Chandra Grahan 2025: सध्या गणेशोत्सवाची धूम सर्वत्र दिसत आहे. वैदिक पंचांगानुसार, 7 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण होणार आहे. 2025 या वर्षातील हे दुसरे, शेवटचे चंद्रग्रहण असेल आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या वर्षातील हे एकमेव ग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. यासोबतच, हे 5 राशीच्या लोकांना खूप फायदे देखील देईल. चंद्रग्रहण ही केवळ एक खगोलीय घटना नाही तर, त्याचा लोकांच्या मनावर आणि जीवनावर खोलवर परिणाम होतो. 2025 या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातूनही खूप खास आहे. जाणून घ्या या चंद्रग्रहणाचा कोणत्या 5 राशींवर सकारात्मक परिणाम होईल.

चंद्रग्रहण 5 राशींना करणार मालामाल... 

वैदिक पंचांगानुसार, 7 सप्टेंबर रोजी वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण कुंभ राशीतील पूर्वा भाद्रपद नक्षत्रात होणार आहे. एवढेच नाही तर हे पूर्ण चंद्रग्रहण आहे, जे भारतात देखील दिसेल. त्यामुळे मेष राशीपासून मीन राशीच्या लोकांवर चंद्रग्रहणाचा परिणाम होईल. जाणून घ्या या चंद्रग्रहणाचा कोणत्या राशींवर सकारात्मक परिणाम होईल.

मेष

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण चांगले राहणार आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. हा काळ विशेषतः व्यावसायिकांसाठी चांगला राहील. तुम्हाला आजारांपासून आराम मिळेल.

मिथुन

ज्योतिषशास्त्रानुसार, या चंद्रग्रहणामुळे मिथुन राशीच्या लोकांचे अडकलेले पैसे मिळून त्यांचे बँक बॅलन्स वाढेल. आरोग्य सुधारेल. गुंतवणुकीवर चांगले परतावे मिळतील. काही महत्त्वाचे काम करता येईल.

कन्या

ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण मोठ्या प्रकरणात किंवा वादात विजय मिळवू शकते. शत्रूंचा पराभव होईल. आयुष्यात सुख-सुविधा वाढतील. मुलांकडून आनंद मिळेल.

वृश्चिक

ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रग्रहणामुळे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी धन आणि समृद्धी येईल. तुम्ही नवीन घर, वाहन खरेदी करू शकता. कुटुंबात आनंद वाढेल. पालकांचे आरोग्य सुधारेल. कामातील अडथळे दूर होतील आणि काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल.

धनु

ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण संपत्ती वाढवणारे ठरेल. नोकरी करणाऱ्यांना फायदा होईल. तुम्हाला पद, प्रतिष्ठा आणि पैसा मिळेल. भाऊ आणि बहिणीचे नाते अधिक घट्ट होईल.

हेही वाचा :           

Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींचं भाग्य घेऊन आलेत, पॉवरफुल धनयोग बनतोय! नोकरीत पगारवाढ, उत्पन्न वाढेल..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)