PM Kisan Yojana : कधी जमा होणार PM किसानचा 20 वा हप्ता? 'या' शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार नाहीत
तुम्ही जर पंतप्रधान किसान योजनेचा (PM Kisan Yojana 2025) लाभ घेत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana : तुम्ही जर पंतप्रधान किसान योजनेचा (PM Kisan Yojana 2025) लाभ घेत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जीएम किसानचा 20 वा हप्ता जमा होणार आहे. सरकार रक्कम हस्तांतरित करण्यापूर्वी, तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का? तसेच तुम्ही तुमचे eKYC अपडेट केली आहे का? हे पाहणं गरजेचं आहे. हे महत्वाचे काम केले नाहीतर 2000 रुपये जमा होणार नाहीत.
पंतप्रधान किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येणार?
या योजनेअंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना वर्षातून तीनदा आर्थिक मदत देते. एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च दरम्यान. शेवटचा म्हणजेच 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी जारी करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, 20 वा हप्ता जूनच्या कोणत्याही आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो असे मानले जाते. मात्र, सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.
पंतप्रधान किसान योजना म्हणजे काय?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, सरकार दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना 6000 रुपयांची ची मदत देते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. शेतकऱ्यांना शेतीच्या खर्चात काही प्रमाणात दिलासा देणे हा त्याचा उद्देश आहे. परंतु ही मदत फक्त अशा शेतकऱ्यांनाच उपलब्ध आहे ज्यांची माहिती पूर्ण आणि बरोबर आहे.
यादीत तुमचे नाव कसे तपासाल?
जर तुम्हाला तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे पहायचे असेल तर तुम्हाला पीएम किसान वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल. तिथे 'लाभार्थी यादी' वर क्लिक करून, तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गावाची माहिती भरा. यानंतर, 'Get Report' वर क्लिक केल्यावर यादी उघडेल ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव पाहू शकता.
eKYC अपडेट केले नाही तर पेमेंट थांबवले जाऊ शकते
जर तुम्ही अजून eKYC केली नसेल, तर तुमचा पुढील हप्ता थांबू शकतो. पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणीकृत प्रत्येक शेतकऱ्याला ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. यासाठी, तुम्ही OTP द्वारे ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करु शकता किंवा जवळच्या CSC केंद्रात जाऊन बायोमेट्रिक KYC करू शकता. ऑनलाइनसाठी, फक्त वेबसाइटला भेट द्या, eKYC पर्याय निवडा, आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर प्रविष्ट करा, OTP मिळाल्यानंतर सबमिट करा.
या कारणामुळं हप्ता जमा होणार नाही
बऱ्याचदा, शेतकऱ्यांचे बँक खात्याची माहिती अपूर्ण किंवा चुकीची असल्याने त्यांचे हप्ते थांबतात. जसे की चुकीचा IFSC कोड, खाते बंद करणे, आधार बँकेशी लिंक न करणे किंवा एकापेक्षा जास्त वेळा अर्ज करणे. याशिवाय, जर कोणताही सदस्य आयकर भरत असेल तर तो कुटुंब नियोजनासाठी पात्र मानला जात नाही. काही प्रकरणांमध्ये, फॉर्ममधून महत्त्वाची माहिती गहाळ असते, ज्यामुळे हप्ता येण्यासही अडथळा येतो.
बँक तपशील आणि आधार कार्ड देणे आवश्यक
या योजनेअंतर्गत मिळणारे सर्व पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येतात. यासाठी शेतकऱ्याने त्याच्या बँक खात्याची आणि आधार कार्डची माहिती देणे आवश्यक आहे. जर तुम्ही ही माहिती दिली नसेल तर तुम्हाला कोणताही फायदा मिळणार नाही. म्हणून, वेळेवर तुमचे तपशील तपासणे चांगले.
महत्वाच्या बातम्या:



















