पाऊल टाकलं असेल... पन्हाळगड आता पूर्णतः दिसेनासा झाला असला तरी इतिहास आमच्यासोबत चालू लागला. पहिल्या काही पावलांतच जाणवलं की ही वाट सोपी नाही. कुठे चिखल... कुठे घसरडी पायवाट... कुठे दगड... तर कुठे खोल उतार... पण त्या प्रत्येक पावलागणिक एकच विचार मनात घोळत होता... आज आपण पाठीवर सॅक घेऊन चालतोय... पायात मजबूत बूट आहेत... पावसापासून वाचवणारा रेनकोट आहे... पण साडेतीनशे वर्षांपूर्वी याच वाटेवरून मावळे तलवार, ढाल आणि स्वराज्याचं स्वप्न घेऊन धावत होते. त्यांच्या पायांना फोड आले नसतील का?... त्यांनाही थकवा आला नसेल का? नक्कीच आला असेल... पण त्यांच्या मनात एकच ध्यास होता... &quot;राजे सुरक्षित विशाळगडावर पोहोचले पाहिजेत.&quot;&lt;/p&gt;
&lt;p&gt;हा विचार त्यांच्या शरीरापेक्षा मोठा होता. म्हणूनच ते आजही अमर आहेत. सह्याद्रीच्या दऱ्या, हिरवाईने नटलेली शेतं, भातलावणीत गुंतलेले शेतकरी, डोंगरावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे... निसर्ग आज त्याच्या सर्वोत्तम रूपात आमच्यासमोर उभा होता. वरून पडणाऱ्या पावसाच्या सरी जणू आम्हाला भिजवत नव्हत्या... त्या आम्हाला शुद्ध करत होत्या. मनात साचलेला थकवा, ताण, धावपळ... सगळंच त्या पावसाबरोबर वाहून जात होतं.&lt;/p&gt;
&lt;p&gt;आम्ही चालत होतो... आणि सह्याद्री आमच्याशी बोलत होता. तो प्रत्येक डोंगर जणू एखादी कथा सांगत होता. प्रत्येक वळणावर इतिहास उभा होता. प्रत्येक दगडावर स्वराज्याचं नाव कोरलेलं जाणवत होतं. असं वाटत होतं... आपण चालत नाही... इतिहासच आपल्याला हात धरून पुढे घेऊन चाललाय... आणि पुढे... आमची वाट पाहत होतं, मसाई पठार.... इतिहासाच्या सर्वात थरारक पर्वाची सुरुवात जिथून होते... त्या पवित्र भूमीवर पाऊल ठेवण्यापूर्वीच मनाची धडधड वाढू लागली होती...&lt;/p&gt;
&lt;p&gt;इतिहास कधी कधी इतका जिवंत होतो की, वर्तमान त्याच्यासमोर फिकं पडतं. त्या दिवशी माझ्याबाबत नेमकं तेच घडत होतं. दुपार जवळ येत होती. समोर एक विशाल मोकळं पठार दिसू लागलं. हिरवाईने नटलेलं... ढगांनी वेढलेलं... आणि तरीही मनात एक वेगळीच गंभीरता निर्माण करणारं... हेच होतं... मसाई पठार. पहिल्याच पावलात त्या भूमीने काहीतरी वेगळं जाणवून दिलं. इथं फक्त गवत नव्हतं. इथं फक्त वारा नव्हता. इथं इतिहास श्वास घेत होता. असं म्हणतात की काही भूमींच्या कणाकणात स्मृती साठलेल्या असतात. मसाई पठार त्यापैकीच एक.&lt;/p&gt;
&lt;p&gt;कारण इथंच छत्रपती शिवाजी महाराज आणि सिद्दी जोहरच्या सैन्याची प्रत्यक्ष गाठ पडली होती. इथंच तलवारींचा आवाज घुमला होता. इथंच रणशिंग फुंकलं गेलं होतं. इथंच स्वराज्यासाठी रक्त सांडलं होतं. त्या भूमीवर उभा राहिलो... आणि नकळत माझे हात जोडले गेले. डोळे मिटले. मनात एकच भावना होती...&quot;राजे... तुमच्या पावलांनी पावन झालेल्या या भूमीला माझा साष्टांग प्रणाम.&quot; त्या क्षणी आसपास उभे असलेले सातशेहून अधिक शिवभक्तही शांत झाले होते. जणू प्रत्येक जण आपापल्या मनात शिवरायांशी संवाद साधत होता.&lt;/p&gt;
&lt;p&gt;थोड्याच वेळात हिंदवी परिवाराचे संस्थापक डॉ. शिवरत्न शेटे सर बोलायला उभे राहिले. त्यांच्या हातात ना कागद होता... ना पुस्तक... ना कोणती नोंद. पण त्यांच्या शब्दांत इतिहासाचं संपूर्ण विश्व होतं. पहिलंच वाक्य त्यांनी उच्चारलं... आणि आम्ही सगळे जण जणू काळाच्या प्रवाहात मागे वाहत गेलो. क्षणात वर्ष १६६० समोर उभं राहिलं. आता आमच्यासमोर हिरवंगार मसाई पठार नव्हतं. आमच्या डोळ्यांसमोर उभा होता पन्हाळगड... त्याभोवती सिद्दी जोहरचा अभेद्य वेढा... चारही बाजूंनी तैनात हजारो सैनिक... तोफांचा मारा... दारूगोळ्याचा धूर... गडावर अडकलेले शिवाजी महाराज... आणि स्वराज्याच्या भविष्याची चिंता... शेटे सर बोलत नव्हते... ते इतिहास जगवत होते. त्यांच्या आवाजात कधी तलवारींची धार जाणवत होती... कधी रणभेरी ऐकू येत होती...कधी शिवरायांचा निर्धार दिसत होता... तर कधी मावळ्यांच्या डोळ्यांतला जाज्वल्य विश्वास.&lt;/p&gt;
&lt;p&gt;आम्ही ऐकत नव्हतो... आम्ही त्या प्रसंगाचा भाग बनलो होतो. इतिहास म्हणजे फक्त तारखा आणि घटना नसतात... इतिहास म्हणजे त्या काळातल्या माणसांच्या मनात डोकावण्याची संधी असते...हे त्या दिवशी प्रथमच इतकं खोलवर जाणवलं. शेटे सर सांगत होते... शिवरायांनी प्रत्येक डाव कसा आखला... सिद्दी जोहरच्या वेढ्याची प्रत्येक कडी कशी अभ्यासली... शिवा काशीदसारखा सामान्य न्हावी स्वराज्यासाठी स्वतःचा जीव कसा अर्पण करतो... आणि स्वराज्य म्हणजे एका माणसाचं नव्हे, तर लाखो लोकांच्या विश्वासाचं नाव कसं आहे... प्रत्येक प्रसंग अंगावर काटा आणत होता. अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळलं होतं. अन् आपसुकच माझ्याही...&lt;/p&gt;
&lt;p&gt;पत्रकार म्हणून असंख्य भाषणं ऐकली होती. अनेक वक्ते पाहिले होते. पण त्या दिवशी जे घडत होतं, ते भाषण नव्हतं.तो इतिहासाचा पुनर्जन्म होता. इतिहास उत्कर्षबिंदूवर पोहोचला. सगळ्यांचा श्वास रोखला गेला. आता पुढे काय? आता शिवराय काय करतील... आता विशाळगड कसा गाठला जाईल?... आम्ही सगळे त्या कथेत इतके हरवून गेलो होतो की वर्तमान विसरलो होतो. आणि तेव्हाच... डॉ. शेटे सर शांत झाले. हलकंसं हसले. आणि म्हणाले... &quot;इतिहासाचा पुढचा भाग... पावनखिंडीत.&quot;... क्षणभर कुणीच काही बोललं नाही. मग सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकाच वेळी हास्य उमटलं. आता पावनखिंडीची ओढ कितीतरी पटीने वाढली होती. तोपर्यंत चालणारी पदभ्रमंती आता केवळ प्रवास उरली नव्हती. आता ती इतिहासाचा शेवटचा अध्याय स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची तीव्र इच्छा बनली होती.&lt;/p&gt;
&lt;p&gt;दुपारचं साधं पण मनापासून बनवलेलं जेवण उरकलं. थोडा वेळ विश्रांती घेतली. आणि पुन्हा आम्ही चालायला सुरुवात केली. आता काळ्याकुट्ट् ढगाआड लपलेला सूर्य पश्चिमेकडे झुकू लागला होता. सह्याद्रीवर संध्याकाळ अलगद उतरू लागली होती. ढग अधिकच खाली आले होते. वारा थंड झाला होता. पहिल्या दिवसाच्या पदभ्रमंतीचा शेवट जवळ येत होता. आणि समोर दिसू लागलं... खोतवाडी. सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं एक छोटंसं, शांत, निरागस गाव. हे गाव पाहताच शहरात राहणाऱ्या मनाला पहिल्यांदा कळलं... समृद्धी म्हणजे नेहमी मोठ्या इमारती नसतात. समृद्धी म्हणजे अशीही असते... जिथे माणसं घराचे दरवाजेच नाही, तर मनाची दारंही उघडी ठेवतात.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;त्या रात्री आम्हा सर्वांची व्यवस्था गावकऱ्यांच्या घरांमध्ये करण्यात आली होती. पहिल्यांदाच भेटणारी माणसं...पण स्वागत मात्र घरच्या माणसांसारखं. कोणी गरम चहा घेऊन उभं... कोणी जेवण वाढत होतं... कोणी विचारत होतं... &quot;थकला असाल ना? आधी हातपाय धुवा...&quot; त्या क्षणी जाणवलं... शिवरायांनी फक्त किल्ले नाही उभारले...त्यांनी माणुसकीची परंपराही घडवली.&lt;/p&gt;
&lt;p&gt;रात्री बाहेर पडलो. संपूर्ण गाव काळोखात विसावलं होतं. मोबाईलला रेंज नव्हती. वाहनांचा आवाज नव्हता. फक्तक्ष रातकिड्यांचं आणि &amp;nbsp;बेडकांचं संगीत... झाडांवरून टपटपणाऱ्या पावसाच्या थेंबांचा नाद... आणि सह्याद्रीच्या कुशीत पसरलेली निरव शांतता... अशा शांततेचा आवाज मी आयुष्यात प्रथमच ऐकत होतो. त्या रात्री झोपताना एकच विचार मनात होता... आज इतिहासाने माझा हात धरला आहे... उद्या तो मला आणखी कुठे घेऊन जाणार आहे...?&lt;/p&gt;
&lt;p&gt;पहाट अजून पूर्ण उजाडली नव्हती. खोतवाडीच्या डोंगररांगांवर धुक्याची पांढरी चादर अलगद पसरली होती. रात्रभर पडलेल्या पावसामुळे मातीचा सुगंध संपूर्ण गावभर दरवळत होता. कोंबड्याच्या आरवण्याने गाव जागं होत होतं, पण सह्याद्री मात्र अजून शांत होता. जणू तोही आमची वाट पाहत होता. रात्री गावकऱ्यांच्या घरात इतक्या समाधानाने झोप लागली होती की, सकाळी जाग आली तेव्हा क्षणभर आपण कुठे आहोत, हाच प्रश्न पडला. मोबाईल नव्हता, नेटवर्क नव्हतं, शहराचा गोंगाट नव्हता... फक्त निसर्ग होता. कित्येक वर्षांनी आयुष्य इतकं शांत झालं होतं.&lt;/p&gt;
&lt;p&gt;गरमागरम चहा हातात घेतला आणि घराच्या ओसरीवर उभा राहिलो. समोर हिरव्या डोंगरांच्या कुशीत हरवलेलं खोतवाडी हळूहळू जागं होत होतं. अंगण झाडणाऱ्या आजी, गुरं सोडणारे शेतकरी, धुराच्या रेषा काढत पेटलेल्या चुली... या दृश्यांनी मनात एक वेगळीच उब निर्माण केली. साधा नाश्ता झाला.सॅक पुन्हा खांद्यावर चढली.बुटांची लेस घट्ट बांधली. रेनकोट अंगावर चढवला. आणि आम्ही पुन्हा एकदा &quot;जय भवानी... जय शिवराय!&quot;च्या गर्जनेने सह्याद्रीच्या दिशेने निघालो.&lt;/p&gt;
&lt;p&gt;आजचा दिवस वेगळा होता. आज तब्बल बत्तीस किलोमीटरचा प्रवास करायचा होता. अनुभवी मावळे सहज म्हणत होते, &quot;आज खरी परीक्षा आहे.&quot; तेव्हा त्या वाक्याचं गांभीर्य पूर्णपणे कळलं नव्हतं. पण पुढच्या काही तासांत सह्याद्रीने त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ स्वतः शिकवला. गाव मागे पडलं. पायवाट जंगलात शिरली. आणि काही मिनिटांतच सभोवताली इतकं दाट जंगल पसरलं की वर आकाश आहे, हेही विसरायला झालं. प्रचंड उंच झाडं... त्यांना बिलगलेल्या वेली... पायाखाली चिखल... मधूनच एखादा ओढा...तर कधी गुडघ्यापर्यंत पाणी साचलेला नाला... वरून अखंड कोसळणारा पाऊस... या सगळ्यांच्या मध्ये आम्ही चालत होतो.&lt;/p&gt;
&lt;p&gt;पाऊस इतका सतत पडत होता की काही वेळाने भिजण्याची जाणीवच संपली. कपडे भिजले, बूट भिजले, सॅक भिजली... पण मन मात्र विलक्षण हलकं होत गेलं. काही वेळाने लक्षात आलं... शहरात आपण पावसापासून स्वतःला वाचवत असतो.इथे मात्र आम्ही पावसात स्वतःला हरवत होतो. तो पाऊस अंगावर पडत नव्हता. तो मनावर पडत होता. जंगलात पक्ष्यांचे आवाज घुमत होते. मधूनच एखादा मोर आरवत होता. दूरवर एखादा धबधबा कोसळण्याचा आवाज ऐकू येत होता. निसर्गाचं हे संगीत इतकं मोहक होतं की काही वेळ आम्ही सगळेच शांत झालो. कोणी बोलत नव्हतं. कारण त्या शांततेतही खूप काही ऐकू येत होतं.&lt;/p&gt;
&lt;p&gt;अचानक समोर एक मोठा ओढा आला. रात्रभराच्या पावसामुळे तो दुथडी भरून वाहत होता. पाणी प्रचंड वेगाने धावत होतं. एका मागोमाग एक जण ओढा पार करू लागला. समोर उभे असलेले हिंदवी परिवाराचे मावळे प्रत्येकाला हात देत होते. कुणाचा हात धरून... कुणाची सॅक उचलून... कुणाला धीर देत... त्या क्षणी जाणवलं... ही मोहीम सातशे लोकांची असली, तरी इथे कोणीही एकटा नाही. याचं नाव परिवार. आणि म्हणूनच त्याचं नाव हिंदवी परिवार...&lt;/p&gt;
&lt;p&gt;असा एकही क्षण आला नाही, जेव्हा कोणाला मागे सोडलं गेलं. प्रत्येक पाऊल एकत्र. प्रत्येक अडथळा एकत्र. प्रत्येक विजयही एकत्र. यातच या मोहिमेचं खरं सौंदर्य दडलं होतं. दुपार जवळ येत होती. पायांमध्ये थकवा जाणवू लागला होता. खांद्यावरची सॅक आता जड वाटू लागली होती. गुडघे कुरकुर करू लागले होते. पण आश्चर्य म्हणजे... मन अजूनही ताजंतवानं होतं. मी स्वतःला एक प्रश्न विचारला... &quot;हा उत्साह नेमका कुठून येतोय?&quot; आणि लगेच उत्तरही मिळालं. कारण ही वाट फक्त जंगलातून जात नव्हती... ती इतिहासातून जात होती. याच पायवाटांवरून छत्रपती शिवाजी महाराज गेले होते. याच दऱ्यांमधून मावळ्यांनी राजांचं रक्षण केलं होतं. याच जंगलाने स्वराज्याचा श्वास लपवून ठेवला होता.मग थकवा येणारच कसा?&lt;/p&gt;
&lt;p&gt;दुपारच्या सुमारास एका मोकळ्या जागी एका मोठ्या दगडावर बसून आम्ही काही सहकारी जेवलोत. साधं जेवण... पोळी आणि मटकीची उसळ... आणि त्यावर पावसाची साथ. पंचतारांकित हॉटेलमध्ये कितीही महाग जेवण मिळालं, तरी त्या दिवशी त्या जंगलात खाल्लेल्या साध्या जेवणाची चव आयुष्यभर विसरणं अशक्य आहे. पुन्हा प्रवास सुरू झाला. आता पाय अधिकच जड झाले होते. पण सहप्रवाशांच्या गप्पा, हास्य, घोषणांनी ऊर्जा पुन्हा मिळत होती.&lt;/p&gt;
&lt;p&gt;या संपूर्ण प्रवासात मला काही सुंदर माणसं भेटली. नागपूरचा पोलीस दलातील अभिषेक हरदास... नेहमी हसतमुख. थकवा चेहऱ्यावर दिसू न देणारा... पोट धरून हसवणाऱ्या अनेक किश्यांचा मोठा खजिना असलेला माणुस... आधीपासून परिचित असलेले अतुलभाऊ चौधरी... पण या प्रवासात नव्यानं समजलेले. आणि ज्याच्यामुळे या प्रवासाची ऊर्जा मिळाली असा माझा मित्र अविनाशभाऊ काळे... कठीण प्रवास सुंदर करण्याचं काम निसर्ग करतो... पण तो अविस्मरणीय करण्याचं काम माणसं करतात. या तिघांनी माझ्यासाठी तेच केलं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;संध्याकाळ जवळ येऊ लागली. शेवटच्या काही किलोमीटरमध्ये शरीर अक्षरशः थकलं होतं. पण अचानक समोर एक फलक दिसला... &quot;पांढरेपाणी.&quot; त्या एका शब्दाने सगळा थकवा कुठच्या कुठे पळून गेला. कारण हे फक्त गाव नव्हतं. हा इतिहासातील शेवटचा मुक्काम होता. ही ती भूमी होती जिथून पुढे शिवरायांचा इतिहास एका निर्णायक वळणावर जाणार होता. गावात पोहोचल्यावर सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. कुणी काही बोललं नाही. पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होतं. आज आम्ही स्वतःवर विजय मिळवला होता. जवळपास बत्तीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला होता. शरीर थकलं होतं. पण मन... मन मात्र पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक मजबूत झालं होतं. रात्री मोठ्या हॉलमध्ये मुक्कामाची व्यवस्था होती. कुणी पाय चोळत होतं... कुणी दिवसाच्या आठवणी सांगत होतं...कुणी उद्याच्या पावनखिंडीची स्वप्नं पाहत होतं. मी मात्र शांतपणे एका कोपऱ्यात बसलो होतो.&lt;/p&gt;
&lt;p&gt;बाहेर पुन्हा पाऊस सुरू झाला होता. त्या पावसाचा आवाज ऐकत असताना एकच विचार मनात आला... आज सह्याद्रीने माझी परीक्षा घेतली... आणि उद्या... उद्या तो मला त्या भूमीवर घेऊन जाणार होता... जिथे बाजीप्रभूंनी आपल्या रक्ताने इतिहास लिहिला होता. त्या विचारानेच अंगावर पुन्हा एकदा रोमांच उभे राहिले. त्या रात्री झोप डोळ्यांवर होती... पण मन मात्र आधीच पावनखिंडीत पोहोचलं होतं...&lt;/p&gt;
&lt;p&gt;२ ऑगस्ट... पहाट अजून पूर्ण उजाडली नव्हती. पांढरेपाणी गावावर हलकंसं धुकं पसरलं होतं. रात्रीचा पाऊस नुकताच थांबला होता. झाडांच्या पानांवरून टपकणारे थेंब, दूरवरून ऐकू येणारा पक्ष्यांचा मंद स्वर आणि सह्याद्रीच्या दऱ्यांतून वाहणारा थंडगार वारा... सगळंच काहीसं विलक्षण शांत होतं. पण त्या शांततेच्या आड प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच धडधड सुरू होती. कारण आजचा दिवस वेगळा होता. आज आम्ही त्या भूमीकडे निघालो होतो, जिचं नाव घेतानाही महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस अभिमानाने उभा राहतो. पावनखिंड...&lt;/p&gt;
&lt;p&gt;नाश्ता उरकला. सॅक खांद्यावर घेतली. आणि आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. आजचा प्रवास फक्त चार किलोमीटरचा होता. पण त्या चार किलोमीटरचं अंतर कधी इतकं मोठं वाटेल, असं वाटलं नव्हतं. प्रत्येक पाऊल पुढे पडत होतं... आणि मन मात्र साडेतीनशे वर्षं मागे चाललं होतं. हीच ती वाट... जिथून शिवराय विशाळगडाकडे निघाले. हीच ती वाट... जिथून बाजीप्रभू मृत्यूला सामोरं जायला पुढे सरसावले. हीच ती वाट... जिथे काही मोजक्या मावळ्यांनी हजारोंच्या सैन्याला रोखून धरलं. सह्याद्री आजही तसाच उभा होता. दऱ्या तशाच होत्या. डोंगर तेच होते. पाऊसही कदाचित तसाच पडत असावा. बदललं होतं ते फक्त काळाचं पान. इतिहास अजूनही तिथेच उभा होता.आणि आम्ही त्याच्याकडे चाललो होतो.&lt;/p&gt;
&lt;p&gt;अचानक समोर भगवे ध्वज दिसू लागले. दूरवर स्मारकाचं शिखर दिसलं. कुणीतरी हलक्या आवाजात म्हणालं... &quot;आली... पावनखिंड.&quot; क्षणभर सगळेच थांबले. पुढे चालण्यापूर्वी प्रत्येकाने नकळत पायातील चिखल झटकला. जणू एखाद्या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी स्वतःला शुद्ध करतो, तसं. कारण ही जागा फक्त ऐतिहासिक नव्हती. ही भूमी तीर्थक्षेत्र होती.&lt;/p&gt;
&lt;p&gt;आम्ही स्मारकाजवळ पोहोचलो. पहिलं पाऊल त्या भूमीवर ठेवलं... आणि अक्षरशः अंगावर शहारा आला. मी नकळत खाली वाकलो. त्या मातीला हात लावला. दोन्ही हात जोडले. आणि काही क्षण डोळे मिटून उभाच राहिलो. त्या क्षणी मला त्या मातीचा स्पर्श जाणवत नव्हता. जाणवत होता... तो बाजीप्रभूंच्या रक्ताचा इतिहास. त्या मातीत एक विलक्षण उब होती. त्यागाची... पराक्रमाची... स्वराज्याच्या प्रेमाची... डोळे उघडले... समोर स्मारक होतं.&lt;/p&gt;
&lt;p&gt;पण माझ्या मनात एक वेगळंच दृश्य उभं राहिलं. घोडखिंडीत रणांगण पेटलं आहे. चारही बाजूंनी शत्रूचा मारा सुरू आहे. तलवारींच्या ठिणग्या उडत आहेत. घोड्यांचा टापांचा आवाज घुमतो आहे. बाजीप्रभू रक्ताने माखलेले आहेत. शरीरावर जखमा आहेत. पण हातातली तलवार अजूनही थांबलेली नाही. एकच ध्यास... &quot;जोपर्यंत विशाळगडावरून तोफांचा आवाज येत नाही, तोपर्यंत ही खिंड सोडायची नाही.&quot; हे वाक्य आपण पुस्तकात वाचतो. पण पावनखिंडीत उभं राहून त्याचा अर्थ समजतो. त्या एका वाक्यात स्वराज्याचं संपूर्ण तत्त्वज्ञान दडलं आहे.स्वतःपेक्षा मोठं ध्येय. स्वतःपेक्षा मोठा राजा. स्वतःपेक्षा मोठा देश.&lt;/p&gt;
&lt;p&gt;थोड्याच वेळात डॉ. शिवरत्न शेटे सर पुन्हा उभे राहिले. मसाई पठारावर जिथे त्यांनी इतिहास थांबवला होता... तिथूनच त्यांनी पुन्हा सुरुवात केली. आणि पुन्हा एकदा आम्ही वर्तमानातून निसटलो. त्यांच्या शब्दांतून बाजीप्रभू लढत होते. फुलाजीप्रभू लढत होते. बांदल मावळे लढत होते. तोफेचा आवाज ऐकण्यासाठी मृत्यूशी झुंजणारे प्रत्येक मावळे आमच्यासमोर जिवंत झाले. सरांच्या आवाजातला कंप... शब्दांमधली वेदना... आणि वर्णनातील जिवंतपणा... यामुळे सभोवताली उभ्या असलेल्या अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले...माझ्याही. पत्रकार म्हणून अनेकदा घटनास्थळी भावना बाजूला ठेवाव्या लागतात. पण त्या दिवशी... त्या भूमीवर... ते शक्यच नव्हतं. कारण तिथे पत्रकार नव्हता. तिथे फक्त एक शिवभक्त उभा होता.&lt;/p&gt;
&lt;p&gt;कार्यक्रम संपला. लोक हळूहळू निघू लागले. पण माझे पाय तिथून हलत नव्हते. मी पुन्हा एकदा मागे वळून पावनखिंडीकडे पाहिलं. मनात एकच विचार आला... जर त्या दिवशी बाजीप्रभूंनी स्वतःचा देह या खिंडीत अडवला नसता... तर कदाचित महाराष्ट्राचा इतिहासच वेगळा लिहिला गेला असता. आपण आज ज्या स्वराज्याचा अभिमान बाळगतो... त्याच्या प्रत्येक अक्षरावर या भूमीचं ऋण आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;या तीन दिवसांत मला नेमकं काय मिळालं?..नवे मित्र?.. हो... अभिषेक हरदास, अतुलभाऊ चौधरी, अविनाशभाऊ काळे आणि असे अनेक सुंदर माणसं आयुष्याला मिळाली. अविस्मरणीय आठवणी?.. हो... त्या तर आयुष्यभरासाठी सोबत आहेत. पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट मिळाली... स्वतःकडे पाहण्याची एक नवी दृष्टी. या पदभ्रमंतीने मला शिकवलं... थकवा शरीरात असतो... हार मनात असते. ध्येय मोठं असेल तर पाय आपोआप चालत राहतात. स्वार्थ माणसाला मोठं बनवत नाही... त्याग बनवतो. यश माणसाला अमर करत नाही... समर्पण करतं. आणि म्हणूनच... आजही शिवराय जिवंत आहेत. आजही बाजीप्रभू जिवंत आहेत. कारण त्यांनी आयुष्य जगलं नाही... ते एका विचारासाठी जगले.&lt;/p&gt;
&lt;p&gt;या संपूर्ण मोहिमेचं श्रेय अर्थातच हिंदवी परिवाराला जातं. सातशेच्या जवळपास शिवभक्त... महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात आणि गोव्यातून आलेले सहभागी... पण कुठेही गोंधळ नाही. व्हीआयपी संस्कृती नाही. पदाचा अहंकार नाही. प्रत्येक जण फक्त एक मावळा. प्रत्येक जण फक्त शिवरायांचा. ही संस्कृती जपणाऱ्या हिंदवी परिवाराचे संस्थापक डॉ. शिवरत्न शेटे, अकोल्यातील आमचे प्रेरणास्थान भूषणजी बापट आणि या मोहिमेला यशस्वी करणाऱ्या प्रत्येक मावळ्याप्रती माझ्या मनात आयुष्यभर कृतज्ञता राहील.&lt;/p&gt;
&lt;p&gt;४ ऑगस्टला जेव्हा अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर उतरलो... तेव्हा माझ्या सॅकमध्ये तीन दिवसांचे कपडे होते. थोडा चिखल होता. काही ओले कपडे होते. पण त्याहीपेक्षा मौल्यवान अशी एक गोष्ट मी घेऊन आलो होतो. इतिहास जगल्याचा अनुभव. आजही डोळे मिटले की सह्याद्री दिसतो. मसाई पठार दिसतं. खोतवाडीची शांत रात्र आठवते. पांढरेपाणीचं पहाटेचं धुकं आठवतं. आणि सर्वात जास्त आठवते... पावनखिंडीची ती माती... जिला स्पर्श करताना माझे डोळे नकळत भरून आले होते. काही प्रवास तुम्हाला नवे प्रदेश दाखवतात. काही प्रवास नवी माणसं भेटवतात. पण काही निवडक प्रवास असे असतात... जे तुम्हाला तुमचंच नव्याने दर्शन घडवतात. पन्हाळगड ते पावनखिंड हा माझ्यासाठी तसाच प्रवास ठरला.&lt;/p&gt;
&lt;p&gt;आज माझ्या आयुष्याच्या स्मरणपटलावर जर काही अविस्मरणीय क्षण कायमचे कोरले गेले असतील, तर त्यात या तीन दिवसांचा क्रम खूप वरचा असेल. कारण... ज्या वाटेवरून छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य वाचवण्यासाठी चालले... ज्या खिंडीत बाजीप्रभूंनी आपल्या रक्ताने इतिहास लिहिला... त्या वाटेवर माझीही काही पावलं उमटली... यापेक्षा मोठं भाग्य एका शिवभक्तासाठी आणखी काय असू शकतं?&lt;/p&gt;
&lt;p&gt;जय भवानी!&lt;/p&gt;
&lt;p&gt;जय शिवराय!....&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/07/01eab17906c365b531bb2a37c6af126517861094603681378_original.jpg" width="220"/></item></channel></rss>