Vastu Tips : कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का की, काही गोष्टी चुकून तुमच्या हातातून पडल्यास, त्या तुम्ही फक्त योगायोग समजून सोडून दिल्या आहेत. रोजच्या जीवनात अशा घटना साध्या वाटू लागतात. पण, वास्तूशास्त्राच्या मते प्रत्येक घटनेच्या मागे भविष्याचा काही ना काही संकेत असतो. विशेषत: काही खास गोष्टी हातातून पडल्यास सामान्य मानलं जात नाही. या कारणासाठी येणार्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तर जाणून घेऊयात, अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत.
1. हातातून मीठ पडणे
वास्तुशास्त्रानुसार, हातातून मीठ सारखं सारखं पडल्यास अशुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्राच्या मते मीठाचा संबंध थेट शुक्र आणि चंद्राशी जोडण्यात आला आहे. असं म्हणतात की, हातातून मीठ पडल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. यामुळे आर्थिक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. शिवाय, हे परस्पर संबंधामधील कटुता देखील दर्शवते.
2. पूजेचा दिवा किंवा पूजेचे ताट खाली पडणे
पूजेदरम्यान जर चुकूनही तुमच्या हातातून दिवा किंवा पूजेचे ताट निसटले, तर ती नकारात्मक ऊर्जा मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, देव तुमच्यावर नाराज असण्याचं हे एक लक्षण असू शकतं. किंवा जवळच्या काळात एखाद्या मोठ्या धार्मिक विधीमध्ये किंवा समारंभात अडथळे येऊ शकतात.
3. दूध उतू जाणं किंवा हातातून सांडणे
दुधाचा सबंध थेट चंद्र आणि देवी लक्ष्मीशी जोडण्यात आला आहे. स्वयंपाकघरात काम करताना जर दूध उतू गेल्यास किंवा हातातून पडल्यास, खरंतर शुभ मानलं जात नाही. वास्तूशास्त्राच्या मते, यामुळे घराची मानसिक शांती, वाद आणि धनसंपत्तीचे संकेत देतात.
4. हातातून जमिनीवर तेल सांडणे
हातातून जमिनीवर कोणतेही तेल सांडणे अशुभ मानले जाते. ज्योतिष शास्त्राच्या मते, तेलाचा संबंध शनिदेव आणि राहु-केतुशी जोडण्यात आला आहे. तेल सांडल्यामुळे आपल्या आयुष्यात शनि-राहूचा अशुभ प्रभाव वाढू शकतो. यामुळे तुम्हाला कायदेशीर प्रकरण, अपघात किंवा मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.
5. काचेची भांडी फुटणे किंवा हातातून खाली पडणे
हातातून काचेचा ग्लास, वाटी आणि प्लेटचं तुटणं अशुभ संकेत मानले जाते. काचेचा संबंध थेट राहु ग्रहाला जोडलेला असतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
