Nanded: पेरणीसाठी बी-बियाणं आणि खते खरेदी करण्यासाठी बँकेतून काढलेले 90 हजार रुपये एका तरुणीने हातचलाखीनं चोरून नेल्याची घटना तामसा गावातील SBI बँकेत घडली आहे. ही धक्कादायक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून, चोरट्या तरुणीचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जात आहे. या घटनेनंतर शेतकरयानं थेट पोलीस ठाणं गाठत तक्रार केल्यानंतर तरुणीवर तामसा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पेरणीसाठी आता अनुकुल परिस्थिती तयार झाल्याने बी बियाणांसाठी, खतासाठी शेतकरी पैशांची जमवाजमव करताना दिसतायत.
बँकेच्या गेटमध्ये असताना पिशवीतून पैसे चोरले
हदगाव तालुक्यातील कंजारा गावचे वृद्ध शेतकरी गणपत चव्हाण हे बी-बियाणं खरेदीसाठी तामसा बाजारात आले होते. खरेदीसाठी आवश्यक असलेली 90 हजार रुपयांची रक्कम त्यांनी बँकेतून काढली. बी-बियाणे आणि खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्याने बँकेतून काढलेले पैसे एका तरुणीने चोरल्याची घटना नांदेडच्या तामसा गावात घडलीय. चोरीची ही हातचलाखीची घटना बँकेच्या CCTV कॅमेरात चित्रित झालीय. हदगाव तालुक्यातील कंजारा गावचे वृद्ध शेतकरी गणपत चव्हाण हे पेरणीच्या साहित्याच्या खरेदीसाठी तामसा बाजारपेठेत आले. खरेदीसाठी लागणारे 90,000 रुपये त्यांनी आपल्या बँकेच्या खात्यातून काढले अन ते खरेदीसाठी निघाले. माञ बँकेच्या गेटमध्येच एका तरुणीने त्यांच्या पिशवीमधले पैसे चोरून घेतले. चोरीची ही घटना बँकेच्या cctv कॅमेरात चित्रित झालीय. या शेतकऱ्यांने दिलेल्या तक्रारीवरून तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस चोरट्या तरुणींचा शोध घेतायत.
शेतकऱ्यांना शेतीची कामे करता येणार
राज्यातील वातावरणात (maharashtra Weather) हळूहळू बदल होत आहे. गेल्या काही दिवसापासून सुरु असलेला पावसाचा जोर कमी आला आहे. काही भागात तुरळक पाऊस होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, पुढील आठवडाभर राज्यात कसं हवामान राहिल? याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांनी दिली आहे. 31 मे पासून ते 6 जून पर्यंत जोराने वारं सुटणार आहे. या काळात पाऊस येणार नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी 6 जून पर्यंत पेरणीसाठी शेतजमिनीची मशागत करुन ठेवावी असं आवाहन पंजाबराव डख यांनी केलं आहे.
हेही वाचा
