Surya Grahan 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर महिना अत्यंत खास असणार आहे. कारण या महिन्यात 2 ग्रहण होणार आहेत. सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू झालाय. या काळात ही ग्रहणं लागणार आहेत. नुकतेच 7 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण झाले. आता प्रतीक्षा आहे ती 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाची. ज्योतिषींच्या मते, 15 दिवसांत दोन ग्रहणे होत असल्याने काही राशींना मोठे नुकसान होणार आहे. जाणून घ्या त्या राशींबद्दल...

15 दिवसांत दोन ग्रहणे, कोणत्या राशींना होणार नुकसान?

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहण 21 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11 ते पहाटे 3:23 पर्यंत राहील. जरी ते भारतात दिसणार नाही, परंतु त्याचा परिणाम राशींवर दिसून येईल. सूर्यग्रहण तेव्हा होते जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जातो. चंद्रग्रहण तेव्हा होते जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते. 7 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण आणि 21 सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण. ज्योतिषींच्या मते, 15 दिवसांत दोन ग्रहणे झाल्यास काही राशींना मोठे नुकसान होते.

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार, 15 दिवसांत दोन ग्रहणे शुभ मानली जात नाहीत. अशा परिस्थितीत वृषभ राशीच्या लोकांचा खर्च वाढेल. काळजी घ्या. करिअरमध्ये आव्हाने वाढतील. सध्या राहू तुमच्या चौथ्या घराकडे पाहत आहे. यामुळे तुम्ही दुःखी होऊ शकता. गुंतवणूक करणे टाळा.

सिंह

ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र आणि सूर्यग्रहणाच्या अशुभ परिणामांमुळे तुम्हाला पैशाच्या बाबतीत त्रास होऊ शकतो. मालमत्तेशी संबंधित नुकसान होईल. कुटुंबाशी तणाव निर्माण होईल. वडिलांसोबतच्या नात्यात दुरावा येऊ शकतो.

कर्क

ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबरपासून पुढील 90 दिवसांपर्यंत ऑनलाइन गुंतवणूक टाळा. पैशाचा गैरवापर तुम्हाला कर्जात बुडवू शकतो. विनाकारण कोणत्याही वादात पडू नका, तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मिथुन

ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबरमध्ये चंद्र आणि सूर्यग्रहणामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. आईशी वाद होऊ शकतो, जिभेवर नियंत्रण ठेवा, कामाचा दबाव वाढेल. बाजारात पैसे अडकू शकतात. काळजीपूर्वक विचार केल्यानंतर विश्वास ठेवा.

हेही वाचा :           

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी सप्टेंबरचा तिसरा आठवडा नशीब पालटणारा! तुमच्यासाठी कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)