Swabhimani Shetkari Saghtana : स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) सातत्यानं शेतकऱ्यांच्या संदर्भातील महत्वाचे प्रश्न घेऊन लढत आहे. नवीन वर्षात स्वाभिमानी शेतकरी संघटेनं आता नवा नारा देणार आहे.  1 जानेवारीपासून महाराष्ट्रात 'स्वाभिमानीचा नारा सातबारा कोरा' हे नवीन अभियाने  स्वाभिमानी शेतकरी संघटना नवीन वर्षापासून राबवणार आहे. शेतकऱ्यांनी शेतीवर घेतलेलं सर्व प्रकारचे कर्ज माफ करुन त्यांचा सातबारा कर्जमुक्त करावा, यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली युवक प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या संयोजनात स्वाभिमानीचा नारा कर्जमुक्त सातबारा अभियान  राज्यातील गावागावात राबवण्यात येणार आहे.


सोयाबीन कापूस दर वाढीची मागणी


नवीन वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानीचा नारा कर्जमुक्त सातबारा अभियान हे अभियान राबवणार आहे. 2013 मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही संकल्पणा राबवून सोयाबीन कापूस दर वाढीची मागणी केली होती. आता त्यांना त्याप्रमाणे दर द्यावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात 1 जानेवारी 2024 रोजी करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष  दामोदर इंगोले यांनी सांगितलं.


आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा स्वाभिमानीचा निर्णय


आगामी लोकसभा निवडणूक (Loksabha Election) स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी घेतला आहे. कोल्हापूरसह (Kolhapur Loksabha) सहा जागांवर लक्ष केंद्रित केलं असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने देखील आम्हाला फसवलं आहे, त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय आधीच जाहीर केला असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. 


शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली. मात्र, महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कालावधीत अनेक निर्णय शेतकरीविरोधी घेतले गेले. ऊसाच्या एफआरपीचे तुकडे केले. भूमी अधिग्रहण विधेयकात बदल करण्याचे काम महाविकास आघाडीच्या काळात झाले. यानंतर शरद पवारांना सात पानी पत्र लिहिलं होतं, पण उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अडीच वर्षांपूर्वीच आम्ही निर्णय घेतला होता.  ते पुढे म्हणाले की, भाजपने छोटे मोठे सगळेच पक्ष संपवण्याचा विडा उचलला आहे. शेतकऱ्यांची नावे घेऊन फसवलं. त्यामुळे स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. मतदारांना योग्य वाटल्यास मदत करतील. चळवळ सुरु राहिलं.


महत्वाच्या बातम्या:


Raju Shetti : महाविकास आघाडी आणि महायुतीने देखील आम्हाला फसवलं; राजू शेट्टींनी कोल्हापूरसह सहा जागांवर शड्डू ठोकला!