<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>विरहाच्या धगीवर “आभाळाचा अभिषेक”...</title><atom:link href="https://marathi.abplive.com/blog/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Thu, 16 Jul 2026 02:19:52 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[Another Birth Movie: अनदर बर्थ : फुरूघ फर्रुखझादंच्या कवितेची सिनेमॅटिक अभिव्यक्ती]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/another-birth-movie-review-cinematic-expression-of-forough-farrokhzads-poetry-by-narendra-bandabe-1431880</link><comments>https://marathi.abplive.com/blog/another-birth-movie-review-cinematic-expression-of-forough-farrokhzads-poetry-by-narendra-bandabe-1431880#respond</comments><pubDate>Wed, 15 Jul 2026 13:49:10 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ नरेंद्र बंडबे ]]></dc:creator><category><![CDATA[ करमणूक ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/another-birth-movie-review-cinematic-expression-of-forough-farrokhzads-poetry-by-narendra-bandabe-1431880</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Another Birth Movie:&lt;/strong&gt; मध्य आशियातील ताजिकिस्तानातून सर्वाधिक स्थलांतर होतं. तिथली भौगोलिक स्थिती याला जबाबदार आहे. तरुणांना कामाची संधी उपलब्ध नाही. मग हे लोक रशिया, युरोप किंवा अमेरिकेत जातात. स्थलांतरित नागरिकांनी पाठवलेल्या पैशावर ताजिकिस्तानचा कारभार चालतो. देशाच्या एकूण उत्पन्नात याचे प्रमाण जवळपास 30 ते 50 टक्के इतके आहे. ताजिकिस्तानातून रशियात जाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. &amp;nbsp;शिवाय शेती आणि इतर औद्योगिक कामाच्या हंगामात इथले पाच लाखांहून अधिक नागरिक स्थलांतरित होतात. यामुळे इथल्या गावांमध्ये फक्त महिला, लहान मुले आणि म्हातारी माणसेच बाकी उरतात. अशाच एका गावाची गोष्ट दिग्दर्शिका इसाबेल कलंदर आपल्या 'अनदर बर्थ' (2025) या चित्रपटातून सांगते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;इसाबेल स्वतः ताजिकिस्तानातून स्थलांतरित झालेय. आता ती अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात राहते. वयात येत असतानाच तिने ताजिकिस्तान सोडलं. कमावते पुरुष घर सोडून जातात आणि मागे राहिलेल्यांचे काय हाल होतात, हे इसाबेलने जवळून पाहिलंय. जेहा ती अमेरिकेत सिनेमाचे शिक्षण घेत होती, तेव्हाच यावर चित्रपट बनवायचे तिने ठरवले होते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;स्थलांतर या विषयाभोवती ती चित्रपट त्रयी (ट्रायलॉजी) तयार करणारेय. &amp;nbsp;यातला पहिला चित्रपट अनदर बर्थ (2025) हा 30व्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (दक्षिण कोरिया, 2025) जगप्रथम प्रदर्शित झाला. त्यानंतर अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये फिरल्यानंतर नुकत्याच किर्गिजस्तानमध्ये झालेल्या चौथ्या बिश्केक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'अनदर बर्थ'ला महत्त्वाचे तीन पुरस्कार मिळाले. यात फिप्रेस्की (FIPRESCI) या आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक संघटनेतर्फे दिला गेलेला 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' पुरस्काराचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर इसाबेलला Exile Trilogy - स्थलांतरित चित्रपटांमध्ये दुसऱ्या फिल्म फंडिंगही मिळालंय.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;ताजिकिस्तान- स्थलांतर आणि त्याचे साइड इफेक्ट्स&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;इसाबेल कलंदरचा अनदर बर्थ (2025)हा ताजिकिस्तानच्या शकधरा खोऱ्यातील तिच्या आजोळी शूट झालाय... गोष्ट एकदम साधी आहे. गावातील सर्व तरुण पुरुष कमवण्यासाठी परदेशात गेलेत. त्यामुळे बायका, मुले आणि म्हातारी मंडळीच फक्त गावात उरलीत. &amp;nbsp;तरुण बायका घरचा कारभार चालवत आहेत. मुलं मोठी होतायत पण त्यांनी वडिलांना प्रत्यक्षात पाहिलेलेच नाही. वडिलांचा चेहरा फक्त घरातल्या फोटोतच दिसतो. घरचे म्हातारे एकटे आहेत, बिछान्यावर आहेत आणि मुलाची वाट पाहतायत. &amp;nbsp;सर्वात कठीण परिस्थिती इथल्या तरुण महिलांची आहे. नवरा घर सोडून गेलाय. आता घरची सर्व जबाबदारी तिच्यावर आहे, मुलं, सासू-सासऱ्यांना सांभाळायचे. नवऱ्याशी अनेक महिने संवाद होत नाही. मग तिच्या मनातली गोष्ट ती कुणाला सांगणार?&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सिनेमातील मुख्य नायिका आहे आठ वर्षांची परुस्तु. तिचे आजोबा शेवटच्या घटका मोजत आहेत. म्हणून ती आपल्या परदेशात गेलेल्या वडिलांना शोधायला निघालीय. यासाठी ती आपल्या कल्पनेतील परीची मदत घेणारेय. परी सर्व ठीक करते. तिला सर्व माहित असतं. ती सर्वांना मदत करते, मग आपल्या वडिलांनाही शोधून काढेल, असा तिला विश्वास आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;स्थलांतर आणि महिला&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&lt;br /&gt;परुस्तुची आई परवीन एकटी आहे. गावातल्या सर्व बायकांची स्थिती अशीच आहे. त्याही अशाच एकट्या आहेत. वरवर पाहता महिलांना इथं सर्व अधिकार आहेत, पण ते केवळ परिस्थितीने दिलेले 'महिला सशक्तीकरण' आहे. अनेकदा स्थलांतरित झालेले नवरे परत येतच नाहीत. तिथेच नवा संसार थाटतात. फक्त पैसे पाठवत राहतात. संवाद कमी झाला की बायकोला ते समजते. मग ती आणखी कोषात जाते, एकटी बनते. परवीनची स्थितीही अशीच आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;परवीनचा एकाकीपणाची भीषणता दाखवण्यासाठी इसाबेलने फुरूघ फर्रुखझाद (1935-1967) यांच्या कवितेचा आधार घेतलाय. घराचा एक अडगळीचा कोपरा आहे, तिथे परवीन या कवितेशी एकरूप होते. त्यातील एक कविता ती परुस्तुलाही पाठ करायला देते. सिनेमात फुरूघच्या दोन कविता तिने वापरल्या आहेत:&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;em&gt;I Pity the Garden&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;(मी बागेवर दया करते)&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;कोणीही फुलांचा विचार करत नाही. &amp;nbsp;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;कोणीही माशांचा विचार करत नाही. &amp;nbsp;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;कोणीही विश्वास ठेवू इच्छित नाही की बाग मरत चालली आहे, &amp;nbsp;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;की या उन्हाच्या प्रखर उष्णतेत तिचे हृदय सुजले आहे, &amp;nbsp;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;की तिची मनःशक्ती हळूहळू कोमेजत चालली आहे &amp;nbsp;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;तिच्या हिरव्यागार, समृद्ध स्मृतींमधून...&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सिनेमात या ओळी आई परवीनच्या तोंडी आहेत. पुरुषांच्या स्थलांतरामुळे घरात राहिलेल्या स्त्रियांच्या एकटेपणा आणि त्यांच्या आजूबाजूच्या जगाच्या उदासीनतेचे चित्रण होतं...&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;em&gt;Let Us Believe in the Dawn of the Cold Season &amp;nbsp;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;(थंड हंगामाच्या सुरुवातीवर विश्वास ठेवू या)&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;मी थंड आहे, &amp;nbsp;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;मी थंड आहे, आणि असं वाटतंय की&amp;nbsp;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;मी पुन्हा कधीही उबदार होणार नाही... &amp;nbsp;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;मी थंड आहे आणि मला माहिती आहे की &amp;nbsp;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;एक दिवस &amp;nbsp;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;एक वन्य पोप्पीच्या सर्व लाल स्वप्नांमधून &amp;nbsp;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;काही थेंब रक्ताशिवाय काहीही उरणार नाही...&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;फुरूघ या कवितेत प्रेम, वेदना आणि आशेचा मिलाफ दाखवतात. 'थंड हंगाम' म्हणजे जीवनातील कठीण काळ, तरीही त्याच्या शेवटी पहाट येईल असा विश्वास ठेवण्याचे आवाहन आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;फुरूघ फर्रुखझाद कोण आहेत?&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;फुरूघ फर्रुखझाद या इराणमधील महत्त्वाच्या कवयित्री होत्या. अवघ्या 32 व्या वर्षी अपघातात त्या वारल्या. इराणच्या फेमिनिस्ट चळवळीत त्यांच्या कवितेचे योगदान मोठे आहे. 17 व्या वर्षी त्यांचे लग्न झालं. वर्षभरात मुलगा झाला. नवऱ्याशी पटले नाही. घटस्फोट घेतला. लहानपणापासूनच त्यांना कवितेची आवड होती. त्यांना स्वतंत्र जगायचे होते. नवऱ्याकडे मुलगा सोपवून त्या घराबाहेर पडल्या. इराणसारख्या देशात 1950 च्या दशकात हे करणे क्रांतीकारी होते. पुढे त्या युरोपात गेल्या. तिथे अनेक पुरुषांशी त्यांचा संबंध आला. SIN (पाप) या कवितेत त्यांनी हे स्पष्ट केलंच आहे. घटस्फोटित एकाकी स्त्रीच्या भावनांना त्यांनी कवितेच्या माध्यमातून हात घातला. जगभरात फुरूघ आणि त्यांच्या कवितांचे लाखो-करोडो चाहते आहेत. स्त्रीवादाच्या माध्यमातून फुरूघच्या कवितांचा अभ्यास झाला आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;Life Says: Still We Must Live - दोहा फिल्म इन्स्टिट्यूटसोबत काम करताना इसाबेलनं पहिल्यांदा फुरूघची कविता वाचली. ती भावली आणि मग यावरच आपला सिनेमा बनवण्याचे तिनं ठरवलं. या पहिल्या सिनेमाला त्यांनी फुरूघच्या कवितेतूनच नाव दिलंय.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एक्झाइल ट्रिलॉजी (Exile Trilogy) अर्थात स्थलांतरित सिनेमाचा दुसरा भाग Life Says: Still We Must Live वर सध्या काम सुरूय. हा सिनेमा स्थलांतर करून परत आलेल्या एका तरुणाची गोष्ट सांगतो. परत आल्यानंतर त्याला अपयशी वाटते. जगाला तोंड दाखवायला लाज वाटते. यामुळे तो एकलकोंडा झाला आहे. गावात फिरकतही नाही.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/15/653f9f66405b2e83cefe73b16c07d286178410337411188_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : मुंबईमधील अनधिकृत घर कम इमारतीचे आयशा मंजील पॅटर्न, किती जीव गेल्यावर पालिकेला जाग येणार? ]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/blog-of-prashant-badhe-on-mumbai-bmc-illegal-building-corruption-chain-ayesha-pattern-marathi-1431657</link><comments>https://marathi.abplive.com/blog/blog-of-prashant-badhe-on-mumbai-bmc-illegal-building-corruption-chain-ayesha-pattern-marathi-1431657#respond</comments><pubDate>Mon, 13 Jul 2026 23:09:43 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ प्रशांत बढे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ मुंबई ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/blog-of-prashant-badhe-on-mumbai-bmc-illegal-building-corruption-chain-ayesha-pattern-marathi-1431657</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;BLOG :&lt;/strong&gt; मानखुर्दमध्ये दोन मजली घर कोसळले, पाच लहान चिमुरड्यांसह एक महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. वांद्रे गरीबनगर येथे रेल्वे प्रशासनाच्या वतीने कारवाई झाली आणि मुंबईत आता अशा अनधिकृत घर कम इमारतीवर जोरदार कारवाई सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र ती साफ फोल ठरली. मुंबईत बहुतांश अशा अनधिकृत झोपड्या कम चार-पाच मजली अनधिकृत इमारती, कुर्ला, वांद्रे, गोवंडी, मानखुर्द इत्यादी वस्त्यांमध्ये अशा सर्रास अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या, राहत आहेत आणि राहतील&amp;hellip;याचे कारण म्हणजे मुंबई मनपाने बंद करून घेतलेले डोळे, मोठा भ्रष्टाचार, राजकीय दबाव आणि मोठा अनधिकृत धंदा&amp;hellip;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आता यात आयशा मंजिल पॅटर्न काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल&amp;hellip;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तर गोष्ट आहे कुर्ला एल वॉर्ड पासून अगदी हाकेचा अंतरावर उभारली जात असलेली आयशा &amp;nbsp;मंजील इमारतीची&amp;hellip; काही दिवसांपूर्वी स्थानिकांनी या बांधकाम बाबत पालिकेच्या सर्व विभागात तक्रारी केल्या. इतकेच काय तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील या इमारतीबाबत पालिका एल विभागाला कारवाई बाबत पत्र लिहिले. मात्र अजून ही इमारत उभी नाही तर आता यातील घरे विक्रीसाठी तयार होऊन काही विक्री ही झाले आहेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सुमारे 40 लाख रुपये किमतीत या एक एक घराची विक्री करण्यात येत असल्याची माहिती आहे. अशा सुमारे आठ ते दहा अनधिकृत इमारती संबंधित व्यक्ती उभारत आहेत. आणि हे सगळे चालू आहे सिटी सिव्हिल कोर्ट चा स्टे घेऊन&amp;hellip;!!!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;याचा थोडा अभ्यास केल्यावर लक्षात आले की याच आयशा मंजिल पॅटर्न चा वापर करून कुर्ला, मानखुर्द, गोवंडी, पार्कसाईट, वांद्रे इत्यादी परिसरात सर्रास अनधिकृत तकलादू इमारती उभारल्या गेल्या आणि अजून ही उभारल्या जात आहेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मुंबईत एखाद्या ठिकाणी इमारत उभारण्यासाठी एखाद्या विकासकाला किती कष्ट करावे लागतात, किती खर्च , किती परवानग्या लागतात याची माहिती घेतली की कळते हे किती कठीण काम असते. मात्र मुंबईच्या मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असलेल्या आणि कायदा सुव्यवस्था याचा अगदी कमी संपर्क असलेल्या भागात सर्रास आयशा मंजिल पॅटर्न राबविला जात आहे. दोन ते चार भूमाफिया मिळून स्वतःचे काही पैसे लावतात. ते झोपडपट्टी मधली चार पाच घरांचे मालक हेरतात त्यांना पैशाच आमिष दिले जाते. मग या पाच सहा झोपड्यांच्या जागी चार पाच मजली इमारतीचे काम सुरू होते. याला राजकीय आणि पालिका अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हे अशक्य आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मग राजकारणी, अधिकारी, तक्रारदार यांचे ठरलेले रेटकार्ड नुसार पैसे वाटप होते आणि बांधकाम सुरू होते. साध्या लोखंडी ढाच्यावर चार पाच मजली पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे धोकादायक बांधकाम उभारले जाते. तक्रार होणारच म्हणून पालिका अशा बांधकामावर टोच्या मारल्यासारखे कारवाईचे फोटो काढून ठेवते. नोटिसा तयार ठेवते. पुढे आणखी तक्रार झाल्यास आधीच सिटी सिव्हिल कोर्टमध्ये वकील तयार असतात. तक्रार झालीच की सिटी सिव्हिल कोर्ट मधून स्टे घेतला जातो, आणि याचा हवाला देत मग पालिकेत किती ही तक्रारी करा प्रकरण कोर्टात आहे, सांगून अभय देण्याचे काम सुरू होतं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;स्टे म्हणजे जैसे थे स्थिती. पण या काळात इमारतीचे उरले सुरले काम पूर्ण करून इथली घरे चाळीस-पन्नास लाख रुपयांना विक्री केली जाते आणि हे माफिया, दुसऱ्या ठिकाणी नव्या बांधकामाला लागतात. आता त्यांचा त्या इमारतीशी संबंध राहिलेला नसतो. अगदी एखाद्याने जोरदार विरोध केल्यास पालिका एमआरटीपीचा जवळील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे गाजर दाखवते. एखाद्याची रेती रस्त्यावर पडलेली असेल तर तुटून पडणारे पोलीस ठाण्याचे बिट मार्शल, पोलीस अधिकारी अशा ठिकाणी मूकदर्शक असतात, याचे कारण तर सर्वांनाच माहिती आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गेल्या काही वर्षात अशा शेकडो अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या. अनेक पडल्या, अनेक कुटुंब बेघर झाली, अनेक जीव गेले . मात्र हा धंदा मुंबईत पालिका अधिकारी, राजकारणी, पोलीस या सगळ्यांना घेऊन बेफाम सुरू आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आयशा मंजिल हे एक उदाहरण असले तरी ही उभारणाऱ्या व्यक्तीने आता पर्यंत अशा आठ ते दहा इमारती याच भागात उभारल्या असल्याचे समजले. काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या बाबत आवाज उचलण्याचा प्रयत्न केला खरा, पण असा काही पॅटर्न सेट आहे की आता काहीच होऊ शकणार नाही. आता पालिका सिटी सिव्हिल कोर्टकडे बोट दाखवणार, आधी थोडीफार तोडक कारवाई केल्याचे फोटो दाखवणार आणि मोठी कारवाई म्हणून एमआरटीपी केल्याच्या एफआयआर पुढे करणार. पण मूळ उभारलेली अनधिकृत इमारतमध्ये कुटुंब आलेली असणार, केस वर्षानुवर्षे चालणार अश्या शेकडो एमआरटीपी पचवून हे भूमाफिया गब्बर होत राहणार आणि &amp;hellip;. प्रत्येक वेळी आपण फक्त त्या इमारती कोसळल्यावर मृतांचे आकडे मोजत चूकचुकत पुढच्या विषयाकडे वळणार&amp;hellip;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हा आयशा मंजिल पॅटर्न मुंबईभर पसरला आहे, कॅन्सर सारखा&amp;hellip;त्याला गरिबीचा मुलांमा चढवला गेला आहे. काही ठराविक विभागात पालिकेच्या सहकार्याने हे सर्रास सुरू आहे&amp;hellip; सत्ताधारी बदलले आहेत, कदाचित पुन्हा बदलतील&amp;hellip; पण हा आयशा मंजिल पॅटर्न सुरूच राहील. तोपर्यंत जोपर्यंत मुंबईला शिस्त लावण्याचा मनापासून प्रयत्न करणारे शासक येणार नाहीत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बघू हे कधी शक्य होईल&amp;hellip;की अश्या आयशा मंजिल मुंबईच्या कानाकोपऱ्यात हे पॅटर्न वापरून उभ्या होतच राहतील आणि मृतांचे आकडे असेच येत राहतील.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/13/f77494bb11bd3422f01b1c3e383a2cf3178396435457893_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : अफाट हालअपेष्टांची अजरामर गोष्ट]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/shankarrao-kharat-blog-dalit-literature-marathwada-university-vice-chancellor-maharashtra-vidrohi-movement-marathi-1431369</link><comments>https://marathi.abplive.com/blog/shankarrao-kharat-blog-dalit-literature-marathwada-university-vice-chancellor-maharashtra-vidrohi-movement-marathi-1431369#respond</comments><pubDate>Sat, 11 Jul 2026 18:01:42 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/shankarrao-kharat-blog-dalit-literature-marathwada-university-vice-chancellor-maharashtra-vidrohi-movement-marathi-1431369</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;BLOG :&lt;/strong&gt; प्रसंग एक - 1927 चा सुमार असावा. लहानगा काळाबिंद्रा शंकर आपल्या श्रमलेल्या दमलेल्या बापासोबत जागल्याच्या कामाला जायचा. एक रात्र अशी आली, जेव्हा गावाबाहेरल्या विहिरीत एक शव फुगून वर आले. गावात सर्वत्र बोंब झाली. डोळ्यात बोट घातले तरी काही दिसणार नाही इतका मिट्ट काळोख होता. कोण कधी मरून पडलं आणि कशामुळे मेलं होतं, काहीच कळायला मार्ग नव्हता. रात्री मुडदा वर काढण्याचे कामही कठीण होते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गावातले म्होरके विहिरीजवळ गोळा झाले. अर्थातच, हे सगळेच उच्चजातीय होते. त्यांनी महारवाड्यात निरोप धाडला आणि विहिरीत पडलेल्या शवाची राखण करण्यासाठी जागल्याने ताबडतोब येण्याचे आदेश दिले. मरतुकड्या अशक्त रामा खरातच्या घरी ही वर्दी पोहोचली. इतक्या रात्री विहिरीपाशी कसं बसून राहायचं याच्या चिंतेने त्याची बायको रडू लागली. तिच्या रडण्याच्या आवाजाने लहानगा शंकर जागा झाला.. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दंड घातलेल्या जुनेर लुगड्यातली आपली आई इतक्या रात्री रडू लागली म्हणजे नक्कीच काहीतरी अप्रिय दुःखद घडले असणार ह्या जाणिवेने शंकरही रडू लागला. पोर रडू लागल्यावर रामाने बायकोला नजरेने दटावले. तिने पोराला शांत केले. घुंगराची काठी हाती घेऊन रामा खरात त्या विहिरीच्या दिशेने निघाला.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एरव्ही ज्या विहिरीच्या पाण्याला स्पर्शही त्याला करू दिला नसता त्या विहिरीत पडलेल्या एका प्रेताची राखण करण्याचे काम त्याच्याकडे आले होते. शेत विहीर एकाची, प्रेत आणखी कुणाचे तरी आणि त्या विहिरीतले पाणी फक्त ठराविक लोकांचे, त्या पाण्यावर ज्यांची सावलीही मान्य नव्हती असा इसम मात्र त्याच पाण्यात पडलेल्या कुणा अज्ञाताच्या प्रेताची राखण करण्यासाठी सक्तीने बोलावला गेलेला! सारेच दुःखद आणि क्लेशदायक, आर्त!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;रामा खरात विहिरीपाशी पोहोचला, तेव्हा काही मोजके लोक तिथे उभे होते. त्यांनी गुरकावण्याच्या स्वरातच दुरूनच रामाला दमात घेतलं. &quot;राम्या इथून हलायचं नाय, डोळा लागू दिऊ नगंस, मुडद्यावर ध्यान ठीव नायतर तुझी धडगत नाय!&quot;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;रामा खराताने सवयीने मान डोलावली. नाहीतरी त्याने उभ्या आयुष्यात फक्त मान डोलवण्याशिवाय काहीच केलं नव्हतं. त्यानं कधी मान वर करून पाहिलं नव्हतं की, कुणावर नजर रोखली नव्हती. तो फक्त हुकुमाची तामिली करण्यासाठी जन्माला आला होता. त्याला त्याचे मत नव्हते की, नव्हता कसला स्वाभिमान! मुळात स्वाभिमान असण्यासाठीची वंशपरंपरागत शक्ती आणि प्रिव्हिलेजेस त्याच्या बाप जन्मात शंभर पिढ्यात कुणातच नव्हते. असो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;रामा, विहिरीच्या कठड्यापासून काही अंतर राखून एका धोंड्यानजीक बसून राहिला. रानातलं चावरं त्याला चावत होतं, रातकिडे किर्रर्र करत होते. आभाळात एकदिकून चान्नी नव्हती. गच्च भरून आलेलं काळं जांभळं आभाळ रात्रीदेखील त्याला जाणवत होतं. त्याच ढगामागे कुठे तरी चंद्र दडून होता. दूरवर कुठेतरी कोल्हेकुई होत होती आणि गावातल्या भटक्या कुत्र्यांचे रडणे त्यात भर घालत होते. रानाच्या खालल्या अंगाला कुठेतरी टिटवी ओरडत होती. रामा खरात तसाच बसून होता. त्याला घराची आठवण येत होती.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बाप गेला म्हणून शंकर जागा झाला. बापाकडे जायचं म्हणून त्याने हट्ट धरला. शेवटी बापासाठी भाकरी घेऊन जायचं निमित्त त्याच्या कामी आलं. बरीच तंगडतोड केल्यानंतर तो विहिरीपाशी आला. त्याचे पाय भयंकर दुखत होते मात्र बापाचं सोबत असणं त्याला अधिक सुखावह वाटत होतं. हा आनंद क्षणिक होता. तिथे येताच त्याला पोटात ढवळू लागलं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आसमंतात दूरवर एक दुर्गंध पसरलेला होता. तो उग्र वास विहिरीतल्या प्रेताचा होता. कुठल्याही क्षणी उलटी होईल असं त्याला वाटू लागलं. अखेर रामाने त्याला रागे भरले. त्याने आणलेली भाकरी ह्या उग्र दर्पात खाणं अशक्य आहे हे त्याला पटवून दिलं. त्याला परत पाठवताना एक कानमंत्र दिला, 'शंकऱ्या तुला सांगून ठेवतो याद राख! हे काम तू करायचं नाय. तू यात खपून जाशील. आमचा जल्म वायफट गेला तुझा जल्म यात गुतू देऊ नगंस.'&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;रामाने काकुळतीच्या स्वरात त्या रात्री जे काही सांगितलं, ते लहानग्या शंकरच्या मनावर कोरलं गेलं कारण त्या अंधारलेल्या रात्री विहिरीपाशी मढं राखत बसलेला बाप त्याच्या मस्तकात खिळा ठोकावा तसा रुतून बसला! शंकर घरी येऊन आईच्या कुशीत शिरून ढसाढसा रडला, त्या माऊलीने त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शांत केलं. &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली. प्रेत टम्म फुगलं होतं. काही ठिकाणी फुटलं होतं. त्याचा भयंकर दुर्गंध येत होता. &amp;nbsp;ते प्रेत बाहेर काढण्याचा आदेश रामाला फर्मावला गेला. गावाला रामा खराताची शिवाशिव आता चालत होती कारण मेलेल्या माणसाला शिवायचे होते! प्रेत काढताना रामाला साप चावला, पायात वेदनेची तीव्र सणक आली. रामाचा जीव कळवळला! &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्याला मदत करायची म्हणजे धर्म बाटवण्यासारखं होतं त्यामुळे कुणीही त्याला मदत केली नाही. वरच्या जातीचे लोक फक्त आदेश देत होते, त्यांच्या ठायी दयेचा लवलेशही नव्हता. लहानगा शंकरही तिथे आला होता. हे सर्व पाहताना त्याचा जीव बापासाठी तीळ तीळ तुटत होता. दरम्यान मनोमन तो ठाम निर्धार करत होता. ती विहीर केवळ एका प्रेताने भरलेली नव्हती तर समग्र दलित समाजाचे दमण केले गेलेले जीव, आत्मे तिथे पाण्यात थिजवले होते. ती अंधारलेली रात्र, ती विहीर, ते प्रेत आणि त्यांची राखण करत बसलेला बेबस बाप शंकर कधीच विसरू शकला नाही!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;प्रसंग दोन &amp;ndash; त्या रात्रीने शंकरच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले. त्याच्या बापाने अक्षरश: रक्ताचे पाणी करून त्याला शाळेत घातले. शंकरला शाळेत प्रवेश मिळणे हे एक दिव्य होते. अनेक मिनतवाऱ्या केल्यानंतर त्याला शाळेत दाखला मिळाला. त्याचं शाळेत जाणं सोपं नव्हतं. महाराला शिवायचं म्हणजे महत्पाप मानले जाई! मुळात शिक्षण हे शूद्रासाठी नाहीच अशी त्याकाळी धारणा होती. अनेक अपमान आणि हालअपेष्टा सोसून शंकरने शाळेत जाणं जारी ठेवलं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एके दिवशी रामाच्या घरी एक पत्र येतं. महारवाड्यात कुणालाही वाचता येत नसल्याने रामा ते पत्र घेऊन गुरुजींच्या घरी जातो. शंकर देखील हट्ट करून बापाच्या मागे जातो. गुरुजींच्या घरी जाईपर्यंत रामाच्या जीवात जीव नसतो. त्याच्या मनात लाख विचार येतात. त्याचे तमाम नातलग त्याच्या डोळ्यापुढे तरळून जातात. आपल्याला कुणी आणि का पत्र पाठवले असेल ह्या विचाराचा खोडकिडा त्याचे मस्तक पोखरून काढतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गुरुजींचे घर जवळ येते. रामा घरापासून बऱ्याच दूर अंतरावर उभं राहतो आणि त्यांना हाका मारू लागतो. खाली मान घालून असलेला बाप उन्हात घामाच्या धारांनी निथळत उभा आहे आणि आतून कुणीच बाहेर येत नाही, की कुणी प्रतिसाद देत नाही तेव्हा शंकर घायाळ होतो. तो चोरून नजर वर करतो तितक्यात गुरुजी ओसरीवर येतात.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;रामाला दूर उभं राहून बोलण्यासाठी निक्षून सांगतात. येण्याचे कारण विचारतात. घायकुतीला आलेला रामा खरात आपल्या हातातले पत्र दाखवत सांगतो, की पत्र वाचून हवंय! गुरुजी त्याला इशारा करतात. तो थोडे पुढे जाऊन पत्र खाली ठेवतो. हे सर्व घडत असताना शंकरच्या जिवाची घालमेल होते. धुळीत माखलेले, भीतीने थरथरणारे बापाचे अनवाणी पाय पाहून त्याच्या डोळ्यात पाणी येतं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गुरुजी पुढे होऊन पत्र वाचतात, एक क्षण रामाकडे टक लावून पाहतात आणि पुढच्याच क्षणी सांगतात की, &amp;lsquo;ठीक आहे. मी पत्र वाचून दाखवतो&amp;rsquo;; कुऱ्हाडीकडे निर्देश करत म्हणतात की, &amp;ldquo;तु आधी लाकडं फोडून दे!&amp;rdquo; हतबल झालेला रामा लाकडांच्या ढिगाऱ्याकडे पाहतो. अतिशय थकलेल्या अवस्थेतला रामा पुढे जातो, शंकर त्याच्या मागोमाग जातो. जाताना त्याच्या पायाखाली गुरुजींच्या घरासमोरची रांगोळी येते. त्याने बापजन्मात असलं काही पाहिलेलं नसतं. त्याला त्याचे अर्थही ठाऊक नव्हते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शंकरने रांगोळी तुडवताच गुरुजींची सोवळ्यात असलेली बायको ओरडते, आंधळ्या महाराच्या पोरा, तुझे डोळे फुटलेत का, असं म्हणत शिव्यांची लाखोली वाहते. रामा आपल्या पोराला दटावतो, गुरुजींना हात जोडतो! अश्राप गायीसारखा डोळ्यात पाणी आणून कामाला लागतो. पंधरवडा जाईल इतके सरपण फोडून होते. रामा घामाघूम होऊन जातो! रामा एकेक ढलपी फोडत असतो तेव्हा शंकर आतल्या आत फुटून निघतो. बघता बघता सगळी लाकडं फोडून होतात.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;लाकडं फोडून झाल्यावर, ती एका जागी रचून घेतल्यानंतर, अतिशय निर्विकारपणे गुरुजी सांगतात की, पत्रात फार काही लिहिलेलं नाही. तुझी बहीण मरण पावलीय. त्याची बातमी पत्रातनं पाठवलीय. इतकं सांगून सव्य अपसव्य करत गुरुजी घरात निघून जातात!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हातात घुसलेली धसकटं चेहऱ्यावर रुतवत रामा खरात आर्त टाहो फोडतो! आपल्या बापाला असं ढसाढसा रडताना पाहून शंकरचं काळीज डोळ्यात येतं! आपली आत्या मेलीय ही बातमी गुरुजींनी आधीच वाचली होती, ती त्यांना लगेच सांगविशी वाटली नाही! त्यांनी आधी खंडीभर लाकडं फोडून घेतली आणि मग बातमी सांगितली याचं विलक्षण शल्य त्या चिमूरड्या जीवाला झालं!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ती वेदना, ते दुःख त्याने बाभूळकाट्यासारखे जपले! हे सर्व दिवस, हा संघर्ष तो कधीही विसरला नाही! &amp;nbsp;त्याने त्या वेदनांचे निखारे बनवले आणि आपल्या मस्तकात भिनवले! तो जीव लावून शिकला. त्याने अशी काही मजल मारली की, पुढे जाऊन तत्कालीन, मराठवाडा विद्यापिठाचा तो कुलगुरू झाला!&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ही दास्तान आहे शंकरराव खरात यांची! बाबासाहेबांनी जर पिचलेल्या शोषित वंचित समाजाला शिक्षणाची उपलब्धी करून दिली नसती तर आजही त्या जीवघेण्या परंपरा स्वरूप बदलून जारी राहिल्या असत्या! इच्छाशक्ती तीव्र असली की, माणसाला काहीही असाध्य नाही हे शंकरराव खरातांनी दाखवून दिलं! त्यांच्या जन्मदिनीचे हे स्मरण लाखों कोट्यवधी दलितांच्या संघर्षास समर्पित! माणसाने हिंमत हारू नये, त्याच्या वाट्याला येणाऱ्या दुःख वेदनांना ठोकरून न देता, त्यांनाच आपली ताकद मानावे! जग झुकवता येतं, त्यासाठीचा निग्रह ठाम हवा!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;काही नोंदी - 1. शंकररावांचे वडील रामा खरात हे गावचे तराळ होते. महारवाड्यात वस्तीला असणाऱ्या तराळाला गावात येण्याची मुभा असे मात्र त्यासाठी काही नियम रिती रिवाज होते. 'तराळ' म्हणजे गावभर दवंड्या पिटत फिरणारा. पाटलाजवळ सतत हजर असणारा, सरकारी अधिकार्&amp;zwj;यांची सरबराई करणारा, त्यांचे सामान वाहणारा महार किंवा मांग जातीतील व्हल्लार उपजातीतला माणूस. एका हातात कामठ्या अडकवलेली हलगी तर दुसऱ्या हातात खुळखुळा असणारी काठी, खांद्याला पिशवी अडकावून फक्त दलित वस्त्यात चपला घालून फिरायची परवानगी असलेला माणूस ! ऊन, वारा. पाऊस यांची तमा न करता गावभर त्यानं अनवाणी फिरायचं, गल्लोगल्ली घसा ताणून हालगी वाजवत दवंडी पिटायची हा शिरस्ता होता. हा मांग-महार लोकांना जवळ आलेला चालत नसे पण त्याची दवंडी चालत असे. तराळाला वंशपरंपरेने हे काम करावे लागत असे, अगदी त्याच्या घरी माणूस मेलेलं असलं तरी त्याला पाटलाने कुणाच्या मयतीची दवंडी पिटायला पाठवले तरी जावं लागे. ह्या तराळाचं दुःख शंकररावांनी जगापुढे आणलं. त्यांच्या आत्मचरित्राचे नावच मुळी, 'तराळ अंतराळ' असे आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;2. मराठी साहित्य जगतात स्वतःच्या विचारांची वेगळी चूल मांडणारा विद्रोही दलित साहित्यिक ही खरातांची दुसरी ओळख. खरातांनी झंझावती लेखन करून स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली. त्याचा प्रभाव इतका पडला होता की, दोन्ही माडगूळकर बंधू खरातांच्या लेखनाचे चाहते होते, शिवाय ते खूप चांगले स्नेही होते. श्री. म. माटे आणि खरात यांच्या लेखनशैलीत काही साम्य जाणवते, पण खरात त्या वेदना जगले होते तर माटेंनी त्यांचा जागर केला होता.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;3. अज्ञातात खितपत पडणे आणि त्या दु:खभोगाला कवटाळणे म्हणजे पुन:पुन्हा एकाच जागेवर फिरत राहण्यासारखं आहे, हे समाजाच्या आणि विशेषत: स्वत:च्याच जीवनप्रवासातून त्यांनी जाणलं. इतरांपुढेही ठेवलं. म्हणूनच त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमध्ये कुठेही आक्रस्ताळी सूर लागताना दिसत नाही. बंड करण्याचं, दारिद्रय झुगारण्याचं, शोषणाला ढकलण्याचं आणि अवहेलनेला पायाखाली घेण्याचं- ही सर्व तंत्रं काही प्रमाणात खरातांची पात्रं अवलंबतात, पण त्यात भोवताल उद्ध्वस्त करण्याची भाषा नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;4. बारा बलुतेदार, तडीपार, सांगावा, टिटवीचा फेरा, सुटका, दौण्डी, आडगावचे पाणी आणि गावशीव हे कथासंग्रह खरात यांच्या नावावर आहेत. या कथांतून आणि त्यांच्या शीर्षकांतून खरात यांचं वेगळेपण सिद्ध होतं. हातभट्टी, गावचा टिनोपाल गुरुजी, झोपडपट्टी, मसालेदार गेस्ट हाऊस, फुटपाथ नं. 1, माझं नाव या कादंबऱ्या शंकरराव खरात यांनी लिहिल्या. 1981 मध्ये त्यांनी लिहिलेलं &amp;lsquo;तराळ-अंतराळ&amp;rsquo; हे आत्मचरित्र मराठी साहित्यविश्वातील एक श्रेष्ठ कलाकृती म्हणून गणलं गेलं. &amp;lsquo;दलित वाङ्मय : प्रेरणा व प्रवृत्ती&amp;rsquo; या समीक्षाग्रंथात खरातांच्या चिंतनशीलतेचं, अन्वयार्थ शोधणाऱ्या विचक्षण समीक्षकाचं दर्शन वाचकाला होतं.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी व अनुयायी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना आंबेडकरांनी1927 ते 1956 या काळात जी पत्रं लिहिली, त्याचंही संपादन शंकरराव खरातांनी केलं. 1961 मध्ये तो ग्रंथ प्रकाशित झाला. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात, डॉ. आंबेडकरांचे धर्मांतर, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची आत्मकथा, त्यांची ही पुस्तकंही उल्लेखनीय ठरली.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;6. शंकरराव खरात यांच्या समग्र लेखनाच्या मुळाशी समाजाने शोषण केलेला असहाय माणूस आणि त्या माणसाच्या वाट्याला आलेले भोग, त्यातून त्यानेच स्वत:चं करून घ्यावयाचं पुनरुत्थान टोकदारपणे आलं आहे. त्याच बळावर त्यांनी स्व-जीवनाची इमारत उभी केली. 1984 ला जळगाव इथे भरलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. याशिवाय अनेक मानाच्या पुरस्कारांचे, सोहळ्यांचे ते सन्माननीय धनी ठरले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;7. मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झाल्यानंतर शिक्षणाला जीवनसन्मुख करण्यासाठी त्यांनी मांडलेला विचार आणि केलेले प्रयत्न मोलाचे ठरले. त्यांच्या समग्र जीवनप्रवासातून दिसणारा वैरभावविरहित निर्मळपणा दीपस्तंभासारखा आहे. विचारसमृद्ध जगणाऱ्या शंकररावांनी तो निर्मळपणा शेवटपर्यंत जपला. आजकाल अशी माणसं क्वचितच दिसतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;8. समाजाने अस्पृश्य ठरवल्यानंतर वाट्याला येणारं दु:ख काय व कसं असतं याचा पदोपदी आलेला आणि हृदय पिळवटून टाकणारा अनुभव त्यांनी घेतला. 'जात', माणसाचा ठिकठिकाणी कसा पाठलाग करते याचे असंख्य घटनाक्रम त्यांच्या आयुष्यात आले. ते भोगून उभा राहिलेला हा माणूस शिकत राहिला, शिक्षणासाठी झगडत राहिला. त्यांचा हा संघर्ष फक्त बाह्यशक्तींशी नव्हता, तर स्वत:शीदेखील होता. शिक्षणासाठीचं झपाटलेपण आताशा लोप पावताना दिसतेय हे चित्र बरे नाही.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;9. वाट्याला आलेल्या उपेक्षा-अवहेलनेशी दोन हात करताना आंतरिक नकारालाही खरात परतवत राहिले. त्यासाठी शिक्षणाने त्यांना साथ दिली. शिक्षणाने नवा विचार त्यांच्या मनात रुजवला आणि तो फुलवत ठेवला. बाबासाहेबांविषयी खरात म्हणतात, &amp;ldquo;बाबासाहेबांच्या सहवासाने मी अधिक विचारी झालो हे खरं असलं, तरी संवेदनशील आणि विवेकविचारी झालो हे जास्त खरं आहे.&amp;rdquo; बाबासाहेबांना त्यांनी आपल्या स्वत्वात रुजवलं होतं, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;10. माधव कोंडविलकर आणि शंकरराव खरात यांच्या साहित्याचे मूल्य जाणून घेताना कळते की ही माणसं अस्सल पोलादी होती, त्यांचं जिगर अफाट होतं! उभ्या आडव्या अक्राळ विक्राळ पर्वताशी टक्कर घ्यायची असेल तर मस्तकात कोणते विचार असले पाहिजेत हे त्यांना पक्के ठाऊक होते! सद्यकाळात हीच गोष्ट मिसिंग असल्याने संघर्ष कचकड्याचे ठरताना दिसतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;11. विवेकाने व्याप्त असणारा विचार, संवेदनशीलतेची जोड मिळाल्यावर कशा पद्धतीने आविष्कृत होतो, याचं उत्तर मराठी साहित्यात ज्या मोजक्या लेखकांच्या लेखनात आढळतं; त्यात शंकरराव खरात यांचं नाव प्राधान्यक्रमाने घेतलं जातं. काळाचं प्रतिबिंब साहित्यात जसं दिसतं, तसं व्यक्तीचं म्हणजेच लेखकाचंही प्रतिबिंब त्याच्या लेखनात दिसतं. कथा, कादंबरी, वैचारिक, सामाजिक आणि समीक्षात्मक असं विविधांगी लेखन खरात यांनी केलं. कथा-कादंबऱ्यातून बोलणारी पात्रं लेखकाचीच असतात. त्यामुळे लेखकाचाच विचार ते बोलत असतात. शंकरराव खरातांच्या पात्रांतून पुढे येणारा विचार वास्तवाची जाणीव तर देतो, पण संयमातून तो जे सांगतो-बोलतो-वागतो त्यातून एका स्वतंत्र संस्कारशैलीची जाणीव वाचकाला सातत्याने होत राहते. दलित साहित्यिक म्हणून जरी खरात यांच्यावर शिक्का मारला जात असला, तरी त्यांच्या वैविध्यपूर्ण आणि स्व-संस्कारशील शैलीचा विचार करता एकाच लेबलखाली त्यांना बसवणं अन्यायकारक आहे.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/11/984881a39c463e371dbfb1b7a87e20df178377326952293_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Ijazat Movie: इजाजत - प्रेमाची चिरतरुण कविता]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/ijaazat-movie-review-by-sameer-gaikwad-ever-youthful-poem-of-love-bollywood-naseeruddin-shah-rekha-1430733</link><comments>https://marathi.abplive.com/blog/ijaazat-movie-review-by-sameer-gaikwad-ever-youthful-poem-of-love-bollywood-naseeruddin-shah-rekha-1430733#respond</comments><pubDate>Mon, 6 Jul 2026 14:12:40 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ समीर गायकवाड ]]></dc:creator><category><![CDATA[ करमणूक ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/ijaazat-movie-review-by-sameer-gaikwad-ever-youthful-poem-of-love-bollywood-naseeruddin-shah-rekha-1430733</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Ijazat Movie:&lt;/strong&gt; बाहेर घनगर्द पाऊस पडतोय आणि मी जाऊन पोहोचलोय त्या रेल्वे स्टेशनवर, जिथे कधीकाळी रेखा आणि नसीरुद्दीन त्या गदगदून आलेल्या, दाट अंधारात दडलेल्या स्टेशनवर एक रात्र घालवण्यासाठी अकस्मात एकत्र येऊन थांबले आहेत. एकमेकाला पाहून त्यांच्या मनात अनेक भावना दाटून आल्यात. मागच्या जखमा ताज्या झाल्यात अन् काही खपल्या देखील निघाल्यात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्याच्या जीवनात आलेल्या 'दुसरी'ची आता काय अवस्था आहे हे तिला जाणायचेय अन् आपण कसे वाहवत गेलो, आपली चूक नव्हती हे त्याला सांगायचेय....&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;रात्रभर तो तिच्याकडे बघत बोलत राहतो; ती मात्र अधून मधून नजर चुकवत राहते. त्याला खरे तर तिची माफी मागायचीय पण एकाच दमात सारं सांगण्याची त्याची हिंमत होत नाहीये.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तिलाही आठवत्येय की, सुरुवातीला आपण किती सुखी होतो; मात्र त्याने आपल्याशी प्रतारणा करावी याचा धक्का कसा पचवावा, हे तिला उलगडलेले नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्यांची अबोल तगमग पाहून रात्रभर तळमळत असणारा अंधार तिच्या अंगावरच्या शालीत तिला अलगद लपेटून चिंब झालाय अन् मंद पिवळसर उजेड त्याच्या ओलेत्या डोळ्यात झिरपतोय, निर्मनुष्य स्थानकावरच्या प्रतिक्षागृहाच्या खडबडीत दगडी भिंती त्या दोघांना रात्रभर अनुभवून सुन्न होऊन गेल्या आहेत, ते ज्या टेबलभोवती बसले होते तिथल्या खुर्च्या त्यांना जवळ आणण्यासाठी आसुसल्या आहेत. तर पहाटेच्या गारव्याला त्यांना एकत्रित बाहुपाशात घ्यायचे आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;img src=&quot;https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/06/95ebdff26a94e02bd9f01c90ab15f498178332716009788_original.jpeg&quot; width=&quot;419&quot; height=&quot;284&quot; /&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ज्या बाकावर ते दोघे बसून आहेत त्याला मात्र त्यांचा अबोला भावतोय. स्थितप्रज्ञ होऊन त्या दोघांना तो आपल्या कवेत घेऊन बसलाय.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तिथल्या हेडलॅम्पला त्या दोघांना डोळे भरून पाहायचेय तर प्लॅटफॉर्मवरील लांबसडक कॉरिडॉरला त्यांचे खाली पडणारे अश्रू झेलायचे आहेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गुलाबाची एकेक पाकळी नितळ अल्वारपणे बाजूला काढावी तशा एकेक घटना तो तरलपणे तिच्या पुढ्यात मांडतोय, त्याचं दुखणं ऐकता ऐकता ती आतूनच धुमसून निघत्येय, आपण कुठे कमी पडलो याचा तिचा शोध संपत नाहीये अन् रातकिड्यांची किर्रर्र देखील सरत नाहीये.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तिला जाणून घ्याययचेय ती घरात नसताना 'त्या' रात्री घरात नेमके काय झाले होते? तो तसं का वागला होता? त्यालाही सत्य सांगायचेय, मात्र सत्य सांगताना त्याला तिचं मन पाकळीवरच्या दवबिंदूसारखं जपायचं आहे. अंतःकरणातला सल सांगता यावा याचा तो जीवापाड प्रयत्न करतोय, तो आता काहीतरी बोलेल या आशेने त्याच्याकडे डोळे लावून बसलेली त्या बंद खोलीची काचेची पिवळसर तावदाने डोळ्यात पाणी आणून त्याच्या चेहऱ्याकडे पाहतायत अन् शिसवी दरवाजा भिंतीत तोंड खुपसून मूक अश्रू ढाळतोय!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;img src=&quot;https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/06/b5426e0ba83cdb2e092a780525a5848c178332717853088_original.jpeg&quot; width=&quot;418&quot; height=&quot;235&quot; /&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ती अधून मधून नाकावरचा चष्मा मागे सरकावण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे बघत्येय, त्याच्यात काय बदल झालेत याचा हळूच अंदाज घेतेय तर तिच्याकडे तिरक्या नजरेने डोळे भरून पाहत ती किती बदलली आहे याचे गणित तो करतोय.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बघता बघता पहाट सरत आलीय, आपल्या मनातलं मळभ त्यानं रितं केलंय. &quot;झालं गेलं विसरून जा अन् माझ्याकडे परत ये&quot; इतकंच सांगायचं बाकी राहिलंय. त्याच्या कबुली जबाबास केवळ निमिषार्धच राहिलाय .&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दरम्यान रात्रभर झोपी गेलेल्या सभोवतालच्या झाडांच्या पालवीला आता जाग आलीय अन् वाऱ्याचाही रात्रीचा सूर बदललाय.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;'तो' मनाचा हिय्या करून तिच्याशी आता बोलणार &amp;nbsp;इतक्यात तांबड्या पिवळ्या सुर्यकिरणांना सोबत घेऊन &quot;तोही ' तिथे येतो! हा &amp;lsquo;तो&amp;rsquo; म्हणजे तिचा सध्याचा पती!&lt;br /&gt;त्याच्याकडे नजर जाताच ह्याचे शब्द गळ्यात विरतात, अश्रू डोळ्यात विझून जातात. स्तब्ध होऊन जागीच थिजून जातो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;रात्रभर दोलायमान झालेलं तिचं मन 'त्याला' पाहून किंचित खुलून उठतं. तिचं हसू खरं की खोटं याचा अंदाज बांधत हा रडवेला होऊन जातो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्या दोघांना रात्रभर अनुभवणारे ते प्लॅटफॉर्म, ती खोली, त्या खिडक्या, तो दरवाजा, टांगता हेडलॅम्प, तांबडे पिवळे दिवे, तो बाक, ते टेबल, त्या खुर्च्या साऱ्यांना नियतीने चकवा दिलाय. सारेच हिरमुसलेत. मी देखील चेहरा बारीक करून तिथून निघालोय. पाऊसही पूर्ण थांबलाय...&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बाहेर प्रसन्न सकाळ झालीय अन् आकाश निरभ्र झालंय. उंच आकाशात उडणाऱ्या बगळ्यांच्या त्रिकोणी थव्यात व्हिक्टरीचे 'व्ही' साईन शोधत मी किशोरदांच्या &amp;lsquo;जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम....&amp;lsquo; या गीताची शीळ घालत निघालोय....&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जीवन हे असेच आहे, एका हातात काही तरी गवसलेय म्हणेपर्यन्त दुसऱ्या हातातलं काही तरी गळून पडलेलं &amp;nbsp;असतं.&amp;nbsp;&lt;br /&gt;साऱ्यांना सारं मिळत नसतं, जो क्षण समोर आहे त्याला स्वच्छंदीपणे समोर जाताना जीवनाशी व स्वतःशी प्रामाणिक राहिलं की दुःखाचा आनंदही सुखाइतकाच घेता येतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;काळजात घर करून राहिलेल्या सिनेमांत 'इजाजत'चे स्थान फार वरचे आहे..... 'इजाजत' केवळ एक सिनेमा नाही तर जीवनात वाट्याला आलेल्या नात्यांचा हळुवार उलगडा करणारी आर्त हळवी कविता आहे ..&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मनात खोल रुतून बसणारी अन् उत्तुंग अभिनयाने सजलेली, अगदीच नटमोगरी नसली तरीही सोज्वळ चाफ्यासारखी दरवळणारी प्रेमपुष्पांची नाजूक गाथा आहे...&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जेव्हा जेव्हा 'इजाजत' पाहतो, तेव्हा नात्यांचे अर्थ नव्याने शिकतो ...&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जीवनातील सुखदुःखाच्या व्याख्या नित्य नव्याने सांगणार्&amp;zwj;या रुपेरी पडद्यास नम आँखोसे सलाम .....&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;विशेष नोंद - वेटिंग रूममधील एक सीनमध्ये त्याला सिगारेट पिण्याची हुक्की येते.&amp;nbsp;&lt;br /&gt;न राहवून तो तिला &quot;माचिस आहे का?&quot; असं विचारतो.&amp;nbsp;&lt;br /&gt;त्याचा सवाल पुरा होण्याआधीच काडीपेटी काढून त्याच्या हाती देते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तो विचारतो, &quot;तू पूर्वी माझ्यासाठी माचिस ठेवत होतीस आता कुणासाठी ठेवतेस?&quot;&amp;nbsp;&lt;br /&gt;त्यावर ती उत्तर देते की, &quot;माझ्यासाठी ठेवते.&quot;&amp;nbsp;&lt;br /&gt;त्यावर तो चमकतो नि तिला म्हणतो की, &quot;म्हणजे तू सिगारेट प्यायला लागलीस काय?&quot;&amp;nbsp;&lt;br /&gt;ती नाही म्हणते.&lt;br /&gt;मग तो पुन्हा सवाल करतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एक उसासा टाकत ती उत्तर देते, &quot;तुझी विसरायची सवय गेली नाही आणि तुझ्यासाठी ठेवायची माझी सवय गेली नाही.&quot;&lt;br /&gt;तिच्या उत्तराने प्रसवलेली व्याकुळता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तो पुटपुटतो, &quot;सवयी मोठ्या अजब असतात! श्वास घेणं ही देखील एक सवय होते, जगत राहणं ही देखील एक बेजान सवय होऊन जाते. केवळ जगत जातो, केवळ जगत जातो!...&quot; &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एखाद्या कट्यारीने घाव केल्यावर जसे आघात होतात तसे आघात करण्याची क्षमता या सीनमध्ये आहे...&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/06/6e54703139b2bf607a73e9938f1eb239178332713069188_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : शिवरायांच्या महाराष्ट्रात, नर्तिकांचा उत्तर भारतीय हैदोस...!]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/blog-of-vishal-garad-on-maharashtra-lavani-culture-north-india-obscene-dance-1430524</link><comments>https://marathi.abplive.com/blog/blog-of-vishal-garad-on-maharashtra-lavani-culture-north-india-obscene-dance-1430524#respond</comments><pubDate>Sat, 4 Jul 2026 18:57:52 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा ब्युरो ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/blog-of-vishal-garad-on-maharashtra-lavani-culture-north-india-obscene-dance-1430524</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;BLOG :&lt;/strong&gt; सध्या बीभत्स नृत्याविष्कार सादर करणाऱ्या काही नर्तिकांनी महाराष्ट्रभर नुसता हैदोस माजवलाय. संतांचा अभंग आणि ओव्यात न्हावून निघणारा महाराष्ट्र अलीकडील काळात नर्तिकांच्या फडात रेंगाळताना दिसतोय. जत्रा, यात्रा, उरुस, दहीहंडी किंवा इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने नर्तिकांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचे प्रमाण गेल्या सात आठ वर्षात प्रचंड वाढलंय. अशात अश्लील हावभाव करणाऱ्या आणि अवयवांची संमोहित हालचाल करणाऱ्या नर्तिकांना जास्त डिमांड आलय. मुळात त्याला नर्तन म्हणता येईल का इतक्या खालच्या थराला जावून काही नर्तिका नृत्याच्या नावाखाली अंग प्रदर्शन करत आहेत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;महाराष्ट्राच्या इतिहासाला आणि भविष्याला न शोभणारा हा वर्तमानकाळ आहे. याला जेवढ्या त्या नर्तिका जबाबदार आहेत तेवढेच आयोजकही आहेत. अशातही सार्वजनिक आचारसंहिता समजून पारंपारिक वस्त्र परिधान करून शुद्ध नृत्य करणाऱ्या नर्तिकांबद्दल आम्हाला आदरच आहे अन पुढेही राहील. करून करून भागले अन देव पूजेला लागलेल्यांचाही थोड्याफार प्रमाणात आहे पण &amp;ldquo;अमुक तमुक बाईसारखंच मलापण व्हायचंय, तिच्यासारखा स्टारडम मलाही मिळवायचाय या येडापायी तिचीच री ओढत या व्यवसायात नव्याने आलेल्या नर्तिकांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे अन्यथा महाराष्ट्राच्या लोककलेला आणि संस्कृतीला या कुठपर्यंत रसातळाला नेतील याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एखाद्या गावात किंवा शहरात समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवायचा म्हणलं की काही गावकरी वर्गणी द्यायला इवळतात पण तिथंच जर नर्तिकेचा कार्यक्रम होणार असेल तर मात्र एका रात्रीत फक्त व्हॉट्सअपवर तीन चार लाख गोळा करतात. कमी जास्त प्रमाणात सगळीकडे हीच परिस्थिती पाहायला मिळेल. त्या कातील नृत्यांगणेला आणण्यासाठी तर पोरा ठोरांसोबत पार म्हातारी कोतारीसुद्धा कात टाकून तयार असतात.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जुन्या काळातले तमाशे हे अत्ताच्या डान्स शो पेक्षा कितीतरी पटीने सरस होते. लावण्या असायच्या पण झाकून चोपून. त्यातूनही श्रोते घायाळ व्हायचेच की पण ते फक्त अदाकरीतूनच. चेहरा, कोपरापासूनचा हात, पायांचा पंजा अन चार बोट कंबर; बस यापलीकडे त्यांचे शरीर दिसत नसायचे पण कला मात्र उठून दिसायची. आता महाराष्ट्राच्या लावणीला परप्रांतीय नर्तिकांच्या बीभत्स नृत्याने पछाडले आणि एक नवीनच मादक व्हर्जन तयार झाले ज्यात छाती अन ढुंगणाच्या हालचाली म्हणजेच लावणी म्हणू लागलेत. त्याला ना शेंडा आहे ना बुड, बीट वाजले की लागले हलायला.. ढंगडांगऽऽ ततडांगऽऽ, ढंगडांगऽऽ ततडांगऽऽ.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अहो पहिले गावात तमाशे यायचे तेव्हा त्या तमाशाचा फड गावाबाहेर असायचा. पण हल्ली मात्र गावातील भर चौकात, सार्वजनिक ठिकाणी डान्स शोच्या नावाखाली हा मादक नृत्याचा हैदोस सुरू असतो. त्या तमाशाला सुद्धा बाहेरून पडदा असतो पण इथे मात्र सगळा खुल्लम खुल्लाच. अगदी रस्त्यावर जाणारे, शेजारच्या अपार्टमेंट किंवा घरातले, चौकातले, पारावरचे ह्या सगळ्यांनाच तो फ्री असतो. कुणीही या बघायला हरकत नाही.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मुळात फक्त प्रौढांनी चार भिंतीच्या आत बघण्याच्या लायकीचे मादक नृत्य आता काही आयोजकांनी पार सार्वजनिक चौकात आणि भर रस्त्यावर आणून ठेवलेत. पुढच्या पिढी साठी हे किती भयंकर ठरेल याची पुसटशीही कल्पना त्यांना नाही. तुम्ही असे कार्यक्रम बघायला जाताना लहान लेकरांना सुद्धा घेवून जात आहात. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा असलेली पोरं तर या मोह कुंडात दणादण उड्या घेत आहेत. आपण समाज म्हणून फक्त हे पाहत आहोत किंबहुना असे थिल्लर कार्यक्रम आयोजित करून त्यांना उड्या मारण्यास बळ देत आहोत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हे असले कार्यक्रम आधी महाराष्ट्रात होत नव्हते. ऑर्केस्ट्रा वगैरे असायचे पण त्यात इतरही बरेच कार्यक्रम, संस्कृती बघायला मिळायची पण अलीकडील काळात मात्र एका नर्तिकेचे यश पाहून अनेक नवोदित नर्तिकांनीही या कुंडात उड्या घेतल्यात. आता तर अशा कार्यक्रमात बीभत्सता दाखवण्याची जणू स्पर्धाच लागली की काय इतक्या टोकाचे थिल्लर डान्स होताना दिसत आहेत. असे कार्यक्रम कोणत्याही चौकात होवू द्या, त्याच दिवशी त्या नर्तिकेचे शे पाचशे रिल्स सोशल मीडियावर पडतात. ज्यांनी पाहायला नको त्यांच्या पण फीड मधे ते पुन्हा पुन्हा दिसत राहतात. नर असलेला प्रत्येक देह क्षणभर का होईना पण ते लटके झटके बघतोच. मुळातच हे आकर्षण नैसर्गिक आहे त्यामुळे त्याला बळी पडण्यापासून वाचताच येत नाही. अगदी लहान लहान लेकरांच्या हातात सुद्धा तासन्नतास मोबाईल आहेत, नकळत त्यांच्यापर्यंतही हा कंटेंट सहज पोहोचत आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नाचता नाचता एखादं लहान पोरगं स्टेजवर जातं अन ती नाचणारी नर्तिका सर्व गर्दीसमोर त्याला तिचा पापा घायला लावते. त्याने तिचा पापा घेतला की मग उपस्थित गर्दीही त्याने मर्दुंगी दाखवल्याप्रमाणे टाळ्या पिटते, शिट्ट्या फुकते. पुढे तर ती नर्तिकाच त्या लेकराची तोंड धरून पप्पी घेते. अरे नृत्या सारख्या पवित्र आणि श्रेष्ठ कलेला अशा तथाकथित नर्तिकांनी पार गटारीत ढकलून दिलंय.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;लावणी सारख्या नृत्यात हात अन पाय सर्वात जास्त नाचत असतात पण लावणीच्या पोशाखात हल्लीच्या काही नर्तिका नको त्याच अवयवांचे जास्त नृत्य करतात मग आंबट शौकिनांचा मेळा तिथे का बरे नाही भरणार ? पार एका मेकांच्या बोकांडी बसून, गाड्यावर, पत्र्यावर, गच्चीवर, झाडावर बसून त्यांचे लटके झटके बघायला का बरे नाही गर्दी होणार ? लहान वयातच पोरांच्या नजरा वासनांध का बरं नाहीत होणार ? जिभल्या चाटत शाळकरी पोरं कशी बरं नाहीत नाचणार ? थांबा ! विचार करा, मुळापासून नासत चाललेलं हे सगळं समाजात पडणारं विषारी विरजण जर वेळीच थांबवलं नाही तर विचारशील पिढी नासून जायला वेळ लागणार नाही हे ध्यानात असू द्या.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नृत्य कलेला हजारो वर्षांची समृद्ध परंपरा आहे पण या दशकात जेवढे केवढ्या अश्लील हावभाव आणि लटक्या झटक्यांनी तिच्यावर अतिक्रमण केलंय त्याने नृत्यकला बदनाम होत आहे. विवेक सोडून दिलेल्या काही प्रसिद्धीपिपासू नर्तिकांमुळेच नृत्य कलेत हे अतिक्रमण झालंय. आता तर देव देवतांच्या गाण्यांना सुद्धा रिमिक्सचा तडका देवून या आधुनिक हाडळणी बीभत्सरित्या थैय्या थैय्या नाचत आहेत आणि तथाकथित धर्म रक्षणावर वगैरे गप्पा मारणारे डोळे बंद करून झोपले आहेत. स्टेजच्या फ्लेक्सवर महापुरुषांचे फोटो आहेत पण याचे ना नाचणाऱ्यांना भान ना नाचवणाऱ्यांना. शिवरायांचा महाराष्ट्र आहे म्हणणाऱ्यांनो हे तुम्हाला पटतं का ? देव अन धर्माची आचार संहिता माहीत असणाऱ्यांनो तुम्हाला हे रुजते का ? शिवभक्तांनो आपल्या राजाच्या एकाही किल्ल्यावर नर्तिकालयासाठी इंचभर सुद्धा जागा नव्हती हे तुम्हाला ठाऊक नाही का ? नर्तिका ही एक स्त्री असते तिच्यातील त्या स्त्रीचा कायम आदरच असेल पण ती जर गैरनृत्य करून इथल्या युवापिढीला नादावून सोडत असेल तर तिच्या त्या कलेचा निषेध करावाच लागेल की.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अशा डान्स शो च्या परवानग्या देतानाच पोलीस स्टेशन स्तरावर कठोर निर्बंध घालायला हवे. सदर कार्यक्रमात जर &amp;nbsp;युवकांना उकसावणारी बीभत्स नृत्य झाली तर संबंधित आयोजक आणि नर्तिकेवरही गुन्हे दाखल व्हायला हवे. मुळात असे कायदे आहेतही पण त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही हेच दुर्दैव. असले कार्यक्रम आयोजित करणारेही मोठे मासे असताना आणि त्यांच्यामागे त्याहून मोठे शार्क मासे असतात मग अशा अवस्थेत पोलीस प्रशासनाकडून तरी कारवाईची काय अपेक्षा ठेवायची ? अन्यथा आजवर जे डान्स शो झालेत त्या रीतसर परवानग्या घेवूनच झाले असतील की, मग तरीही एवढा नंगा नाच कसा पचवला जातो ?&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मी एक लोकव्याख्यानकार आहे. समाजात चांगला विचार रुजवणं आणि वाईट विचारांना मूठ माती देणं माझं काम आहे. माझ्या व्याख्यानातून तर मी या गोष्टींवर नेहमीच आसूड ओढत आलोय पण एक लेखक म्हणूनही गेली काही वर्ष मनाला खटकत असलेली आणि माझ्या विवेकी मेंदूला न पटणारी गोष्ट इथे परखडपणे मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. माझ्या लिखाणाशी आपण सहमत असाल नसाल पण बिथरत चाललेली युवा पिढी मी खूप जवळून अनुभवत आहे. विभयभंग, छेडछाड, बलात्कार या सारख्या घटना वाढण्यामागे अनेक कारणे आहेत त्यातलेच एक हे देखील आहे. या नर्तिका नाचत असताना स्टेजच्या अवती भवती उभा राहून तिच्यावर खिळलेल्या नजरा एकदा निरखून बघा. तुम्हाला त्या डोळ्यात या लेखाचे तात्पर्य दिसेल.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बाकी हा लेख कोणत्याही विशिष्ठ एखाद्या व्यक्तीबद्दल लिहिला नसून तो एका बीभत्स वृत्तीबद्दल लिहिला आहे. या विषयाबद्दलच्या तुमच्याही काही भावना असतील, अनुभव असतील तर कमेंटबॉक्समधे अवश्य नोंदवा. पोस्ट वाचणाऱ्यांचे कमेंट वाचूनही प्रबोधन होईल याची खात्री आहे. काही आवली पोरांनी जर वाकड्या तिकड्या कमेंट केल्याच तर चांगल्या तेवढ्या वाचा, लय इरसाल अन बिलिंदर असतील तर दुर्लक्ष करा. शक्यतो वृत्तीबद्दल लिहा, विशिष्ठ व्यक्तीबद्दल लिहिणे टाळा. आणि मी लेखात उल्लेख केलेल्या तथाकथित नर्तिकांचे फोटो/व्हिडिओ वगैरे पोस्ट करणे टाळा. सार्वजनिक स्थळी नाचण्याची आचार संहिता आधुनिक नर्तिकांना कळेल का नाही माहीत नाही पण किमान त्यांना बोलवणाऱ्यांनी तरी ती पाळावी म्हणून हा अट्टाहास.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;- प्रा. विशाल गरड.&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहास व विविध सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/04/da4818bd68119a9b1d23698bb51668ad178317166082893_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : आनंदयात्री]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/veteran-marathi-journalist-chandrashekhar-kulkarni-aka-ck-chandu-kulkarni-passes-away-vijay-salvi-blog-post-old-memories-1430493</link><comments>https://marathi.abplive.com/blog/veteran-marathi-journalist-chandrashekhar-kulkarni-aka-ck-chandu-kulkarni-passes-away-vijay-salvi-blog-post-old-memories-1430493#respond</comments><pubDate>Sat, 4 Jul 2026 14:25:27 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ विजय साळवी, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/veteran-marathi-journalist-chandrashekhar-kulkarni-aka-ck-chandu-kulkarni-passes-away-vijay-salvi-blog-post-old-memories-1430493</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;BLOG :&lt;/strong&gt; चवीनं खाणार त्याला देव देणार, अशी एक म्हण आहे. या म्हणीतला उल्लेख हा केवळ खाण्यापुरता मर्यादित असला तरी त्यामागे जीवनाचा सकारात्मकतेनं आनंद घेण्याच्या आणि समाधानानं जगण्याच्या वृत्तीचा खूप मोठा अर्थ दडलाय. आयुष्याचा सकारात्मकतेनं आनंद घेण्याची वृत्ती असलेल्या माणसाला देवही भरभरून देतो असं म्हणतात. माझा मित्र चंद्रशेखर कुलकर्णी म्हणजे चंदू हा तसाच पट्टीचा खवय्या आणि चवीनं जगणारा माणूस होता. शास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक वि. गो. कुलकर्णींच्या या लेकाला तल्लख बुद्धी, दांडगी स्मरणशक्ती आणि असामान्य प्रतिभेचं वरदान उपजतच लाभलं होतं. त्यामुळं पत्रकार किंवा लेखक म्हणून जगताना चंदूनं आपल्या सभोवतालच्या जगाचा कायम सकारात्मकतेनं आनंद घेतला आणि आपण समृद्धपणे अनुभवलेल्या त्या जगाचा त्यानं आपल्या वाचकांनाही भरभरून आनंद दिला. चंदूनं त्याच्या ६१ वर्षांच्या आयुष्यात केवळ चवीनं खाल्लंच नाही, तर त्यानं चवीनं वाचलं, आजूबाजूचं जग त्यानं चवीनं पाहिलं, त्यानं चवीनं गाणं ऐकलं, चवीनं नाटक आणि सिनेमा पाहिला, चवीनं अगदी जगभर भटकंती केली. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी दिल्ली-लाहोर बससेवा सुरु केली, त्यावेळी पाकिस्तानला जाताना दिसलेला त्याचा उत्साह हा देशविदेशात किंवा अगदी पुणं-श्रीवर्धनला जातानाही त्याच्यामध्ये कमालीचा असायचा. नवं काही तरी जाणून घेण्याची आणि ते मराठी जनमानसाला आपल्या शैलीतून सांगण्याची त्याची भूक कायम होती.&lt;br /&gt;&amp;nbsp;&lt;br /&gt;खरं तर माटुंग्याच्या रुईया कॉलेजात शिकत असताना, नवशक्तीत महाविद्यालयीन सदर लिहिण्याच्या निमित्तानं चंदू १९८५ सालीच पत्रकारितेत आला आणि तिथंच त्याच्या भावी आयुष्याची वाट कदाचित निश्चित झाली असावी. मग सकाळ आणि महाराष्ट्र टाईम्समध्ये लक्षवेधक बातमीदारी करत करत तो 1995 सालाच्या सुमारास लोकसत्तात रुजू झाला. मी त्यावेळी सांज लोकसत्तामध्ये होतो. पण माझी आणि चंदूची ओळख त्याआधीची. त्यावेळी तो महाराष्ट्र टाईम्समध्ये होता. माझ्या क्रीडा पत्रकारितेची सुरुवात ही दैनिक सामनातली. आमच्या दोघांमधला दुवा म्हणजे सुहास गांगल मला सामनात भेटला. त्या काळात आम्हा पत्रकारांना बबनशेठच्या चहाचं आणि त्यांच्या चहाच्या ठेल्यावर गप्पांच्या देवाणघेवाणीचं व्यसन होतं. सुहास गांगल आणि देवदास मटाले यांच्या साथीनं मी चहा आणि गप्पांच्या त्या मैफिलीत सामील झालो. ही सारी मंडळी माझ्यापेक्षा वयानं तीनचार वर्षांनी मोठी होतीच, पण त्यात चंदू राजकारण, समाजकारण, संगीत, साहित्य, सिनेमा, नाटक, क्रिकेट आदी विविध प्रांताविषयीच्या ज्ञानानं समृद्ध होता. बरं हे काही फक्त कानोकानी नव्हतं, त्याचं पुस्तकांचं आणि विविध क्षेत्रांमधल्या छोट्यामोठ्या माणसांविषयीचं वाचन दांडगं होतं. त्यामुळं त्याच्याशी बोलताना किंवा त्याचं महाराष्ट्र टाईम्समधलं लिखाण वाचताना नवं काही तरी समजायचं, नवं शिकायलाही मिळायचं.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;चंदूची लिखाणाची शैली ही फक्त ओघवती नव्हती, तर आपल्या समृद्ध जगण्यातून समोरच्यालाही चार गोष्टी समजावून सांगण्याची त्याची हातोटी होती. त्यामुळं शिक्षण किंवा सामाजिक क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराची बातमी असो, चटकदार या हॉटेलिंग सदराचा मजकूर असो, लाल परी या एसटी बसच्या अनुषंगानं लिहिलेल्या सदराचा मजकूर असो किंवा एखाद्या बातमीसाठी त्यानं सुचवलेला मथळा असो... त्यात खूप वेगळेपण असायचं. आणि वाचताक्षणी ते मनाला भावायचं. पण चंदूच्या या ज्ञानाचं, त्याच्या शैलीचं किंवा पत्रकार म्हणून मोठा असण्याचं कधी दडपण आलं नाही. कारण त्यानं समोरच्याला कायम आपला मित्र समजून एक हात त्याच्या खांद्यावर ठेवला किंवा वेळोवेळी त्याच्या मदतीसाठी पुढे केला. चंदूनं क्रीडा पत्रकारितेतल्या माझ्या धडपडीला नेहमीच शाबासकी दिली आणि वेळोवेळी मला प्रोत्साहन दिलं.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मी सांज लोकसत्तात असताना १९९७ साली एमसीएच्या कांगा लीग ए डिव्हिजन विजेत्या क्लब्सवर कांगा नाबाद ५० हे सदर चालवलं होतं. त्यात पारसी सायक्लिस्टस या त्यावेळी अमृतमहोत्सव साजऱ्या करणाऱ्या क्लबवर लिहिताना, मी मथळ्यात आणि एन्ट्रोमध्ये अवघे पाऊणशे वयोमान वगैरे बाबी जुळवून आणल्या होत्या. त्यावेळी सांज लोकसत्ताची ताजी आवृत्ती सकाळी साडेदहा-अकराच्या सुमारास तळमजल्यावरच्या प्रेसमधून कार्यालयात यायची. त्यादिवशी चंदू कदाचित लवकर ऑफिसला आला होता. माझा मथळा आणि सदर वाचून तो तडक लोकसत्तामधून पोटमाळ्यावरच्या सांज लोकसतात आला आणि त्यानं मला शाबासकी दिली. त्याच दिवशी चंदू आणि माझी खऱ्या अर्थानं मैत्री झाली आणि मग ती अधिकाधिक घट्ट होत राहिली. एक्स्प्रेस वृत्तसमूहानं सांज लोकसत्ता बंद करून, आम्हाला लोकसत्तात सामावून घेतलं, त्यावेळी मला मानसिक आधार आणि प्रोत्साहनही देणारा पहिला सहकारी हा चंदूच होता. माझ्या आयुष्यात एक मित्र म्हणून चंदूकडून वेळोवेळी मिळालेलं हे प्रोत्साहन खूप मोलाचं होतं.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;चंदू एक मित्र या नात्यानं पाठीवर शाबासकीची थाप देताना अधूनमधून, अगदी आवर्जून गिफ्टही देत असे. एरवीही चंदूनं आपल्या मित्रांसाठी कधी हात आखडता घेतला नाही. पण त्याच्याकडून उत्तम गिफ्ट मिळवायचं तर त्यासाठी तुम्ही काही तरी उत्तम लिहिणं त्याला अपेक्षित असे. मला एखादा शर्ट किंवा पेनं अनेक मिळालीयत. पण धों. वि. देशपांडे यांचं राजमुद्रा हे पुस्तक चंदूनं मला दिलेलं सर्वोत्तम गिफ्ट होतं. ते पुस्तक माझ्या हातात देताना त्यानं आधी धों. वि. देशपांडे मला समजावून सांगितले. मग सांगितलं की, ते त्याच्या वडिलांचे म्हणजे वि. गो. कुलकर्णींचे जवळचे मित्र होते. त्यामुळं मग त्यांच्याशी गप्पा मारण्याची आपल्याला कशी संधी मिळालीय, हेही त्यांनं खुलवून सांगितलं होतं. आपल्या लिखाणाचा विषय असलेली समोरची व्यक्ती ही समाजात कितीही मोठी असली तरी ती प्रात:स्मरणीय आहे का, या मुद्द्यावर धों. वि. देशपांडे लिहिते होत. त्यामुळंच राजमुद्रा पुस्तकातल्या थोरामोठ्यांवरच्या चरित्रलेखात ते अतिशय कणखरपणे व्यक्त झालेत. खेळांच्या दुनियेतल्या दिग्गज व्यक्तींकडे पाहताना आपण कळत नकळत त्यांच्या मैदानातल्या कर्तृत्त्वाच्या निकषावर वाहवत जाण्याची शक्यता असते. पण त्यापलिकडे समाजात वावरताना या दिग्गजांनी आपले हात स्वच्छ ठेवलेयत का किंवा समाजासाठी आपले हात कधी मोकळे सोडलेयत का याचाही उहापोह माझ्याकडून होऊ लागला तो धों. वि. देशपांडे यांचं राजमुद्रा वाचल्यानंतरच. त्याचं श्रेय 'धोंवि' यांच्याइतकंच मला चंदूलाही द्यायला हवं. खेळांच्या आकडेवारीच्या अलिकडे आणि पलिकडेही असलेलं जग एक क्रीडा पत्रकार म्हणून समजून घ्यायचं, तर तशी दृष्टी हवी आणि त्यासाठीच &amp;nbsp;चंदूनं मला नेमकं गिफ्ट दिलं होतं.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;लोकसत्तामधल्या सान्निध्यात एक मित्र आणि एक पत्रकार म्हणून चंदू रोज नव्यानं उलगडत होता. लालबागच्या चिवडा गल्लीत हनुमान थिएटरपासून अर्ध्या मिनिटावर लोकसत्ताचं कार्यालय होतं. तिथून पुढच्या कोपऱ्यावर एक चहाची टपरी होती. तिथं आमची दुपार आणि संध्याकाळ चहाच्या रतीबानं साजरी व्हायची. मी, चंदू आणि सुहास गांगल चहाच्या घोटासोबत दिवसभरातल्या बातम्यांवर गप्पा मारायचो. त्यात खेळाच्या मैदानावर काय घडतंय हे अगदी रोज जाणून घेणारा चंदू हा माझ्यासाठी पहिला ज्येष्ठ सहकारी होता. त्याचा क्रीडाविश्वातल्या घडामोडींबाबतचा मैदानापलिकडचा इंटरेस्ट मला २००३ सालच्या क्रिकेट विश्वचषकादरम्यानही जाणवला. त्या विश्वचषकाच्या काळात लोकसत्ता दररोज चार पानी खास कव्हरेज करत होता. आणि त्यावेळी मला चंदू आणि सुहाससोबत थेट काम करायची संधी मिळाली. त्या दीडेक महिन्याच्या काळातल्या अनेक आठवणी माझ्या मनात आजही ताज्या आहेत. पण महत्त्वाची आठवण म्हणजे, २००३ सालच्या विश्वचषकात फायनलमध्ये धडक मारण्याआधी टीम इंडियाच्या मोहिमेची सुरुवात खूप खराब झाली होती. आपण सलामीला नेदरलॅण्डला हरवलं होतं, पण त्या सामन्यात नेदरलॅण्डनं भारताला २०४ धावांत गुंडाळलं होतं. मग ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवला होता. त्यानंतर देशात भारतीय संघाविरोधात वातावरण निर्माण झालं होतं. मोहम्मद कैफच्या घरावर दगडफेक झाली होती. माझ्या आणि चंदूच्या त्यावेळच्या गप्पांमध्ये हीच वेळ आहे की देश म्हणून आपण टीम इंडियाच्या पाठीशी उभं राहायला हवं असा सूर निर्माण झाला. आणि मग चंदूनं एडिट पानावर लिहिलेलं स्फुट माझ्या आजही स्मरणात आहे. विश्वचषकातला केवळ एक पराभव आपल्या राष्ट्रभावनेत कशी चुकीच्या पद्धतीनं तेढ निर्माण करतोय यावर चंदूनं भाष्य केलं होतं. विश्वचषकात मुसुंडी मारण्याची आपल्याला अजूनही कशी संधी आहे हाही मुद्दा त्यानं ठासून मांडला होता. आणि मग त्यानंतर टीम इंडियानं गाठलेली विश्वचषकाची फायनला हा सारा इतिहास आज आपल्यासमोर आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;चंदूसोबत लोकसत्ताच्या लालबाग ऑफिसमध्ये असताना त्याची खवय्येगिरी मी जवळून पाहिली. आम्ही सारे सहकारी एकमेकांचे डबे फस्त करताना, तोही आमच्यासोबत असायचा. त्या डब्यांमधल्या आवडलेल्या मेन्यूवर चंदूचा हक्क जरा जास्तच असायचा आणि मग त्यावर त्याचं पोटभर विश्लेषणही व्हायचं. मुंबईत छोट्यामोठ्या ठेल्यापासून किंवा उपाहारगृहापासून अगदी बड्या हॉटेल्सपर्यंत कुठं काय चांगलं खायला मिळतं याची चंदूला इत्यंभूत माहिती असायची. मला तो वेळीअवेळी तिथं घेऊन जायचा. तिथल्या ठेलेवाल्याला, वेटरला किंवा मॅनेजरला आपल्याला नेमकी कशी डिश हवीय, हे अधिकारवाणीनं सांगताना त्याच्या चेहऱ्यावरचे भावही खूप काही सांगून जायचे. कळकट मळकट ठेल्यावरच्या भेळपुरीपासून झणझणीत-सणसणीत वडापाव, मिसळपाव, उपाहारगृहातलं शाकाहारी-मांसाहारी जेवण किंवा उंची हॉटेलात इन्टरकॉन्टिनेटल फूडचा चवीनं आनंद घेतल्यावर तृप्तीचा ढेकर देणारा चंदू हा त्या मंडळींचं मग लाडकं गिऱ्हाईक किंवा कस्टमर होऊन जायचा. पण कुठेही गेलं की कच्च्या हिरव्या मिरच्या खाण्याचा त्याचा सोस मला कधीच समजला नाही, आणि जमला तर मुळीच नाही. तिखट खाणं आणि गोठवणाऱ्या थंडीतही सहज वावरणं ही कदाचित त्याला मिळालेली नैसर्गिक देणगी होती.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मी 2007 साली लोकसत्तामधून, त्यावेळच्या स्टार माझात दाखल झालो. चंदूही सकाळमधून लोकमत वृत्तसमूहात आला. आणि एक दिवस अचानक त्यानं एका वृत्तवाहिनीची त्याला आलेली ऑफऱ माझ्या कानावर घातली. त्यासाठी नेटवर्कच्या मालकांसोबत त्याचा इन्टरव्ह्यूही झाला, कार्यकारी संपादक म्हणून नियुक्तीचं पत्रही चंदूच्या हातात पडलं. योगायोगानं त्याच दिवशी आमची भेट झाली. त्यामुळं ते पत्रही चंदूनं मला दाखवलं. पण अचानक सुरु झालेल्या आजारपणानं चंदूला तिथं जॉईन व्हायची संधीच दिली नाही. त्यामुळं चंदूच्या वैयक्तिक करीअरचं नुकसान झालंही असेल, पण त्यापेक्षाही मोठं नुकसान त्या वृत्तवाहिनीचं आणि तिथल्या तरुण पत्रकारांचं झालं असावं. कारण त्यांच्यावर चंद्रशेखर कुलकर्णीचे संस्कार व्हायचे राहून गेले.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/04/97e5de5fc43066d50230c8124432e1571783155031485358_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/sachin-ahir-hopefully-ntc-closed-mills-will-finally-restart-a-solution-can-only-be-found-through-holding-power-ekanth-shinde-shivsena-1430291</link><comments>https://marathi.abplive.com/blog/sachin-ahir-hopefully-ntc-closed-mills-will-finally-restart-a-solution-can-only-be-found-through-holding-power-ekanth-shinde-shivsena-1430291#respond</comments><pubDate>Thu, 2 Jul 2026 20:02:34 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ महेश गलांडे ]]></dc:creator><category><![CDATA[  ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/sachin-ahir-hopefully-ntc-closed-mills-will-finally-restart-a-solution-can-only-be-found-through-holding-power-ekanth-shinde-shivsena-1430291</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;सचिनभाऊंची&lt;/strong&gt; परवा विधानपरिषद &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/sachin-ahir&quot;&gt;उपसभापतीपदी (Sachin ahir)&lt;/a&gt; निवड झाली आणि 4 वर्षांपूर्वी मित्रासोबत विधिमंडळात त्यांची झालेली भेट आठवली. कारण, कोरोना लॉकडाऊनपासून बंद असलेली आमच्या &lt;strong&gt;बार्शीतील&lt;/strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/mill&quot;&gt; मिल (Mill)&lt;/a&gt; सुरू करण्यासाठी प्रयत्न करा असं मी त्यांना म्हटलं होतं, अर्थात आमच्या आमदार, खासदारांनी प्रयत्न केले होतेच. पण, सचिनभाऊ हे इंटकचे अध्यक्ष असल्याने त्यांच्यासोबतच्या भेटीत तोच महत्त्वाचा विषय वाटल्याने मी त्यांना बोललो. त्यावर, अरे बाबा तुझ्या बार्शीचंच नाही &lt;strong&gt;आम्हाला NTC च्या देशातल्या सगळ्या मिल सुरु करायच्या आहेत&lt;/strong&gt;, आमच्या मुंबईतल्यापण बंद आहेत, पण दिल्लीवाले काय मनावर घेत नाहीत, असे उत्तर त्यांनी दिले होते. आता, सचिनभाऊ पंतप्रधान मोदीजींच्या मित्र पक्षात आले आहेत, विधानपरिषद उपसभापती देखील झाले. त्यामुळे, आता त्यांच्याकडून हा प्रश्न लवकर मार्गी निघेल, देशातील 23 गिरण्यांचा भोंगा वाजेल, कामगारांना न्याय मिळेल ही गिरणीकामगाराच्या मुलाची अपेक्षा आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मुंबईसह देशातील जवळपास 23 सरकारी गिरण्या कोरोना लॉकडाऊनपासून बंद आहेत, त्या आजही बंदच आहे. 20 हजार गिरणी कामगारांचा हा प्रश्न आहे, ज्यात आमच्या बार्शीतील 400 मिल कामगारांचे संसार देखील 6 वर्षांपासून कसे सुरू आहेत, हे त्यांनाच माहिती. आता, या कामगारांच्या संघटनेचे (इंटकचे) अध्यक्ष आहेत महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर. मुख्यमंत्री देवाभाऊ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील सचिनभाऊंच्या कामगार नेतृत्वाचे कौतुक केले, सचिनभाऊ म्हणजे तळागाळातील लोकांसाठी, कामगारांसाठी काम करणारं नेतृत्व असल्याचं सभागृहात सांगितलं. त्यामुळे, साहजिकच आता उपसभापतीपदी विराजमान झाल्यानंतर सचिनभाऊंकडून 20 हजार कामगारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;बच्चू कडू, ओमराजेंसह, सचिनभाऊंचे प्रयत्न&lt;/h2&gt;
&lt;p&gt;आमदार बच्चू कडू यांनी दोन महिन्यांपूर्वी सत्ताधारी शिवसेना पक्षात प्रवेश केला, त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही ठाकरेंना सोडत सत्ता जवळ केली. आता, सचिनभाऊंनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत ते उपसभापतीपदी विराजमान झाले. मुद्दामहून आ. बच्चू कडू आणि खा. ओमराजे निंबाळकर यांचे नावं इथं लिहतोय. कारण, अचलपूर मतदारसंघात एनटीसीची फिनले मिल बंद आहे, ज्यासाठी बच्चू कडूंनी अनेकदा मंत्रालयीन स्तरावर प्रश्न उपस्थित केला, दुसरी मिल बार्शीमध्ये आहे, जिथले खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही संसदेत मिल सुरू करण्यासाठी आवाज उठवला, पण मोदी सरकारने काही ऐकलं नाही, भाऊ तुम्ही देखील 2022 मध्ये दिल्लीतील जंतरमंतरवर मिल सुरू करण्यासाठी आंदोलन केले होते, तरीही मिल काही सुरू झाल्या नाहीत, याउलट कामगारांचे पगार 10 ते 11 महिन्यांपासून थकलेले आहेत. त्यामुळे, आता आपण तिन्ही नेते एकाच पक्षात आहात, सत्ताधारी पक्षात विशिष्ट स्थानावर आहात. सत्तेत गेल्यावर प्रश्न सुटतात, विरोधात केवळ आंदोलने करावी लागतात हे सर्वजण सांगतात. त्यामुळेच, आता आंदोलनं न करता आपण सर्वांनी मिळून गिरणी कामगारांचा हा पश्न कायमचा मार्गी लावावा, काय तो सोक्षमोक्ष करुन टाकावा. म्हणजे, कधीतरी मिलचा भोंगा वाजेल या आशेवर असलेल्या गिरणीकामगारांना एकदाचे उत्तर मिळेल.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;सचिनभाऊंचंही दिल्लीत आंदोलन&lt;/h2&gt;
&lt;p&gt;सचिनभाऊ, मार्च 2022 मध्ये आपण स्वत: दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करत, केंद्र सरकारचा निषेध केला होता. या आंदोलनात देशभरातून 23 संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यानंतर, जानेवारी महिन्यात कोयंबतूर येथेही आंदोलन करण्यात आले. मात्र, महाराष्ट्राचे नेते पियुष गोयल केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री असताना देखील हा प्रश्न सुटला नाही. आता, गिरिराज सिंह हे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आहेत, आता तुम्ही त्यांच्याकडून हा प्रश्न सोडवाल ही अपेक्षा आहे, कारण तुम्ही सत्तेत पोहोचला आहात, एका महत्त्वाच्या पदावर बसला आहात, आणि हा प्रश्न मोदींजींच्या जवळ सहज पाहोचवाल एवढीच गिरणीकामगाराचा लेक म्हणून तुमच्याकडून अपेक्षा आहे. आता, आपण मुख्यमंत्री देवाभाऊं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आग्रह धरुन हा प्रश्न सोडवावा ही विनंती.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;महाराष्ट्रातील 6 मिल्स बंद, मुंबईतील तीन&lt;/h2&gt;
&lt;p&gt;मुंबईतील इंडिया युनायटेड नंबर 5, टाटा, सीताराम-पोद्दार, दिग्विजय या चार तर बार्शी टेक्स्टाईल्स मिल्स आणि अचलपूरमधील फिनले मिल्स या दोन अशा एकूण 6 गिरण्या बंद आहेत. मुंबईतील या गिरण्या मध्यवर्ती जागेत आहेत. त्यामुळे, शेकडो एकरचा परिसर या गिरण्यांनी व्यापला असून मोठी जागा केंद्र सरकारच्या ताब्यात आहेत. कदाचित या जागांमुळेच गिरण्या सुरू न करण्याचा डाव आखला जातोय की काय, अशी शंकाही उपस्थित होत आहे. या गिरण्यांमधील हजारो कामगार देखील सध्या बेरोजगार आहेत, आता अनेकांनी आपल्या रोजगाराचा पर्याय शोधलाय, तर मिल सुरु होईल, या आशेनं काहींनी जगाला कायमचा निरोप दिलाय. अनेकांनी हमाली, भाजीविक्री, रिक्षा, मजुरी, पानटपरी असे किरकोळ उद्योग सुरू केले आहेत. मात्र, मिलचा भोंगा वाजणार, या आशेवर उरला-सुरला गिरणी कामगारही संपून जात आहे.&lt;/p&gt;
&lt;blockquote class=&quot;twitter-tweet&quot; data-media-max-width=&quot;560&quot;&gt;
&lt;p dir=&quot;ltr&quot; lang=&quot;mr&quot;&gt;सदर आंदोलनात कामगारांविरोधी कायदे तसेच बंद असलेल्या मुंबईतील गिरण्या चालू करण्याबाबत व कामगारांच्या हक्काबाबत मागण्या करण्यात आल्या.&lt;br /&gt;त्यावेळी माझ्यासह सर्व गिरणी कामगार व सर्व संघाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;२/२&lt;/p&gt;
&amp;mdash; Sachin Ahir (@AhirsachinAhir) &lt;a href=&quot;https://x.com/AhirsachinAhir/status/1508843287511470080?ref_src=twsrc%5Etfw&quot;&gt;March 29, 2022&lt;/a&gt;&lt;/blockquote&gt;
&lt;p&gt;
&lt;script src=&quot;https://platform.x.com/widgets.js&quot; async=&quot;&quot; charset=&quot;utf-8&quot;&gt;&lt;/script&gt;
&lt;/p&gt;
&lt;p&gt;31 मार्च 2022 रोजी खासदार अरविंद सावंत यांनी ससंदेत हा मुद्दा उपस्थित केला होता, तेव्हा भाऊ तुम्हीच हा व्हिडिओ सोशल मीडियावरुन शेअर केला होता. आता, मुख्यमंत्री देवाभाऊ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेऊन तुम्ही हा प्रश्न मोदींजींपर्यंत पोहोचवावा आणि देशातील 20 हजार कामगारांना, तुमच्या संघटनेच्या कामगारांना न्याय द्यावा, तरच तुमचं पक्षांतर, सत्तेत जाणं सार्थकी ठरेल एवढीच अपेक्षा. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;blockquote class=&quot;twitter-tweet&quot; data-media-max-width=&quot;560&quot;&gt;
&lt;p dir=&quot;ltr&quot; lang=&quot;mr&quot;&gt;धन्यवाद मा.श्री.&lt;a href=&quot;https://x.com/AGSawant?ref_src=twsrc%5Etfw&quot;&gt;@AGSawant&lt;/a&gt; जी..!🙏&lt;br /&gt;आपण मांडलेल्या गिरणी कामगारांच्या जठील व्यथा या अत्यंत महत्वाच्या आहेत व या गिरण्या चालू होण्यासाठी आपण शेवट पर्यंत कामगारांसाठी प्रयत्न करू व संघर्षाने लढू.&lt;a href=&quot;https://x.com/ANI?ref_src=twsrc%5Etfw&quot;&gt;@ANI&lt;/a&gt; &lt;a href=&quot;https://x.com/PTI_News?ref_src=twsrc%5Etfw&quot;&gt;@PTI_News&lt;/a&gt; &lt;a href=&quot;https://x.com/ShivsenaComms?ref_src=twsrc%5Etfw&quot;&gt;@ShivsenaComms&lt;/a&gt; &lt;a href=&quot;https://t.co/fteN4Hr0Nw&quot;&gt;pic.twitter.com/fteN4Hr0Nw&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&amp;mdash; Sachin Ahir (@AhirsachinAhir) &lt;a href=&quot;https://x.com/AhirsachinAhir/status/1509439728177020931?ref_src=twsrc%5Etfw&quot;&gt;March 31, 2022&lt;/a&gt;&lt;/blockquote&gt;
&lt;p&gt;
&lt;script src=&quot;https://platform.x.com/widgets.js&quot; async=&quot;&quot; charset=&quot;utf-8&quot;&gt;&lt;/script&gt;
&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/02/3b8ccf15c8b1e885fd77f4d42b5b184517830024842821002_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Veteran Theater Director Vijaya Mehta Passed Away: नाटकवाल्यांच्या 'बाई']]></title><link>https://marathi.abplive.com/blog/veteran-theater-director-vijaya-mehta-passed-away-at-age-of-95-blog-by-vijay-salvi-1430068</link><comments>https://marathi.abplive.com/blog/veteran-theater-director-vijaya-mehta-passed-away-at-age-of-95-blog-by-vijay-salvi-1430068#respond</comments><pubDate>Wed, 1 Jul 2026 09:55:29 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ विजय साळवी, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ करमणूक ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/veteran-theater-director-vijaya-mehta-passed-away-at-age-of-95-blog-by-vijay-salvi-1430068</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;em&gt;तू काय करतोयस इथं...&lt;/em&gt; मला ओळखणाऱ्या एका व्यक्तीचा कुतुहलानं प्रश्न...&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;em&gt;तुझा काय इथं संबंध...&lt;/em&gt; माझी तिथली उपस्थिती अनपेक्षित असलेल्या व्यक्तीकडून चक्क उलटतपासणी...&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;em&gt;तुम्ही एबीपी माझावर स्पोर्टसचं अँकरिंग करता ना, मग आज नाटकवाल्यांमध्ये काय?...&lt;/em&gt; तिसऱ्या प्रश्नकर्त्याच्या सूरात पुन्हा एकदा आश्चर्य दडलेलं...&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मी नाटक-सिनेमात कधीच काम केलेलं नाही. दिग्दर्शन आणि माझा तर आजवर संबंध आलेला नाही आणि यापुढच्या काळातही तो येईल असं वाटत नाही. कारण तो माझा प्रांत नाही. पण 2014-15 साली विजया मेहता यांचं पाच दिवसांचं वर्कशॉप मी करायचं ठरवलं, त्यावेळी मला अजिबातच वाटलं नव्हतं की, आपल्या ओळखीच्या नाटकवाल्यांना त्या कृतीचं इतकं मोठं आश्चर्य वाटेल. विजयाबाईंचं ते वर्कशॉप खरं तर साऱ्यांसाठी खुल होतं. अभिनेते-अभिनेत्री, दिग्दर्शक आणि अगदी ऑब्जर्व्हर्स म्हणजे, प्रेक्षकांसाठीही. आयोजकांनी पाठवलेला अर्ज आणि वर्कशॉपसाठीचं शुल्क भरलं की, कुणीही विजयाबाईंसमोर मांडी घालून बसायला मोकळं होतं. बरं, आजच्या जमान्यात ज्यांच्या पायाशी मांडी घालून बसावं आणि मिळेल तेवढं ज्ञान पदरात पाडून घ्यावं अशी ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वं दुर्मिळ झाली आहेत. त्यामुळं विजयाबाईंचं ते वर्कशॉप ही केवळ नटमंडळी किंवा दिग्दर्शकांसाठीच नाही, तर माझ्यासारख्या नाटकांची आवड असलेल्या प्रेक्षकांसाठीही मोठी पर्वणी होती. त्यामुळं मला विजयाबाईंच्या वर्कशॉपमध्ये विद्यार्थी बनून बसावंसं वाटावं यात आश्चर्य काहीच नव्हतं.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बाईंनी बसवलेलं पुरुष, तसंच वाडा चिरेबंदीची त्रिनाट्यधारा, जब्बार पटेलांचं मूळ संचातलं घाशीराम कोतवाल, सतीश आळेकर-चंद्रकांत काळे यांचं बेगम बर्वे अशी किती तरी नाटकं मी ऐन तारुण्यात पाहिली होती. पण विक्रम गोखले आणि नाना पाटेकर यांची भाषणं आणि त्यांच्या मुलाखतींमधून बाईंच्या कर्तृत्त्वाचा झालेला उल्लेख त्यांच्याविषयी अधिक कुतूहल निर्माण करणारा होता. कळत्या वयात ते आकर्षण आणखी वाढलं. बाईंचं 'झिम्मा' वाचूनही ती भूक भागली नव्हती. 'एबीपी माझा'च्या सन्मान सोहळ्यात बाईंशी प्रत्यक्ष बोलताही आलं. पण बाई अभिनेत्यांना पैलू कसे पाडतात, ती प्रोसेस प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा कायम होती. शशी व्यास यांच्या 'पंचम निषाद'च्या वतीनं प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे अकादमीत बारा वर्षांपूर्वी आयोजित वर्कशॉपच्या निमित्तानं माझी ती इच्छा सफल झाली. पण बाईंचं ते वर्कशॉप म्हणजे, नाट्यशिक्षणं कसं असावं याचा तो निव्वळ वस्तुपाठ नव्हता, तर एखाद्याचं जगणंही समृद्ध करणारा तो अनुभव होता.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;रोज सकाळी दहाच्या ठोक्याला बाई डाव्या विंगेतून मिनी ऑडिटोरियमच्या स्टेजवर अवतीर्ण होत. वयोमानानुसार बाईंची चाल आणि त्यांच्या हालचाली संथ झाल्या होत्या. पण त्यांच्यामधली कमालीची उर्जा त्यावेळीही कायम होती. आपल्यातली ती उर्जा बाई समोरच्या माणसांमध्ये अतिशय सहजतेनं परावर्तित करत. म्हणूनच एखादा पोरसवदा अभिनेता असो किंवा वयाची साठी ओलांडलेले सशक्त अभिनेते किंवा अभिनेत्री असोत, प्रत्येकजण पाच दिवसांत अगदी 'विजयाबाई'मय झाला होता. बाईंची तुकतुकीत कांती, त्यांची प्रसन्न मुद्रा, त्यांचे रुपेरी केस, डोळ्यांना सुखावणाऱ्या रंगाची त्यांची साडी पाहिली की, साक्षात सरस्वतीमातेनंच मॉडर्न अवतारात रंगमंचावर एण्ट्री घेतल्याचा भास व्हायचा आणि कळत नकळत प्रत्येकजण खुर्चीतून उठून उभा राहायचा. मग बाईंचं, 'ए तुम्ही उठून नाही हं उभं राहायचं' असं दरडावणं ठरलेलं असायचं. पण ते दरडावणंही कानाला इतकं गोड वाटायचं की, बाईंच्या व्यक्तिमत्त्वाबाबतचं पहिलं टेन्शन तिथंच खलास व्हायचं. मग लक्षात यायचा तो बाईंचा काटेकोर स्वभाव. बाईंना त्यांची खुर्ची, त्यांचं टेबल, त्यांची पर्स, त्यांचं पेन अगदी नेमक्या जागीच लागायचं. रंगमंच आणि सभागृहामधल्या प्रकाशयोजनेवरही त्यांची सूक्ष्म नजर असायची. आपल्याला हव्या त्या गोष्टी विशिष्ट जागी दिसल्या, प्रकाशयोजना आणि साऊंड सिस्टिम मनासारखी आढळली की, 'देवीजी' प्रसन्न होऊन आपल्या खुर्चीत आसनस्थ होत. आणि मग वर्कशॉपच्या नावानं सुरू होई तो माणूस घडवण्याचा प्रवास.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बाईंना त्यांना हवी असलेली एखादी गोष्ट वेळेवर आणि पाहिजे त्या जागी सापडली नाही की, खूप गंमत येई. 'ए माझं पेन कुठेय? तुमचं लक्ष नाही हं माझ्याकडे' अशी लडिवाळ तक्रार करून बाई पुन्हा आपल्या मुद्यावर येत. बाईंच्या तक्रारीचा तो सूरही कानाला इतका गोड लागायचा की, कुणीही त्यांच्या प्रेमात पडावं. त्याच प्रेमातून कुणाला बाईंमध्ये आपल्या आईचा, तर कुणाला आजीचा भास झाला. तसं त्यांनी समारोप सोहळ्यात बोलून दाखवलं. पण मला बाईंमध्ये दिसल्या होत्या त्या शिशुवर्गातल्या आपल्या शिक्षिका किंवा आजच्या भाषेत सांगायचं तर माँटेसरीच्या टिचर. समोरची मुलं दंगा घालणार, त्यांचं आपल्याकडं अधूनमधून लक्ष नसणार हे ध्यानात ठेवून, शिशुवर्गाच्या शिक्षिका कशा त्या चिमुरड्यांच्या कलांनी घेतात, त्यांच्याशी कशा एकरुप होतात; तशाच विजयाबाईही वर्कशॉपमधल्या लहानथोरांशी बोलताना मूलात मूल होऊन बोलायच्या. त्यामुळं त्यांच्या विद्वतेचं कधी दडपण आलं नाही. समोरच्याच खुर्चीतला एक युवा रंगकर्मी चक्क च्युईंगम चघळत असल्याचं आढळल्यावरही बाईंच्या रागाचा पारा चढला नाही. कदाचित बाईंच्या लडिवाळ तक्रारीचा परिणामच इतका उत्तम असतो की, त्यांना आयुष्यात कधी आवाज चढवायची गरज भासली नसावी. 'ए, मी मघाचपासून बघतेय हं, हा किनई च्युईंगम खातोय&amp;rsquo;, या बाईंच्या लडिवाळ उद्गारांवर सभागृहात पिकलेला हशा विरायच्या आत, त्या युवा रंगकर्मीनं शरमेनं ते च्युईंगम चक्क गिळलेलं होतं. आणि तसं त्यानं लागलीच जाहीरही करून टाकलं.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;विजयाबाईंचा मूळचा बोलघेवडा आणि गोष्टीवेल्हाळ स्वभाव त्यांच्या वर्कशॉपदरम्यान अनेकदा उफाळून येई. सरावाच्या नसलेल्या माणसांची नावं बाईंना त्यावेळी लक्षात राहात नव्हती. म्हणून मुलांना बाबू आणि मुलींना बाबी किंवा बेब संबोधण्याचा सोयीस्कर पर्याय त्यांनी स्वीकारला होता. वैभव तत्त्ववादीला त्याच्याच सुचनेनुसार आतंकवादी, भूषण प्रधानला &amp;lsquo;ए सीकेपी&amp;rsquo; किंवा मनवा नाईकला सुचेल त्या नावानं त्या बोलवायच्या. एरवी मात्र विजयाबाईंची स्मरणशक्ती दांडगी होती. एखादा विषय समजावून देताना जुन्या नटांचे, नाटकांचे कितीतरी किस्से त्यांच्या ओठांवर सहज येत. आणि मग ते किस्से रंगवून सांगताना बाई त्यात इतक्या रमून जायच्या की, कुणालाही वेळेचं भान उरायचं नाही. पण वेळेचं भान आलं की, पुन्हा डोकावायचा तो बाईंचा लडिवाळपणा... ए, मी खूप बोलते का, असा प्रश्न करत बाई पुन्हा मूळ मुद्यावर यायच्या. पण तोवर समोरचा विद्यार्थी हा ब्रेख्त, बारो, स्टेनिस्लावस्की, पीटर ब्रुक, फ्रिट्झ बेनेव्हिट्झ यांच्यापासून मास्टर दत्ताराम, गिरीश कर्नाड, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी आदी नाट्यप्रतिभावंताच्या प्रतिमांमध्ये गुंग झालेला असायचा. बाईंनी बोलण्याच्या ओघात काही दिग्गजांशी झालेल्या आपल्या वादांची, मग त्यांनी धरलेल्या अबोल्यांचीही कबुली दिली. पण पाच दिवसांत त्यांनी एकदाही कुणावर कटू शेरेबाजी केली नाही. विक्रम गोखले, अशोक सराफ, नाना पाटेकर, रवींद्र मंकणी, भारती आचरेकर, सुकन्या कुलकर्णी-मोने यांच्यासारख्या आजच्या पिढीलाही परिचीत अशा नटाविषयी किंवा नटीविषयी चांगली कमेंट केली, की बाईंचा आग्रह भलताच लडिवाळ व्हायचा... 'ए, त्याला सांगू नका हं मी त्याच्याविषयी चांगलं बोलली म्हणून...' बाईंनी कौतुक केलेली ही नटमंडळी त्यावेळी चक्क साठीपासष्ठीच्या अल्याड किंवा पल्याड उभी होती, पण आपल्या कौतुकानं तो किंवा ती फार शेफारून जाऊ नयेत, एवढीच मातृत्त्वसुलभ भीती त्यांच्या लडिवाळ आग्रहापाठी असायची.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बाईंच्या तक्रारी किंवा त्यांच्या आग्रहाइतकीच त्यांची टीकाही भलतीच लोभसवाणी वाटायची. नव्या संचात उभी राहिलेली जुनी नाटकं त्यांना फारशी भावली नव्हती. 'ए, मला नाही आवडलं हं ते' या शब्दांमध्ये त्यांनी आपल्या मनातली ती खंत व्यक्त केली होती. टेलिव्हिजन सीरियल्समधल्या स्त्रिया धडोतीची लुगडी का नेसत नाहीत, त्या घरात इतके दागिने का घालतात, त्या लिपस्टिक लावून चपात्या का लाटतात, सीरीयल्स चकचकीत वस्तूंमध्ये हरवल्या आहेत का, असे प्रश्न त्यांनी नव्या पिढीच्या कलाकारांना विचारले. बाईंच्या त्या शंकांचे काहींनी आपापल्या परीनं निरसन करण्याचा प्रयत्न केला होता. 'बाई, एखाद्या निर्मात्यानं तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं पायलट एपिसोड्स शूट केले ना तर ती सीरियल पासच होत नाही. त्यामुळं आमच्याइतकीच तुमच्या मार्गदर्शनाची गरज ही विविध चॅनेल्समधल्या कार्यकारी निर्मात्यांना आहे.&amp;rsquo; टेलिव्हिजन सीरियल्समधल्या कलाकारांना वेळेत स्क्रीप्ट्स मिळत नाहीत आणि त्यामुळं त्यांच्या तालमीच होत नाहीत, या बाईंच्या तक्रारीवर नाना पाटेकरांनी नव्या पिढीची वकिली केली होती. नाना म्हणाले होते, 'बाई, ते या काळाचंच दुर्दैव आहे. म्हणून मी सीरियल्स करत नाही, पण चित्रपटांच्या दुनियेतही हीच बोंब आहे. माझा एकंदर स्वभाव लक्षात घेता मला वेळेत स्क्रीप्ट मिळेल याची दक्षता घेतली जाते.&amp;rsquo; विजयाबाईंचं मोठेपण म्हणजे त्यांनी आपल्या शिष्योत्तमांनी घेतलेला मोठा घासही अगदी सहज स्वीकारला होता. मोठी माणसं ही मोठी का असतात याचं विजयाबाई या आदर्श उदाहरण होत्या.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;विजयाबाई आपल्या वर्कशॉपमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही विषयांवर अगदी भरभरून आणि तळमळीनं बोलल्या होत्या. पाच दिवसांमधल्या साधारण वीसेक तासांत समोरच्यांना जितकं देता येईल, तितकं त्यांनी दिलं. समोरून कितीही असबंध प्रश्न आला तरी त्याचं सविस्तर उत्तर देऊन बाईंनी त्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचं समाधान होईल, हे कटाक्षानं पाहिलं. त्यावेळी त्या साधारण 80 वर्षांच्या होत्या. पण वयाच्या 80 व्या वर्षी विजयाबाईंइतका संयम, त्यांच्याइतकी उर्जा आपल्यापैकी कितीजण दाखवू शकतील, ही शंकाच आहे. म्हणूनच त्यांनी वर्कशॉपमध्ये दिलेला सल्ला किंवा त्यांनी गिरवून घेतलेला धडा हा अनेकांपर्यंत पोहोचावा हाच लेखाचा मूळ उद्देश आहे. बाईंचा तो सल्ला फक्त नाटकवाल्यांपुरता मर्यादित नाही, कोणत्याही क्षेत्रातल्या व्यक्तीनं आत्मसात करावा असा आहे. बाई म्हणाल्या होत्या की, आपण प्रत्येकजण कळत नकळत अभिनय करत असतो. पण आपल्याला आयुष्यात रॉबर्ट डी निरो बनायचं आहे की, एखाद्या सार्वजनिक उत्सवात कला सादर करून समाधान मानायचं आहे, हे ज्याचं त्यानं ठरवावं. सार्वजनिक उत्सवातून कर्णकर्कश संगीत वाजवून ऑर्केस्ट्रा सादर करण्यात येतो. पण त्याच वेळी एखादा कुमार गंधर्व जीवनाचा नवा अनुभव देत अभिजात संगीत निर्माण करत असतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;विजयाबाईंच्या दृष्टीनं प्रशिक्षणाचं महत्त्व खूप मोठं होतं. ते ठासून सांगताना त्या म्हणाल्या होत्या, 'प्रशिक्षण दिलं जात नाही. ते घ्यावं लागतं. प्रशिक्षण खिरापतीसारखं दिलं गेलं असतं तर एनएसडीतले सारे विद्यार्थी नसिरुद्दिन शाह झाले असते. पण तसं होत नाही. कारण तुम्ही किती घेता यावर ते अवलंबून असतं. म्हणूनच प्रशिक्षणाचं महत्त्व लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही आयुष्यभर प्रशिक्षण घेत राहता. शोध घेत राहता. तो शोध संपला की तुमच्यातली कलाही संपते.&amp;rsquo; विजयाबाईंनी वर्कशॉपच्या पहिल्याच दिवशी होतकरू कलाकारांना धोक्याचाही इशारा दिला होता. त्या म्हणाल्या होत्या, 'अभिनयाला टाळी लवकर मिळते. पण टाळी मिळते म्हणून प्रवास संपवू नका.' आधी अनुभूती आणि मग अभिव्यक्ती हे स्टेनिस्लावस्कीचं सूत्र सांगून त्या सांगितलं की, 'तुमच्यातल्या कलेवर प्रेम करा, पण स्वत:वर प्रेम करायचं टाळा. स्वत:च्या प्रेमात पडणारी माणसं त्यातच मुकी, बहिरी आणि आंधळी होतात. आणि तिथंच तुमचा शेवट होतो.'&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;विजयाबाईंचे ते शब्द खरं तर रंगकर्मींसाठी होते तरी त्या शब्दांमधून शहाणपण कुणी घ्यायचं याला मर्यादा नाहीत. त्या शब्दांमधून तुम्हीआम्हीही आयुष्यात खूप काही शिकण्यासारखं आहे. विजय तेंडुलकरांनी आपल्यापेक्षा सहा वर्षांनी लहान असलेल्या, एकवीस वर्षांच्या विजया जयवंत म्हणजे विजया मेहतांना 'बाई' म्हणून संबोधायचं फर्मान काढलं होतं, ते किती योग्य होतं यावर पुढच्या काळात वारंवार शिक्कामोर्तब होत राहिलं. विजया मेहतांचं बारा वर्षांपूर्वीचं वर्कशॉपही त्याला अपवाद नव्हतं.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/01/46428a11f47377c463acfac7714e7fd5178288038463488_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[विरहाच्या धगीवर “आभाळाचा अभिषेक”...]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/smiles-of-joy-on-farmers-faces-as-the-delayed-monsoon-rains-finally-begin-in-maharashtra-1429829</link><comments>https://marathi.abplive.com/blog/smiles-of-joy-on-farmers-faces-as-the-delayed-monsoon-rains-finally-begin-in-maharashtra-1429829#respond</comments><pubDate>Mon, 29 Jun 2026 11:53:11 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ गणेश लटके ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/smiles-of-joy-on-farmers-faces-as-the-delayed-monsoon-rains-finally-begin-in-maharashtra-1429829</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गेल्या महिन्याभरापासून शेतकरी चातकासारखे आभाळाकडं डोळं लावून बसले होते. नदी नाले आटले होते, बोर विहीरी कोरड्या पडल्या होत्या. पाखराला पाणी प्यावं म्हटलं तरी नदीत पाणी नव्हतं. एका बाजूला शेतकऱ्यांची उभी पिकं जळत होती. तर दुसरीडं हे बघून शेतकऱ्यांचं काळीज पिळवटून निघत होतं. गेल्या मोसमात ज्या सीनाकाठाने भयंकर महापूर पाहिला, तोच भाग आता पाण्यावाचून भाजत होता.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आज पडेल, उद्या पडेल असं म्हणत म्हणत, जून महिना पूरा लोटला तरी पाऊस काय पडला नाही. आकाशात काळं ढग यायचं, तस तशी बळीराजाला आतुरता वाटायची. पण जस जसा ढग यायचं तस तसा वाऱ्यासंग पुढं निघून जायचा. एवढा पाऊस कधीच दगा देत नव्हता, पण यावर्षी काय असं झालं? अशी म्हतारी कोतारी माणसं म्हणायची. महिन्याभरापासून हा दिनक्रम सुरुच होता. सगळ्या हवामान तज्ञांनी, अभ्यासकांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस बरसेल असं सांगतिलं, पण 27 तारीख लोटली तरी काय पावसानं तोडं दाखवलं नाही.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पावसावाचून भुई भेगाळली होती. हिरव्यागार पिकाला पाण्यावाचून सोन्याची चमक येऊ लागली होती. जसं जसं उन्हानं धान चमकायचं, तसं तसं बळीराजाच्या पोटात आग पडायची. लवकर पडला तर बरं नाहीतर टिचभर पोटाचं खळगं भऱायचं कसं? पोरा बाळांना शिकवायचं कसं? म्हतारा म्हातारीचं दुखणं करायचं कसं? सावकाराचं, बँकेचं घेतलंलं कर्ज फेडायचं कसं? गुरं ढोरांना &amp;nbsp;टाकायचं काय? पाऊस पडला नाही आणि माणसचं जगली नाहीत तर गुर ढोरं तरी कशी जगायची? असं एक ना 100 प्रश्नांचं काहूर त्याच्या डोक्यात माजलं होतं. पावसाच्या वादळापेक्षा मनातलं वादळ अधिक चिंतेचं आणि भयाचं होतं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पण 28 तारखेला उजाडलेला दिवस शेतकऱ्यांच्या करपत चाललेल्या पिकाला पुन्हा पालवी फोडणारा ठरला. सकाळचा प्रहर गेला. दुपारचा प्रहर सुरु झाला. काम करणाऱ्या माणसांनी भाकरी खाऊन झाडाखाली सावलीला भूईवर पाट टाकली. जरा डुलकी लागती ना लागती तोवर आभाळ भरुन आलं. थंडगार वाऱ्याची झुळुक आली. जशी थंड वाऱ्याची झुळुक आली तसा अंगावर काटा उभारला. आज पाऊस येणार याची खात्री झाली. झाडाखाली लवडंलेली सगळी माणसं उठून बसली. आता पाऊस येणार हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नव्हती. एखाद्या सणा सुदीला बाई जशी नटून थटून बाहेर पडते, तसं आज निळ्याशार आकाशाला काळ्याकुट्ट ढगांनी अलंकार चढवला होता.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पावसाचा दागिना आता माझ्या पदरात पडणार या आशेनं झाडाखालचा बळीराजा वर बघत होता. अखेर चार दोन थेंब त्याच्या अंगावर पडले, तशा त्याच्या डोळ्याचा कडा पाणावल्या. त्यानं डोळे झाकले, ज्याची अतुरता होती तेच झालं, पावसाला सुरुवात झाली. नभानं भुईला दान दिलं. अत्तराला लाजवेल असा मातीचा सुंगध आला. त्या सुगंधाने बळीराजाचं अंतकरण प्रसन्न झालं.पावसाचा जोर जस जसा वाढत होता तसं तसा त्याचा आनंद वाढत होता. तासाभरात पावसानं सगळीकडं पाणीचं पाणी केलं. आता वाचलो... आता जगलो.... आणखी थोडा जर उशीर केला असता तर माझं काय खरं नव्हतं... असं म्हणत म्हणत त्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं, पण आलेलं पाणी दिसलं नाही, अंगावर पडलेल्या पावसात एकरुप झालं.&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/06/29/b238604eff4b5a90efaa4f83940307a01782713895996736_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[विरहाच्या धगीवर “आभाळाचा अभिषेक”...]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/smiles-of-joy-on-farmers-faces-as-the-delayed-monsoon-rains-finally-begin-in-maharashtra-1429830</link><comments>https://marathi.abplive.com/blog/smiles-of-joy-on-farmers-faces-as-the-delayed-monsoon-rains-finally-begin-in-maharashtra-1429830#respond</comments><pubDate>Mon, 29 Jun 2026 11:53:11 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ गणेश लटके ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/smiles-of-joy-on-farmers-faces-as-the-delayed-monsoon-rains-finally-begin-in-maharashtra-1429830</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गेल्या महिन्याभरापासून शेतकरी चातकासारखे आभाळाकडं डोळं लावून बसले होते. नदी नाले आटले होते, बोर विहीरी कोरड्या पडल्या होत्या. पाखराला पाणी प्यावं म्हटलं तरी नदीत पाणी नव्हतं. एका बाजूला शेतकऱ्यांची उभी पिकं जळत होती. तर दुसरीडं हे बघून शेतकऱ्यांचं काळीज पिळवटून निघत होतं. गेल्या मोसमात ज्या सीनाकाठाने भयंकर महापूर पाहिला, तोच भाग आता पाण्यावाचून भाजत होता.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आज पडेल, उद्या पडेल असं म्हणत म्हणत, जून महिना पूरा लोटला तरी पाऊस काय पडला नाही. आकाशात काळं ढग यायचं, तस तशी बळीराजाला आतुरता वाटायची. पण जस जसा ढग यायचं तस तसा वाऱ्यासंग पुढं निघून जायचा. एवढा पाऊस कधीच दगा देत नव्हता, पण यावर्षी काय असं झालं? अशी म्हतारी कोतारी माणसं म्हणायची. महिन्याभरापासून हा दिनक्रम सुरुच होता. सगळ्या हवामान तज्ञांनी, अभ्यासकांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस बरसेल असं सांगतिलं, पण 27 तारीख लोटली तरी काय पावसानं तोडं दाखवलं नाही.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पावसावाचून भुई भेगाळली होती. हिरव्यागार पिकाला पाण्यावाचून सोन्याची चमक येऊ लागली होती. जसं जसं उन्हानं धान चमकायचं, तसं तसं बळीराजाच्या पोटात आग पडायची. लवकर पडला तर बरं नाहीतर टिचभर पोटाचं खळगं भऱायचं कसं? पोरा बाळांना शिकवायचं कसं? म्हतारा म्हातारीचं दुखणं करायचं कसं? सावकाराचं, बँकेचं घेतलंलं कर्ज फेडायचं कसं? गुरं ढोरांना &amp;nbsp;टाकायचं काय? पाऊस पडला नाही आणि माणसचं जगली नाहीत तर गुर ढोरं तरी कशी जगायची? असं एक ना 100 प्रश्नांचं काहूर त्याच्या डोक्यात माजलं होतं. पावसाच्या वादळापेक्षा मनातलं वादळ अधिक चिंतेचं आणि भयाचं होतं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पण 28 तारखेला उजाडलेला दिवस शेतकऱ्यांच्या करपत चाललेल्या पिकाला पुन्हा पालवी फोडणारा ठरला. सकाळचा प्रहर गेला. दुपारचा प्रहर सुरु झाला. काम करणाऱ्या माणसांनी भाकरी खाऊन झाडाखाली सावलीला भूईवर पाट टाकली. जरा डुलकी लागती ना लागती तोवर आभाळ भरुन आलं. थंडगार वाऱ्याची झुळुक आली. जशी थंड वाऱ्याची झुळुक आली तसा अंगावर काटा उभारला. आज पाऊस येणार याची खात्री झाली. झाडाखाली लवडंलेली सगळी माणसं उठून बसली. आता पाऊस येणार हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नव्हती. एखाद्या सणा सुदीला बाई जशी नटून थटून बाहेर पडते, तसं आज निळ्याशार आकाशाला काळ्याकुट्ट ढगांनी अलंकार चढवला होता.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पावसाचा दागिना आता माझ्या पदरात पडणार या आशेनं झाडाखालचा बळीराजा वर बघत होता. अखेर चार दोन थेंब त्याच्या अंगावर पडले, तशा त्याच्या डोळ्याचा कडा पाणावल्या. त्यानं डोळे झाकले, ज्याची अतुरता होती तेच झालं, पावसाला सुरुवात झाली. नभानं भुईला दान दिलं. अत्तराला लाजवेल असा मातीचा सुंगध आला. त्या सुगंधाने बळीराजाचं अंतकरण प्रसन्न झालं.पावसाचा जोर जस जसा वाढत होता तसं तसा त्याचा आनंद वाढत होता. तासाभरात पावसानं सगळीकडं पाणीचं पाणी केलं. आता वाचलो... आता जगलो.... आणखी थोडा जर उशीर केला असता तर माझं काय खरं नव्हतं... असं म्हणत म्हणत त्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं, पण आलेलं पाणी दिसलं नाही, अंगावर पडलेल्या पावसात एकरुप झालं.&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/06/29/b238604eff4b5a90efaa4f83940307a01782713895996736_original.jpeg" width="220"/></item></channel></rss>