Numerology: संपत्ती प्रचंड, पण मानसिक शांती नाही! 'या' जन्मतारखेचे लोक मोठं यश मिळवूनही एकटं राहण्याची वेळ? राहूचे मोठे वर्चस्व, अंकशास्त्र...
Numerology: अंकशास्त्रानुसार, आज आपण अशा जन्मतारखेच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, जे यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही एकटे राहतात. प्रचंड संपत्ती असूनही त्यांना शांती मिळत नाही.

Numerology: आजकालच्या जगात सर्वांनाच श्रीमंत व्हायचंय. त्यासाठी अनेक जण पैसा कमवण्याच्या शर्यतीत धावू लागले आहेत. पण पैशानेच सारं सुख विकत घेता येतं का? तर काही जणांचं उत्तर कदाचित हो... तर काहीचं नाही असेल...या जगात आजकाल बरेच जण खूप पैसा कमवतात. पण त्याबदल्यात अनेकांना मानसिक शांतीच मिळत नाही. त्यांना सुखाची झोपही लागत नाही, अंकशास्त्रानुसार, आज आपण अशा जन्मतारखेच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, जे यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही एकटे राहतात. प्रचंड संपत्ती असूनही त्यांना शांती मिळत नाही...तुमची जन्मतारीख कोणती? जाणून घ्या...
संपत्ती, प्रसिद्धी असूनही 'या' जन्मतारखेच्या लोकांना शांती मिळत नाही....(Numerology)
अंकशास्त्रानुसार पाहायला गेलं तर, काही विशिष्ट जन्मतारीख असलेले लोक सहजपणे यशाच्या शिखरावर पोहोचतात, परंतु संपत्ती आणि प्रसिद्धी असूनही त्यांना शांती मिळत नाही. ते पूर्णपणे एकटे पडतात. अंक ज्योतिषनुसार तुम्ही एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊ शकता. आज आपण अशा जन्मतारीख किंवा मूलांकाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांच्या नशिबात मोठे यश लिहिलेले असते, पण तरीही त्यांना शांती मिळत नाही.
'या' लोकांवर राहूचा सर्वाधिक प्रभाव...
अंकशास्त्रानुसार ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13 किंवा 22 तारखेला झाला असेल, त्या लोकांचा मूलांक 4 असतो. या लोकांवर राहूचा सर्वाधिक प्रभाव असतो. अंक 4 असलेले लोक व्यावहारिक आणि शिस्तप्रिय असतात. ते स्वप्नांवर नाही, तर वास्तवावर विश्वास ठेवतात. ते थोडे कडक आणि हट्टी असू शकतात. ते नियमांचे पालन करतात आणि इतरांकडूनही तीच अपेक्षा ठेवतात.
त्यांचे आयुष्य सोपे नसते...
अंकशास्त्रानुसार हे लोक लहान गोष्टींकडे बारकाईने लक्ष देतात, म्हणूनच ते त्यांच्या कामात परिपूर्णता मिळवतात. त्यांचे आयुष्य सोपे नसते. त्यांना मार्गात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो, तरीही ते हार न मानता पुढे जात राहतात.
करिअर आणि यश...उच्च पदावर पोहचतात
अंकशास्त्रानुसार मूलांक 4 चे लोक राहूच्या प्रभावामुळे, ते प्रत्येक गोष्टीबद्दल उत्सुक असतात. त्यांना जे हवे आहे ते मिळवण्यासाठी ते काहीही करण्यास तयार असतात. म्हणूनच हे लोक यशस्वी होतातच. मूलांक 4 चे लोक त्यांच्या समर्पणामुळे, ज्या क्षेत्रात प्रवेश करतात, त्यात सर्वोच्च स्थानी पोहोचतात. पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही त्यांना आनंद मिळत नाही. कामाच्या ओझ्याखाली दबून ते कुटुंब आणि मित्रांपासून दुरावतात.
प्रचंड संपत्ती असूनही त्यांना शांती मिळत नाही...?
अंकशास्त्रानुसार मूलांक 4 चे लोक अत्यंत निष्ठावान असतात, पण ते आपल्या भावना सहजपणे व्यक्त करत नाहीत. यश मिळवल्यानंतरही ते अनेकदा एकाकी पडतात. प्रचंड संपत्ती असूनही त्यांना शांती मिळत नाही.
हेही वाचा
ज्याची होती भीती, तो 'कालसर्प योग' जुळला, 3 राशींना फुटणार घाम! पुढचे 14 दिवस राहू-केतूमुळे तणाव, अडथळे? सतर्कतेचा ग्रहयोग..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















