Shani 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचं वेळोवेळी संक्रमण होत असतं आणि अशा वेळी कधी ते इतर ग्रहांवर शुभ दृष्टी टाकतात, तर कधी अशुभ, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर तसेच देश आणि जगावर दिसून येतो. यातच आता 16 सप्टेंबरला ग्रहांचा राजा सूर्य (Sun) याने कन्या राशीत प्रवेश केला आहे आणि तो शनीवर (Shani) शुभ दृष्टी ठेवेल. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतं. या लोकांना करिअर आणि व्यवसायात चांगले परिणाम पाहायला मिळतील. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मिथुन रास (Gemini)


शनीवर सूर्याची शुभ दृष्टी तुमच्यासाठी लाभाची ठरू शकते. या काळात तुमचं आयुष्य खूप आनंदी होईल. व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तुमचं एखादं प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतं. तसेच, तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच, या काळात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सर्व कामात तुम्हाला यश मिळू लागेल.  यावेळी तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती दोन्ही मिळेल. 


कर्क रास (Cancer)


शनीवर सूर्यदेवाची दृष्टी तुमच्यासाठी शुभ ठरेल. तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावर बरंच काही साध्य करण्यात यशस्वी व्हाल. या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात चांगलं यश मिळेल. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या कामाचं वरिष्ठांकडून कौतुक होईल. या कालावधीत आपल्याला चांगला आर्थिक नफा मिळेल. जर तुमच्यावर काही कर्ज असेल तर तुम्ही ते या कालावधीत सेटल करू शकता. 


मीन रास (Pisces)


शनीवर शुभ दृष्टी पडल्यामुळे मीन राशीला सुखाचे दिवस येतील. नोकरी-व्यवसायात तुम्हाला अपेक्षित लाभ मिळेल. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभाच्या संधी प्राप्त होतील. तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळू शकतं. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रचंड यश मिळेल. तुमचं मन प्रसन्न आणि समाधानी राहणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही मोठं यश मिळवू शकता. तसेच गुंतवणुकीतून नफाही मिळेल. कौटुंबिक वातावरण सुखाचं असेल आणि सर्व अडीअडचणी संपतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Gochar : शनीने राशी बदलताच 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू; नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार, सर्व चिंता मिटणार