Shani Ast 2026 : होळीनंतर शनिदेवाचा अस्त! तब्बल 30 वर्षांनंतर 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरु; राजासारखं ऐटीत जगाल आयुष्य
Shani Ast 2026 : 13 मार्च 2026 रोजी शनि मीन राशीत अस्त होणार आहे. 13 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी शनि मीन राशीत अस्त होणार आहे. यामुळे काही राशींच्या जीवनात महत्त्वाचे बदल दिसून येतील.

Shani Ast 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनि (Shani Ast 2026) जेव्हा आपल्या चालीत बदल करतात तेव्हा त्याचा थेट परिणाम सर्व 12 राशींवर होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, शनिला कर्मफळदाता, न्यायदेवता म्हणतात. यामध्ये तब्बल 30 वर्षांनंतर शनि (Shani Dev) मीन राशीत अस्त होणार आहे. होळीच्या नंतर 13 मार्च 2026 रोजी शनि मीन राशीत अस्त होणार आहे. 13 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी शनि मीन राशीत अस्त होणार आहे. यामुळे काही राशींच्या जीवनात महत्त्वाचे बदल दिसून येतील.
शनिच्या अस्ताने 'या' राशींवर होणार शुभ परिणाम
ज्योतिष शास्त्रानुसार, 13 मार्च रोजी होणाऱ्या शनिच्या अस्ताचा परिणाम सर्व 12 राशींवर दिसून येतो. तर, शनिच्या अस्तामुळे कोणकोणत्या राशींना शुभ परिणाम मिळतील हे जाणून घेऊयात.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांवर शनिच्या अस्ताचा शुभ तसेच, सकारात्मक परिणाम होणार आहे. या काळात तुमच्या भौतिक सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमची अनेक रखडलेली कार्य तुम्हाला पूर्ण करता येतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. पैशांच्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळेल. तसेच, या कालावधीत कोणालाही पैसे उधार देऊ नका. तुम्हाला ते परत मिळतीलच याबाबत काही सांगता येत नाही. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शनिच्या अस्ताने कुंभ राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या काळात अचानक धनलाभाचे योग जुळून येणार आहेत. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. मार्केटिंगच्या क्षेत्राशी संबंधित तुम्हाला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला याच महिन्यात मिळेल. मार्चचा महिना सुरु होणार असल्यामुळे अनेक नवीन गोष्टींचा शुभारंभ तुम्ही करु शकता.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीत शनि अस्त होणार आहे. त्यामुळे शनिच्या अस्ताचा मीन राशीवर शुभ प्रभाव दिसून येईल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. नवीन गोष्टी तुम्ही आत्मसात कराल. तसेच, समाजात मान-सन्मान टिकून राहील. तसेच, या कालावधीत तुम्ही एखाद्या नवीन कार्याची देखील सुरुवात करु शकता.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















