Shukra Gochar 2026 : 2 मार्चपासून मीन राशीत शुक्राचा जुळून येतोय 'मालव्य राजयोग'; 'या' 3 राशींना मिळणार पैसा, प्रसिद्धी आणि सुख-शांती
Shukra Gochar 2026 : द्रिक पंचांगानुसार, शुक्र ग्रह जवळपास 26 दिवसांनी राशी परिवर्तन करतात. शुक्र आता कुंभ राशीत विराजमान आहे.

Shukra Gochar 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रहाला (Shukra Gochar) धनसंपत्ती, प्रेम, विवाह आणि सुख सुविधांचा कारक ग्रह मानतात. असं म्हणतात की ज्या लोकांच्या कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत असते अशा लोकांना भौतिक सुख-समृद्धीचा लाभ घेता येतो. त्यांची आर्थिक स्थिती चांगली असते. त्यामुळेच शुक्राच्या संक्रमणाचा सर्व 12 राशींवर (Zodiac Signs) परिणाम पाहायला मिळतो.
द्रिक पंचांगानुसार, शुक्र ग्रह जवळपास 26 दिवसांनी राशी परिवर्तन करतात. शुक्र आता कुंभ राशीत विराजमान आहे. 2 मार्च रोजी दुपारी 1 वाजून 1 मिनिटांनी शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 26 मार्चपर्यंत तो याच राशीत स्थित असणार आहे. या दरम्यान शुक्र मालव्य राजयोग म्हणजेच लक्ष्मी योग निर्माण करणार आहे.
कसा जुळून येतो लक्ष्मी योग?
ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा शुक्र ग्रह आपल्या उच्च म्हणजेच मीन राशीत वृषभ आणि तूळ राशीत स्थित असतात तेव्हा लक्ष्मी योग निर्माण होतो. याचा कोणकोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी हा योग फार फायदेशीर मानला जातो. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, तुमची रखडलेली कामे पूर्ण करता येतील. नोकरीत प्रगतीचे संकेत आहे. तुमचं प्रमोशन होऊ शकतं. किंवा पगार वाढू शकतो. तसेच, व्यवसायिकांसाठी देखील हा काळ चांगला असणार आहे. प्रेम तसेच, वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल घडून येतील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. या कालावधीत तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, तुमच्यातील लीडरशिप क्वालिटी दिसून येईल. तुमच्यावर मोठी जबाबदारी पडू शकते. तसेच, मुलांच्या अभ्यासात चांगलं मन रमेल. व्यवसायिकांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. तुम्हाला परदेशात जाण्याची देखील संधी मिळू शकते.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांना या काळात अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, संपत्तीचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल. घरातील वातावरण आनंदी असल्यामुळे सकारात्मक गोष्टी घडतील. जे लोक अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव देखील येऊ शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















